मुख्य सामग्रीवर वगळा

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 4 - स्यालमी - बनियाकुंड

आदल्या संध्याकाळी भुरभुरत असलेल्या पावसाने हवेतला गारवा अजूनच वाढवला होता. इतक्या लहान तंबूमध्ये झोपण्याची पहिलीच वेळ होती. पण सुरुवातीचे दोन तास सोडले तर नंतरचे पाच तास चांगली झोप झाली. अगदी प्रसन्न जाग आली.काल एकदाच क्षणभर का होईना, मनात तरळून गेलेला,"आपण ट्रेक इथेच थांबवावा का?"ह्या विचाराचा आज कुठे मागमूसही उरला नव्हता. मनात होते, 

"इरादे अगर पक्के हो, तो डगमगाए कदम क्यु?

हौसले बुलंद हो तो सहमा सा हो मन क्यु?

मंज़िल अब दूर नहीं.. बस संभल के चलना,

कभी न रुकना, हार ना मानना, बस्स .. चलते रहना।"
- वृंदा टिळक
आमच्या सगळ्याच कॅम्पसाईट्स भन्नाट जागांवर होत्या. आजची स्यालमीची कॅम्प साईट देखील त्याला अपवाद नव्हती. नजर पोचेल तिथपर्यंत फक्त पर्वत रांगा आणि जंगल. मानवी वस्तीची जवळपास काहीच चाहूल नाही. 

📷Samrat Darda 

सगळ्यांचे आवरून वॉर्म अप करून आम्ही निघालो. आजचा सगळा रस्ता सुंदर असणार होता. काल इतके चढ उतार चढून उतरून आता सगळ्यांची चांगली तयारी झाली होती. शिवाय आज मी नीकॅप्स देखील घातल्या होत्या!! त्यामुळे समजा जरी आज रस्ता अवघड असला असता तरी काळजीचे काही कारण नव्हते. हरहर महादेव!!
 एका संस्मरणीय ट्रेक मध्ये असावे ते सगळे आज होते. चढ उतार होते, घनदाट जंगल होते, पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज होते, वन्य श्वापदे येऊन गेल्याच्या खुणा होत्या, ऱ्होडोडेंड्रॉन तर होतेच शिवाय इतरही रानफुले होती, झरे, धबधबे, नदी सगळे सगळे होते. आजच्या दिवसाचे निसर्गवैभव काही खासच होते. 

📷Co trekker 

📷Co trekker 

हा उतार देखील खूप तीव्र होता. पण कालच्या प्रॅक्टिस नंतर आज तो तितकासा त्रासदायक वाटला नाही. 
अधूनमधून असे पाण्याचे प्रवाह दिसत होते.
 
📷Co trekker 

📷Supan Shah 

📷Co trekker 

आज जंगलातला रस्ता, फुलझाडे आणि जवळ असलेले पाण्याचे साठे ह्यामुळे बऱ्याच पक्ष्यांची चाहूल लागत होती. मध्येच किलबिलाट ऐकू येत होता. गेल्या तीन दिवसांत दिसली होती त्यापेक्षा वेगळी फुले दिसत होती. 

📷Co trekker 

📷Co trekker 

📷Samrat Darda 

 ह्या फुलांचे नाव Himalayan Peony. हिमालयात रानटी फुल म्हणून वाढते. ह्याचे अनेक औषधी उपयोग असल्याने त्याला हिमालयन पॅरासिटामॉल पण म्हणतात. 
इतक्या दिवसांत कुठे न दिसलेले बांबू देखील दिसले. हिरवे आणि पिवळे असे दोन प्रकारचे होते. 

📷Co trekker 

📷Co trekker 

आजूबाजूच्या झाडांविषयी, फुलांविषयी, तिथे आढळणाऱ्या प्राण्यांविषयी लोकल गाईडकडून माहिती मिळत होती. अर्थात जेव्हा सर्वजण दोन मिनिटे थांबू शकतील असे ठिकाण असेल तेव्हाच बोलणे शक्य होते. 
आज जलप्रवाहांची साथ होती. अधूनमधून असे झरे दिसत होते. 

