Skip to main content

मोरबे धरण -वावर्ले गाव

 रोज सूर्योदय आणि सूर्यास्त होतो आणि विशेष म्हणजे तो सर्वांसाठी फुकटात उपलब्ध असतो! तेव्हा तो चुकवू नका. प्रवास हा किलोमीटर मध्ये नव्हे तर प्रवासात मिळालेल्या आनंदात मोजायला हवा. तुम्ही हे दोन्ही,आधी कधी ऐकले होते का? 

मोरबे 
त्या दिवशी सुखद गार हवेने आमचे स्वागत केले. डोंगर, जंगल, तलावातील पाणी आणि ताजी हवा ..दिवसाची प्रसन्न सुरुवात व्हायला अजून काय हवे? माझी खात्री आहे, सूर्यदेखील इथे उगवताना मनात असेच म्हणत असेल!!

मोरबे धरणाच्या बांधावरून 
आम्ही मोरबे धरणाच्या बांधावर होतो. चालण्यासाठी, धावण्यासाठी हा उत्तम रस्ता आहे. इथे दिवसभर पर्यटकांना परवानगी नाही. फक्त सकाळी फिरायला येणाऱ्या लोकांसाठी सकाळी साधारण ८ वाजेपर्यंत हा परिसर सार्वजनिक वापरासाठी खुला असतो. आम्ही तिथे सकाळी खूप लवकरच पोचलो होतो. 
 महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ धावरी नदीवर बांधलेले हे धरण आहे. मोरबे हे तसे अलिकडच्या काळात बांधले गेलेले भारस्थायी धरण आहे. 
आधुनिक युगातील नोंदी बघितल्या तर लक्षात येते की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धामापूर हे धरण महाराष्ट्रातील सर्वात जुने धरण आहे. धामापूर धरणाचे बांधकाम १५३० मध्ये सुरु झाले आणि १६०० मध्ये ते पूर्ण क्षमतेने काम करत होते. पण ते मातीचे धरण होते. धामापूर म्हटल्यावर सुनीताबाईंची आठवण होते. सुनीताबाई देशपांडे ह्यांनी एका पुस्तकात धामापूर धरणावर लेख लिहिला आहे. ते चित्र डोळ्यांपुढे उभे राहते. 
प्राचीन काळातल्या, भारतातील सर्वात जुन्या धरणाचा उल्लेख सापडतो तो चोला राजांनी बांधलेल्या कल्लनाई धरणाचा. ह्या धरणाचे बांधकाम इ.पूर्व १०० मध्ये सुरु झाले. पहिल्या शतकाच्या अखेरीस हे धरण बांधून पूर्ण झाले होते. तंजावर जवळ कावेरी नदीवर बांधलेले हे धरण अजूनही कार्यक्षम आहे. कावेरी नदीचे पाणी अडवून शेतीसाठी वापरले गेले व तो सर्व भूभाग समृद्ध झाला. 
आधुनिक काळातील जुने भारस्थायी धारण आहे ते तुळशी धरण. मुंबईजवळील तुळशी नदीवर हे धरण १८७९ मध्ये बांधले गेले. 
मोरबे धरण २००६ मध्ये कार्यान्वित झाले. भारस्थायी धरण बांधायचे तर तिथे पाया भक्कम व मजबूत होण्यासाठी, विशिष्ट संरचनेची, खडकाळ जमीन आवश्यक असते. त्यावर मग दगडांच्या राशी व दगड, काँक्रीटचे बांधकाम केले जाते. मोरबे येथे पण आपल्याला दगडांच्या राशी व दगडी बांधकाम दिसते. अशी भारस्थायी धरणे ही स्वतःच्या वजनामुळे व विशिष्ट रचनेमुळे पाण्याच्या धडका वर्षानुवर्षे सहन करू शकतात. 
मोरबे धरण नवी मुंबईला पाणीपुरवठा करते. ह्या धरणाची मालकी नवी मुंबई महानगर पालिकेकडे आहे. एक धरण मालकीचे असणारी अशी, मला वाटते, ही एकमेव महानगर पालिका असेल. 

धरणाची सविस्तर माहिती 
📷 Wikimedia Commons

 चंद्रास्त 01/11/20
कोजागिरीचा पूर्ण चंद्र मावळण्याच्या तयारीत होता. हा फोटो सकाळी ६. २६ ला घेतलेला आहे. ह्या फोटोत तुम्हाला धरणाचा दगडी बांध दिसेल. दुसऱ्या बाजूला दिशा उजळू लागल्या होत्या. सूर्य उगवण्याच्या तयारीत होता. ती नक्कीच एक अप्रतिम सुंदर सकाळ होती.

सूर्योदय 01/11/20
ते सुखद सुंदर वातावरण कोणत्याच कॅमेऱ्याने टिपता येणार नाही. तरीही मी माझ्या साध्या मोबाईल कॅमेऱ्याने टिपण्याचा प्रयत्न केला आहे. 

हे पहाटेचे दृश्य अनुभवण्यासाठी आम्ही आदल्या दिवशीच जवळच्या वावर्ले गावात जाऊन राहिलो होतो. मोरबे धरणापासून कारने दहा मिनिटांच्या अंतरावर असलेले ते एक छोटेसे गाव आहे. 

खालापूर जिल्ह्यात चौक कर्जत रस्त्यावर ह्या वावर्ले गावात आम्ही राहिलो होतो साठे फार्म वर. खूप मोठाली झाडे असलेली ही शांत जागा जणू ऑक्सिजन बँकच आहे. प्रशस्त आवार असल्याने, सध्याच्या दिवसात आवश्यक असणारी 'दो गज की दूरी' पण सहज शक्य होते. 

