मुख्य सामग्रीवर वगळा

कोस्टल कर्नाटक ८ - गोकर्ण महाबळेश्वर

मिर्जन किल्ल्यापासून निघाल्यावर गोकर्ण महाबळेश्वरला जाण्याचा रस्ता सुंदर होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार झाडे होती. वळण आले की मधूनच डोकावणारा समुद्र, नंतर सामोराच आला. 

गोकर्ण 
गोकर्ण 
गोकर्ण 
गोकर्ण 
गंगावली आणि अघनाशिनी नद्या आणि सिंधु सागर (अरबी समुद्र) ह्याच्या मधल्या भागात गोकर्ण महाबळेश्वर वसलेले आहे. खरे तर पूर्वी लहानसे गांव असणार. पण आता पर्यटक, परदेशी पर्यटकांसाठी समुद्रकिनाऱ्यावर उभे राहिलेले असंख्य रिसॉर्ट्स आणि अन्य सुविधा, मोठ्या प्रमाणात भेट देणारे भाविक ह्यामुळे गाव विस्तारते आहे. गजबजलेले आहे. 

गोकर्ण महाबळेश्वरचा उल्लेख तर शतकानुशतके आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात आढळतो. त्याला दक्षिण काशी असेही म्हटले जाते. 

गोकर्ण महाबळेश्वर मध्ये आपण शिरलो की शिव मंदिराकडे जाताना आधी लागते श्री महागणपती मंदिर. तर तिथे जाण्यासाठी आमची गाडी एका चिंचोळ्या रस्त्याने चालली होती. आता कोपऱ्यावर महागणपती मंदिर येणार म्हणून मी उत्सुकतेने पाहत होते. दोन्ही बाजूला घरे, दुकाने अगदी चिकटून चिकटून उभी होती. सगळ्याच जुन्या इमारती. 

त्यातच अचानक मला पुण्यश्लोक श्री देवी अहिल्याबाई होळकर वाड्याची पाटी दिसली. श्री अहिल्या रेवाळेश्वर मंदिर!! खूप आनंद झाला.

पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर वाडा. 

पण तिथे गाडी थांबवता येण्याजोगी नव्हती. शिवाय पुढच्या दोन्ही मंदिरात किती रांग असेल माहिती नव्हते. महागणपती मंदिर आणि गोकर्ण मुख्य मंदिर दोन्हीही दुपारी बारा साडेबारा पासून चार साडेचार तास बंद असतात असे कळले होते. त्यामुळे आम्ही ठरवले की आधी दोन्ही मंदिरे पाहू या आणि मग परत ह्या वाड्यात येऊ या. त्यामुळे मध्ये न थांबता आम्ही आधी महागणपती मंदिरात गेलो. 

शंकराचे आत्मलिंग, रावणाला मिळालेला वर आणि गणेशाचे गुराख्याच्या रूपात येणे ही गोष्ट तुम्ही आधीच्या ब्लॉग पोस्ट मध्ये वाचली आहेतच. तरी ज्यांनी तो भाग वाचला नसेल त्यांच्यासाठी इथे पुन्हा देते आहे. कारण गोकर्ण महाबळेश्वर हेच तर ते ठिकाण आहे जिथे ती कथा घडली. 

रावणाने अमर होण्यासाठी तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घेतले. काय हवे ते माग म्हटल्यावर रावणाने मागितले शंकराचे आत्मलिंग. भोळ्या शंकराने ते दिले. पण त्याचवेळी हे सांगितले की वाटेत कुठे हे खाली ठेवू नकोस. 

आता अविवेकी रावणाला शिवशंकराचे आत्मलिंग मिळणे, तो अमर होणे म्हणजे सृष्टीत हाहा:कार माजला असता. त्यासाठी काहीतरी करायला हवे होते. . 

वाटेत संध्याकाळ झाली. रावणाची सायंसंध्येची वेळ झाली. आता हे आत्मलिंग ठेवायचे कुठे? इतक्यात गणपती एका बाल गुराख्याचे रूप घेऊन समोर आला. त्याला रावणाने विनंती केली की तू थोडावेळ हातात धरून ठेवशील का?

गणपती म्हणाला, "ठीक आहे. पण मी तीनदा हाक मारल्यावर त्याच्या आत, तुला यायला पाहिजे. नाहीतर मी हे आत्मलिंग खाली ठेवून देईन. "

झालेही तसेच. गणपतीने तीन हाका मारल्या. रावण काही आला नाही. गणपतीने लिंग खाली ठेवले. नंतर रावण आला. क्रोधाने वेडापिसा होऊन ते आत्मलिंग जमिनीतून बाहेर काढू लागला. पण ते कसले निघणार? शंकराने तसेच सांगितले होते. 

