Skip to main content

शिवथरघळ

जर आपण भारताचा नकाशा पाहिला तर आपल्याला नकाशात डावीकडे, गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत काळसर हिरवी रेषा दिसते. ही रेषा गुजराथ येथून सुरु होते आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू मार्गे जाऊन केरळला पोहोचते.
ती रेषा म्हणजेच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट म्हणजे दख्खनच्या पठाराची जणू किनारच आहे. दख्खन पठाराच्या काठावरच्या ह्या पर्वत रांगा आहेत. 
या भागात बरीच जंगले, जलसाठे, धबधबे आहेत आणि जैवविविधता तसेच त्याचे वय यामुळे या भागाला 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून ओळखले गेले आहे. पश्चिम घाट हिमालयापेक्षाही जुना आहे!
वरंधा घाट 
📷विकिमीडिया कॉमन्स 
पश्चिम घाट हा अनेक मुख्य नद्यांचे उगमस्थान आहे. वरील छायाचित्रात दिसते आहे त्या प्रमाणे, वर्षा ऋतूत या प्रदेशात अनेक धबधबे पाहायला मिळतात. 
पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) अनेक सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे शिवथरघळ धबधबा. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण रौद्र सौंदर्यानिशी आणि ताकदीनिशी रोरावत खाली येताना दिसतो. 
हा धबधबा सुमारे शंभर फूट उंचीवरून, डोंगरमाथ्यावरून खाली झेपावतो. धबधब्याचा आवाज, धबधब्याच्या प्रवाहातून विखुरलेले थेंब आणि त्याच्या सभोवतालची हिरवाई हे सगळे गिर्यारोहकांसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी एक आकर्षण केंद्र बनलेले आहेत.
शिवथर धबधबा
 📷 माझी मैत्रीण 
पावसाळ्यातील शिवथर धबधबा 
📷विकिमिडीया कॉमन्स 

