मुख्य सामग्रीवर वगळा

शिवथरघळ

जर आपण भारताचा नकाशा पाहिला तर आपल्याला नकाशात डावीकडे, गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत काळसर हिरवी रेषा दिसते. ही रेषा गुजराथ येथून सुरु होते आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू मार्गे जाऊन केरळला पोहोचते.
ती रेषा म्हणजेच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट म्हणजे दख्खनच्या पठाराची जणू किनारच आहे. दख्खन पठाराच्या काठावरच्या ह्या पर्वत रांगा आहेत. 
या भागात बरीच जंगले, जलसाठे, धबधबे आहेत आणि जैवविविधता तसेच त्याचे वय यामुळे या भागाला 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून ओळखले गेले आहे. पश्चिम घाट हिमालयापेक्षाही जुना आहे!
वरंधा घाट 
📷विकिमीडिया कॉमन्स 
पश्चिम घाट हा अनेक मुख्य नद्यांचे उगमस्थान आहे. वरील छायाचित्रात दिसते आहे त्या प्रमाणे, वर्षा ऋतूत या प्रदेशात अनेक धबधबे पाहायला मिळतात. 
पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) अनेक सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे शिवथरघळ धबधबा. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण रौद्र सौंदर्यानिशी आणि ताकदीनिशी रोरावत खाली येताना दिसतो. 
हा धबधबा सुमारे शंभर फूट उंचीवरून, डोंगरमाथ्यावरून खाली झेपावतो. धबधब्याचा आवाज, धबधब्याच्या प्रवाहातून विखुरलेले थेंब आणि त्याच्या सभोवतालची हिरवाई हे सगळे गिर्यारोहकांसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी एक आकर्षण केंद्र बनलेले आहेत.
शिवथर धबधबा
 📷 माझी मैत्रीण 
पावसाळ्यातील शिवथर धबधबा 
📷विकिमिडीया कॉमन्स 

