Skip to main content

गोल्डन पॅगोडा, नामसाई

ईशान्य भारताच्या ट्रीपमध्ये आम्ही नाहरलगूनला राहिलो होतो. तिथून झिरो, कार्डो, इटानगर पाहून ट्रेनने निघालो ते तिनसुखियाला जाण्यासाठी. फार सुंदर रस्ता आहे तो. नाहरलगून हे इटानगरच्या रेल्वे स्टेशनचे नाव. इटानगरहून नाहरलगून साधारण १५ किलोमीटरवर आहे. 


From Nahar Lagun to Itanagar 


रस्ता कसा होता हे नीट कळावे म्हणून हा छोटासा विडिओ बघा.

https://youtu.be/JNztM_dFN3I


रस्ता म्हणजे नुसते नेत्रसुख! सगळीकडे हिरवळ, तळी , डोंगर, स्वच्छता आणि असे संपूर्ण रस्ताभर! 





ट्रेनही आरामदायक होती. कुर्सीयान होते. आमच्या डब्यात चढणारे उतरणारे प्रवासी सगळे नोकरीनिमित्त रोज ये जा करणारे असे वाटत होते. 




आम्हाला रस्त्यात लागला भारतातील सर्वात मोठा रेल- रोड ब्रिज, बोगीबील ब्रिज. ब्रह्मपुत्रा नदीवर असलेला ५ किलोमीटरच्या ह्या ब्रिजवरून आम्ही गेलो ते ऑक्टोबर २०१९ मध्ये. ह्या पुलाचे उदघाटन डिसेंबर २०१८ मध्ये मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या हस्ते झाले होते. 

ह्या पुलामुळे प्रवाश्यांची, विद्यार्थ्यांची, पेशंटसची, उद्योगधंद्यांची फार सोय झाली आहे. 

हा पूल किती मोठा आहे ते ह्या व्हिडिओत कळेल. किती वेळ झाला तरी ट्रेन ह्या पुलावरून जातच असते! आपण पुलावरून जायला सुरुवात केली हे माझ्या लक्षात आल्यावर विडिओ करायला सुरुवात केली तरी पाच मिनिटांची विडिओ आहे!

ब्रह्मपुत्रेला नद म्हणतात ते किती सार्थ आहे हे आपल्याला तिचे पात्र बघून कळते. 

https://youtu.be/yV_7b_9ezT8




न्यू तिनसुखियाला उतरल्यावर आधी आरक्षित करून ठेवलेली गाडी आमची स्टेशनवर वाट पाहत होती. 

New Tinsukiya Railway Station 


तेव्हा साधारण सकाळचे ११ वाजत आले होते. रस्त्यात कुठे जेवण्याचे चांगले ठिकाण मिळेल ना, असे विचारल्यावर वाहनचालकाने मिळेल असे सांगितले. पण शाकाहारी लोक जिथे खाउ शकतील असे ठिकाण काही रस्त्यात कुठेच दिसले नाही. मग आम्ही बरोबर नेलेल्या चिवडा लाडूवर समाधान मानले!

 आमचे रात्री राहण्याचे बुकिंग होते नामसाईला, पण त्या आधी आम्ही रोइंग देखील पाहणार होतो. निसर्गसुंदर रोइंगमधले नवे झालेले संग्रहालय आणि केंद्र आम्हाला पाहायचे होते. 
 
पण तिकडे जाताना आम्ही रस्ता चुकलो. अगदीच साफ चुकलो! वाहनचालकाला पण त्या भागाची विशेष माहिती नव्हती. शेवटी भरपूर प्रवास करूनही काहीच पाहता आले नाही. मोठ्या प्रवासात अशा छोट्या छोट्या गोष्टी व्हायच्याच! पण एक सुख होते की रस्ते अतिशय चांगले होते. अगदी गुळगुळीत, एकही धक्का बसणार नाही असे!

तिथे संध्याकाळ फार लवकर होते. त्यामुळे अंधार पडायच्या आत नामसाईला पोचणे आवश्यक होते. नव्या भागात प्रवास करताना अशी काळजी घेणे आवश्यकच असते.त्यामुळे मग रोइंगला आणखी शोधत न बसता, आम्ही टेंगापानीला जायला निघालो. हा देखील रस्ता फार छान होता. 

मुक्कामाजवळ पोचायच्या आधीच, पॅगोडाचे सोनेरी कळस रस्त्याच्या वळणानुसार अधुनमधून दिसत होते, खुणावत होते.

