मुख्य सामग्रीवर वगळा

दिरांग, अरुणाचल प्रदेश - एक निसर्गसुंदर गाव .

 काही ठिकाणे खरे तर फार सुंदर असतात. पण ती एखाद्या मोठ्या पर्यटन स्थळाच्या जवळ असतील तर मग लोक त्या ठिकाणांकडे एका रात्रीचा थांबा म्हणूनच पाहतात. त्या मोठ्या स्थळांच्या कीर्तीमुळे ही लहान पण सुंदर असलेली स्थळे झाकोळून जातात. दिरांग हे असेच एक ठिकाण आहे. तिथे बरेच पर्यटक जातात, पण ते फक्त तवांग ला जाताना प्रवास खूप अवघड आणि लांबचा आहे, म्हणून विश्रांतीसाठी, एक रात्र मुक्काम करायला प्रवासी दिरांग ला थांबतात. काहीजण तिथे थांबतात ते तवांगला जाण्याआधी, इतक्या उंचीवर असलेल्या हवेची, कमी ऑक्सिजन ची, थंडीची शरीराला सवय व्हावी म्हणून.

थंड तवांग च्या तुलनेत जे समुद्रसपाटीपासून ३०४८मीटर उंचीवर आहे, दिरांग चे हवामान प्रसन्न आणि सुसह्य आहे. दिरांग समुद्रसपाटीपासून १५६० मीटर उंचीवर आहे. दिरांग पासून तवांगपर्यंतचे अंतर फक्त १३० किलोमीटर आहे. पण सगळा रस्ता पर्वतांतून जाणारा आहे. त्यामुळे कधी कधी गाडीत बसल्या बसल्या रोलर कोस्टर राईडचा आनंद आणि थरार पण अनुभवता येतो. जर का तुम्ही सुदैवी असाल, हवामानाची तुम्हाला साथ असेल तर मग फक्त चार तासांत देखील हे १३० किलोमीटर अंतर पार करता येते. पण कधी जर का बर्फवृष्टी, ढगफुटी किंवा दरड कोसळण्याचा प्रसंग घडलेला असेल तर मात्र हिमालयाच्या संगतीत तुम्हाला अनेक तास काढण्याची संधी मिळते!! 

आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल की दिरांग अरुणाचल प्रदेश मध्ये आहे. अरुणाचल प्रदेश - ज्या पर्वतांवर सूर्य सर्वात आधी उगवतो असे पर्वत असलेली भूमी. अरुणाचल भारताची फळबाग म्हणून पण ओळखले जाते. तसेच जीव वैविध्यासाठी देखील अरुणाचल प्रसिद्ध आहे. अनेक प्रकारचे पक्षी, प्राणी अरुणाचल मध्ये आढळतात. 

दिरांग मध्ये देखील ही सर्व गुणवैशिष्ट्ये आहेत. स्वच्छ निळे आकाश, शुद्ध मोकळी हवा. प्रदूषण अगदी कमी आणि हे केवळ आकडेवारीत नाही, तर तुम्हाला प्रत्यक्ष देखील लगेच जाणवते. 

आमचा दिरांग ला पोचण्या आधीच्या दिवशी खूप प्रवास झाला होता. गोहाटीपासून ते बोमडीला पर्यंतचा प्रवास आम्ही केला. त्यातला बराच भाग रस्ते चांगले आहेत. पण नंतर मात्र रस्ते चांगले असले तरी डोंगर, दऱ्या, वळणे असा प्रवास असल्याने वेळ लागतो. आम्ही बोमडीला येथे रात्री राहिलो आणि बोमडीला परतीच्या प्रवासात बघण्याचे ठरवून सकाळी दिरांग ला जाण्यासाठी निघालो. 

बोमडीला -दिरांग हा प्रवास साधारण दोन तासांचा आहे. रस्ताभर हिमालयाच्या पर्वतरांगा दिसत राहतात. सगळी शिखरे पांढऱ्या ढगांनी वेढलेली असल्याने बर्फ कोणता आणि ढग कोणते ते समजतच नाही!


