मुख्य सामग्रीवर वगळा

Sok Dee (शुभेच्छा) लुआंग प्रबांग!

लुआंग प्रबांग एकदम संथ, शांत जीवनशैलीचे शहर आहे. इथे आल्यावर तुम्हाला तर वाटेल की जणू तुम्ही 1970च्या दशकात आहात! जीवनाची संथ गती, कमी गर्दीचे रस्ते, वैभवशाली संस्कृती व स्थापत्य, वातावरणातील अध्यात्मिकता, सुस्वभावी लोक आणि नैसर्गिक सृष्टीसौंदर्य या सर्वांमुळे लुआंग प्रबांग अगदी अनोखे शहर वाटते. लुआंग प्रबांगच्या जुन्या शहर भागातून निवांत फेरफटका मारणे आम्हाला खूप आनंददायी वाटले. या भागातील इमारती आणि कॉफी शॉप्स पाहून लुआंग प्रबांग ही फ्रेंच वसाहत होती त्याची आठवण होते. 



luang prabang, laos, phabang, asia, mekong, city, town, countryside, landscape
लुआंग प्रबांग (From Pikist.com)

चुली वरचा स्वैपाक!

सुंदर मंदिरे

सजावट 

बौद्ध भिक्षु

फुलं घ्या फुलं ..देवासाठी फुलं!!


बौद्ध मंदिरे सगळीकडे, अगदी पावलोपावली दिसतात.


Wat Sensoukhram

एका मंदिरातील बुद्धाची सोनेरी मूर्ती

That Makmo - Watermelon Stupa

पूजाविधीतील एक भाग

धर्म समर्पित तरुण 

उच्च शिक्षण !! अभ्यास असा करायचा असतो!!!
उंच भिंतीवर बसून..म्हणजे ते उच्च शिक्षण होते !!!


मुळात लुआंग प्रबांग या नावाचा अर्थच मुळी रॉयल बुद्ध मूर्ती असा आहे. बौद्ध मंदिरे आणि बौद्ध भिक्षू ह्या शहराला एक वेगळीच शांतता प्रदान करतात.बौद्ध भिक्षूंनी शहरात हिंडून भिक्षा मागायची ही इथली जुनी पद्धत आहे. शंभराहून जास्त बौद्ध भिक्षु पहाटेच मंदिरातून दीक्षा मागण्यासाठी निघतात. त्यांच्या रस्त्यावर भाविक लोक आधीपासूनच भिक्षा घेऊन तयार असतात आणि फोटो काढायला पर्यटक पण तयार असतात. 


भिक्षाफेरी
(From Pixabay)

Haw Kham किंवा Ho Kham नावाचा राजप्रासाद आता वस्तु संग्रहालयात रुपांतरीत झालेला आहे. आवर्जून बघायलाच हवे असे हे ठिकाण आहे. इथे तुम्हाला लाओसच्या इतिहास आणि संस्कृती बद्दल खूप चांगली माहिती मिळेल. या आवारात अनेक राजेशाही इमारती आहेत, तसेच त्यांचे म्हणजे राजघराण्याचे वैयक्तिक वापराचे भाग देखील आहेत. जरी राजघराण्यातले लोक आता तिथे राहत नसतील तरी तो भाग, जणू काही ते तिथे राहातच असावेत, असाच ठेवलेला आहे. एका दारावर ऐरावत म्हणजे इंद्राचा हत्ती आणि इंद्र यांच्या मूर्ती दिसतील. एका शिल्पात महेंद्र पर्वत आणि गंगा पण दिसेल!


पूर्वी लाओस, कंबूज (आत्ताच्या कंबोडियातील अनेक शतकांपूर्वी असलेल्या) ह्या हिंदू साम्राज्याचा एक भाग होता. त्यामुळेच आपल्याला इथे अनेक हिंदू देवदेवतांची चित्रे दिसतील. तसेच अनेक संस्कृत नावे पण आढळतील उदाहरणार्थ जयवर्मन, हरिहरालय, श्रेष्ठपुरा, द्वारावती. लाओसमध्ये अजूनही आपल्याला भारतीय धर्म, कला, संस्कृती आणि वास्तुशास्त्र ह्यांची छाप दिसते.


