Skip to main content

पंचमहाभूत मंदिरे

पंचमहाभूत - या विश्वातील प्रत्येक गोष्टीच्या निर्मितीचा आधार असलेली पाच तत्त्वे किंवा पाच घटक. पृथ्वी, आप/ जल, तेज/अग्नी, वायु आणि आकाश/अवकाश ही ती पाच तत्वे.
आम्ही ऐकले होते की या पाच घटकांचे प्रतिनिधित्व करणारी अशी पाच शिव मंदिरे आहेत. ही मंदिरे दक्षिण भारतात आहेत. आम्ही ती मंदिरे बघण्याची संधीच शोधत होतो! ऑगस्ट २०१८ मध्ये आम्ही त्या पाचपैकी तीन मंदिरे पाहू शकलो.
आम्ही कन्याकुमारीपासून सुरुवात केली होती. कन्याकुमारी ते चेन्नई या मार्गावरील सर्वात जवळचे मंदिर असल्याने, आम्ही प्रथम जलतत्वाच्या मंदिराला भेट दिली.
जांबुकेश्वरम मंदिर - तिरुवनाईकावल
हे मंदिर त्रिची जिल्ह्यातील श्रीरंगम बेटावर आहे. श्रीरंगम बेट कावेरी आणि कोलाडम नद्यांनी वेढलेले आहे. हे मंदिर पंचमहाभूतातील जलतत्वाचे मंदिर आहे आणि म्हणून हे शिवलिंग अप्पू लिंगम म्हणून ओळखले जाते.
शिवलिंगाखाली पाण्याचा प्रवाह आहे जो पावसाळ्यात हळूहळू वाढतो. परंतु वर्षभर, ते पाणी दिसत नसले तरी तो क्षीण का होईना, पण जलप्रवाह असतो. मंदिरात शिवलिंगाच्या सभोवती वेढलेले वस्त्र, जमिनीलगत ओले होते त्यावरून त्या जलप्रवाहाचे अस्तित्व लक्षात येते.
मंदिराचा परिसर विशाल आहे. किल्ल्यासारखी रुंद व उंच अशी बाहेरील भिंत आहे. एकाच्या आत एक असे, पाच विशाल प्राकार आहेत. त्यांच्या आत गोपुरम आणि हजारो सुंदर खांब असलेली सभागृहे आहेत. पाण्याचे साठे आहेत.
या मंदिराशी अनेक दंतकथा जोडल्या गेलेल्या आहेत. जांब हे एक फळ आहे, ज्याला इंग्रजीमध्ये रोज ऍपल किंवा जावा सफरचंद म्हणतात. मी दंतकथांबद्दल काही तपशीलवार सांगणार नाही, परंतु आख्यायिका दर्शविणारी शिल्पे पाहण्यासारखी आहेत, हे मात्र नक्की सांगेन!
खांबांवरील कोरीव काम फार सुंदर आहे. या मंदिराबद्दल एक विलक्षण गोष्ट आहे ती म्हणजे गर्भगृहाचे प्रवेशद्वार. जेव्हा आपण सर्वात आतील प्राकारात जातो, तेव्हा गर्भगृहाचे प्रवेशद्वार एका दगडी खिडकीने बंद केले आहे, असे आपल्याला दिसते. त्या खिडकीला जाळी आहे. त्यातून आपल्याला शिवलिंग दिसू शकते. 
प्रवेशद्वारासाठी, आपल्या उजव्या बाजूला, डावीकडे वळावे लागते! प्रवेशद्वार खूपच लहान आहे. त्यातून गाभाऱ्यात जाण्यासाठी तुम्हाला मान खाली वाकवूनच जावे लागते.
मंदिराचा विशाल परिसर, गगनचुंबी गोपुरम आणि मंदिराच्या उंचच उंच भिंती लक्षात घेता, गर्भगृहाचे प्रवेशद्वार इतके छोटे का असेल याचा आपण विचार करत राहतो!
मंदिराच्या आवारात देवी अखिलानंदेश्वरी मंदिर आहे. १५ ऑगस्ट २०१८ ह्या दिवशी आम्ही ह्या मंदिरात गेलो होतो. तेव्हा अनपेक्षितपणे आम्हाला एक उत्सव आणि मिरवणूक पाहण्याचे भाग्य लाभले!
मिरवणुक आतल्या प्राकारातून सुरू झाली आणि फेरी मारत तिने परिसरातील तलावाला भेट दिली. देवांना घातलेले सुंदर आणि अनोखे पुष्पहार, त्या दिव्याचा उजेड, वाद्यांचा आवाज, भाविकांची गर्दी .. अनपेक्षितपणे आम्हाला ह्या साऱ्याचा आनंद घेता आला.
जंबुकेश्वर मंदिर 
जंबुकेश्वर मंदिर 
जंबुकेश्वर मंदिर 
जंबुकेश्वर मंदिर 
मंदिराच्या आवारात नादस्वरम नावाच्या पारंपरिक सुषिर वादनाचे शिक्षण देणारे विद्यालय आहे.
जंबुकेश्वर मंदिर 
जंबुकेश्वर मंदिर 
जंबुकेश्वर मंदिर 
जंबुकेश्वर मंदिर 
त्रिचीमध्ये, आणखी एक सुंदर मंदिर आहे जे पंचमहाभूत मंदिरात समाविष्ट नाही, परंतु हे भारतातील सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक आहे. ते म्हणजे रंगनाथस्वामी मंदिर.
हे एक अतिशय प्राचीन वैष्णव मंदिर आहे. चौदाव्या शतकात मोगलांनी अनेकदा लुटलेले व नष्ट केलेले असे हे अत्यंत प्राचीन मंदिर आहे. त्यावेळी मंदिराचे रक्षण करण्याच्या प्रयत्नात १०,००० हून अधिक वैष्णव भक्त मरण पावले होते. काही दशकांनंतर, विजयनगर राजवटीत ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. पुन्हा पुन्हा या मंदिर आणि शहराला बर्‍याच हल्ल्यांचा सामना करावा लागला. पण सर्व हल्ले सहन करून, आजही हे मंदिर मोठ्या वैभवाने तळपते आहे.
रंगनाथस्वामी मंदिर, श्रीरंगम, त्रिची 
रंगनाथस्वामी मंदिर, श्रीरंगम, त्रिची 

