Skip to main content

अलिशान वन विभाग - जेव्हा जाल तैवानला, नक्की भेट द्या अलिशानला!

तैवानचे नाव सध्या चर्चेत आहे, सर्वत्र तैवानचे कौतुक होते आहे, ते तैवानने कोरोनाशी दिलेल्या अतिशय प्रभावी व यशस्वी लढतीमुळे!! जानेवारी २०२० पासून तैवानने, कोविड१९ विरूद्धच्या लढाईत परिणामकारक  उपाययोजना केली आहे आणि आतापर्यंत म्हणजे फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोविडमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या एक आकडी म्हणजे ९ आहे. 

तैवान हा एक विकसित देश आहे. तैवान स्वतःला आरओसी (ROC) म्हणवतो- रिपब्लिक ऑफ चायना, म्हणजेच चीनचे प्रजासत्ताक आणि स्वत: ला पीपल्स रिपब्लिक ऑफ चाइना म्हणजेच कम्युनिस्ट चीनपेक्षा वेगळे करू इच्छितो.

आम्ही एप्रिल २०१५मध्ये तैवानला गेलो होतो तेव्हा तैवानमधील सर्वोत्तम ऋतुंपैकी एक ऋतु  होता. वसंत ऋतुची सुरुवात होती. त्यामुळे आम्हाला बरीच रंगीबेरंगी फुले दिसली. हवामान थंड होते पण थंडी असह्य होण्याइतकी नव्हती. 

आज मी 'अलिशान राष्ट्रीय वन क्षेत्राबद्दल' लिहित आहे. अलिशान हे युशान जवळ, मध्य तैवानमध्ये असलेल्या एका पर्वतरांगेचे नाव आहे. युशान म्हणजे जेड पर्वत. हा तैवान मधील सर्वात उंच पर्वत आहे, समुद्रसपाटीपासून सुमारे 3000 मीटर उंचीवर.

अलिशान म्हणजे अली पर्वत. हा समुद्रसपाटीपासून २०००- २७०० मीटर उंचीवर असल्याने, अगदी उन्हाळ्यातही इथे थंड वातावरण असते. अलिशान हे ढगांचा सागर, सायप्रसची जंगले, रंगीबेरंगी फुले आणि फॉरेस्ट ट्रेन यासाठी प्रसिद्ध आहे. आम्ही हे सर्व चमत्कार अनुभवू शकलो.

अलिशान राष्ट्रीय वन क्षेत्र तैवानच्या 'चियायी' काउंटीमध्ये आहे.

 



Chiyayi Train Station



😊


फॉरेस्ट ट्रेनचा चियायी ते अलिशान हा मार्ग असला तरी दरड कोसळल्यामुळे ह्यातील बराच मार्ग बंद आहे. 2023 मध्ये ह्या मार्गाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होईल.


आम्ही चियायीपासून अलीशानला जाण्यासाठी टॅक्सी केली. हा डोंगराळ प्रदेश असल्याने रस्ता खूप वळणांचा आणि निसर्गरम्य सौंदर्याने नटलेला आहे.


Along the road!





Along the road!


चियायी ते अलिशान प्रवासाला सुमारे दोन तास लागतात. जेव्हा आम्ही अलिशानला पोहोचलो तेव्हा नेमका अलिशानमध्ये पाऊस पडत होता. पाऊस, वारा आणि थंड हवा सगळे मिळून खरोखरच खूप थंडगार बनले! 

 मॅपलच्या सुंदर लाल पानांनी आणि अनेक प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांनी आमचे स्वागत केले.

 

Maple leaves



Cherry Blossom


अलिशानमध्ये, तुम्हाला कुठेही जायचे असो, तिथे जाण्यासाठी एकतर काही पायर्‍या चढायला लागतात किंवा उतरायला लागतात!! थंड हवेमुळे थकवा मात्र जाणवत नाही.



 






पण हे सगळे चढउतार, न कंटाळता पार करण्याचे बक्षीस फारच छान होते! आम्हाला उत्कृष्ट शाकाहारी भोजन मिळाले. अलिशान हा भाग बांबूच्या शाकाहारी पदार्थांसाठी, आल्याच्या पेयासाठी आणि चहासाठी प्रसिद्ध आहे.



Bamboo stir fry



Crispy puffs 

 

आमचे जेवण होण्याची वाट पाहत, पाऊस बाहेर उभा होताच! आम्ही बाहेर आलो तर समोर हे दृश्य!









दुपारी आम्ही जंगल टूर घेतली. 


@4. 42 p.m.


अजूनही पावसाची रिपरिप चालूच होती. सगळी फुले पावसाने गच्च भिजली होती. ह्या ट्रेल चे नावच साकुरा ट्रेल होते. त्यामुळे मला अगदी मनसोक्त, तृप्त होईपर्यंत साकुरा -चेरी ब्लॉसम बघता आले. 








