Skip to main content

से ला आणि जसवंतगढ युद्ध स्मारक

गेल्या पोस्टमध्ये, आपण होतो दिरांग ला! तिथला सुप्रसिद्ध, सुंदर सूर्योदय देखील आपण पाहिला होता. निसर्गरम्य दिरांग शहराच्या सौंदर्यामुळे आमच्या अपेक्षा खूपच उंचावल्या होत्या आणि आम्ही उत्सुकतेने से ला पास दिसण्याची वाट पाहत होतो.

तिबेटियन भाषेत ला म्हणजे पास. त्यामुळे खरे तर नुसते से ला म्हणणे पुरेसे आहे! मात्र ह्याचा उल्लेख सर्वत्र से ला पास असाच केलेला आढळतो. 

अरुणाचल मधील वाहन जाण्याजोग्या सर्वात उंच रस्त्यांपैकी हा एक रस्ता असल्याने, तुमचा प्रवास खूपच रोमहर्षक होतो. तवांग ला बाकी भारताशी जोडणारा हा एकमेव रस्ता असल्याने संरक्षणाच्या तसेच दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता खूपच महत्वाचा आहे. 

 समुद्रसपाटीपासून अंदाजे 13,700 फूट उंचीवर, आपण अरुणाचलच्या पश्चिम कामेंग जिल्ह्यातील दिरांग आणि तवांग दरम्यानच्या हिमालय पर्वतरांगा ओलांडतो. हवामान थंड असले आणि बर्‍याच वेळा रस्ता बर्फाच्छादित असला तरी बीआरओ (सीमा रस्ता संस्था) हा रस्ता प्रवासासाठी खुला राहील यासाठी खूप प्रयत्न करते. वर्षाकाठी, फक्त काही वेळा, तुफान बर्फवृष्टीमुळे, मुसळधार पाऊस पडल्याने किंवा दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद होतो.परंतु रहदारीसाठी रस्ता खुला व्हावा म्हणून दुरुस्त करण्यासाठी बीआरओ सर्व प्रयत्न अगदी त्वरित करते . 

से ला पासला जाताना चारदर तवंग रस्ता 

हा रस्ता एनएच 13 चा एक भाग आहे आणि मला तो तुम्हाला Google नकाशात दाखवायला आवडेल. म्हणजे तो रस्ता कसा आहे हे आपल्याला कोणतेही वर्णन न लिहितासुद्धा नीटच कळेल!



भारत सरकारने तवांग पर्यंत एक बोगद्यातून रस्ता तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला असून, तो २०२२ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. यामुळे प्रवासाचे अंतर कमी होईल व वेळेची बचत होईल. हा बोगदा पूर्ण झाल्यावर, तो रस्ता पाऊस आला, बर्फ पडला तरी वर्षभर सुरु राहील आणि तवांगशी सतत संपर्कात राहता येईल. 

जेव्हा भूभाग खूपच कठीण आणि दऱ्याखोऱ्यानी बनलेला असेल तेव्हा रस्ते तयार करणे सोपे काम नाही. से ला तलावाजवळील से ला स्मारक, आपल्याला रस्ते तयार करताना आलेल्या अडचणी, त्या साठी धारातीर्थी पडलेले शिपाई याबद्दल सांगते.





इथे आहे अरुणाचल प्रदेश मधील सर्वात सुंदर तलावांपैकी एक तलाव- से ला तलाव. 


ह्या भागातील हवामान खूप चटकन बदलते. अगदी काही मिनिटांतच आधी राखाडी दिसणारे आकाश निळे दिसू लागले. 


अप्रतिम दृश्य
📷 Girish Tilak 

तिथे हवा खूपच थंड होती. जमिनीवर, कानाकोपर्‍यात, सांदीसपाटीत थोडा थोडा बर्फ दिसत होता. तसेच डोंगराच्या शिखरावर बर्फ पसरलेला होता. अगदी पाण्यातही तरंगांचा होणारा बर्फ आणि बर्फाचे तरंग दिसत होते. 

