Skip to main content

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

 रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व!

शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. 

राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहासनाकडे, हिंदवी स्वराज्याकडे, संघटनेकडे वळवली. व्यक्ती माहात्म्य टाळले. अशी दृष्टी असणारे राज्यकर्ते फारच विरळे. 

शिवाजी महाराज आदर्श राजा होते, उत्कृष्ट सेनापती होते. राज्याभिषेकाच्या निमित्ताने इतर राष्ट्रांची मान्यता मिळवणे हा हेतू तर त्यांनी साध्य केलाच पण रयतेची निष्ठा स्वराज्याकडे वळवून, आपल्या मृत्यूनंतरही अनेक वर्षे हा लढा चालू राहील अशी व्यवस्था निर्माण केली. विजिगिषु वृत्ती जागृत केली. 

छत्रपती शिवाजी महाराज 

ह्या अभूतपूर्व राज्याभिषेकाचे स्थान होते किल्ले रायगड! आजच्या दिवशी ही पोस्ट लिहिताना मला अतिशय आनंद होतो आहे. एरवी मी ब्लॉगपोस्ट लिहिते, ते मी जाऊन आलेल्या ठिकाणांची माहिती वाचकांना द्यावी म्हणून. पण ह्या पोस्टमध्ये काहीही माहिती नव्याने द्यायची गरजच नाही. आपल्याला सगळ्यांना रायगड, जरी प्रत्यक्ष तिथे गेलेलो नसलो तरीही, माहितीच असतो. माननीय बाबासाहेब पुरंदरे, गो. नी दांडेकर ह्यांच्या लेखनातून, भाषणातून रायगड आपल्या ओळखीचा झालेला असतो. कोणत्याही गडापेक्षा रायगडावर अधिक पुस्तके लिहिली गेली आहेत. अगदी पहिल्यांदा तिथे जाणाऱ्या लोकांना देखील आपण पहिल्यांदाच हे सगळे बघत आहोत असे वाटत नाही! मी आज फक्त तुमच्या रायगडाच्या आठवणी जागविण्याचे काम करणार आहे.



सह्याद्री पर्वतरांगांमध्ये असलेल्या ह्या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून १३५० मीटर आहे. पण भारतीय मनातील ह्या किल्ल्याची उंची न मोजता येण्याइतकी आहे. (रायगडाची उंची अनेक जण वेगवेगळी सांगतात. मी इथे लिहिलेली उंची रायगडावर जो फलक लावलेला आहे त्यावरची आहे.) आम्ही ऑक्टोबर २०१५ मध्ये रायगडला गेलो होतो. तेव्हाचे फोटो आहेत हे सगळे. 


रायगडावरील माहितीफलक 

बाराव्या शतकात हा किल्ला सर्वप्रथम बांधला गेला. त्या आधी नुसता डोंगर असतानाची नावे होती रासिवटा, तणस, नंदादीप. नंतर किल्ला बांधल्यावर नाव होते रायरी. अनेक वर्षे शिर्के ह्यांच्याकडे किल्ला होता. निजामशाहीत कैदी ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा उपयोग होत असे. 

मे १६५६ मध्ये महाराजांनी हा किल्ला जिंकला. इथे पोचायला आणि चढायला अत्यंत अवघड होते, तसेच समुद्र जवळ होता. म्हणून इथे राजधानी करावी असे राजांनी ठरवले. डच, पोर्तुगीज, अरब, इंग्रज या आक्रमकांचा विचार करून नाविक शक्ती, आरमार व्यवस्था विकसित करणाऱ्या महाराजांनी राजधानीसाठी समुद्र जवळ असलेला किल्ला निवडला हे अगदीच संयुक्तिक आहे. 

महाराज हा किल्ला राजधानीसाठी निवडताना काय म्हणाले ते अनेक ठिकाणी वाचायला मिळते. किल्ल्यावरचा गाईड पण ते सांगतोच तरी देखील मी पुन्हा इथे ते शब्द देत आहे. 

