Skip to main content

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान

 काझीरंगा, मोठ्या पाचांचे घर!! कोण आहेत हे मोठे पाच? गेंडा, हत्ती, वाघ, हरीण आणि पाणम्हैस! काय आहे हे काझीरंगा? कुठे आहे हे काझीरंगा?

भारताच्या आसाम राज्यात काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे. ४०० चौ. कि. मी. पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेले हे उद्यान आसामच्या नागाव, गोलाघाट आणि कार्बी अँग्लोन्ग या तीन जिल्ह्यात पसरलेले आहे. 


भारतीय एकशिंगी गेंड्यांसाठी काझीरंगा राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की जगातील दोन तृतीयांश एकशिंगी गेंडे ह्या राष्ट्रीय उद्यानात आहेत. युनेस्कोने हे उद्यान जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलेले आहे. 

ह्या उद्यानातील वाघांच्या वाढत्या संख्येमुळे ह्याला वाघांचे अभयारण्य म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. 

ब्रह्मपुत्रेसह काही नद्या ह्या राष्ट्रीय उद्यानातून वाहतात. तसेच अजूनही अनेक तळी, तलाव ह्या राष्ट्रीय उद्यानात आढळतात. ह्यामुळे इथे घनदाट जंगल, उंचच उंच हत्ती गवत आणि दलदलीची जमीन आढळते. जवळपास वर्षभर हा परिसर हिरवा असतो. 



Kaziranga National Park


काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, मानस आणि पोबितोरा ह्या इतर दोन अभयारण्यांना नदीतल्या छोट्या छोट्या बेटांनी जोडलेले आहे. त्यामुळे वन्य जीव त्या मार्गाने एका उद्यानातून दुसऱ्या उद्यानात जाऊ शकतात. ह्यामुळे त्यातील प्रत्येकच अभयारण्यात आणि राष्ट्रीय उद्यानात जैव विविधता आढळून येते. 

आसाम बील साठी प्रसिद्ध आहे आणि काझीरंगा ह्याला अपवाद नाही. ह्या राष्ट्रीय उद्यानात अनेक बील आहे. ज्यांना बील म्हणजे काय ते माहिती नाही त्यांच्यासाठी - बील म्हणजे तळ्यासारखी पाणथळ जागा. नदीला पूर आला आणि नंतर पुराचे पाणी ओसरले तरी काही खोल जागी पाणी साठलेलेच राहते आणि बील तयार होते. आसाम आणि पश्चिम बंगाल मध्ये गंगा आणि ब्रम्हपुत्रा नद्यांच्या खोऱ्यात अशी अनेक बील आहेत. एकशिंगी गेंड्याना पाणी आवडते. त्यामुळे साधारणपणे ते ह्या बीलच्या आसपास दिसतात. 
 











ही अशी पाणक्षेत्रे आणि उंच उंच हत्ती गवत काझीरंगाचे वैशिष्ट्य आहे. हत्ती गवत शाकाहारी एकशिंगी गेंड्यांसाठी अन्न म्हणून तर उपयोगात येतेच शिवाय इतर अनेक प्राण्यांनाही राहायला, लपायला आडोसा मिळतो. 












 काझीरंगामधील बील आणि तळ्यांच्या पाण्यात अनेक प्रकारच्या पाणवनस्पती, हायसिंथस दिसतात. संपूर्ण आसाम आणि आजूबाजूच्या राज्यात शिंगाडा पाण्यात वाढताना दिसतो. गेंड्याना ह्या वनस्पती खायला आवडतात. 



 





दरवर्षी पावसाळ्यात काझीरंगात पुराचे पाणी शिरते आणि वन्य जीवन धोक्यात येते. त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट घडते ती म्हणजे पुराच्या पाण्याबरोबर सुपीक गाळाची माती वाहून येते ती काझीरंगात साठून राहते आणि त्यामुळे ह्या संपूर्ण प्रदेशात वनस्पतींची वाढ उत्तम होते.