गडद अंधार पडलाच होता. पाऊसही पडायला लागलेला होता. पहाटे नाहरलगूनला प्रवास सुरु झाला होता तो दिवसभर चालूच होता. त्यामुळे गोल्डन पॅगोडा रिसॉर्ट येताच अगदी हायसे वाटले पण नेमके त्या परिसरातले लाईट गेलेले होते. आमचे बंगल्याचे बुकिंग झालेले होते. अंधारात ते बंगले एकमेकांपासून खूप लांब आहेत असे वाटले. पण बंगल्यातले आतले लाईट होते. त्यामुळे जीव भांड्यात पडला!

फार सुंदर बंगले आहेत. बाहेरचा व्हरांडा, हॉल, भव्य बेडरूम, मुंबईच्या एखाद्या घराचा हॉल असेल तेवढी मोठी बाथरूम आणि एक बाल्कनी, इतकी मोठी जागा प्रत्येक बंगल्यात आहे. आजूबाजूला चांगली निगा राखलेली बाग आणि झाडे आहेत. 

जेवणासाठी रिसॉर्टमध्येच डायनिंग हॉल मध्ये जाऊन जेवायची सोय आहे. पण ऑर्डर मात्र आधी द्यायला लागते. ऑर्डर दिल्यापासून साधारण तास दीड तास लागतो अन्न तयार व्हायला. कारण प्रत्येक गोष्ट ते ताजी आणि हवी असेल तितकीच तयार करतात. 

परत अंधारातून, पावसातून जेवायला जायचा खरे तर कंटाळा आला होता. पण जेवायला हवे तर जायलाच लागणार होते! तिथे पोचल्यावर गरम गरम अन्न मिळाल्यावर मात्र उत्साह वाटला. 

रिसॉर्ट किती सुंदर आहे, हे मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी उजाडल्यावरच कळले! फार सुंदर परिसर आहे. बंगले तर आहेतच, पण काही एकेक खोलीची निवासस्थाने देखील आहेत असे वाटले. 
 
जागेची अजिबात काटकसर केलेली नाही. आतले रस्ते पण रुंद. दोन बंगल्यात भरपूर अंतर. खूपच प्रसन्न परिसर. 

 Villas 


The Golden Pagoda Resort 


The Campus 

तिथे आम्हाला एक नवल पाहायला मिळाले. खाली वेगवेगळी खोडे पण वर मात्र एकत्र आलेली पाने आणि शेंडे, असा झाडांचा समूह बघायला मिळाला. मला दर वेळी हा फोटो बघताना वाटते, ती झाडे ,'तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिये' हे गाणे म्हणत असणार! 


Unusual cluster!

Reception 

तो दिवस अगदी खास अरुणाचली पावसाचा दिवस होता. सतत पाऊस, राखाडी आकाश, थंड हवा. सकाळी रिसॉर्टच्या रेस्टॉरंट मध्ये ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो गोल्डन पॅगोडा पाहायला.

तुम्ही जर का मुख्य रस्त्यावरून येणाऱ्या पहिल्याच पॅगोडाच्या पाटीशी उतरलात तर तुम्हाला बऱ्याच पायऱ्या चढायला लागतात. मात्र जरा पुढे जाऊन रिसॉर्टच्या जवळून गेलात तर मात्र थेट पॅगोडाच्या गेटपर्यंत गाडी जाते. रिसॉर्टमधून पण एक लहान रस्ता आहे पॅगोडात जायला, आम्ही तिथूनच गेलो. गाडीला मात्र वळसा घालून यायला लागले. 

हा पॅगोडा अतिशय भव्य परिसरात उभारला गेला आहे. अगदी नवा प्रकल्प आहे, २००८ मध्ये सुरु होऊन २०१० मध्ये पूर्ण झाला. 

पूर्व हिमालयीन पर्वतरांगांमध्ये वसलेले हे ठिकाण आहे. नामसाई जिल्हा हा पूर्वी लोहित जिल्ह्याचाच भाग होता . नामसाई जिल्ह्यातील टेंगापानी येथील हा गोल्डन पॅगोडा प्रमुख पर्यटन आकर्षण केंद्र आहे. 

थायलंडच्या बौद्ध भिख्खूनी भारतातील बौद्ध धर्म तत्वांच्या प्रचार प्रसारासाठी बुद्धाची ही ब्रॉन्झची मूर्ती भेट दिली. मग त्यावर बर्मीज वास्तुशैलीचे मंदिर बांधले गेले. आज मुख्य पॅगोडात ही भेट मिळालेली मूर्ती आहे. 