सह्याद्री पर्वतरांगांमधील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी हा एक धबधबा आहे आणि तो महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाडजवळ आहे. 
हा सह्याद्री पर्वतरांगामधील धबधब्यांपैकी एक सर्वात सुंदर धबधबा आहे हे निश्चितच, पण लोक या ठिकाणी येण्याचे मुख्य कारण मात्र ते नाही! तर शिवथर घळीच्या मुळे इतके लोक या ठिकाणी भेट देतात. 
शिवथरघळ ही धबधब्याजवळील घळ किंवा गुहा आहे, खरे तर जवळजवळ धबधब्याखालीच आहे म्हणा ना!
ही शिवथरघळ इतक्या लोकांनी भेट देण्याइतकी का महत्वाची आहे? नैसर्गिक सौंदर्य, भोवतालची हिरवाई, भूरचना शास्त्राच्या अभ्यासकांसाठी असलेले ह्या जागेचे महत्व हे तर कारण आहेच, पण मुख्य म्हणजे ह्या घळीत २२ वर्षे समर्थ रामदास स्वामी यांचे वास्तव्य होते हे इतक्या लोकांनी वर्षानुवर्षे, परत परत भेट देण्याचे कारण आहे. 
समर्थ रामदास स्वामी हे सतराव्या शतकातील भारतीय, राष्ट्रउपासक संत होते जे एक उत्तम कवी, तत्वज्ञ आणि आध्यात्मिक मार्गदर्शक होते.
समर्थ रामदास 
त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले असून, आज इतक्या शतकांनंतरही, हजारो नव्हे तर कोट्यावधी लोक त्यांचे अनुयायी आहेत. दासबोध हे त्यांचे प्रमुख लेखन आहे, जे त्यांनी शिवथर घळीत लिहिले आहे.
दासबोध हा जीवनाला मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर नव्याने उमगत जातो असा ग्रंथ आहे. 
शिवथर घळीमध्ये रामदासस्वामी आणि कल्याणस्वामी यांच्या मूर्ती आपण पाहू शकतो. समर्थ रामदासस्वामी दासबोध सांगत आहेत आणि कल्याणस्वामी लिहित आहेत.
समर्थ रामदास आणि कल्याणस्वामी 
ह्या दोन्ही मूर्ती पाहिल्या की आठवते कल्याणस्वामींचे पद,
मज तो आवडतो मम स्वामी | निशिदिनी अंतर्यामी ||धृ||
अक्षैपदाचा सुखदाता | निरसोनी माया ममता ||1||
भक्तीमार्गाचा गजढाला | चालविल्या आढाला ||2||
काय बोलो मी किर्तीसी | न दिसे तुळणेसी ||3||
छेत्र बहुतांचे दासाचे | धाम ची कल्याणाचे ||4||
धबधब्याजवळच्या किंवा खरे तर धबधब्याखालच्याच म्हणा ना, घळीत ह्या मूर्ती आहेत. ह्या मूर्तींच्या मागे श्रीरामाचे रामदासस्वामींनी स्थापन केलेले लहानसे मंदिर दिसेल. ह्या फोटोतही आपण मागे मूर्ती पाहू शकता. 
घळीचे प्रवेशद्वार हे खालच्या फोटोत आहेत तसे दिसते. खडकापासून आपले डोके वाचावे म्हणून आपण झुकून आत जातो आणि आत ह्या मूर्ती दिसल्या की आपोआप नतमस्तक होतोच!
घळीचे प्रवेशद्वार 
इथे फोटोत आपल्याला जो बोर्ड दिसतो त्यावर समर्थ रामदास स्वामींनी शिवथर घळ धबधब्याचे केलेले वर्णनपर काव्य वाचायला मिळते. ते काव्य असे आहे, 
गिरीचे मस्तकी गंगा । तेथुनि चालली बळे
धबाबा लोटती धारा । धबाबा तोय आदळे ॥ १ ॥
गर्जता मेघ तो सिंधू । ध्वनीकल्होळ ऊठिला ।
कड्याशी आदळे धारा । वात आवर्त होतसे ॥ २ ॥
तुषार उठती रेणू । दुसरे रज मातले ।
वात मिश्रित ते रेणू । सीत मिश्रित धुकटे ॥ ३ ॥
दराच तुटला मोठा । झाड खंडे परोपरी ।
निबीड दाटती छाया । त्या मधे वोघ वाहती ॥ ४ ॥
गर्जती श्वापदे पक्षी । नाना स्वरे भयंकरे ।
गडद होतसे रात्री । ध्वनी कल्लोळ ऊठती ॥ ५ ॥
कर्दमू निवडेना तो । मानसी साकडे पडे ।
विशाळ लोटती धारा । ती खाले रम्य वीवरे ॥ ६ ॥
विश्रांती वाटते तेथे । जावया पुण्य पाहिजे ।
कथा निरुपणे चर्चा । सार्थके काळ जातसे ॥ ७ ॥
ज्या परिसरात शिवथर घळ आहे त्या परिसराला सुंदरमठ असे म्हणतात. 
सुंदरमठाचे प्रवेशद्वार 
ह्या प्रवेशद्वारा पर्यंत आपण गाडीने जाऊ शकता. पुढे काही पायऱ्या चढून गेलात की मग शिवथर घळीत जाण्याचा रस्ता लागतो. तिथून अगदी काही पावलांच्या अंतरावर आहे शिवथरघळ. 
माहितीपत्रक 
माहितीपत्रक 
समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अध्यात्मिक गुरु होते. असे म्हणतात की त्या दोघांची शिवथर घळीत भेट झाली होती. 
समर्थ रामदास म्हणाले होते की जरी मी देहाने तुमच्यामध्ये नसलो तरी दासबोधाच्या रूपाने मी आहेच. 
माझी काया आणि वाणी | गेली म्हणाल अंत:करणी |
परी मी आहे जगज्जीवनी | निरंतर ||१ ||
आत्माराम दासबोध | माझे स्वरूप स्वत:सिद्ध |
असता न करावा खेद | भक्तजनी ||२||
नका करू खटपट | पहा माझा ग्रंथ नीट |
तेणे सायुज्याची वाट | गवसेल की ||३||
इतक्या शतकानंतर अजूनही, दासबोध कालबाह्य न होता, अनेकांना मार्गदर्शक ठरला आहे. दासबोधाचे अनेक भारतीय भाषांत तर भाषांतर झाले आहेच पण अनेक आंतरराष्ट्रीय भाषांत देखील अनुवाद झालेला आहे. 
दासबोध जयंती दरवर्षी माघ शुद्ध नवमीला साजरी केली जाते. ह्याच दिवशी १६५४ मध्ये दासबोध लिहून पूर्ण झाला होता. 
त्या दिवशी दासबोधाची पालखीतून मिरवणूक निघते. हे एखाद्या ग्रंथाचा जन्मदिवस साजरा होणे ह्याचे अनोखे उदाहरण आहे. त्या निमित्ताने त्यातील विचारांना उजाळा मिळतो हे सर्वात महत्वाचे. 
आसपासच्या गावांतून म्हणजे कुंभे शिवथर, आंबे शिवथर, कसबे शिवथर आणि खडकेश्वर ह्या गावातून पालखी नेली जाते. ह्या सोहळ्यासाठी आधीच अनेक ठिकाणाहून दिंड्या शिवथरघळीत दाखल झालेल्या असतात. 
स्थानिक लोक पालखीची वाट पाहत असतात. मग पालखी दाराशी आली की तिची साग्रसंगीत पूजा करतात आणि थोडा वेळ का होईना, पण पालखी आपल्या खांद्यावरून नेतात. 
त्या त्या गावातील मंदिरांतून पण पालखी नेली जाते. सर्वाना नंतर शिवथर घळीत येण्याचे आमंत्रण दिले जाते. ते आमंत्रण पण अगदी ऐकण्याजोगे असते. 
सगळीकडे फिरून काही तासांनी पालखी जेव्हा शिवथरघळीत परत येते तेव्हा तिथे पूजा, आरती, प्रार्थना आणि प्रसाद असतो. आलेल्या सर्व गावकऱ्यांना तसेच पालखीसाठी आलेल्या दिंडयांना जेवण असते. सामु हिकतेचा आणि समरसतेचा आविष्कारच आपल्याला त्या वेळी बघायला मिळतो. मला फेब्रुवारी २०१९ मध्ये ह्या सोहळ्यात सहभागी होण्याची अविस्मरणीय संधी मिळाली होती. 
पालखी 
पालखी 
दासबोधाची पालखी 

