मुख्य सामग्रीवर वगळा

गोल्डन पॅगोडा, नामसाई

ईशान्य भारताच्या ट्रीपमध्ये आम्ही नाहरलगूनला राहिलो होतो. तिथून झिरो, कार्डो, इटानगर पाहून ट्रेनने निघालो ते तिनसुखियाला जाण्यासाठी. फार सुंदर रस्ता आहे तो. नाहरलगून हे इटानगरच्या रेल्वे स्टेशनचे नाव. इटानगरहून नाहरलगून साधारण १५ किलोमीटरवर आहे. 


From Nahar Lagun to Itanagar 


रस्ता कसा होता हे नीट कळावे म्हणून हा छोटासा विडिओ बघा.

https://youtu.be/JNztM_dFN3I


रस्ता म्हणजे नुसते नेत्रसुख! सगळीकडे हिरवळ, तळी , डोंगर, स्वच्छता आणि असे संपूर्ण रस्ताभर! 





ट्रेनही आरामदायक होती. कुर्सीयान होते. आमच्या डब्यात चढणारे उतरणारे प्रवासी सगळे नोकरीनिमित्त रोज ये जा करणारे असे वाटत होते. 




आम्हाला रस्त्यात लागला भारतातील सर्वात मोठा रेल- रोड ब्रिज, बोगीबील ब्रिज. ब्रह्मपुत्रा नदीवर असलेला ५ किलोमीटरच्या ह्या ब्रिजवरून आम्ही गेलो ते ऑक्टोबर २०१९ मध्ये. ह्या पुलाचे उदघाटन डिसेंबर २०१८ मध्ये मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या हस्ते झाले होते. 

ह्या पुलामुळे प्रवाश्यांची, विद्यार्थ्यांची, पेशंटसची, उद्योगधंद्यांची फार सोय झाली आहे. 

हा पूल किती मोठा आहे ते ह्या व्हिडिओत कळेल. किती वेळ झाला तरी ट्रेन ह्या पुलावरून जातच असते! आपण पुलावरून जायला सुरुवात केली हे माझ्या लक्षात आल्यावर विडिओ करायला सुरुवात केली तरी पाच मिनिटांची विडिओ आहे!

ब्रह्मपुत्रेला नद म्हणतात ते किती सार्थ आहे हे आपल्याला तिचे पात्र बघून कळते. 

https://youtu.be/yV_7b_9ezT8




न्यू तिनसुखियाला उतरल्यावर आधी आरक्षित करून ठेवलेली गाडी आमची स्टेशनवर वाट पाहत होती. 

New Tinsukiya Railway Station 


तेव्हा साधारण सकाळचे ११ वाजत आले होते. रस्त्यात कुठे जेवण्याचे चांगले ठिकाण मिळेल ना, असे विचारल्यावर वाहनचालकाने मिळेल असे सांगितले. पण शाकाहारी लोक जिथे खाउ शकतील असे ठिकाण काही रस्त्यात कुठेच दिसले नाही. मग आम्ही बरोबर नेलेल्या चिवडा लाडूवर समाधान मानले!

 आमचे रात्री राहण्याचे बुकिंग होते नामसाईला, पण त्या आधी आम्ही रोइंग देखील पाहणार होतो. निसर्गसुंदर रोइंगमधले नवे झालेले संग्रहालय आणि केंद्र आम्हाला पाहायचे होते. 
 
पण तिकडे जाताना आम्ही रस्ता चुकलो. अगदीच साफ चुकलो! वाहनचालकाला पण त्या भागाची विशेष माहिती नव्हती. शेवटी भरपूर प्रवास करूनही काहीच पाहता आले नाही. मोठ्या प्रवासात अशा छोट्या छोट्या गोष्टी व्हायच्याच! पण एक सुख होते की रस्ते अतिशय चांगले होते. अगदी गुळगुळीत, एकही धक्का बसणार नाही असे!

तिथे संध्याकाळ फार लवकर होते. त्यामुळे अंधार पडायच्या आत नामसाईला पोचणे आवश्यक होते. नव्या भागात प्रवास करताना अशी काळजी घेणे आवश्यकच असते.त्यामुळे मग रोइंगला आणखी शोधत न बसता, आम्ही टेंगापानीला जायला निघालो. हा देखील रस्ता फार छान होता. 

