Skip to main content

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

 कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे. 

उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच. 

फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर!

त्रासी मरवंथे बीच 
📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi

उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना. 

मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!!

पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे आणि दुसऱ्या बाजूला समुद्र आहे हे अनोखेपण तर होतेच ना!!

हे दृश्य कसे दिसत होते हे तिथे काढलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता. 

Trase Marvanthe Beach 

https://youtu.be/c_hCEkdj5WU

पश्चिम घाटात कोडाचाद्री जवळ उगम पावणारी सौपर्णिका नदी कोल्लूरच्या मुकाम्बिका मंदिराजवळून वाहते म्हणून हिला कोल्लुरू असेही म्हटले जाते. 

आमचा ह्या नंतरचा कार्यक्रम होता कोल्लुरू नदीतील बोटिंगचा. तसे फलक लावलेले नसल्याने हे ठिकाण शोधावे लागले. मग एका दुकानदाराने फोन कल्यावर दोन तरुण मुले आली आणि आम्हाला बोटिंगसाठी घेऊन गेली. कोल्लुरू नदी एका लहानशा बेटामुळे दुभंगते आणि बेट संपल्यावर पुन्हा एकत्र येते. 

कोल्लुरू नदी 
हे मध्ये दिसते आहे ते लहानसे कुरु बेट. ह्याचे गुगल मॅप लोकेशन पाहिलेत की कल्पना येईल. 

कुरु बेट 
इतके शांततेत बोटिंग करायचे, आपल्याखेरीज नदीत दुसरे कोणी नाही, असे अनुभवायचे तर अशाच एखाद्या भागात यायला पाहिजे. इथे तसे अजून पर्यटन फारसे विकसित झालेले नाही. 

कोल्लुरू नदी 

कोल्लुरू नदी 

बोटिंगची तयारी 

बोटीतून दिसणारे दृश्य 

बोटीतून दिसणारे दृश्य 

बोटीतून दिसणारे दृश्य 

नाव माहिती नाही!

बोटीतून दिसणारे दृश्य 

थोड्याच वेळात आम्ही कुरु बेटावर पोचलो. हे अगदी लहानसे बेट आहे. माझ्या आठवणीत कुरु बेट राहिले आहे आणि लक्षात राहील ते असे.. नारळ, केळी, पोफळीची झाडे, सुपीक मातीमुळे लवलवत असलेली हिरवी पोपटी शेती, स्थानिकांची अगदीच मोजकी घरे, दूर अंतरावर दिसणारे मंदिर आणि प्रगाढ शांतता!! आम्ही सकाळच्या वेळी गेलो होतो. पण जर पहाटे कोणी तिकडे गेले तर खूप पक्षीदेखील दिसतात असे कळले. 

कुरु बेट 
कुरु बेट 

कुरु बेट 
कुरू बेटावर 
कुरू बेटावर 
बोटिंग झाल्यावर आम्ही जवळच असलेल्या वराहमंदिरात गेलो. वराहमंदिरे फारशी आढळत नाहीत. एरवी मंदिरातून दशावतार असतात त्यातील एक म्हणून वराह मूर्ती पाहायला मिळते. पण वराह अवताराचे स्वतंत्र मंदिर फारच क्वचित बघायला मिळते. म्हणून हे विशेष वाटले. तिथे कांताराचे शूटिंग झाले होते असे कळले. मी कांतारा सिनेमा पाहिलेला नसल्याने आम्हाला सांगणाऱ्याची उत्सुकता एकदमच मावळली!!
त्यानंतर त्रासि मारवंते बीचजवळच्या रस्त्याने आम्ही परत निघालो. अनेगुडडे गणपती मंदिराला जाताना आधी कुंभासी येथील चंडिका परमेश्वरी मंदिरात गेलो. नव्याने प्रवेशद्वाराचे काम चालू होते. 
कुंभासी चंडिका परमेश्वरी मंदिर प्रवेशद्वार 

कुंभासी चंडिका परमेश्वरी मंदिर 
कुंभासी प्रसिद्ध आहे ते अनेगुड्डे श्री विनायक मंदिरासाठी. एका टेकडीवर असणाऱ्या मंदिरासाठी एक पिटुकला देखणा घाट चढून गाडी जाते. 
कुंभासी हे नाव इथे भीमाने कुम्भासुराचा तलवारीने वध केला त्यावरून पडले आहे. विनायकाने गजरूपात 
 ( गजरूप विश्वम्भर) ही तलवार भीमाला दिली होती. टेकडीचे नाव कानडीत अनेगुड्डी आणि संस्कृतमध्ये गजगिरी असे पडले. 
ही सर्व माहिती मंदिरात लिहिलेली आहे!!येथील मूर्ती स्वयंभू आहे. साधारण १२ फुटाची मूर्ती आहे. भाविकांमध्ये ह्या स्थानाची मोठी महती आहे. त्यामुळे इथे गर्दी असते. मंदिरात आत फोटो काढण्याची अनुमती नाही. हे बाहेरून काढलेले फोटो आपण पाहू शकता. 
श्री विनायक मंदिर, अनेगुड्डे 
श्री विनायक मंदिर, अनेगुड्डे 
श्री विनायक मंदिर, अनेगुड्डे 
श्री विनायक मंदिर, अनेगुड्डे 
ह्या भागातील सर्व मंदिरांप्रमाणे इथेही सुंदर हार फुले विकणारे दुकान होते. 
श्री विनायक मंदिराजवळ, अनेगुड्डे 
ह्या मन्दिरातील प्रसाद भोजन सात्विक आणि फार चविष्ट होते. भोपळ्याची पातळ भाजी आणि भात. हे झाले की खीर! खीर नारळाच्या दुधातील होती म्हणून मला खाता आली ह्याचा नंद चेहऱ्यावर झळकतो आहे!! प्रसादाचे भोजन खरोखर तृप्त करणारे असते!
प्रसादाची खीर 
त्या नंतर आमचे पुढचे ठिकाण होते मालपे बीच. आम्ही तिथे पोचलो आणि बोटिंगच्या रांगेत उभे राहिलो. पण त्या दिवशी, त्या वेळी भयंकर जोरात वारा वाहत होता. त्यामुळे बोटिंग बंद केले होते. ज्या बोटी आधीच समुद्रात गेलेल्या होत्या त्यांनाच कसेबसे परत आणले जात होते. 
इतक्या लांब अंतरावर येऊन बोटिंग करायला नाही मिळणार म्हणून त्या वेळी थोडे खट्टू झाल्यासारखे वाटले तरी वाऱ्याचा वेग पाहता त्यांनी बोटिंग बंद करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता. नंतर कुठे कुठे झालेल्या अपघाताच्या बातम्या ऐकल्यावर तर हे विशेषच पटले. 
मालपे बीच 

मालपे बीच 

इथून बोटीने आम्ही जाणार होतो सेंट मेरीज आयलंडला. ह्या बेटावर बसाल्टचे उभे खडक आहेत, जणू षटकोनी खांब असावेत असे. पूर्वी असे खडक आम्ही कोरियाच्या जेजू बेटावर पहिले होते. इथलेही पाहण्याची उत्सुकता होती. पण आम्ही तिथे जावे असे वाऱ्याच्या मनात नव्हते तर काय करणार?!!ह्या खडकांचा फोटो आपल्याला आंतरजालावर निश्चितच पाहायला मिळेल. 
मालपेचा समुद्रकिनारा सुंदर आहे. इथे अनेक वॉटर स्पोर्ट्स आहेत जे त्या दिवशी अर्थातच बंद होते. 
त्या दिवशी वारा किती होता, मालपेचा समुद्रकिनारा कसा आहे ते आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहता येईल. 

https://youtu.be/pfpGmUJ-a5A
आता सेंट मेरीज बेटावर जाणार नव्हतो म्हटल्यावर आमच्या कडे भरपूर वेळ होता. म्हणून आम्ही दुसरी दोन ठिकाणे पाहण्याचे ठरवले. 
मग आम्ही गेलो मणिपाल लेकला. स्थानिक लोक ह्याला मनापल्ला की मणीपल्ला लेक म्हणतात. 
मणीपालला जाणे हा एक वेगळाच अनुभव आहे. अनेक शैक्षणिक संस्था, मोठमोठी हॉस्पिटल्स, सगळीकडे तरुण मुले असे सगळे दिसत राहते. 
आम्ही ज्या तळ्यावर गेलो होतो तिथेही अनेक तरुण मुली फिरायला आल्या होत्या, कोणी निवांत झाडाच्या सावलीत गप्पा मारत होत्या, कोणी अभ्यास करत होत्या. 
तळ्याभोवतीने चालायला चांगला रस्ता केलेला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरपूर झाडे असल्याने ऊन जाणवत नव्हते. 
मणिपाल लेक

मणिपाल लेक

मणिपाल लेक

मणिपाल लेक

मणिपाल लेक

मणिपाल लेक

मणिपाल लेक

मणिपाल लेक

मणिपाल लेक 

हा फलक फार आवडला आहे. असे करायला हवे सगळ्यांनी. कदाचित ह्या लेकजवळ सगळे जण करत असतीलही. कारण तळ्याभोवतीचे रस्ते अगदी स्वच्छ होते!!

मणिपाल लेक गार्डन 

मणिपाल लेक

मणिपाल लेक

इथून आम्ही सूर्यास्त बघण्यासाठी मणिपालमध्ये प्रसिद्ध असलेल्या एन्ड पॉईंटला जायचे ठरवले. मणिपाल लेकजवळून बऱ्याच वेळाने रिक्षा मिळाली. एन्ड पॉईंटला जातो तर तिकडे भरपूर गर्दी होती. तरी आम्हाला वाटले की सूर्यास्त बघण्यासाठी इतकी मुले जात असतील. पण जसजसे पुढे जात होतो तसतशी गर्दी वाढू लागली आणि पुढे तर पोलिसांनी रस्ताच बंद केला होता!!
त्या दिवशी एन्ड पॉइंट ग्राउंडवर सुप्रसिद्ध गायक शानचा कार्यक्रम होता. त्यामुळे तो संपूर्ण भाग आम जनतेसाठी बंद केला होता. 
तर अशा रीतीने त्या एका दिवसात मालपे बीच आणि मणिपाल एन्ड पॉईंट अशी दोन ठिकाणे आम्हाला वेगवेगळ्या कारणांमुळे पाहता नाही आली. पण मोठ्या ट्रीपमध्ये असे लहान लहान प्रसंग तर घडत राहणारच ना!!
त्या दिवसांत बाकी अनुभव इतके सुंदर घेतले होते की आधी ठरवलेली ही दोन ठिकाणे पाहता न आल्याची निराशा फार जाणवली नाही. 

#मराठीब्लॉग #प्रवासवर्णन #भटकंती #कर्नाटकपर्यटन #कोस्टलकर्नाटक #समुद्रकिनारा #प्रवास #मराठीब्लॉगर #मराठीट्रॅव्हल#MaravantheBeach #TrasiBeach #KuruIsland #KollurRiver #AneguddeTemple #ManipalLake #Udupi #UdupiTourism #CoastalKarnataka #KarnatakaTourism#MarathiTravelBlogger #IndianTravelBlogger #HiddenGemsOfIndia #IncredibleIndia#NatureLovers #SilverVeganTravels




Comments

Popular posts from this blog

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....

कोस्टल कर्नाटक- २ मंगळुरू, मुलकी, उचिल, उडुपी

  आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते.  नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते.  मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात.  काद्री मंजुनाथ मंदिर  का...

महेश्वर

महेश्वर हे मध्यप्रदेश पर्यटन निगमच्या पर्यटन स्थळांमधले एक महत्वाचे नाव आहे. पण करोडो भारतीयांसाठी ते केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर एक तीर्थस्थान असते. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेले स्थान आहे.  महेश्वर किल्ला प्रवेशद्वार  राजवाडा प्रवेशद्वार  बाह्यरूप  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  राजवाडा प्रवेशद्वार  अहिल्याबाई होळकर हे केवळ भारताच्याच नव्हे तर विश्वाच्या इतिहासातील एक सोनेरी पान. संपूर्ण मानव विश्वातील यशस्वी स्त्री राज्यकर्त्यांची सूची करायची झाली तर अहिल्याबाई होळकरांचे नाव ठळकपणे लिहायला लागेल.   31 मे 2025 ला त्यांची तीनशेवी जयंती आहे. पण 300 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या अहिल्याबाईंचे आयुष्य अगदी आजच्या आधुनिक काळातल्या आव्हानातही मार्गदर्शक ठरावे असेच आहे.  त्यांच्याविषयीचा आदर मनात घेऊनच आपण महेश्वरला जातो आणि त्या भावनेच्या प्रकाशात महेश्वर पाहतो. महेश्वरला फार मोठी प्राचीन परंपरा आहे. स्कंद पुराणाच्या रेवा खंडात आणि वायू पुराणाच्या नर्मदा रहस्य मध्ये महिष्मती म्हणजे महेश्वरचे वर्णन आलेले आहे. 'गुप्...