Skip to main content

Sok Dee (शुभेच्छा) लुआंग प्रबांग!

लुआंग प्रबांग एकदम संथ, शांत जीवनशैलीचे शहर आहे. इथे आल्यावर तुम्हाला तर वाटेल की जणू तुम्ही 1970च्या दशकात आहात! जीवनाची संथ गती, कमी गर्दीचे रस्ते, वैभवशाली संस्कृती व स्थापत्य, वातावरणातील अध्यात्मिकता, सुस्वभावी लोक आणि नैसर्गिक सृष्टीसौंदर्य या सर्वांमुळे लुआंग प्रबांग अगदी अनोखे शहर वाटते. लुआंग प्रबांगच्या जुन्या शहर भागातून निवांत फेरफटका मारणे आम्हाला खूप आनंददायी वाटले. या भागातील इमारती आणि कॉफी शॉप्स पाहून लुआंग प्रबांग ही फ्रेंच वसाहत होती त्याची आठवण होते. 



luang prabang, laos, phabang, asia, mekong, city, town, countryside, landscape
लुआंग प्रबांग (From Pikist.com)

चुली वरचा स्वैपाक!

सुंदर मंदिरे

सजावट 

बौद्ध भिक्षु

फुलं घ्या फुलं ..देवासाठी फुलं!!


बौद्ध मंदिरे सगळीकडे, अगदी पावलोपावली दिसतात.


Wat Sensoukhram

एका मंदिरातील बुद्धाची सोनेरी मूर्ती

That Makmo - Watermelon Stupa

पूजाविधीतील एक भाग

धर्म समर्पित तरुण 

उच्च शिक्षण !! अभ्यास असा करायचा असतो!!!
उंच भिंतीवर बसून..म्हणजे ते उच्च शिक्षण होते !!!


मुळात लुआंग प्रबांग या नावाचा अर्थच मुळी रॉयल बुद्ध मूर्ती असा आहे. बौद्ध मंदिरे आणि बौद्ध भिक्षू ह्या शहराला एक वेगळीच शांतता प्रदान करतात.बौद्ध भिक्षूंनी शहरात हिंडून भिक्षा मागायची ही इथली जुनी पद्धत आहे. शंभराहून जास्त बौद्ध भिक्षु पहाटेच मंदिरातून दीक्षा मागण्यासाठी निघतात. त्यांच्या रस्त्यावर भाविक लोक आधीपासूनच भिक्षा घेऊन तयार असतात आणि फोटो काढायला पर्यटक पण तयार असतात. 


भिक्षाफेरी
(From Pixabay)

Haw Kham किंवा Ho Kham नावाचा राजप्रासाद आता वस्तु संग्रहालयात रुपांतरीत झालेला आहे. आवर्जून बघायलाच हवे असे हे ठिकाण आहे. इथे तुम्हाला लाओसच्या इतिहास आणि संस्कृती बद्दल खूप चांगली माहिती मिळेल. या आवारात अनेक राजेशाही इमारती आहेत, तसेच त्यांचे म्हणजे राजघराण्याचे वैयक्तिक वापराचे भाग देखील आहेत. जरी राजघराण्यातले लोक आता तिथे राहत नसतील तरी तो भाग, जणू काही ते तिथे राहातच असावेत, असाच ठेवलेला आहे. एका दारावर ऐरावत म्हणजे इंद्राचा हत्ती आणि इंद्र यांच्या मूर्ती दिसतील. एका शिल्पात महेंद्र पर्वत आणि गंगा पण दिसेल!


पूर्वी लाओस, कंबूज (आत्ताच्या कंबोडियातील अनेक शतकांपूर्वी असलेल्या) ह्या हिंदू साम्राज्याचा एक भाग होता. त्यामुळेच आपल्याला इथे अनेक हिंदू देवदेवतांची चित्रे दिसतील. तसेच अनेक संस्कृत नावे पण आढळतील उदाहरणार्थ जयवर्मन, हरिहरालय, श्रेष्ठपुरा, द्वारावती. लाओसमध्ये अजूनही आपल्याला भारतीय धर्म, कला, संस्कृती आणि वास्तुशास्त्र ह्यांची छाप दिसते.