मुक्कामाजवळ पोचायच्या आधीच, पॅगोडाचे सोनेरी कळस रस्त्याच्या वळणानुसार अधुनमधून दिसत होते, खुणावत होते.

गडद अंधार पडलाच होता. पाऊसही पडायला लागलेला होता. पहाटे नाहरलगूनला प्रवास सुरु झाला होता तो दिवसभर चालूच होता. त्यामुळे गोल्डन पॅगोडा रिसॉर्ट येताच अगदी हायसे वाटले पण नेमके त्या परिसरातले लाईट गेलेले होते. आमचे बंगल्याचे बुकिंग झालेले होते. अंधारात ते बंगले एकमेकांपासून खूप लांब आहेत असे वाटले. पण बंगल्यातले आतले लाईट होते. त्यामुळे जीव भांड्यात पडला!

फार सुंदर बंगले आहेत. बाहेरचा व्हरांडा, हॉल, भव्य बेडरूम, मुंबईच्या एखाद्या घराचा हॉल असेल तेवढी मोठी बाथरूम आणि एक बाल्कनी, इतकी मोठी जागा प्रत्येक बंगल्यात आहे. आजूबाजूला चांगली निगा राखलेली बाग आणि झाडे आहेत. 

जेवणासाठी रिसॉर्टमध्येच डायनिंग हॉल मध्ये जाऊन जेवायची सोय आहे. पण ऑर्डर मात्र आधी द्यायला लागते. ऑर्डर दिल्यापासून साधारण तास दीड तास लागतो अन्न तयार व्हायला. कारण प्रत्येक गोष्ट ते ताजी आणि हवी असेल तितकीच तयार करतात. 

परत अंधारातून, पावसातून जेवायला जायचा खरे तर कंटाळा आला होता. पण जेवायला हवे तर जायलाच लागणार होते! तिथे पोचल्यावर गरम गरम अन्न मिळाल्यावर मात्र उत्साह वाटला. 

रिसॉर्ट किती सुंदर आहे, हे मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी उजाडल्यावरच कळले! फार सुंदर परिसर आहे. बंगले तर आहेतच, पण काही एकेक खोलीची निवासस्थाने देखील आहेत असे वाटले. 
 
जागेची अजिबात काटकसर केलेली नाही. आतले रस्ते पण रुंद. दोन बंगल्यात भरपूर अंतर. खूपच प्रसन्न परिसर. 

 Villas 


The Golden Pagoda Resort 


The Campus 

तिथे आम्हाला एक नवल पाहायला मिळाले. खाली वेगवेगळी खोडे पण वर मात्र एकत्र आलेली पाने आणि शेंडे, असा झाडांचा समूह बघायला मिळाला. मला दर वेळी हा फोटो बघताना वाटते, ती झाडे ,'तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिये' हे गाणे म्हणत असणार! 


Unusual cluster!

Reception 

तो दिवस अगदी खास अरुणाचली पावसाचा दिवस होता. सतत पाऊस, राखाडी आकाश, थंड हवा. सकाळी रिसॉर्टच्या रेस्टॉरंट मध्ये ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो गोल्डन पॅगोडा पाहायला.

तुम्ही जर का मुख्य रस्त्यावरून येणाऱ्या पहिल्याच पॅगोडाच्या पाटीशी उतरलात तर तुम्हाला बऱ्याच पायऱ्या चढायला लागतात. मात्र जरा पुढे जाऊन रिसॉर्टच्या जवळून गेलात तर मात्र थेट पॅगोडाच्या गेटपर्यंत गाडी जाते. रिसॉर्टमधून पण एक लहान रस्ता आहे पॅगोडात जायला, आम्ही तिथूनच गेलो. गाडीला मात्र वळसा घालून यायला लागले. 

हा पॅगोडा अतिशय भव्य परिसरात उभारला गेला आहे. अगदी नवा प्रकल्प आहे, २००८ मध्ये सुरु होऊन २०१० मध्ये पूर्ण झाला. 

