Skip to main content

मेडता - मीराबाईंचे निवासस्थान आणि नागौर किल्ला 

गीताजयंती नुकतीच म्हणजे 25 डिसेंबर 2020 रोजी साजरी केली गेली. जगातील हे एकमेव आणि अनोखे उदाहरण आहे, जिथे एका पुस्तकाचा वाढदिवस इतक्या मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. सध्या वातावरणात सगळीकडे कृष्ण भक्ती आहे, तेव्हा मला भगवान कृष्णाच्या महान भक्त संत मीराबाईंच्या गावाबद्दल, घराबद्दल लिहायला आवडेल. 

महान कवी व कृष्णभक्त असलेल्या संत मीराबाई यांचे मूळ ठिकाण राजस्थानमधील मेडता हे आहे. त्यांचे जन्मस्थान हे मेडता जवळील एक छोटेसे गाव आहे आणि बालपणी त्या मेडता येथे राहिल्या होत्या. 



Young Meerabai Raja Ravi Varma's painting
📷 wikipedia


मेडता हे गाव भारतातील राजस्थान राज्याच्या नागौर जिल्ह्यात आहे. हे गाव पुष्कर जवळ आहे. पुष्कर हे ठिकाण पुष्कर तलाव आणि ब्रम्हा मंदिरासाठी प्रसिद्ध आहेत. आपण पुष्करहुन मेडता आणि नागौर ची एक दिवसाची ट्रिप करू शकतो. पुष्करपासून मेडता फक्त ६१ कि. मी. अंतरावर आहे. मेड़ता- जोधपूर हे अंतर १२५ कि.मी. आणि मेडता जयपूर हे अंतर २१० कि. मी. आहे. पुष्करहून बिकानेरला जाताना आम्ही मेडता येथे गेलो होतो. राजस्थानमधील रस्ते खरोखर चांगले आहेत. राजस्थानमधील महामार्गांवर अधुनमधून नीलगाईंचे दर्शन होईल !!



Pushkar Lake



संत मीराबाईंचा जन्म १४९८ मध्ये जोधपूर साम्राज्याचे संस्थापक राव जोधामल यांच्या कुटुंबात झाला. ते मीराबाईचे पणजोबा होते. बालपणी त्या आजोबा राव दुदामल यांच्याजवळ मेडता येथील राजवाड्यात राहिल्या होत्या. राव दुदामल हे मेडता राजपूत कुळाचे संस्थापक होते. मीराबाईंचे संगीत, धार्मिक ज्ञान, राजकारण आणि युद्धकलेचे शिक्षण घरीच झाले. त्या कृष्णाच्या महान भक्त होत्या आणि त्यांनी आपले जीवन कृष्णाला समर्पित केले होते.

त्यांचे लग्न चित्तोड येथील युवराज भोजराज ह्यांच्याशी झाले होते. त्या एक महान संत आणि भक्तिमार्गातील प्रसिद्ध कवियत्री होत्या. त्यांची गीते सर्वश्रुत आहेत. त्यांनी पुष्कर, वृंदावन, द्वारका अशा अनेक ठिकाणी प्रवास केला होता आणि १५४६ मध्ये त्यांचे द्वारकेला निधन झाले. त्यांच्या मृत्यूविषयी रहस्यच आहे. नेमका त्यांचा मृत्यू कसा झाला कोणाला माहिती नाही. असे म्हणतात की त्या द्वारका येथील कृष्णमूर्तीत विलीन झाल्या. 

मेडता येथे त्यांचे वडिलोपार्जित घर, जिथे त्या लग्न होईपर्यंत राहिल्या होत्या ते आणि त्या कृष्णाची जिथे पूजा करायच्या ते मंदिर असे आपण पाहू शकतो.




Krishna Mandir, Merta. 


ह्या कृष्ण मंदिरामध्ये कृष्ण चतुर्भुजनाथ रूपात म्हणजे चार हात असलेली अशी मूर्ती आहे. चतुर्भुजनाथांच्या मूर्तीच्या अगदी समोरच मीराबाईंची मूर्ती आहे. असे वाटते की ते दोघे एकमेकांकडे पहात आहेत.