सह्याद्री पर्वतरांगांमधील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी हा एक धबधबा आहे आणि तो महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाडजवळ आहे. 
हा सह्याद्री पर्वतरांगामधील धबधब्यांपैकी एक सर्वात सुंदर धबधबा आहे हे निश्चितच, पण लोक या ठिकाणी येण्याचे मुख्य कारण मात्र ते नाही! तर शिवथर घळीच्या मुळे इतके लोक या ठिकाणी भेट देतात. 
शिवथरघळ ही धबधब्याजवळील घळ किंवा गुहा आहे, खरे तर जवळजवळ धबधब्याखालीच आहे म्हणा ना!
ही शिवथरघळ इतक्या लोकांनी भेट देण्याइतकी का महत्वाची आहे? नैसर्गिक सौंदर्य, भोवतालची हिरवाई, भूरचना शास्त्राच्या अभ्यासकांसाठी असलेले ह्या जागेचे महत्व हे तर कारण आहेच, पण मुख्य म्हणजे ह्या घळीत २२ वर्षे समर्थ रामदास स्वामी यांचे वास्तव्य होते हे इतक्या लोकांनी वर्षानुवर्षे, परत परत भेट देण्याचे कारण आहे. 
समर्थ रामदास स्वामी हे सतराव्या शतकातील भारतीय, राष्ट्रउपासक संत होते जे एक उत्तम कवी, तत्वज्ञ आणि आध्यात्मिक मार्गदर्शक होते.
समर्थ रामदास 
त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले असून, आज इतक्या शतकांनंतरही, हजारो नव्हे तर कोट्यावधी लोक त्यांचे अनुयायी आहेत. दासबोध हे त्यांचे प्रमुख लेखन आहे, जे त्यांनी शिवथर घळीत लिहिले आहे.
दासबोध हा जीवनाला मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर नव्याने उमगत जातो असा ग्रंथ आहे. 
शिवथर घळीमध्ये रामदासस्वामी आणि कल्याणस्वामी यांच्या मूर्ती आपण पाहू शकतो. समर्थ रामदासस्वामी दासबोध सांगत आहेत आणि कल्याणस्वामी लिहित आहेत.
समर्थ रामदास आणि कल्याणस्वामी 
ह्या दोन्ही मूर्ती पाहिल्या की आठवते कल्याणस्वामींचे पद,
मज तो आवडतो मम स्वामी | निशिदिनी अंतर्यामी ||धृ||
अक्षैपदाचा सुखदाता | निरसोनी माया ममता ||1||
भक्तीमार्गाचा गजढाला | चालविल्या आढाला ||2||
काय बोलो मी किर्तीसी | न दिसे तुळणेसी ||3||
छेत्र बहुतांचे दासाचे | धाम ची कल्याणाचे ||4||
धबधब्याजवळच्या किंवा खरे तर धबधब्याखालच्याच म्हणा ना, घळीत ह्या मूर्ती आहेत. ह्या मूर्तींच्या मागे श्रीरामाचे रामदासस्वामींनी स्थापन केलेले लहानसे मंदिर दिसेल. ह्या फोटोतही आपण मागे मूर्ती पाहू शकता. 
घळीचे प्रवेशद्वार हे खालच्या फोटोत आहेत तसे दिसते. खडकापासून आपले डोके वाचावे म्हणून आपण झुकून आत जातो आणि आत ह्या मूर्ती दिसल्या की आपोआप नतमस्तक होतोच!
घळीचे प्रवेशद्वार 
इथे फोटोत आपल्याला जो बोर्ड दिसतो त्यावर समर्थ रामदास स्वामींनी शिवथर घळ धबधब्याचे केलेले वर्णनपर काव्य वाचायला मिळते. ते काव्य असे आहे, 
गिरीचे मस्तकी गंगा । तेथुनि चालली बळे
धबाबा लोटती धारा । धबाबा तोय आदळे ॥ १ ॥
गर्जता मेघ तो सिंधू । ध्वनीकल्होळ ऊठिला ।
कड्याशी आदळे धारा । वात आवर्त होतसे ॥ २ ॥
तुषार उठती रेणू । दुसरे रज मातले ।
वात मिश्रित ते रेणू । सीत मिश्रित धुकटे ॥ ३ ॥
दराच तुटला मोठा । झाड खंडे परोपरी ।
निबीड दाटती छाया । त्या मधे वोघ वाहती ॥ ४ ॥
गर्जती श्वापदे पक्षी । नाना स्वरे भयंकरे ।
गडद होतसे रात्री । ध्वनी कल्लोळ ऊठती ॥ ५ ॥
कर्दमू निवडेना तो । मानसी साकडे पडे ।
विशाळ लोटती धारा । ती खाले रम्य वीवरे ॥ ६ ॥
विश्रांती वाटते तेथे । जावया पुण्य पाहिजे ।
कथा निरुपणे चर्चा । सार्थके काळ जातसे ॥ ७ ॥
ज्या परिसरात शिवथर घळ आहे त्या परिसराला सुंदरमठ असे म्हणतात. 
सुंदरमठाचे प्रवेशद्वार 
ह्या प्रवेशद्वारा पर्यंत आपण गाडीने जाऊ शकता. पुढे काही पायऱ्या चढून गेलात की मग शिवथर घळीत जाण्याचा रस्ता लागतो. तिथून अगदी काही पावलांच्या अंतरावर आहे शिवथरघळ. 
माहितीपत्रक 
माहितीपत्रक 
समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अध्यात्मिक गुरु होते. असे म्हणतात की त्या दोघांची शिवथर घळीत भेट झाली होती. 
समर्थ रामदास म्हणाले होते की जरी मी देहाने तुमच्यामध्ये नसलो तरी दासबोधाच्या रूपाने मी आहेच. 
माझी काया आणि वाणी | गेली म्हणाल अंत:करणी |
परी मी आहे जगज्जीवनी | निरंतर ||१ ||
आत्माराम दासबोध | माझे स्वरूप स्वत:सिद्ध |
असता न करावा खेद | भक्तजनी ||२||
नका करू खटपट | पहा माझा ग्रंथ नीट |
तेणे सायुज्याची वाट | गवसेल की ||३||
इतक्या शतकानंतर अजूनही, दासबोध कालबाह्य न होता, अनेकांना मार्गदर्शक ठरला आहे. दासबोधाचे अनेक भारतीय भाषांत तर भाषांतर झाले आहेच पण अनेक आंतरराष्ट्रीय भाषांत देखील अनुवाद झालेला आहे. 
दासबोध जयंती दरवर्षी माघ शुद्ध नवमीला साजरी केली जाते. ह्याच दिवशी १६५४ मध्ये दासबोध लिहून पूर्ण झाला होता. 
त्या दिवशी दासबोधाची पालखीतून मिरवणूक निघते. हे एखाद्या ग्रंथाचा जन्मदिवस साजरा होणे ह्याचे अनोखे उदाहरण आहे. त्या निमित्ताने त्यातील विचारांना उजाळा मिळतो हे सर्वात महत्वाचे. 
आसपासच्या गावांतून म्हणजे कुंभे शिवथर, आंबे शिवथर, कसबे शिवथर आणि खडकेश्वर ह्या गावातून पालखी नेली जाते. ह्या सोहळ्यासाठी आधीच अनेक ठिकाणाहून दिंड्या शिवथरघळीत दाखल झालेल्या असतात. 
स्थानिक लोक पालखीची वाट पाहत असतात. मग पालखी दाराशी आली की तिची साग्रसंगीत पूजा करतात आणि थोडा वेळ का होईना, पण पालखी आपल्या खांद्यावरून नेतात. 
त्या त्या गावातील मंदिरांतून पण पालखी नेली जाते. सर्वाना नंतर शिवथर घळीत येण्याचे आमंत्रण दिले जाते. ते आमंत्रण पण अगदी ऐकण्याजोगे असते. 
सगळीकडे फिरून काही तासांनी पालखी जेव्हा शिवथरघळीत परत येते तेव्हा तिथे पूजा, आरती, प्रार्थना आणि प्रसाद असतो. आलेल्या सर्व गावकऱ्यांना तसेच पालखीसाठी आलेल्या दिंडयांना जेवण असते. सामु हिकतेचा आणि समरसतेचा आविष्कारच आपल्याला त्या वेळी बघायला मिळतो. मला फेब्रुवारी २०१९ मध्ये ह्या सोहळ्यात सहभागी होण्याची अविस्मरणीय संधी मिळाली होती. 
पालखी 
पालखी 
दासबोधाची पालखी 

