मुख्य सामग्रीवर वगळा

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान

 काझीरंगा, मोठ्या पाचांचे घर!! कोण आहेत हे मोठे पाच? गेंडा, हत्ती, वाघ, हरीण आणि पाणम्हैस! काय आहे हे काझीरंगा? कुठे आहे हे काझीरंगा?

भारताच्या आसाम राज्यात काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे. ४०० चौ. कि. मी. पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेले हे उद्यान आसामच्या नागाव, गोलाघाट आणि कार्बी अँग्लोन्ग या तीन जिल्ह्यात पसरलेले आहे. 


भारतीय एकशिंगी गेंड्यांसाठी काझीरंगा राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की जगातील दोन तृतीयांश एकशिंगी गेंडे ह्या राष्ट्रीय उद्यानात आहेत. युनेस्कोने हे उद्यान जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलेले आहे. 

ह्या उद्यानातील वाघांच्या वाढत्या संख्येमुळे ह्याला वाघांचे अभयारण्य म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. 

ब्रह्मपुत्रेसह काही नद्या ह्या राष्ट्रीय उद्यानातून वाहतात. तसेच अजूनही अनेक तळी, तलाव ह्या राष्ट्रीय उद्यानात आढळतात. ह्यामुळे इथे घनदाट जंगल, उंचच उंच हत्ती गवत आणि दलदलीची जमीन आढळते. जवळपास वर्षभर हा परिसर हिरवा असतो. 



Kaziranga National Park


काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, मानस आणि पोबितोरा ह्या इतर दोन अभयारण्यांना नदीतल्या छोट्या छोट्या बेटांनी जोडलेले आहे. त्यामुळे वन्य जीव त्या मार्गाने एका उद्यानातून दुसऱ्या उद्यानात जाऊ शकतात. ह्यामुळे त्यातील प्रत्येकच अभयारण्यात आणि राष्ट्रीय उद्यानात जैव विविधता आढळून येते. 

आसाम बील साठी प्रसिद्ध आहे आणि काझीरंगा ह्याला अपवाद नाही. ह्या राष्ट्रीय उद्यानात अनेक बील आहे. ज्यांना बील म्हणजे काय ते माहिती नाही त्यांच्यासाठी - बील म्हणजे तळ्यासारखी पाणथळ जागा. नदीला पूर आला आणि नंतर पुराचे पाणी ओसरले तरी काही खोल जागी पाणी साठलेलेच राहते आणि बील तयार होते. आसाम आणि पश्चिम बंगाल मध्ये गंगा आणि ब्रम्हपुत्रा नद्यांच्या खोऱ्यात अशी अनेक बील आहेत. एकशिंगी गेंड्याना पाणी आवडते. त्यामुळे साधारणपणे ते ह्या बीलच्या आसपास दिसतात. 
 











ही अशी पाणक्षेत्रे आणि उंच उंच हत्ती गवत काझीरंगाचे वैशिष्ट्य आहे. हत्ती गवत शाकाहारी एकशिंगी गेंड्यांसाठी अन्न म्हणून तर उपयोगात येतेच शिवाय इतर अनेक प्राण्यांनाही राहायला, लपायला आडोसा मिळतो. 












 काझीरंगामधील बील आणि तळ्यांच्या पाण्यात अनेक प्रकारच्या पाणवनस्पती, हायसिंथस दिसतात. संपूर्ण आसाम आणि आजूबाजूच्या राज्यात शिंगाडा पाण्यात वाढताना दिसतो. गेंड्याना ह्या वनस्पती खायला आवडतात. 



 





दरवर्षी पावसाळ्यात काझीरंगात पुराचे पाणी शिरते आणि वन्य जीवन धोक्यात येते. त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट घडते ती म्हणजे पुराच्या पाण्याबरोबर सुपीक गाळाची माती वाहून येते ती काझीरंगात साठून राहते आणि त्यामुळे ह्या संपूर्ण प्रदेशात वनस्पतींची वाढ उत्तम होते.

पुराच्या संकटकाळात गेंडे आणि इतर वन्य जीव कार्बी अँग्लोन्ग भागातल्या जरा उंचावर असलेल्या प्रदेशात जातात. जे जाऊ शकत नाहीत त्यांना मात्र जमिनीच्या उंचवटा असलेल्या छोट्याश्या भागात अडकून पडावे लागते. २०१७ मध्ये आलेल्या पुराने काझीरंगाचे अतोनात नुकसान केले. प्राण्यांना आसरा घेता येईल असे अनेक कृत्रिम उंचवटे भारतीय सैन्यदलाने तिथे तयार केलेले आहेत. 

काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाने आपला शतक पूर्ती महोत्सव २००५ मध्ये साजरा केला. असे म्हणतात कि १९०४ मध्ये तत्कालीन भारतीय व्हॉइसराय ची पत्नी मेरी कर्झन जेव्हा काझीरंगात गेंडे बघण्यासाठी गेली तेव्हा तिला एकही गेंडा दिसला नाही. ह्या जंगलाची अशी धोकादायक परिस्थिती, गेंड्यांची कमी होत जाणारी संख्या ह्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन १९०५ मध्ये काझीरंगा प्रस्तावित अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. पुढे वेळोवेळी त्या अभयारण्याचे क्षेत्रफळ वाढवले गेले आणि परिणाम म्हणून आज आपण असे भव्य राष्ट्रीय उद्यान पाहत आहोत. ह्या ठिकाणाचे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान असे नामकरण १९५० मध्ये केले गेले. 

त्याचे नाव काझीरंगा कसे पडले त्याच्या अनेक लोककथा, कहाण्या सांगितल्या जातात. पण इतिहासकारांचे म्हणणे आहे की काझीरंगा हा शब्द आला काज़ीर - ओ - रोंग अशा कार्बी भाषेतील शब्दावरून. त्याचा अर्थ आहे काज़ीर नावाच्या मुलीचे घर. काज़ीर ही कोणे एके काळी त्या भागाची शासक होती. 

जंगलाच्या अंतर्भागात जाण्यासाठी जीपच्या आणि हत्तीच्या सफारी उपलब्ध असतात. अर्थातच पर्यटकांना मर्यादित भागातच प्रवेश आहे आणि ठराविक मार्गानेच जावे लागते. फक्त वन खात्याचे अधिकारीच काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील संपूर्ण अंतर्भागात हिंडू शकतात. 

आम्ही जीप सफारी घेतली होती. जीप सफारीसाठी दोन वेळा असतात, एक अगदी लवकर सकाळी आणि दुसरी दुपारी साधारण अडीचच्या सुमारास असते. दोन्ही वेळी आपल्याला साधारण २-३ तास हिंडवून आणतात. 

सफारीसाठी चार मार्ग आहेत. तुमच्याबरोबर असलेला गाईड/ ड्रायव्हर तुम्हाला कोणत्या वेळी कोणता मार्ग घ्यावा त्याचे मार्गदर्शन करेल. कोणत्या ठिकाणी सध्या कोणते प्राणी दिसत आहेत ते त्यांना साधारणपणे माहिती असते. 

उद्यानाच्या प्रवेशद्वाराशी अनुमतीपत्र मिळते. ते घेऊन मगच आत जाता येते. तुम्हाला तुमची वाहने घेऊन आत जात येत नाही. वन खात्याकडे नोंदणी केलेली वाहने असतील ती भाड्याने घेऊन, तिथलाच नोंदणीकृत ड्रायव्हर घेऊनच जाता येते. 


Information - 3rd Nov.2019
📷Girish Tilak 


आम्ही बागोरी मार्ग घेतला होता. काझीरंगाच्या पश्चिम क्षेत्रात फिरवून आणणारा हा मार्ग डोंगा कॅम्प मध्ये नेऊन आणतो. आत्तापर्यंत तुम्ही पाहिलेत ते सगळे फोटो ३ नोव्हेंबर २०१९ सकाळच्या बागोरी मार्ग जीप सफारीचेच आहेत. आम्हाला ह्या मार्गावर खूप एकशिंगी गेंडे दिसले. 

ह्या क्षेत्रात खूप पक्षी दिसतात. गरुड, सारसपक्षी, पेलिकन्स, बदके, हंस हे त्यातील काही पक्षी. तुमच्याकडे जर का चांगला कॅमेरा असेल आणि तुमचा हात स्थिर असेल तरच तुम्हाला चालत्या जीपमधून, उडत्या पक्ष्यांचे फोटो काढता येतात. 