महाराजांचे त्यावेळचे शब्द सभासदाच्या बखरीत वाचायला मिळतात. "दीड गाव उंच - देवगिरीच्याहुन दशगुणी उंच जागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाही. हे बघून महाराज खुषीने म्हणाले - तख्तास जागा हाच गड करावा."


आमचा किल्ल्यावरील मार्गदर्शक 


मा. गो. नी. दांडेकर महाराजांच्या गड निवडीविषयी म्हणतात, "आधीही दुर्ग होतेच. पण शिवछत्रपतींनी दुर्गरचना, त्यांची गरज, उपयोग, महत्व, स्थान, आवश्यकता इत्यादी सर्व बाबींचा अतिशय सूक्ष्म अभ्यास केला व एक स्वतंत्र शास्त्र बनवले. जिथे पूर्वी दुर्गं होते त्यांची डागडुजी केली. नव्हते तिथे मोक्याच्या जागी नवे बांधवून घेतले.

प्रत्येक वेळीच महाराजांचे चातुर्य व दूरदृष्टी दिसून येते. पण सर्वाधिक चातुर्य दिसते ते रायगडी राजधानी स्थापन करण्यात. रायगड ऐन कोकणात. चहुबाजूंस डोंगरदाटी. वरंध घाट, लिंगाणा, माणगाव अशा चारदोन ठिकाणांव्यतिरिक्त अन्यत्र कुठुन तो किल्ला कोणता, ते त्या डोंगर दाटी मध्ये ओळखू येत नाही. घाटापासून तसा जवळ पण अडचणीत. समुद्रकिनारा अंदाजे तीस मैलांवर. चहूकडून तुटलेला ताशीव कडा. अगदी पाखरू बसू म्हणेल तरी त्यास जागा नाही. असा हा दुर्गम किल्ला त्यांनी राजधानी म्हणून निवडला. तिथून घाटावरही लक्ष पोचत असे व समुद्रही आवाक्यात होता." 

आता कशी आहे रायगडाची वाट? पुण्याहून रायगड दर्शन बस आहे. मुंबईकरांना महाडमार्गे जाता येते. रस्ता २०१५ मध्ये आम्ही गेलो तेव्हा चांगला नव्हता. पण लवकरच दुरुस्ती होणार होती. तेव्हा आता चांगला असेल. 


रायगडावर जाणारा रस्ता 


पायथ्यापासून चढून जाणार असाल तर साधारण १४००/१५०० पायऱ्या चढून जावे लागेल. चढताना निसर्ग आणि अनेक ठिकाणे बघायला मिळतील. डोंगर चढण्याचा आनंद देखील मिळेल. तेव्हा खरे तर रायगड ह्याच मार्गाने पाहायला हवा. 

नवा रज्जुमार्ग झालेला आहे. त्याचे ऑनलाईन आरक्षण होते. त्यांची साईट आहे,

 https://www.raigadropeway.com/index.html

त्या साईटवर आपण केबल कारचे आरक्षण करू शकता. एका वेळचे अथवा परतीचे सुद्धा आरक्षण होऊ शकते. अवघ्या काही मिनिटात ही केबल कार आपल्याला गडावर घेऊन जाते.

 

केबल कार मधून दिसणारे दृश्य 

केबल कार मधून दिसणारे दृश्य 

केबल कार मधून दिसणारे दृश्य 

केबल कार मधून दिसणारे दृश्य 

केबल कार मधून दिसणारे दृश्य 

 

इतका मोठा परिसर नजरेच्या आवाक्यात येतो. केबल कार अजून थोड्या वेळ चालू राहावी असेच वाटायला लागते!

ह्याच साईटवर राहण्याच्या व्यवस्थेचे पण आरक्षण होते. त्यांचे गडावर रेस्टॉरंट आहे. पण आम्ही २०१५ मध्ये गेलो तेव्हा तिथे फारसा स्वैपाक होत नसे. त्यामुळे आपल्याला काय आणि कधी हवे त्याची मागणी पायथ्याशी असलेल्या ऑफिस मध्ये नोंदवायची आणि मग त्या त्या वेळी अन्न केबल कारने गडावर येणार अशी व्यवस्था होती. 