 

Meerabai Idol in the temple.
📷 Commons Wikimedia



 

हे मंदिर मीराबाईंचे आजोबा राव दुदामल यांनी बांधले होते आणि तिथे मीराबाई कृष्णाची पूजा करायच्या! आणखी एक छोटी पंचधातूची कृष्ण मूर्ती दाखवली जाते. मीराबाई लहान असल्यापासून त्या मूर्तीची पूजा करायच्या असे म्हटले जाते. 

मंदिराच्या आतील भागात सगळीकडे काचा आणि आरसे लावलेले नक्षीकाम आहे. मीराबाईंच्या आयुष्यातील प्रसंग एकतर पेंटिंग्ज किंवा कोरलेल्या काचकामाच्या रूपात दाखवलेले आहेत. 

शहराच्या मध्यभागी असलेले हे मंदिर मेडताच्या मुख्य बाजारपेठेत आहे. येथे आपल्याला स्थानिक जीवनाची झलक बघायला मिळते. मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांसाठी राखून ठेवलेले असे पार्किंग नसल्यामुळे मंदिराच्या मागच्या गल्लीत गाडी पार्क करावी लागते. 

 हे मंदिर केवळ त्याच्या सौंदर्यासाठीच नव्हे तर भारताच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक इतिहासाचा एक भाग आहे म्हणूनही बघायला हवे. प्रसिद्ध पर्यटनस्थळ नसले तरी बघायला हवे. मंदिर अजूनही नांदते प्रार्थनास्थळ आहे. अनेक भक्त ह्या मंदिरात येत असतात. मेडता नगरातले बरेच  रहिवासी ह्या मंदिरात रोज येतात.























Residence of Meerabai 



मीराबाईंच्या आजोबांचा, राव दुदामल यांचा हा राजवाडा आहे. युवराज भोजबरोबर लग्न होईपर्यंत मीराबाई येथेच राहत होत्या. मीराबाईंच्या आयुष्यातील विविध घटनांचे चित्रण आणि फलक येथे पाहायला मिळतात. येथे देखील मीराबाईंची मूर्ती आहे आणि एक छोटेसे संग्रहालय देखील आहे. आम्ही गेलो होतो तेव्हा असे वाटले की १९ व्या शतकात, काही वर्षे या जागेचा उपयोग मुलींची शाळा म्हणून केला जात होता. मागच्या अंगणात एक छोटी बाग आहे आणि तेथे राधाकृष्ण मूर्ती आहे.










Radha Krishna 



आजुबाजूची इतर बरीच राजपूत राज्ये मुघलांच्या समोर नमली होती आणि त्यांनी मुघलांना मुलगी देऊन सामंजस्याचे करार केलेले होते. मेडता आणि मेवाड, विशेषतः चित्तोर हे दोनच वंश असे होते की ज्यांनी मोगल राजांना आपल्या मुली देण्यास नकार दिला. 

मेडता पासून सुमारे ९० कि.मी. अंतरावर नागौर किल्ला आहे. किल्ल्याचे मूळ नाव 'अहिछत्रगड' असे आहे. नागौर परिसराला महाभारत काळात जंगलदेश म्हणून संबोधले जायचे. अहिछत्रगढ ह्या नावाचा अर्थ 'नागफणीचा किल्ला' असा आहे. प्राचीन काळातील नागवंशी क्षत्रियांनी हा मूळ किल्ला बांधला होता. 

१२ व्या शतकापासून नागौर किल्ला मुख्यत्वे मुस्लिमांच्या ताब्यात होता. सध्याचा किल्ला हे जाट मुघल वास्तुशास्त्राचे उदाहरण आहे. गेल्या ४० वर्षात गडावर जीर्णोद्धाराची अनेक कामे झाली आहेत. त्यामुळे आता किल्ला बऱ्याच चांगल्या स्थितीत आहे. 

किल्ल्याचा परिसर विशाल आहे, जवळजवळ ३६ एकर परिसर आहे. ह्या परिसरात अनेक सुंदर ऐतिहासिक इमारती आहेत. अनेक चौक, बागा आणि कारंजी आहेत. आम्ही नोव्हेंबर २०१६ मध्ये नागौरला गेलो होतो, तेव्हा मात्र अनेक हौदातील पाणी आटलेले असल्यामुळे त्यात कारंजी उडत नव्हती!