आपल्याला आत्मलिंग घेऊन जाता येणार नाही हे लक्षात आल्यावर रावणाने ते उपटून काढण्याचा प्रयत्न केला. त्या भरात आत्मलिंग ओढले जाऊन त्याचा आकार गायीच्या कानासारखा झाला. म्हणून गोकर्ण! जिथे गणपतीने आत्मलिंग ठेवले होते ती मूळ जागा म्हणजे गोकर्ण महाबळेश्वर. महा बलाढ्य अशा रावणालाही ते तिथून हलवता आले नाही म्हणून महाबळेश्वर! 

असे सांगितले जाते की जिथे बाकी भाग उडाले, म्हणजे ते आत्मलिंग घालून आणलेला डबा, झाकण, त्याला बांधलेला धागा, त्याला गुंडाळलेले वस्त्र असे सगळे उडाले त्या जागा म्हणजे मुर्डेश्वर (वस्त्र), सज्जेश्वर (डबा), धारेश्वर (धागा) आणि गुणवंतेश्वर (झाकण). ह्याला (गोकर्ण महाबळेश्वरसह) म्हणतात पंचलिंग क्षेत्रे. भाविक लोक एका दिवसांत ह्या पाची ठिकाणांना भेट द्यायची अशी तीर्थयात्रा करतात. 

गणपतीला गोकर्ण महाबळेश्वरमध्ये विशेष महत्व आहे. तसेही आपण कोणत्याही मंदिरात जाण्याआधी गणेशाला नमस्कार करतो. इथे देखील मुख्य शिवमंदिराला भेट देण्याआधी महागणपतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. 

बाहेर हार, फुले, बकुळीचे वळेसर, पत्री, दुर्वा विकणाऱ्या अनेक मावश्या असतात. त्यांच्या पोषाखावरून विविध स्थानिक जमातींची ओळख होऊ शकते. आपल्याला त्यांची भाषा कळत नसतानाही शिताफीने त्या आपल्याला फुले, गजरे विकतात! 

 मंदिर अतिशय जुने आहे. मूर्ती तर जवळपास दीड हजार वर्षे जुनी आहे. फोटो काढायला अर्थातच आत अनुमती नाही. 

श्री गणेशाची उभी मूर्ती आहे. दोन हातांची मूर्ती पाहायला वेगळी वाटते. मोठ्ठे पोट आणि अगदी लहानसे पाय अशी मूर्ती आहे. पाय लहान असल्याने की काय माहिती नाही, नुकत्याच उभ्या राहू लागलेल्या बाळासारखी गोंडस वाटते मूर्ती! गणेशाच्या मस्तकावर खड्डा असल्यासारखा खोलगट भाग आहे. रावणाने रागावून गणपतीच्या डोक्यावर काहीतरी मारले अशी आख्यायिका आहे. 

महागणपती मंदिर 
महागणपती मंदिर 

महागणपती मंदिरात दर्शन अगदी शांतपणे घेता येते. त्यानंतर आम्ही गेलो गोकर्ण महाबळेश्वरच्या शिवमंदिरात.

शतकानुशतके जुने असे हे मंदिर आहे. मंदिराच्या बाह्यभागावर देवीदेवता तसेच काही पौराणिक प्रसंग ह्यांची शिल्पे आढळतात. 

मंदिरात आत गणेश व देवी ह्यांच्या डाव्या उजव्या बाजूला मूर्ती आहेत. मध्यभागी असलेल्या गाभाऱ्यात शंकराची पिंड आहे. 

गोकर्ण शिवमंदिर 
गोकर्ण शिवमंदिर 
गोकर्ण शिवमंदिर 
मंदिर भव्य आहे. गेल्या गेल्या आधी अनेक दगडी ओटे आहेत. ह्या मंदिराचे माहात्म्य मोठे असल्याने इथे भाविक अनेक प्रकारच्या पूजा, रुद्र करत असतात. अनेक भाविक, त्यांच्याकडून पूजा करवून घेणारे अनेक गुरुजी ह्या सगळ्यांची मंदिराच्या आवारात वर्दळ असते. 