तुम्ही जाल तेव्हा चौकशी करून मगच वर जा. पायथ्याशी दुकाने आहेत. शिवाय तुम्ही स्वतः बरोबर काही अन्न पदार्थ ठेवणे चांगले. 

गडावर MTDC ची देखील राहण्याची सोय तसेच रेस्टॉरंट आहे. त्यांचे बुकिंग पण आधीच करावे लागते. ऐनवेळी जाऊन सोय होण्याची शक्यता कमीच असते. 

१६७४ मध्ये साम्राज्याची राजधानी हा रायगड बांधला तो महाराजांच्या आज्ञेवरून हिरोजी इंदुलकरांनी. आज इतक्या शतकानंतर, इंग्रजांनी उध्वस्त करून देखील ज्या काही थोड्या खुणा उरल्या आहेत त्यावरून तेव्हाच्या वैभवाची कल्पना आपण करू शकतो.

 

किल्ले रायगड 



किल्ले रायगड 



किल्ले रायगड - पाण्याची टाकी 



किल्ले रायगड 



किल्ले रायगड 



गवत खूप वाढले आहे!

मी तुम्हाला सगळा गड फिरवणार नाही. अगदी विस्तृत माहिती देखील लिहिणार नाही! ज्यांनी रायगड पाहिला नाही त्यांना उत्सुकता वाटेल आणि ज्यांनी पाहिला आहे त्यांच्या आठवणी जागृत होऊन परत जावेसे वाटेल इतकेच सांगणार आहे!


बाजारपेठ 

रायगडावरील बाजारपेठ घोड्यावर बसून खरेदी करता येईल अशी आणि इतकी उंच आणि रुंद आहे. पेठेच्या दोन रांगा आहेत. आता दुकानांची जोती उरली आहेत. दोन्ही रांगांमध्ये साधारण ४० फूट इतके अंतर सोडलेले आहे. प्रत्येक रांगेत वीस पेक्षा जास्त दुकाने आहेत. 




किल्ले रायगड 



किल्ले रायगड - नगारखाना दरवाजा 



किल्ले रायगड - कथा सांगतो शिवरायांची 


सिंहासनाधिश्वर छत्रपती शिवाजी महाराज 


किल्ले रायगड 


प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने भरून यावा अशी ही जागा. महाराजांच्या अनेक कथा आठवतात. इथे प्रत्यक्ष महाराज वावरलेले आहेत, राज्याभिषेक झालेला आहे ह्या कल्पनेने देखील रायगडावर फिरताना अंगावर रोमांच उभे राहतात. 

असे म्हणतात की दरवाज्याजवळ उभे राहून बोललेले सिंहासनाशी ऐकू जाईल अशी ध्वनी व्यवस्था गड बांधताना केलेली आहे. त्याचा अनुभव आम्ही घेतला. 

आम्ही नगारखाना दरवाज्याजवळ असताना पाहिले की काही हौशी पर्यटक सिंहासनावर चढून महाराजांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढण्याच्या प्रयत्नात आहेत. ह्या उद्दामपणाने अक्षरश: अंगाचा संताप झाला. आम्ही नगारखाना दरवाज्यातून "खाली उतरा" असे ओरडलेले तिथे ऐकू गेले. कोणी ओरडल्यानंतर तरी खाली उतरण्याइतकी लाज त्यांच्याकडे शिल्लक होती हे आमचे नशीब. 

हे असे उद्दाम हौशी पर्यटक, गडांवर जाऊन धूम्रपान, मद्यपान करणारे, घाण टाकून गड खराब करणारे पर्यटक ह्यांचे काय करावे, कळत नाही. 


टकमक टोक 

पूर्वी गुन्हेगारांना देहदंड देण्यासाठी ह्या कड्या वरून ढकलून देण्यात येत असे. खरोखरच उभा कातळ आहे. कपाळमोक्ष शंभर टक्के ठरलेलाच. आता तो एक चांगला व्यू पॉईंट झाला आहे. 