पूर्व हिमालयीन पर्वतरांगांमध्ये वसलेले हे ठिकाण आहे. नामसाई जिल्हा हा पूर्वी लोहित जिल्ह्याचाच भाग होता . नामसाई जिल्ह्यातील टेंगापानी येथील हा गोल्डन पॅगोडा प्रमुख पर्यटन आकर्षण केंद्र आहे. 

थायलंडच्या बौद्ध भिख्खूनी भारतातील बौद्ध धर्म तत्वांच्या प्रचार प्रसारासाठी बुद्धाची ही ब्रॉन्झची मूर्ती भेट दिली. मग त्यावर बर्मीज वास्तुशैलीचे मंदिर बांधले गेले. आज मुख्य पॅगोडात ही भेट मिळालेली मूर्ती आहे. 



The Main Buddha idol 

पॅगोडाला अनेक लहान लहान शिखरे आणि मध्यभागी उंच शिखर अशी रचना आहे. सोनेरी रंग दिल्याने हा पॅगोडा सतत चमचमत असतो. 


Golden Pagoda 


Guardian Deity outside the main pagoda 


Pair of lions guarding each entrance 

Three entrances 

गोल्डन पॅगोडाला चारी दिशांना चार प्रवेशद्वारे आहेत. मुख्य प्रवेशद्वारासमोर (पहिल्याच छायाचित्रात) एक जयस्तंभ पण दिसेल. बुद्ध मूर्ती उत्तरेकडे तोंड केलेली अशी आहे. प्रत्येक प्रवेशद्वार सिंहांच्या जोडीने संरक्षित केलेले आहे. प्रत्येक कोपऱ्यात संरक्षक देवता किंवा घंटा आहे.

आवारात इतर अनेक इमारती आहेत. वाचनालय, भिक्खुंच्या राहण्याची व शिकण्याची जागा, ध्यानधारणा सभागृह, संस्कृती संशोधन केंद्र आणि इतर काही. आम्ही २०१९ च्या ऑक्टोबर मध्ये इथे भेट दिली तेव्हा काही बांधकाम देखील चालू होते.



Other Buddha Temple 
P.C. - G. D. Sathe

ह्या मंदिरातील बुद्ध मूर्ती ही सोनेरी तुकड्या तुकड्यानी संपूर्ण आच्छादलेली आहे ह्या प्रकारची, भारतातील ही सर्वात मोठी मूर्ती आहे.

P.C. - G. D. Sathe

One More Building and Ashok Stambh 
P.C. - G. D. Sathe


A Rainy Day 

मंदिराचा खूप मोठा प्रदक्षिणा मार्ग काँक्रीट ने बांधून काढलेला आहे. 

P.C. - G. Y. Tilak



 
P.C. - G. Y. Tilak


Main Entrance 


Students 

एक शांत सुंदर ठिकाण म्हणून हे लक्षात राहील. बौद्धधर्माचा उदय भारतात झाला. भारतातून बौद्धधर्म इतर देशात पसरला.आता हे बौद्ध मंदिर थायलंडची मूर्ती, ब्रम्हदेशाच्या मंदिराचे वास्तुशास्त्र असे करत एक कालचक्र पूर्ण करीत आहे!

#Namsai #Tengapani #NamsaiGoldenPagoda #DibrugarhToGoldenPagoda #Roing #WhereToStayInNamsai #PlacesToVisitInArunachal #Buddha #Thailand
#BurmeseArchitecture #Tinsukia #GoldenPagodaEcoResort #Naharlagun 

टिप्पण्या

  1. खूप सुंदर निसर्ग, देखण्या बुद्ध मूर्ती, अणि सुंदर फोटो. तितके समर्पक लेखन.

    उत्तर द्याहटवा
  2. खूप सुंदर प्रवास झाला तुमच्या शब्द आणि छायाचित्रणातून !!! धन्यवाद वृंदाकाकू 🙏

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

कोस्टल कर्नाटक- २ मंगळुरू, मुलकी, उचिल, उडुपी

  आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते.  नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते.  मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात.  काद्री मंजुनाथ मंदिर  का...