मिर्जन किल्ला आदल्या दिवशी शरावती नदीतील बोटिंग आणि शरावती कांडला मॅन्ग्रोव्हना भेट दिल्यावर आम्ही विश्रांती घेऊन ताजेतवाने झालो. दुसऱ्या दिवशी लवकरच निघालो मिर्जन किल्ला बघायला. मिर्जन किल्ला हा होनावर गोकर्ण रस्त्यावरच आहे. कुमटा ओलांडून पुढे आलो की अघनाशिनी नदीच्या किनाऱ्यावर हा भुईकोट किल्ला आहे. मिर्जन किल्ला मिर्जन किल्ला मिर्जन किल्ला हा किल्ला बांधला होता राणी चेन्नभैरादेवी ही इतिहासाला ज्ञात आहे ती दीर्घकाळ म्हणजे तब्बल ५४ वर्षे राज्य करणारी राणी म्हणून. १५५२ ते १६०६ असा तिचा राज्यकाल होता. होनावर जवळच्या गिरसप्पा भागाची ती राणी होती. विजयनगर साम्राज्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवत ती महामंडलेश्वरी म्हणून राज्य करत होती. आजूबाजूच्या शत्रूंच्या कारवायांना जशास तसे उत्तर देत तिच्या दीर्घ राज्यकारभारात तिने प्रजेला शांती आणि सुबत्ता दिली. पोर्तुगीजांना देखील तिने दोन युद्धांत १५५९ आणि १५७० मध्ये पराभव चाखायला लावला. आधी केवळ रानटी पीक असणाऱ्या मिरीची लागवड करण्यासाठी तिने शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. पण नुसते उत्पादन वाढवून काय फायदा? त्या मालाला बाजारपे...
मी आधीच्या पोस्टमध्ये सांगितले होते की आजचा सूर्यास्त समुद्रात होता तर उद्याचा सूर्योदय शरावती नदीत असणार आहे! तोच हा सूर्योदय शरावती नदीत, कमळांच्या मध्ये. शरावती बॅकवॉटर बोटिंग दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहापर्यंत आम्ही बोटिंगच्या ठिकाणी पोचलो. कारण आम्हाला सूर्योदय चुकवायचा नव्हता. होनावर जवळचे शरावती नदीतील बोटिंग हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. आजूबाजूची शांतता, संथ पाणी, स्वच्छ नितळ पाण्यात वाकून आपले प्रतिबिंब न्याहाळणारी नारळाची झाडे, पाण्यात अध्ये मध्ये असलेली लहानशी बेटे, खारफूटीची जंगले, कमळाची पाण्यावर तरंगणारी पाने, उगवत्या सूर्याची पाण्यात मिसळणारी किरणे, त्याने तांबूस झालेले पाणी .. एक वेगळेच जग असते ते. तुम्ही जितक्या वेळासाठी बोट ठरवलेली असेल.. तास दीड तास.. तो वेळ, तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असणार हे मी अगदी खात्रीने सांगू शकते. आपोआप जगाचा, आयुष्याचा कोलाहल मंद होत जातो. पहाटेचा मवाळ प्रकाश, पाण्यावर हेलकावणारी नाव, हवेतला अगदी किंचितसा सुखद गारवा आणि मुरत जाणारी शांतता ह्या सगळ्याने मन निवळत जाते. आम्ही गेलो त्या दिवशी,...