किल्ले रायगड - खलबतखाना 


किल्ले रायगड स्तंभ 



किल्ले रायगड - स्तंभ 

गंगासागर च्या जवळ उभे असलेले हे दोन सुंदर स्तंभ. अजूनही नक्षीदार तीन मजले दिसतात. पूर्वी हे पाच मजले होते असे म्हणतात. बारा कोनांचे हे स्तंभ खूपच विशेष आहेत. जगदीश्वर मंदिराजवळ असलेला शिलालेख पुढे दिला आहे त्यात उल्लेख केलेले स्तंभ हेच असावेत. 



किल्ले रायगड 



किल्ले रायगड 



किल्ले रायगड 



गंगा सागर तलाव 

राज्याभिषेकाच्या वेळी ह्या तलावात विविध तीर्थक्षेत्रीचे, नद्यांचे पाणी आणून मिसळले होते. त्यामुळेच ह्याचे नाव गंगा सागर असे पडले. 

किल्ले रायगड 



किल्ले रायगड 



किल्ले रायगड - राणीवसा 



किल्ले रायगड - राणीवसा 



राणीवसा म्हणजे राण्यांची राहण्याची जागा. इथे सहा महाल आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या मदतनीसांची पण राहण्याची सोय केलेली आहे. मेणा दरवाजातून ह्या सर्वांची ये जा होत असे. 



किल्ले रायगड 

रायगड संरक्षित स्मारक म्हणून आता शासनाच्या ताब्यात आहे. त्याची देखभाल शासनाच्या संबंधित विभागाने करणे अपेक्षित आहे. गडावरचे रस्ते ठीक आहेत आणि सर्वत्र पाट्या लावलेल्या आहेत. 

किल्ले रायगड - होळीचा माळ 


किल्ले रायगड - होळीचा माळ


किल्ले रायगड - होळीचा माळ व महाराजांचा पुतळा 



किल्ले रायगड 




किल्ले रायगड - जगदीश्वराची पायरी 

रायगडचा आराखडा करणारे व इमारती बांधवून घेणारे होते हिरोजी इंदुलकर. महाराजांच्या कल्पनेपेक्षाही भव्य अश्या इमारती बांधून त्यांनी गड सुसज्ज केला. महाराजांनी प्रसन्न होऊन, काय हवे ते माग सांगितल्यावर हिरोजी म्हणाले, काही नको. देवाच्या पायरीवर नाव लिहितो. माझ्या नावावर पाय देऊन महाराज देवाच्या दर्शनाला जातील. तुमच्या पायाची धूळ मस्तकी लागेल. अजून काय हवे? अहंकाराचा लोप होण्याचे किती मोठे उदाहरण! नाव पण काय लिहिले तर 'सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इटळकर'.

जगदीश्वर मंदिर - बाह्य द्वार व नंदी 



जगदीश्वर मंदिर 



जगदीश्वर मंदिर -शिलालेख 



शिलालेख वाचून दाखवताना आमचा मार्गदर्शक 




तो शिलालेख असा आहे.
"श्री गणपतये नमः। प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंददोनुज्ञया श्रीमच्छत्रपतेः शिवस्यनृपतेःसिंहासने तिष्ठतः। शाकेषण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ ॥१॥ वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वीतिकौ स्तभेः कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते। श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो यावच्चन्द्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ॥२॥"( इंटरनेटवरून साभार )


ह्याचा साधारण अर्थ असा, "गणपतीला नमस्कार! हा जगदीश्वराचा प्रासाद,सर्व जगाला आनंददायी असा, सिंहासनाधिश्वर श्रीमद् छत्रपती शिवाजी राजांच्या आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहुर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाचा शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे अशांची उभारणी केली आहे. ती चंद्रसूर्य असेतोवर अशीच विलसत राहो."



वाघ्याचा स्मृतिस्तंभ 

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडाने पाहिला तसाच त्यांचा मृत्यू देखील रायगडाला सहन करावा लागला. शके १६०२ चैत्र शुद्ध १५ म्हणजेच १६८० मध्ये महाराजांचा मृत्यू झाला. असे म्हणतात की महाराजांच्या चितेत त्यांच्या वाघ्या कुत्र्याने देखील उडी मारली व आत्मार्पण केले. त्याचे स्मृतिस्थळ आपल्याला जगदीश्वराच्या मंदिरासमोरच दिसते आणि अर्थातच ह्या फोटोत उंच दिसते आहे ती महाराजांची समाधी. अष्टकोनी जोते बांधलेले आहे.

