Skip to main content

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 4 - स्यालमी - बनियाकुंड

आदल्या संध्याकाळी भुरभुरत असलेल्या पावसाने हवेतला गारवा अजूनच वाढवला होता. इतक्या लहान तंबूमध्ये झोपण्याची पहिलीच वेळ होती. पण सुरुवातीचे दोन तास सोडले तर नंतरचे पाच तास चांगली झोप झाली. अगदी प्रसन्न जाग आली.काल एकदाच क्षणभर का होईना, मनात तरळून गेलेला,"आपण ट्रेक इथेच थांबवावा का?"ह्या विचाराचा आज कुठे मागमूसही उरला नव्हता. मनात होते, 

"इरादे अगर पक्के हो, तो डगमगाए कदम क्यु?

हौसले बुलंद हो तो सहमा सा हो मन क्यु?

मंज़िल अब दूर नहीं.. बस संभल के चलना,

कभी न रुकना, हार ना मानना, बस्स .. चलते रहना।"
- वृंदा टिळक
आमच्या सगळ्याच कॅम्पसाईट्स भन्नाट जागांवर होत्या. आजची स्यालमीची कॅम्प साईट देखील त्याला अपवाद नव्हती. नजर पोचेल तिथपर्यंत फक्त पर्वत रांगा आणि जंगल. मानवी वस्तीची जवळपास काहीच चाहूल नाही. 

📷Samrat Darda 

सगळ्यांचे आवरून वॉर्म अप करून आम्ही निघालो. आजचा सगळा रस्ता सुंदर असणार होता. काल इतके चढ उतार चढून उतरून आता सगळ्यांची चांगली तयारी झाली होती. शिवाय आज मी नीकॅप्स देखील घातल्या होत्या!! त्यामुळे समजा जरी आज रस्ता अवघड असला असता तरी काळजीचे काही कारण नव्हते. हरहर महादेव!!
 एका संस्मरणीय ट्रेक मध्ये असावे ते सगळे आज होते. चढ उतार होते, घनदाट जंगल होते, पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज होते, वन्य श्वापदे येऊन गेल्याच्या खुणा होत्या, ऱ्होडोडेंड्रॉन तर होतेच शिवाय इतरही रानफुले होती, झरे, धबधबे, नदी सगळे सगळे होते. आजच्या दिवसाचे निसर्गवैभव काही खासच होते. 

📷Co trekker 

📷Co trekker 

हा उतार देखील खूप तीव्र होता. पण कालच्या प्रॅक्टिस नंतर आज तो तितकासा त्रासदायक वाटला नाही. 
अधूनमधून असे पाण्याचे प्रवाह दिसत होते.
 
📷Co trekker 

📷Supan Shah 

📷Co trekker 

आज जंगलातला रस्ता, फुलझाडे आणि जवळ असलेले पाण्याचे साठे ह्यामुळे बऱ्याच पक्ष्यांची चाहूल लागत होती. मध्येच किलबिलाट ऐकू येत होता. गेल्या तीन दिवसांत दिसली होती त्यापेक्षा वेगळी फुले दिसत होती. 

📷Co trekker 

📷Co trekker 

📷Samrat Darda 

 ह्या फुलांचे नाव Himalayan Peony. हिमालयात रानटी फुल म्हणून वाढते. ह्याचे अनेक औषधी उपयोग असल्याने त्याला हिमालयन पॅरासिटामॉल पण म्हणतात. 
इतक्या दिवसांत कुठे न दिसलेले बांबू देखील दिसले. हिरवे आणि पिवळे असे दोन प्रकारचे होते. 

📷Co trekker 

📷Co trekker 

आजूबाजूच्या झाडांविषयी, फुलांविषयी, तिथे आढळणाऱ्या प्राण्यांविषयी लोकल गाईडकडून माहिती मिळत होती. अर्थात जेव्हा सर्वजण दोन मिनिटे थांबू शकतील असे ठिकाण असेल तेव्हाच बोलणे शक्य होते. 
आज जलप्रवाहांची साथ होती. अधूनमधून असे झरे दिसत होते. 

