मुख्य सामग्रीवर वगळा

मेडता - मीराबाईंचे निवासस्थान आणि नागौर किल्ला 

गीताजयंती नुकतीच म्हणजे 25 डिसेंबर 2020 रोजी साजरी केली गेली. जगातील हे एकमेव आणि अनोखे उदाहरण आहे, जिथे एका पुस्तकाचा वाढदिवस इतक्या मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. सध्या वातावरणात सगळीकडे कृष्ण भक्ती आहे, तेव्हा मला भगवान कृष्णाच्या महान भक्त संत मीराबाईंच्या गावाबद्दल, घराबद्दल लिहायला आवडेल. 

महान कवी व कृष्णभक्त असलेल्या संत मीराबाई यांचे मूळ ठिकाण राजस्थानमधील मेडता हे आहे. त्यांचे जन्मस्थान हे मेडता जवळील एक छोटेसे गाव आहे आणि बालपणी त्या मेडता येथे राहिल्या होत्या. 



Young Meerabai Raja Ravi Varma's painting
📷 wikipedia


मेडता हे गाव भारतातील राजस्थान राज्याच्या नागौर जिल्ह्यात आहे. हे गाव पुष्कर जवळ आहे. पुष्कर हे ठिकाण पुष्कर तलाव आणि ब्रम्हा मंदिरासाठी प्रसिद्ध आहेत. आपण पुष्करहुन मेडता आणि नागौर ची एक दिवसाची ट्रिप करू शकतो. पुष्करपासून मेडता फक्त ६१ कि. मी. अंतरावर आहे. मेड़ता- जोधपूर हे अंतर १२५ कि.मी. आणि मेडता जयपूर हे अंतर २१० कि. मी. आहे. पुष्करहून बिकानेरला जाताना आम्ही मेडता येथे गेलो होतो. राजस्थानमधील रस्ते खरोखर चांगले आहेत. राजस्थानमधील महामार्गांवर अधुनमधून नीलगाईंचे दर्शन होईल !!



Pushkar Lake



संत मीराबाईंचा जन्म १४९८ मध्ये जोधपूर साम्राज्याचे संस्थापक राव जोधामल यांच्या कुटुंबात झाला. ते मीराबाईचे पणजोबा होते. बालपणी त्या आजोबा राव दुदामल यांच्याजवळ मेडता येथील राजवाड्यात राहिल्या होत्या. राव दुदामल हे मेडता राजपूत कुळाचे संस्थापक होते. मीराबाईंचे संगीत, धार्मिक ज्ञान, राजकारण आणि युद्धकलेचे शिक्षण घरीच झाले. त्या कृष्णाच्या महान भक्त होत्या आणि त्यांनी आपले जीवन कृष्णाला समर्पित केले होते.

त्यांचे लग्न चित्तोड येथील युवराज भोजराज ह्यांच्याशी झाले होते. त्या एक महान संत आणि भक्तिमार्गातील प्रसिद्ध कवियत्री होत्या. त्यांची गीते सर्वश्रुत आहेत. त्यांनी पुष्कर, वृंदावन, द्वारका अशा अनेक ठिकाणी प्रवास केला होता आणि १५४६ मध्ये त्यांचे द्वारकेला निधन झाले. त्यांच्या मृत्यूविषयी रहस्यच आहे. नेमका त्यांचा मृत्यू कसा झाला कोणाला माहिती नाही. असे म्हणतात की त्या द्वारका येथील कृष्णमूर्तीत विलीन झाल्या. 

मेडता येथे त्यांचे वडिलोपार्जित घर, जिथे त्या लग्न होईपर्यंत राहिल्या होत्या ते आणि त्या कृष्णाची जिथे पूजा करायच्या ते मंदिर असे आपण पाहू शकतो.




Krishna Mandir, Merta. 


ह्या कृष्ण मंदिरामध्ये कृष्ण चतुर्भुजनाथ रूपात म्हणजे चार हात असलेली अशी मूर्ती आहे. चतुर्भुजनाथांच्या मूर्तीच्या अगदी समोरच मीराबाईंची मूर्ती आहे. असे वाटते की ते दोघे एकमेकांकडे पहात आहेत.


 

Meerabai Idol in the temple.
📷 Commons Wikimedia



 

हे मंदिर मीराबाईंचे आजोबा राव दुदामल यांनी बांधले होते आणि तिथे मीराबाई कृष्णाची पूजा करायच्या! आणखी एक छोटी पंचधातूची कृष्ण मूर्ती दाखवली जाते. मीराबाई लहान असल्यापासून त्या मूर्तीची पूजा करायच्या असे म्हटले जाते. 

मंदिराच्या आतील भागात सगळीकडे काचा आणि आरसे लावलेले नक्षीकाम आहे. मीराबाईंच्या आयुष्यातील प्रसंग एकतर पेंटिंग्ज किंवा कोरलेल्या काचकामाच्या रूपात दाखवलेले आहेत. 

शहराच्या मध्यभागी असलेले हे मंदिर मेडताच्या मुख्य बाजारपेठेत आहे. येथे आपल्याला स्थानिक जीवनाची झलक बघायला मिळते. मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांसाठी राखून ठेवलेले असे पार्किंग नसल्यामुळे मंदिराच्या मागच्या गल्लीत गाडी पार्क करावी लागते. 

 हे मंदिर केवळ त्याच्या सौंदर्यासाठीच नव्हे तर भारताच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक इतिहासाचा एक भाग आहे म्हणूनही बघायला हवे. प्रसिद्ध पर्यटनस्थळ नसले तरी बघायला हवे. मंदिर अजूनही नांदते प्रार्थनास्थळ आहे. अनेक भक्त ह्या मंदिरात येत असतात. मेडता नगरातले बरेच  रहिवासी ह्या मंदिरात रोज येतात.