रंगनाथस्वामी मंदिर, श्रीरंगम, त्रिची 
रंगनाथस्वामी मंदिर, श्रीरंगम, त्रिची 
आम्ही पाहिलेले दुसरे पंचमहाभूत मंदिर होते चिदंबरम मंदिर.
थिल्लई नटराज मंदिर किंवा चिदंबरम नटराज मंदिर.
हे मंदिर तामिळनाडूमधील कुडलोर जिल्ह्यातील चिदंबरम शहरात आहे. हे पॉन्डिचेरी ६० कि.मी. आणि तंजावूरपासून १०० कि.मी. अंतरावर आहे. शिव आपले सुप्रसिद्ध दैवी नृत्य करत असतानाची मूर्ती ही मंदिरातील मुख्य देवता आहे.
विशाल आवाराच्या आत बरीच लहान मंदिरे आहेत आणि चिदंबरम मंदिराचे गोपुरम, भारतातील मंदिरांच्या सर्वात उंच गोपुरांपैकी एक आहे. हे मंदिर पंचमहाभूताच्या आकाश तत्त्वाला समर्पित आहे.
हे एक प्रसिद्ध, महत्वाचे व प्रमुख मंदिर असल्याने येथे नेहमीच गर्दी असते. येथील शिवलिंग खूपच विलक्षण आहे. नृत्य नटराजा शिव मूर्ती आहे आणि तिथेच उजवीकडे चितसभेत एक रिकामी जागा आहे.
ही जागा ग्रंथांमध्ये 'रहस्य' म्हणून सांगितली गेली आहे. ही एक पडद्याने झाकलेली जागा आहे, जी बहुधा वर आकाशाला खुली आहे. ही जागा म्हणजेच आकाश तत्वातील शिवलिंग आहे असे मानले जाते. जर तुम्हाला त्याची एक झलक पहायची असेल तर तुम्हाला लांबच लांब रांगेत उभे रहावे लागेल!
थिल्लरी नटराज मंदिर/ चिदंबरम मंदिर 

तिसरे पंचमहाभूत मंदिर, जे आम्ही पाहू शकलो ते कांची येथे होते.
एकंबरेश्वर मंदिर
हे मंदिर चेन्नई जवळच्या कांची येथे आहे. हे भारतातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे आणि त्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये सापडतो. येथे, गर्भगृहात, पृथ्वीचे तत्व दर्शविणारे एक शिवलिंग आहे. मंदिरातील गोपुरांमध्ये आहेत, सर्वात उंच गोपूर १९२ फूट आहे.
एकंबरेश्वर मंदिर, कांची 
📷विकिमिडीया कॉमन्स 
या मंदिराविषयी एक वेगळी गोष्ट म्हणजे ह्या मंदिर परिसरात पार्वती मंदिर नाही. असे म्हणतात की कांची येथील कामाक्षी मंदिर हीच एकंबरेश्वरची पार्वती आहे.

