Skip to main content

दिरांग, अरुणाचल प्रदेश - एक निसर्गसुंदर गाव .

 काही ठिकाणे खरे तर फार सुंदर असतात. पण ती एखाद्या मोठ्या पर्यटन स्थळाच्या जवळ असतील तर मग लोक त्या ठिकाणांकडे एका रात्रीचा थांबा म्हणूनच पाहतात. त्या मोठ्या स्थळांच्या कीर्तीमुळे ही लहान पण सुंदर असलेली स्थळे झाकोळून जातात. दिरांग हे असेच एक ठिकाण आहे. तिथे बरेच पर्यटक जातात, पण ते फक्त तवांग ला जाताना प्रवास खूप अवघड आणि लांबचा आहे, म्हणून विश्रांतीसाठी, एक रात्र मुक्काम करायला प्रवासी दिरांग ला थांबतात. काहीजण तिथे थांबतात ते तवांगला जाण्याआधी, इतक्या उंचीवर असलेल्या हवेची, कमी ऑक्सिजन ची, थंडीची शरीराला सवय व्हावी म्हणून.

थंड तवांग च्या तुलनेत जे समुद्रसपाटीपासून ३०४८मीटर उंचीवर आहे, दिरांग चे हवामान प्रसन्न आणि सुसह्य आहे. दिरांग समुद्रसपाटीपासून १५६० मीटर उंचीवर आहे. दिरांग पासून तवांगपर्यंतचे अंतर फक्त १३० किलोमीटर आहे. पण सगळा रस्ता पर्वतांतून जाणारा आहे. त्यामुळे कधी कधी गाडीत बसल्या बसल्या रोलर कोस्टर राईडचा आनंद आणि थरार पण अनुभवता येतो. जर का तुम्ही सुदैवी असाल, हवामानाची तुम्हाला साथ असेल तर मग फक्त चार तासांत देखील हे १३० किलोमीटर अंतर पार करता येते. पण कधी जर का बर्फवृष्टी, ढगफुटी किंवा दरड कोसळण्याचा प्रसंग घडलेला असेल तर मात्र हिमालयाच्या संगतीत तुम्हाला अनेक तास काढण्याची संधी मिळते!! 

आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल की दिरांग अरुणाचल प्रदेश मध्ये आहे. अरुणाचल प्रदेश - ज्या पर्वतांवर सूर्य सर्वात आधी उगवतो असे पर्वत असलेली भूमी. अरुणाचल भारताची फळबाग म्हणून पण ओळखले जाते. तसेच जीव वैविध्यासाठी देखील अरुणाचल प्रसिद्ध आहे. अनेक प्रकारचे पक्षी, प्राणी अरुणाचल मध्ये आढळतात. 

दिरांग मध्ये देखील ही सर्व गुणवैशिष्ट्ये आहेत. स्वच्छ निळे आकाश, शुद्ध मोकळी हवा. प्रदूषण अगदी कमी आणि हे केवळ आकडेवारीत नाही, तर तुम्हाला प्रत्यक्ष देखील लगेच जाणवते. 

आमचा दिरांग ला पोचण्या आधीच्या दिवशी खूप प्रवास झाला होता. गोहाटीपासून ते बोमडीला पर्यंतचा प्रवास आम्ही केला. त्यातला बराच भाग रस्ते चांगले आहेत. पण नंतर मात्र रस्ते चांगले असले तरी डोंगर, दऱ्या, वळणे असा प्रवास असल्याने वेळ लागतो. आम्ही बोमडीला येथे रात्री राहिलो आणि बोमडीला परतीच्या प्रवासात बघण्याचे ठरवून सकाळी दिरांग ला जाण्यासाठी निघालो. 

बोमडीला -दिरांग हा प्रवास साधारण दोन तासांचा आहे. रस्ताभर हिमालयाच्या पर्वतरांगा दिसत राहतात. सगळी शिखरे पांढऱ्या ढगांनी वेढलेली असल्याने बर्फ कोणता आणि ढग कोणते ते समजतच नाही!


हिमालय पर्वतरांगा 

मला माहिती होते की अरुणाचल प्रदेशातील सर्वात उंच शिखर गोरीचेन आहे. त्यामुळे रस्त्यात कोणतेही उंच शिखर दिसले की मला वाटायचे की गोरीचेन दिसले! जरी गोरी चेन नसले तरी तुम्ही वरच्या फोटोत बर्फाच्छादित शिखर पाहू शकता. 