📷विकिमीडिया कॉमन्स 


महाराजांची समाधी पाहून मन विषण्ण होते खरे, पण मग वाटते, आपल्या सगळ्यांच्या मनात तर महाराज कायम राहणार आहेतच..अगदी त्या शिलालेखात म्हटल्याप्रमाणे यावतचंद्र दिवाकरौ. त्यांनी दिलेली शिकवण आपल्याला सतत मार्गदर्शन करत राहणार आहे. 


किल्ले रायगड 


जय भवानी जय शिवाजी 




#Raigad #ShivajiMaharajRajyabhishek #ShivajiMaharajThrone #WheretostayonRaigad #HowtogotoRaigad #OneDayTripToRaigad #RaigadRopeway #Hirkani #Takmaktok #ChatrapatiShivajiMaharaj #ShivajiMaharajCapital #shivSwarajyaDin

Comments

  1. किल्ले रायगड - नाव उच्चारताच रोमांच उसे राहतात. वृंदा टिळक आज सर्व आठवणींना उजाळा मिळाला. छान लेख लिहीला आहे.महाराजांना त्रिवार प्रणाम 🙏

    ReplyDelete
  2. Mast lekh vrunda tai , Raigad che vernan atishay surekh

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक- भाग 1 - तयारी !!

  आपण स्वप्न पाहतो… आपण स्वप्ने पाहतो… त्यातील एखाद दुसरेच प्रत्यक्षात यावे म्हणून धडपडतो आणि बाकीची स्वप्ने कधीतरी नवलाईने आंजारायला गोंजारायला असावीत म्हणून त्यांना स्वप्न म्हणूनच राहू देतो.  हाय अल्टिट्युड ट्रेक हे माझे एक असेच स्वप्न होते, नेहमी भुरळ पाडणारे आणि तरीही प्रत्यक्षात आले तर इतक्या उंचीवर चालताना काहीशी धास्तीच वाटावी असे. त्यामुळे वर्षानुवर्ष ते स्वप्न प्रत्यक्षात न येता स्वप्नच राहिले होते.  नोव्हेंबरमध्ये माझी मैत्रीण धनश्री जगताप इंडियाहाईक्सबरोबर देवरिया ताल चंद्रशिला हा ट्रेक करून आली. तिच्याशी गप्पा मारताना या ट्रेकची सविस्तर माहिती मिळाली. मार्च एप्रिलमध्ये या संपूर्ण रस्त्यावर ऱ्होडोडेंड्रॉनची फुले फुललेली असतात असेही कळले… आणि मनातल्या स्वप्नाला पुन्हा एकदा जाग आली.  असे म्हणतात की देवरिया ताल म्हणजे जिथे यक्षाने युधिष्ठिराला प्रश्न विचारले ते तळे. वाटेत लागणारे तुंगनाथ हे तर जगातले सर्वात उंचावर असणारे शंकराचे मंदिर, पंच केदारापैकी एक. हे पांडवांनी बांधले आहे असे सांगितले जाते. ट्रेकचा समिट पॉईंट म्हणजे चंद्रशिला. जिथे चंद्राने तपश्चर्या केली ती जागा. असेही म