मंदिराच्या आत फोटो काढायला अनुमती नाही. आम्ही गेलो तेव्हा कोणीतरी घरी आईवडिलांना दर्शन घडवण्यासाठी म्हणून विडिओ कॉल लावला होता. त्यांचा बोलण्याचा आवाज होता. दर्शनासाठी आलेले लोक, पूजा सांगणारे गुरुजी ह्यांचे आवाज गाभाऱ्यात घुमत होते. त्यातच 'मंदिरात बोलू नका, शांतता राखा, पटापट दर्शन घ्या' असे अगदी गाभाऱ्यात उभे असलेले गुरुजी सतत आणि मोठमोठ्याने ओरडून सांगत होते! सगळा कोलाहलच होता. काही वर्षांपूर्वी शांततेत घेतलेले राजस दर्शन आणि ह्या वेळचे दर्शन ह्यात फार फरक जाणवला. 

महादेव तर शतकानुशतके तोच आहे, तिथेच आहे आणि तसाच आहे. बदलते आहे ती माणसांची वृत्ती आणि दर्शन घेण्यामागील भावना. 

ह्या मंदिरात प्रवेश करताना स्त्रियांनी भारतीय पोशाखात असावे आणि पुरुषांनी शर्ट काढून प्रवेश करावा अशी मंदिर व्यवस्थापनाची अपेक्षा आहे. मंदिर दुपारी चार तास बंद असते. 

मंदिराच्या आसपासचा सर्वच परिसर जुन्या काळची घरे असलेला असा आहे. आम्ही गेलो त्या दिवशी तरी रस्त्यावर अनेक गायी गुरे होती. 

दोन्ही मंदिरातील दर्शन वेळेत झाले होते. मग येताना जो होळकर वाडा दिसला होता तिथे आम्ही गेलो. महागणपती मंदिर, गोकर्णचे शिव मंदिर आणि हा होळकर वाडा हे सगळे अगदी जवळ जवळ आहे. चालत गेल्यावर पाच मिनिटे सुद्धा लागणार नाहीत असे. 

शिक्का 
होळकर वाडा 
होळकर वाडा 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी 
होळकर वाडा 
रेवाळेश्वर महादेव 
होळकर वाडा 
अगदी जुन्या पद्धतीचा लाकडी खांब तुळयांच्या ह्या वाड्यातील देवघरात असावे तसे हे रेवाळेश्वर महादेवाचे मंदिर आहे. अहिल्यादेवींच्या काळातील हे मंदिर असून होळकर संस्थानाने नियुक्त केले बुगडे नावाचे व्यवस्थापक ह्या वाड्याची व्यवस्था पाहतात. त्यांचा निवासही वाड्यातच आहे. 

त्यांच्या अनेक पिढ्या इथे गोकर्णमध्येच रेवाळेश्वराची व्यवस्था पाहण्यासाठी राहिल्या असणार. दारावरच्या पाटीवरच तीन पिढ्यांची नावे होती. 

तीन पिढ्या 
तेथील सध्याचे व्यवस्थापक श्री बुगडे ह्यांची अनुमती घेऊन, आत जाऊन दर्शन घेतले आणि फोटोही काढले. रस्त्याने जाताना अचानक पाटी दिसली म्हणून हा वाडा आणि रेवाळेश्वर मंदिर पाहू शकले. नाहीतर इथे असे मंदिर आहे हे मला माहिती पण नव्हते.

नंतर समुद्रकिनाऱ्याकडे निघालो. त्या बाजूला गोकर्ण मुख्य मंदिराचे आणखी एक प्रवेशद्वार आहे. 

गोकर्ण 
समुद्राकडे तोंड करून असलेले हे प्रवेशद्वार जे समुद्रात स्नान करून मग दर्शन घेतात त्यांच्यासाठी जवळ असल्याने अगदी सोयीचे आहे

गोकर्णमध्ये बघण्यासाठी इतर अनेक मंदिरे आहेत, सुंदर समुद्रकिनारे आहेत. वरून पाहिल्यावर ह्याचा आकार ओम सारखा दिसतो असा ओम बीच, मंदिराजवळचा गोकर्ण बीच हे दोन विशेष प्रसिद्ध आहेत. 

ओम बीचला जाण्यासाठी मात्र साधारण शंभर पायऱ्या उतरून जावे लागते. 

ओम बीच 
आम्हाला पुढे कारवारला जायचे असल्याने आम्ही गोकर्णमध्ये अजून जास्त वेळ हिंडलो नाही. 
आता परतीचा प्रवास सुरु झाला होता. मी प्रत्येक भागात लिहिले की कोस्टल कर्नाटकचे रस्ते खूप छान आहेत. पण ते कसे..तर ही एक छोटीशी विडिओ बघा. मला आता नेमके आठवत नाही आहे. पण बहुतेक हा शृंगेरीला जातानाचा घाट असावा! 

