Skip to main content

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 3 - देवरियाताल -स्यालमी

ट्रेकचा तिसरा दिवस. कालचा सारी- देवरियाताल प्रवास तर खूपच छान झाला होता. पायही दुखले नव्हते की थकल्यासारखे देखील वाटले नव्हते. त्यामुळे उत्साहाने आजच्या दिवसाला सुरुवात केली. आजचा दिवस तसा अवघड असेल अशी, इंडियाहाईक्सच्या  वेब साईटवरचे वर्णन वाचून कल्पना आली होती. आज अंतर नऊ किलोमीटरपेक्षा जास्त होते. पण वाटेत अनेक शिखरे दिसणार होती. घनदाट जंगलातून जाणार होतो त्यामुळे अनेक पक्षीही दिसणार होते. त्याचीही उत्सुकता होती.
सगळेजण देवरियाताल कॅम्पसाईट मधून बाहेर पडलो. अवघे एक दिवस वास्तव्य केलेले असले तरी मन थोडेतरी गुंतलेले असतेच. 
देवरियातालच्या रस्त्याच्या डाव्या बाजूने एक जंगलवाटेचा फाटा होता. त्या वाटेने आम्ही निघालो. थोडा वेळ चालल्यावर आम्हाला पुन्हा एकदा चंद्रशिला शिखर दिसणार होते. अधून मधून दिसणारे हे शिखर आपल्याला कुठे पोचायचे आहे त्याची जाणीव करून द्यायचे, त्यानेही एक नवे बळ मिळायचे. पण आज आकाश इतके ढगाळ होते की शिखर दिसलेच नाही.उजवीकडे पुन्हा एकदा सारी गाव मात्र दिसले.

📷Cotrekker
📷Sumati Dhembre

ह्या फोटोवरून कशा रस्त्याने आम्ही चालत होतो, चढ किती होता त्याची कल्पना येईल. (सर्वात उजव्या कोपऱ्यात लाल शर्ट मधील मला पाहायला विसरू नका!!) इतका चढ दिसत असला तरी हा दिवसातील सर्वात सोपा भाग होता किंवा आम्ही नुकतीच चालायला सुरुवात केली होती म्हणूनही तसे वाटत असेल. डोंगरकडयांवरून आम्ही चालत असल्याने दोन्हीकडची विस्तीर्ण भूप्रदेश दिसत होता.

📷Preeti Thakur

जंगलातील पायवाट अधूनमधून दगडांनी सुनिश्चित केलेली होती. त्यातच मध्येच झाडांची मूळे येत होती. ऱ्होडोडेंड्रॉनची अनेक झाडे फुललेली होती. आमच्या टीम खेरीज दुसरे कोणीही दिसत नव्हते.

📷Sumati Dhembre

इतकी चिंचोळी वाट होती. पण त्या दिवशी चालताना तसे विशेष जाणवले नव्हते. फक्त आम्हाला सूचना दिलेली होती की इतकी अरुंद जागा असेल तेव्हा वॉकिंग पोल टेकतांना डोंगराच्या बाजूला टेकायचा, दरीच्या नाही. कारण तिथे पानांखाली पोकळ जागा असेल तर दिसणार नाही आणि काठी घसरेल. 

📷Preeti Thakur

खरे तर कॅम्पमधून निघून पाऊणतासच झाला होता. पण इतके चढ उतार पार केल्याने बॅगसकटच दोन मिनिटे थांबलो होतो. हा एवढा चढ चढून गेलो की मग झंडी टॉप आलेच असते. तिथे असणार होता आमचा विश्रांतीचा टप्पा.
लवकरच झंडी टॉप आले. हवा स्वच्छ असती तर इथून हिमाच्छादित शिखरे दिसली असती. पण आज खूप ढग होते.

