मुख्य सामग्रीवर वगळा

Sai Bai Dee (नमस्कार) लुआंग प्रबांग!

नुकतेच आपले माननीय पंतप्रधान मोदीजी यांचे लाओ PDR च्या पंतप्रधानांबरोबर covid-19 नंतरच्या काळातील जगा समोरील आरोग्य विषयक आणि आर्थिक आव्हाने याविषयी फोनवर संभाषण झाले. त्यावेळी लाओ PDR च्या विकास कार्यक्रमात असलेल्या भारताच्या सहभागाबद्दल लाओ PDR च्या पंतप्रधानांनी भारताला धन्यवाद दिले. Vat Phou हिंदू मंदिराच्या संरक्षण प्रकल्पात देखील भारताचा सक्रीय सहभाग आहे. हे एक पाचव्या किंवा सहाव्या शतकात बांधले गेलेले पुरातन शिवमंदिर आहे.


चीन आणि लाओस मधील रेल्वे मार्गाचे मेकोंग वरील लुआंग प्रबांग जवळील खांब बांधून पूर्ण झाले अशी बातमी जेव्हा एप्रिलमध्ये वाचली तेव्हापासून मला वाटायला लागले की लुआंग प्रबांग किती बदलेल या रेल्वे मार्गा मुळे आणि चीनच्या वाढत्या प्रभावामुळे! तर त्याच्या आधीच मी पूर्वी ते कसे होते त्याच्या विषयी लिहायला पाहिजे.


काय आहे लुआंग प्रबांग आणि कुठे आहे?


तर लुआंग प्रबांग हे लाओस मधील एक अत्यंत रमणीय असे शहर आहे. लाओस देश सर्व बाजूंनी जमिनीने आणि वेगवेगळ्या देशांना वेढला गेलेला आहे. जर का तुम्ही जगाचा नकाशा बघाल तर तुमच्या लक्षात येईल की लाओस च्या सगळ्या बाजूनी थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, चायना असे देश त्याचे शेजारी आहेत आणि समुद्र किनारा न लाभलेला असा आग्नेय आशिया तील तो एकमेव देश आहे


भूमीने वेढलेला लाओस 
(छायाचित्र नेटवरून साभार )


आम्ही लुआंग प्रबांग ला डिसेंबर २०१२ मध्ये गेलो होतो. त्यावेळी लुआंग प्रबांग चा विमानतळ म्हणजे एक मोठा हॉल होता..बास! अगदी मोजक्या फ्लाइट्स.. माझ्या आठवणीप्रमाणे बॅंकॉक, चीअंग मई आणि सियम रिप हून तिथे जायच्या. पण तेव्हा तिथे विमानतळाच्या विस्ताराचे कामही चालू होते. मी तर पहिल्यांदा इतका लहान विमानतळ पाहिला होता आणि त्याच्यामुळे असेल, त्या वातावरणाला काहीतरी एक घरगुती स्पर्श होता आणि संपूर्ण वास्तव्यात तीच भावना मनात राहिली.


File:Luang Prabang Airport 2010.jpg
लुआंग प्रबांग विमानतळ, 2012
(विकीपीडिया वरून साभार)


विमानतळावर आम्हाला घ्यायला आमच्या हॉटेल ने गाडी व ड्रायव्हर पाठवलेला होता. तो आम्हाला त्या सुंदर शहरातुन घेऊन गेला आणि अचानक एका छोट्या गल्लीच्या जवळ गाडी थांबली. तिथे दुसरा माणूस आमची वाट पाहत होता. त्याने आमचे सामान उचलले आणि चालायला सुरवात केली. त्या गल्लीतून त्याच्या मागोमाग आम्ही चालू लागलो. तिथे रस्त्यावर लाईट नाही, पूर्ण अंधार, जवळपास कुठेही मला हॉटेलची इमारत काही दिसत नव्हती. आमचे सामान घेऊन चालणारा माणूस एका बांबूच्या पुलावरून खाली उतरायला लागला. खालती एक बोट आमची वाट पाहत होती आणि हे आमच्यासाठी खरोखरीच खूप मोठे आश्चर्य होते. मला अजून आठवतंय ते आश्चर्य, चंद्रप्रकाश आणि त्या शांत वातावरणात नदीच्या पाण्याचा बोटीमुळे होणारा आवाज.