📷Co trekker 

पाणी प्यायला पाणवठ्याशी येणाऱ्या प्राण्यांना लपायला घनदाट जंगल होते. त्यामुळे आम्हाला केवळ त्यांच्या झाडांच्या बुंध्यावर दिसलेल्या खुणांवर समाधान मानायला लागले. आणि समजा खरेच वन्य प्राणी समोर आले असते तर पळता भुई थोडी झाली असती..अक्षरश: !!! कारण तिथे जागाच कुठे होती पळायला!!!
तुंगनाथ चंद्रशिला मध्ये जिचा उगम आहे ती आकाश कामिनी नदी आम्हांला दिसली. दिसायच्या आधीपासूनच ऐकू येऊ लागली होती. जंगल, फुले, पक्ष्यांचे आवाज आणि ऐकू येणारा नदीचा खळखळाट .. सगळेच कसे मन शांत करणारे. 
एका वळणावर ती सामोरी आली. अजून अगदी बालरुपात होती. अजून उन्हाळा वाढला की बर्फ वितळेल आणि मग आकाशकामिनीचे पाणीही वाढेल, रुप बदलेल. 
पाण्यात एक झाडाचा बुंधा आडवा टाकून त्याला टेकून ओळीने ठेवलेले मोठाले दगड असा तो पूल होता. पाण्याच्या वेगाने आणि आम्ही पाय दिल्याने दगड हलत होते. पूल ओलांडण्याचा थरार वाढवत होते. 

📷Supan Shah 

📷Co trekker 

📷Vrunda Tilak 

इथे आम्हाला थोडा वेळ बसता आले. नदीच्या काठावर शांतपणे बसणे म्हणजे एकदम सुख आहे! 

📷Samrat Darda 

📷Sumati Dhembre 

📷Sneha Tilak 

📷Samrat Darda 

पुढची वाट खुणावत होती. साधारण तासभर जंगलातून चालल्यावर अशी वाट आली की बाकी कसलाच आवाज येत नव्हता. आम्हीही सगळे अगदी शांतपणे चालत होतो. आवाज असेलच तर तो वाहणाऱ्या वाऱ्याचा, पानांच्या सळसळण्याचा, पायांखाली येणाऱ्या वाळलेल्या पानांचा आणि दूर कुठेतरी पाण्याचाही. 
आम्ही सगळे वेगवेगळ्या ठिकाणी झाडांजवळ बसलो होतो. केवळ झाडांची संगत अनुभवत होतो. श्वासातून येणारी जंगलातील ताजी हवा, डोळ्यांना दिसणारी जंगलातील हिरवाई, कानांना तृप्त करणारी जंगलातील शांतता अनुभवत होतो. जंगलातले वेगवेगळ्या वनस्पतींचे वास अनुभवत होतो. बसल्यावर होणारा मातीचा, पानांचा, दगडांचा स्पर्श अनुभवत होतो. शांत होतो. आसपासचे सगळे वातावरण स्वतःत मुरवून घेत होतो. मन संपूर्णपणे तिथेच होते. जागरूकपणे प्रत्येक क्षण अनुभवत होते. जपानी शिनरीन योकू - फॉरेस्ट बाथ सारखाच हा अनुभव होता. 

📷Supan Shah 

📷 Sneha Tilak 

📷 Sumati Dhembre 

तिथून निघालो तेव्हाही सगळेजण शांत होते. एक अनामिक भारावलेपण जाणवत होते. वाटेने दिसणारी वेगवेगळी रानफुले आपल्या सौंदर्याने मोहवत होती. 

📷Co trekker 

📷Co trekker 

📷Co trekker 

अनेक फुले, झरे लागलेली ती जंगलवाट अजून तासभर चालल्यावर एक मोठे पठार आले. ह्याचे नाव होते 'शामखुदी बुग्याल'. ऊन होतेच. तशी अगदी डोक्यावर सावली नव्हती. पण आजूबाजूच्या झाडांमुळे उन्हाचा तडाखा तितकासा जाणवत नव्हता. 

📷Co trekker 

तिथे जवळच गुराख्यांच्या दगडी झोपड्या होत्या. आत्ता त्या रिकाम्याच होत्या. पण उन्हाळ्यात आसपासचे गुराखी तिथे गुरे घेऊन येतात आणि राहतात असे कळले. 
तिथून निघाल्यावर पुन्हा वाटेत अनेक लहान जलप्रवाह लागले. त्यांना ओलांडून पुढे जात होतो. आता पुन्हा अनेक फुललेली ऱ्होडोडेंड्रॉनची झाडे दिसत होती. 

