Skip to main content

Sok Dee (शुभेच्छा) लुआंग प्रबांग!

लुआंग प्रबांग एकदम संथ, शांत जीवनशैलीचे शहर आहे. इथे आल्यावर तुम्हाला तर वाटेल की जणू तुम्ही 1970च्या दशकात आहात! जीवनाची संथ गती, कमी गर्दीचे रस्ते, वैभवशाली संस्कृती व स्थापत्य, वातावरणातील अध्यात्मिकता, सुस्वभावी लोक आणि नैसर्गिक सृष्टीसौंदर्य या सर्वांमुळे लुआंग प्रबांग अगदी अनोखे शहर वाटते. लुआंग प्रबांगच्या जुन्या शहर भागातून निवांत फेरफटका मारणे आम्हाला खूप आनंददायी वाटले. या भागातील इमारती आणि कॉफी शॉप्स पाहून लुआंग प्रबांग ही फ्रेंच वसाहत होती त्याची आठवण होते. 



luang prabang, laos, phabang, asia, mekong, city, town, countryside, landscape
लुआंग प्रबांग (From Pikist.com)

चुली वरचा स्वैपाक!

सुंदर मंदिरे

सजावट 

बौद्ध भिक्षु

फुलं घ्या फुलं ..देवासाठी फुलं!!


बौद्ध मंदिरे सगळीकडे, अगदी पावलोपावली दिसतात.


Wat Sensoukhram

एका मंदिरातील बुद्धाची सोनेरी मूर्ती

That Makmo - Watermelon Stupa

पूजाविधीतील एक भाग

धर्म समर्पित तरुण 

उच्च शिक्षण !! अभ्यास असा करायचा असतो!!!
उंच भिंतीवर बसून..म्हणजे ते उच्च शिक्षण होते !!!


मुळात लुआंग प्रबांग या नावाचा अर्थच मुळी रॉयल बुद्ध मूर्ती असा आहे. बौद्ध मंदिरे आणि बौद्ध भिक्षू ह्या शहराला एक वेगळीच शांतता प्रदान करतात.बौद्ध भिक्षूंनी शहरात हिंडून भिक्षा मागायची ही इथली जुनी पद्धत आहे. शंभराहून जास्त बौद्ध भिक्षु पहाटेच मंदिरातून दीक्षा मागण्यासाठी निघतात. त्यांच्या रस्त्यावर भाविक लोक आधीपासूनच भिक्षा घेऊन तयार असतात आणि फोटो काढायला पर्यटक पण तयार असतात. 


भिक्षाफेरी
(From Pixabay)

Haw Kham किंवा Ho Kham नावाचा राजप्रासाद आता वस्तु संग्रहालयात रुपांतरीत झालेला आहे. आवर्जून बघायलाच हवे असे हे ठिकाण आहे. इथे तुम्हाला लाओसच्या इतिहास आणि संस्कृती बद्दल खूप चांगली माहिती मिळेल. या आवारात अनेक राजेशाही इमारती आहेत, तसेच त्यांचे म्हणजे राजघराण्याचे वैयक्तिक वापराचे भाग देखील आहेत. जरी राजघराण्यातले लोक आता तिथे राहत नसतील तरी तो भाग, जणू काही ते तिथे राहातच असावेत, असाच ठेवलेला आहे. एका दारावर ऐरावत म्हणजे इंद्राचा हत्ती आणि इंद्र यांच्या मूर्ती दिसतील. एका शिल्पात महेंद्र पर्वत आणि गंगा पण दिसेल!


पूर्वी लाओस, कंबूज (आत्ताच्या कंबोडियातील अनेक शतकांपूर्वी असलेल्या) ह्या हिंदू साम्राज्याचा एक भाग होता. त्यामुळेच आपल्याला इथे अनेक हिंदू देवदेवतांची चित्रे दिसतील. तसेच अनेक संस्कृत नावे पण आढळतील उदाहरणार्थ जयवर्मन, हरिहरालय, श्रेष्ठपुरा, द्वारावती. लाओसमध्ये अजूनही आपल्याला भारतीय धर्म, कला, संस्कृती आणि वास्तुशास्त्र ह्यांची छाप दिसते.