📷Sumati Dhembre



📷Samrat Darda

आम्हाला वाटेत खाण्यासाठी खाऊ म्हणून रोज एक सफरचंद आणि चणे, फुटाणे, खारका दयायचे!!संधी मिळाली की आधी सफरचंद खाण्याचे कारण म्हणजे तेवढीच बॅग हलकी होते आणि पाठीवर कमी ओझे वाहायला लागते!!आम्ही जिथे थांबलो होतो त्या ठिकाणालाच झंडी टॉप म्हणतात. नंतर कळले की त्या भागात टेकडीवरच्या सर्वात उंच ठिकाणाला झंडी टॉप किंवा झंडी धार म्हणतात. म्हणजे कदाचित असे अनेक झंडी टॉप प्रत्येक ट्रेकवर असतील!!

Jhandi Top
📷Supan Shah

झंडी टॉपहुन निघाल्यावर रस्ता अधिक सुंदर झाला. जंगल अधिक घनदाट झाले. माथ्यावर झाडे झुलत होती. त्यांच्या पानांचे रंग विलोभनीय होते. ही बहुतेक भारतीय मेपलची झाडे असावीत. रस्त्यावर माती दिसतच नव्हती. झाडावरून गळून पडलेल्या वाळलेल्या पानांच्या पायघड्या होत्या. त्यात मध्येच कुठे गवतफुले फुललेली होती. कुठे कुठे ऱ्होडोडेंड्रॉनच्या पाकळ्या दिसत होत्या.
📷Kedar Tembe
राह बन जाये
 जब मंजिल

📷Samrat Darda

कॅम्पमधून निघाल्या पासून आता जवळपास तीन तास झाले होते. सतत चढ उतार करून दगदग तर नक्कीच होत होती. पण समोर दिसणारे दृश्य असे असेल तर थकवा का जाणवेल?
📷Supan Shah

आता पुन्हा एकदा सगळीकडे ऱ्होडोडेंड्रॉन्स फुललेले दिसू लागले. त्यांचा आनंद घेणार इतक्यात पावसाला सुरुवात झाली. सगळ्यांची रेनकोट घालणे आणि बॅग कव्हर करणे ह्याची धावपळ झाली. पावसाने हात देखील गारठून गेले होते. त्यात रस्ता सतत चढ उताराचा.

📷Samrat Darda

📷Samrat Darda

असा चढाचा रस्ता पावसात पार केल्यावर आला पुन्हा उतार!! आज इतक्या तासात सपाट रस्ता फारच क्वचित मिळाला.
📷Preeti Thakur

चोहीकडे फुललेली लाल गुलाबी जांभळट फुले, त्यांच्या पाकळ्या गळून वाटेत पडलेल्या... ह्या सौंदर्यापुढे चढण उतरण ओलांडणे,पाऊस, दमणे सगळे क्षुल्लक होते! 'फूल खिलते रहेंगे दुनियामे ..रोज निकलगी बात फुलोंकी' ह्याच ओळी सतत आठवत राहिल्या.
पाऊस कमी झाला. तुलनेने थोडा सपाट भूभाग आला आणि मग आमची दुपारच्या जेवणाची जागा ठरली. आता कॅम्पमधून निघून पाच तास झाले होते. जेवणात आमच्या सोबतीला म्हणा किंवा राखणीला म्हणा दोन कुत्रे हजर होते.
📷Cotrekker

जेवणांनंतर परत चालायला सुरुवात केली. अजून बरीच मजल बाकी होती. पुन्हा उताराचा आणि चढाचा सिलसिला चालू राहिला. बऱ्याच वेळानंतर मग एक पठार आले.. सुप्रसिद्ध रोहिणी बुग्याल.

📷Cotrekker

आता हा आमचा फोटो बघताना डिस्कव्हरी चॅनल बघतो आहोत असे वाटते. इतक्या विस्तीर्ण पठारावर आम्ही चालतो आहोत ते फक्त ठिपक्यांसारखे दिसतो आहोत. निसर्गापुढे मानव किती क्षुद्र आहे ह्याची अगणित वेळा झालेली जाणीव पुन्हा एकदा नव्याने होते आहे. 

