Skip to main content

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच. 
गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे. 
रानी की वाव 
रानी की वाव 
रानी की वाव 
रानी की वाव 
रानी की वाव 
'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल. जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे. 
राणी उदयमती हिने तिचा पती राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्रमी राजे पाटणला दिले. त्या काळी या संपूर्ण प्रदेशावर सोळंकी राजघराण्याची सत्ता होती. पाटण ही त्यांच्या राज्याची राजधानी होती.
ह्या राजघराण्याने जसे स्थैर्य आणि सुबत्ता दिली तसेच अनेक कलावंत, विचारवंत, प्रतिभावंतांना प्रोत्साहन आणि राजाश्रय दिला. कला, संस्कृती, इतिहास जपण्याचाच हा एक मार्ग होता. त्यामुळे मोढेराचे सूर्यमंदिर, पाटणची वाव आणि सिद्धपूरसारखी आज शतकानुशतके लोटली तरीही कला आणि स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना असलेली स्थाने निर्माण होऊ शकली. ही स्थापत्य शैली अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. 
ह्या काळात अनेक मंदिरे आणि बारवांचे निर्माण झाले. बारव म्हणजे पाण्याचा साठा करण्यासाठी तयार केलेली विहिर. आपल्याला रांगोळीत देखील बारव रचना दिसते, भरतकामाच्या विणीमध्ये देखील बारव रचना दिसते. 
बारव म्हणजे एका किंवा अधिक बाजूंनी खालपर्यंत जाण्यासाठी पायर्‍यांची रचना केलेली असते. आपल्याकडे खूप प्राचीन काळापासून, अशा पद्धतीच्या बारव बांधण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रात देखील अनेक मंदिरांत बारव पाहायला मिळते. अगदी सर्वाना माहिती असलेले उदाहरण द्यायचे तर वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराच्या आवारात अशी बारव आहे. 
त्या काळी अशी बारव बांधून देणे हा व्रतातील, दानधर्मातील एक महत्त्वाचा भाग समजला जात असावा. राजस्थान आणि गुजरातमध्ये मोठ्या संख्येने अशा बारव बघायला मिळतात.
ही बारव म्हणजेच विहीर/ वाव जमिनीच्या खाली आहे आणि बुजली गेली असल्याने परकीय आक्रमकांच्या विध्वंसापासून सुरक्षित राहिली. अनेक शतके हिचे अस्तित्वच कोणाला माहिती नव्हते. 
तसेच ह्या गावाजवळून सरस्वती नदी वाहते. अनेक शतकांपूर्वी या नदीला प्रचंड पूर आला आणि आजूबाजूचा सगळा भाग या नदीच्या गाळामध्ये गाडला गेला. त्यातही ही वाव पूर्णपणे बुजून गेली. 
 साधारण १९५८ च्या सुमाराला ‘आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया’ने, त्या भागामध्ये उत्खनन करण्यास सुरुवात केली आणि समोर आले एक अद्वितीय स्थापत्यवैभव! पुरातत्व खात्याने अतिशय काळजीपूर्वक जी शिल्पे आपल्या जागेपासून ढळली होती ती पुनर्स्थापित केली आहेत. तरी काही जागा रिकाम्या दिसतातच. 
