 |
| मिर्जन किल्ला |
आदल्या दिवशी शरावती नदीतील बोटिंग आणि शरावती कांडला मॅन्ग्रोव्हना भेट दिल्यावर आम्ही विश्रांती घेऊन ताजेतवाने झालो. दुसऱ्या दिवशी लवकरच निघालो मिर्जन किल्ला बघायला.
मिर्जन किल्ला हा होनावर गोकर्ण रस्त्यावरच आहे. कुमटा ओलांडून पुढे आलो की अघनाशिनी नदीच्या किनाऱ्यावर हा भुईकोट किल्ला आहे.
 |
| मिर्जन किल्ला |
 |
| मिर्जन किल्ला |
 |
| मिर्जन किल्ला |
हा किल्ला बांधला होता राणी चेन्नभैरादेवी ही इतिहासाला ज्ञात आहे ती दीर्घकाळ म्हणजे तब्बल ५४ वर्षे राज्य करणारी राणी म्हणून. १५५२ ते १६०६ असा तिचा राज्यकाल होता. होनावर जवळच्या गिरसप्पा भागाची ती राणी होती.
विजयनगर साम्राज्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवत ती महामंडलेश्वरी म्हणून राज्य करत होती. आजूबाजूच्या शत्रूंच्या कारवायांना जशास तसे उत्तर देत तिच्या दीर्घ राज्यकारभारात तिने प्रजेला शांती आणि सुबत्ता दिली. पोर्तुगीजांना देखील तिने दोन युद्धांत १५५९ आणि १५७० मध्ये पराभव चाखायला लावला.
आधी केवळ रानटी पीक असणाऱ्या मिरीची लागवड करण्यासाठी तिने शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. पण नुसते उत्पादन वाढवून काय फायदा? त्या मालाला बाजारपेठ देखील हवी. इथेच तिची व्यवहारकुशलता आणि दूरदृष्टी दिसून येते.
तिने मिरी, दालचिनी, सुंठ, वेलची, चंदन, तांदूळ, गूळ, सुपारी अशा पदार्थांच्या निर्यातीला सुरुवात केली. भटकळ आणि होनावर बंदरांतून जगभरात होणारी निर्यात भरपूर विदेशी मुद्रा मिळवून देत होती आणि राज्याच्या महसुलात भर पडत होती. तिची प्रसिद्धी इतकी की तिचे शत्रू असलेल्या पोर्तुगीजांनी देखील तिला ' रैना दा पिमेन्टा' अशी पदवी दिली. त्याचा अर्थ आहे 'काळ्या मिरीची राणी. '
गोव्यात पोर्तुगीजांच्या जुलुमांना कंटाळून आणि जबरदस्तीने केल्या जाणाऱ्या धर्मांतरांमुळे गोव्यातून आलेल्या अनेक लोकांना तिने आपल्या राज्यात आश्रय दिला होता. त्यांना उत्पन्नाची साधने दिली होती.
राणी चेन्नभैरादेवी हिची राष्ट्रनिष्ठा, व्यावहारिक कुशलता आणि शौर्य ह्या साऱ्यांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने एक स्मरणीय डाक तिकीट जुलै २०२५ मध्ये प्रकाशित केले आहे. माननीय राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू ह्यांच्या हस्ते ते प्रकाशित झाले.
 |
| २४/०७/२५ |
तिने बांधलेला मिर्जन किल्ला हा जाड भिंतींचा, अनेक बुरुज असलेला, सभोवताली संरक्षणासाठी पाण्याचे खंदक असलेला असा भक्कम किल्ला आहे. त्यामुळे शत्रूच्या हातात तो अनेक वर्षे लागला नाही.
आक्रमण झालेच तर किल्ल्यावर पिण्याच्या पाण्यासाठी अनेक विहिरी होत्या. त्यामुळे पाण्याची टंचाई व्हायची नाही. किल्ल्यावर पाणी खेळते राहण्यासाठी जलव्यवस्थापन यंत्रणा होती. अशीच एक पाणी वाहून नेऊन लहानशा साठवणुकीच्या कुंडात सोडणारी नलिका तिथे पाहायला मिळाली. अशाच नलिकांचे जाळे सर्वत्र असणार.