हिमालय पर्वतरांगा 

मला माहिती होते की अरुणाचल प्रदेशातील सर्वात उंच शिखर गोरीचेन आहे. त्यामुळे रस्त्यात कोणतेही उंच शिखर दिसले की मला वाटायचे की गोरीचेन दिसले! जरी गोरी चेन नसले तरी तुम्ही वरच्या फोटोत बर्फाच्छादित शिखर पाहू शकता. 

नंतर मला कळले की त्या जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर कामते आहे. झाले.. त्या नंतर दिसणारे प्रत्येक उंच शिखर कामते वाटायला लागले!! 

अरुणाचल प्रदेशचे पहाटे उजळणारे पर्वत किंवा उगवणारा सूर्य ज्या पर्वतांवर सर्वप्रथम दिसतो अशा पर्वतांचा प्रदेश हे नाव सार्थ आहे. अरुणाचल प्रदेशामध्ये सूर्य खरोखरच लवकर उगवतो आणि संध्याकाळी सात वाजता पार रात्र झालेली असते. अर्थात भारताचा अवाढव्य भूभाग आणि त्या सर्वांची मिळून एकच भारतीय प्रमाण वेळ असल्याने आपल्याला लवकर आणि उशिरा वाटते. 

ह्या संपूर्ण प्रवासात तुम्ही वाहनाच्या आत बघूच शकत नाही. पूर्ण वेळ तुमचे डोळे खिडकीबाहेर खिळलेले असतात. हिमालयाची सूर्याच्या किरणांनी चमचमणारी शिखरे हे तर अविस्मरणीय दृश्य आहे. कधी कधी भीतीदायक दरी, कधी कधी खाच खळगे आणि तीव्र वळणे असलेला असा हा प्रवास.. पण हे सगळे असले तरीही अद्भुत सुंदर आणि अवर्णनीय असाच आहे. 

बर्फाच्छादित शिखर

अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यातील दिरांग हे लहानसे शहर, खरे तर गाव आहे. कामेंग नदीच्या तीरांजवळ हे गाव वसलेले आहे.

गावाची झलक

दिरांग मधील भेट देण्याजोगी ठिकाणे म्हणजे कालचक्र गोम्पा हा पाचशे वर्षे जुना बौद्ध मठ, दिरांग झोन्ग हे जुन्या किल्ल्याचे अवशेष आणि गरम पाण्याचे झरे ही ठिकाणे आहेत. त्यातील दिरांग झोन्ग मध्ये आता निवासी भाग आहे. तिथे आता लोकांची घरे आहेत. 

दिरांग झोन्ग 
📷Girish Tilak

आम्ही ही सगळी पर्यटन स्थळे टाळायचे ठरवले. त्या ऐवजी आम्ही LDL बौद्ध मठ आणि सांगती व्हॅली ला जायचे ठरवले. ह्या दोन्ही ठिकाणी, त्या वेळी, आमच्या खेरीज क्वचितच कोणी आलेले होते. आम्ही ह्या ठिकाणांचे सौंदर्य आणि शांती मनसोक्त उपभोगली.  

जर का कोणाच्या लक्षात आले नाही तर!!


प्रवेशद्वाराच्या पुढचा रस्ता थोडा चढणीचा आहे. जरी चढाचे अंतर फार नसले तरी विरळ हवा आणि कमी ऑक्सिजन ह्यामुळे असे वाटते की आपण एखादी टेकडी चढून गेलो आहोत!!

चढणीचा रस्ता

ही खरोखरच खूप शांत निवांत जागा आहे. नवीन बांधकाम आहे. खूप चांगल्या प्रकारे निगा राखलेली बाग आणि इमारत पाहून सुद्धा खूप ऊर्जादायी वाटते. 

जेव्हा आम्ही गेलो, तेव्हा मठात कोणीच नव्हते. फक्त माळी होता. त्यांनी आनंदाने फोटोसाठी पोज दिली.

हे बघा, आम्ही अशी पोज देतो!

काम चालू आहे!

काम चालू आहे!!