सुरुवातीला काही नक्षीदार दगड, काही खांबांचे अवशेष, काही मूर्ती अशा गोष्टी समोर दिसल्या. अशा रीतीने हे स्थान प्रकाशात आले. पुरातत्व खात्याने अनेक वर्षे चिकाटीने काम केल्यानंतर, जमिनीच्या खाली दडलेले हे वैभव जगासमोर आले. 
मरू-गुर्जर स्थापत्यशैलीत बांधलेली ही 'रानी की वाव' सात स्तरांमध्ये ती खाली खोल उतरते. प्रत्येक स्तरावर अप्रतिम शिल्पे कोरलेले अनेक स्तंभ, कमानी आणि मूर्ती आहेत. भौमितिक रचनांमुळे ह्या ठिकाणाला एक आगळेच सौंदर्य प्राप्त झालेले आहे.
छाया प्रकाश!
खांब 
खांबांनी बनलेलं अनेक भाग 
मधला चौक 
अनेक मजले 
रानी की वाव 
रानी की वाव 
ह्या पलीकडे प्रवेश निषिद्ध 
रानी की वाव 
खांब, कमानी, वेलबुट्टी 
रानी की वाव 
अनेक मजले 
रानी की वाव 
इतके खांब, प्रत्येक खांबावरील नाजूक कलाकुसर, वैविध्य पाहून मन थक्क होते. त्यातही जणू चौक असावेत असे खांबांनी वेगवेगळे भाग तयार झाले आहेत. 
हा संपूर्ण परिसरच जमिनीत गाडला जाऊन आक्रमकांपासून वाचल्यामुळे अनेक संपूर्ण अभंग शिल्पे इथे आपल्याला बघता येतात. इथे कोणकोणती शिल्पे आहेत?
प्रामुख्याने विष्णूचे अनेक अवतार आहेत. अप्सरा आहेत, सुरसुंदरी आहेत. देवीची अनेक रूपे आहेत. दिग्पाल आहेत. अतिशय नाजूक कोरीवकाम असलेली अशी शेकडो शिल्पे इथे आहेत. कोरीव स्तंभांच्या रांगा आहेत. पाने, फुले, पक्षी,प्राणी आहेत. 
अप्रतिम कलाकुसर 
अप्रतिम कलाकुसर 
अप्रतिम कलाकुसर 
तुंबरु?
अप्रतिम कलाकुसर 
विविध भावमुद्रा 
अप्रतिम कलाकुसर 
शंख, चक्र, गदा, पद्म ही आयुधे कोणत्या क्रमाने कोणत्या हातात आहेत ह्यावरून विष्णुरूप बदलते. अशी अनेक रूपे आपल्याला वरील फोटोत पाहायला मिळतात. 
अप्रतिम कलाकुसर 
अप्रतिम कलाकुसर 
अप्रतिम कलाकुसर 
इकडे आपल्याला महिषासुर मर्दिनी दिसते आहे. ( डावीकडून चौथे शिल्प) दुर्दैवाने माझ्याकडे महिषासुरमर्दिनीच्या शिल्पाचे समोरून काढलेले छायाचित्र नाही. 
एका पायाने महिषासुराला दाबून त्यावर ती आघात करताना दिसते आहे. तिच्या हातात अनेक आयुधे आहेत. त्रिशुळ, बाण, ढाल, भाला, पाश, अंकुश, चक्र अशी विविध आयुधे आपण ओळखू शकतो. बारकाईने पाहिलेत तर देवीचे वाहन असलेल्या सिंहाने महिषासुरावर मागून हल्ला चढवलेला आहे. 
देवीचा चेहरा मात्र अगदी शांत दाखवला आहे. म्हणजे महिषासुराला नेस्तनाबूत करणे ही तिच्यासाठी जणू क्षुल्लक गोष्ट आहे!! 
अप्रतिम कलाकुसर 
अप्रतिम कलाकुसर 
अप्रतिम कलाकुसर 
नक्षी 
नक्षीतले विविध प्रकार आपण इथे बघू शकतो. आपण वरील फोटोत पहिले तर केवळ आंब्याच्या पानाची तोरणेच तीन प्रकारची चितारलेली दिसतील. केवढे कल्पनावैभव आहे हे!
पटोला साडीवर आज आपण जी नक्षी पाहतो तशीच नक्षी इथे आढळते. तेव्हा कदाचित इथूनच हातमाग कारागिरांना साडीची नक्षी सुचली असेल का?
पटोला नक्षीचे स्फुर्तीस्थान?
अप्रतिम कलाकुसर 
शरणागत?
अप्रतिम कलाकुसर 
अप्रतिम कलाकुसर 
प्रत्येक स्तंभ, मार्गिका आणि त्यावर कोरलेली शिल्पे देखणी, प्रमाणबद्ध आणि सुंदर तर आहेतच पण अगदी सजीव वाटावी अशी आहेत. त्यामुळे ही 'रानी की वाव' विलक्षण कलात्मक आहे. 