नंतर मला कळले की त्या जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर कामते आहे. झाले.. त्या नंतर दिसणारे प्रत्येक उंच शिखर कामते वाटायला लागले!! 

अरुणाचल प्रदेशचे पहाटे उजळणारे पर्वत किंवा उगवणारा सूर्य ज्या पर्वतांवर सर्वप्रथम दिसतो अशा पर्वतांचा प्रदेश हे नाव सार्थ आहे. अरुणाचल प्रदेशामध्ये सूर्य खरोखरच लवकर उगवतो आणि संध्याकाळी सात वाजता पार रात्र झालेली असते. अर्थात भारताचा अवाढव्य भूभाग आणि त्या सर्वांची मिळून एकच भारतीय प्रमाण वेळ असल्याने आपल्याला लवकर आणि उशिरा वाटते. 

ह्या संपूर्ण प्रवासात तुम्ही वाहनाच्या आत बघूच शकत नाही. पूर्ण वेळ तुमचे डोळे खिडकीबाहेर खिळलेले असतात. हिमालयाची सूर्याच्या किरणांनी चमचमणारी शिखरे हे तर अविस्मरणीय दृश्य आहे. कधी कधी भीतीदायक दरी, कधी कधी खाच खळगे आणि तीव्र वळणे असलेला असा हा प्रवास.. पण हे सगळे असले तरीही अद्भुत सुंदर आणि अवर्णनीय असाच आहे. 

बर्फाच्छादित शिखर

अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यातील दिरांग हे लहानसे शहर, खरे तर गाव आहे. कामेंग नदीच्या तीरांजवळ हे गाव वसलेले आहे.

गावाची झलक

दिरांग मधील भेट देण्याजोगी ठिकाणे म्हणजे कालचक्र गोम्पा हा पाचशे वर्षे जुना बौद्ध मठ, दिरांग झोन्ग हे जुन्या किल्ल्याचे अवशेष आणि गरम पाण्याचे झरे ही ठिकाणे आहेत. त्यातील दिरांग झोन्ग मध्ये आता निवासी भाग आहे. तिथे आता लोकांची घरे आहेत. 

दिरांग झोन्ग 
📷Girish Tilak

आम्ही ही सगळी पर्यटन स्थळे टाळायचे ठरवले. त्या ऐवजी आम्ही LDL बौद्ध मठ आणि सांगती व्हॅली ला जायचे ठरवले. ह्या दोन्ही ठिकाणी, त्या वेळी, आमच्या खेरीज क्वचितच कोणी आलेले होते. आम्ही ह्या ठिकाणांचे सौंदर्य आणि शांती मनसोक्त उपभोगली.  

जर का कोणाच्या लक्षात आले नाही तर!!


प्रवेशद्वाराच्या पुढचा रस्ता थोडा चढणीचा आहे. जरी चढाचे अंतर फार नसले तरी विरळ हवा आणि कमी ऑक्सिजन ह्यामुळे असे वाटते की आपण एखादी टेकडी चढून गेलो आहोत!!

चढणीचा रस्ता

ही खरोखरच खूप शांत निवांत जागा आहे. नवीन बांधकाम आहे. खूप चांगल्या प्रकारे निगा राखलेली बाग आणि इमारत पाहून सुद्धा खूप ऊर्जादायी वाटते. 

जेव्हा आम्ही गेलो, तेव्हा मठात कोणीच नव्हते. फक्त माळी होता. त्यांनी आनंदाने फोटोसाठी पोज दिली.

हे बघा, आम्ही अशी पोज देतो!

काम चालू आहे!

काम चालू आहे!!

बागेची पण खूप सुंदर निगा राखलेली आहे. संपूर्ण परिसरात अजिबात कचरा नव्हता, अगदी कागदाचा एखादा कपटाही नाही. थोड्या वेळाने तिथे दोन महिला आल्या. त्यांच्याशी बोलल्यावर कळले की  रोज पूजेसाठी आणि प्रार्थनेसाठी तिथे परिसरातले लोक येऊन जातात.

 निळेशार आकाश, शुभ्र पांढरे ढग, सभोवतालचे डोंगर, जागेतील प्रगाढ शांतता आणि बुद्ध मूर्ती हे सगळे ह्या जागेला एक अध्यात्मिक व्यक्तिमत्व प्रदान करते. ह्या ठिकाणी, अगदी तुम्ही इकडे तिकडे भटकत असलात तरी तुम्हाला आपण ध्यान साधना करत आहोत असेच वाटते. त्या शांततेला, आपल्या बोलण्याने धक्का लावू नये असे वाटते.  