The Main Buddha idol 

पॅगोडाला अनेक लहान लहान शिखरे आणि मध्यभागी उंच शिखर अशी रचना आहे. सोनेरी रंग दिल्याने हा पॅगोडा सतत चमचमत असतो. 


Golden Pagoda 


Guardian Deity outside the main pagoda 


Pair of lions guarding each entrance 

Three entrances 

गोल्डन पॅगोडाला चारी दिशांना चार प्रवेशद्वारे आहेत. मुख्य प्रवेशद्वारासमोर (पहिल्याच छायाचित्रात) एक जयस्तंभ पण दिसेल. बुद्ध मूर्ती उत्तरेकडे तोंड केलेली अशी आहे. प्रत्येक प्रवेशद्वार सिंहांच्या जोडीने संरक्षित केलेले आहे. प्रत्येक कोपऱ्यात संरक्षक देवता किंवा घंटा आहे.

आवारात इतर अनेक इमारती आहेत. वाचनालय, भिक्खुंच्या राहण्याची व शिकण्याची जागा, ध्यानधारणा सभागृह, संस्कृती संशोधन केंद्र आणि इतर काही. आम्ही २०१९ च्या ऑक्टोबर मध्ये इथे भेट दिली तेव्हा काही बांधकाम देखील चालू होते.



Other Buddha Temple 
P.C. - G. D. Sathe

ह्या मंदिरातील बुद्ध मूर्ती ही सोनेरी तुकड्या तुकड्यानी संपूर्ण आच्छादलेली आहे ह्या प्रकारची, भारतातील ही सर्वात मोठी मूर्ती आहे.

P.C. - G. D. Sathe

One More Building and Ashok Stambh 
P.C. - G. D. Sathe


A Rainy Day 

मंदिराचा खूप मोठा प्रदक्षिणा मार्ग काँक्रीट ने बांधून काढलेला आहे. 

P.C. - G. Y. Tilak



 
P.C. - G. Y. Tilak


Main Entrance 


Students 

एक शांत सुंदर ठिकाण म्हणून हे लक्षात राहील. बौद्धधर्माचा उदय भारतात झाला. भारतातून बौद्धधर्म इतर देशात पसरला.आता हे बौद्ध मंदिर थायलंडची मूर्ती, ब्रम्हदेशाच्या मंदिराचे वास्तुशास्त्र असे करत एक कालचक्र पूर्ण करीत आहे!

#Namsai #Tengapani #NamsaiGoldenPagoda #DibrugarhToGoldenPagoda #Roing #WhereToStayInNamsai #PlacesToVisitInArunachal #Buddha #Thailand
#BurmeseArchitecture #Tinsukia #GoldenPagodaEcoResort #Naharlagun 

Comments

  1. खूप सुंदर निसर्ग, देखण्या बुद्ध मूर्ती, अणि सुंदर फोटो. तितके समर्पक लेखन.

    ReplyDelete
  2. खूप सुंदर प्रवास झाला तुमच्या शब्द आणि छायाचित्रणातून !!! धन्यवाद वृंदाकाकू 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...

शिवथरघळ

जर आपण भारताचा नकाशा पाहिला  तर आपल्याला नकाशात डावीकडे, गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत काळसर  हिरवी रेषा दिसते. ही रेषा  गुजराथ येथून सुरु होते  आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू मार्गे जाऊन केरळला पोहोचते. ती रेषा म्हणजेच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट म्हणजे दख्खनच्या पठाराची जणू किनारच आहे. दख्खन पठाराच्या काठावरच्या ह्या पर्वत रांगा आहेत.  या भागात बरीच जंगले, जलसाठे, धबधबे आहेत आणि जैवविविधता तसेच त्याचे वय यामुळे या भागाला 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून ओळखले गेले आहे. पश्चिम घाट हिमालयापेक्षाही जुना आहे! वरंधा घाट  📷विकिमीडिया कॉमन्स  पश्चिम घाट हा अनेक मुख्य नद्यांचे उगमस्थान आहे. वरील छायाचित्रात दिसते आहे त्या प्रमाणे, वर्षा ऋतूत या प्रदेशात अनेक धबधबे पाहायला मिळतात.  पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) अनेक सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे शिवथरघळ धबधबा. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण रौद्र सौंदर्यानिशी आणि ताकदीनिशी रोरावत खाली येताना दिसतो.  हा धबधबा सुमारे शंभर फूट उंचीवर...