या विहिरीची रचना पावसाचे पाणी साठवून मग ते उर्वरित वर्षात वापरता यावे ह्या दृष्टीने केली गेली होती. जलव्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून ही वास्तू अभियांत्रिकी आणि स्थापत्यकुशलतेचे उत्तम उदाहरण आहे.
अजून एक विशेष म्हणजे जैन भिक्षू मेरुतुंगा यांच्या १३०४ च्या एका रचनेत उल्लेख आहे की, नरवराह खंगारा यांची कन्या उदयमतीने पाटण येथे ही पायऱ्यांची विहीर बांधली.
एखाद्या राणीचे नाव तिच्या माहेरच्या राजवंशावरून दिलेले असणे वैशिष्ट्यपूर्ण आहे. खंगार हा एक लढवय्या, शूर असा प्राचीन राजवंश आहे. 
त्याच रचनेत असेही लिहिलेले आहे की, या विहिरीचे काम १०६३ मध्ये म्हणजे राजा भीमदेवाच्या मृत्यूनंतर लगेचच सुरू झाले आणि ती पूर्ण होण्यासाठी २० वर्षे लागली. 
'रानी की वाव' मध्ये संध्याकाळी एक ध्वनिप्रकाश कार्यक्रम म्हणजेच लाईट अँड साउंड शो असतो. ह्या कार्यक्रमात ह्या जागतिक वारसा स्थानाचा इतिहास सांगितलं जातो. पण आम्ही गेलो तेव्हा पाऊस असल्याने तो कार्यक्रम बंद होता. 
सुरक्षेच्या कारणास्तव 'रानी की वाव' चा काही भाग पर्यटकांना खुला केलेला नाही. त्यामुळे तो आपल्याला बघता येत नाही.
सर्वात मागचा भाग आहे तो सर्वात खोल आहे. तिकडे तुम्हाला जाता येत नाही. पण तुम्ही विहिरीच्या बाहेरच्या बाजूने मागे गेलात तर साधारण असे दृश्य दिसते. 
रानी की वाव 
तिथल्या भागाची तुम्ही झूम करून छायाचित्रे काढलीत तर तुम्हाला लक्षात येते की ही वाव मूळ स्वरूपात असेल तेव्हा त्याचे वैभव कसे असेल! किती बारीक कलाकुसर केलेली आहे!अक्षरशः एक इंचही जागा मोकळी सोडली नाही. 
रानी की वाव 
'रानी की वाव' ही गुजरातमधील पायऱ्यांच्या वास्तुकलेचा एक उत्कृष्ट आणि सर्वात मोठा नमुना मानली जाते. या वारसास्थळाचे महत्त्व लक्षात घेऊन 2014 साली, 'रानी की वाव'चा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला गेला.
स्थापत्यशास्त्र आणि भूमिती म्हणजेच विज्ञान, संस्कृती, इतिहास, हिंदू धर्माची तत्वे अशा अनेक गोष्टी इथे आपल्याला पाहायला मिळतात. 
जागतिक वारसास्थळांच्या यादीत सर्वांत स्वच्छ स्थान म्हणून, या जागेचा सन्मान झाला आहे. संपूर्ण परिसर पुरातत्व खात्याने अतिशय चांगला ठेवला आहे. हा परिसर पाहिल्यावर 'रानी की वाव' ला सर्वात स्वच्छ जागतिक वारसा स्थानाचा पुरस्कार का मिळाला असेल ते अगदी सहज समजते!
परिसर 
परिसर 
परिसर 
परिसर 
परिसर 
'रानी की वाव' गुजराथेत असली तरी तिचे चित्र आपल्या सगळ्यांच्या पाकिटात असते!!आपल्या शंभराच्या नोटेवर 'रानी की वाव' विराजमान आहे. 
प्रतिमा आणि प्रत्यक्ष! 
आणखी एका गोष्टीचा विशेष उल्लेख करावासा वाटतो ते म्हणजे ह्या स्थानाची माहिती ब्रेल लिपीत देखील तिथे लावली आहे. पुरातत्व खात्याची ही संवेदनशीलता अभिनंदनीय आहे. 
ब्रेल 