LDL मठ 
📷Girish Tilak

मठाचा परिसर 

ओम मणी पद्मे हं!

अजून एका वेगळ्या बाजूने फोटो 

सुंदर बाग 

हा फोटो म्हणजे माझे मागच्या वर्षीचे दिवाळी शुभेच्छापत्र होते. कारण मागच्या वर्षी दिवाळीत आम्ही ह्या ठिकाणी होतो. दिवस होता, २८ ऑक्टोबर २०१९. 



 नव्याने रंग दिलेला असल्याने मठ अगदी चमकत होता. मठाच्या आतल्या भागाचा मी फोटो काढला नाही. आत खूप शांतता होती. सर्व काही जाणणाऱ्या बुद्धाचा पुतळा होता. पूजा, प्रार्थनेसाठी, ध्यान धारणेसाठी फारच उत्तम जागा आहे. 

किती सुंदर दिवस! स्वच्छ निळ्या आकाशाचा!!

 मी मध्यंतरी एक वाक्य वाचले होते, "स्वच्छ निळे आकाश पाहून जर का तुम्हाला खूप आनंद होत असेल तर तुम्ही भाग्यवान आहात. तुमचा आत्मा अजून जिवंत आहे!!!" अरुणाचल प्रदेश ह्या अर्थाने, तुमच्या आत्म्याला जागे करणारा प्रदेश आहे. 

दिरांग मध्ये अजून एक दडलेले रत्न आहे, ते म्हणजे सांगती व्हॅली. सुदैवाने अजून ते पर्यटन स्थळ बनलेले नाही. फार लोकांना माहिती नाही त्यामुळे त्या ठिकाणाची शांतता आणि नैसर्गिक सौंदर्य अबाधित राहिलेले आहे. सांगती व्हॅली ट्रेकर्स आणि कॅम्पर्स ना चांगली माहिती आहे. पण मला भीती वाटते, की अजून काही वर्षांनी ही जागा जेव्हा सर्व पर्यटकांना माहिती होईल, तेव्हा तिथे भरपूर गर्दी व्हायला सुरुवात होईल आणि तिथल्या नैसर्गिक सौंदर्याला धक्का लागेल. 

सगळ्या बाजूनी हिमालयाच्या पर्वतरांगा, शेजारून वाहणारी स्वच्छ नितळ पाण्याची नदी हे सगळे तुम्हाला एका वेगळ्याच जगात घेऊन जाते. 

सांगती व्हॅली दिरांग पासून साधारण १५ किलोमीटर वर आहे. रस्ता निसर्गसुंदर आहे. जाताना अनेक फळबागा दिसतात. तुम्ही जर का योग्य मौसमात तिथे असाल आणि सुदैवी असाल तर किवीज, संत्री,सफरचंदे ही फळे देखील लगडलेली पाहायला मिळतील. 

रस्त्यांवर, पुलांवर, जिकडेतिकडे तुम्हाला रंगीबेरंगी पताकांच्या माळा वाऱ्याबरोबर झुलताना दिसतील. सगळे दृश्य त्या झुलणाऱ्या पताकांनी अगदी जिवंत होऊन जाते. त्यावर बहुधा काही मंत्र लिहिलेले असावेत. बारीक अक्षरात खूप मजकूर लिहिलेला दिसतो. 

रस्त्याने दिसलेली घरे छोटी आणि डोंगर उतारावर बांधलेली होती. त्यामुळे खूपदा रस्त्यावर असलेला भाग हा दुसरा मजला होता आणि पहिला मजला अगदी नदीच्या शेजारी!! प्रत्येक घराच्या छतावर काही भाज्या वाळवत ठेवलेल्या होत्या. हिवाळ्याची बेगमी करत असावेत. मक्याच्या कणसांच्या दोरीने केलेल्या माळा वाळवण्यासाठी, खिडक्यांना किंवा छताला लटकवलेल्या दिसल्या. छतांवर भले मोठे भोपळे देखील उन्हात पहुडलेले होते. हो, आणखी एक गोष्ट दिसते ती म्हणजे मिरच्या पण वाळत ठेवलेल्या असतात. बहुधा अरुणाचल प्रदेशाच्या सुप्रसिद्ध भूत जोलोकिया मिरच्या असाव्यात. 