बर्फाचे तरंग

📷 Girish Tilak 

अनिवार्य फोटो!
📷Girish Tilak

ह्या फोटोतल्या स्मितहास्यावर जाऊ नका. हे फक्त फोटोपुरते आहे! हवा खूप थंड होती. अंगात हुडहुडी भरत होती. शिवाय ऑक्सिजनचे प्रमाण खूप कमी असल्याचे श्वास घेताना जाणवत होते. 

📷 Girish Tilak 

तलावाभोवती चालण्यासाठी चांगला रस्ता केलेला आहे. पण इतक्या थंड हवेत कोणाचीच त्या रस्त्यावरून जाण्याची हिंमत होत नव्हती!!

या फोटोमध्ये आपण बर्फाच्छादित पर्वत शिखरे आणि वळणा वळणाचे रस्ते पाहू शकता.


 या तलावाचे, ह्या भागातील बौद्ध लोकांसाठी, लामांसाठी खूपच आध्यात्मिक महत्व आहे. दलाई लामा यांनी बर्‍याचदा या ठिकाणाला भेट दिली आहे. आमच्या ड्रायव्हरने आम्हाला सांगितले की या भागात 101 लहानमोठे तलाव आहेत.

जेव्हा आपण या प्रदेशात प्रवास करतो, तेव्हा नक्कीच असे वाटते की 'शांग्री ला' खरोखर अस्तित्त्वात असल्यास, ते खरंच, इथेच असेल. 

आता आम्ही जसवंतगढ युद्ध स्मारकाकडे निघालो होतो. ही शौर्य व पराक्रमाची कहाणी सांगणारी जागा आहे. 

चौथी तुकडी, गढवाल रायफल्सचा रायफलमन जसवंसिंग रावत हे १९६२ च्या भारत चीन युद्धात नुरानंग येथे तैनात होते. गढवाल रायफल बटालियनने चिनी सैनिकांशी जोरदार लढाई केली. त्यांच्या आक्रमणांना उत्तर दिले. परंतु प्रतिकूल परिस्थितीमुळे बटालियनला माघार घ्यावी लागली.

त्यावेळी जसवंतसिंगने आपल्या दोन अन्य सैनिक साथीदारांसह ह्या चौकीवर तळ ठोकला. चिनी सैनिकांवर गोळीबार करत राहिले. त्यामुळे माघार घेणाऱ्या बटालियनला, दुसर्‍या तळावर सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी वेळ मिळाला.
 
दुसर्‍या दिवशी त्याचे दोन साथीदार देखील युद्धात मरण पावले, पण असे म्हणतात की जसवंतसिंग एकट्याने ७२ तास ही चौकी सांभाळत होते. चिनी सैन्याला त्यांनी रोखून ठेवले होते. 

आक्रमक चिनी सैन्याने 17 नोव्हेंबर 1962 रोजी त्यांना ताब्यात घेऊन ठार केले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना महावीर चक्र देण्यात आले. गोष्ट इथेच संपत नाही. जसवंतसिंग असे एकमेव सैनिक आहेत जे मृत्यू नंतरही भारतीय सशस्त्र सेनेच्या सेवेत होते.

ते सेवेत असते तर जशी बढती मिळाली असती, तशी अगदी नियमित बढती त्यांना देण्यात आली. त्यांचे सामानदेखील इथे ठेवले आहे. त्यांच्या बुटांना दररोज पॉलिश केले जाते. 2002 मध्ये ते कॅप्टन म्हणून निवृत्त झाले.

 हा शूर देशभक्त मृत्यू नंतरही आपल्या राष्ट्राची सेवा करत राहिला आणि त्या भागात तैनात असलेल्या सैनिकांना ते अजूनही धोक्यांची सूचना देतात, वेगवेगळ्या प्रकारे मदत करतात असे म्हटले जाते. 
 



स्मृतिस्थळ 

जसवंतसिंग स्मारक

जसवंतसिंगांना रोज लागतील अशा सगळ्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. युनिफॉर्मला रोज इस्त्री होते, बुटांनादेखील रोज पॉलिश होते. 

