मुख्य सामग्रीवर वगळा

महेश्वर

महेश्वर हे मध्यप्रदेश पर्यटन निगमच्या पर्यटन स्थळांमधले एक महत्वाचे नाव आहे. पण करोडो भारतीयांसाठी ते केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर एक तीर्थस्थान असते. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेले स्थान आहे. 

महेश्वर किल्ला प्रवेशद्वार 
राजवाडा प्रवेशद्वार 
बाह्यरूप 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 
राजवाडा प्रवेशद्वार 

अहिल्याबाई होळकर हे केवळ भारताच्याच नव्हे तर विश्वाच्या इतिहासातील एक सोनेरी पान. संपूर्ण मानव विश्वातील यशस्वी स्त्री राज्यकर्त्यांची सूची करायची झाली तर अहिल्याबाई होळकरांचे नाव ठळकपणे लिहायला लागेल.

 31 मे 2025 ला त्यांची तीनशेवी जयंती आहे. पण 300 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या अहिल्याबाईंचे आयुष्य अगदी आजच्या आधुनिक काळातल्या आव्हानातही मार्गदर्शक ठरावे असेच आहे. त्यांच्याविषयीचा आदर मनात घेऊनच आपण महेश्वरला जातो आणि त्या भावनेच्या प्रकाशात महेश्वर पाहतो.

महेश्वरला फार मोठी प्राचीन परंपरा आहे. स्कंद पुराणाच्या रेवा खंडात आणि वायू पुराणाच्या नर्मदा रहस्य मध्ये महिष्मती म्हणजे महेश्वरचे वर्णन आलेले आहे. 'गुप्तकाशी' या नावाने देखील ते प्रसिद्ध होते. मांधाता हा महेश्वरचा सार्वभौम राजा होता.

हैहयया वंशाने महिष्मतीवर २८ पिढ्या राज्य केले. या वंशातील प्रसिद्ध राजा म्हणजे कृतवीर्याचा वंशज अर्जुन. त्यालाच 'कार्तवीर्य, सहस्त्रार्जुन, सहस्त्रबाहू' या नावाने ओळखले जाते.


त्यानंतर सहाव्या शतकात महिष्मतीचे नाव 'चेदी देश' होते. आठव्या शतकात अवंती नगरीच्या दक्षिणेचा भाग 'दक्षिण पथ' म्हणून प्रसिद्ध होता. या शासकांची राजधानी महिष्मती होती.


मंडन मिश्रा आणि आद्य शंकराचार्य यांच्यातला शास्त्रार्थ प्रसिद्ध आहे. तो याच नगरीत झाला होता असे म्हणतात. याचा विशेष म्हणजे या शास्त्रार्थाची परीक्षक होती मंडन मिश्राची पत्नी भारती! त्या काळातील सुशिक्षित, निःपक्षपाती व ज्ञान समृद्ध स्त्रियांचे जणू प्रतीक.


चिनी प्रवासी ह्यू एन सांग ने आपल्या ग्रंथात महिष्मतीचे नाव 'महेश फलो पुलो' असे लिहिले आहे. हे वाचून 'दुधो नहाओ पुतो फलो' हा आशीर्वाद दिला जातो त्याचीच आठवण येते!


मध्य इतिहासाच्या काळात महेश्वर मोगलांकडे होते. त्यावेळी महेश्वरचा किल्ला मातीचा होता. पुढे महेश्वर मराठ्यांच्या अखत्यारीत आले.


१७३४ मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांनी गौतमाबाईंना जी सनद दिली त्यात महेश्वरचा समावेश होता. त्यानंतर मल्हाररावांनी महेश्वरच्या किल्ल्याचे पुन्हा बांधकाम करून तो मजबूत बनवला.


१७६७ मध्ये अहिल्यादेवींनी महेश्वरला राजधानीचा दर्जा दिला. त्या तिथे राहायला आल्या आणि महेश्वरचे भाग्य उजळले. त्यांनी महेश्वरचा किल्ला काळ्या दगडाने बांधून आणखी मजबूत केला. 