📷Co trekker 

पाणी प्यायला पाणवठ्याशी येणाऱ्या प्राण्यांना लपायला घनदाट जंगल होते. त्यामुळे आम्हाला केवळ त्यांच्या झाडांच्या बुंध्यावर दिसलेल्या खुणांवर समाधान मानायला लागले. आणि समजा खरेच वन्य प्राणी समोर आले असते तर पळता भुई थोडी झाली असती..अक्षरश: !!! कारण तिथे जागाच कुठे होती पळायला!!!
तुंगनाथ चंद्रशिला मध्ये जिचा उगम आहे ती आकाश कामिनी नदी आम्हांला दिसली. दिसायच्या आधीपासूनच ऐकू येऊ लागली होती. जंगल, फुले, पक्ष्यांचे आवाज आणि ऐकू येणारा नदीचा खळखळाट .. सगळेच कसे मन शांत करणारे. 
एका वळणावर ती सामोरी आली. अजून अगदी बालरुपात होती. अजून उन्हाळा वाढला की बर्फ वितळेल आणि मग आकाशकामिनीचे पाणीही वाढेल, रुप बदलेल. 
पाण्यात एक झाडाचा बुंधा आडवा टाकून त्याला टेकून ओळीने ठेवलेले मोठाले दगड असा तो पूल होता. पाण्याच्या वेगाने आणि आम्ही पाय दिल्याने दगड हलत होते. पूल ओलांडण्याचा थरार वाढवत होते. 

📷Supan Shah 

📷Co trekker 

📷Vrunda Tilak 

इथे आम्हाला थोडा वेळ बसता आले. नदीच्या काठावर शांतपणे बसणे म्हणजे एकदम सुख आहे! 

📷Samrat Darda 

📷Sumati Dhembre 

📷Sneha Tilak 

📷Samrat Darda 

पुढची वाट खुणावत होती. साधारण तासभर जंगलातून चालल्यावर अशी वाट आली की बाकी कसलाच आवाज येत नव्हता. आम्हीही सगळे अगदी शांतपणे चालत होतो. आवाज असेलच तर तो वाहणाऱ्या वाऱ्याचा, पानांच्या सळसळण्याचा, पायांखाली येणाऱ्या वाळलेल्या पानांचा आणि दूर कुठेतरी पाण्याचाही. 
आम्ही सगळे वेगवेगळ्या ठिकाणी झाडांजवळ बसलो होतो. केवळ झाडांची संगत अनुभवत होतो. श्वासातून येणारी जंगलातील ताजी हवा, डोळ्यांना दिसणारी जंगलातील हिरवाई, कानांना तृप्त करणारी जंगलातील शांतता अनुभवत होतो. जंगलातले वेगवेगळ्या वनस्पतींचे वास अनुभवत होतो. बसल्यावर होणारा मातीचा, पानांचा, दगडांचा स्पर्श अनुभवत होतो. शांत होतो. आसपासचे सगळे वातावरण स्वतःत मुरवून घेत होतो. मन संपूर्णपणे तिथेच होते. जागरूकपणे प्रत्येक क्षण अनुभवत होते. जपानी शिनरीन योकू - फॉरेस्ट बाथ सारखाच हा अनुभव होता. 

📷Supan Shah 

📷 Sneha Tilak 

📷 Sumati Dhembre 

तिथून निघालो तेव्हाही सगळेजण शांत होते. एक अनामिक भारावलेपण जाणवत होते. वाटेने दिसणारी वेगवेगळी रानफुले आपल्या सौंदर्याने मोहवत होती. 

📷Co trekker 

📷Co trekker 

📷Co trekker 

अनेक फुले, झरे लागलेली ती जंगलवाट अजून तासभर चालल्यावर एक मोठे पठार आले. ह्याचे नाव होते 'शामखुदी बुग्याल'. ऊन होतेच. तशी अगदी डोक्यावर सावली नव्हती. पण आजूबाजूच्या झाडांमुळे उन्हाचा तडाखा तितकासा जाणवत नव्हता. 

📷Co trekker 

तिथे जवळच गुराख्यांच्या दगडी झोपड्या होत्या. आत्ता त्या रिकाम्याच होत्या. पण उन्हाळ्यात आसपासचे गुराखी तिथे गुरे घेऊन येतात आणि राहतात असे कळले. 
तिथून निघाल्यावर पुन्हा वाटेत अनेक लहान जलप्रवाह लागले. त्यांना ओलांडून पुढे जात होतो. आता पुन्हा अनेक फुललेली ऱ्होडोडेंड्रॉनची झाडे दिसत होती. 