#Rani ki Vav #UNESCOWorldHeritage, #Patan, #GujaratTourism, #Stepwell, #IncredibleIndia, #IndianHistory, #ArchitecturalMarvel और #CulturalHeritage #QueenStepwell, #PatanStepwell #History, #Architecture, #StepwellWonders, #AncientArchitecture, #IndianHistory, #CulturalHeritage, #Carvings #UNESCO, #WorldHeritageSite #रानीकीवाव, #गुजरातपर्यटन, #भारतीयविरासत, #इतिहास








 






























 

 

Comments

Popular posts from this blog

महेश्वर

महेश्वर हे मध्यप्रदेश पर्यटन निगमच्या पर्यटन स्थळांमधले एक महत्वाचे नाव आहे. पण करोडो भारतीयांसाठी ते केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर एक तीर्थस्थान असते. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेले स्थान आहे.  महेश्वर किल्ला प्रवेशद्वार  राजवाडा प्रवेशद्वार  बाह्यरूप  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  राजवाडा प्रवेशद्वार  अहिल्याबाई होळकर हे केवळ भारताच्याच नव्हे तर विश्वाच्या इतिहासातील एक सोनेरी पान. संपूर्ण मानव विश्वातील यशस्वी स्त्री राज्यकर्त्यांची सूची करायची झाली तर अहिल्याबाई होळकरांचे नाव ठळकपणे लिहायला लागेल.   31 मे 2025 ला त्यांची तीनशेवी जयंती आहे. पण 300 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या अहिल्याबाईंचे आयुष्य अगदी आजच्या आधुनिक काळातल्या आव्हानातही मार्गदर्शक ठरावे असेच आहे.  त्यांच्याविषयीचा आदर मनात घेऊनच आपण महेश्वरला जातो आणि त्या भावनेच्या प्रकाशात महेश्वर पाहतो. महेश्वरला फार मोठी प्राचीन परंपरा आहे. स्कंद पुराणाच्या रेवा खंडात आणि वायू पुराणाच्या नर्मदा रहस्य मध्ये महिष्मती म्हणजे महेश्वरचे वर्णन आलेले आहे. 'गुप्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

Prashanti Kutiram, Bangalore

I am happy to write my first post of 2022!! I am here with a really very special post! This is not a tourist place and still it holds a special place in each and every visitor’s mind. This is Prashanti Kutiram of Bangalore. Prashanti kutiram as the name suggests, surely makes your mind peaceful. It's around 70-80 kms from Bangalore airport but with the famous traffic jams of Bangalore, it may take two and half hours by taxi.  This is the place where The Swami Vivekananda Yoga Anusandhan Sansthan is situated on a sprawling 100 acres. Swami Vivekanand  Swami Vivekanand  Ramakrishna Paramahans and Sharada Mataji  SVyasa Founded in 1986, Svyasa follows Swami Vivekanand's teachings and combines best of east and West. So it combines Yoga and spirituality with modern sciences.  The first thing you will notice about Vyasa is the greenery. The campus is having umpteen trees. It's hilly area. The steep paths and slopes offer you the much needed exercise!! The Green Umbre...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...