Skip to main content

अलिशान वन विभाग - जेव्हा जाल तैवानला, नक्की भेट द्या अलिशानला!

तैवानचे नाव सध्या चर्चेत आहे, सर्वत्र तैवानचे कौतुक होते आहे, ते तैवानने कोरोनाशी दिलेल्या अतिशय प्रभावी व यशस्वी लढतीमुळे!! जानेवारी २०२० पासून तैवानने, कोविड१९ विरूद्धच्या लढाईत परिणामकारक  उपाययोजना केली आहे आणि आतापर्यंत म्हणजे फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोविडमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या एक आकडी म्हणजे ९ आहे. 

तैवान हा एक विकसित देश आहे. तैवान स्वतःला आरओसी (ROC) म्हणवतो- रिपब्लिक ऑफ चायना, म्हणजेच चीनचे प्रजासत्ताक आणि स्वत: ला पीपल्स रिपब्लिक ऑफ चाइना म्हणजेच कम्युनिस्ट चीनपेक्षा वेगळे करू इच्छितो.

आम्ही एप्रिल २०१५मध्ये तैवानला गेलो होतो तेव्हा तैवानमधील सर्वोत्तम ऋतुंपैकी एक ऋतु  होता. वसंत ऋतुची सुरुवात होती. त्यामुळे आम्हाला बरीच रंगीबेरंगी फुले दिसली. हवामान थंड होते पण थंडी असह्य होण्याइतकी नव्हती. 

आज मी 'अलिशान राष्ट्रीय वन क्षेत्राबद्दल' लिहित आहे. अलिशान हे युशान जवळ, मध्य तैवानमध्ये असलेल्या एका पर्वतरांगेचे नाव आहे. युशान म्हणजे जेड पर्वत. हा तैवान मधील सर्वात उंच पर्वत आहे, समुद्रसपाटीपासून सुमारे 3000 मीटर उंचीवर.

अलिशान म्हणजे अली पर्वत. हा समुद्रसपाटीपासून २०००- २७०० मीटर उंचीवर असल्याने, अगदी उन्हाळ्यातही इथे थंड वातावरण असते. अलिशान हे ढगांचा सागर, सायप्रसची जंगले, रंगीबेरंगी फुले आणि फॉरेस्ट ट्रेन यासाठी प्रसिद्ध आहे. आम्ही हे सर्व चमत्कार अनुभवू शकलो.

अलिशान राष्ट्रीय वन क्षेत्र तैवानच्या 'चियायी' काउंटीमध्ये आहे.

 



Chiyayi Train Station



😊


फॉरेस्ट ट्रेनचा चियायी ते अलिशान हा मार्ग असला तरी दरड कोसळल्यामुळे ह्यातील बराच मार्ग बंद आहे. 2023 मध्ये ह्या मार्गाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होईल.


आम्ही चियायीपासून अलीशानला जाण्यासाठी टॅक्सी केली. हा डोंगराळ प्रदेश असल्याने रस्ता खूप वळणांचा आणि निसर्गरम्य सौंदर्याने नटलेला आहे.


Along the road!





Along the road!


चियायी ते अलिशान प्रवासाला सुमारे दोन तास लागतात. जेव्हा आम्ही अलिशानला पोहोचलो तेव्हा नेमका अलिशानमध्ये पाऊस पडत होता. पाऊस, वारा आणि थंड हवा सगळे मिळून खरोखरच खूप थंडगार बनले! 

 मॅपलच्या सुंदर लाल पानांनी आणि अनेक प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांनी आमचे स्वागत केले.

 

Maple leaves



Cherry Blossom


अलिशानमध्ये, तुम्हाला कुठेही जायचे असो, तिथे जाण्यासाठी एकतर काही पायर्‍या चढायला लागतात किंवा उतरायला लागतात!! थंड हवेमुळे थकवा मात्र जाणवत नाही.



 






पण हे सगळे चढउतार, न कंटाळता पार करण्याचे बक्षीस फारच छान होते! आम्हाला उत्कृष्ट शाकाहारी भोजन मिळाले. अलिशान हा भाग बांबूच्या शाकाहारी पदार्थांसाठी, आल्याच्या पेयासाठी आणि चहासाठी प्रसिद्ध आहे.



Bamboo stir fry



Crispy puffs 

 

आमचे जेवण होण्याची वाट पाहत, पाऊस बाहेर उभा होताच! आम्ही बाहेर आलो तर समोर हे दृश्य!









