मुख्य सामग्रीवर वगळा

मार्तंड सूर्य मंदिर, अनंतनाग, काश्मीर

 ढासळलेले खांब, उडालेले छप्पर, कळसाचा पत्ताच नाही. भव्य आवारात सर्वत्र भग्न शिलाखंड पडलेले असे उध्वस्त मंदिर पाहून मन विषण्ण होते.

विस्तीर्ण आवार, तुटक्या खांबांवरची आणि भिंतीवरची कलाकुसर, मुळातले ते तीन मजली मंदिर असावे असे वाटायला लावणारी रचना, सर्वच मंदिराच्या गतवैभवाची जाणीव करून देते.




हे आहे मार्तंड सूर्य मंदिर, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्यातर्फे संरक्षित असलेले स्मारक. पण तसे संरक्षित असल्याच्या खुणा मात्र प्रवेशद्वाराशी लावलेली पाटी सोडता कुठेही दिसत नाहीत.




उघडे राहून, ऊन, पाऊस, वारा, बर्फ यांना तोंड देत हे मंदिर दरवर्षी आणखीच ढासळते आहे असे जुने फोटो पाहताना नक्कीच वाटते. मंदिराच्या आवारातील उद्यान हे स्थानिकांचे संध्याकाळी फिरायला येण्याचे किंवा सुट्टीच्या दिवशी सहलीला येण्याचे ठिकाण आहे. मंदिराच्या अवशेषांचे रक्षण करण्यासाठी कोणीही रखवालदार नसतो. ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून ते भग्नावशेष दिवसेंदिवस अधिकच ढासळत आहेत.

कार्कोट वंशाचा राजा ललितादित्य मुक्तपीड ह्याने आठव्या शतकात ह्या मंदिराचे निर्माण केले.

राजा ललितादित्य हा काश्मीरच्या इतिहासातील अत्यंत शूर आणि पराक्रमी राजा होता. अजिंक्य राजा म्हणून तो इतिहासाला ज्ञात आहे. त्याने अरब आक्रमणापासून तर भारताचे रक्षण केलेच शिवाय तिबेट मधील आक्रमकांपासून पण केले. इतकेच नव्हे तर आपल्या राज्याचा विस्तार पार अफगाणिस्तान तसेच सध्याच्या उजबेकिस्तान, ताजीकीस्तान, किर्गिस्तानपर्यंत केला. कवी कल्हणाने लिहिलेल्या 'राजतरंगिणी' या काश्मीरच्या इतिहास विषयक काव्यग्रंथात ललितादित्याविषयी, त्याच्या पराक्रमाविषयी गौरवपूर्ण व सविस्तर लिहिलेले आढळते. ललितादित्याने काश्मीर प्रांतात अनेक मंदिरांची निर्मिती केली. अत्यंत सुंदर शिल्पकला व स्थापत्य असलेली ही मंदिरे होती. 'मार्तंड सूर्य मंदिर' हे त्यापैकीच एक आणि प्रमुख मंदिर.


भारतातील केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यात हे मंदिर आहे. पहलगाम पासून साधारण चाळीस किलोमीटरवर हे ठिकाण आहे. कधीकाळी या भागाचे नाव नक्कीच मार्तंड असणार. पण सध्या मात्र ते मट्टन गाव या नावाने ओळखले जाते. एखाद्या नावाचा अपभ्रंश किती विचित्र होऊ शकतो, तो झालेला अपभ्रंश कसा रुळतो आणि आता स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही तो तसाच कसा राहतो ह्याचे हे दुर्दैवी उदाहरण आहे.


आठव्या शतकात जेव्हा हे मंदिर निर्माण केले गेले. पण काही तज्ज्ञांचे म्हणणे असे आहे की मंदिराच्या पायाचा काही भाग त्याच्याही शेकडो वर्ष आधीपासूनच आहे. म्हणजेच त्याचा अर्थ हे मंदिर आठव्या शतकापेक्षाही पुरातन आहे. जेव्हा आठव्या शतकात हे मंदिर निर्माण केले गेले तेव्हा अशा उंचीवर बनवले होते की तिथून संपूर्ण कश्मीर घाटी दिसायची.