 



 













Part of the trail


अलिशान हे मूलतः लाल सायप्रसच्या झाडांचे घनदाट जंगल होते. तिथे वनवासी लोकच मूळ रहिवासी होते. नंतर १९व्या शतकात चीनी लोक आले. जपानच्या आक्रमणानंतर, जपानी राज्यकर्त्या लोकांनी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी सुरु केली. 

ही कापलेली लाकडे घेऊन जाण्यासाठी फॉरेस्ट ट्रेन सुरू झाली आणि हळूहळू लोकांच्या लहान लहान वस्त्या झाल्या आणि अशाप्रकारे जंगल परिसरात गावे वसवली गेली. 

आम्ही एक अतिशय विलक्षण गोष्ट पाहिली, ती म्हणजे ट्री स्पिरिट पॅगोडा. हे १९३५ मध्ये बांधले गेले होते. अलिशान जंगलात काही हजार वर्षे जुनी झाडे आहेत. जेव्हा ती झाडे कापली गेली, तेव्हा त्यांच्या आत्म्यांना वंदन करण्यासाठी, पूजा करून त्यांना शांत करण्यासाठी हे मंदिर, तिथे जंगलात बांधले गेले होते.



📷 Commons Wikimedia



📷 Commons Wikimedia

 

ही वर्तुळे, वृक्षांच्या वार्षिक वाढीची जी वर्तुळे खोडावर असतात, त्याचे प्रतीक आहेत. प्रत्येक पायरी म्हणजे 500 वर्षांची कालगणना. अशी एकूण ३००० वर्षे इथे दाखवलेली आहेत. समोर एक मंदिर आहे. ते बंद होते म्हणून वरून पायऱ्यांवरूनच त्याचा एक फोटो काढला होता.






आम्ही तिथे एक सुंदर तळे पाहिले. त्याविषयी काही मनोरंजक लोककथा देखील आहेत. त्या वेळपर्यंत मुसळधार पाऊस पडायला लागला होता, म्हणून पोंचोच्या बाहेर मोबाईल काढून, तळ्याचे फोटो काढण्याची हिम्मत केली नाही. 

दुसर्‍या दिवशी, पहाटे २.३० च्या सुमारास उठून यु शान पर्वतावर फेरफटका मारण्यासाठी व जंगलातील सर्वात उंच ठिकाणाहून दिसणारा सूर्योदय पाहण्यासाठी जायचे होते. 
हवामान अनुकूल असेल, तर ढगांच्या सागरातून सूर्य उगवताना बघायला मिळतो. 

यूशानच्या जंगलातील ह्या टूरने आम्हाला सुमारे 5000 वर्ष जुनी झाडे असलेल्या जंगलात नेले. पहाटे, अंधार आणि उजेडाच्या सीमारेषेवर, तिथे, त्या पुरातन किंवा (खरे तर नित्यनूतनही!) जंगलात असणे हा खरोखर एक जादूई अनुभव होता.


Yu Shan @5.14 a.m.



@5.27a.m.



The moon was still in the sky @5.29 a.m. 




Part of the trunk of a 5000 yrs old tree

 

@5.46 a.m. 



Have to hurry for watching sunrise!



Nearly 5000 year old tree






@6.03 a.m.


@ 6.14 a.m. 



@ 6.15a.m.



6.23 a.m.



Shopkeeper dressed like aborigines 


इतकी हजार वर्षे वयाची झाडे पाहून झाल्यावर, जेव्हा आम्ही जवळपास शंभर वर्षे वयाची झाडे पाहिली तेव्हा, ती अगदी लिंबू टिंबू वाटली. अगदी चिकूपिकूच म्हणाना! 




अलिशान फॉरेस्ट रेल्वे हे अजून एक मोठे आकर्षण होते. 


Alishan Railway station 



At the station gallery 



Upper floor of the station 












तो [प्रचंड मोठा लाल सायप्रसचा वृक्ष, दैवी वृक्ष म्हणून ओळखला जात असे. मेघगर्जना, सोसाट्याचा वारा व वीज कोसळल्यामुळे १९५३ आणि १९५६ मध्ये ह्या वृक्षाचे खूप नुकसान झाले. अखेर १९९७ मध्ये हा वृक्ष संपूर्ण कोसळला. म्हणून १९९८ मध्ये ह्या दैवी वृक्षासाठी एक निरोप समारंभ व पूजा पार पडली. ह्या वृक्षाला निसर्गाकडे परत जाण्याच्या यात्रेसाठी समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. त्या जागेवर जंगलातील अक्षय जीवन परंपरा कायम ठेवण्यासाठी, लाल सायप्रसची काही रोपे लावली गेली. ही माहिती ह्रदयस्पर्शी होती.