 

या स्मारकावर लष्करी अधिकारी तैनात आहेत. ह्या स्मृतिस्थळाला ते 'बाबा का मंदिर' असे म्हणतात. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्याने आम्हाला सांगितले की येथे तैनात असलेले अधिकारी व इतर कर्मचारी मांस, मासे इत्यादी पदार्थ खात नाहीत. इथे असताना पूर्णपणे शाकाहारच घेतात. .

दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात, एक पूजा होते आणि स्मारकात एक कार्यक्रम आयोजित केला जातो. ऑक्टोबर २०१९ च्या शेवटी आम्ही जसवंत गडला भेट दिली तेव्हा ही जागा वार्षिक समारंभासाठी सज्ज होत होती.

एक छोटेसे संग्रहालय आहे जिथे बंकर उभे केले आहेत. ते पाहून आलेल्या पर्यटकांना सैनिक कसे जगतात हे समजते.  



 जेव्हा आपण इथे उभे राहून, लष्करी अधिकाऱ्यांकडून, युद्धाबद्दल ऐकतो तेव्हा आपल्या सैनिकांच्या खडतर आयुष्याची आणि कष्टांची तीव्र जाणीव होते. त्यांना प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागतो, आपल्या कुटूंबापासून दूर रहावे लागते आणि समाज त्यांच्या ह्या त्यागाची जाणीव क्वचितच ठेवतो. इथून निघताना मनातील, आपल्या देशाच्या सैनिकांविषयीचा आदर, सन्मान आणि अभिमान जास्तच तीव्र झालेला असतो.

जवळच एक लहान रेस्टॉरंट आहे. ते लष्कराने चालवलेले आहे. येथे तुम्ही ताजे बनविलेले, गरमगरम, नाश्त्याचे पदार्थ आणि काही केक्स, डोनट्स इत्यादी खाऊ शकता. इथे मिळणारे उत्पन्न जसवंतगडच्या देखभालीसाठी वापरले जाते.

इथे आपण चवदार स्नॅक्स खाऊ शकता, त्याबरोबर मोफत दिला जाणारा गरम गरम चहा, हवा तेवढा पिऊ शकता आणि तवांगच्या प्रवासासाठी स्वत: ला तयार करू शकता!

#IndiaChinaWarMemorial #MustVisitPlaceInArunachal #SelaIconicPlace #101LakesNearTawang #BeautifulLakeNearTawang  #JasawantSinghRawat #72Hours








 



Comments

  1. NH13 Omg😶
    सलाम जसवंतसींगजीना 🙏🙏🙏
    मस्त लिहलेस

    ReplyDelete
    Replies
    1. भारत माता की जय!!

      Delete
    2. NH 13 खूपच भारी आहे. आपल्याला बघताना असे वाटते, तो बांधला जाताना किती अवघड गेले असेल?!

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...

शिवथरघळ

जर आपण भारताचा नकाशा पाहिला  तर आपल्याला नकाशात डावीकडे, गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत काळसर  हिरवी रेषा दिसते. ही रेषा  गुजराथ येथून सुरु होते  आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू मार्गे जाऊन केरळला पोहोचते. ती रेषा म्हणजेच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट म्हणजे दख्खनच्या पठाराची जणू किनारच आहे. दख्खन पठाराच्या काठावरच्या ह्या पर्वत रांगा आहेत.  या भागात बरीच जंगले, जलसाठे, धबधबे आहेत आणि जैवविविधता तसेच त्याचे वय यामुळे या भागाला 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून ओळखले गेले आहे. पश्चिम घाट हिमालयापेक्षाही जुना आहे! वरंधा घाट  📷विकिमीडिया कॉमन्स  पश्चिम घाट हा अनेक मुख्य नद्यांचे उगमस्थान आहे. वरील छायाचित्रात दिसते आहे त्या प्रमाणे, वर्षा ऋतूत या प्रदेशात अनेक धबधबे पाहायला मिळतात.  पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) अनेक सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे शिवथरघळ धबधबा. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण रौद्र सौंदर्यानिशी आणि ताकदीनिशी रोरावत खाली येताना दिसतो.  हा धबधबा सुमारे शंभर फूट उंचीवर...