सह्याद्री पर्वतरांगा 
📷प्रज्ञा साठे 

मिरवणूक 
📷प्रज्ञा साठे 

मी भाग्यवान! ( Feb 2019)
📷प्रज्ञा साठे 

मिरवणूक 
📷प्रज्ञा साठे 

झेंडा रामनामाचा 
📷प्रज्ञा साठे 
मला सांगायला फार अभिमान वाटतो की ह्या गावातील अनेक जण सैन्यात आहेत. सुट्टीसाठी घरी आलेले सैनिक देखील ह्या मिरवणुकीत सामील झाले होते. 
सह्याद्रीच्या खोऱ्यातील गावांतून चालत जाता येणे, तिथल्या स्थानिकांसोबत मिसळता येणे, दासबोधाची पालखी काही क्षण का होईना खांद्यांवर घेता येण्याचे भाग्य लाभणे आणि मिरवणुकीचा भाग होण्याची संधी मिळणे हे ह्या अविस्मरणीय अनुभवाचे उत्कर्ष बिंदू होते. 
शिवथरघळीत कसे आणि कधी जाता येईल ह्या विषयी अधिक माहिती हवी असेल तर हा मी फेब्रुवारी २०१९ मध्ये काढलेला फोटो पहा. हे नंबर आत्तापर्यंत बदललेले नसतील तर तुम्हाला माहिती मिळू शकेल. 