Pra Lak Pra Ram हे लाओसचे राष्ट्रीय महाकाव्य आहे आणि ते वाल्मिकी रामायण वर आधारलेले आहे. इथेही जरी रामच नायक असला तरी लक्ष्मणाचे नाव आधी येते. त्यामागचे कारण असे की रामाला राजा म्हणून जे करणे आवश्यक होते ते त्याने केले पण लक्ष्मणाने मात्र स्वतःच्या इच्छेने त्याच्याबरोबर वनवास स्वीकारला तसेच आयुष्यभर त्याला साथ दिली. त्याबद्दल गौरव म्हणून लक्ष्मणाचे नाव आधी येते! या महाकाव्यात ते दोघं राजा Thattarathह्याचे पुत्र आहेत. ह्या काव्यात Nang Sida आहे,जिला लक्ष्मीचा अवतार मानले गेले आहे. इथे monkey Hanoumane आहे, जो त्यांना Sida चा शोध घ्यायला आणि युद्धातही मदत करतो. लाओसमध्ये लोक मानतात की रामायण हे जातक कथा आहे! Wat Mai Suwannaphumaham (Mai Souvana Phoun Ram) हे ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या एक अत्यंत महत्त्वाचे मंदिर आहे. कारण मधल्या अशांततेच्या काळात, दीर्घकाळ पर्यंत ह्या मंदिरात प्रबांगची मूर्ती राहिलेली होती आणि शिवाय त्यावेळी हे मंदिर राजघराण्याचे मंदिर म्हणून पण कार्यरत होते. इथे रामायण कथेतील चित्रे लाकडी भिंतींवर, सोनेरी पत्र्याच्या प्लेटिंगवर चित्रीत केलेली आहेत. हे नक्कीच लुआंग प्रबांग मधील चित्तवेधक मंदिर आहे आणि आणि त्यामुळे अर्थातच सर्वात जास्त लोक आणि प्रवासी ह्या मंदिरात जातात आणि फोटो काढतात.


सीता

राम, लक्ष्मण, सीता


राजवाड्याच्या परिसरात Haw Phra/Pra Bang याचे मंदिर आहे. ही तीच मूर्ती जिचे नाव शहराच्या नावा सारखेच आहे. लुआंग म्हणजे शाही आणि प्रबांग म्हणजे बुद्धाची सोनेरी मूर्ती. लाओसच्या इतिहासात या मूर्तीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.


Haw Pra Bang

एकाग्रता !! देवळाच्या दुरुस्तीचे आणि सौन्दर्यीकरणाचे काम चालू होते.


रॉयल म्युझियम परिसरातील हॉल मध्ये होणारा सांस्कृतिक कार्यक्रम आवर्जून बघावा असाच आहे. इथे तुम्हाला लाओ संस्कृतीची एक झलक पाहायला मिळेल. या Royal Ballet theatre मध्ये बहुतेकदा Phra Lak Phra Lam ही नृत्यनाटिका चालू असते. ही माहिती वाचून तुम्हाला या नृत्यनाटिकेविषयी उत्सुकता वाटत असेल तर ह्यातील काही भाग तुम्ही युट्युब वर देखील बघू शकता.


Royal theatre cultural show

रोयल थियेटर, लुआंग प्रबांग


Pak Ou Caves 


चुनखडीच्या खडकात असलेल्या, एकावर एक अशा या दोन गुफा आहेत. लुआंग प्रबांगहुन इथे जाण्यासाठी मेकॉन्ग मधून बोटीने जायला लागते. या प्रवासात अत्यंत मनोहारी असे सृष्टीसौंदर्य बघायला मिळते.


या गुहांमध्ये बुद्धाच्या अक्षरशः हजारो मूर्ती ठेवलेल्या आहेत. ह्या गुहातून जलदेवतेचा वास आहे अशी स्थानिक लोकांची श्रद्धा आहे आणि त्यामुळे अनेक शतके, खरेतर जवळपास दोन हजार वर्षे हे एक पूजास्थान म्हणून मानले गेलेले आहे.


Pak Ou caves - मधून दिसणारी नदी

गुंफेकडे जाणारा मार्ग 

वरच्या गुंफेकडे जाण्याचा मार्ग 

काही छोटी गावे पारंपरिक लाओ पद्धतीच्या गावांप्रमाणे अजूनही ठेवलेली आहेत. पर्यटक त्यातील काही गावांना भेट देऊ शकतात. तिथे जाण्यासाठीही बोटीनेच जावे लागते.


बोटीसाठीचा पेट्रोल पंप!