तेव्हा काश्मिरी वास्तुकलेचा एक अद्भुत नमुना म्हणून सुप्रसिद्ध असलेले हे मंदिर आपल्या निर्माणानंतर पाच-सहाशे वर्ष वैभवाच्या शिखरावर होते. पंधराव्या शतकात शाह मीर घराण्यातील सिकंदर राजा बुतशिकन म्हणून ओळखला जातो. बुतशिकन म्हणजे मूर्तिभंजक. सिकंदराचा समकालीन इतिहासकार हसन अली लिहितो की मंदिरातील तर सोडाच पण लोकांच्या घरातील हिंदू देवतांच्या मूर्ती देखील सिकंदराने फोडून टाकल्या. हिंदू लोकांचे जबरदस्ती धर्मांतर करून त्यांना इस्लाम धर्माचे अनुयायी केले. ज्यांनी धर्मांतर करणे मान्य केले नाही त्यांचे शिरकाण केले गेले. सिकंदराने उध्वस्त केलेल्या अनेक मंदिरांपैकी मार्तंड सूर्य मंदिर हे एक मंदिर.

हे मंदिर इतके भव्य होते, इतकी शिल्पे कोरलेली होती, इतके मजबूत होते की ते नष्ट करण्यासाठी सिकंदराच्या माणसांना एक वर्ष लागले.


सूर्य देवतेला समर्पित असलेली देशभरात काही मोजकी मंदिरे आहेत. ओरिसातील कोणार्क आहे, गुजराथमध्ये मोढेरा आहे. उत्तर भारतात विशेष आढळत नाहीत. त्यामुळेही काश्मीरमधील हे मार्तंड सूर्य मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे.


मंदिराच्या भव्य आवारात चारी बाजूंना दीर्घा म्हणजे गॅलरी म्हणावी अशी रचना असावी. कारण त्याचे अवशेष असलेले खांब आपल्याला दिसतात. मग कदाचित ही लहान लहान मंदिरे असावीत किंवा अभ्यासाची जागा असावी किंवा नुसता मंदिर रचनेतील सौंदर्य वाढवण्याचा एक भाग असावा. या गॅलरीच्या खांबांवरची नक्षी सुंदर असावी अशी कल्पना भग्नावशेषांवरून आपल्याला येऊ शकते. हे एकूण 84 खांब आहेत असे आपल्याला माहितीपत्रकात वाचता येते.



मुख्य मंदिराच्या समोर आपल्याला पायऱ्या बांधलेले कुंड आढळून येते. . अनेक उद्ध्वस्त मूर्ती आपल्याला दिसतात. गंगा, यमुना, विष्णू अशा मूर्ती ओळखता येतात. एक तीन मस्तकांची मूर्ती दिसते ती बहुदा ब्रह्मदेवाची असावी.








केवळ निसर्गाचा प्रकोप असता तर कदाचित मूर्ती इतक्या वाईट अवस्थेत दिसल्या नसत्या. विकृत मनोवृत्तीच्या माणसांनी तोडून, घाव घालून, घासून त्या खराब केल्या आहेत.

मुख्य मंदिरातील गर्भगृह, त्यासमोरच सभा मंडप, त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या लहान खोल्या यावरून मंदिराच्या भव्यतेचा अंदाज आपण करू शकतो. गाभारा तर अगदी सगळ्या मूर्ती नाहीश्या करून ओसाड केला आहे.









