Skip to main content

से ला आणि जसवंतगढ युद्ध स्मारक

गेल्या पोस्टमध्ये, आपण होतो दिरांग ला! तिथला सुप्रसिद्ध, सुंदर सूर्योदय देखील आपण पाहिला होता. निसर्गरम्य दिरांग शहराच्या सौंदर्यामुळे आमच्या अपेक्षा खूपच उंचावल्या होत्या आणि आम्ही उत्सुकतेने से ला पास दिसण्याची वाट पाहत होतो.

तिबेटियन भाषेत ला म्हणजे पास. त्यामुळे खरे तर नुसते से ला म्हणणे पुरेसे आहे! मात्र ह्याचा उल्लेख सर्वत्र से ला पास असाच केलेला आढळतो. 

अरुणाचल मधील वाहन जाण्याजोग्या सर्वात उंच रस्त्यांपैकी हा एक रस्ता असल्याने, तुमचा प्रवास खूपच रोमहर्षक होतो. तवांग ला बाकी भारताशी जोडणारा हा एकमेव रस्ता असल्याने संरक्षणाच्या तसेच दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता खूपच महत्वाचा आहे. 

 समुद्रसपाटीपासून अंदाजे 13,700 फूट उंचीवर, आपण अरुणाचलच्या पश्चिम कामेंग जिल्ह्यातील दिरांग आणि तवांग दरम्यानच्या हिमालय पर्वतरांगा ओलांडतो. हवामान थंड असले आणि बर्‍याच वेळा रस्ता बर्फाच्छादित असला तरी बीआरओ (सीमा रस्ता संस्था) हा रस्ता प्रवासासाठी खुला राहील यासाठी खूप प्रयत्न करते. वर्षाकाठी, फक्त काही वेळा, तुफान बर्फवृष्टीमुळे, मुसळधार पाऊस पडल्याने किंवा दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद होतो.परंतु रहदारीसाठी रस्ता खुला व्हावा म्हणून दुरुस्त करण्यासाठी बीआरओ सर्व प्रयत्न अगदी त्वरित करते . 

से ला पासला जाताना चारदर तवंग रस्ता 

हा रस्ता एनएच 13 चा एक भाग आहे आणि मला तो तुम्हाला Google नकाशात दाखवायला आवडेल. म्हणजे तो रस्ता कसा आहे हे आपल्याला कोणतेही वर्णन न लिहितासुद्धा नीटच कळेल!



भारत सरकारने तवांग पर्यंत एक बोगद्यातून रस्ता तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला असून, तो २०२२ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. यामुळे प्रवासाचे अंतर कमी होईल व वेळेची बचत होईल. हा बोगदा पूर्ण झाल्यावर, तो रस्ता पाऊस आला, बर्फ पडला तरी वर्षभर सुरु राहील आणि तवांगशी सतत संपर्कात राहता येईल. 

जेव्हा भूभाग खूपच कठीण आणि दऱ्याखोऱ्यानी बनलेला असेल तेव्हा रस्ते तयार करणे सोपे काम नाही. से ला तलावाजवळील से ला स्मारक, आपल्याला रस्ते तयार करताना आलेल्या अडचणी, त्या साठी धारातीर्थी पडलेले शिपाई याबद्दल सांगते.





इथे आहे अरुणाचल प्रदेश मधील सर्वात सुंदर तलावांपैकी एक तलाव- से ला तलाव. 


ह्या भागातील हवामान खूप चटकन बदलते. अगदी काही मिनिटांतच आधी राखाडी दिसणारे आकाश निळे दिसू लागले. 


अप्रतिम दृश्य
📷 Girish Tilak 

तिथे हवा खूपच थंड होती. जमिनीवर, कानाकोपर्‍यात, सांदीसपाटीत थोडा थोडा बर्फ दिसत होता. तसेच डोंगराच्या शिखरावर बर्फ पसरलेला होता. अगदी पाण्यातही तरंगांचा होणारा बर्फ आणि बर्फाचे तरंग दिसत होते. 

बर्फाचे तरंग

📷 Girish Tilak 

अनिवार्य फोटो!
📷Girish Tilak

ह्या फोटोतल्या स्मितहास्यावर जाऊ नका. हे फक्त फोटोपुरते आहे! हवा खूप थंड होती. अंगात हुडहुडी भरत होती. शिवाय ऑक्सिजनचे प्रमाण खूप कमी असल्याचे श्वास घेताना जाणवत होते. 