त्यांनी केलेल्या बांधकामाचे उल्लेख आहेत, त्यात लिहिले आहे की प्रथम सरकार वाडा बांधवला. नंतर नर्मदा घाट आणि श्री काशी विश्वेश्वराचे मोठे मंदिर बांधले. किल्ल्यावर राम मंदिर, कृष्ण मंदिर, रेवाकाठी विठोबाचे देऊळ बांधले. एकीकडे किल्ल्याखाली गाव वसवले.


सुभेदार मल्हार होळकरांनी सहस्र बाहू कार्तवीर्य अर्जुनाच्या पुरातन राजेराजेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार आधीच केला होता. तसेच केशव राजाचे मंदिर गौतमाबाईनी बांधवून घेतले होते.


राजवाड्याच्या भव्य आवारात अगदी साधी अशी अहिल्यादेवींची सदर आहे. घोंगडी आणि त्यावर टाकलेली पांढरी चादर. इतका दीर्घकाळ प्रभावी सुशासन करुनही त्यांचे वैयक्तिक जीवन अतिशय साधे आणि वैराग्यपूर्ण होते ह्याचा दाखलाच ती सदर देते. राजा जनकाप्रमाणेच विश्वस्त भावनेने राज्य करता येते ह्याची साक्ष ती सदर देते.

अहिल्यादेवी प्रतिमा 
📷नेहा खरे 

सदर आणि वाड्याचे अंतरंग 
वैशिष्ट्यपूर्ण बेल 
शिव आराधक अहिल्यादेवींच्या सदरेजवळ बेलाचे झाड असणे अगदीच स्वाभाविक वाटते. हा बेल फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याच्या पानाचा जवळून घेतलेला फोटो पाहून आपल्यालाही कल्पना येईल.

हे झाड अहिल्यादेवी असताना होते की नंतरचे आहे ह्याचा मात्र उलगडा झाला नाही. बेलाचे झाड काही शतके जगू शकते. पण महेश्वरला सांगितले जाते तसे हे झाड तीनशे वर्षे जुने असेल की नाही माहिती नाही.

नर्मदेचे दर्शन अहिल्यादेवींनी अतिशय प्रिय होते. महेश्वरचा किल्ला नर्मदेच्या तीरावरच बांधलेला आहे. राजवाड्यातून ठिकठिकाणी नर्मदा दर्शन होईल अशी व्यवस्था केलेली आहे.


चौकातून होणारे नर्मदा दर्शन 
नर्मदामैय्या 
शिलालेख 
प्रातिनिधिक खोली 
माहिती 
तिथून आपण जातो ते अहिल्यादेवींचे देवघर पाहण्यासाठी. सुंदर, प्रसन्न, जिथे नित्यपूजा होते आहे असे देवघर बघताना अतिशय समाधान वाटते. अहिल्यादेवींच्या हातात बघतो ते तसेच त्यांच्या नित्यपूजेतील इतर शिवलिंगे बघता येतात. तिथे फोटो काढायला अनुमती नाही.

वाड्याचा अंतर्भाग 
वाड्याचा अंतर्भाग 
वाड्याचा अंतर्भाग 
अहिल्यादेवींनी सुरु केलेली लिंगार्चन पूजा अजूनही सुरु आहे. आम्हाला पूजा तर पाहायला मिळाली नाही. पण त्या पूजेचा पाट मात्र पाहता आला.

लिंगार्चनाचा पाट 
लिंगार्चन माहिती 
राजवाड्याचा बराचसा भाग आता अहिल्या फोर्ट हॉटेलमध्ये रूपांतरित झाला आहे. त्यामुळे तो बघता येत नाही. 

अंतर्भाग 
अंतर्भाग 
तिथून बाहेर पडल्यावर आपण जातो ते अनेक मंदिरे आणि नर्मदेचा घाट बघण्यासाठी. महेश्वर किल्ल्यात अनेक सुंदर आणि ऐतिहासिक मंदिरे आहेत. 

