Skip to main content

Sai Bai Dee (नमस्कार) लुआंग प्रबांग!

नुकतेच आपले माननीय पंतप्रधान मोदीजी यांचे लाओ PDR च्या पंतप्रधानांबरोबर covid-19 नंतरच्या काळातील जगा समोरील आरोग्य विषयक आणि आर्थिक आव्हाने याविषयी फोनवर संभाषण झाले. त्यावेळी लाओ PDR च्या विकास कार्यक्रमात असलेल्या भारताच्या सहभागाबद्दल लाओ PDR च्या पंतप्रधानांनी भारताला धन्यवाद दिले. Vat Phou हिंदू मंदिराच्या संरक्षण प्रकल्पात देखील भारताचा सक्रीय सहभाग आहे. हे एक पाचव्या किंवा सहाव्या शतकात बांधले गेलेले पुरातन शिवमंदिर आहे.


चीन आणि लाओस मधील रेल्वे मार्गाचे मेकोंग वरील लुआंग प्रबांग जवळील खांब बांधून पूर्ण झाले अशी बातमी जेव्हा एप्रिलमध्ये वाचली तेव्हापासून मला वाटायला लागले की लुआंग प्रबांग किती बदलेल या रेल्वे मार्गा मुळे आणि चीनच्या वाढत्या प्रभावामुळे! तर त्याच्या आधीच मी पूर्वी ते कसे होते त्याच्या विषयी लिहायला पाहिजे.


काय आहे लुआंग प्रबांग आणि कुठे आहे?


तर लुआंग प्रबांग हे लाओस मधील एक अत्यंत रमणीय असे शहर आहे. लाओस देश सर्व बाजूंनी जमिनीने आणि वेगवेगळ्या देशांना वेढला गेलेला आहे. जर का तुम्ही जगाचा नकाशा बघाल तर तुमच्या लक्षात येईल की लाओस च्या सगळ्या बाजूनी थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, चायना असे देश त्याचे शेजारी आहेत आणि समुद्र किनारा न लाभलेला असा आग्नेय आशिया तील तो एकमेव देश आहे


भूमीने वेढलेला लाओस 
(छायाचित्र नेटवरून साभार )


आम्ही लुआंग प्रबांग ला डिसेंबर २०१२ मध्ये गेलो होतो. त्यावेळी लुआंग प्रबांग चा विमानतळ म्हणजे एक मोठा हॉल होता..बास! अगदी मोजक्या फ्लाइट्स.. माझ्या आठवणीप्रमाणे बॅंकॉक, चीअंग मई आणि सियम रिप हून तिथे जायच्या. पण तेव्हा तिथे विमानतळाच्या विस्ताराचे कामही चालू होते. मी तर पहिल्यांदा इतका लहान विमानतळ पाहिला होता आणि त्याच्यामुळे असेल, त्या वातावरणाला काहीतरी एक घरगुती स्पर्श होता आणि संपूर्ण वास्तव्यात तीच भावना मनात राहिली.


File:Luang Prabang Airport 2010.jpg
लुआंग प्रबांग विमानतळ, 2012
(विकीपीडिया वरून साभार)


विमानतळावर आम्हाला घ्यायला आमच्या हॉटेल ने गाडी व ड्रायव्हर पाठवलेला होता. तो आम्हाला त्या सुंदर शहरातुन घेऊन गेला आणि अचानक एका छोट्या गल्लीच्या जवळ गाडी थांबली. तिथे दुसरा माणूस आमची वाट पाहत होता. त्याने आमचे सामान उचलले आणि चालायला सुरवात केली. त्या गल्लीतून त्याच्या मागोमाग आम्ही चालू लागलो. तिथे रस्त्यावर लाईट नाही, पूर्ण अंधार, जवळपास कुठेही मला हॉटेलची इमारत काही दिसत नव्हती. आमचे सामान घेऊन चालणारा माणूस एका बांबूच्या पुलावरून खाली उतरायला लागला. खालती एक बोट आमची वाट पाहत होती आणि हे आमच्यासाठी खरोखरीच खूप मोठे आश्चर्य होते. मला अजून आठवतंय ते आश्चर्य, चंद्रप्रकाश आणि त्या शांत वातावरणात नदीच्या पाण्याचा बोटीमुळे होणारा आवाज.

