Skip to main content

महेश्वर

महेश्वर हे मध्यप्रदेश पर्यटन निगमच्या पर्यटन स्थळांमधले एक महत्वाचे नाव आहे. पण करोडो भारतीयांसाठी ते केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर एक तीर्थस्थान असते. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेले स्थान आहे. 

महेश्वर किल्ला प्रवेशद्वार 
राजवाडा प्रवेशद्वार 
बाह्यरूप 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 
राजवाडा प्रवेशद्वार 

अहिल्याबाई होळकर हे केवळ भारताच्याच नव्हे तर विश्वाच्या इतिहासातील एक सोनेरी पान. संपूर्ण मानव विश्वातील यशस्वी स्त्री राज्यकर्त्यांची सूची करायची झाली तर अहिल्याबाई होळकरांचे नाव ठळकपणे लिहायला लागेल.

 31 मे 2025 ला त्यांची तीनशेवी जयंती आहे. पण 300 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या अहिल्याबाईंचे आयुष्य अगदी आजच्या आधुनिक काळातल्या आव्हानातही मार्गदर्शक ठरावे असेच आहे. त्यांच्याविषयीचा आदर मनात घेऊनच आपण महेश्वरला जातो आणि त्या भावनेच्या प्रकाशात महेश्वर पाहतो.

महेश्वरला फार मोठी प्राचीन परंपरा आहे. स्कंद पुराणाच्या रेवा खंडात आणि वायू पुराणाच्या नर्मदा रहस्य मध्ये महिष्मती म्हणजे महेश्वरचे वर्णन आलेले आहे. 'गुप्तकाशी' या नावाने देखील ते प्रसिद्ध होते. मांधाता हा महेश्वरचा सार्वभौम राजा होता.

हैहयया वंशाने महिष्मतीवर २८ पिढ्या राज्य केले. या वंशातील प्रसिद्ध राजा म्हणजे कृतवीर्याचा वंशज अर्जुन. त्यालाच 'कार्तवीर्य, सहस्त्रार्जुन, सहस्त्रबाहू' या नावाने ओळखले जाते.


त्यानंतर सहाव्या शतकात महिष्मतीचे नाव 'चेदी देश' होते. आठव्या शतकात अवंती नगरीच्या दक्षिणेचा भाग 'दक्षिण पथ' म्हणून प्रसिद्ध होता. या शासकांची राजधानी महिष्मती होती.


मंडन मिश्रा आणि आद्य शंकराचार्य यांच्यातला शास्त्रार्थ प्रसिद्ध आहे. तो याच नगरीत झाला होता असे म्हणतात. याचा विशेष म्हणजे या शास्त्रार्थाची परीक्षक होती मंडन मिश्राची पत्नी भारती! त्या काळातील सुशिक्षित, निःपक्षपाती व ज्ञान समृद्ध स्त्रियांचे जणू प्रतीक.


चिनी प्रवासी ह्यू एन सांग ने आपल्या ग्रंथात महिष्मतीचे नाव 'महेश फलो पुलो' असे लिहिले आहे. हे वाचून 'दुधो नहाओ पुतो फलो' हा आशीर्वाद दिला जातो त्याचीच आठवण येते!


मध्य इतिहासाच्या काळात महेश्वर मोगलांकडे होते. त्यावेळी महेश्वरचा किल्ला मातीचा होता. पुढे महेश्वर मराठ्यांच्या अखत्यारीत आले.


१७३४ मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांनी गौतमाबाईंना जी सनद दिली त्यात महेश्वरचा समावेश होता. त्यानंतर मल्हाररावांनी महेश्वरच्या किल्ल्याचे पुन्हा बांधकाम करून तो मजबूत बनवला.


१७६७ मध्ये अहिल्यादेवींनी महेश्वरला राजधानीचा दर्जा दिला. त्या तिथे राहायला आल्या आणि महेश्वरचे भाग्य उजळले. त्यांनी महेश्वरचा किल्ला काळ्या दगडाने बांधून आणखी मजबूत केला. 