 





 











दुरुस्ती आणि देखभालीसाठी बराचसा रेल्वे मार्ग बंदच असल्याने आम्ही फक्त आलिशान ते सॅक्रीड ट्री रुटवरच प्रवास करू शकलो. 







Clear weather




Engulfing clouds



16 degrees at 10.45 a.m.



माझ्या आठवणीत अलिशान कायमचे कोरले गेले आहे. हजार वर्षे वयाची जुनी झाडे, चेरी ब्लॉसम- फुलांनी बहरलेली असंख्य झाडे, ट्री स्पिरिट पागोडा आणि दैवी वृक्षासाठी साजरा केला गेलेला निरोप सोहळा ह्या अलि शानविषयीच्या संस्मरणीय गोष्टी होत्या. 

अजून एक खूपच सुंदर गोष्ट म्हणजे जंगलात पाट्यांवर कविता लिहिलेल्या होत्या. गेल्या काही शतकांतील कवींच्या रचना होत्या त्या. त्यांच्या भाषेतून इंग्रजीत येताना, कदाचित अर्थाचा परिमळ थोडा कमीही झाला असण्याची शक्यता आहे. पण तरीही, दाट जंगलात आणि झाडाच्या सहवासात त्या काव्यरचना वाचणे खूपच आनंददायी होते. आता मला वाटतंय की मी त्या कविता लिहून घ्यायला हव्या होत्या. 

 अजूनही मला एका कवितेचा भावार्थ आठवतो. कवीने झाड किंवा जंगलातील अक्षय जीवनाविषयी सांगितले होते. कवीने लिहिले होते, 'जंगलाच्या जीवनात, काहीही कायम टिकत नाही परंतु सर्व काही अंतहीन आहे.' 

आता अलिशानचा निरोप घेण्याची वेळ आली होती !! अच्छा आलिशान.. आत्तापुरते तरी!!






#ThingsToSeeInTaiwan #AlishanSightseeing #TreeSpiritPagoda #WhenInTaiwanMustSeeAlishan #chikupiku 

 


Comments

  1. Vrunda, Enjoyed tour in Taivan . Love your writing style.

    ReplyDelete
  2. Very engaging writing. I am a big fan of you and your writing!!!

    ReplyDelete
  3. A small typing error, temperature caption should be 16 degree. Thanks

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

महेश्वर

महेश्वर हे मध्यप्रदेश पर्यटन निगमच्या पर्यटन स्थळांमधले एक महत्वाचे नाव आहे. पण करोडो भारतीयांसाठी ते केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर एक तीर्थस्थान असते. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेले स्थान आहे.  महेश्वर किल्ला प्रवेशद्वार  राजवाडा प्रवेशद्वार  बाह्यरूप  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  राजवाडा प्रवेशद्वार  अहिल्याबाई होळकर हे केवळ भारताच्याच नव्हे तर विश्वाच्या इतिहासातील एक सोनेरी पान. संपूर्ण मानव विश्वातील यशस्वी स्त्री राज्यकर्त्यांची सूची करायची झाली तर अहिल्याबाई होळकरांचे नाव ठळकपणे लिहायला लागेल.   31 मे 2025 ला त्यांची तीनशेवी जयंती आहे. पण 300 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या अहिल्याबाईंचे आयुष्य अगदी आजच्या आधुनिक काळातल्या आव्हानातही मार्गदर्शक ठरावे असेच आहे.  त्यांच्याविषयीचा आदर मनात घेऊनच आपण महेश्वरला जातो आणि त्या भावनेच्या प्रकाशात महेश्वर पाहतो. महेश्वरला फार मोठी प्राचीन परंपरा आहे. स्कंद पुराणाच्या रेवा खंडात आणि वायू पुराणाच्या नर्मदा रहस्य मध्ये महिष्मती म्हणजे महेश्वरचे वर्णन आलेले आहे. 'गुप्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

Prashanti Kutiram, Bangalore

I am happy to write my first post of 2022!! I am here with a really very special post! This is not a tourist place and still it holds a special place in each and every visitor’s mind. This is Prashanti Kutiram of Bangalore. Prashanti kutiram as the name suggests, surely makes your mind peaceful. It's around 70-80 kms from Bangalore airport but with the famous traffic jams of Bangalore, it may take two and half hours by taxi.  This is the place where The Swami Vivekananda Yoga Anusandhan Sansthan is situated on a sprawling 100 acres. Swami Vivekanand  Swami Vivekanand  Ramakrishna Paramahans and Sharada Mataji  SVyasa Founded in 1986, Svyasa follows Swami Vivekanand's teachings and combines best of east and West. So it combines Yoga and spirituality with modern sciences.  The first thing you will notice about Vyasa is the greenery. The campus is having umpteen trees. It's hilly area. The steep paths and slopes offer you the much needed exercise!! The Green Umbre...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...