पुराच्या संकटकाळात गेंडे आणि इतर वन्य जीव कार्बी अँग्लोन्ग भागातल्या जरा उंचावर असलेल्या प्रदेशात जातात. जे जाऊ शकत नाहीत त्यांना मात्र जमिनीच्या उंचवटा असलेल्या छोट्याश्या भागात अडकून पडावे लागते. २०१७ मध्ये आलेल्या पुराने काझीरंगाचे अतोनात नुकसान केले. प्राण्यांना आसरा घेता येईल असे अनेक कृत्रिम उंचवटे भारतीय सैन्यदलाने तिथे तयार केलेले आहेत. 

काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाने आपला शतक पूर्ती महोत्सव २००५ मध्ये साजरा केला. असे म्हणतात कि १९०४ मध्ये तत्कालीन भारतीय व्हॉइसराय ची पत्नी मेरी कर्झन जेव्हा काझीरंगात गेंडे बघण्यासाठी गेली तेव्हा तिला एकही गेंडा दिसला नाही. ह्या जंगलाची अशी धोकादायक परिस्थिती, गेंड्यांची कमी होत जाणारी संख्या ह्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन १९०५ मध्ये काझीरंगा प्रस्तावित अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. पुढे वेळोवेळी त्या अभयारण्याचे क्षेत्रफळ वाढवले गेले आणि परिणाम म्हणून आज आपण असे भव्य राष्ट्रीय उद्यान पाहत आहोत. ह्या ठिकाणाचे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान असे नामकरण १९५० मध्ये केले गेले. 

त्याचे नाव काझीरंगा कसे पडले त्याच्या अनेक लोककथा, कहाण्या सांगितल्या जातात. पण इतिहासकारांचे म्हणणे आहे की काझीरंगा हा शब्द आला काज़ीर - ओ - रोंग अशा कार्बी भाषेतील शब्दावरून. त्याचा अर्थ आहे काज़ीर नावाच्या मुलीचे घर. काज़ीर ही कोणे एके काळी त्या भागाची शासक होती. 

जंगलाच्या अंतर्भागात जाण्यासाठी जीपच्या आणि हत्तीच्या सफारी उपलब्ध असतात. अर्थातच पर्यटकांना मर्यादित भागातच प्रवेश आहे आणि ठराविक मार्गानेच जावे लागते. फक्त वन खात्याचे अधिकारीच काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील संपूर्ण अंतर्भागात हिंडू शकतात. 

आम्ही जीप सफारी घेतली होती. जीप सफारीसाठी दोन वेळा असतात, एक अगदी लवकर सकाळी आणि दुसरी दुपारी साधारण अडीचच्या सुमारास असते. दोन्ही वेळी आपल्याला साधारण २-३ तास हिंडवून आणतात. 

सफारीसाठी चार मार्ग आहेत. तुमच्याबरोबर असलेला गाईड/ ड्रायव्हर तुम्हाला कोणत्या वेळी कोणता मार्ग घ्यावा त्याचे मार्गदर्शन करेल. कोणत्या ठिकाणी सध्या कोणते प्राणी दिसत आहेत ते त्यांना साधारणपणे माहिती असते. 

उद्यानाच्या प्रवेशद्वाराशी अनुमतीपत्र मिळते. ते घेऊन मगच आत जाता येते. तुम्हाला तुमची वाहने घेऊन आत जात येत नाही. वन खात्याकडे नोंदणी केलेली वाहने असतील ती भाड्याने घेऊन, तिथलाच नोंदणीकृत ड्रायव्हर घेऊनच जाता येते. 


Information - 3rd Nov.2019
📷Girish Tilak 


आम्ही बागोरी मार्ग घेतला होता. काझीरंगाच्या पश्चिम क्षेत्रात फिरवून आणणारा हा मार्ग डोंगा कॅम्प मध्ये नेऊन आणतो. आत्तापर्यंत तुम्ही पाहिलेत ते सगळे फोटो ३ नोव्हेंबर २०१९ सकाळच्या बागोरी मार्ग जीप सफारीचेच आहेत. आम्हाला ह्या मार्गावर खूप एकशिंगी गेंडे दिसले. 