प्रत्येक घरासमोर, किंवा खिडकीत किंवा छतावर रंगीबेरंगी फुलांच्या कुंड्या ठेवलेल्या असतात. तुम्हाला कोणी भेटले तर ताबडतोब स्मितहास्य करतात आणि तुमच्याशी बोलायला तयार असतात. मवाळ आणि सुस्वभावी लोक वाटले.

पूल आणि पताका!

स्वच्छ नितळ नदी, पर्वत रांगा आणि पताका 


फळबाग मालकाचे घर 

तुम्ही फोटो काढायचे थांबूच शकत नाही. 

किवीज 


भोपळे!

मिरच्या, बहुतेक भूत जोलोकिया

आम्हाला एक स्थानिक घर बघता आले. पुढच्या मोसमात ते लोकांना होम स्टे उपलब्ध करवून द्यायचा विचार करीत होते. त्या साठी त्यांची तयारी चालू होती.  

स्थानिक घर.

हा होम स्टे नक्कीच खूप छान असणार आहे. नदी आणि डोंगराच्या इतक्या जवळ राहणे किती आनंदाचे असेल! तिथे मला अजून एक खास गोष्ट पाहायला मिळाली. जे काय घर मालकिणीने सांगितलेले मला समजले त्यावरून, सीवीड वाळवत होते. वर्षभराच्या साठवणीचे काम चालू होते. 

प्रसन्न घरमालकीण

सी वीड

हा संपूर्ण परिसर पर्यटनासाठी अजून तयार होतो आहे. तोपर्यंत, जर तुम्हाला अत्याधुनिक सुविधा हव्या असतील, तर अरुणाचल तुमच्यासाठी नाही. हॉटेल्स मध्ये लिफ्ट्स नाहीत, रेस्टॉरंट्स अगदी साधी आहेत, रस्ते कुठे कुठे अगदी खाच खळग्यांचे असतील. जिथे तुम्ही राहत असाल त्या हॉटेलमध्ये तुम्ही आधी सांगितलेत तर तुम्हाला साधे पण ताजे बनवलेले आणि सुग्रास शाकाहारी अन्न मिळू शकते. बाहेर शाकाहारी अन्न मिळणे थोडे त्रासाचे होऊ शकते. 

आम्हाला पर्यटकांचा एक गट भेटला, ते सगळे ह्या सगळ्या गोष्टींमुळे वैतागलेले होते. जिथे तुम्ही ट्रीप ला जाण्याचा विचार करीत आहात, तिथला नीट अभ्यास करा. आपल्या अपेक्षा त्याप्रमाणे ठेवा असेच मी सांगेन!! अरुणाचल तिथल्या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे, अत्याधुनिक सोयी सुविधांसाठी नाही, इतके लक्षात ठेवा. 

आणि हे सगळे सांगून झाल्यानंतर, मी पुन्हा पुन्हा प्रत्येकाला अरुणाचलला भेट द्यावी असेच सुचवेन, अरुणाचल ला भेट द्या, भारतीय निसर्गाचे वैभव बघा. भारतातील विविधता बघा. 

आता आपल्यासमोर येत आहे, अरुणाचल चा सुप्रसिद्ध सूर्योदय! 

अरुणोदय झाला!!
📷Pradnya Sathe










Comments

  1. फोटो अप्रतिम आहेत प्रत्यक्ष किती छान असेल 😍😍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 4 - स्यालमी - बनियाकुंड

आदल्या संध्याकाळी भुरभुरत असलेल्या पावसाने हवेतला गारवा अजूनच वाढवला होता. इतक्या लहान तंबूमध्ये झोपण्याची पहिलीच वेळ होती. पण सुरुवातीचे दोन तास सोडले तर नंतरचे पाच तास चांगली झोप झाली. अगदी प्रसन्न जाग आली.काल एकदाच क्षणभर का होईना, मनात तरळून गेलेला,"आपण ट्रेक इथेच थांबवावा का?"ह्या विचाराचा आज कुठे मागमूसही उरला नव्हता. मनात होते,  "इरादे अगर पक्के हो, तो डगमगाए कदम क्यु? हौसले बुलंद हो तो सहमा सा हो मन क्यु? मंज़िल अब दूर नहीं.. बस संभल के चलना, कभी न रुकना, हार ना मानना, बस्स .. चलते रहना।" - वृंदा टिळक आमच्या सगळ्याच कॅम्पसाईट्स भन्नाट जागांवर होत्या. आजची स्यालमीची कॅम्प साईट देखील त्याला अपवाद नव्हती. नजर पोचेल तिथपर्यंत फक्त पर्वत रांगा आणि जंगल. मानवी वस्तीची जवळपास काहीच चाहूल नाही.  📷Samrat Darda  सगळ्यांचे आवरून वॉर्म अप करून आम्ही निघालो. आजचा सगळा रस्ता सुंदर असणार होता. काल इतके चढ उतार चढून उतरून आता सगळ्यांची चांगली तयारी झाली होती. शिवाय आज मी नीकॅप्स देखील घातल्या होत्या!! त्यामुळे समजा जरी आज रस्ता अवघड असला असता तरी काळजीचे काही कारण नव्हते....

