मुख्य सामग्रीवर वगळा

तंजावर - सरस्वती महाल ग्रंथालय आणि रामदास स्वामी मठ 


मागे एका पोस्टमध्ये आपण प्रचंड मोठ्या आणि सुंदर बृहदेश्वर मंदिराविषयी वाचले होते. (Here! ) तंजावर मध्ये बघण्याजोगी अजून देखील बरीच ठिकाणे आहेत. तंजावर तामिळनाडू राज्यात आहे. 

मराठा पॅलेस आणि म्युझियम हे तर नक्कीच बघण्याजोगे आहे. राजवाड्याच्या भिंतींवर रंगवलेली चित्रे आता फिकी झाली आहेत आणि राजवाड्याला दुरुस्तीची आणि देखभालीची खूप गरज आहे हे बघताना सतत जाणवत राहते. राजवाड्यातच रॉयल पॅलेस म्युझियम आणि आर्ट गॅलरी आहेत. तिथे अतिशय सुंदर कलावस्तूंचा संग्रह आहे. धातूच्या पुरातन मूर्तींचा मोठा संग्रह आहे. अनेक शतकांच्या आणि शतकांतल्या आहेत ह्या मूर्ती! नाण्यांचा संग्रह आहे. काही चित्रे आहेत. शस्त्रे देखील आहेत. राजघराण्यातील काही कपडे देखील ठेवलेले आहेत. 

आम्ही राजवाड्याला दिनांक १७ ऑगस्ट २०१८ ला भेट दिली तेव्हा दरबार हॉल काही दुरुस्तीच्या कारणासाठी बंद होता. 
 


Darbar Hall
📷 Wikimedia Commons



The royal palace museum
📷 Wikimedia Commons


तिथेच एक सुंदर मनोऱ्यासारखी इमारत आहे. त्यातील सर्वात वरचा मजला टेहळणीसाठी असावा असे वाटते. परिसरात संगीत महाल म्हणून पण एक इमारत आहे. एका बोगद्यासारख्या जिन्याने राजवाड्याच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाता येते. 

राजवाड्याच्या आवारात, सरस्वती महाल ग्रंथालय आहे. आशिया खंडातील सर्वात जुन्या ग्रंथालयांपैकी हे एक. इथे पुस्तके, हस्तलिखिते आणि भूर्जपत्रांचा विशाल संग्रह आहे. विविध विषयांवरची दुर्मिळ आणि पुरातन पुस्तके असलेला हा खजिना आश्चर्यचकित करणारा आहे. 



Saraswati Mahal Library
📷 Wikimedia Commons



Manuscript of Advait bhashy -Adi Shakaracharya.
📷 Wikimedia Commons



ह्या ग्रंथालयाची सोळाव्या शतकात स्थापना झाली ते नायक राजवटीतील राजांसाठी शाही ग्रंथालय म्हणून. नंतरच्या मराठा राजांनी पण संग्रहात मोलाची भर घातली व ग्रंथालय जतन केले. विशेषतः सर्फोजीराजे भोसले ह्यांनी देशोदेशींचे विविध भाषेतले तसेच देशभरातील दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते मिळवण्यासाठी अपार प्रयत्न केले व सरस्वती महाल ग्रंथालयाला त्याचे आत्ताचे स्थान प्राप्त करून दिले. त्यांचे नाव ग्रंथालयाला देणे औचित्यपूर्ण होते. आता हे ग्रंथालय 'महाराज सर्फोजीराजे भोसले सरस्वती महाल ग्रंथालय' म्हणून ओळखले जाते. ह्या ग्रंथालयात हस्तलिखिते आणि पुस्तके मिळून नक्कीच लाखाच्यावर संग्रह असेल! 

तळमजल्यावर ग्रंथालयाचे संग्रहालय आहे. ग्रंथालयात काय काय पाहायला मिळणार आहे ह्याची झलक आपल्याला इथे दिसते. नुसते ते संग्रहालय नीट पाहायचे असेल तरी काही तास राखून ठेवायला हवेत. आम्ही तळमजला पाहिला आणि ग्रंथालय बंद होण्याची वेळ झाल्याने उद्या परत येऊ, असे ठरवले. 

पण दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी, भूतपूर्व पंतप्रधान व आपल्या सर्वांचे लाडके नेते मा. अटल बिहारीजी वाजपेयी ह्यांच्या दुःखद निधनानिमित्त राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाला व सर्व शासकीय संस्था बंद राहिल्या. सरस्वती महाल ग्रंथालय आता तामिळनाडू सरकारच्या अखत्यारीत आहे. 

राजवाड्याच्या आवारातील प्रत्येक गोष्टीसाठी वेगळे तिकीट आहे. पण मला वाटते सगळ्याचे मिळून एकत्र असे, एकच तिकीट घेता येत असावे. सरस्वती महाल ग्रंथालयात एक पुस्तकांचे दुकान आहे. बाहेर कुठे मिळणार नाहीत अशी जुनी व काहीशी दुर्मिळ, सरस्वती महाल ग्रंथालयाने प्रकाशित केलेली पुस्तके इथे मिळतात. 




Books bought from 
Saraswati Mahal Granthalay





त्याच ट्रीपमध्ये आम्ही अजून एका महत्वाच्या ठिकाणाला भेट दिली ती म्हणजे रामदास स्वामी मठाला! महाराष्ट्राचे संत रामदास (१६०८-१६८१) ह्यांनी अफगाणिस्तान पासून ते सिंहलद्वीप म्हणजे श्रीलंके पर्यंत प्रवास केला. समाजाला जागृत करणे व ऐक्य घडवणे हे त्या दौऱ्यामुळे साध्य झाले. 

