मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

लोकमान्य टिळक जन्मस्थान, रत्नागिरी

लोकमान्य टिळक म्हणजेच   बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक महत्वाचे नाव.  केसरी आणि मराठाचे संपादक, गणित आणि कायदयाचे शिक्षक, स्वातंत्र्यसमराला दिशा देणारे एक प्रभावी राष्ट्रीय नेतृत्व, गीतेवर भाष्य लिहिणारे तत्वचिंतक, संशोधक अशा विविध रूपांत आपण त्यांना ओळखतो.  त्यांनी म्हटलेले 'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ' हे नुसते वाक्य किंवा घोषणा राहिली नाही तर ती भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजली. स्वातंत्र्यसंग्रामाला ह्यातून ऊर्जा मिळाली.  वंदे मातरमचा घोष बंगालासोबतच संपूर्ण देशांत गुंजला आणि स्वातंत्र्याची प्रेरणा बनला. त्यात 'लाल बाल पाल' ह्या त्रयीचा मोठा वाटा होता.  ब्रिटिश सरकार त्यांना 'भारतीय असंतोषाचे जनक' असे म्हणत असे. निद्रिस्त समाजाला जागे करण्याचे श्रेय लोकमान्य टिळकांना जाते.  त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ ला रत्नागिरी येथे झाला. आज आपण पाहणार आहोत ते जिथे त्यांचा जन्म झाला ते रत्नागिरीमधील घर. आता तिथे स्मारक केलेले आहे.  वयाच्या साधारण दहाव्या वर्षापर्यंत लोकमान्य टिळक ह्या वास्तूत राहिले. ही वास्तू रत...
अलीकडील पोस्ट

कोस्टल कर्नाटक ८ - गोकर्ण महाबळेश्वर

गोकर्ण महाबळेश्वरजवळ.  मिर्जन किल्ल्यापासून निघाल्यावर गोकर्ण महाबळेश्वरला जाण्याचा  रस्ता सुंदर होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार झाडे होती. वळण आले की मधूनच डोकावणारा समुद्र, नंतर सामोराच आला.  गोकर्ण  गोकर्ण  गोकर्ण  गोकर्ण  गंगावली आणि अघनाशिनी नद्या आणि सिंधु सागर (अरबी समुद्र) ह्याच्या मधल्या भागात गोकर्ण महाबळेश्वर वसलेले आहे. खरे तर पूर्वी लहानसे गांव असणार. पण आता पर्यटक, परदेशी पर्यटकांसाठी समुद्रकिनाऱ्यावर उभे राहिलेले असंख्य रिसॉर्ट्स आणि अन्य सुविधा, मोठ्या प्रमाणात भेट देणारे भाविक ह्यामुळे गाव विस्तारते आहे. गजबजलेले आहे.  गोकर्ण महाबळेश्वरचा उल्लेख तर शतकानुशतके आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात आढळतो.  त्याला दक्षिण काशी असेही म्हटले जाते.  गोकर्ण महाबळेश्वर मध्ये आपण शिरलो की शिव मंदिराकडे जाताना आधी लागते श्री महागणपती मंदिर. तर तिथे जाण्यासाठी आमची गाडी एका चिंचोळ्या रस्त्याने चालली होती. आता कोपऱ्यावर महागणपती मंदिर येणार म्हणून मी उत्सुकतेने पाहत होते. दोन्ही बाजूला घरे, दुकाने अगदी चिकटून चिकटून उभी होत...

कोस्टल कर्नाटक ७ - मिर्जन किल्ला

मिर्जन किल्ला   आदल्या दिवशी शरावती नदीतील बोटिंग आणि शरावती कांडला मॅन्ग्रोव्हना भेट दिल्यावर आम्ही विश्रांती घेऊन ताजेतवाने झालो. दुसऱ्या दिवशी लवकरच निघालो मिर्जन किल्ला बघायला.  मिर्जन किल्ला हा होनावर गोकर्ण रस्त्यावरच आहे. कुमटा ओलांडून पुढे आलो की अघनाशिनी नदीच्या किनाऱ्यावर हा भुईकोट किल्ला आहे.  मिर्जन किल्ला मिर्जन किल्ला मिर्जन किल्ला हा किल्ला बांधला होता राणी चेन्नभैरादेवी ही इतिहासाला ज्ञात आहे ती दीर्घकाळ म्हणजे तब्बल ५४ वर्षे राज्य करणारी राणी म्हणून. १५५२ ते १६०६ असा तिचा राज्यकाल होता. होनावर जवळच्या गिरसप्पा भागाची ती राणी होती.  विजयनगर साम्राज्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवत ती महामंडलेश्वरी म्हणून राज्य करत होती. आजूबाजूच्या शत्रूंच्या कारवायांना जशास तसे उत्तर देत तिच्या दीर्घ राज्यकारभारात तिने प्रजेला शांती आणि सुबत्ता दिली. पोर्तुगीजांना देखील तिने दोन युद्धांत १५५९ आणि १५७० मध्ये पराभव चाखायला लावला.  आधी केवळ रानटी पीक असणाऱ्या मिरीची लागवड करण्यासाठी तिने शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. पण नुसते उत्पादन वाढवून काय फायदा? त्या मालाला बाजारपे...