दुपारी आम्ही जंगल टूर घेतली. 


@4. 42 p.m.


अजूनही पावसाची रिपरिप चालूच होती. सगळी फुले पावसाने गच्च भिजली होती. ह्या ट्रेल चे नावच साकुरा ट्रेल होते. त्यामुळे मला अगदी मनसोक्त, तृप्त होईपर्यंत साकुरा -चेरी ब्लॉसम बघता आले. 








 



 













Part of the trail


अलिशान हे मूलतः लाल सायप्रसच्या झाडांचे घनदाट जंगल होते. तिथे वनवासी लोकच मूळ रहिवासी होते. नंतर १९व्या शतकात चीनी लोक आले. जपानच्या आक्रमणानंतर, जपानी राज्यकर्त्या लोकांनी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी सुरु केली. 

ही कापलेली लाकडे घेऊन जाण्यासाठी फॉरेस्ट ट्रेन सुरू झाली आणि हळूहळू लोकांच्या लहान लहान वस्त्या झाल्या आणि अशाप्रकारे जंगल परिसरात गावे वसवली गेली. 

आम्ही एक अतिशय विलक्षण गोष्ट पाहिली, ती म्हणजे ट्री स्पिरिट पॅगोडा. हे १९३५ मध्ये बांधले गेले होते. अलिशान जंगलात काही हजार वर्षे जुनी झाडे आहेत. जेव्हा ती झाडे कापली गेली, तेव्हा त्यांच्या आत्म्यांना वंदन करण्यासाठी, पूजा करून त्यांना शांत करण्यासाठी हे मंदिर, तिथे जंगलात बांधले गेले होते.



📷 Commons Wikimedia



📷 Commons Wikimedia

 

ही वर्तुळे, वृक्षांच्या वार्षिक वाढीची जी वर्तुळे खोडावर असतात, त्याचे प्रतीक आहेत. प्रत्येक पायरी म्हणजे 500 वर्षांची कालगणना. अशी एकूण ३००० वर्षे इथे दाखवलेली आहेत. समोर एक मंदिर आहे. ते बंद होते म्हणून वरून पायऱ्यांवरूनच त्याचा एक फोटो काढला होता.






आम्ही तिथे एक सुंदर तळे पाहिले. त्याविषयी काही मनोरंजक लोककथा देखील आहेत. त्या वेळपर्यंत मुसळधार पाऊस पडायला लागला होता, म्हणून पोंचोच्या बाहेर मोबाईल काढून, तळ्याचे फोटो काढण्याची हिम्मत केली नाही. 

दुसर्‍या दिवशी, पहाटे २.३० च्या सुमारास उठून यु शान पर्वतावर फेरफटका मारण्यासाठी व जंगलातील सर्वात उंच ठिकाणाहून दिसणारा सूर्योदय पाहण्यासाठी जायचे होते. 
हवामान अनुकूल असेल, तर ढगांच्या सागरातून सूर्य उगवताना बघायला मिळतो. 

यूशानच्या जंगलातील ह्या टूरने आम्हाला सुमारे 5000 वर्ष जुनी झाडे असलेल्या जंगलात नेले. पहाटे, अंधार आणि उजेडाच्या सीमारेषेवर, तिथे, त्या पुरातन किंवा (खरे तर नित्यनूतनही!) जंगलात असणे हा खरोखर एक जादूई अनुभव होता.


Yu Shan @5.14 a.m.



@5.27a.m.



The moon was still in the sky @5.29 a.m. 




Part of the trunk of a 5000 yrs old tree

 

@5.46 a.m. 



Have to hurry for watching sunrise!



Nearly 5000 year old tree






@6.03 a.m.


@ 6.14 a.m. 



@ 6.15a.m.



6.23 a.m.



Shopkeeper dressed like aborigines 


इतकी हजार वर्षे वयाची झाडे पाहून झाल्यावर, जेव्हा आम्ही जवळपास शंभर वर्षे वयाची झाडे पाहिली तेव्हा, ती अगदी लिंबू टिंबू वाटली. अगदी चिकूपिकूच म्हणाना! 




अलिशान फॉरेस्ट रेल्वे हे अजून एक मोठे आकर्षण होते. 