पलीकडच्या किनार्‍यावर आम्हाला परत अनेक पायर्‍या चढायला लागल्या. जवळपास आम्ही दोन तीन मजले असावे इतकी उंची चढून गेलो. पण आताचा रस्ता हॉटेलचा असल्यामुळे सुंदर दिव्यांनी उजळलेला होता. याच्याइतका सुंदर प्रवास असूच शकत नाही.. अर्थात जेव्हा तुमचे सामान दुसरे कोणी वाहून नेत असेल तेव्हा!! नाहीतर इतकी उंच चढण होती ती. म्हणजे बाबा गाडी आणि व्हीलचेअर साठी तर त्या पायऱ्या अशक्यच. पण कोणी वयस्कर किंवा आजारी माणूस असेल तर त्याच्यासाठी पण खूप अवघड. आम्ही इथेच प्रवासातला एक मोठा धडा शिकलो. जेव्हा तुम्ही ऑनलाईन बुकिंग करता तर तेव्हा साधारणपणे तुम्ही हॉटेल पासून त्या शहराच्या महत्त्वाच्या भागा पर्यंतचे अंतर ध्यानात घेऊन हॉटेलचं बुकिंग करता. पण तेवढे पाहणे पुरेसे नाही, तर वाटेत काही नद्या आणि डोंगर आहेत का हे पण बघायला पाहिजे!! हॉटेल खूप छान होते. लहानशा, दोन मजली, लाओ पद्धतीचे बांधकाम असलेल्या इमारती परिसरात विखुरलेल्या होत्या. नशिबाने आम्हाला वरच्या मजल्यावरची खोली मिळाली होती. कौलारू छपराची आणि बाल्कनी मधून खाली बघितल्यावर चाफ्याची झाडेच झाडे (लाओ भाषेमध्ये त्याला चंपा म्हणतात). शिवाय नदी दिसत होती, डोंगर दिसत होते आणि जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा त्या वेळेला तर चंद्र प्रकाशाची जादू या पूर्ण आसमंतावर पसरलेली होती.


चाफा - चंपा 

डोक चंपा हे लाओस चे राष्ट्रीय फूल आहे आणि लाओ एअर लाईन चे चिन्ह पण. लाओ एअरलाईनच्या विमानांवर देखील हे फुल काढलेले असते.

लाओ एअर लाईन 


दुसऱ्या दिवशी सूर्यप्रकाशात आम्हाला आमच्या परिसर जास्त चांगला पाहता आला. खूपच रमणीय परिसर होता. हॉटेलच्या नदीकाठी असलेल्या रेस्टॉरंट मध्येच आम्ही नाश्ता घेतला. तुम्हाला सांगते, त्यावेळेला मेकाॅंग अशी मळकट पिवळट मातकट रंगाची होती आणि आता मी मध्यंतरी वाचले की आता मेकॉंग चा रंग बदलून निळसर हिरवट झालेला आहे. मी असे ऐकले आहे मेकाॅंग ह्या नावाची उत्पत्ती मे+ नाम+ खोंग अशी आहे. मे म्हणजे आई, नाम म्हणजे पाणी आणि खोंग म्हणजे गंगा.


हॉटेलचे नदीतीरावरील रेस्टॉरंट 


ब्रेकफास्ट टेबल वरून दिसणारे दृश्य 

ब्रेकफास्ट

हॉटेल मधून दिसणारे एक गाव 

नजर जाईल तिकडे पाणी आणि डोंगर!

हॉटेल मधून दिसणारे विहंगम दृश्य 

सुख!

तर अशा रीतीने आम्ही लुआंग प्रबांग नावाच्या अत्यंत रमणीय शहरात पोचलो होतो. हे शहर अगदी आत्तापर्यंत म्हणजे १९७५ पर्यंत अनेक शतके देशाची राजधानी होते आणि युनेस्कोने त्याला विश्व वारसा शहर म्हणून घोषित केलेले आहे. या शहराच्या सगळ्या बाजूंनी डोंगररांगा आहेत. मेकोंग आणि नाम खम नदीच्या संगमावर असलेल्या एका थोड्या खोलगट भागात हे शहर वसलेले आहे. कसे होते लुआंग प्रबांग शहर? दुसऱ्या दिवशी आम्ही कुठे कुठे गेलो?? काय पाहिले? ते बघुयात उद्याच्या पोस्टमध्ये.

#serenedestination #vacation #SouthEastAsia #LaoAirlines #shorttrip

Comments

  1. नेहमी सारखे सुंदर

    उत्सुकता निर्माण केलीस 👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...

शिवथरघळ

जर आपण भारताचा नकाशा पाहिला  तर आपल्याला नकाशात डावीकडे, गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत काळसर  हिरवी रेषा दिसते. ही रेषा  गुजराथ येथून सुरु होते  आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू मार्गे जाऊन केरळला पोहोचते. ती रेषा म्हणजेच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट म्हणजे दख्खनच्या पठाराची जणू किनारच आहे. दख्खन पठाराच्या काठावरच्या ह्या पर्वत रांगा आहेत.  या भागात बरीच जंगले, जलसाठे, धबधबे आहेत आणि जैवविविधता तसेच त्याचे वय यामुळे या भागाला 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून ओळखले गेले आहे. पश्चिम घाट हिमालयापेक्षाही जुना आहे! वरंधा घाट  📷विकिमीडिया कॉमन्स  पश्चिम घाट हा अनेक मुख्य नद्यांचे उगमस्थान आहे. वरील छायाचित्रात दिसते आहे त्या प्रमाणे, वर्षा ऋतूत या प्रदेशात अनेक धबधबे पाहायला मिळतात.  पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) अनेक सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे शिवथरघळ धबधबा. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण रौद्र सौंदर्यानिशी आणि ताकदीनिशी रोरावत खाली येताना दिसतो.  हा धबधबा सुमारे शंभर फूट उंचीवर...