रामदास स्वामी एक थोर संत, कवी, तत्वज्ञ आणि अध्यात्मिक गुरु होते. ते छत्रपती शिवाजीमहाराजांचे अध्यात्मिक गुरु होते. जेव्हा त्यांच्या भारत भ्रमणात समर्थ रामदास स्वामी ह्यांनी तंजावरला भेट दिली तेव्हा तात्कालिन मराठा राजवटीचे राजे व्यंकोजीराजे भोसले ह्यांनी देखील त्यांचे शिष्यत्व पत्करले.
 
रामदास स्वामींनी देशभरात हजाराहून जास्त मठांची स्थापना केली. ही अभ्यासाची, पूजेची केंद्रे तर होतीच पण शक्तिसंवर्धनाची, चेतना जागृतीची केंद्रे देखील होती. त्यांनी तंजावरला एक मठ स्थापन केला व आपले शिष्य भीमस्वामी ह्यांना तिथे राहून मठाची देखभाल करण्यास सांगितले. भीमस्वामी तिथे अनेक वर्षे म्हणजे त्यांच्या अंतापर्यंत राहिले, मठाची देखभाल केली, इतकेच नव्हे तर तंजावरमध्येच आणखी काही मठांची स्थापना केली. 

आम्ही ज्या मठात गेलो, तो सापडायला जरा कठीण गेला. खूप वेळ आम्ही दुतर्फा घरे असलेल्या गल्लीबोळातून फिरलो, मग अखेर तो सापडला. रॉयल पॅलेस पासून अगदी चालत जाण्याच्या अंतरावर आहे हा मठ. 

आम्ही मठाधिपतींच्या वारसांना भेटू शकलो. ते आता मठाची व्यवस्था बघतात. त्यांनी आम्हाला सर्व माहिती सांगितली. 


 

The Muth from Outside


भरपूर हिंडल्यावर जेव्हा आम्हाला हा कळस दिसला तेव्हा आपण योग्य ठिकाणी पोचल्याची जाणीव झाली!



Entrance Of the Building




A small temple in the compound



Entrance




Entrance


Shri Ram Panchayatan 



The Current Mathadhipati



A closeup 



Ramdas Swami Painting




Zoli


असे म्हणतात की रामदास स्वामींचे हे मूळ चित्र आहे. त्यांना प्रत्यक्ष बघून काढलेले. तसे असेल तर मग हे चित्र काही शतके जुने आहे असेच म्हणावे लागेल. तसेच ही झोळी देखील काही शतके जुनी आहे असे सांगण्यात आले. इथे असलेले रामपंचायतन आणि चाफळच्या मंदिरातील रामपंचायतन हे दोन्ही सारखे आहे असे म्हणतात. तंजावर जवळच्या एका कलाकाराकडून समर्थानी घडवून घेतलेल्या मूर्ती आहेत ह्या. 

तुम्हाला बघायचे असेल, तर तुम्ही दासबोधाच्या हस्तलिखित प्रतीविषयी त्यांना विचारू शकता. आम्हाला खूप उत्सुकता होती आणि खरोखर हस्तलिखित दासबोध बघायला मिळाल्याने फार आनंद झाला. 


 

Dasbodh Hand Written copy



The wrappings










The wooden cover



Beautiful hand painted front page


 
Handwriting!


भिक्षाफेरी उत्सवाच्या वेळी काढली जाते. भजने म्हणत अनेक लोक त्यात सामील होतात. त्यात मराठी तसेच अमराठी लोकांचा समावेश असतो असे कळले. हा उत्सव वर्षप्रतिपदा ते रामनवमी असा असतो की दासनवमीला ते मात्र मी आता विसरले. 

तुम्ही तंजावर ला जाणार असाल तर ह्या मठांना नक्की भेट द्या. त्यांनी हे मठ अनेक शतके सांभाळले आहेत. आपण भेट देऊन, काही सहभाग राशी देणे, कमीतकमी इतके तर करूच शकतो. कोणी जाणार असेल तर त्यांना सांगा. मला देखील माझ्या मैत्रिणीने सांगितले होते म्हणूनच जायचे लक्षात आले. 

तंजावर कसे आहे? तर हे एक मध्यम आकाराचे उत्साही आणि गजबजलेले शहर आहे. दुकानांनी, लोकांनी ओसंडणारे रस्ते आणि बाजार, खूप सुंदर देवळे, मशिदी, चर्चेस ह्या शहराला त्याचे व्यक्तिमत्व प्रदान करतात. रस्त्यांवर बेताची वाहतूक व वर्दळ असते. त्यामुळे गर्दीला सरावलेल्या आपल्या डोळ्यांना चुकल्या चुकल्यासारखे होत नाही!!

तंजावर मध्ये उत्तम प्रतीची सुटी वस्त्रे अतिशय रास्त दरात मिळतात. मला तिथे एक छानशी सुती साडी घेता आली. 






आणि हे विसरू नका!!




#PlacesToVisitInThanjavur #MarathaPalaceThanjavur #ThanjvurMarathaKingdome #CholaNadu #ThanjavurTouristPlaces

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

कोस्टल कर्नाटक- २ मंगळुरू, मुलकी, उचिल, उडुपी

  आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते.  नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते.  मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात.  काद्री मंजुनाथ मंदिर  का...