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 2 - सारी - देवरियाताल

दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेकला सुरुवात झाली तीच एका तीव्र चढणीने!! चढताना एका क्षणी मागे वळून आम्ही सारी बेस कॅम्पचा निरोप घेतला. परत येउ तेव्हा ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला असेल की नाही, ते माहिती नव्हते. पण अनुभवसमृद्ध मात्र नक्की होऊन परत येऊ ह्याची ग्वाही मनातच दिली. सारी बेस कॅम्प 📷 Supan Shah रस्ता ओबडधोबड दगडांनी तयार केलेला होता. पण भुसभुशीत मातीत पाय घसरण्यापेक्षा दगड परवडले असे मनाला सांगत चढण चढत होते. 📷 Pawan Gowda ह्या फोटोवरून चढ किती होता त्याचा तर अंदाज येईल पण आम्ही सगळे कसे चढत होतो ते कळायचे असेल तर व्हिडिओ आहे ना! विडिओ - सम्राट दर्डा https://youtube.com/shorts/CJuWDSml8XU?feature=share रस्त्याचा सुरुवातीचा काही भाग लोकवस्तीतून जाणारा. पण तेथील घरेही अगदी तुरळक आणि तशी लांब लांब. हिरवीगार शेते मात्र दिसत होती. डोंगर उतारावर पायऱ्यांसारखे बांध घालत केलेली ही शेती संपूर्ण उतार जिवंत करत होती. The view 📷 Supan Shah 📷 Samrat Darda तासभर तीव्र चढणीचा रस्ता पार केल्यानंतर थोडया वेळाने तुलनेने जरा सपाट भाग आला तेव्हा हृदयाने थँक्यू म्हणायला सुरूवात केली!! तिथून चंद्रशिल

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 3 - देवरियाताल -स्यालमी

ट्रेकचा तिसरा दिवस. कालचा सारी- देवरियाताल प्रवास तर खूपच छान झाला होता. पायही दुखले नव्हते की थकल्यासारखे देखील वाटले नव्हते. त्यामुळे उत्साहाने आजच्या दिवसाला सुरुवात केली. आजचा दिवस तसा अवघड असेल अशी, इंडियाहाईक्सच्या  वेब साईटवरचे वर्णन वाचून कल्पना आली होती. आज अंतर नऊ किलोमीटरपेक्षा जास्त होते. पण वाटेत अनेक शिखरे दिसणार होती. घनदाट जंगलातून जाणार होतो त्यामुळे अनेक पक्षीही दिसणार होते. त्याचीही उत्सुकता होती. सगळेजण देवरियाताल कॅम्पसाईट मधून बाहेर पडलो. अवघे एक दिवस वास्तव्य केलेले असले तरी मन थोडेतरी गुंतलेले असतेच.  देवरियातालच्या रस्त्याच्या डाव्या बाजूने एक जंगलवाटेचा फाटा होता. त्या वाटेने आम्ही निघालो. थोडा वेळ चालल्यावर आम्हाला पुन्हा एकदा चंद्रशिला शिखर दिसणार होते. अधून मधून दिसणारे हे शिखर आपल्याला कुठे पोचायचे आहे त्याची जाणीव करून द्यायचे, त्यानेही एक नवे बळ मिळायचे. पण आज आकाश इतके ढगाळ होते की शिखर दिसलेच नाही.उजवीकडे पुन्हा एकदा सारी गाव मात्र दिसले. 📷Cotrekker 📷Sumati Dhembre ह्या फोटोवरून कशा रस्त्याने आम्ही चालत होतो, चढ किती होता त्याची कल्पना येईल. (सर्वात

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 5- अंतिम भाग - बनियाकुंड- तुंगनाथ- चंद्रशिला

  📷Samrat Darda १५ एप्रिल, बनियाकुंड कॅम्पसाईट मधून काढलेला चंद्राचा सुंदर फोटो. त्या दिवशी शुक्ल पक्षातील सप्तमी किंवा अष्टमी असावी. कारण १७ एप्रिलला रामनवमी होती. सुंदर काळ्याभोर रात्रीचा सघन अंधार.. पौर्णिमा अजून साताठ दिवसांवर असली तरीही आत्तापासूनच तेजाळलेला चंद्र.. चमचमणारे, मध्येच ढगांच्या आड लपणारे चांदणे, आमच्या मनातील समिटविषयीची उत्सुकता..फार अनोखी रात्र होती ती.  उद्या पहाटे दोन वाजताचा वेकप कॉल असणार होता. आम्हाला आवरून, ब्रेकफास्ट करून तीन वाजता निघायचे होते. न विसरता घेण्याच्या गोष्टी तशा तर डे पॅक मध्ये भरूनच ठेवल्या होत्या. हेडलॅम्पच्या उजेडात सामान देखील आवरून ठेवले होते. पहाटे निघताना बाकी सामान मेन टेन्ट मध्ये नेऊन ठेवायचे होते.  इतक्या उंचीवर जायचे होते. काही तासांत आम्ही ४००० फुटांचा अल्टीट्युड गेन करणार होतो. झोपण्यासाठी डोळे मिटले खरे, पण मिटल्या डोळ्यांपुढेही बर्फाच्छादित शिखरांचीच दृश्ये तरळत होती. कधीतरी झोप लागली. सतत अधूनमधून जाग येऊन घड्याळात बघत होते. सगळे दोन वाजता उठणार, त्या आधी आपण आपले आवरून घेऊ या असा विचार डोक्यात होता तो बहुधा सतत जाग आणत असावा!!