📷Co trekker 

📷Co trekker 

📷Co trekker 

📷Co trekker 

📷Supan Shah 

📷Co trekker 

त्यानंतर दहा पंधरा मिनिटांत आम्ही चक्क एक सडक ओलांडली. तीन दिवसांनी असा रस्ता पाहून काहीतरी वेगळेच वाटले. आता सडकेवरून चालायला कंटाळा येईल असेही मनात आले. पण सुदैवाने मिनिटभरातच पुन्हा जंगलवाट आली. आता आमचा कॅम्प जवळ आला होता. पण तिथे पोचण्याचा रस्ताही सोपा नव्हताच!!

📷Co trekker 

📷Co trekker 

📷Co trekker 

आज समिट करून आलेला ग्रुप तिथे जेवणासाठी आणि सामान घेण्यासाठी आला होता. ते सगळे पुन्हा सारीला जायला निघाले होते. आम्हां २५ जणांखेरीज इतर कोणीदेखील आम्हाला तीन दिवसानंतर दिसले होते. समिट करून आलेला ग्रुप पाहून आनंद झाला. ह्यांना जमले तसे आपल्यालाही समिट जमेलच असेही वाटू लागले. 
आज आम्ही सहा सात तास चाललो होतो. अल्टीट्युड गेन साधारण हजार फुटांचा होता. पण आज थकवा अजिबात जाणवत नव्हता. 
आधीच्या सर्व कॅम्पसाईट प्रमाणेच बनियाकुंड कॅम्पसाईट देखील फार सुंदर ठिकाणी होती. 

📷Co trekker 

📷Supan Shah 

आम्ही पोचलो तेव्हा थेम्ब थेम्ब पडणाऱ्या पावसाचा वेग वाढला होता. पाहता पाहता एका कोपऱ्यातील पर्वतशिखरे ढगांनी झाकून टाकली. 

📷Co trekker 

पावसाने पलीकडचे दृश्य झाकून टाकले. उरली ती ओलेती झाडे आणि पावसात भिजत असलेले आमचे चिमुकले टेन्ट्स. 

📷Vrunda Tilak 

 उद्याच्या दिवसाची खूपच उत्सुकता होती. उद्याचा दिवस स्वप्नपूर्तीचा होता असे मी म्हणणार नाही. कारण ट्रेकचा प्रत्येक दिवस आणि क्षण स्वप्नवतच होता. पण तरीही तुंगनाथ आणि चंद्रशिला पाहण्याची अतीव उत्सुकता आणि आतुरता होती हे देखील खरेच. 

#deoriatal #chopta #uttarakhand #chandrashila #deoria #tungnath #sarivillage #himalayas #uttarakhandheaven #mountains #instagram #trekking #travel #motivations #indiahikes #Baniyakund #Syalmi


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका  आज उडुपीहून लवकर निघून शृंगेरीला पोचण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच निघालो. रस्ता खूपच छान होता. आता खरं सांगायचे तर कोस्टल कर्नाटक प्रवासात रस्ता सुंदर होता म्हणणे ही द्विरुक्तीच आहे.  सगळ्या सडका अगदी एका पातळीतील आणि गुळगुळीत आहेत. खड्डे खळगे, रस्ते वर खाली असणे असे काही नसल्याने महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हाला थोडे चुकल्यासारखे वाटले खरे!!! शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, स्वच्छता ह्यामुळे प्रवास फार आनंदाचा होतो. उडुपी शृंगेरी रस्ता तर आगुंबे जंगलातून जातो. त्यामुळे दाट झाडी होती. रस्त्यात सुप्रसिद्ध आगुंबे घाटही येतोच. सकाळची प्रसन्न वेळ आणि इतका छान रस्ता..दिवसाची चांगली सुरुवात होण्यासाठी आणखी काय पाहिजे?!!  आम्हाला वाटले होते इतक्या लवकर फारसे कोणी श्रुंगेरीत आलेले नसेल. पण शृंगेरीला पोचल्यावर लक्षात आले की आमच्यासारखाच विचार अनेकांनी केला होता!  अनेक बस रात्रभराचा प्रवास करून सकाळी शृंगेरीला पोचल्या होत्या. त्या लोकांच्या प्रातर्विधी आणि अंघोळीसाठी अनेक ठिकाणी माफक पैसे घेऊन उत्तम सोय केलेली होती....

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...