 #OneDayTrip #JayJayRaghuveerSamarth #RamdasSwami #DasNavami #DasbodhNavami #Raigad#PlacsToVisitNearRaigad

Comments

  1. पालखी मिरविता आली तुला, धन्य झालीस ����

    ReplyDelete
  2. खरंच पालखीत सामिल होणे व त्याचा झेंडा मिरवायला मिळणे भाग्याची गोष्ट आहे, धन्य झालीस तू वृंदा

    ReplyDelete
  3. आठवणींना उजाळा मिळाला😍🙏🙏मला आ.मीराताईमुळे हे भाग्य सलग ६-७ वर्ष मिळाल 🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 3 - देवरियाताल -स्यालमी

ट्रेकचा तिसरा दिवस. कालचा सारी- देवरियाताल प्रवास तर खूपच छान झाला होता. पायही दुखले नव्हते की थकल्यासारखे देखील वाटले नव्हते. त्यामुळे उत्साहाने आजच्या दिवसाला सुरुवात केली. आजचा दिवस तसा अवघड असेल अशी, इंडियाहाईक्सच्या  वेब साईटवरचे वर्णन वाचून कल्पना आली होती. आज अंतर नऊ किलोमीटरपेक्षा जास्त होते. पण वाटेत अनेक शिखरे दिसणार होती. घनदाट जंगलातून जाणार होतो त्यामुळे अनेक पक्षीही दिसणार होते. त्याचीही उत्सुकता होती. सगळेजण देवरियाताल कॅम्पसाईट मधून बाहेर पडलो. अवघे एक दिवस वास्तव्य केलेले असले तरी मन थोडेतरी गुंतलेले असतेच.  देवरियातालच्या रस्त्याच्या डाव्या बाजूने एक जंगलवाटेचा फाटा होता. त्या वाटेने आम्ही निघालो. थोडा वेळ चालल्यावर आम्हाला पुन्हा एकदा चंद्रशिला शिखर दिसणार होते. अधून मधून दिसणारे हे शिखर आपल्याला कुठे पोचायचे आहे त्याची जाणीव करून द्यायचे, त्यानेही एक नवे बळ मिळायचे. पण आज आकाश इतके ढगाळ होते की शिखर दिसलेच नाही.उजवीकडे पुन्हा एकदा सारी गाव मात्र दिसले. 📷Cotrekker 📷Sumati Dhembre ह्या फोटोवरून कशा रस्त्याने आम्ही चालत होतो, चढ किती होता त्याची कल्पना येईल....

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 4 - स्यालमी - बनियाकुंड

आदल्या संध्याकाळी भुरभुरत असलेल्या पावसाने हवेतला गारवा अजूनच वाढवला होता. इतक्या लहान तंबूमध्ये झोपण्याची पहिलीच वेळ होती. पण सुरुवातीचे दोन तास सोडले तर नंतरचे पाच तास चांगली झोप झाली. अगदी प्रसन्न जाग आली.काल एकदाच क्षणभर का होईना, मनात तरळून गेलेला,"आपण ट्रेक इथेच थांबवावा का?"ह्या विचाराचा आज कुठे मागमूसही उरला नव्हता. मनात होते,  "इरादे अगर पक्के हो, तो डगमगाए कदम क्यु? हौसले बुलंद हो तो सहमा सा हो मन क्यु? मंज़िल अब दूर नहीं.. बस संभल के चलना, कभी न रुकना, हार ना मानना, बस्स .. चलते रहना।" - वृंदा टिळक आमच्या सगळ्याच कॅम्पसाईट्स भन्नाट जागांवर होत्या. आजची स्यालमीची कॅम्प साईट देखील त्याला अपवाद नव्हती. नजर पोचेल तिथपर्यंत फक्त पर्वत रांगा आणि जंगल. मानवी वस्तीची जवळपास काहीच चाहूल नाही.  📷Samrat Darda  सगळ्यांचे आवरून वॉर्म अप करून आम्ही निघालो. आजचा सगळा रस्ता सुंदर असणार होता. काल इतके चढ उतार चढून उतरून आता सगळ्यांची चांगली तयारी झाली होती. शिवाय आज मी नीकॅप्स देखील घातल्या होत्या!! त्यामुळे समजा जरी आज रस्ता अवघड असला असता तरी काळजीचे काही कारण नव्हते....