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 3 - देवरियाताल -स्यालमी

ट्रेकचा तिसरा दिवस. कालचा सारी- देवरियाताल प्रवास तर खूपच छान झाला होता. पायही दुखले नव्हते की थकल्यासारखे देखील वाटले नव्हते. त्यामुळे उत्साहाने आजच्या दिवसाला सुरुवात केली. आजचा दिवस तसा अवघड असेल अशी, इंडियाहाईक्सच्या  वेब साईटवरचे वर्णन वाचून कल्पना आली होती. आज अंतर नऊ किलोमीटरपेक्षा जास्त होते. पण वाटेत अनेक शिखरे दिसणार होती. घनदाट जंगलातून जाणार होतो त्यामुळे अनेक पक्षीही दिसणार होते. त्याचीही उत्सुकता होती. सगळेजण देवरियाताल कॅम्पसाईट मधून बाहेर पडलो. अवघे एक दिवस वास्तव्य केलेले असले तरी मन थोडेतरी गुंतलेले असतेच.  देवरियातालच्या रस्त्याच्या डाव्या बाजूने एक जंगलवाटेचा फाटा होता. त्या वाटेने आम्ही निघालो. थोडा वेळ चालल्यावर आम्हाला पुन्हा एकदा चंद्रशिला शिखर दिसणार होते. अधून मधून दिसणारे हे शिखर आपल्याला कुठे पोचायचे आहे त्याची जाणीव करून द्यायचे, त्यानेही एक नवे बळ मिळायचे. पण आज आकाश इतके ढगाळ होते की शिखर दिसलेच नाही.उजवीकडे पुन्हा एकदा सारी गाव मात्र दिसले. 📷Cotrekker 📷Sumati Dhembre ह्या फोटोवरून कशा रस्त्याने आम्ही चालत होतो, चढ किती होता त्याची कल्पना येईल....

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 5- अंतिम भाग - बनियाकुंड- तुंगनाथ- चंद्रशिला

  📷Samrat Darda १५ एप्रिल, बनियाकुंड कॅम्पसाईट मधून काढलेला चंद्राचा सुंदर फोटो. त्या दिवशी शुक्ल पक्षातील सप्तमी किंवा अष्टमी असावी. कारण १७ एप्रिलला रामनवमी होती. सुंदर काळ्याभोर रात्रीचा सघन अंधार.. पौर्णिमा अजून साताठ दिवसांवर असली तरीही आत्तापासूनच तेजाळलेला चंद्र.. चमचमणारे, मध्येच ढगांच्या आड लपणारे चांदणे, आमच्या मनातील समिटविषयीची उत्सुकता..फार अनोखी रात्र होती ती.  उद्या पहाटे दोन वाजताचा वेकप कॉल असणार होता. आम्हाला आवरून, ब्रेकफास्ट करून तीन वाजता निघायचे होते. न विसरता घेण्याच्या गोष्टी तशा तर डे पॅक मध्ये भरूनच ठेवल्या होत्या. हेडलॅम्पच्या उजेडात सामान देखील आवरून ठेवले होते. पहाटे निघताना बाकी सामान मेन टेन्ट मध्ये नेऊन ठेवायचे होते.  इतक्या उंचीवर जायचे होते. काही तासांत आम्ही ४००० फुटांचा अल्टीट्युड गेन करणार होतो. झोपण्यासाठी डोळे मिटले खरे, पण मिटल्या डोळ्यांपुढेही बर्फाच्छादित शिखरांचीच दृश्ये तरळत होती. कधीतरी झोप लागली. सतत अधूनमधून जाग येऊन घड्याळात बघत होते. सगळे दोन वाजता उठणार, त्या आधी आपण आपले आवरून घेऊ या असा विचार डोक्यात होता तो बहुधा सतत ज...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...