Residence of Meerabai 



मीराबाईंच्या आजोबांचा, राव दुदामल यांचा हा राजवाडा आहे. युवराज भोजबरोबर लग्न होईपर्यंत मीराबाई येथेच राहत होत्या. मीराबाईंच्या आयुष्यातील विविध घटनांचे चित्रण आणि फलक येथे पाहायला मिळतात. येथे देखील मीराबाईंची मूर्ती आहे आणि एक छोटेसे संग्रहालय देखील आहे. आम्ही गेलो होतो तेव्हा असे वाटले की १९ व्या शतकात, काही वर्षे या जागेचा उपयोग मुलींची शाळा म्हणून केला जात होता. मागच्या अंगणात एक छोटी बाग आहे आणि तेथे राधाकृष्ण मूर्ती आहे.










Radha Krishna 



आजुबाजूची इतर बरीच राजपूत राज्ये मुघलांच्या समोर नमली होती आणि त्यांनी मुघलांना मुलगी देऊन सामंजस्याचे करार केलेले होते. मेडता आणि मेवाड, विशेषतः चित्तोर हे दोनच वंश असे होते की ज्यांनी मोगल राजांना आपल्या मुली देण्यास नकार दिला. 

मेडता पासून सुमारे ९० कि.मी. अंतरावर नागौर किल्ला आहे. किल्ल्याचे मूळ नाव 'अहिछत्रगड' असे आहे. नागौर परिसराला महाभारत काळात जंगलदेश म्हणून संबोधले जायचे. अहिछत्रगढ ह्या नावाचा अर्थ 'नागफणीचा किल्ला' असा आहे. प्राचीन काळातील नागवंशी क्षत्रियांनी हा मूळ किल्ला बांधला होता. 

१२ व्या शतकापासून नागौर किल्ला मुख्यत्वे मुस्लिमांच्या ताब्यात होता. सध्याचा किल्ला हे जाट मुघल वास्तुशास्त्राचे उदाहरण आहे. गेल्या ४० वर्षात गडावर जीर्णोद्धाराची अनेक कामे झाली आहेत. त्यामुळे आता किल्ला बऱ्याच चांगल्या स्थितीत आहे. 

किल्ल्याचा परिसर विशाल आहे, जवळजवळ ३६ एकर परिसर आहे. ह्या परिसरात अनेक सुंदर ऐतिहासिक इमारती आहेत. अनेक चौक, बागा आणि कारंजी आहेत. आम्ही नोव्हेंबर २०१६ मध्ये नागौरला गेलो होतो, तेव्हा मात्र अनेक हौदातील पाणी आटलेले असल्यामुळे त्यात कारंजी उडत नव्हती!

 






















































काही इमारतींच्या भिंतींवर तर आहेतच पण छतावर देखील सुंदर पेंटिंग्ज आहेत. काही इमारती आणि अगदी काही स्नानगृहेसुद्धा आपल्याला किल्ल्याच्या शासकांच्या वैभवशाली जीवनशैलीच्या कहाण्या सांगतात!

नक्षीदार कमानी आणि जाळ्यांमुळे ह्या वस्तू वैशिष्ट्यपूर्ण आणि सुंदर दिसतात. सांस्कृतिक वारसा संवर्धन उत्तम प्रकारे करण्यासाठीचा युनेस्को पुरस्कार नागौर किल्ल्याला मिळालेला आहे. 

नागौर शहरात सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन यांचे शिष्य वास्तव्य करीत होते आणि त्यातील एका प्रमुख शिष्याचा, हमीनूद्दीन चिस्ती ह्यांचा दर्गा अजूनही तेथे आहे. दरवर्षी जागतिक सूफी संगीत महोत्सव जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात नागौर किल्ल्यात भरतो. 

नागौर येथून बिकानेर अंदाजे १२० कि.मी. अंतरावर आहे. एकदा तुम्ही राजस्थानात आलात की बरेच किल्ले आणि हवेल्या पाहायला मिळतात. राजस्थान शाकाहारी अन्नासाठी प्रसिद्ध आहे. शाकाहारी लोकांना इथे कोणतीही अडचण उद्भवणार नाही, त्यांना कुठेही सहज शाकाहारी भोजन मिळेल. मात्र भाज्या शिजवताना बरीच हॉटेल्स शुद्ध तूप वापरतात, म्हणून व्हीगन लोकांना त्याबद्दल विशेष चौकशी करावी लागेल. पण व्हीगन ग्राहकांसाठी ते तेलात केलेल्या भाज्या आणि काही पक्वान्नेदेखील नक्की बनवतील. 

राजस्थानमध्ये बरीच चांगली हॉटेल्स आहेत. काही हवेल्या आणि राजवाडे हॉटेलमध्ये रुपांतरित केलेले आहेत. जर आपल्याला ऐतिहासिक काळाचा अनुभव घ्यायचा असेल तर आपण अशा हॉटेल्स मध्ये राहू शकता. आमच्या राजस्थान ट्रिपमध्ये आम्हाला अशा काही हॉटेल्समध्ये राहण्याची संधी मिळाली. 


#MeerabaiResidence #MereToGirdharGopal #SufiMusicFestival #MartiaRathors #Chittorgadh








 
















 






टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

कोस्टल कर्नाटक- २ मंगळुरू, मुलकी, उचिल, उडुपी

  आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते.  नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते.  मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात.  काद्री मंजुनाथ मंदिर  का...