साठे फार्म वरील फुले 
हिरवाई 
ऊन सावल्या इथे खेळती, झाडांसंगे त्याही हिरवळती!

वावर्ले गाव आणि एकूणच हा सर्व परिसर टेकड्या, डोंगर, पाझरतलाव, ओढे, धबधबे, झाडे ह्या सगळ्यांमुळे निसर्गसमृद्ध आहे. दहा पंधरा मिनिटे चाललात आणि एक छोटासा चढ चढलात की तुम्ही ह्या तलावापाशी पोचता. पावसाचे पाणी इथे ह्या तलावात साठते. ह्या भागात भरपूर पाऊस असल्याने पावसाळ्यात खूप धबधबेदेखील असतात.
रस्त्याची सुरुवात आमराईतून होते आणि रानातील वळणवाटांनी आपण तलावापाशी पोचतो. इतकी शुद्ध मोकळी हवा शहरांत नक्कीच मिळत नाही.


तलावाचे विहंगम दृश्य
जेव्हा तुमच्या नजरेला असे विस्तीर्ण मोकळे रान, डोंगर आणि पाणी दिसते तेव्हा एका अवर्णनीय स्वातंत्र्याचा अनुभव येतो. 
वाऱ्याने हलते रान, बाकी सुनसान, जग हे सारे! 
जवळच एक लहानसे गणेश व शिवमंदिर आहे. जरी मंदिराचे बांधकाम नवे असले तरी शिव पिंडी आणि गणपती मात्र अनेक दशके पाहिलेले जुने जाणते दिसतात. काळाच्या धडका सोसून, त्या खुणा अंगाखांद्यावर वागवत आहेत.
मंदिर 
अजून मावळायला वेळ आहे, सूर्य नुसता डोंगराच्या मागे जाऊन बघतो आहे!
सूर्य मावळण्याच्या तयारीत !! 31/10/20
उगवता पूर्ण चंद्र दिसणे ह्यापेक्षा वेगळी, अशी एखाद्या दिवसाची काय सुंदर अखेर असू शकते?
रिसॉर्टच्या जेवणघरातून दिसलेला उगवता पूर्ण चंद्र! 31/10/20
स्वादिष्ट व्हीगन अन्नाचा आस्वाद घेता घेता कोजागिरीचा उगवणारा पूर्ण चंद्र दिसणे हा अपार आनंद होता. 
साठे फार्मपासून जवळच सोंडाई किल्ल्याचा ट्रेक करता येतो. मध्यम अवघड असा हा दोन तासांचा ट्रेक आहे. कोंढाणे बुद्ध लेणी देखील साठे फार्म पासून कारने अर्ध्या तासाच्या अंतरावर आहेत. ही दोन्ही ठिकाणे पुढच्या ट्रीपला जाण्या साठी राखून ठेवली आहेत. 
जसे मी सुरुवातीला म्हणाले तसे, प्रवास हा किलोमीटर मध्ये नव्हे तर मिळालेल्या आनंदात मोजायला हवा. घरापासून साधारण ५० किलोमीटर वर असणाऱ्या ठिकाणाची दीड दिवसाची एक लहानशी ट्रिप देखील तुम्हाला ताजेतवाने करून टाकते!  

#ShortTripFromMumbai #ShortTripFromThane #ShortTripFromPune #SatheFarmsSatishSathe07738342820 #PlacesToVisitNearKarjatKhopli

Comments

  1. अप्रतिम पुढच्या वेळी आम्हाला पण घेऊन चल😍
    फोटो खूप छान 👌👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....

कोस्टल कर्नाटक- २ मंगळुरू, मुलकी, उचिल, उडुपी

  आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते.  नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते.  मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात.  काद्री मंजुनाथ मंदिर  का...

महेश्वर

महेश्वर हे मध्यप्रदेश पर्यटन निगमच्या पर्यटन स्थळांमधले एक महत्वाचे नाव आहे. पण करोडो भारतीयांसाठी ते केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर एक तीर्थस्थान असते. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेले स्थान आहे.  महेश्वर किल्ला प्रवेशद्वार  राजवाडा प्रवेशद्वार  बाह्यरूप  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  राजवाडा प्रवेशद्वार  अहिल्याबाई होळकर हे केवळ भारताच्याच नव्हे तर विश्वाच्या इतिहासातील एक सोनेरी पान. संपूर्ण मानव विश्वातील यशस्वी स्त्री राज्यकर्त्यांची सूची करायची झाली तर अहिल्याबाई होळकरांचे नाव ठळकपणे लिहायला लागेल.   31 मे 2025 ला त्यांची तीनशेवी जयंती आहे. पण 300 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या अहिल्याबाईंचे आयुष्य अगदी आजच्या आधुनिक काळातल्या आव्हानातही मार्गदर्शक ठरावे असेच आहे.  त्यांच्याविषयीचा आदर मनात घेऊनच आपण महेश्वरला जातो आणि त्या भावनेच्या प्रकाशात महेश्वर पाहतो. महेश्वरला फार मोठी प्राचीन परंपरा आहे. स्कंद पुराणाच्या रेवा खंडात आणि वायू पुराणाच्या नर्मदा रहस्य मध्ये महिष्मती म्हणजे महेश्वरचे वर्णन आलेले आहे. 'गुप्...