Alishan Railway station 



At the station gallery 



Upper floor of the station 












तो [प्रचंड मोठा लाल सायप्रसचा वृक्ष, दैवी वृक्ष म्हणून ओळखला जात असे. मेघगर्जना, सोसाट्याचा वारा व वीज कोसळल्यामुळे १९५३ आणि १९५६ मध्ये ह्या वृक्षाचे खूप नुकसान झाले. अखेर १९९७ मध्ये हा वृक्ष संपूर्ण कोसळला. म्हणून १९९८ मध्ये ह्या दैवी वृक्षासाठी एक निरोप समारंभ व पूजा पार पडली. ह्या वृक्षाला निसर्गाकडे परत जाण्याच्या यात्रेसाठी समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. त्या जागेवर जंगलातील अक्षय जीवन परंपरा कायम ठेवण्यासाठी, लाल सायप्रसची काही रोपे लावली गेली. ही माहिती ह्रदयस्पर्शी होती.





 





 











दुरुस्ती आणि देखभालीसाठी बराचसा रेल्वे मार्ग बंदच असल्याने आम्ही फक्त आलिशान ते सॅक्रीड ट्री रुटवरच प्रवास करू शकलो. 







Clear weather




Engulfing clouds



16 degrees at 10.45 a.m.



माझ्या आठवणीत अलिशान कायमचे कोरले गेले आहे. हजार वर्षे वयाची जुनी झाडे, चेरी ब्लॉसम- फुलांनी बहरलेली असंख्य झाडे, ट्री स्पिरिट पागोडा आणि दैवी वृक्षासाठी साजरा केला गेलेला निरोप सोहळा ह्या अलि शानविषयीच्या संस्मरणीय गोष्टी होत्या. 

अजून एक खूपच सुंदर गोष्ट म्हणजे जंगलात पाट्यांवर कविता लिहिलेल्या होत्या. गेल्या काही शतकांतील कवींच्या रचना होत्या त्या. त्यांच्या भाषेतून इंग्रजीत येताना, कदाचित अर्थाचा परिमळ थोडा कमीही झाला असण्याची शक्यता आहे. पण तरीही, दाट जंगलात आणि झाडाच्या सहवासात त्या काव्यरचना वाचणे खूपच आनंददायी होते. आता मला वाटतंय की मी त्या कविता लिहून घ्यायला हव्या होत्या. 

 अजूनही मला एका कवितेचा भावार्थ आठवतो. कवीने झाड किंवा जंगलातील अक्षय जीवनाविषयी सांगितले होते. कवीने लिहिले होते, 'जंगलाच्या जीवनात, काहीही कायम टिकत नाही परंतु सर्व काही अंतहीन आहे.' 

आता अलिशानचा निरोप घेण्याची वेळ आली होती !! अच्छा आलिशान.. आत्तापुरते तरी!!






#ThingsToSeeInTaiwan #AlishanSightseeing #TreeSpiritPagoda #WhenInTaiwanMustSeeAlishan #chikupiku 

 


Comments

  1. Vrunda, Enjoyed tour in Taivan . Love your writing style.

    ReplyDelete
  2. Very engaging writing. I am a big fan of you and your writing!!!

    ReplyDelete
  3. A small typing error, temperature caption should be 16 degree. Thanks

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...

शिवथरघळ

जर आपण भारताचा नकाशा पाहिला  तर आपल्याला नकाशात डावीकडे, गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत काळसर  हिरवी रेषा दिसते. ही रेषा  गुजराथ येथून सुरु होते  आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू मार्गे जाऊन केरळला पोहोचते. ती रेषा म्हणजेच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट म्हणजे दख्खनच्या पठाराची जणू किनारच आहे. दख्खन पठाराच्या काठावरच्या ह्या पर्वत रांगा आहेत.  या भागात बरीच जंगले, जलसाठे, धबधबे आहेत आणि जैवविविधता तसेच त्याचे वय यामुळे या भागाला 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून ओळखले गेले आहे. पश्चिम घाट हिमालयापेक्षाही जुना आहे! वरंधा घाट  📷विकिमीडिया कॉमन्स  पश्चिम घाट हा अनेक मुख्य नद्यांचे उगमस्थान आहे. वरील छायाचित्रात दिसते आहे त्या प्रमाणे, वर्षा ऋतूत या प्रदेशात अनेक धबधबे पाहायला मिळतात.  पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) अनेक सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे शिवथरघळ धबधबा. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण रौद्र सौंदर्यानिशी आणि ताकदीनिशी रोरावत खाली येताना दिसतो.  हा धबधबा सुमारे शंभर फूट उंचीवर...