Skip to main content

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

 मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे. 

मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.

 हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.

 जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे. 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 

लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळांपैकी एक विमानतळ. विमान उतरताना खरोखर आपण एखाद्या डोंगरमाथ्यावर चिंचोळ्या पट्टीवर उतरत आहोत असे वाटू लागते. आजूबाजूला दऱ्या असणारे रनवेज प्रवाश्यांना मजेचे वाटतात पण पायलटसाठी मात्र इथे लँडिंग करणे आव्हानात्मक वाटत असणार. 

होडीत बसलो असताना बुडण्याच्या गोष्टी करू नये म्हणतात. तसेच विमानात बसलेले असताना असे आठवू नये म्हटले तरी २०१० चा मंगळुरु विमानतळावरील अपघात आठवलाच. दीडशेच्या वर लोकांनी ह्या अपघातात जीव गमावला होता. त्या सर्वाना श्रद्धांजली. 

 मंगळुरु विमानतळ लहानसा आणि कलात्मकतेने सजवलेला आहे. 

मंगळुरु विमानतळ 
मंगळुरु विमानतळ 
मंगळुरु विमानतळ 
मंगळुरु विमानतळ 
मंगळुरु विमानतळ 
मंगळुरु विमानतळ 
मंगळुरु विमानतळ 
मंगळुरु विमानतळ 
मंगळुरु विमानतळ 
मंगळुरु विमानतळ 
तुलनेने लहान जागेत इतक्या सुंदर कलाकृती आहेत की आपण एखादे कलादालन पाहत आहोत असेच वाटू लागते. 

विमानतळावर उबर सहज मिळाली. आमचे हॉटेल विमानतळापासून साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर अत्तावार भागातील अवतार हॉटेल होते. हॉटेल अगदी मध्यवर्ती भागात असल्याने बाहेर यायला जायला रिक्षा मिळणे अगदी सोपे होते. 

थोडा वेळ आराम करून आम्ही कुदरोली गोकर्णनाथ मंदिरात गेलो. सामाजिक समरसतेचे उदाहरण म्हणून हे मंदिर ओळखले जाते. बिलवा समाजासहित समाजातील सर्व घटकांना मुक्तपणे प्रवेश असावा म्हणून ब्रम्हर्षी नारायण गुरु ह्यांच्या आशीर्वादाने १९१२ मध्ये हे मंदिर उभारले गेले. नारायणगुरु ह्यांची शिकवण होती की 'एक जात, एक धर्म, एक दैवत. स्वतंत्र होण्यासाठी शिक्षण घ्या, समर्थ होण्यासाठी संघटित व्हा." 

मंदिरातील मुख्य देवता शिव असून मंदिराच्या आवारात गणेश, सुब्रमण्यम, अन्नपूर्णेश्वरी, भैरव, नवग्रह, शनी, श्रीकृष्ण ह्या देवतांची मंदिरे आहेत. 

१९९१ मध्ये जीर्णोद्धाराच्या वेळी चोला स्थापत्यशैलीतील भव्य मंदिर उभारण्यात आले. 

श्री गोकर्णनाथ क्षेत्र 
श्री गोकर्णनाथ क्षेत्र 
श्री गोकर्णनाथ क्षेत्र 
श्री गोकर्णनाथ क्षेत्र 
श्री गोकर्णनाथ क्षेत्र 
श्री गोकर्णनाथ क्षेत्र 
श्री गोकर्णनाथ क्षेत्र 
श्री गोकर्णनाथ क्षेत्र 
श्री गोकर्णनाथ क्षेत्र 
श्री गोकर्णनाथ क्षेत्र 
मंदिर सकाळी ६ वाजता उघडते आणि रात्री ९ वाजता बंद होते. दुपारी २ ते ४.३० मंदिर बंद असते. 

मंदिरातून बाहेर पडताच लगेच रिक्षा मिळते. रिक्षाने आम्ही तनिरबावी बीचला जाण्यासाठी गुरूपूर नदीच्या किनाऱ्यावर जिथून नाव सुटते त्या ठिकाणी गेलो. अगदी पाच मिनिटांचा नावेचा प्रवास आहे आणि आपण पलीकडल्या किनाऱ्यावर पोचतो. साधारण पाच मिनिटे चालत गेलो की आपण तनिरबावी बीचला पोचतो. 

तसे मंगळुरूमधून दूरच्या रस्त्याने गेलो तर वाहनाने जाता येते. शिवाय आता गुरूपूर नदीवर एक पूल बांधत आहेत. म्हणजे मग तनिरबावी बीच अगदी चालत जाण्याच्या अंतरावर येईल. 

तानिरबावी बीच सूर्यास्त पाहण्यासाठी विशेष ठिकाण मानले जाते. बीच स्वच्छ आहे, सर्व मूलभूत सुविधा आहेत. बीचचा काही भाग ब्लु फ्लॅग बीच म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सुविधा आणि सुरक्षितता असलेला म्हणून घोषित झाला आहे. बीचजवळच एक मोठे वनस्पती उद्यान आहे. तिथे अनेक औषधी वनस्पती लावलेल्या आहेत. 

तनिरबावी बीचला जाण्यासाठी नाव 
तनिरबावी बीच
तनिरबावी बीच
तनिरबावी बीच
📷 प्रज्ञा साठे 
गुगलवर वाचून आम्ही हॉटेल जनता डिलक्स ह्या शुद्ध शाकाहारी उपाहारगृहात जेवायला गेलो. भाषा आणि त्या भागातील खाद्य पदार्थ माहिती नसले की पंचाईत होते! खास मंगळुरूचे स्थानिक पदार्थ खाऊ या म्हणून एक पदार्थ आम्ही मागवला आणि समोर आला तो अळुवडीचा अख्खा उकडलेला उंडा!! 