'प्रत्नकीर्तिमपावृणु' हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे बोधवाक्य आहे. आपल्याला सगळ्या संरक्षित स्मारकांच्या पाट्यांवर हे वाचायला मिळते. त्याचा अर्थ आहे की चला प्रयत्न करू या. आपल्या पूर्वजांचा गौरव पुढील पिढ्यांपर्यंत पोचवू या. मात्र असे प्रयत्न या मंदिराच्या संरक्षणासाठी,संवर्धनासाठी आणि संरचनेसाठी होत आहेत की नाही याचा संभ्रम पडावा अशीच स्थिती मार्तंड मंदिराची आहे.

एरवी आपण एखाद्या शिल्पकलेनी नटलेल्या मंदिरात गेलो की तिथे प्रत्येक शिल्पाचे बारकाईने निरीक्षण करतो. अभ्यास करतो, त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करतो. पण मार्तंड मंदिराची उद्ध्वस्त स्थिती पाहून मन इतके विषण्ण झाले होते की तिथे फार वेळ थांबावे असेच वाटले नाही. मात्र तुम्ही कोणी जाल तेव्हा ही चूक करू नका. तेथील ज्या मूर्ती थोड्याफार बऱ्या अवस्थेत असतील त्यांचे फोटो काढून ठेवा. एक मोलाचा ऐतिहासिक ऐवज असेल तो.


मार्तंड मंदिर फार कमी प्रवासी कंपन्या दाखवतात. पण आपण सर्वांनी जर का आपल्या काश्मीर पर्यटनात या मंदिराचा समावेश केला, या मंदिराला जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवून दिली, तर कदाचित जागृती निर्माण होईल आणि मंदिराचे संगोपन, संवर्धन व्हावे यासाठी प्रयत्न सुरू होतील.


नॅशनल मॉन्युमेंट अथॉरिटी म्हणजेच राष्ट्रीय संस्मारक प्राधिकरणाच्या अधिकृत चिन्हात मार्तंड मंदिराचा समावेश असल्याची बातमी मध्ये वाचली होती पण प्राधिकरणाच्या संस्थळावर मात्र हे चिन्ह अजून आलेले दिसत नाही.




1975 मध्ये रिलीज झालेल्या आंधी सिनेमातील "तेरे बिना जिंदगी से.... " ह्या गाण्यात मार्तंड मंदिरातील चित्रीकरण झाले होते.





इथे दिग्दर्शक दिसतो असे म्हणता येईल असे ते दृश्य होते. भंगलेल्या नात्याची कहाणी आणि मागचे उध्वस्त मंदिर.

आरकीओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया - ए एस आय ची साईट पाहिली तर त्याच्यावर काश्मीरमधील अनंतनाग, बारामुल्ला, कारगिल, पुलवामा अशा अनेक जिल्ह्यातील मंदिरांच्या म्हणजे अर्थातच मंदिरांच्या अवशेषांची स्थळे असलेली यादी सापडते.

कधीतरी ही सर्व मंदिरे निर्धोकपणे पर्यटकांना पाहता येतील अशी आशा करूयात.

—------

काश्मीर पर्यटनासाठी सूचना

१. श्रीनगर विमानतळाच्या बाहेर आलात की पुन्हा श्रीनगर विमानतळावर जाईपर्यंत बहुतेक् सगळ्या मोबाईलना रेंज नसते हे लक्षात ठेवावे.

२. भारतात सगळीकडे डिजिटल पेमेंट स्वीकारत असताना काश्मीरमध्ये मात्र बऱ्याच ठिकाणी अजूनही रोख रकमेचा आग्रह धरला जातो.

३. टीप घेण्याविषयी आणि ती त्यांना हवी तेवढी घेण्याविषयी सर्व सेवा पुरवणारे आग्रही असतात.

४. हे सगळे असले तरी काश्मीर अत्यंत सुंदर आहे खरोखर धरतीवरचा स्वर्ग आहे. तेव्हा नक्की पाहायलाच हवे.


 

टिप्पण्या

  1. एकदम मस्त.