📷Co trekker 

📷Co trekker 

📷Co trekker 

📷Co trekker 

📷Supan Shah 

📷Co trekker 

त्यानंतर दहा पंधरा मिनिटांत आम्ही चक्क एक सडक ओलांडली. तीन दिवसांनी असा रस्ता पाहून काहीतरी वेगळेच वाटले. आता सडकेवरून चालायला कंटाळा येईल असेही मनात आले. पण सुदैवाने मिनिटभरातच पुन्हा जंगलवाट आली. आता आमचा कॅम्प जवळ आला होता. पण तिथे पोचण्याचा रस्ताही सोपा नव्हताच!!

📷Co trekker 

📷Co trekker 

📷Co trekker 

आज समिट करून आलेला ग्रुप तिथे जेवणासाठी आणि सामान घेण्यासाठी आला होता. ते सगळे पुन्हा सारीला जायला निघाले होते. आम्हां २५ जणांखेरीज इतर कोणीदेखील आम्हाला तीन दिवसानंतर दिसले होते. समिट करून आलेला ग्रुप पाहून आनंद झाला. ह्यांना जमले तसे आपल्यालाही समिट जमेलच असेही वाटू लागले. 
आज आम्ही सहा सात तास चाललो होतो. अल्टीट्युड गेन साधारण हजार फुटांचा होता. पण आज थकवा अजिबात जाणवत नव्हता. 
आधीच्या सर्व कॅम्पसाईट प्रमाणेच बनियाकुंड कॅम्पसाईट देखील फार सुंदर ठिकाणी होती. 

📷Co trekker 

📷Supan Shah 

आम्ही पोचलो तेव्हा थेम्ब थेम्ब पडणाऱ्या पावसाचा वेग वाढला होता. पाहता पाहता एका कोपऱ्यातील पर्वतशिखरे ढगांनी झाकून टाकली. 

📷Co trekker 

पावसाने पलीकडचे दृश्य झाकून टाकले. उरली ती ओलेती झाडे आणि पावसात भिजत असलेले आमचे चिमुकले टेन्ट्स. 

📷Vrunda Tilak 

 उद्याच्या दिवसाची खूपच उत्सुकता होती. उद्याचा दिवस स्वप्नपूर्तीचा होता असे मी म्हणणार नाही. कारण ट्रेकचा प्रत्येक दिवस आणि क्षण स्वप्नवतच होता. पण तरीही तुंगनाथ आणि चंद्रशिला पाहण्याची अतीव उत्सुकता आणि आतुरता होती हे देखील खरेच. 

#deoriatal #chopta #uttarakhand #chandrashila #deoria #tungnath #sarivillage #himalayas #uttarakhandheaven #mountains #instagram #trekking #travel #motivations #indiahikes #Baniyakund #Syalmi


Comments

  1. Aaj direct Day 4 cha trek vachala...khupch chhan...jas kahi mi svatahch chalatoy tasa anubhav shabdat utaravala ahet..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

महेश्वर

महेश्वर हे मध्यप्रदेश पर्यटन निगमच्या पर्यटन स्थळांमधले एक महत्वाचे नाव आहे. पण करोडो भारतीयांसाठी ते केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर एक तीर्थस्थान असते. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेले स्थान आहे.  महेश्वर किल्ला प्रवेशद्वार  राजवाडा प्रवेशद्वार  बाह्यरूप  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  राजवाडा प्रवेशद्वार  अहिल्याबाई होळकर हे केवळ भारताच्याच नव्हे तर विश्वाच्या इतिहासातील एक सोनेरी पान. संपूर्ण मानव विश्वातील यशस्वी स्त्री राज्यकर्त्यांची सूची करायची झाली तर अहिल्याबाई होळकरांचे नाव ठळकपणे लिहायला लागेल.   31 मे 2025 ला त्यांची तीनशेवी जयंती आहे. पण 300 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या अहिल्याबाईंचे आयुष्य अगदी आजच्या आधुनिक काळातल्या आव्हानातही मार्गदर्शक ठरावे असेच आहे.  त्यांच्याविषयीचा आदर मनात घेऊनच आपण महेश्वरला जातो आणि त्या भावनेच्या प्रकाशात महेश्वर पाहतो. महेश्वरला फार मोठी प्राचीन परंपरा आहे. स्कंद पुराणाच्या रेवा खंडात आणि वायू पुराणाच्या नर्मदा रहस्य मध्ये महिष्मती म्हणजे महेश्वरचे वर्णन आलेले आहे. 'गुप्...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...