Skip to main content

मेडता - मीराबाईंचे निवासस्थान आणि नागौर किल्ला 

गीताजयंती नुकतीच म्हणजे 25 डिसेंबर 2020 रोजी साजरी केली गेली. जगातील हे एकमेव आणि अनोखे उदाहरण आहे, जिथे एका पुस्तकाचा वाढदिवस इतक्या मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. सध्या वातावरणात सगळीकडे कृष्ण भक्ती आहे, तेव्हा मला भगवान कृष्णाच्या महान भक्त संत मीराबाईंच्या गावाबद्दल, घराबद्दल लिहायला आवडेल. 

महान कवी व कृष्णभक्त असलेल्या संत मीराबाई यांचे मूळ ठिकाण राजस्थानमधील मेडता हे आहे. त्यांचे जन्मस्थान हे मेडता जवळील एक छोटेसे गाव आहे आणि बालपणी त्या मेडता येथे राहिल्या होत्या. 



Young Meerabai Raja Ravi Varma's painting
📷 wikipedia


मेडता हे गाव भारतातील राजस्थान राज्याच्या नागौर जिल्ह्यात आहे. हे गाव पुष्कर जवळ आहे. पुष्कर हे ठिकाण पुष्कर तलाव आणि ब्रम्हा मंदिरासाठी प्रसिद्ध आहेत. आपण पुष्करहुन मेडता आणि नागौर ची एक दिवसाची ट्रिप करू शकतो. पुष्करपासून मेडता फक्त ६१ कि. मी. अंतरावर आहे. मेड़ता- जोधपूर हे अंतर १२५ कि.मी. आणि मेडता जयपूर हे अंतर २१० कि. मी. आहे. पुष्करहून बिकानेरला जाताना आम्ही मेडता येथे गेलो होतो. राजस्थानमधील रस्ते खरोखर चांगले आहेत. राजस्थानमधील महामार्गांवर अधुनमधून नीलगाईंचे दर्शन होईल !!



Pushkar Lake



संत मीराबाईंचा जन्म १४९८ मध्ये जोधपूर साम्राज्याचे संस्थापक राव जोधामल यांच्या कुटुंबात झाला. ते मीराबाईचे पणजोबा होते. बालपणी त्या आजोबा राव दुदामल यांच्याजवळ मेडता येथील राजवाड्यात राहिल्या होत्या. राव दुदामल हे मेडता राजपूत कुळाचे संस्थापक होते. मीराबाईंचे संगीत, धार्मिक ज्ञान, राजकारण आणि युद्धकलेचे शिक्षण घरीच झाले. त्या कृष्णाच्या महान भक्त होत्या आणि त्यांनी आपले जीवन कृष्णाला समर्पित केले होते.

त्यांचे लग्न चित्तोड येथील युवराज भोजराज ह्यांच्याशी झाले होते. त्या एक महान संत आणि भक्तिमार्गातील प्रसिद्ध कवियत्री होत्या. त्यांची गीते सर्वश्रुत आहेत. त्यांनी पुष्कर, वृंदावन, द्वारका अशा अनेक ठिकाणी प्रवास केला होता आणि १५४६ मध्ये त्यांचे द्वारकेला निधन झाले. त्यांच्या मृत्यूविषयी रहस्यच आहे. नेमका त्यांचा मृत्यू कसा झाला कोणाला माहिती नाही. असे म्हणतात की त्या द्वारका येथील कृष्णमूर्तीत विलीन झाल्या. 

मेडता येथे त्यांचे वडिलोपार्जित घर, जिथे त्या लग्न होईपर्यंत राहिल्या होत्या ते आणि त्या कृष्णाची जिथे पूजा करायच्या ते मंदिर असे आपण पाहू शकतो.




Krishna Mandir, Merta. 


ह्या कृष्ण मंदिरामध्ये कृष्ण चतुर्भुजनाथ रूपात म्हणजे चार हात असलेली अशी मूर्ती आहे. चतुर्भुजनाथांच्या मूर्तीच्या अगदी समोरच मीराबाईंची मूर्ती आहे. असे वाटते की ते दोघे एकमेकांकडे पहात आहेत.


 

Meerabai Idol in the temple.
📷 Commons Wikimedia



 

हे मंदिर मीराबाईंचे आजोबा राव दुदामल यांनी बांधले होते आणि तिथे मीराबाई कृष्णाची पूजा करायच्या! आणखी एक छोटी पंचधातूची कृष्ण मूर्ती दाखवली जाते. मीराबाई लहान असल्यापासून त्या मूर्तीची पूजा करायच्या असे म्हटले जाते. 