Pra Lak Pra Ram हे लाओसचे राष्ट्रीय महाकाव्य आहे आणि ते वाल्मिकी रामायण वर आधारलेले आहे. इथेही जरी रामच नायक असला तरी लक्ष्मणाचे नाव आधी येते. त्यामागचे कारण असे की रामाला राजा म्हणून जे करणे आवश्यक होते ते त्याने केले पण लक्ष्मणाने मात्र स्वतःच्या इच्छेने त्याच्याबरोबर वनवास स्वीकारला तसेच आयुष्यभर त्याला साथ दिली. त्याबद्दल गौरव म्हणून लक्ष्मणाचे नाव आधी येते! या महाकाव्यात ते दोघं राजा Thattarathह्याचे पुत्र आहेत. ह्या काव्यात Nang Sida आहे,जिला लक्ष्मीचा अवतार मानले गेले आहे. इथे monkey Hanoumane आहे, जो त्यांना Sida चा शोध घ्यायला आणि युद्धातही मदत करतो. लाओसमध्ये लोक मानतात की रामायण हे जातक कथा आहे! Wat Mai Suwannaphumaham (Mai Souvana Phoun Ram) हे ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या एक अत्यंत महत्त्वाचे मंदिर आहे. कारण मधल्या अशांततेच्या काळात, दीर्घकाळ पर्यंत ह्या मंदिरात प्रबांगची मूर्ती राहिलेली होती आणि शिवाय त्यावेळी हे मंदिर राजघराण्याचे मंदिर म्हणून पण कार्यरत होते. इथे रामायण कथेतील चित्रे लाकडी भिंतींवर, सोनेरी पत्र्याच्या प्लेटिंगवर चित्रीत केलेली आहेत. हे नक्कीच लुआंग प्रबांग मधील चित्तवेधक मंदिर आहे आणि आणि त्यामुळे अर्थातच सर्वात जास्त लोक आणि प्रवासी ह्या मंदिरात जातात आणि फोटो काढतात.


सीता

राम, लक्ष्मण, सीता


राजवाड्याच्या परिसरात Haw Phra/Pra Bang याचे मंदिर आहे. ही तीच मूर्ती जिचे नाव शहराच्या नावा सारखेच आहे. लुआंग म्हणजे शाही आणि प्रबांग म्हणजे बुद्धाची सोनेरी मूर्ती. लाओसच्या इतिहासात या मूर्तीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.


Haw Pra Bang

एकाग्रता !! देवळाच्या दुरुस्तीचे आणि सौन्दर्यीकरणाचे काम चालू होते.


रॉयल म्युझियम परिसरातील हॉल मध्ये होणारा सांस्कृतिक कार्यक्रम आवर्जून बघावा असाच आहे. इथे तुम्हाला लाओ संस्कृतीची एक झलक पाहायला मिळेल. या Royal Ballet theatre मध्ये बहुतेकदा Phra Lak Phra Lam ही नृत्यनाटिका चालू असते. ही माहिती वाचून तुम्हाला या नृत्यनाटिकेविषयी उत्सुकता वाटत असेल तर ह्यातील काही भाग तुम्ही युट्युब वर देखील बघू शकता.


Royal theatre cultural show

रोयल थियेटर, लुआंग प्रबांग


Pak Ou Caves 


चुनखडीच्या खडकात असलेल्या, एकावर एक अशा या दोन गुफा आहेत. लुआंग प्रबांगहुन इथे जाण्यासाठी मेकॉन्ग मधून बोटीने जायला लागते. या प्रवासात अत्यंत मनोहारी असे सृष्टीसौंदर्य बघायला मिळते.


या गुहांमध्ये बुद्धाच्या अक्षरशः हजारो मूर्ती ठेवलेल्या आहेत. ह्या गुहातून जलदेवतेचा वास आहे अशी स्थानिक लोकांची श्रद्धा आहे आणि त्यामुळे अनेक शतके, खरेतर जवळपास दोन हजार वर्षे हे एक पूजास्थान म्हणून मानले गेलेले आहे.


Pak Ou caves - मधून दिसणारी नदी

गुंफेकडे जाणारा मार्ग 

वरच्या गुंफेकडे जाण्याचा मार्ग 

काही छोटी गावे पारंपरिक लाओ पद्धतीच्या गावांप्रमाणे अजूनही ठेवलेली आहेत. पर्यटक त्यातील काही गावांना भेट देऊ शकतात. तिथे जाण्यासाठीही बोटीनेच जावे लागते.


बोटीसाठीचा पेट्रोल पंप!

राइस वाईन तयार होते आहे.

भाजलेली केळी 

जाता जाता खायला खाऊ!

केशरचना 

अर्थातच बाजारातून स्थानिक कलाकुसर खरेदी करण्यास तुम्ही विसरणार नाहीच! हातमागावर तयार केलेली वस्त्रप्रावरणे तसेच स्थानिक लोकांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू या सगळ्यांनी बाजार ओसंडून वाहत असतो.

लुआंग प्रबांगच्या बाजारातून घेतलेली
 विणलेली सुंदर शाल 


Mount Phousi वर चढून संपूर्ण गावाचे मनोरम दृश्य पाहणे आणि अत्यंत सुंदर अशा Tat Kuang Si धबधब्यांना भेट देणे अजिबात विसरू नका. ही दोन्ही ठिकाणे बघायचे आमचे राहूनच गेले आहे.


