Skip to main content

निसर्गसुंदर झीरो!

मला माहिती आहे ते शून्याचा म्हणजे झीरोचा शोध भारतीयांनी लावला, पण झीरो कोणी पाहिले आहे का? ऑक्टोबर 2019 ला मी झीरो प्रत्यक्ष बघितले. जरा ह्या झीरोचे स्पेलिंग वेगळे होते एवढेच! हे Ziro होते!! झीरो ही अत्यंत सुंदर निसर्गरम्य आणि अद्भुत जागा आहे. 
अरुणाचल प्रदेश मधील लोअर सुबान सिरी जिल्ह्यामधील झीरो हे छोटे शहर आहे. संपूर्ण अरुणाचल प्रदेशलाच नैसर्गिक सौंदर्य आणि प्रसन्न हवामान याची देणगी मिळालेली आहे. नयनरम्य निळे आकाश, उंच उंच पहाड आणि हिरवाई अरुणाचल प्रदेश मध्ये सगळीकडेच असतात. झीरो मध्ये हे सगळे तर आहेच शिवाय पाईन वृक्ष देखील खूप आहेत. 
Archivo:Paddy fields at Ziro, Arunachal Pradesh.jpg
विकिमीडिया वरून साभार 
ऑक्टोबर २०१९ मध्ये असे दिसत होते. 
हवामान खूपच छान आहे. झीरोला जाण्यासाठी सर्वात चांगला काळ म्हणजे एप्रिल ते ऑक्टोबरमधला काळ. झीरो मध्ये डिसेंबर-जानेवारीत झीरोच्याही खाली तापमान जाऊ शकते! आयुष्यभर गरम हवेच्या ठिकाणीच राहिल्यामुळे मला तर 12 डिग्री झाले तापमान तरी हुडहुडी भरायला लागते. 
इथे कधीही पाऊस पडू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पोन्चोसकट तयारच राहायला हवे. हवा अगदी शुद्ध, प्रदूषणरहित अशी आहे. मला नेहमी वाटते ईशान्य भारतातली राज्ये म्हणजे भारताची ऑक्सीजन सिलेंडर आहेत. 
झीरोला कसे जायचे? सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे इटानगरजवळचे नाहरलगुन. तिथून झीरोला जाण्यासाठी तुम्ही टॅक्सी बुक करू शकता. नहार लागून हुन आम्ही खूप पहाटेच निघालो कारण आम्हाला एका दिवसात झीरोला जाऊन परत यायचे होते.
नहरलागुन पासून झीरोपर्यंतचे अंतर फार नसले, म्हणजे खरे तर जवळपास शंभर किलोमीटरच असेल, तरी रस्ता खूप डोंगराळ प्रदेशातील, खाचखळग्यांचा आणि अवघड आहे. तुम्ही जाऊन आलात की तुम्हाला तुमच्या शरीरात किती हाडे आहेत हे नीटच कळते! खूपदा ढगांमुळे समोरचा रस्ता दिसत नाही. म्हणूनच अंतर थोडे असले तरी आम्हाला जाताना पाच तास लागले आणि येताना अंधार पडायला लागल्यावर तर सात तास लागले. 
                                 