मंदिराच्या आतील भागात सगळीकडे काचा आणि आरसे लावलेले नक्षीकाम आहे. मीराबाईंच्या आयुष्यातील प्रसंग एकतर पेंटिंग्ज किंवा कोरलेल्या काचकामाच्या रूपात दाखवलेले आहेत. 

शहराच्या मध्यभागी असलेले हे मंदिर मेडताच्या मुख्य बाजारपेठेत आहे. येथे आपल्याला स्थानिक जीवनाची झलक बघायला मिळते. मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांसाठी राखून ठेवलेले असे पार्किंग नसल्यामुळे मंदिराच्या मागच्या गल्लीत गाडी पार्क करावी लागते. 

 हे मंदिर केवळ त्याच्या सौंदर्यासाठीच नव्हे तर भारताच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक इतिहासाचा एक भाग आहे म्हणूनही बघायला हवे. प्रसिद्ध पर्यटनस्थळ नसले तरी बघायला हवे. मंदिर अजूनही नांदते प्रार्थनास्थळ आहे. अनेक भक्त ह्या मंदिरात येत असतात. मेडता नगरातले बरेच  रहिवासी ह्या मंदिरात रोज येतात.























Residence of Meerabai 



मीराबाईंच्या आजोबांचा, राव दुदामल यांचा हा राजवाडा आहे. युवराज भोजबरोबर लग्न होईपर्यंत मीराबाई येथेच राहत होत्या. मीराबाईंच्या आयुष्यातील विविध घटनांचे चित्रण आणि फलक येथे पाहायला मिळतात. येथे देखील मीराबाईंची मूर्ती आहे आणि एक छोटेसे संग्रहालय देखील आहे. आम्ही गेलो होतो तेव्हा असे वाटले की १९ व्या शतकात, काही वर्षे या जागेचा उपयोग मुलींची शाळा म्हणून केला जात होता. मागच्या अंगणात एक छोटी बाग आहे आणि तेथे राधाकृष्ण मूर्ती आहे.










Radha Krishna 



आजुबाजूची इतर बरीच राजपूत राज्ये मुघलांच्या समोर नमली होती आणि त्यांनी मुघलांना मुलगी देऊन सामंजस्याचे करार केलेले होते. मेडता आणि मेवाड, विशेषतः चित्तोर हे दोनच वंश असे होते की ज्यांनी मोगल राजांना आपल्या मुली देण्यास नकार दिला. 

मेडता पासून सुमारे ९० कि.मी. अंतरावर नागौर किल्ला आहे. किल्ल्याचे मूळ नाव 'अहिछत्रगड' असे आहे. नागौर परिसराला महाभारत काळात जंगलदेश म्हणून संबोधले जायचे. अहिछत्रगढ ह्या नावाचा अर्थ 'नागफणीचा किल्ला' असा आहे. प्राचीन काळातील नागवंशी क्षत्रियांनी हा मूळ किल्ला बांधला होता. 

१२ व्या शतकापासून नागौर किल्ला मुख्यत्वे मुस्लिमांच्या ताब्यात होता. सध्याचा किल्ला हे जाट मुघल वास्तुशास्त्राचे उदाहरण आहे. गेल्या ४० वर्षात गडावर जीर्णोद्धाराची अनेक कामे झाली आहेत. त्यामुळे आता किल्ला बऱ्याच चांगल्या स्थितीत आहे. 

किल्ल्याचा परिसर विशाल आहे, जवळजवळ ३६ एकर परिसर आहे. ह्या परिसरात अनेक सुंदर ऐतिहासिक इमारती आहेत. अनेक चौक, बागा आणि कारंजी आहेत. आम्ही नोव्हेंबर २०१६ मध्ये नागौरला गेलो होतो, तेव्हा मात्र अनेक हौदातील पाणी आटलेले असल्यामुळे त्यात कारंजी उडत नव्हती!

 






















































काही इमारतींच्या भिंतींवर तर आहेतच पण छतावर देखील सुंदर पेंटिंग्ज आहेत. काही इमारती आणि अगदी काही स्नानगृहेसुद्धा आपल्याला किल्ल्याच्या शासकांच्या वैभवशाली जीवनशैलीच्या कहाण्या सांगतात!

नक्षीदार कमानी आणि जाळ्यांमुळे ह्या वस्तू वैशिष्ट्यपूर्ण आणि सुंदर दिसतात. सांस्कृतिक वारसा संवर्धन उत्तम प्रकारे करण्यासाठीचा युनेस्को पुरस्कार नागौर किल्ल्याला मिळालेला आहे. 