राइस वाईन तयार होते आहे.

भाजलेली केळी 

जाता जाता खायला खाऊ!

केशरचना 

अर्थातच बाजारातून स्थानिक कलाकुसर खरेदी करण्यास तुम्ही विसरणार नाहीच! हातमागावर तयार केलेली वस्त्रप्रावरणे तसेच स्थानिक लोकांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू या सगळ्यांनी बाजार ओसंडून वाहत असतो.

लुआंग प्रबांगच्या बाजारातून घेतलेली
 विणलेली सुंदर शाल 


Mount Phousi वर चढून संपूर्ण गावाचे मनोरम दृश्य पाहणे आणि अत्यंत सुंदर अशा Tat Kuang Si धबधब्यांना भेट देणे अजिबात विसरू नका. ही दोन्ही ठिकाणे बघायचे आमचे राहूनच गेले आहे.


Kuang Si waterfall
(from Pixabay)


आता नेहमीचे पर्यटकांचे प्रश्न

लुआंगप्रबंग स्वस्त आहे का? नाही, स्वस्त नाही. विशेष करून तुम्हाला हे रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर लक्षात येईल! रस्त्यांवर खूप सगळे स्थानिक अन्न अगदी स्वस्तात विकायला असते. पण ते व्हिगन आहे का किंवा शाकाहारी आहे का हे तुम्हाला कळणार नाही. जर का नशिबाने एखादा दुकानदार तुम्हाला इंग्रजी बोलणारा भेटलाच तर तुम्हाला नक्कीच स्वस्त स्थानिक अन्न खाता येईल. पण नाही तर व्हिगन आणि शाकाहारी लोकांना विशेष रेस्टॉरंटमध्ये जायला लागेल.ती महाग जरूर आहेत पण तिथले अन्न मात्र अत्यंत चविष्ट आहे. आग्नेय आशियातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक असल्याने लुआंग प्रबांगला प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. लुआंग प्रबांग सुरक्षित आहे का? तुम्ही ऐकले असेल की लाओस हा जगातील सर्वात जास्त बॉम्ब टाकले गेलेला देश आहे. व्हिएतनाम युद्धाच्या वेळेला लाओसवर जबरदस्त बॉम्ब हल्ले झाले. किती बॉम्ब टाकलेले असतील? सरासरीच काढायची तर दर आठ मिनिटाला एक. आणि असे किती दिवस? तर दिवसाचे चोवीस तास, अशी नऊ वर्ष. त्यातले कित्येक न फुटलेले बॉम्ब अजूनही लाओस मध्ये सापडतात. शेतकऱ्यांना शेतीसाठी जमीन नांगरताना किंवा ग्रामीण भागातील मुलांना खेळताना ते बॉम्ब सापडतात आणि त्यांना काही कळायच्या आत ते बाँम्ब फुटून लोक जखमी होतात. मी वाचले आहे की अजूनही सरासरी लाओसमधील रोज एक माणूस ह्या बॉम्ब मुळे मरतो आहे. असेही म्हणतात कि लाओस पुन्हा पूर्णपणे सुरक्षित व्हायला, या बॉम्बच्या भीती तून मुक्त व्हायला अजून दोनशे वर्षे लागतील. दोन महासत्तांमध्ये झालेल्या शीत युद्धाचा एका तटस्थ देशावर झालेला हा महाभयंकर परिणाम आहे. पण अर्थातच तिथे पर्यटक म्हणून गेल्यावर तुम्ही अशा आडबाजूच्या जागांना जाणार नाही आणि त्यामुळेच लाओस आणि लुआंग प्रबांग हे प्रवाशांसाठी सुरक्षित आहे. आपल्या समृद्ध वास्तुशैलीच्या आणि कलात्मकतेच्या वारश्यामुळे लुआंग प्रबांग खूप विलक्षण शहर आहे. शहरात फ्रेंच वास्तुशैली आणि पारंपारिक लाओ वास्तुशैलीचा एक अनोखा संगम पाहायला मिळतो. हा सर्वच वारसा अतिशय चांगल्या तऱ्हेने जतन केला गेलेला असल्यामुळे, युनेस्कोने लुआंग प्रबांग ला विश्व वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

कोस्टल कर्नाटक- २ मंगळुरू, मुलकी, उचिल, उडुपी

  आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते.  नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते.  मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात.  काद्री मंजुनाथ मंदिर  का...