रस्त्यात आम्हाला अगदी ताजे बनवलेले चवीष्ट, शाकाहारी अन्न मिळाले. पण अर्थात शाकाहारी अन्न मिळणाऱ्या खूप कमी जागा, कमी रेस्टॉरंट्स रस्त्यात आहेत.
ताजे, चविष्ट शाकाहारी अन्न!
या भागातले लोक सगळे काही खातात. सगळे म्हणजे अगदी रेशमाच्या किड्यांच्या पासून, अंडी, मासे, कोंबडी, डुक्कर, अगदी मिथुनदेखील खातात. भाजीच्या दुकानात भाजी बरोबरच तुम्हाला रेशमाचे किडे विकायला ठेवलेले दिसतात. आम्ही तर कधी रस्त्यावरचे अन्न खाण्याची किंवा बाजार बघण्याची हिम्मतच केली नाही. डुकराच्या मांसाचा आणि इतर मांसाहारी पदार्थांचा दुर्गंध हे आम्हाला त्या ठिकाणापासून लांब ठेवण्यासाठी पुरेसे होते!
रस्त्याने जाताना तुम्हाला खूप मिथुन दिसतील. मिथुन हा अरुणाचल प्रदेशचा राज्यप्राणी आहे. हा खरेतर गाई-बैलांच्या जातीतला एक मोठ्या आकाराचा रानटी प्राणी आहे. पण तो पाळीव प्राणी म्हणून देखील आपण माणसाळवून ठेवू शकतो. 
मिथुन 
झीरो कशासाठी प्रसिद्ध आहे? तर डोंगर, सुंदर दऱ्या, भात शेती आणि भात शेतीत होणारी माशांची शेती यासाठी झीरो प्रसिद्ध आहे. ह्या प्रकारची माशांची शेती अतिशय विलक्षण आहे. बहुतेक ही भारतातली एकमेव जागा असेल, जिथे अशा प्रकारे भाताच्या शेतातच माशांची देखील शेती केली जाते. झीरो तिथे होणाऱ्या वार्षिक संगीत समारोहा साठी प्रसिद्ध आहे. संगीत समारोहाच्या वेळेला खूप जास्त संख्येने पर्यटक अरुणाचल प्रदेश मध्ये येतात, झीरोला येतात. झीरो हे विविध जनजातींच्या वसाहतींसाठी आणि त्यांच्या पारंपारिक घरांसाठी देखील प्रसिद्ध आहे.
जनजातींचे पारंपरिक घर 
भातशेतातच मत्स्य शेती 

                                       

पण आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे ते एकमेवाद्वितीय अशा शिवमंदिरात.

रस्त्यात दिसलेले स्वप्नातले घर!!
      

विलक्षण असे हे स्वयंभू शिवलिंग पाहिल्यावर तुम्हाला पण माझ्यासारखेच वाटायला लागेल. जेव्हा मी तिथे त्या प्रचंड मोठ्या स्वयंभू शिवलिंग समोर उभी होते, तेव्हा माझे मला निश्चितपणे वाटून गेले की एखादी जागा मंदिर होण्यासाठी तिथे माणसांनी बांधलेल्या भिंती, सुंदर कोरीव काम, नक्षीकाम कशाचीही गरज नाही नसतेच. 
श्री सिद्धेश्वरनाथ मंदिर, कार्दो, झीरो

नंदी 
उंच डोंगर आणि उंच, उंच झाडे या शिवलिंगाभोवती गोलाकार उभी आहेत. असे म्हणतात की हे जगातले सर्वात उंच स्वयंभू शिवलिंग आहे. वीस फुटापेक्षा देखील अधिक उंची असलेला हा ग्रॅनाईटचा मोठा खडक आहे. त्याच्यावर नैसर्गिकरित्या रुद्राक्ष माला कोरलेली आहे. 

वीस फुटांहून अधिक उंचीचे,
नैसर्गिक रुद्राक्ष माला
असलेले स्वयंभू शिवलिंग 
एका मजुराला त्या जमिनीतली झाडे तोडत असताना या शिवलिंगाचा शोध लागला, ते 2004 मध्ये. जवळच पाण्याचा एक छोटा झरा वाहतो आहे. त्याला स्थानिक लोक, ही शिवाजवळची गंगा आहे असे म्हणतात. झीरोला जाण्याचा रस्ता जरी खूप अवघड असला तरी इथले नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला भुरळ पडेल असेच आहे आणि म्हणूनच झीरोही तुमच्या प्रवासातील एक नक्की भेट देण्याची जागा ठरते. 

                                         
प्रवासात असे दृश्य दिसणार असेल तर
मग खराब रस्त्यांची फिकीर कशाला?

तळटीप: अरुणाचल प्रदेश संरक्षित प्रदेश असल्याने तिथे जाण्यासाठी सर्वांनाच इनर लाइन परमिट ची आवश्यकता असते. जेव्हा तुम्ही झीरो मध्ये असाल तेव्हा गुगल मॅप वर तुमची लोकेशन शानान, तिबेट चायना अशी दिसेल. 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....

कोस्टल कर्नाटक- २ मंगळुरू, मुलकी, उचिल, उडुपी

  आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते.  नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते.  मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात.  काद्री मंजुनाथ मंदिर  का...