बागेची पण खूप सुंदर निगा राखलेली आहे. संपूर्ण परिसरात अजिबात कचरा नव्हता, अगदी कागदाचा एखादा कपटाही नाही. थोड्या वेळाने तिथे दोन महिला आल्या. त्यांच्याशी बोलल्यावर कळले की  रोज पूजेसाठी आणि प्रार्थनेसाठी तिथे परिसरातले लोक येऊन जातात.

 निळेशार आकाश, शुभ्र पांढरे ढग, सभोवतालचे डोंगर, जागेतील प्रगाढ शांतता आणि बुद्ध मूर्ती हे सगळे ह्या जागेला एक अध्यात्मिक व्यक्तिमत्व प्रदान करते. ह्या ठिकाणी, अगदी तुम्ही इकडे तिकडे भटकत असलात तरी तुम्हाला आपण ध्यान साधना करत आहोत असेच वाटते. त्या शांततेला, आपल्या बोलण्याने धक्का लावू नये असे वाटते.  

LDL मठ 
📷Girish Tilak

मठाचा परिसर 

ओम मणी पद्मे हं!

अजून एका वेगळ्या बाजूने फोटो 

सुंदर बाग 

हा फोटो म्हणजे माझे मागच्या वर्षीचे दिवाळी शुभेच्छापत्र होते. कारण मागच्या वर्षी दिवाळीत आम्ही ह्या ठिकाणी होतो. दिवस होता, २८ ऑक्टोबर २०१९. 



 नव्याने रंग दिलेला असल्याने मठ अगदी चमकत होता. मठाच्या आतल्या भागाचा मी फोटो काढला नाही. आत खूप शांतता होती. सर्व काही जाणणाऱ्या बुद्धाचा पुतळा होता. पूजा, प्रार्थनेसाठी, ध्यान धारणेसाठी फारच उत्तम जागा आहे. 

किती सुंदर दिवस! स्वच्छ निळ्या आकाशाचा!!

 मी मध्यंतरी एक वाक्य वाचले होते, "स्वच्छ निळे आकाश पाहून जर का तुम्हाला खूप आनंद होत असेल तर तुम्ही भाग्यवान आहात. तुमचा आत्मा अजून जिवंत आहे!!!" अरुणाचल प्रदेश ह्या अर्थाने, तुमच्या आत्म्याला जागे करणारा प्रदेश आहे. 

दिरांग मध्ये अजून एक दडलेले रत्न आहे, ते म्हणजे सांगती व्हॅली. सुदैवाने अजून ते पर्यटन स्थळ बनलेले नाही. फार लोकांना माहिती नाही त्यामुळे त्या ठिकाणाची शांतता आणि नैसर्गिक सौंदर्य अबाधित राहिलेले आहे. सांगती व्हॅली ट्रेकर्स आणि कॅम्पर्स ना चांगली माहिती आहे. पण मला भीती वाटते, की अजून काही वर्षांनी ही जागा जेव्हा सर्व पर्यटकांना माहिती होईल, तेव्हा तिथे भरपूर गर्दी व्हायला सुरुवात होईल आणि तिथल्या नैसर्गिक सौंदर्याला धक्का लागेल. 

सगळ्या बाजूनी हिमालयाच्या पर्वतरांगा, शेजारून वाहणारी स्वच्छ नितळ पाण्याची नदी हे सगळे तुम्हाला एका वेगळ्याच जगात घेऊन जाते. 

सांगती व्हॅली दिरांग पासून साधारण १५ किलोमीटर वर आहे. रस्ता निसर्गसुंदर आहे. जाताना अनेक फळबागा दिसतात. तुम्ही जर का योग्य मौसमात तिथे असाल आणि सुदैवी असाल तर किवीज, संत्री,सफरचंदे ही फळे देखील लगडलेली पाहायला मिळतील. 

रस्त्यांवर, पुलांवर, जिकडेतिकडे तुम्हाला रंगीबेरंगी पताकांच्या माळा वाऱ्याबरोबर झुलताना दिसतील. सगळे दृश्य त्या झुलणाऱ्या पताकांनी अगदी जिवंत होऊन जाते. त्यावर बहुधा काही मंत्र लिहिलेले असावेत. बारीक अक्षरात खूप मजकूर लिहिलेला दिसतो. 