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 4 - स्यालमी - बनियाकुंड

आदल्या संध्याकाळी भुरभुरत असलेल्या पावसाने हवेतला गारवा अजूनच वाढवला होता. इतक्या लहान तंबूमध्ये झोपण्याची पहिलीच वेळ होती. पण सुरुवातीचे दोन तास सोडले तर नंतरचे पाच तास चांगली झोप झाली. अगदी प्रसन्न जाग आली.काल एकदाच क्षणभर का होईना, मनात तरळून गेलेला,"आपण ट्रेक इथेच थांबवावा का?"ह्या विचाराचा आज कुठे मागमूसही उरला नव्हता. मनात होते,  "इरादे अगर पक्के हो, तो डगमगाए कदम क्यु? हौसले बुलंद हो तो सहमा सा हो मन क्यु? मंज़िल अब दूर नहीं.. बस संभल के चलना, कभी न रुकना, हार ना मानना, बस्स .. चलते रहना।" - वृंदा टिळक आमच्या सगळ्याच कॅम्पसाईट्स भन्नाट जागांवर होत्या. आजची स्यालमीची कॅम्प साईट देखील त्याला अपवाद नव्हती. नजर पोचेल तिथपर्यंत फक्त पर्वत रांगा आणि जंगल. मानवी वस्तीची जवळपास काहीच चाहूल नाही.  📷Samrat Darda  सगळ्यांचे आवरून वॉर्म अप करून आम्ही निघालो. आजचा सगळा रस्ता सुंदर असणार होता. काल इतके चढ उतार चढून उतरून आता सगळ्यांची चांगली तयारी झाली होती. शिवाय आज मी नीकॅप्स देखील घातल्या होत्या!! त्यामुळे समजा जरी आज रस्ता अवघड असला असता तरी काळजीचे काही कारण नव्हते.

ग्यानबोक पॅलेस, सेऊल, साऊथ कोरिया

राष्ट्रीय अस्मितेची चिन्हे परकीय आक्रमक पुसून टाकायचा प्रयत्न करतात, करतातच. जगभर अशी असंख्य उदाहरणे सापडतील. कारण त्याशिवाय त्यांना त्यांची सत्ता निर्माण करता येणार नसते. पण मग त्या त्या देशातील, देशावर प्रेम असणारे लोक काय करतात हे जाणून घ्यायचे असेल तर एक उदाहरण सांगते. आपल्याला सेऊल मधील ग्यानबोक  पॅलेस याच्याविषयी वाचायला हवे. ------------- तसा पोचायला आम्हाला थोडा उशीरच झाला होता. शेवटची इंग्लिश गाईडेड टूर चुकते की काय अशी भीती वाटायला लागली होती. अनेक कोरियन युवक युवती राजवाड्याकडे जाताना दिसत होते. विशेष म्हणजे त्यांनी पारंपरिक कोरियन पोशाख घातले होते. फार छान दिसत होते ते सगळे. आम्ही गेलो होतो, कोरियाच्या सार्वभौमत्वाचे मानचिन्ह असलेल्या ग्यानबोक पॅलेसला ( Gyeongbok Palace ) भेट देण्यासाठी.  तिकिटाच्या काउंटर जवळच राजवाड्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. त्याचे नाव आहे ग्वान्गमन गेट.( Gwanghwamun) . सेऊलच्या पुरातन इतिहासाचे प्रतीक असलेले हे प्रवेशद्वार १३९५ मध्ये बांधले गेले आहे. आज हे प्रवेशद्वार कोरियाची ओळख बनलेले आहे. कोरियाच्या वास्तुशास्त्राप्रमाणे, कोरियाची भरभराट व्हावी म्ह