Pra Lak Pra Ram हे लाओसचे राष्ट्रीय महाकाव्य आहे आणि ते वाल्मिकी रामायण वर आधारलेले आहे. इथेही जरी रामच नायक असला तरी लक्ष्मणाचे नाव आधी येते. त्यामागचे कारण असे की रामाला राजा म्हणून जे करणे आवश्यक होते ते त्याने केले पण लक्ष्मणाने मात्र स्वतःच्या इच्छेने त्याच्याबरोबर वनवास स्वीकारला तसेच आयुष्यभर त्याला साथ दिली. त्याबद्दल गौरव म्हणून लक्ष्मणाचे नाव आधी येते! या महाकाव्यात ते दोघं राजा Thattarathह्याचे पुत्र आहेत. ह्या काव्यात Nang Sida आहे,जिला लक्ष्मीचा अवतार मानले गेले आहे. इथे monkey Hanoumane आहे, जो त्यांना Sida चा शोध घ्यायला आणि युद्धातही मदत करतो. लाओसमध्ये लोक मानतात की रामायण हे जातक कथा आहे! Wat Mai Suwannaphumaham (Mai Souvana Phoun Ram) हे ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या एक अत्यंत महत्त्वाचे मंदिर आहे. कारण मधल्या अशांततेच्या काळात, दीर्घकाळ पर्यंत ह्या मंदिरात प्रबांगची मूर्ती राहिलेली होती आणि शिवाय त्यावेळी हे मंदिर राजघराण्याचे मंदिर म्हणून पण कार्यरत होते. इथे रामायण कथेतील चित्रे लाकडी भिंतींवर, सोनेरी पत्र्याच्या प्लेटिंगवर चित्रीत केलेली आहेत. हे नक्कीच लुआंग प्रबांग मधील चित्तवेधक मंदिर आहे आणि आणि त्यामुळे अर्थातच सर्वात जास्त लोक आणि प्रवासी ह्या मंदिरात जातात आणि फोटो काढतात.


सीता

राम, लक्ष्मण, सीता


राजवाड्याच्या परिसरात Haw Phra/Pra Bang याचे मंदिर आहे. ही तीच मूर्ती जिचे नाव शहराच्या नावा सारखेच आहे. लुआंग म्हणजे शाही आणि प्रबांग म्हणजे बुद्धाची सोनेरी मूर्ती. लाओसच्या इतिहासात या मूर्तीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.


Haw Pra Bang

एकाग्रता !! देवळाच्या दुरुस्तीचे आणि सौन्दर्यीकरणाचे काम चालू होते.


रॉयल म्युझियम परिसरातील हॉल मध्ये होणारा सांस्कृतिक कार्यक्रम आवर्जून बघावा असाच आहे. इथे तुम्हाला लाओ संस्कृतीची एक झलक पाहायला मिळेल. या Royal Ballet theatre मध्ये बहुतेकदा Phra Lak Phra Lam ही नृत्यनाटिका चालू असते. ही माहिती वाचून तुम्हाला या नृत्यनाटिकेविषयी उत्सुकता वाटत असेल तर ह्यातील काही भाग तुम्ही युट्युब वर देखील बघू शकता.


Royal theatre cultural show

रोयल थियेटर, लुआंग प्रबांग


Pak Ou Caves 


चुनखडीच्या खडकात असलेल्या, एकावर एक अशा या दोन गुफा आहेत. लुआंग प्रबांगहुन इथे जाण्यासाठी मेकॉन्ग मधून बोटीने जायला लागते. या प्रवासात अत्यंत मनोहारी असे सृष्टीसौंदर्य बघायला मिळते.


या गुहांमध्ये बुद्धाच्या अक्षरशः हजारो मूर्ती ठेवलेल्या आहेत. ह्या गुहातून जलदेवतेचा वास आहे अशी स्थानिक लोकांची श्रद्धा आहे आणि त्यामुळे अनेक शतके, खरेतर जवळपास दोन हजार वर्षे हे एक पूजास्थान म्हणून मानले गेलेले आहे.


Pak Ou caves - मधून दिसणारी नदी

गुंफेकडे जाणारा मार्ग 

वरच्या गुंफेकडे जाण्याचा मार्ग 

काही छोटी गावे पारंपरिक लाओ पद्धतीच्या गावांप्रमाणे अजूनही ठेवलेली आहेत. पर्यटक त्यातील काही गावांना भेट देऊ शकतात. तिथे जाण्यासाठीही बोटीनेच जावे लागते.


बोटीसाठीचा पेट्रोल पंप!

राइस वाईन तयार होते आहे.

भाजलेली केळी 

जाता जाता खायला खाऊ!

केशरचना 

अर्थातच बाजारातून स्थानिक कलाकुसर खरेदी करण्यास तुम्ही विसरणार नाहीच! हातमागावर तयार केलेली वस्त्रप्रावरणे तसेच स्थानिक लोकांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू या सगळ्यांनी बाजार ओसंडून वाहत असतो.

लुआंग प्रबांगच्या बाजारातून घेतलेली
 विणलेली सुंदर शाल 


Mount Phousi वर चढून संपूर्ण गावाचे मनोरम दृश्य पाहणे आणि अत्यंत सुंदर अशा Tat Kuang Si धबधब्यांना भेट देणे अजिबात विसरू नका. ही दोन्ही ठिकाणे बघायचे आमचे राहूनच गेले आहे.