ह्या क्षेत्रात खूप पक्षी दिसतात. गरुड, सारसपक्षी, पेलिकन्स, बदके, हंस हे त्यातील काही पक्षी. तुमच्याकडे जर का चांगला कॅमेरा असेल आणि तुमचा हात स्थिर असेल तरच तुम्हाला चालत्या जीपमधून, उडत्या पक्ष्यांचे फोटो काढता येतात. 



In front of the Donga Camp.
📷Girish Tilak 


एकशिंगी गेंड्यांच्या बाबत एक मनोरंजक गोष्ट म्हणजे ते शी करायला त्याच ठरलेल्या ठिकाणी परत येतात. त्यामुळे सफारीच्या रस्त्यात बाजूला, अनेक ठिकाणी शी चे ढिगारे दिसतात. ते नैसर्गिक रित्या विघटित होऊन जाईपर्यंत तसेच ठेवले जातात आणि मग ते मातीत मिसळून मातीचा कस वाढवतात! 

काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात अनेक वाघ असले तरी दाट जंगलामुळे आणि उंच हत्ती गवतामुळे ते दिसत नाहीत. त्यांचे अस्तित्व जाणवते ते त्यांच्या पायांच्या खुणांमुळे आणि त्यांनी खाल्लेल्या प्राण्यांच्या अवशेषांमुळे!

काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात खूप हत्ती आणि जंगली पाणम्हशीदेखील आहेत. दुपारच्या सफारीमध्ये आम्हाला त्या मोठ्या पाचांपैकी उरलेला पाचवा दिसला. ते म्हणजे हरीण. हरणांपैकी बारशिंगी, सांबर, भेकर हे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात खूप मोठ्या प्रमाणात आहेत. सूर्यास्ताच्या सुमाराला आम्हाला पुष्कळ हरणे आणि हत्ती दिसले. 

आम्ही दुपारच्या जीप सफारीला दुपारी अडीचच्या सुमाराला सुरुवात केली. जेव्हा साधारण अडीच तास फिरून आम्ही परत आलो तेव्हा गडद अंधार झाला होता! त्या दिवशी सूर्यास्त साडेचारच्या सुमाराला झाला. आम्ही मध्य भागाची सफारी घेतली होती. दफलांग डिफओलू नदीच्या किनाऱ्याजवळ आम्ही सूर्यास्ताच्या वेळी होतो.



Water body



Beel



Surroundings



Watch Tower








पाण्याजवळ चरणारी हरणे!




मी काढलेल्या सर्वात चांगल्या फोटोंपैकी एक!!




Water body



pugmarks and mounds of poop!




When the road is beautiful, who would want the journey to end!




Watch tower near the Diffolu river bank. 




Jeeps and too many people




About to set!




Last few minutes..and ..gone




Their day starts when the sun sets.




Out for a walk!!!















Must be the Safari elephants.


सूर्यास्तानंतर जंगलात प्रवास करणे खूपच अनोखा अनुभव आहे. सगळे जगच चंद्रप्रकाशात वेगळे दिसते. खूप आनंददायी आणि मन शांत करत जाणारा अनुभव असतो तो. वाऱ्याने हलकेच हलणारी झाडांची पाने, पाण्यात चमकणारे चंद्राचे किरण, मध्येच उडत जाणारे पक्षी, आजूबाजूला प्राण्यांच्या चाहुलीचा भास आणि आपण सुरक्षित जीपमध्ये असल्याने हा आनंद उपभोगता येण्याजोगी स्थिती!!

प्राणी पाणी पिण्यासाठी बाहेर पडलेले होते. सगळीकडे शांतता. जीपच्या इंजिनचा अगदी हळू येणारा आवाज पण खूप मोठा आहे असे वाटत होते.