किल्ल्याला एक मुख्य द्वार तसेच तीन उपद्वारे आहेत. काही भुयारी मार्ग आहेत.
 |
| मिर्जन किल्ला |
 |
| भुयारी मार्ग |
 |
| मिर्जन किल्ला |
 |
| मिर्जन किल्ला |
 |
| मिर्जन किल्ला |
 |
| मिर्जन किल्ला |
 |
| मिर्जन किल्ला |
 |
| मिर्जन किल्ला |
 |
| मिर्जन किल्ला |
 |
| मिर्जन किल्ला |
 |
| मिर्जन किल्ला |
 |
| मिर्जन किल्ला |
 |
| मिर्जन किल्ला |
 |
| बंद केलेली भुयारे |
 |
| मिर्जन किल्ला |
 |
| तटबंदी |
 |
| मिर्जन किल्ला |
 |
| मिर्जन किल्ला |
 |
| मिर्जन किल्ला |
 |
| मिर्जन किल्ला |
 |
| मिर्जन किल्ला |
 |
| मिर्जन किल्ला |
 |
| विहीर |
 |
| मिर्जन किल्ला |
 |
| मिर्जन किल्ला |
 |
| मिर्जन किल्ला |
 |
| मिर्जन किल्ला |
 |
| मिर्जन किल्ला |
 |
| मिर्जन किल्ला |
 |
| भुयारे |
 |
| भुयारे |
किल्ला पर्यटकांसाठी सकाळी आठ वाजता उघडतो. संध्याकाळी पाच की साडेपाच वाजेपर्यंत पाहू शकतो. आम्ही गेलो तेव्हा तरी गाईड उपलब्ध नव्हता.
सकाळचे साडेआठ नऊच वाजले होते तरी ऊन जाणवत होते. दूर अंतरावर एक चांगले डेरेदार झाड दिसले. पावले आपोआप तिकडे वळली.
 |
| सावलीच्या शोधात |
तिकडे जाताना वाटेत चिमुकली रानफुले दिसत होती.
 |
| रानफुले |
हे पक्षीराव एकटेच ऐटीत बसले होते झाडावर. सगळ्या परिसरावर नजर ठेवत होते.
 |
| पक्षी |
 |
| तज्ज्ञांना नाव सांगता येईल!! |
कोणाला नाव माहिती असेल तर कॉमेंट्स मध्ये अवश्य लिहा.
झाडाला टेकून काही शिल्पपट्टिका ठेवलेल्या होत्या. त्यातल्या एकावर शंकराची पिंड, पूजा करणारे भाविक आणि देवी दिसत होती. एक वीरगळ असावी बहुधा. तिथे किल्ल्याची माहिती सांगणारा गाईड असता तर किती चांगले झाले असते असे वारंवार वाटत होते.
 |
| उत्खननात सापडलेले काही |
 |
| महिषासुर मर्दिनी |
 |
| महिषासुरमर्दिनी |
उत्खननात सापडलेले काही भाग झाडाखाली मांडून ठेवले होते. तिथेच होती एक अतिशय प्रमाणबद्ध आणि सुंदर अशी महिषासुरमर्दिनीची मूर्ती.
 |
| महिषासुरमर्दिनी |
वाटले, 'आज अशा ओसाड माळरानात कशी अचानक भेटलीस माय?' शौर्याची देवता असलेली महिषासुर मर्दिनी रानी चेन्नभैरदेवीने बांधलेल्या किल्ल्यात असणे अतिशय औचित्यपूर्ण आहे.
शिशिरातील ती पानगळ, पिवळे पडलेले गवत ह्या कशालाही न जुमानता हिरवेगार राहिलेले ते डेरेदार झाड आणि त्या खालची झाडाच्या सावलीत असलेली सुबक सुंदर देवीची मूर्ती कायम लक्षात राहील. देवी देवता नेहमी मंदिरात पाहण्याची आपल्याला सवय असते. अशा उघड्यावर पाहायला वेगळेच वाटते.
हा किल्ला पावसाळ्यात फार सुंदर दिसतो असे ऐकले आहे. त्याचे शेवाळ्याने हिरवेगार झालेले रूप फोटोत पाहिले आहे. तुम्हाला देखील ड्रोनने काढलेला पावसाळ्यातील निर्जन किल्ल्याचा फोटो आंतरजालावर पाहायला मिळेल. अवश्य बघा, फार सुंदर दिसतो.
 |
| 📷Wikimedia commons |
शासनाने किल्ल्याची डागडुजी करून त्याचे रूप चांगले ठेवले आहे. अनेक ऐतिहासिक चित्रपटांची, मालिकांची चित्रीकरणे ह्या किल्ल्यावर होत असतात.  |
| मिर्जन भेटीचा पुरावा |
किल्ला म्हटले की नेहमी मनात येतो तो देवगिरी आणि रायगड, त्यांच्या नंतर पाहिलेले, त्यांच्या इतिहासामुळे मनात रुतलेले चितोडगड, कुम्भलगड हे देखील आठवतात. आता त्याच ओळीत मिर्जन किल्लाही आठवेल हे निश्चित.
त्या दिवशी नंतर आम्ही निघालो गोकर्ण महाबळेश्वरला. पण त्याविषयी वाचू या पुढच्या भागात! गोकर्ण महाबळेश्वरचा अनुभव लवकरच लिहीन.
#MirjanFort #CoastalKarnataka #QueenChennabhairadevi #KarnatakaTourism #MarathiTravelBlog #IndianHistory #TravelKarnataka #SilverVeganTravels #HistoricForts #PepperQueen
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा