Skip to main content

तंजावर - सरस्वती महाल ग्रंथालय आणि रामदास स्वामी मठ 


मागे एका पोस्टमध्ये आपण प्रचंड मोठ्या आणि सुंदर बृहदेश्वर मंदिराविषयी वाचले होते. (Here! ) तंजावर मध्ये बघण्याजोगी अजून देखील बरीच ठिकाणे आहेत. तंजावर तामिळनाडू राज्यात आहे. 

मराठा पॅलेस आणि म्युझियम हे तर नक्कीच बघण्याजोगे आहे. राजवाड्याच्या भिंतींवर रंगवलेली चित्रे आता फिकी झाली आहेत आणि राजवाड्याला दुरुस्तीची आणि देखभालीची खूप गरज आहे हे बघताना सतत जाणवत राहते. राजवाड्यातच रॉयल पॅलेस म्युझियम आणि आर्ट गॅलरी आहेत. तिथे अतिशय सुंदर कलावस्तूंचा संग्रह आहे. धातूच्या पुरातन मूर्तींचा मोठा संग्रह आहे. अनेक शतकांच्या आणि शतकांतल्या आहेत ह्या मूर्ती! नाण्यांचा संग्रह आहे. काही चित्रे आहेत. शस्त्रे देखील आहेत. राजघराण्यातील काही कपडे देखील ठेवलेले आहेत. 

आम्ही राजवाड्याला दिनांक १७ ऑगस्ट २०१८ ला भेट दिली तेव्हा दरबार हॉल काही दुरुस्तीच्या कारणासाठी बंद होता. 
 


Darbar Hall
📷 Wikimedia Commons



The royal palace museum
📷 Wikimedia Commons


तिथेच एक सुंदर मनोऱ्यासारखी इमारत आहे. त्यातील सर्वात वरचा मजला टेहळणीसाठी असावा असे वाटते. परिसरात संगीत महाल म्हणून पण एक इमारत आहे. एका बोगद्यासारख्या जिन्याने राजवाड्याच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाता येते. 

राजवाड्याच्या आवारात, सरस्वती महाल ग्रंथालय आहे. आशिया खंडातील सर्वात जुन्या ग्रंथालयांपैकी हे एक. इथे पुस्तके, हस्तलिखिते आणि भूर्जपत्रांचा विशाल संग्रह आहे. विविध विषयांवरची दुर्मिळ आणि पुरातन पुस्तके असलेला हा खजिना आश्चर्यचकित करणारा आहे. 



Saraswati Mahal Library
📷 Wikimedia Commons



Manuscript of Advait bhashy -Adi Shakaracharya.
📷 Wikimedia Commons



ह्या ग्रंथालयाची सोळाव्या शतकात स्थापना झाली ते नायक राजवटीतील राजांसाठी शाही ग्रंथालय म्हणून. नंतरच्या मराठा राजांनी पण संग्रहात मोलाची भर घातली व ग्रंथालय जतन केले. विशेषतः सर्फोजीराजे भोसले ह्यांनी देशोदेशींचे विविध भाषेतले तसेच देशभरातील दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते मिळवण्यासाठी अपार प्रयत्न केले व सरस्वती महाल ग्रंथालयाला त्याचे आत्ताचे स्थान प्राप्त करून दिले. त्यांचे नाव ग्रंथालयाला देणे औचित्यपूर्ण होते. आता हे ग्रंथालय 'महाराज सर्फोजीराजे भोसले सरस्वती महाल ग्रंथालय' म्हणून ओळखले जाते. ह्या ग्रंथालयात हस्तलिखिते आणि पुस्तके मिळून नक्कीच लाखाच्यावर संग्रह असेल! 

तळमजल्यावर ग्रंथालयाचे संग्रहालय आहे. ग्रंथालयात काय काय पाहायला मिळणार आहे ह्याची झलक आपल्याला इथे दिसते. नुसते ते संग्रहालय नीट पाहायचे असेल तरी काही तास राखून ठेवायला हवेत. आम्ही तळमजला पाहिला आणि ग्रंथालय बंद होण्याची वेळ झाल्याने उद्या परत येऊ, असे ठरवले. 

पण दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी, भूतपूर्व पंतप्रधान व आपल्या सर्वांचे लाडके नेते मा. अटल बिहारीजी वाजपेयी ह्यांच्या दुःखद निधनानिमित्त राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाला व सर्व शासकीय संस्था बंद राहिल्या. सरस्वती महाल ग्रंथालय आता तामिळनाडू सरकारच्या अखत्यारीत आहे. 

राजवाड्याच्या आवारातील प्रत्येक गोष्टीसाठी वेगळे तिकीट आहे. पण मला वाटते सगळ्याचे मिळून एकत्र असे, एकच तिकीट घेता येत असावे. सरस्वती महाल ग्रंथालयात एक पुस्तकांचे दुकान आहे. बाहेर कुठे मिळणार नाहीत अशी जुनी व काहीशी दुर्मिळ, सरस्वती महाल ग्रंथालयाने प्रकाशित केलेली पुस्तके इथे मिळतात. 




Books bought from 
Saraswati Mahal Granthalay





त्याच ट्रीपमध्ये आम्ही अजून एका महत्वाच्या ठिकाणाला भेट दिली ती म्हणजे रामदास स्वामी मठाला! महाराष्ट्राचे संत रामदास (१६०८-१६८१) ह्यांनी अफगाणिस्तान पासून ते सिंहलद्वीप म्हणजे श्रीलंके पर्यंत प्रवास केला. समाजाला जागृत करणे व ऐक्य घडवणे हे त्या दौऱ्यामुळे साध्य झाले. 

रामदास स्वामी एक थोर संत, कवी, तत्वज्ञ आणि अध्यात्मिक गुरु होते. ते छत्रपती शिवाजीमहाराजांचे अध्यात्मिक गुरु होते. जेव्हा त्यांच्या भारत भ्रमणात समर्थ रामदास स्वामी ह्यांनी तंजावरला भेट दिली तेव्हा तात्कालिन मराठा राजवटीचे राजे व्यंकोजीराजे भोसले ह्यांनी देखील त्यांचे शिष्यत्व पत्करले.
 
रामदास स्वामींनी देशभरात हजाराहून जास्त मठांची स्थापना केली. ही अभ्यासाची, पूजेची केंद्रे तर होतीच पण शक्तिसंवर्धनाची, चेतना जागृतीची केंद्रे देखील होती. त्यांनी तंजावरला एक मठ स्थापन केला व आपले शिष्य भीमस्वामी ह्यांना तिथे राहून मठाची देखभाल करण्यास सांगितले. भीमस्वामी तिथे अनेक वर्षे म्हणजे त्यांच्या अंतापर्यंत राहिले, मठाची देखभाल केली, इतकेच नव्हे तर तंजावरमध्येच आणखी काही मठांची स्थापना केली. 

आम्ही ज्या मठात गेलो, तो सापडायला जरा कठीण गेला. खूप वेळ आम्ही दुतर्फा घरे असलेल्या गल्लीबोळातून फिरलो, मग अखेर तो सापडला. रॉयल पॅलेस पासून अगदी चालत जाण्याच्या अंतरावर आहे हा मठ. 

आम्ही मठाधिपतींच्या वारसांना भेटू शकलो. ते आता मठाची व्यवस्था बघतात. त्यांनी आम्हाला सर्व माहिती सांगितली. 


 

The Muth from Outside


भरपूर हिंडल्यावर जेव्हा आम्हाला हा कळस दिसला तेव्हा आपण योग्य ठिकाणी पोचल्याची जाणीव झाली!



Entrance Of the Building




A small temple in the compound



Entrance




Entrance


Shri Ram Panchayatan 



The Current Mathadhipati



A closeup 



Ramdas Swami Painting




Zoli


असे म्हणतात की रामदास स्वामींचे हे मूळ चित्र आहे. त्यांना प्रत्यक्ष बघून काढलेले. तसे असेल तर मग हे चित्र काही शतके जुने आहे असेच म्हणावे लागेल. तसेच ही झोळी देखील काही शतके जुनी आहे असे सांगण्यात आले. इथे असलेले रामपंचायतन आणि चाफळच्या मंदिरातील रामपंचायतन हे दोन्ही सारखे आहे असे म्हणतात. तंजावर जवळच्या एका कलाकाराकडून समर्थानी घडवून घेतलेल्या मूर्ती आहेत ह्या. 

तुम्हाला बघायचे असेल, तर तुम्ही दासबोधाच्या हस्तलिखित प्रतीविषयी त्यांना विचारू शकता. आम्हाला खूप उत्सुकता होती आणि खरोखर हस्तलिखित दासबोध बघायला मिळाल्याने फार आनंद झाला. 


 

Dasbodh Hand Written copy



The wrappings










The wooden cover



Beautiful hand painted front page


 
Handwriting!


भिक्षाफेरी उत्सवाच्या वेळी काढली जाते. भजने म्हणत अनेक लोक त्यात सामील होतात. त्यात मराठी तसेच अमराठी लोकांचा समावेश असतो असे कळले. हा उत्सव वर्षप्रतिपदा ते रामनवमी असा असतो की दासनवमीला ते मात्र मी आता विसरले. 

तुम्ही तंजावर ला जाणार असाल तर ह्या मठांना नक्की भेट द्या. त्यांनी हे मठ अनेक शतके सांभाळले आहेत. आपण भेट देऊन, काही सहभाग राशी देणे, कमीतकमी इतके तर करूच शकतो. कोणी जाणार असेल तर त्यांना सांगा. मला देखील माझ्या मैत्रिणीने सांगितले होते म्हणूनच जायचे लक्षात आले. 

तंजावर कसे आहे? तर हे एक मध्यम आकाराचे उत्साही आणि गजबजलेले शहर आहे. दुकानांनी, लोकांनी ओसंडणारे रस्ते आणि बाजार, खूप सुंदर देवळे, मशिदी, चर्चेस ह्या शहराला त्याचे व्यक्तिमत्व प्रदान करतात. रस्त्यांवर बेताची वाहतूक व वर्दळ असते. त्यामुळे गर्दीला सरावलेल्या आपल्या डोळ्यांना चुकल्या चुकल्यासारखे होत नाही!!

तंजावर मध्ये उत्तम प्रतीची सुटी वस्त्रे अतिशय रास्त दरात मिळतात. मला तिथे एक छानशी सुती साडी घेता आली. 






आणि हे विसरू नका!!




#PlacesToVisitInThanjavur #MarathaPalaceThanjavur #ThanjvurMarathaKingdome #CholaNadu #ThanjavurTouristPlaces

Comments

  1. समर्थरामदास स्वामींच्या मठ बघितलास किती मस्त 🙏🙏🙏

    ReplyDelete
  2. वा तिकडे जाऊन मठात जाणे मस्त वाटले असेल ना

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...

शिवथरघळ

जर आपण भारताचा नकाशा पाहिला  तर आपल्याला नकाशात डावीकडे, गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत काळसर  हिरवी रेषा दिसते. ही रेषा  गुजराथ येथून सुरु होते  आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू मार्गे जाऊन केरळला पोहोचते. ती रेषा म्हणजेच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट म्हणजे दख्खनच्या पठाराची जणू किनारच आहे. दख्खन पठाराच्या काठावरच्या ह्या पर्वत रांगा आहेत.  या भागात बरीच जंगले, जलसाठे, धबधबे आहेत आणि जैवविविधता तसेच त्याचे वय यामुळे या भागाला 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून ओळखले गेले आहे. पश्चिम घाट हिमालयापेक्षाही जुना आहे! वरंधा घाट  📷विकिमीडिया कॉमन्स  पश्चिम घाट हा अनेक मुख्य नद्यांचे उगमस्थान आहे. वरील छायाचित्रात दिसते आहे त्या प्रमाणे, वर्षा ऋतूत या प्रदेशात अनेक धबधबे पाहायला मिळतात.  पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) अनेक सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे शिवथरघळ धबधबा. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण रौद्र सौंदर्यानिशी आणि ताकदीनिशी रोरावत खाली येताना दिसतो.  हा धबधबा सुमारे शंभर फूट उंचीवर...