काझीरंगाच्या पर्यटनाची सुरुवात १ नोव्हेंबर ला होते. आम्ही तेथे ३ नोव्हेंबरला होतो. जंगलात खूप लोक जीप सफारी घेतलेले फिरत होते. त्यांचा मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज जंगलातल्या शांततेवर ओरखाडे उमटवत होता. 

प्राण्यांच्या घरात एकतर आपण त्यांना न विचारता येतो, फिरतो. मग निदान काही नियम तरी पाळायला हवेत. 

अगदी शांतता पाळायला हवी. अत्यावश्यक असेल तेव्हाच आणि तेवढेच बोलावे. मातकट रंगाचे, जंगलाशी, झाडांशी, मातीशी सुसंगत असतील असे कपडे घालावे. भडक रंग जसे लाल, पिवळा, केशरी, गडद निळा असे घालू नये. प्राणी बिचकतात. उग्र वासाची अत्तरे, रासायनिक वासांचे किडे पळवणारे स्प्रेज मारून जंगलात जाउ नये. हे नियम तर अगदी सहज कोणालाही सुचतील आणि पाळता येतील असेच आहेत. 

हे नियम पाळले तर प्राण्यांनाही त्रास होणार नाही आणि तुम्हाला देखील जास्त प्राणी बघायला मिळतील.

संध्याकाळी ऑर्किड गार्डन जवळचा सांस्कृतिक कार्यक्रम बघायला विसरू नका. आसामची आणि एकूणच पूर्वांचलाची लोकगीते, लोकनृत्ये बघणे आनंददायी आहे. 

तिथे समोरच एक बाजार आहे. तिथे हस्तकलेच्या, विणकामाच्या वस्तू, शाली, ओढण्या,स्टोल्स विकत घेणे हे आद्यकर्तव्य आहेच!! खूप सुंदर, मनमोहक वस्तू, कापडे तिथे मिळतात. 










#OneHornedRhino #Naturalreserve #JeepSafari #HowToTravelInKaziranga #MustVisitPlacesInIndia #SanctuaryInIndia #TouristPlaceInAssam




Comments

  1. वाहवा नक्की एकदा भेट द्यायला हवी. फोटो खूप सुंदर आले आहेत.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद! नक्कीच भेट द्यायला हवी!

      Delete
  2. फोटो अप्रतिम 👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अरुंधती!

      Delete
  3. सुंदर लेख अप्रतिम फोटो. माझी काझीरंगा भेट आठवली.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद!! पुन: प्रत्ययाचा आनंद!

      Delete
  4. Thanks for this lovely tour of Kazeeranga .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...

शिवथरघळ

जर आपण भारताचा नकाशा पाहिला  तर आपल्याला नकाशात डावीकडे, गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत काळसर  हिरवी रेषा दिसते. ही रेषा  गुजराथ येथून सुरु होते  आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू मार्गे जाऊन केरळला पोहोचते. ती रेषा म्हणजेच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट म्हणजे दख्खनच्या पठाराची जणू किनारच आहे. दख्खन पठाराच्या काठावरच्या ह्या पर्वत रांगा आहेत.  या भागात बरीच जंगले, जलसाठे, धबधबे आहेत आणि जैवविविधता तसेच त्याचे वय यामुळे या भागाला 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून ओळखले गेले आहे. पश्चिम घाट हिमालयापेक्षाही जुना आहे! वरंधा घाट  📷विकिमीडिया कॉमन्स  पश्चिम घाट हा अनेक मुख्य नद्यांचे उगमस्थान आहे. वरील छायाचित्रात दिसते आहे त्या प्रमाणे, वर्षा ऋतूत या प्रदेशात अनेक धबधबे पाहायला मिळतात.  पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) अनेक सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे शिवथरघळ धबधबा. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण रौद्र सौंदर्यानिशी आणि ताकदीनिशी रोरावत खाली येताना दिसतो.  हा धबधबा सुमारे शंभर फूट उंचीवर...