त्यांनी केलेल्या बांधकामाचे उल्लेख आहेत, त्यात लिहिले आहे की प्रथम सरकार वाडा बांधवला. नंतर नर्मदा घाट आणि श्री काशी विश्वेश्वराचे मोठे मंदिर बांधले. किल्ल्यावर राम मंदिर, कृष्ण मंदिर, रेवाकाठी विठोबाचे देऊळ बांधले. एकीकडे किल्ल्याखाली गाव वसवले.


सुभेदार मल्हार होळकरांनी सहस्र बाहू कार्तवीर्य अर्जुनाच्या पुरातन राजेराजेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार आधीच केला होता. तसेच केशव राजाचे मंदिर गौतमाबाईनी बांधवून घेतले होते.


राजवाड्याच्या भव्य आवारात अगदी साधी अशी अहिल्यादेवींची सदर आहे. घोंगडी आणि त्यावर टाकलेली पांढरी चादर. इतका दीर्घकाळ प्रभावी सुशासन करुनही त्यांचे वैयक्तिक जीवन अतिशय साधे आणि वैराग्यपूर्ण होते ह्याचा दाखलाच ती सदर देते. राजा जनकाप्रमाणेच विश्वस्त भावनेने राज्य करता येते ह्याची साक्ष ती सदर देते.

अहिल्यादेवी प्रतिमा 
📷नेहा खरे 

सदर आणि वाड्याचे अंतरंग 
वैशिष्ट्यपूर्ण बेल 
शिव आराधक अहिल्यादेवींच्या सदरेजवळ बेलाचे झाड असणे अगदीच स्वाभाविक वाटते. हा बेल फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याच्या पानाचा जवळून घेतलेला फोटो पाहून आपल्यालाही कल्पना येईल.

हे झाड अहिल्यादेवी असताना होते की नंतरचे आहे ह्याचा मात्र उलगडा झाला नाही. बेलाचे झाड काही शतके जगू शकते. पण महेश्वरला सांगितले जाते तसे हे झाड तीनशे वर्षे जुने असेल की नाही माहिती नाही.

नर्मदेचे दर्शन अहिल्यादेवींनी अतिशय प्रिय होते. महेश्वरचा किल्ला नर्मदेच्या तीरावरच बांधलेला आहे. राजवाड्यातून ठिकठिकाणी नर्मदा दर्शन होईल अशी व्यवस्था केलेली आहे.


चौकातून होणारे नर्मदा दर्शन 
नर्मदामैय्या 
शिलालेख 
प्रातिनिधिक खोली 
माहिती 
तिथून आपण जातो ते अहिल्यादेवींचे देवघर पाहण्यासाठी. सुंदर, प्रसन्न, जिथे नित्यपूजा होते आहे असे देवघर बघताना अतिशय समाधान वाटते. अहिल्यादेवींच्या हातात बघतो ते तसेच त्यांच्या नित्यपूजेतील इतर शिवलिंगे बघता येतात. तिथे फोटो काढायला अनुमती नाही.

वाड्याचा अंतर्भाग 
वाड्याचा अंतर्भाग 
वाड्याचा अंतर्भाग 
अहिल्यादेवींनी सुरु केलेली लिंगार्चन पूजा अजूनही सुरु आहे. आम्हाला पूजा तर पाहायला मिळाली नाही. पण त्या पूजेचा पाट मात्र पाहता आला.

लिंगार्चनाचा पाट 
लिंगार्चन माहिती 
राजवाड्याचा बराचसा भाग आता अहिल्या फोर्ट हॉटेलमध्ये रूपांतरित झाला आहे. त्यामुळे तो बघता येत नाही. 