रस्त्याने दिसलेली घरे छोटी आणि डोंगर उतारावर बांधलेली होती. त्यामुळे खूपदा रस्त्यावर असलेला भाग हा दुसरा मजला होता आणि पहिला मजला अगदी नदीच्या शेजारी!! प्रत्येक घराच्या छतावर काही भाज्या वाळवत ठेवलेल्या होत्या. हिवाळ्याची बेगमी करत असावेत. मक्याच्या कणसांच्या दोरीने केलेल्या माळा वाळवण्यासाठी, खिडक्यांना किंवा छताला लटकवलेल्या दिसल्या. छतांवर भले मोठे भोपळे देखील उन्हात पहुडलेले होते. हो, आणखी एक गोष्ट दिसते ती म्हणजे मिरच्या पण वाळत ठेवलेल्या असतात. बहुधा अरुणाचल प्रदेशाच्या सुप्रसिद्ध भूत जोलोकिया मिरच्या असाव्यात. 

प्रत्येक घरासमोर, किंवा खिडकीत किंवा छतावर रंगीबेरंगी फुलांच्या कुंड्या ठेवलेल्या असतात. तुम्हाला कोणी भेटले तर ताबडतोब स्मितहास्य करतात आणि तुमच्याशी बोलायला तयार असतात. मवाळ आणि सुस्वभावी लोक वाटले.

पूल आणि पताका!

स्वच्छ नितळ नदी, पर्वत रांगा आणि पताका 


फळबाग मालकाचे घर 

तुम्ही फोटो काढायचे थांबूच शकत नाही. 

किवीज 


भोपळे!

मिरच्या, बहुतेक भूत जोलोकिया

आम्हाला एक स्थानिक घर बघता आले. पुढच्या मोसमात ते लोकांना होम स्टे उपलब्ध करवून द्यायचा विचार करीत होते. त्या साठी त्यांची तयारी चालू होती.  

स्थानिक घर.

हा होम स्टे नक्कीच खूप छान असणार आहे. नदी आणि डोंगराच्या इतक्या जवळ राहणे किती आनंदाचे असेल! तिथे मला अजून एक खास गोष्ट पाहायला मिळाली. जे काय घर मालकिणीने सांगितलेले मला समजले त्यावरून, सीवीड वाळवत होते. वर्षभराच्या साठवणीचे काम चालू होते. 

प्रसन्न घरमालकीण

सी वीड

हा संपूर्ण परिसर पर्यटनासाठी अजून तयार होतो आहे. तोपर्यंत, जर तुम्हाला अत्याधुनिक सुविधा हव्या असतील, तर अरुणाचल तुमच्यासाठी नाही. हॉटेल्स मध्ये लिफ्ट्स नाहीत, रेस्टॉरंट्स अगदी साधी आहेत, रस्ते कुठे कुठे अगदी खाच खळग्यांचे असतील. जिथे तुम्ही राहत असाल त्या हॉटेलमध्ये तुम्ही आधी सांगितलेत तर तुम्हाला साधे पण ताजे बनवलेले आणि सुग्रास शाकाहारी अन्न मिळू शकते. बाहेर शाकाहारी अन्न मिळणे थोडे त्रासाचे होऊ शकते. 

आम्हाला पर्यटकांचा एक गट भेटला, ते सगळे ह्या सगळ्या गोष्टींमुळे वैतागलेले होते. जिथे तुम्ही ट्रीप ला जाण्याचा विचार करीत आहात, तिथला नीट अभ्यास करा. आपल्या अपेक्षा त्याप्रमाणे ठेवा असेच मी सांगेन!! अरुणाचल तिथल्या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे, अत्याधुनिक सोयी सुविधांसाठी नाही, इतके लक्षात ठेवा. 