📷Gravit Jain

फार वेळ बसून चालणार नव्हतेच. अजून स्यालमी कॅम्पसाईट लांब होती. पुन्हा एक तीव्र चढ पार केला आणि मग आला अतिशय तीव्र उतार. आडवे आडवे पाऊल टाकत उतरले तरी तोल सावरताना पाय थरथरू लागले होते असा उतार. पावले ठाम होती पण त्यांच्यावरचे पाय मात्र थरथरत होते. म्हटले मी त्यांना ," असं करून कसं चालेल? पावले नेतील तिकडे जायलाच लागेल नं? मग थरथरायचे कशाला?" पण माझ्या counselling skills ची पायांनी पार ऐशी की तैशी केली आणि उतार संपेपर्यंत थरथरणे काही त्यांनी थांबवले नाही. एकच गोष्ट चांगली होती की थरथरत का होईना त्यांनी आपला वेग फारसा कमी केला नव्हता. त्यामुळे मी सर्वांच्या सोबतच राहू शकले. मागे पडले नाही. 
अर्थात उतरताना किंवा चढताना कधी हात द्यायला लागलाच तर केदार होता, ट्रेक लीडर साहिल होता, आमचे ट्रेक गाईड्स अमितजी आणि प्रमोदजी होते. 
 एक महत्वाचा धडा त्या दिवशी मिळाला की इतके तीव्र चढ उतार असतील त्या वेळी नी कॅप्स घालायला हव्या. मग दुसऱ्या दिवशीपासून नीकॅप्स घालायला सुरुवात केली आणि चढणे उतरणे खूपच सोपे झाले.
तसेच तुम्ही फोटोमध्ये आमच्या हातात वॉकिंग पोल्स पाहत असाल. त्याचा पण खूप फायदा होतो. स्यालमी कॅम्पसाईट वरून दिसू लागली आणि उरलेला उतार पटापट संपला.. किंवा निदान तसे वाटले तरी!!!

📷Sumati Dhembre 

📷Supan Shah 

आज आम्ही साधारण सात साडेसात तास चाललो होतो. खरे तर अंतर तसे ९. १ किलोमीटरच होते. पण सतत चढ आणि उतार आणि त्यात जंगलातल्या डोंगरवाटा त्यामुळे इतका वेळ लागला. अनेकदा उंचावर जात आणि नंतर उतरत अखेर आम्ही कालच्या कॅम्पपेक्षा दोनशे फूट खालीच आलो होतो.

📷Supan Shah 


त्या दिवसाविषयी आठवताना मी विचार करते की त्या दिवसाने मला काय दिले? 
संपूर्ण रस्ता कष्टप्रद होता हे तर खरेच. एरवी जे डोंगराचे चढ आणि उतार चित्रात, फोटोत किंवा लांबून बघताना मोहक वाटतात ते प्रत्यक्ष चालताना आपली फजिती करतात हे अनुभवले. 
शिखरे दिसणार होती ती ढगाळ हवामानामुळे दिसली नाहीत. पक्षी दिसणार होते तेही पावसामुळे विशेष दिसले नाहीत. एक सुतार पक्षी दिसला तेवढाच. इतर ऋतुत ह्याच ट्रेकला आले असते तर कदाचित ते सगळे दिसले असते. पण आत्ता मला फुले दिसली त्याचे काय? ती कशी इतर वेळी दिसली असती? तेव्हा जे मिळाले नाही त्या विषयी खंत करत न बसता, जे मिळाले आहे त्याचे मोल जाणण्याचा धडा पुन्हा एकवार मिळाला. 
'चरैवेती चरैवेती येही तो मंत्र है अपना' हे वारंवार स्वतःला सांगता आले. 
एका दिवसांत खूप काही शिकता आले. आमच्या टीममध्ये मी सर्वात मोठी. त्यामुळे दोन दिवस माझा उत्साह, निश्चय आणि फिटनेस चे भरपूर कौतुक झाले होते. पण थरथरलेल्या पायांनी मला माझी खरी जागा दाखवली!! आणि त्या कौतुकाला खरेच पात्र व्हायचे असेल तर भरपूर व्यायाम सातत्याने करायला हवा हे ही शिकवले. 
इतकेच काय कॅम्पवर आल्यावर मी स्नेहाला म्हटले सुद्धा ," मी इथेच थांबवू की काय ट्रेक?" अर्थात पुढे जायचे थांबवले असते तरी त्या कॅम्पवर कोणतेही वाहन येणे शक्यच नव्हते. आम्ही अगदीच दुर्गम ठिकाणी होतो. त्यामुळे तिथून कुठेतरी भरपूर चालत जाऊन मगच परत बेसकॅम्पवर जाता आले असते. पण स्नेहा म्हणाली,
"उद्याचा दिवस चाल .. मग बघू या!!!" 
उद्याचा दिवस खूप छान असणार होता. संपूर्ण वाट घनदाट जंगलातूनच जाणार होती. शिवाय एक नदी लागणार होती. 