Deoriatal - Chandrashila trek - Part 1 - Preparation

We dream… we dream about many things … but we strive to make only few of them a reality and leave the rest of the dreams as dreams only, to cherish them someday in our leisure time. A high altitude trek was one such dream of mine, always enthralling and yet a little daunting. So for years that dream remained a dream without becoming a reality. In November, my friend Dhanshree Jagtap did the Deoria Tal Chandrashila trek with Indiahikes. While chatting with her, I could get detailed information about this trek. She told that in March and April, rhododendron flowers will be blooming in this region … and the dormant dream was awakened once again. It is said that DeoriaTal is the lake where the famous Yaksha and Yudhishthira conversation had taken place. On the way to the summit, Tungnath is the highest temple of Shankara in the world, one of the Panch Kedars. It is said to have been built by the Pandavas. The summit point of the trek is Chandrashila. The place where Chandra did Tapas. It i

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका आड एका वाडीत आपल्याला रिसॉर्ट झालेला द

हम्पी- विठ्ठल मंदिर

तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले  हम्पी . तिसऱ्या शतकापासून ह्या शहराचे उल्लेख आहेतच.  चौदाव्या शतकातल्या विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेले  हम्पी .  विजयनगर साम्राज्यासोबतच  या शहराची देखील प्रगती  झाली आणि जगातले  एक अत्यंत श्रीमंत, भरभराटीला आलेले शहर म्हणून हम्पी मान्यता पावले. विदेशातून देखील व्यापारी  हम्पी ला येत असत.  चौदाव्या शतकाच्या आधीदेखील तिसऱ्या शतकापासून इतकेच काय, अगदी रामायण कालात देखील  हम्पीचे  उल्लेख आपल्याला सापडतात. अजून देखील ऋष्यमुक सारखी पर्वतांची नावे असतील किंवा पम्पा सरोवर, किष्किंधा अशी ठिकाणांची नावे असतील, आपल्याला सतत रामायणाचा संदर्भ दिसत राहतो. हनुमानाचे जन्मस्थान, राम लक्ष्मण हनुमानाला भेटले ते ठिकाण देखील ह्याच परिसरात आहे. त्यामुळे अनेक भाविक नेहमीच  हम्पी ला भेट देत असतात. इतिहास संशोधकांसाठी, कलेच्या अभ्यासकांसाठी देखील  हम्पी  फार महत्त्वाचे आहे ते त्यातील एकाहून एक सुंदर, कोरीव काम असलेल्या मंदिरांमुळे! युनेस्कोने देखील या संपूर्ण भागाला जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली आहे.  हम्पीतील  खरे तर सगळीच मंदिरे पाहण्याजोगी आहेत इतकेच काय तिथ

Deoriatal Chandrashila trek - Part 2- - Sari to Deoriatal.

The next morning, the trek started with a steep climb!! At one point during the climb, we turned back and bade goodbye to the Sari base camp. It was not known whether we would successfully complete the trek or not. But I was sure that we will definitely come back with a life changing experience.   Sari Base camp  📷 Supan Shah The road was paved with rough stones. But while climbing I was telling myself that these stones were better than walking in the slippery soil. 📷 Pawan Gowda You can guess how much the climb was, from this photo, but if you want to know how we were climbing, there is a video! विडिओ - सम्राट दर्डा https://youtube.com/shorts/CJuWDSml8XU?feature=share The initial, few meters part of the road passed through populated areas. But the houses there were very few and sparse. Green fields were visible everywhere. Farming was done on the mountain slopes, by step method. This greenery enlivened the entire slope. The view 📷 Supan Shah 📷 Samrat Darda After walking on the ste