पलीकडच्या किनार्‍यावर आम्हाला परत अनेक पायर्‍या चढायला लागल्या. जवळपास आम्ही दोन तीन मजले असावे इतकी उंची चढून गेलो. पण आताचा रस्ता हॉटेलचा असल्यामुळे सुंदर दिव्यांनी उजळलेला होता. याच्याइतका सुंदर प्रवास असूच शकत नाही.. अर्थात जेव्हा तुमचे सामान दुसरे कोणी वाहून नेत असेल तेव्हा!! नाहीतर इतकी उंच चढण होती ती. म्हणजे बाबा गाडी आणि व्हीलचेअर साठी तर त्या पायऱ्या अशक्यच. पण कोणी वयस्कर किंवा आजारी माणूस असेल तर त्याच्यासाठी पण खूप अवघड. आम्ही इथेच प्रवासातला एक मोठा धडा शिकलो. जेव्हा तुम्ही ऑनलाईन बुकिंग करता तर तेव्हा साधारणपणे तुम्ही हॉटेल पासून त्या शहराच्या महत्त्वाच्या भागा पर्यंतचे अंतर ध्यानात घेऊन हॉटेलचं बुकिंग करता. पण तेवढे पाहणे पुरेसे नाही, तर वाटेत काही नद्या आणि डोंगर आहेत का हे पण बघायला पाहिजे!! हॉटेल खूप छान होते. लहानशा, दोन मजली, लाओ पद्धतीचे बांधकाम असलेल्या इमारती परिसरात विखुरलेल्या होत्या. नशिबाने आम्हाला वरच्या मजल्यावरची खोली मिळाली होती. कौलारू छपराची आणि बाल्कनी मधून खाली बघितल्यावर चाफ्याची झाडेच झाडे (लाओ भाषेमध्ये त्याला चंपा म्हणतात). शिवाय नदी दिसत होती, डोंगर दिसत होते आणि जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा त्या वेळेला तर चंद्र प्रकाशाची जादू या पूर्ण आसमंतावर पसरलेली होती.


चाफा - चंपा 

डोक चंपा हे लाओस चे राष्ट्रीय फूल आहे आणि लाओ एअर लाईन चे चिन्ह पण. लाओ एअरलाईनच्या विमानांवर देखील हे फुल काढलेले असते.

लाओ एअर लाईन 


दुसऱ्या दिवशी सूर्यप्रकाशात आम्हाला आमच्या परिसर जास्त चांगला पाहता आला. खूपच रमणीय परिसर होता. हॉटेलच्या नदीकाठी असलेल्या रेस्टॉरंट मध्येच आम्ही नाश्ता घेतला. तुम्हाला सांगते, त्यावेळेला मेकाॅंग अशी मळकट पिवळट मातकट रंगाची होती आणि आता मी मध्यंतरी वाचले की आता मेकॉंग चा रंग बदलून निळसर हिरवट झालेला आहे. मी असे ऐकले आहे मेकाॅंग ह्या नावाची उत्पत्ती मे+ नाम+ खोंग अशी आहे. मे म्हणजे आई, नाम म्हणजे पाणी आणि खोंग म्हणजे गंगा.


हॉटेलचे नदीतीरावरील रेस्टॉरंट 


ब्रेकफास्ट टेबल वरून दिसणारे दृश्य 

ब्रेकफास्ट

हॉटेल मधून दिसणारे एक गाव 

नजर जाईल तिकडे पाणी आणि डोंगर!

हॉटेल मधून दिसणारे विहंगम दृश्य 

सुख!

तर अशा रीतीने आम्ही लुआंग प्रबांग नावाच्या अत्यंत रमणीय शहरात पोचलो होतो. हे शहर अगदी आत्तापर्यंत म्हणजे १९७५ पर्यंत अनेक शतके देशाची राजधानी होते आणि युनेस्कोने त्याला विश्व वारसा शहर म्हणून घोषित केलेले आहे. या शहराच्या सगळ्या बाजूंनी डोंगररांगा आहेत. मेकोंग आणि नाम खम नदीच्या संगमावर असलेल्या एका थोड्या खोलगट भागात हे शहर वसलेले आहे. कसे होते लुआंग प्रबांग शहर? दुसऱ्या दिवशी आम्ही कुठे कुठे गेलो?? काय पाहिले? ते बघुयात उद्याच्या पोस्टमध्ये.

#serenedestination #vacation #SouthEastAsia #LaoAirlines #shorttrip

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

कोस्टल कर्नाटक- २ मंगळुरू, मुलकी, उचिल, उडुपी

  आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते.  नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते.  मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात.  काद्री मंजुनाथ मंदिर  का...