    चीड चीड होते नकारात्मक विचारांमुळे आणि उदासीनतेमुळे. कलाकार आणि कलाकारी एवढ्या विपुल प्रमाणात आपल्याकडे होती आणि आहे पण विध्वंस केला ह्या सगळ्याचा, त्याने मन विषण्ण होते.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

कोस्टल कर्नाटक ६ - अविस्मरणीय शरावती बॅकवॉटर बोटिंग, शरावती कांडला मॅन्ग्रोव्ह बोर्ड वॉक

मी आधीच्या पोस्टमध्ये सांगितले होते की आजचा सूर्यास्त समुद्रात होता तर उद्याचा सूर्योदय शरावती नदीत असणार आहे! तोच हा सूर्योदय शरावती नदीत, कमळांच्या मध्ये.  शरावती बॅकवॉटर बोटिंग  दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहापर्यंत आम्ही बोटिंगच्या ठिकाणी पोचलो. कारण आम्हाला सूर्योदय चुकवायचा नव्हता. होनावर जवळचे शरावती नदीतील बोटिंग हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.  आजूबाजूची शांतता, संथ पाणी, स्वच्छ नितळ पाण्यात वाकून आपले प्रतिबिंब न्याहाळणारी नारळाची झाडे, पाण्यात अध्ये मध्ये असलेली लहानशी बेटे, खारफूटीची जंगले, कमळाची पाण्यावर तरंगणारी पाने, उगवत्या सूर्याची पाण्यात मिसळणारी किरणे, त्याने तांबूस झालेले पाणी .. एक वेगळेच जग असते ते. तुम्ही जितक्या वेळासाठी बोट ठरवलेली असेल.. तास दीड तास..  तो वेळ, तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असणार हे मी अगदी खात्रीने सांगू शकते.  आपोआप जगाचा, आयुष्याचा कोलाहल मंद होत जातो. पहाटेचा मवाळ प्रकाश, पाण्यावर हेलकावणारी नाव, हवेतला अगदी किंचितसा सुखद गारवा आणि मुरत जाणारी शांतता ह्या सगळ्याने मन निवळत जाते.  आम्ही गेलो त्या दिवशी,...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका  आज उडुपीहून लवकर निघून शृंगेरीला पोचण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच निघालो. रस्ता खूपच छान होता. आता खरं सांगायचे तर कोस्टल कर्नाटक प्रवासात रस्ता सुंदर होता म्हणणे ही द्विरुक्तीच आहे.  सगळ्या सडका अगदी एका पातळीतील आणि गुळगुळीत आहेत. खड्डे खळगे, रस्ते वर खाली असणे असे काही नसल्याने महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हाला थोडे चुकल्यासारखे वाटले खरे!!! शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, स्वच्छता ह्यामुळे प्रवास फार आनंदाचा होतो. उडुपी शृंगेरी रस्ता तर आगुंबे जंगलातून जातो. त्यामुळे दाट झाडी होती. रस्त्यात सुप्रसिद्ध आगुंबे घाटही येतोच. सकाळची प्रसन्न वेळ आणि इतका छान रस्ता..दिवसाची चांगली सुरुवात होण्यासाठी आणखी काय पाहिजे?!!  आम्हाला वाटले होते इतक्या लवकर फारसे कोणी श्रुंगेरीत आलेले नसेल. पण शृंगेरीला पोचल्यावर लक्षात आले की आमच्यासारखाच विचार अनेकांनी केला होता!  अनेक बस रात्रभराचा प्रवास करून सकाळी शृंगेरीला पोचल्या होत्या. त्या लोकांच्या प्रातर्विधी आणि अंघोळीसाठी अनेक ठिकाणी माफक पैसे घेऊन उत्तम सोय केलेली होती....

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

कोस्टल कर्नाटक- २ मंगळुरू, मुलकी, उचिल, उडुपी

  आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते.  नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते.  मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात.  काद्री मंजुनाथ मंदिर  का...