In front of the Donga Camp.
📷Girish Tilak 


एकशिंगी गेंड्यांच्या बाबत एक मनोरंजक गोष्ट म्हणजे ते शी करायला त्याच ठरलेल्या ठिकाणी परत येतात. त्यामुळे सफारीच्या रस्त्यात बाजूला, अनेक ठिकाणी शी चे ढिगारे दिसतात. ते नैसर्गिक रित्या विघटित होऊन जाईपर्यंत तसेच ठेवले जातात आणि मग ते मातीत मिसळून मातीचा कस वाढवतात! 

काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात अनेक वाघ असले तरी दाट जंगलामुळे आणि उंच हत्ती गवतामुळे ते दिसत नाहीत. त्यांचे अस्तित्व जाणवते ते त्यांच्या पायांच्या खुणांमुळे आणि त्यांनी खाल्लेल्या प्राण्यांच्या अवशेषांमुळे!

काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात खूप हत्ती आणि जंगली पाणम्हशीदेखील आहेत. दुपारच्या सफारीमध्ये आम्हाला त्या मोठ्या पाचांपैकी उरलेला पाचवा दिसला. ते म्हणजे हरीण. हरणांपैकी बारशिंगी, सांबर, भेकर हे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात खूप मोठ्या प्रमाणात आहेत. सूर्यास्ताच्या सुमाराला आम्हाला पुष्कळ हरणे आणि हत्ती दिसले. 

आम्ही दुपारच्या जीप सफारीला दुपारी अडीचच्या सुमाराला सुरुवात केली. जेव्हा साधारण अडीच तास फिरून आम्ही परत आलो तेव्हा गडद अंधार झाला होता! त्या दिवशी सूर्यास्त साडेचारच्या सुमाराला झाला. आम्ही मध्य भागाची सफारी घेतली होती. दफलांग डिफओलू नदीच्या किनाऱ्याजवळ आम्ही सूर्यास्ताच्या वेळी होतो.



Water body



Beel



Surroundings



Watch Tower








पाण्याजवळ चरणारी हरणे!




मी काढलेल्या सर्वात चांगल्या फोटोंपैकी एक!!




Water body



pugmarks and mounds of poop!




When the road is beautiful, who would want the journey to end!




Watch tower near the Diffolu river bank. 




Jeeps and too many people




About to set!




Last few minutes..and ..gone




Their day starts when the sun sets.




Out for a walk!!!















Must be the Safari elephants.


सूर्यास्तानंतर जंगलात प्रवास करणे खूपच अनोखा अनुभव आहे. सगळे जगच चंद्रप्रकाशात वेगळे दिसते. खूप आनंददायी आणि मन शांत करत जाणारा अनुभव असतो तो. वाऱ्याने हलकेच हलणारी झाडांची पाने, पाण्यात चमकणारे चंद्राचे किरण, मध्येच उडत जाणारे पक्षी, आजूबाजूला प्राण्यांच्या चाहुलीचा भास आणि आपण सुरक्षित जीपमध्ये असल्याने हा आनंद उपभोगता येण्याजोगी स्थिती!!

प्राणी पाणी पिण्यासाठी बाहेर पडलेले होते. सगळीकडे शांतता. जीपच्या इंजिनचा अगदी हळू येणारा आवाज पण खूप मोठा आहे असे वाटत होते.

काझीरंगाच्या पर्यटनाची सुरुवात १ नोव्हेंबर ला होते. आम्ही तेथे ३ नोव्हेंबरला होतो. जंगलात खूप लोक जीप सफारी घेतलेले फिरत होते. त्यांचा मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज जंगलातल्या शांततेवर ओरखाडे उमटवत होता. 

प्राण्यांच्या घरात एकतर आपण त्यांना न विचारता येतो, फिरतो. मग निदान काही नियम तरी पाळायला हवेत. 

अगदी शांतता पाळायला हवी. अत्यावश्यक असेल तेव्हाच आणि तेवढेच बोलावे. मातकट रंगाचे, जंगलाशी, झाडांशी, मातीशी सुसंगत असतील असे कपडे घालावे. भडक रंग जसे लाल, पिवळा, केशरी, गडद निळा असे घालू नये. प्राणी बिचकतात. उग्र वासाची अत्तरे, रासायनिक वासांचे किडे पळवणारे स्प्रेज मारून जंगलात जाउ नये. हे नियम तर अगदी सहज कोणालाही सुचतील आणि पाळता येतील असेच आहेत. 

हे नियम पाळले तर प्राण्यांनाही त्रास होणार नाही आणि तुम्हाला देखील जास्त प्राणी बघायला मिळतील.