आणि हे सगळे सांगून झाल्यानंतर, मी पुन्हा पुन्हा प्रत्येकाला अरुणाचलला भेट द्यावी असेच सुचवेन, अरुणाचल ला भेट द्या, भारतीय निसर्गाचे वैभव बघा. भारतातील विविधता बघा. 

आता आपल्यासमोर येत आहे, अरुणाचल चा सुप्रसिद्ध सूर्योदय! 

अरुणोदय झाला!!
📷Pradnya Sathe










टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

कोस्टल कर्नाटक ६ - अविस्मरणीय शरावती बॅकवॉटर बोटिंग, शरावती कांडला मॅन्ग्रोव्ह बोर्ड वॉक

मी आधीच्या पोस्टमध्ये सांगितले होते की आजचा सूर्यास्त समुद्रात होता तर उद्याचा सूर्योदय शरावती नदीत असणार आहे! तोच हा सूर्योदय शरावती नदीत, कमळांच्या मध्ये.  शरावती बॅकवॉटर बोटिंग  दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहापर्यंत आम्ही बोटिंगच्या ठिकाणी पोचलो. कारण आम्हाला सूर्योदय चुकवायचा नव्हता. होनावर जवळचे शरावती नदीतील बोटिंग हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.  आजूबाजूची शांतता, संथ पाणी, स्वच्छ नितळ पाण्यात वाकून आपले प्रतिबिंब न्याहाळणारी नारळाची झाडे, पाण्यात अध्ये मध्ये असलेली लहानशी बेटे, खारफूटीची जंगले, कमळाची पाण्यावर तरंगणारी पाने, उगवत्या सूर्याची पाण्यात मिसळणारी किरणे, त्याने तांबूस झालेले पाणी .. एक वेगळेच जग असते ते. तुम्ही जितक्या वेळासाठी बोट ठरवलेली असेल.. तास दीड तास..  तो वेळ, तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असणार हे मी अगदी खात्रीने सांगू शकते.  आपोआप जगाचा, आयुष्याचा कोलाहल मंद होत जातो. पहाटेचा मवाळ प्रकाश, पाण्यावर हेलकावणारी नाव, हवेतला अगदी किंचितसा सुखद गारवा आणि मुरत जाणारी शांतता ह्या सगळ्याने मन निवळत जाते.  आम्ही गेलो त्या दिवशी,...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका  आज उडुपीहून लवकर निघून शृंगेरीला पोचण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच निघालो. रस्ता खूपच छान होता. आता खरं सांगायचे तर कोस्टल कर्नाटक प्रवासात रस्ता सुंदर होता म्हणणे ही द्विरुक्तीच आहे.  सगळ्या सडका अगदी एका पातळीतील आणि गुळगुळीत आहेत. खड्डे खळगे, रस्ते वर खाली असणे असे काही नसल्याने महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हाला थोडे चुकल्यासारखे वाटले खरे!!! शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, स्वच्छता ह्यामुळे प्रवास फार आनंदाचा होतो. उडुपी शृंगेरी रस्ता तर आगुंबे जंगलातून जातो. त्यामुळे दाट झाडी होती. रस्त्यात सुप्रसिद्ध आगुंबे घाटही येतोच. सकाळची प्रसन्न वेळ आणि इतका छान रस्ता..दिवसाची चांगली सुरुवात होण्यासाठी आणखी काय पाहिजे?!!  आम्हाला वाटले होते इतक्या लवकर फारसे कोणी श्रुंगेरीत आलेले नसेल. पण शृंगेरीला पोचल्यावर लक्षात आले की आमच्यासारखाच विचार अनेकांनी केला होता!  अनेक बस रात्रभराचा प्रवास करून सकाळी शृंगेरीला पोचल्या होत्या. त्या लोकांच्या प्रातर्विधी आणि अंघोळीसाठी अनेक ठिकाणी माफक पैसे घेऊन उत्तम सोय केलेली होती....

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

कोस्टल कर्नाटक- २ मंगळुरू, मुलकी, उचिल, उडुपी

  आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते.  नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते.  मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात.  काद्री मंजुनाथ मंदिर  का...