Kuang Si waterfall
(from Pixabay)


आता नेहमीचे पर्यटकांचे प्रश्न

लुआंगप्रबंग स्वस्त आहे का? नाही, स्वस्त नाही. विशेष करून तुम्हाला हे रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर लक्षात येईल! रस्त्यांवर खूप सगळे स्थानिक अन्न अगदी स्वस्तात विकायला असते. पण ते व्हिगन आहे का किंवा शाकाहारी आहे का हे तुम्हाला कळणार नाही. जर का नशिबाने एखादा दुकानदार तुम्हाला इंग्रजी बोलणारा भेटलाच तर तुम्हाला नक्कीच स्वस्त स्थानिक अन्न खाता येईल. पण नाही तर व्हिगन आणि शाकाहारी लोकांना विशेष रेस्टॉरंटमध्ये जायला लागेल.ती महाग जरूर आहेत पण तिथले अन्न मात्र अत्यंत चविष्ट आहे. आग्नेय आशियातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक असल्याने लुआंग प्रबांगला प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. लुआंग प्रबांग सुरक्षित आहे का? तुम्ही ऐकले असेल की लाओस हा जगातील सर्वात जास्त बॉम्ब टाकले गेलेला देश आहे. व्हिएतनाम युद्धाच्या वेळेला लाओसवर जबरदस्त बॉम्ब हल्ले झाले. किती बॉम्ब टाकलेले असतील? सरासरीच काढायची तर दर आठ मिनिटाला एक. आणि असे किती दिवस? तर दिवसाचे चोवीस तास, अशी नऊ वर्ष. त्यातले कित्येक न फुटलेले बॉम्ब अजूनही लाओस मध्ये सापडतात. शेतकऱ्यांना शेतीसाठी जमीन नांगरताना किंवा ग्रामीण भागातील मुलांना खेळताना ते बॉम्ब सापडतात आणि त्यांना काही कळायच्या आत ते बाँम्ब फुटून लोक जखमी होतात. मी वाचले आहे की अजूनही सरासरी लाओसमधील रोज एक माणूस ह्या बॉम्ब मुळे मरतो आहे. असेही म्हणतात कि लाओस पुन्हा पूर्णपणे सुरक्षित व्हायला, या बॉम्बच्या भीती तून मुक्त व्हायला अजून दोनशे वर्षे लागतील. दोन महासत्तांमध्ये झालेल्या शीत युद्धाचा एका तटस्थ देशावर झालेला हा महाभयंकर परिणाम आहे. पण अर्थातच तिथे पर्यटक म्हणून गेल्यावर तुम्ही अशा आडबाजूच्या जागांना जाणार नाही आणि त्यामुळेच लाओस आणि लुआंग प्रबांग हे प्रवाशांसाठी सुरक्षित आहे. आपल्या समृद्ध वास्तुशैलीच्या आणि कलात्मकतेच्या वारश्यामुळे लुआंग प्रबांग खूप विलक्षण शहर आहे. शहरात फ्रेंच वास्तुशैली आणि पारंपारिक लाओ वास्तुशैलीचा एक अनोखा संगम पाहायला मिळतो. हा सर्वच वारसा अतिशय चांगल्या तऱ्हेने जतन केला गेलेला असल्यामुळे, युनेस्कोने लुआंग प्रबांग ला विश्व वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

महेश्वर

महेश्वर हे मध्यप्रदेश पर्यटन निगमच्या पर्यटन स्थळांमधले एक महत्वाचे नाव आहे. पण करोडो भारतीयांसाठी ते केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर एक तीर्थस्थान असते. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेले स्थान आहे.  महेश्वर किल्ला प्रवेशद्वार  राजवाडा प्रवेशद्वार  बाह्यरूप  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  राजवाडा प्रवेशद्वार  अहिल्याबाई होळकर हे केवळ भारताच्याच नव्हे तर विश्वाच्या इतिहासातील एक सोनेरी पान. संपूर्ण मानव विश्वातील यशस्वी स्त्री राज्यकर्त्यांची सूची करायची झाली तर अहिल्याबाई होळकरांचे नाव ठळकपणे लिहायला लागेल.   31 मे 2025 ला त्यांची तीनशेवी जयंती आहे. पण 300 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या अहिल्याबाईंचे आयुष्य अगदी आजच्या आधुनिक काळातल्या आव्हानातही मार्गदर्शक ठरावे असेच आहे.  त्यांच्याविषयीचा आदर मनात घेऊनच आपण महेश्वरला जातो आणि त्या भावनेच्या प्रकाशात महेश्वर पाहतो. महेश्वरला फार मोठी प्राचीन परंपरा आहे. स्कंद पुराणाच्या रेवा खंडात आणि वायू पुराणाच्या नर्मदा रहस्य मध्ये महिष्मती म्हणजे महेश्वरचे वर्णन आलेले आहे. 'गुप्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

Prashanti Kutiram, Bangalore

I am happy to write my first post of 2022!! I am here with a really very special post! This is not a tourist place and still it holds a special place in each and every visitor’s mind. This is Prashanti Kutiram of Bangalore. Prashanti kutiram as the name suggests, surely makes your mind peaceful. It's around 70-80 kms from Bangalore airport but with the famous traffic jams of Bangalore, it may take two and half hours by taxi.  This is the place where The Swami Vivekananda Yoga Anusandhan Sansthan is situated on a sprawling 100 acres. Swami Vivekanand  Swami Vivekanand  Ramakrishna Paramahans and Sharada Mataji  SVyasa Founded in 1986, Svyasa follows Swami Vivekanand's teachings and combines best of east and West. So it combines Yoga and spirituality with modern sciences.  The first thing you will notice about Vyasa is the greenery. The campus is having umpteen trees. It's hilly area. The steep paths and slopes offer you the much needed exercise!! The Green Umbre...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...