📷 Girish Tilak 

तलावाभोवती चालण्यासाठी चांगला रस्ता केलेला आहे. पण इतक्या थंड हवेत कोणाचीच त्या रस्त्यावरून जाण्याची हिंमत होत नव्हती!!

या फोटोमध्ये आपण बर्फाच्छादित पर्वत शिखरे आणि वळणा वळणाचे रस्ते पाहू शकता.


 या तलावाचे, ह्या भागातील बौद्ध लोकांसाठी, लामांसाठी खूपच आध्यात्मिक महत्व आहे. दलाई लामा यांनी बर्‍याचदा या ठिकाणाला भेट दिली आहे. आमच्या ड्रायव्हरने आम्हाला सांगितले की या भागात 101 लहानमोठे तलाव आहेत.

जेव्हा आपण या प्रदेशात प्रवास करतो, तेव्हा नक्कीच असे वाटते की 'शांग्री ला' खरोखर अस्तित्त्वात असल्यास, ते खरंच, इथेच असेल. 

आता आम्ही जसवंतगढ युद्ध स्मारकाकडे निघालो होतो. ही शौर्य व पराक्रमाची कहाणी सांगणारी जागा आहे. 

चौथी तुकडी, गढवाल रायफल्सचा रायफलमन जसवंसिंग रावत हे १९६२ च्या भारत चीन युद्धात नुरानंग येथे तैनात होते. गढवाल रायफल बटालियनने चिनी सैनिकांशी जोरदार लढाई केली. त्यांच्या आक्रमणांना उत्तर दिले. परंतु प्रतिकूल परिस्थितीमुळे बटालियनला माघार घ्यावी लागली.

त्यावेळी जसवंतसिंगने आपल्या दोन अन्य सैनिक साथीदारांसह ह्या चौकीवर तळ ठोकला. चिनी सैनिकांवर गोळीबार करत राहिले. त्यामुळे माघार घेणाऱ्या बटालियनला, दुसर्‍या तळावर सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी वेळ मिळाला.
 
दुसर्‍या दिवशी त्याचे दोन साथीदार देखील युद्धात मरण पावले, पण असे म्हणतात की जसवंतसिंग एकट्याने ७२ तास ही चौकी सांभाळत होते. चिनी सैन्याला त्यांनी रोखून ठेवले होते. 

आक्रमक चिनी सैन्याने 17 नोव्हेंबर 1962 रोजी त्यांना ताब्यात घेऊन ठार केले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना महावीर चक्र देण्यात आले. गोष्ट इथेच संपत नाही. जसवंतसिंग असे एकमेव सैनिक आहेत जे मृत्यू नंतरही भारतीय सशस्त्र सेनेच्या सेवेत होते.

ते सेवेत असते तर जशी बढती मिळाली असती, तशी अगदी नियमित बढती त्यांना देण्यात आली. त्यांचे सामानदेखील इथे ठेवले आहे. त्यांच्या बुटांना दररोज पॉलिश केले जाते. 2002 मध्ये ते कॅप्टन म्हणून निवृत्त झाले.

 हा शूर देशभक्त मृत्यू नंतरही आपल्या राष्ट्राची सेवा करत राहिला आणि त्या भागात तैनात असलेल्या सैनिकांना ते अजूनही धोक्यांची सूचना देतात, वेगवेगळ्या प्रकारे मदत करतात असे म्हटले जाते. 
 



स्मृतिस्थळ 

जसवंतसिंग स्मारक

जसवंतसिंगांना रोज लागतील अशा सगळ्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. युनिफॉर्मला रोज इस्त्री होते, बुटांनादेखील रोज पॉलिश होते. 

 

या स्मारकावर लष्करी अधिकारी तैनात आहेत. ह्या स्मृतिस्थळाला ते 'बाबा का मंदिर' असे म्हणतात. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्याने आम्हाला सांगितले की येथे तैनात असलेले अधिकारी व इतर कर्मचारी मांस, मासे इत्यादी पदार्थ खात नाहीत. इथे असताना पूर्णपणे शाकाहारच घेतात. .

दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात, एक पूजा होते आणि स्मारकात एक कार्यक्रम आयोजित केला जातो. ऑक्टोबर २०१९ च्या शेवटी आम्ही जसवंत गडला भेट दिली तेव्हा ही जागा वार्षिक समारंभासाठी सज्ज होत होती.

एक छोटेसे संग्रहालय आहे जिथे बंकर उभे केले आहेत. ते पाहून आलेल्या पर्यटकांना सैनिक कसे जगतात हे समजते.  



 जेव्हा आपण इथे उभे राहून, लष्करी अधिकाऱ्यांकडून, युद्धाबद्दल ऐकतो तेव्हा आपल्या सैनिकांच्या खडतर आयुष्याची आणि कष्टांची तीव्र जाणीव होते. त्यांना प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागतो, आपल्या कुटूंबापासून दूर रहावे लागते आणि समाज त्यांच्या ह्या त्यागाची जाणीव क्वचितच ठेवतो. इथून निघताना मनातील, आपल्या देशाच्या सैनिकांविषयीचा आदर, सन्मान आणि अभिमान जास्तच तीव्र झालेला असतो.

जवळच एक लहान रेस्टॉरंट आहे. ते लष्कराने चालवलेले आहे. येथे तुम्ही ताजे बनविलेले, गरमगरम, नाश्त्याचे पदार्थ आणि काही केक्स, डोनट्स इत्यादी खाऊ शकता. इथे मिळणारे उत्पन्न जसवंतगडच्या देखभालीसाठी वापरले जाते.

इथे आपण चवदार स्नॅक्स खाऊ शकता, त्याबरोबर मोफत दिला जाणारा गरम गरम चहा, हवा तेवढा पिऊ शकता आणि तवांगच्या प्रवासासाठी स्वत: ला तयार करू शकता!

#IndiaChinaWarMemorial #MustVisitPlaceInArunachal #SelaIconicPlace #101LakesNearTawang #BeautifulLakeNearTawang  #JasawantSinghRawat #72Hours








 



Comments

  1. NH13 Omg😶
    सलाम जसवंतसींगजीना 🙏🙏🙏
    मस्त लिहलेस

    ReplyDelete
    Replies
    1. भारत माता की जय!!

      Delete
    2. NH 13 खूपच भारी आहे. आपल्याला बघताना असे वाटते, तो बांधला जाताना किती अवघड गेले असेल?!

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....

कोस्टल कर्नाटक- २ मंगळुरू, मुलकी, उचिल, उडुपी

  आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते.  नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते.  मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात.  काद्री मंजुनाथ मंदिर  का...

महेश्वर

महेश्वर हे मध्यप्रदेश पर्यटन निगमच्या पर्यटन स्थळांमधले एक महत्वाचे नाव आहे. पण करोडो भारतीयांसाठी ते केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर एक तीर्थस्थान असते. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेले स्थान आहे.  महेश्वर किल्ला प्रवेशद्वार  राजवाडा प्रवेशद्वार  बाह्यरूप  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  राजवाडा प्रवेशद्वार  अहिल्याबाई होळकर हे केवळ भारताच्याच नव्हे तर विश्वाच्या इतिहासातील एक सोनेरी पान. संपूर्ण मानव विश्वातील यशस्वी स्त्री राज्यकर्त्यांची सूची करायची झाली तर अहिल्याबाई होळकरांचे नाव ठळकपणे लिहायला लागेल.   31 मे 2025 ला त्यांची तीनशेवी जयंती आहे. पण 300 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या अहिल्याबाईंचे आयुष्य अगदी आजच्या आधुनिक काळातल्या आव्हानातही मार्गदर्शक ठरावे असेच आहे.  त्यांच्याविषयीचा आदर मनात घेऊनच आपण महेश्वरला जातो आणि त्या भावनेच्या प्रकाशात महेश्वर पाहतो. महेश्वरला फार मोठी प्राचीन परंपरा आहे. स्कंद पुराणाच्या रेवा खंडात आणि वायू पुराणाच्या नर्मदा रहस्य मध्ये महिष्मती म्हणजे महेश्वरचे वर्णन आलेले आहे. 'गुप्...