कारवारच्या अनुभवावर आधीच पोस्ट केली होती.. रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे कारवार. त्यामुळे कोस्टल कर्नाटक मालिका आजच्या ह्या भागानेच समाप्त होते आहे. 
भारतात इतकी विविधता, इतके सौंदर्य, इतकी ऐतिहासिक ठिकाणे, धार्मिक स्थाने आहेत की प्रवास करावा आणि वर्णन करावे तेवढे कमीच आहे. आपला देश, आपले लोक, आपली संस्कृती जाणून घेत राहू या! इतरांनाही माहिती सांगत राहू या!
रसिक वाचकांनी ह्या मालिकेला अगदी भरभरून प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार!!

#Gokarna Mahabaleshwar, #Om Beach Gokarna, #Coastal Karnataka Tourism, #Mirjan Fort to Gokarna, #South Kashi of India, #Karnataka West Coast road trip, #Shri Maha Ganpati Temple Gokarna, #Atma Linga story in Marathi, #Ravana and Ganpati Katha, #Panchalinga Darshana Karnataka, #Shiva Temples in South India, #Ahilyabai Holkar Wada Gokarna, #Places to visit in Karnataka, #Indian domestic travel destinations, #Marathi travel blog, # मराठी ट्रॅव्हल ब्लॉग, #Silver Vegan Travels, #Gokarna travel guide Marathi





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

कोस्टल कर्नाटक ६ - अविस्मरणीय शरावती बॅकवॉटर बोटिंग, शरावती कांडला मॅन्ग्रोव्ह बोर्ड वॉक

मी आधीच्या पोस्टमध्ये सांगितले होते की आजचा सूर्यास्त समुद्रात होता तर उद्याचा सूर्योदय शरावती नदीत असणार आहे! तोच हा सूर्योदय शरावती नदीत, कमळांच्या मध्ये.  शरावती बॅकवॉटर बोटिंग  दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहापर्यंत आम्ही बोटिंगच्या ठिकाणी पोचलो. कारण आम्हाला सूर्योदय चुकवायचा नव्हता. होनावर जवळचे शरावती नदीतील बोटिंग हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.  आजूबाजूची शांतता, संथ पाणी, स्वच्छ नितळ पाण्यात वाकून आपले प्रतिबिंब न्याहाळणारी नारळाची झाडे, पाण्यात अध्ये मध्ये असलेली लहानशी बेटे, खारफूटीची जंगले, कमळाची पाण्यावर तरंगणारी पाने, उगवत्या सूर्याची पाण्यात मिसळणारी किरणे, त्याने तांबूस झालेले पाणी .. एक वेगळेच जग असते ते. तुम्ही जितक्या वेळासाठी बोट ठरवलेली असेल.. तास दीड तास..  तो वेळ, तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असणार हे मी अगदी खात्रीने सांगू शकते.  आपोआप जगाचा, आयुष्याचा कोलाहल मंद होत जातो. पहाटेचा मवाळ प्रकाश, पाण्यावर हेलकावणारी नाव, हवेतला अगदी किंचितसा सुखद गारवा आणि मुरत जाणारी शांतता ह्या सगळ्याने मन निवळत जाते.  आम्ही गेलो त्या दिवशी,...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका  आज उडुपीहून लवकर निघून शृंगेरीला पोचण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच निघालो. रस्ता खूपच छान होता. आता खरं सांगायचे तर कोस्टल कर्नाटक प्रवासात रस्ता सुंदर होता म्हणणे ही द्विरुक्तीच आहे.  सगळ्या सडका अगदी एका पातळीतील आणि गुळगुळीत आहेत. खड्डे खळगे, रस्ते वर खाली असणे असे काही नसल्याने महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हाला थोडे चुकल्यासारखे वाटले खरे!!! शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, स्वच्छता ह्यामुळे प्रवास फार आनंदाचा होतो. उडुपी शृंगेरी रस्ता तर आगुंबे जंगलातून जातो. त्यामुळे दाट झाडी होती. रस्त्यात सुप्रसिद्ध आगुंबे घाटही येतोच. सकाळची प्रसन्न वेळ आणि इतका छान रस्ता..दिवसाची चांगली सुरुवात होण्यासाठी आणखी काय पाहिजे?!!  आम्हाला वाटले होते इतक्या लवकर फारसे कोणी श्रुंगेरीत आलेले नसेल. पण शृंगेरीला पोचल्यावर लक्षात आले की आमच्यासारखाच विचार अनेकांनी केला होता!  अनेक बस रात्रभराचा प्रवास करून सकाळी शृंगेरीला पोचल्या होत्या. त्या लोकांच्या प्रातर्विधी आणि अंघोळीसाठी अनेक ठिकाणी माफक पैसे घेऊन उत्तम सोय केलेली होती....

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....