Kuang Si waterfall
(from Pixabay)


आता नेहमीचे पर्यटकांचे प्रश्न

लुआंगप्रबंग स्वस्त आहे का? नाही, स्वस्त नाही. विशेष करून तुम्हाला हे रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर लक्षात येईल! रस्त्यांवर खूप सगळे स्थानिक अन्न अगदी स्वस्तात विकायला असते. पण ते व्हिगन आहे का किंवा शाकाहारी आहे का हे तुम्हाला कळणार नाही. जर का नशिबाने एखादा दुकानदार तुम्हाला इंग्रजी बोलणारा भेटलाच तर तुम्हाला नक्कीच स्वस्त स्थानिक अन्न खाता येईल. पण नाही तर व्हिगन आणि शाकाहारी लोकांना विशेष रेस्टॉरंटमध्ये जायला लागेल.ती महाग जरूर आहेत पण तिथले अन्न मात्र अत्यंत चविष्ट आहे. आग्नेय आशियातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक असल्याने लुआंग प्रबांगला प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. लुआंग प्रबांग सुरक्षित आहे का? तुम्ही ऐकले असेल की लाओस हा जगातील सर्वात जास्त बॉम्ब टाकले गेलेला देश आहे. व्हिएतनाम युद्धाच्या वेळेला लाओसवर जबरदस्त बॉम्ब हल्ले झाले. किती बॉम्ब टाकलेले असतील? सरासरीच काढायची तर दर आठ मिनिटाला एक. आणि असे किती दिवस? तर दिवसाचे चोवीस तास, अशी नऊ वर्ष. त्यातले कित्येक न फुटलेले बॉम्ब अजूनही लाओस मध्ये सापडतात. शेतकऱ्यांना शेतीसाठी जमीन नांगरताना किंवा ग्रामीण भागातील मुलांना खेळताना ते बॉम्ब सापडतात आणि त्यांना काही कळायच्या आत ते बाँम्ब फुटून लोक जखमी होतात. मी वाचले आहे की अजूनही सरासरी लाओसमधील रोज एक माणूस ह्या बॉम्ब मुळे मरतो आहे. असेही म्हणतात कि लाओस पुन्हा पूर्णपणे सुरक्षित व्हायला, या बॉम्बच्या भीती तून मुक्त व्हायला अजून दोनशे वर्षे लागतील. दोन महासत्तांमध्ये झालेल्या शीत युद्धाचा एका तटस्थ देशावर झालेला हा महाभयंकर परिणाम आहे. पण अर्थातच तिथे पर्यटक म्हणून गेल्यावर तुम्ही अशा आडबाजूच्या जागांना जाणार नाही आणि त्यामुळेच लाओस आणि लुआंग प्रबांग हे प्रवाशांसाठी सुरक्षित आहे. आपल्या समृद्ध वास्तुशैलीच्या आणि कलात्मकतेच्या वारश्यामुळे लुआंग प्रबांग खूप विलक्षण शहर आहे. शहरात फ्रेंच वास्तुशैली आणि पारंपारिक लाओ वास्तुशैलीचा एक अनोखा संगम पाहायला मिळतो. हा सर्वच वारसा अतिशय चांगल्या तऱ्हेने जतन केला गेलेला असल्यामुळे, युनेस्कोने लुआंग प्रबांग ला विश्व वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...

शिवथरघळ

जर आपण भारताचा नकाशा पाहिला  तर आपल्याला नकाशात डावीकडे, गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत काळसर  हिरवी रेषा दिसते. ही रेषा  गुजराथ येथून सुरु होते  आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू मार्गे जाऊन केरळला पोहोचते. ती रेषा म्हणजेच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट म्हणजे दख्खनच्या पठाराची जणू किनारच आहे. दख्खन पठाराच्या काठावरच्या ह्या पर्वत रांगा आहेत.  या भागात बरीच जंगले, जलसाठे, धबधबे आहेत आणि जैवविविधता तसेच त्याचे वय यामुळे या भागाला 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून ओळखले गेले आहे. पश्चिम घाट हिमालयापेक्षाही जुना आहे! वरंधा घाट  📷विकिमीडिया कॉमन्स  पश्चिम घाट हा अनेक मुख्य नद्यांचे उगमस्थान आहे. वरील छायाचित्रात दिसते आहे त्या प्रमाणे, वर्षा ऋतूत या प्रदेशात अनेक धबधबे पाहायला मिळतात.  पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) अनेक सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे शिवथरघळ धबधबा. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण रौद्र सौंदर्यानिशी आणि ताकदीनिशी रोरावत खाली येताना दिसतो.  हा धबधबा सुमारे शंभर फूट उंचीवर...