संध्याकाळी ऑर्किड गार्डन जवळचा सांस्कृतिक कार्यक्रम बघायला विसरू नका. आसामची आणि एकूणच पूर्वांचलाची लोकगीते, लोकनृत्ये बघणे आनंददायी आहे. 

तिथे समोरच एक बाजार आहे. तिथे हस्तकलेच्या, विणकामाच्या वस्तू, शाली, ओढण्या,स्टोल्स विकत घेणे हे आद्यकर्तव्य आहेच!! खूप सुंदर, मनमोहक वस्तू, कापडे तिथे मिळतात. 










#OneHornedRhino #Naturalreserve #JeepSafari #HowToTravelInKaziranga #MustVisitPlacesInIndia #SanctuaryInIndia #TouristPlaceInAssam




टिप्पण्या

  1. वाहवा नक्की एकदा भेट द्यायला हवी. फोटो खूप सुंदर आले आहेत.

    उत्तर द्याहटवा
  2. सुंदर लेख अप्रतिम फोटो. माझी काझीरंगा भेट आठवली.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

कोस्टल कर्नाटक ६ - अविस्मरणीय शरावती बॅकवॉटर बोटिंग, शरावती कांडला मॅन्ग्रोव्ह बोर्ड वॉक

मी आधीच्या पोस्टमध्ये सांगितले होते की आजचा सूर्यास्त समुद्रात होता तर उद्याचा सूर्योदय शरावती नदीत असणार आहे! तोच हा सूर्योदय शरावती नदीत, कमळांच्या मध्ये.  शरावती बॅकवॉटर बोटिंग  दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहापर्यंत आम्ही बोटिंगच्या ठिकाणी पोचलो. कारण आम्हाला सूर्योदय चुकवायचा नव्हता. होनावर जवळचे शरावती नदीतील बोटिंग हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.  आजूबाजूची शांतता, संथ पाणी, स्वच्छ नितळ पाण्यात वाकून आपले प्रतिबिंब न्याहाळणारी नारळाची झाडे, पाण्यात अध्ये मध्ये असलेली लहानशी बेटे, खारफूटीची जंगले, कमळाची पाण्यावर तरंगणारी पाने, उगवत्या सूर्याची पाण्यात मिसळणारी किरणे, त्याने तांबूस झालेले पाणी .. एक वेगळेच जग असते ते. तुम्ही जितक्या वेळासाठी बोट ठरवलेली असेल.. तास दीड तास..  तो वेळ, तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असणार हे मी अगदी खात्रीने सांगू शकते.  आपोआप जगाचा, आयुष्याचा कोलाहल मंद होत जातो. पहाटेचा मवाळ प्रकाश, पाण्यावर हेलकावणारी नाव, हवेतला अगदी किंचितसा सुखद गारवा आणि मुरत जाणारी शांतता ह्या सगळ्याने मन निवळत जाते.  आम्ही गेलो त्या दिवशी,...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका  आज उडुपीहून लवकर निघून शृंगेरीला पोचण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच निघालो. रस्ता खूपच छान होता. आता खरं सांगायचे तर कोस्टल कर्नाटक प्रवासात रस्ता सुंदर होता म्हणणे ही द्विरुक्तीच आहे.  सगळ्या सडका अगदी एका पातळीतील आणि गुळगुळीत आहेत. खड्डे खळगे, रस्ते वर खाली असणे असे काही नसल्याने महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हाला थोडे चुकल्यासारखे वाटले खरे!!! शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, स्वच्छता ह्यामुळे प्रवास फार आनंदाचा होतो. उडुपी शृंगेरी रस्ता तर आगुंबे जंगलातून जातो. त्यामुळे दाट झाडी होती. रस्त्यात सुप्रसिद्ध आगुंबे घाटही येतोच. सकाळची प्रसन्न वेळ आणि इतका छान रस्ता..दिवसाची चांगली सुरुवात होण्यासाठी आणखी काय पाहिजे?!!  आम्हाला वाटले होते इतक्या लवकर फारसे कोणी श्रुंगेरीत आलेले नसेल. पण शृंगेरीला पोचल्यावर लक्षात आले की आमच्यासारखाच विचार अनेकांनी केला होता!  अनेक बस रात्रभराचा प्रवास करून सकाळी शृंगेरीला पोचल्या होत्या. त्या लोकांच्या प्रातर्विधी आणि अंघोळीसाठी अनेक ठिकाणी माफक पैसे घेऊन उत्तम सोय केलेली होती....

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....