मंदिरांकडे जाताना 
मंदिरांकडे जाताना 
अतिशय प्राचीन असे राजराजेश्वर मंदिर म्हणजे कार्तवीर्य सहस्रार्जुनाच्या काळापासून असलेले मंदिर. तेथील नंदादीप अखंड ठेवतो आहे. ११ दिव्यांच्या रूपात असलेला हा अखंडदीप अक्षय ठेवण्यासाठी तेथील पुजाऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या जागरूकतेने काम करत आहेत. 

ह्या मंदिराची विशेषता म्हणजे वैष्णव राजाचे हे शिवमंदिर आहे. भक्तिधारांचा एक अनोखा संगम इथे झालेला आपल्याला आढळतो. 

राजराजेश्वर मंदिर 
राजराजेश्वर मंदिर 
त्याच आवारात सहस्रार्जुनाची मूर्ती असलेले देखील एक मंदिर आहे. 

सहस्त्रार्जुन मंदिर 
सहस्त्रार्जुन मंदिर 
त्याच आवारात श्री रामदत्त मंदिर आहे. सूर्यनारायणाचे देखील मंदिर आहे. 

श्री रामदत्त मंदिर 
श्री रामदत्त मंदिर 
सूर्यनारायण मंदिर 
सूर्यनारायण मंदिर 
सात्विक आणि स्वच्छ, नित्यपुजेने नांदती मंदिरे असणारा हा परिसर आहे. 

मंदिर परिसर 
पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे आराध्य दैवत असलेल्या काशी विश्वनाथाचे मंदिर त्यांनी महेश्वरला आल्याआल्याच निर्माण करवले होते. अगदी नर्मदेच्या तीरावर असलेले हे साधे मंदिर खूप शांतता देऊन जाते. 

काशी विश्वनाथ मंदिर 

काशी विश्वनाथ मंदिर 
काशी विश्वनाथ मंदिर 
मंदिरातून दिसणारे दृश्य 
काशी विश्वनाथाच्या मंदिरातून दिसणारे नर्मदेचे भव्य पात्र, डौलात फडकणारा भगवा आणि काठीवर निवांत बसून ह्या सगळ्याकडे पाहणारा पक्षी हे सगळे पाहताना मन भारावून गेले होते. 

ह्या मंदिरात अहिल्यादेवी शेकडो वेळा आल्या असतील. सर्व प्रापंचिक दुःखाचे हलाहल प्राशन करण्याचे आणि तरी दीर्घकाळ धवल, उन्नत सुशासन करण्याचे सामर्थ्य त्यांना त्यांच्या ईश्वरावरील अढळ श्रद्धेतून मिळाले असावे. 

अहिल्यादेवींच्या स्मरणार्थ नंतर बांधले गेलेले अहिल्येश्वराचे मंदिर आणि एकूणच परिसरात सुंदर दगडी बांधकाम आणि कोरीव काम आहे. 

परिसर 
परिसर 
अहिल्येश्वर मंदिर 
अहिल्यादेवींचे वाक्य 
अहिल्येश्वर मंदिर परिसर 
अतिशय नयनरम्य असा घाट आणि नदीचे दृश्य पाहायला मिळते. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण ह्या घाटावर झालेले आहे. 

पण सर्वात महत्वाचे वाटते ते हे की कधीकाळी अहिल्यादेवी इथे बसल्या असतील. राजकारणाच्या कटकटीतून त्यांच्या मनाला दोन घटका विश्रांती मिळाली असेल. वैयक्तिक आयुष्यातील दुःखांनी पोळलेले मन शांतले असेल. 

महेश्वर घाट 
महेश्वर घाट 
महेश्वर घाट
महेश्वर घाट 


#Maheshwar #Indore #Holkar #Ahilyadevi #Madhyapradesh #MP tourism 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

कोस्टल कर्नाटक- २ मंगळुरू, मुलकी, उचिल, उडुपी

  आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते.  नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते.  मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात.  काद्री मंजुनाथ मंदिर  का...