नागौर शहरात सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन यांचे शिष्य वास्तव्य करीत होते आणि त्यातील एका प्रमुख शिष्याचा, हमीनूद्दीन चिस्ती ह्यांचा दर्गा अजूनही तेथे आहे. दरवर्षी जागतिक सूफी संगीत महोत्सव जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात नागौर किल्ल्यात भरतो. 

नागौर येथून बिकानेर अंदाजे १२० कि.मी. अंतरावर आहे. एकदा तुम्ही राजस्थानात आलात की बरेच किल्ले आणि हवेल्या पाहायला मिळतात. राजस्थान शाकाहारी अन्नासाठी प्रसिद्ध आहे. शाकाहारी लोकांना इथे कोणतीही अडचण उद्भवणार नाही, त्यांना कुठेही सहज शाकाहारी भोजन मिळेल. मात्र भाज्या शिजवताना बरीच हॉटेल्स शुद्ध तूप वापरतात, म्हणून व्हीगन लोकांना त्याबद्दल विशेष चौकशी करावी लागेल. पण व्हीगन ग्राहकांसाठी ते तेलात केलेल्या भाज्या आणि काही पक्वान्नेदेखील नक्की बनवतील. 

राजस्थानमध्ये बरीच चांगली हॉटेल्स आहेत. काही हवेल्या आणि राजवाडे हॉटेलमध्ये रुपांतरित केलेले आहेत. जर आपल्याला ऐतिहासिक काळाचा अनुभव घ्यायचा असेल तर आपण अशा हॉटेल्स मध्ये राहू शकता. आमच्या राजस्थान ट्रिपमध्ये आम्हाला अशा काही हॉटेल्समध्ये राहण्याची संधी मिळाली. 


#MeerabaiResidence #MereToGirdharGopal #SufiMusicFestival #MartiaRathors #Chittorgadh








 
















 






Comments

Post a Comment

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 3 - देवरियाताल -स्यालमी

ट्रेकचा तिसरा दिवस. कालचा सारी- देवरियाताल प्रवास तर खूपच छान झाला होता. पायही दुखले नव्हते की थकल्यासारखे देखील वाटले नव्हते. त्यामुळे उत्साहाने आजच्या दिवसाला सुरुवात केली. आजचा दिवस तसा अवघड असेल अशी, इंडियाहाईक्सच्या  वेब साईटवरचे वर्णन वाचून कल्पना आली होती. आज अंतर नऊ किलोमीटरपेक्षा जास्त होते. पण वाटेत अनेक शिखरे दिसणार होती. घनदाट जंगलातून जाणार होतो त्यामुळे अनेक पक्षीही दिसणार होते. त्याचीही उत्सुकता होती. सगळेजण देवरियाताल कॅम्पसाईट मधून बाहेर पडलो. अवघे एक दिवस वास्तव्य केलेले असले तरी मन थोडेतरी गुंतलेले असतेच.  देवरियातालच्या रस्त्याच्या डाव्या बाजूने एक जंगलवाटेचा फाटा होता. त्या वाटेने आम्ही निघालो. थोडा वेळ चालल्यावर आम्हाला पुन्हा एकदा चंद्रशिला शिखर दिसणार होते. अधून मधून दिसणारे हे शिखर आपल्याला कुठे पोचायचे आहे त्याची जाणीव करून द्यायचे, त्यानेही एक नवे बळ मिळायचे. पण आज आकाश इतके ढगाळ होते की शिखर दिसलेच नाही.उजवीकडे पुन्हा एकदा सारी गाव मात्र दिसले. 📷Cotrekker 📷Sumati Dhembre ह्या फोटोवरून कशा रस्त्याने आम्ही चालत होतो, चढ किती होता त्याची कल्पना येईल....