 #deoriatal #chopta #uttarakhand #chandrashila #deoria #tungnath #sarivillage #himalayas #uttarakhandheaven #mountains #instagram #trekking  #travel  #motivations #indiahikes #Baniyakund #Syalmi


Comments

Popular posts from this blog

महेश्वर

महेश्वर हे मध्यप्रदेश पर्यटन निगमच्या पर्यटन स्थळांमधले एक महत्वाचे नाव आहे. पण करोडो भारतीयांसाठी ते केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर एक तीर्थस्थान असते. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेले स्थान आहे.  महेश्वर किल्ला प्रवेशद्वार  राजवाडा प्रवेशद्वार  बाह्यरूप  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  राजवाडा प्रवेशद्वार  अहिल्याबाई होळकर हे केवळ भारताच्याच नव्हे तर विश्वाच्या इतिहासातील एक सोनेरी पान. संपूर्ण मानव विश्वातील यशस्वी स्त्री राज्यकर्त्यांची सूची करायची झाली तर अहिल्याबाई होळकरांचे नाव ठळकपणे लिहायला लागेल.   31 मे 2025 ला त्यांची तीनशेवी जयंती आहे. पण 300 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या अहिल्याबाईंचे आयुष्य अगदी आजच्या आधुनिक काळातल्या आव्हानातही मार्गदर्शक ठरावे असेच आहे.  त्यांच्याविषयीचा आदर मनात घेऊनच आपण महेश्वरला जातो आणि त्या भावनेच्या प्रकाशात महेश्वर पाहतो. महेश्वरला फार मोठी प्राचीन परंपरा आहे. स्कंद पुराणाच्या रेवा खंडात आणि वायू पुराणाच्या नर्मदा रहस्य मध्ये महिष्मती म्हणजे महेश्वरचे वर्णन आलेले आहे. 'गुप्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

Prashanti Kutiram, Bangalore

I am happy to write my first post of 2022!! I am here with a really very special post! This is not a tourist place and still it holds a special place in each and every visitor’s mind. This is Prashanti Kutiram of Bangalore. Prashanti kutiram as the name suggests, surely makes your mind peaceful. It's around 70-80 kms from Bangalore airport but with the famous traffic jams of Bangalore, it may take two and half hours by taxi.  This is the place where The Swami Vivekananda Yoga Anusandhan Sansthan is situated on a sprawling 100 acres. Swami Vivekanand  Swami Vivekanand  Ramakrishna Paramahans and Sharada Mataji  SVyasa Founded in 1986, Svyasa follows Swami Vivekanand's teachings and combines best of east and West. So it combines Yoga and spirituality with modern sciences.  The first thing you will notice about Vyasa is the greenery. The campus is having umpteen trees. It's hilly area. The steep paths and slopes offer you the much needed exercise!! The Green Umbre...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...