कांची कामाक्षी मंदिर.
देवीची अत्यंत सुंदर मूर्ती म्हणजे या मंदिराची मुख्य देवता. लांब रांगेत उभे रहायला लागेलच. पण तरीही देवीची मूर्ती पाहण्यास विसरू नका. अप्रतिम आहे.
कांची कामाक्षी मंदिर 
कांची कामाक्षी मंदिर 
हे मंदिर तुमच्या 'अवश्य भेट देण्याच्या ' यादीमध्ये असलेच पाहिजे. मी तर म्हणेन, सर्वात सुंदर देवी मंदिर आहे हे!
सुमारे पाच एकरांच्या विशाल परिसरामध्ये अनेक लहान मंदिरे तसेच तलाव /तीर्थे आहेत.
आपण कांचीमध्ये असतांना श्री कांची कामकोटी पीठमला भेट द्यायला विसरू नका आणि शक्य असल्यास तेथील पूजेच्या वेळी उपस्थित रहा. पाहण्या, अनुभवण्याजोगे आणि आयुष्यभर लक्षात राहण्याजोगेच दृश्य आहे ते.
कांची रेशमी आणि सुती साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. व्हीगन असल्याने, रेशमी किड्यांचा संहार करून, रेशमी वस्त्र परिधान करणे मला अजिबातच मान्य नाही. म्हणून मी जरी रेशीम विकत घेत नसले तरी मला सुंदर सुती साड्या नक्कीच खरेदी करता आल्या! आम्ही ज्या दुकानात गेलो होतो त्या दुकानात मी आत्तापर्यंत पाहिलेल्या दुकानांपेक्षा कित्येक पटींनी मोठा असा साड्यांचा साठा होता!
ह्या फोटोला कॅप्शनची आवश्यकताच नाही!!
ह्या भागात असताना तुम्ही जेवणाची काळजीच करू नका. उत्तम, चविष्ट दक्षिण भारतीय शाकाहारी अन्न इथे मिळते.
अजून दोन पंचमहाभूत मंदिरे पाहायची राहिली आहेत. एक म्हणजे तामिळनाडू मधील अरुणाचलेश्वर मंदिर (अग्नि) आणि आंध्र प्रदेशातील श्रीकालहस्तेश्वर मंदिर (वायु). पण त्या ट्रिपमध्ये ह्या दोन्ही मंदिरांना भेट देता आली नाही.. आता पुन्हा कधीतरी.
चेन्नई हे कांचीहून सर्वात जवळचा विमानतळ आहे. ते कांचीपासून सुमारे 70 कि.मी. अंतरावर आहे.
विशेष सूचना - ज्या मंदिरात फोटो काढू नका असे लिहिलेले असेल तिथे कृपया फोटो काढू नका. 






Comments

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...

शिवथरघळ

जर आपण भारताचा नकाशा पाहिला  तर आपल्याला नकाशात डावीकडे, गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत काळसर  हिरवी रेषा दिसते. ही रेषा  गुजराथ येथून सुरु होते  आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू मार्गे जाऊन केरळला पोहोचते. ती रेषा म्हणजेच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट म्हणजे दख्खनच्या पठाराची जणू किनारच आहे. दख्खन पठाराच्या काठावरच्या ह्या पर्वत रांगा आहेत.  या भागात बरीच जंगले, जलसाठे, धबधबे आहेत आणि जैवविविधता तसेच त्याचे वय यामुळे या भागाला 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून ओळखले गेले आहे. पश्चिम घाट हिमालयापेक्षाही जुना आहे! वरंधा घाट  📷विकिमीडिया कॉमन्स  पश्चिम घाट हा अनेक मुख्य नद्यांचे उगमस्थान आहे. वरील छायाचित्रात दिसते आहे त्या प्रमाणे, वर्षा ऋतूत या प्रदेशात अनेक धबधबे पाहायला मिळतात.  पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) अनेक सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे शिवथरघळ धबधबा. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण रौद्र सौंदर्यानिशी आणि ताकदीनिशी रोरावत खाली येताना दिसतो.  हा धबधबा सुमारे शंभर फूट उंचीवर...