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 4 - स्यालमी - बनियाकुंड

आदल्या संध्याकाळी भुरभुरत असलेल्या पावसाने हवेतला गारवा अजूनच वाढवला होता. इतक्या लहान तंबूमध्ये झोपण्याची पहिलीच वेळ होती. पण सुरुवातीचे दोन तास सोडले तर नंतरचे पाच तास चांगली झोप झाली. अगदी प्रसन्न जाग आली.काल एकदाच क्षणभर का होईना, मनात तरळून गेलेला,"आपण ट्रेक इथेच थांबवावा का?"ह्या विचाराचा आज कुठे मागमूसही उरला नव्हता. मनात होते,  "इरादे अगर पक्के हो, तो डगमगाए कदम क्यु? हौसले बुलंद हो तो सहमा सा हो मन क्यु? मंज़िल अब दूर नहीं.. बस संभल के चलना, कभी न रुकना, हार ना मानना, बस्स .. चलते रहना।" - वृंदा टिळक आमच्या सगळ्याच कॅम्पसाईट्स भन्नाट जागांवर होत्या. आजची स्यालमीची कॅम्प साईट देखील त्याला अपवाद नव्हती. नजर पोचेल तिथपर्यंत फक्त पर्वत रांगा आणि जंगल. मानवी वस्तीची जवळपास काहीच चाहूल नाही.  📷Samrat Darda  सगळ्यांचे आवरून वॉर्म अप करून आम्ही निघालो. आजचा सगळा रस्ता सुंदर असणार होता. काल इतके चढ उतार चढून उतरून आता सगळ्यांची चांगली तयारी झाली होती. शिवाय आज मी नीकॅप्स देखील घातल्या होत्या!! त्यामुळे समजा जरी आज रस्ता अवघड असला असता तरी काळजीचे काही कारण नव्हते....

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 5- अंतिम भाग - बनियाकुंड- तुंगनाथ- चंद्रशिला

  📷Samrat Darda १५ एप्रिल, बनियाकुंड कॅम्पसाईट मधून काढलेला चंद्राचा सुंदर फोटो. त्या दिवशी शुक्ल पक्षातील सप्तमी किंवा अष्टमी असावी. कारण १७ एप्रिलला रामनवमी होती. सुंदर काळ्याभोर रात्रीचा सघन अंधार.. पौर्णिमा अजून साताठ दिवसांवर असली तरीही आत्तापासूनच तेजाळलेला चंद्र.. चमचमणारे, मध्येच ढगांच्या आड लपणारे चांदणे, आमच्या मनातील समिटविषयीची उत्सुकता..फार अनोखी रात्र होती ती.  उद्या पहाटे दोन वाजताचा वेकप कॉल असणार होता. आम्हाला आवरून, ब्रेकफास्ट करून तीन वाजता निघायचे होते. न विसरता घेण्याच्या गोष्टी तशा तर डे पॅक मध्ये भरूनच ठेवल्या होत्या. हेडलॅम्पच्या उजेडात सामान देखील आवरून ठेवले होते. पहाटे निघताना बाकी सामान मेन टेन्ट मध्ये नेऊन ठेवायचे होते.  इतक्या उंचीवर जायचे होते. काही तासांत आम्ही ४००० फुटांचा अल्टीट्युड गेन करणार होतो. झोपण्यासाठी डोळे मिटले खरे, पण मिटल्या डोळ्यांपुढेही बर्फाच्छादित शिखरांचीच दृश्ये तरळत होती. कधीतरी झोप लागली. सतत अधूनमधून जाग येऊन घड्याळात बघत होते. सगळे दोन वाजता उठणार, त्या आधी आपण आपले आवरून घेऊ या असा विचार डोक्यात होता तो बहुधा सतत ज...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक- भाग 1 - तयारी !!

  आपण स्वप्न पाहतो… आपण स्वप्ने पाहतो… त्यातील एखाद दुसरेच प्रत्यक्षात यावे म्हणून धडपडतो आणि बाकीची स्वप्ने कधीतरी नवलाईने आंजारायला गोंजारायला असावीत म्हणून त्यांना स्वप्न म्हणूनच राहू देतो.  हाय अल्टिट्युड ट्रेक हे माझे एक असेच स्वप्न होते, नेहमी भुरळ पाडणारे आणि तरीही प्रत्यक्षात आले तर इतक्या उंचीवर चालताना काहीशी धास्तीच वाटावी असे. त्यामुळे वर्षानुवर्ष ते स्वप्न प्रत्यक्षात न येता स्वप्नच राहिले होते.  नोव्हेंबरमध्ये माझी मैत्रीण धनश्री जगताप इंडियाहाईक्सबरोबर देवरिया ताल चंद्रशिला हा ट्रेक करून आली. तिच्याशी गप्पा मारताना या ट्रेकची सविस्तर माहिती मिळाली. मार्च एप्रिलमध्ये या संपूर्ण रस्त्यावर ऱ्होडोडेंड्रॉनची फुले फुललेली असतात असेही कळले… आणि मनातल्या स्वप्नाला पुन्हा एकदा जाग आली.  असे म्हणतात की देवरिया ताल म्हणजे जिथे यक्षाने युधिष्ठिराला प्रश्न विचारले ते तळे. वाटेत लागणारे तुंगनाथ हे तर जगातले सर्वात उंचावर असणारे शंकराचे मंदिर, पंच केदारापैकी एक. हे पांडवांनी बांधले आहे असे सांगितले जाते. ट्रेकचा समिट पॉईंट...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...