सह्याद्री पर्वतरांगा 
📷प्रज्ञा साठे 

मिरवणूक 
📷प्रज्ञा साठे 

मी भाग्यवान! ( Feb 2019)
📷प्रज्ञा साठे 

मिरवणूक 
📷प्रज्ञा साठे 

झेंडा रामनामाचा 
📷प्रज्ञा साठे 
मला सांगायला फार अभिमान वाटतो की ह्या गावातील अनेक जण सैन्यात आहेत. सुट्टीसाठी घरी आलेले सैनिक देखील ह्या मिरवणुकीत सामील झाले होते. 
सह्याद्रीच्या खोऱ्यातील गावांतून चालत जाता येणे, तिथल्या स्थानिकांसोबत मिसळता येणे, दासबोधाची पालखी काही क्षण का होईना खांद्यांवर घेता येण्याचे भाग्य लाभणे आणि मिरवणुकीचा भाग होण्याची संधी मिळणे हे ह्या अविस्मरणीय अनुभवाचे उत्कर्ष बिंदू होते. 
शिवथरघळीत कसे आणि कधी जाता येईल ह्या विषयी अधिक माहिती हवी असेल तर हा मी फेब्रुवारी २०१९ मध्ये काढलेला फोटो पहा. हे नंबर आत्तापर्यंत बदललेले नसतील तर तुम्हाला माहिती मिळू शकेल. 


 #OneDayTrip #JayJayRaghuveerSamarth #RamdasSwami #DasNavami #DasbodhNavami #Raigad#PlacsToVisitNearRaigad

टिप्पण्या

  1. पालखी मिरविता आली तुला, धन्य झालीस ����

    उत्तर द्याहटवा
  2. खरंच पालखीत सामिल होणे व त्याचा झेंडा मिरवायला मिळणे भाग्याची गोष्ट आहे, धन्य झालीस तू वृंदा

    उत्तर द्याहटवा
  3. आठवणींना उजाळा मिळाला😍🙏🙏मला आ.मीराताईमुळे हे भाग्य सलग ६-७ वर्ष मिळाल 🙏🙏

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

कोस्टल कर्नाटक- २ मंगळुरू, मुलकी, उचिल, उडुपी

  आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते.  नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते.  मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात.  काद्री मंजुनाथ मंदिर  का...