मंगळुरु खाणे 
आम्ही फेब्रुवारी २०२६ च्या शेवट इथे गेलो होतो. आता ह्या दोन्ही पदार्थांची नावे विसरले. तुम्हाला माहिती असतील तर अवश्य सांगा. बाकी ह्या उपाहारगृहातील सांबार, चटणीची चव चांगली होती. 

रात्री हॉटेलवर परतल्यावर हॉटेल नीट हिंडून पाहिले. जिने, भिंती, खिडक्या, दारे वैशिष्ट्यपूर्ण केली आहेत. 

हॉटेल अवतार 
हॉटेल अवतार 

हॉटेल अवतार 
हॉटेल अवतार - स्वागतकक्ष 
स्वागतकक्षात झोपाळा आणि वाचनालय केलेले आहे. पुस्तकांची निवडदेखील चांगली आहे. 

तर असा संपला आमचा कोस्टल कर्नाटक सहलीचा पहिला दिवस! आता दुसऱ्या दिवशी कुठे गेलो, काय पाहिले ते लवकरच लिहीन!





Comments

Popular posts from this blog

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

महेश्वर

महेश्वर हे मध्यप्रदेश पर्यटन निगमच्या पर्यटन स्थळांमधले एक महत्वाचे नाव आहे. पण करोडो भारतीयांसाठी ते केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर एक तीर्थस्थान असते. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेले स्थान आहे.  महेश्वर किल्ला प्रवेशद्वार  राजवाडा प्रवेशद्वार  बाह्यरूप  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  राजवाडा प्रवेशद्वार  अहिल्याबाई होळकर हे केवळ भारताच्याच नव्हे तर विश्वाच्या इतिहासातील एक सोनेरी पान. संपूर्ण मानव विश्वातील यशस्वी स्त्री राज्यकर्त्यांची सूची करायची झाली तर अहिल्याबाई होळकरांचे नाव ठळकपणे लिहायला लागेल.   31 मे 2025 ला त्यांची तीनशेवी जयंती आहे. पण 300 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या अहिल्याबाईंचे आयुष्य अगदी आजच्या आधुनिक काळातल्या आव्हानातही मार्गदर्शक ठरावे असेच आहे.  त्यांच्याविषयीचा आदर मनात घेऊनच आपण महेश्वरला जातो आणि त्या भावनेच्या प्रकाशात महेश्वर पाहतो. महेश्वरला फार मोठी प्राचीन परंपरा आहे. स्कंद पुराणाच्या रेवा खंडात आणि वायू पुराणाच्या नर्मदा रहस्य मध्ये महिष्मती म्हणजे महेश्वरचे वर्णन आलेले आहे. 'गुप्...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....

Prashanti Kutiram, Bangalore

I am happy to write my first post of 2022!! I am here with a really very special post! This is not a tourist place and still it holds a special place in each and every visitor’s mind. This is Prashanti Kutiram of Bangalore. Prashanti kutiram as the name suggests, surely makes your mind peaceful. It's around 70-80 kms from Bangalore airport but with the famous traffic jams of Bangalore, it may take two and half hours by taxi.  This is the place where The Swami Vivekananda Yoga Anusandhan Sansthan is situated on a sprawling 100 acres. Swami Vivekanand  Swami Vivekanand  Ramakrishna Paramahans and Sharada Mataji  SVyasa Founded in 1986, Svyasa follows Swami Vivekanand's teachings and combines best of east and West. So it combines Yoga and spirituality with modern sciences.  The first thing you will notice about Vyasa is the greenery. The campus is having umpteen trees. It's hilly area. The steep paths and slopes offer you the much needed exercise!! The Green Umbre...

निसर्गसुंदर झीरो!

मला माहिती आहे ते शून्याचा म्हणजे झीरोचा शोध भारतीयांनी लावला, पण  झी रो  कोणी पाहिले आहे का? ऑक्टोबर 2019 ला मी  झी रो  प्रत्यक्ष बघितले. जरा ह्या  झी रो चे स्पेलिंग वेगळे होते एवढेच! हे Ziro होते!!  झी रो  ही अत्यंत सुंदर निसर्गरम्य आणि अद्भुत जागा आहे.  अरुणाचल प्रदेश मधील लोअर सुबान सिरी जिल्ह्यामधील  झी रो  हे छोटे शहर आहे. संपूर्ण अरुणाचल प्रदेशलाच नैसर्गिक सौंदर्य आणि प्रसन्न हवामान याची देणगी मिळालेली आहे. नयनरम्य निळे आकाश, उंच उंच पहाड आणि हिरवाई अरुणाचल प्रदेश मध्ये सगळीकडेच असतात.  झी रो  मध्ये हे सगळे तर आहेच शिवाय पाईन वृक्ष देखील खूप आहेत.  विकिमीडिया वरून साभार  ऑक्टोबर २०१९ मध्ये असे दिसत होते.  हवामान खूपच छान आहे.  झी रो ला जाण्यासाठी सर्वात चांगला काळ म्हणजे एप्रिल ते ऑक्टोबरमधला काळ.  झी रो  मध्ये डिसेंबर-जानेवारीत  झी रो च्याही खाली तापमान जाऊ शकते!  आयुष्यभर गरम हवेच्या ठिकाणीच राहिल्यामुळे मला तर  12 डिग्री झाले  तापमान तरी हुडहुडी भरायला लागते....