अंतर्भाग 
अंतर्भाग 
तिथून बाहेर पडल्यावर आपण जातो ते अनेक मंदिरे आणि नर्मदेचा घाट बघण्यासाठी. महेश्वर किल्ल्यात अनेक सुंदर आणि ऐतिहासिक मंदिरे आहेत. 

मंदिरांकडे जाताना 
मंदिरांकडे जाताना 
अतिशय प्राचीन असे राजराजेश्वर मंदिर म्हणजे कार्तवीर्य सहस्रार्जुनाच्या काळापासून असलेले मंदिर. तेथील नंदादीप अखंड ठेवतो आहे. ११ दिव्यांच्या रूपात असलेला हा अखंडदीप अक्षय ठेवण्यासाठी तेथील पुजाऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या जागरूकतेने काम करत आहेत. 

ह्या मंदिराची विशेषता म्हणजे वैष्णव राजाचे हे शिवमंदिर आहे. भक्तिधारांचा एक अनोखा संगम इथे झालेला आपल्याला आढळतो. 

राजराजेश्वर मंदिर 
राजराजेश्वर मंदिर 
त्याच आवारात सहस्रार्जुनाची मूर्ती असलेले देखील एक मंदिर आहे. 

सहस्त्रार्जुन मंदिर 
सहस्त्रार्जुन मंदिर 
त्याच आवारात श्री रामदत्त मंदिर आहे. सूर्यनारायणाचे देखील मंदिर आहे. 

श्री रामदत्त मंदिर 
श्री रामदत्त मंदिर 
सूर्यनारायण मंदिर 
सूर्यनारायण मंदिर 
सात्विक आणि स्वच्छ, नित्यपुजेने नांदती मंदिरे असणारा हा परिसर आहे. 

मंदिर परिसर 
पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे आराध्य दैवत असलेल्या काशी विश्वनाथाचे मंदिर त्यांनी महेश्वरला आल्याआल्याच निर्माण करवले होते. अगदी नर्मदेच्या तीरावर असलेले हे साधे मंदिर खूप शांतता देऊन जाते. 

काशी विश्वनाथ मंदिर 

काशी विश्वनाथ मंदिर 
काशी विश्वनाथ मंदिर 
मंदिरातून दिसणारे दृश्य 
काशी विश्वनाथाच्या मंदिरातून दिसणारे नर्मदेचे भव्य पात्र, डौलात फडकणारा भगवा आणि काठीवर निवांत बसून ह्या सगळ्याकडे पाहणारा पक्षी हे सगळे पाहताना मन भारावून गेले होते. 

ह्या मंदिरात अहिल्यादेवी शेकडो वेळा आल्या असतील. सर्व प्रापंचिक दुःखाचे हलाहल प्राशन करण्याचे आणि तरी दीर्घकाळ धवल, उन्नत सुशासन करण्याचे सामर्थ्य त्यांना त्यांच्या ईश्वरावरील अढळ श्रद्धेतून मिळाले असावे. 

अहिल्यादेवींच्या स्मरणार्थ नंतर बांधले गेलेले अहिल्येश्वराचे मंदिर आणि एकूणच परिसरात सुंदर दगडी बांधकाम आणि कोरीव काम आहे. 

परिसर 
परिसर 
अहिल्येश्वर मंदिर 
अहिल्यादेवींचे वाक्य 
अहिल्येश्वर मंदिर परिसर 
अतिशय नयनरम्य असा घाट आणि नदीचे दृश्य पाहायला मिळते. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण ह्या घाटावर झालेले आहे. 

पण सर्वात महत्वाचे वाटते ते हे की कधीकाळी अहिल्यादेवी इथे बसल्या असतील. राजकारणाच्या कटकटीतून त्यांच्या मनाला दोन घटका विश्रांती मिळाली असेल. वैयक्तिक आयुष्यातील दुःखांनी पोळलेले मन शांतले असेल. 

महेश्वर घाट 
महेश्वर घाट 
महेश्वर घाट
महेश्वर घाट 







Comments

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...