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 5- अंतिम भाग - बनियाकुंड- तुंगनाथ- चंद्रशिला

  📷Samrat Darda १५ एप्रिल, बनियाकुंड कॅम्पसाईट मधून काढलेला चंद्राचा सुंदर फोटो. त्या दिवशी शुक्ल पक्षातील सप्तमी किंवा अष्टमी असावी. कारण १७ एप्रिलला रामनवमी होती. सुंदर काळ्याभोर रात्रीचा सघन अंधार.. पौर्णिमा अजून साताठ दिवसांवर असली तरीही आत्तापासूनच तेजाळलेला चंद्र.. चमचमणारे, मध्येच ढगांच्या आड लपणारे चांदणे, आमच्या मनातील समिटविषयीची उत्सुकता..फार अनोखी रात्र होती ती.  उद्या पहाटे दोन वाजताचा वेकप कॉल असणार होता. आम्हाला आवरून, ब्रेकफास्ट करून तीन वाजता निघायचे होते. न विसरता घेण्याच्या गोष्टी तशा तर डे पॅक मध्ये भरूनच ठेवल्या होत्या. हेडलॅम्पच्या उजेडात सामान देखील आवरून ठेवले होते. पहाटे निघताना बाकी सामान मेन टेन्ट मध्ये नेऊन ठेवायचे होते.  इतक्या उंचीवर जायचे होते. काही तासांत आम्ही ४००० फुटांचा अल्टीट्युड गेन करणार होतो. झोपण्यासाठी डोळे मिटले खरे, पण मिटल्या डोळ्यांपुढेही बर्फाच्छादित शिखरांचीच दृश्ये तरळत होती. कधीतरी झोप लागली. सतत अधूनमधून जाग येऊन घड्याळात बघत होते. सगळे दोन वाजता उठणार, त्या आधी आपण आपले आवरून घेऊ या असा विचार डोक्यात होता तो बहुधा सतत ज...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक- भाग 1 - तयारी !!

  आपण स्वप्न पाहतो… आपण स्वप्ने पाहतो… त्यातील एखाद दुसरेच प्रत्यक्षात यावे म्हणून धडपडतो आणि बाकीची स्वप्ने कधीतरी नवलाईने आंजारायला गोंजारायला असावीत म्हणून त्यांना स्वप्न म्हणूनच राहू देतो.  हाय अल्टिट्युड ट्रेक हे माझे एक असेच स्वप्न होते, नेहमी भुरळ पाडणारे आणि तरीही प्रत्यक्षात आले तर इतक्या उंचीवर चालताना काहीशी धास्तीच वाटावी असे. त्यामुळे वर्षानुवर्ष ते स्वप्न प्रत्यक्षात न येता स्वप्नच राहिले होते.  नोव्हेंबरमध्ये माझी मैत्रीण धनश्री जगताप इंडियाहाईक्सबरोबर देवरिया ताल चंद्रशिला हा ट्रेक करून आली. तिच्याशी गप्पा मारताना या ट्रेकची सविस्तर माहिती मिळाली. मार्च एप्रिलमध्ये या संपूर्ण रस्त्यावर ऱ्होडोडेंड्रॉनची फुले फुललेली असतात असेही कळले… आणि मनातल्या स्वप्नाला पुन्हा एकदा जाग आली.  असे म्हणतात की देवरिया ताल म्हणजे जिथे यक्षाने युधिष्ठिराला प्रश्न विचारले ते तळे. वाटेत लागणारे तुंगनाथ हे तर जगातले सर्वात उंचावर असणारे शंकराचे मंदिर, पंच केदारापैकी एक. हे पांडवांनी बांधले आहे असे सांगितले जाते. ट्रेकचा समिट पॉईंट...