 






















































काही इमारतींच्या भिंतींवर तर आहेतच पण छतावर देखील सुंदर पेंटिंग्ज आहेत. काही इमारती आणि अगदी काही स्नानगृहेसुद्धा आपल्याला किल्ल्याच्या शासकांच्या वैभवशाली जीवनशैलीच्या कहाण्या सांगतात!

नक्षीदार कमानी आणि जाळ्यांमुळे ह्या वस्तू वैशिष्ट्यपूर्ण आणि सुंदर दिसतात. सांस्कृतिक वारसा संवर्धन उत्तम प्रकारे करण्यासाठीचा युनेस्को पुरस्कार नागौर किल्ल्याला मिळालेला आहे. 

नागौर शहरात सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन यांचे शिष्य वास्तव्य करीत होते आणि त्यातील एका प्रमुख शिष्याचा, हमीनूद्दीन चिस्ती ह्यांचा दर्गा अजूनही तेथे आहे. दरवर्षी जागतिक सूफी संगीत महोत्सव जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात नागौर किल्ल्यात भरतो. 

नागौर येथून बिकानेर अंदाजे १२० कि.मी. अंतरावर आहे. एकदा तुम्ही राजस्थानात आलात की बरेच किल्ले आणि हवेल्या पाहायला मिळतात. राजस्थान शाकाहारी अन्नासाठी प्रसिद्ध आहे. शाकाहारी लोकांना इथे कोणतीही अडचण उद्भवणार नाही, त्यांना कुठेही सहज शाकाहारी भोजन मिळेल. मात्र भाज्या शिजवताना बरीच हॉटेल्स शुद्ध तूप वापरतात, म्हणून व्हीगन लोकांना त्याबद्दल विशेष चौकशी करावी लागेल. पण व्हीगन ग्राहकांसाठी ते तेलात केलेल्या भाज्या आणि काही पक्वान्नेदेखील नक्की बनवतील. 

राजस्थानमध्ये बरीच चांगली हॉटेल्स आहेत. काही हवेल्या आणि राजवाडे हॉटेलमध्ये रुपांतरित केलेले आहेत. जर आपल्याला ऐतिहासिक काळाचा अनुभव घ्यायचा असेल तर आपण अशा हॉटेल्स मध्ये राहू शकता. आमच्या राजस्थान ट्रिपमध्ये आम्हाला अशा काही हॉटेल्समध्ये राहण्याची संधी मिळाली. 


#MeerabaiResidence #MereToGirdharGopal #SufiMusicFestival #MartiaRathors #Chittorgadh








 
















 






Comments

Post a Comment

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...

शिवथरघळ

जर आपण भारताचा नकाशा पाहिला  तर आपल्याला नकाशात डावीकडे, गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत काळसर  हिरवी रेषा दिसते. ही रेषा  गुजराथ येथून सुरु होते  आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू मार्गे जाऊन केरळला पोहोचते. ती रेषा म्हणजेच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट म्हणजे दख्खनच्या पठाराची जणू किनारच आहे. दख्खन पठाराच्या काठावरच्या ह्या पर्वत रांगा आहेत.  या भागात बरीच जंगले, जलसाठे, धबधबे आहेत आणि जैवविविधता तसेच त्याचे वय यामुळे या भागाला 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून ओळखले गेले आहे. पश्चिम घाट हिमालयापेक्षाही जुना आहे! वरंधा घाट  📷विकिमीडिया कॉमन्स  पश्चिम घाट हा अनेक मुख्य नद्यांचे उगमस्थान आहे. वरील छायाचित्रात दिसते आहे त्या प्रमाणे, वर्षा ऋतूत या प्रदेशात अनेक धबधबे पाहायला मिळतात.  पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) अनेक सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे शिवथरघळ धबधबा. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण रौद्र सौंदर्यानिशी आणि ताकदीनिशी रोरावत खाली येताना दिसतो.  हा धबधबा सुमारे शंभर फूट उंचीवर...