मिर्जन किल्ल्यापासून निघाल्यावर गोकर्ण महाबळेश्वरला जाण्याचा रस्ता सुंदर होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार झाडे होती. वळण आले की मधूनच डोकावणारा समुद्र, नंतर सामोराच आला. गोकर्ण गोकर्ण गोकर्ण गोकर्ण गंगावली आणि अघनाशिनी नद्या आणि सिंधु सागर (अरबी समुद्र) ह्याच्या मधल्या भागात गोकर्ण महाबळेश्वर वसलेले आहे. खरे तर पूर्वी लहानसे गांव असणार. पण आता पर्यटक, परदेशी पर्यटकांसाठी समुद्रकिनाऱ्यावर उभे राहिलेले असंख्य रिसॉर्ट्स आणि अन्य सुविधा, मोठ्या प्रमाणात भेट देणारे भाविक ह्यामुळे गाव विस्तारते आहे. गजबजलेले आहे. गोकर्ण महाबळेश्वरचा उल्लेख तर शतकानुशतके आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात आढळतो. त्याला दक्षिण काशी असेही म्हटले जाते. गोकर्ण महाबळेश्वर मध्ये आपण शिरलो की शिव मंदिराकडे जाताना आधी लागते श्री महागणपती मंदिर. तर तिथे जाण्यासाठी आमची गाडी एका चिंचोळ्या रस्त्याने चालली होती. आता कोपऱ्यावर महागणपती मंदिर येणार म्हणून मी उत्सुकतेने पाहत होते. दोन्ही बाजूला घरे, दुकाने अगदी चिकटून चिकटून उभी होती. सगळ्याच जुन्या इमारती....
मिर्जन किल्ला आदल्या दिवशी शरावती नदीतील बोटिंग आणि शरावती कांडला मॅन्ग्रोव्हना भेट दिल्यावर आम्ही विश्रांती घेऊन ताजेतवाने झालो. दुसऱ्या दिवशी लवकरच निघालो मिर्जन किल्ला बघायला. मिर्जन किल्ला हा होनावर गोकर्ण रस्त्यावरच आहे. कुमटा ओलांडून पुढे आलो की अघनाशिनी नदीच्या किनाऱ्यावर हा भुईकोट किल्ला आहे. मिर्जन किल्ला मिर्जन किल्ला मिर्जन किल्ला हा किल्ला बांधला होता राणी चेन्नभैरादेवी ही इतिहासाला ज्ञात आहे ती दीर्घकाळ म्हणजे तब्बल ५४ वर्षे राज्य करणारी राणी म्हणून. १५५२ ते १६०६ असा तिचा राज्यकाल होता. होनावर जवळच्या गिरसप्पा भागाची ती राणी होती. विजयनगर साम्राज्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवत ती महामंडलेश्वरी म्हणून राज्य करत होती. आजूबाजूच्या शत्रूंच्या कारवायांना जशास तसे उत्तर देत तिच्या दीर्घ राज्यकारभारात तिने प्रजेला शांती आणि सुबत्ता दिली. पोर्तुगीजांना देखील तिने दोन युद्धांत १५५९ आणि १५७० मध्ये पराभव चाखायला लावला. आधी केवळ रानटी पीक असणाऱ्या मिरीची लागवड करण्यासाठी तिने शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. पण नुसते उत्पादन वाढवून काय फायदा? त्या मालाला बाजारपे...