Skip to main content

मार्तंड सूर्य मंदिर, अनंतनाग, काश्मीर

 ढासळलेले खांब, उडालेले छप्पर, कळसाचा पत्ताच नाही. भव्य आवारात सर्वत्र भग्न शिलाखंड पडलेले असे उध्वस्त मंदिर पाहून मन विषण्ण होते.

विस्तीर्ण आवार, तुटक्या खांबांवरची आणि भिंतीवरची कलाकुसर, मुळातले ते तीन मजली मंदिर असावे असे वाटायला लावणारी रचना, सर्वच मंदिराच्या गतवैभवाची जाणीव करून देते.




हे आहे मार्तंड सूर्य मंदिर, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्यातर्फे संरक्षित असलेले स्मारक. पण तसे संरक्षित असल्याच्या खुणा मात्र प्रवेशद्वाराशी लावलेली पाटी सोडता कुठेही दिसत नाहीत.




उघडे राहून, ऊन, पाऊस, वारा, बर्फ यांना तोंड देत हे मंदिर दरवर्षी आणखीच ढासळते आहे असे जुने फोटो पाहताना नक्कीच वाटते. मंदिराच्या आवारातील उद्यान हे स्थानिकांचे संध्याकाळी फिरायला येण्याचे किंवा सुट्टीच्या दिवशी सहलीला येण्याचे ठिकाण आहे. मंदिराच्या अवशेषांचे रक्षण करण्यासाठी कोणीही रखवालदार नसतो. ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून ते भग्नावशेष दिवसेंदिवस अधिकच ढासळत आहेत.

कार्कोट वंशाचा राजा ललितादित्य मुक्तपीड ह्याने आठव्या शतकात ह्या मंदिराचे निर्माण केले.

राजा ललितादित्य हा काश्मीरच्या इतिहासातील अत्यंत शूर आणि पराक्रमी राजा होता. अजिंक्य राजा म्हणून तो इतिहासाला ज्ञात आहे. त्याने अरब आक्रमणापासून तर भारताचे रक्षण केलेच शिवाय तिबेट मधील आक्रमकांपासून पण केले. इतकेच नव्हे तर आपल्या राज्याचा विस्तार पार अफगाणिस्तान तसेच सध्याच्या उजबेकिस्तान, ताजीकीस्तान, किर्गिस्तानपर्यंत केला. कवी कल्हणाने लिहिलेल्या 'राजतरंगिणी' या काश्मीरच्या इतिहास विषयक काव्यग्रंथात ललितादित्याविषयी, त्याच्या पराक्रमाविषयी गौरवपूर्ण व सविस्तर लिहिलेले आढळते. ललितादित्याने काश्मीर प्रांतात अनेक मंदिरांची निर्मिती केली. अत्यंत सुंदर शिल्पकला व स्थापत्य असलेली ही मंदिरे होती. 'मार्तंड सूर्य मंदिर' हे त्यापैकीच एक आणि प्रमुख मंदिर.


भारतातील केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यात हे मंदिर आहे. पहलगाम पासून साधारण चाळीस किलोमीटरवर हे ठिकाण आहे. कधीकाळी या भागाचे नाव नक्कीच मार्तंड असणार. पण सध्या मात्र ते मट्टन गाव या नावाने ओळखले जाते. एखाद्या नावाचा अपभ्रंश किती विचित्र होऊ शकतो, तो झालेला अपभ्रंश कसा रुळतो आणि आता स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही तो तसाच कसा राहतो ह्याचे हे दुर्दैवी उदाहरण आहे.


आठव्या शतकात जेव्हा हे मंदिर निर्माण केले गेले. पण काही तज्ज्ञांचे म्हणणे असे आहे की मंदिराच्या पायाचा काही भाग त्याच्याही शेकडो वर्ष आधीपासूनच आहे. म्हणजेच त्याचा अर्थ हे मंदिर आठव्या शतकापेक्षाही पुरातन आहे. जेव्हा आठव्या शतकात हे मंदिर निर्माण केले गेले तेव्हा अशा उंचीवर बनवले होते की तिथून संपूर्ण कश्मीर घाटी दिसायची.


तेव्हा काश्मिरी वास्तुकलेचा एक अद्भुत नमुना म्हणून सुप्रसिद्ध असलेले हे मंदिर आपल्या निर्माणानंतर पाच-सहाशे वर्ष वैभवाच्या शिखरावर होते. पंधराव्या शतकात शाह मीर घराण्यातील सिकंदर राजा बुतशिकन म्हणून ओळखला जातो. बुतशिकन म्हणजे मूर्तिभंजक. सिकंदराचा समकालीन इतिहासकार हसन अली लिहितो की मंदिरातील तर सोडाच पण लोकांच्या घरातील हिंदू देवतांच्या मूर्ती देखील सिकंदराने फोडून टाकल्या. हिंदू लोकांचे जबरदस्ती धर्मांतर करून त्यांना इस्लाम धर्माचे अनुयायी केले. ज्यांनी धर्मांतर करणे मान्य केले नाही त्यांचे शिरकाण केले गेले. सिकंदराने उध्वस्त केलेल्या अनेक मंदिरांपैकी मार्तंड सूर्य मंदिर हे एक मंदिर.

हे मंदिर इतके भव्य होते, इतकी शिल्पे कोरलेली होती, इतके मजबूत होते की ते नष्ट करण्यासाठी सिकंदराच्या माणसांना एक वर्ष लागले.


सूर्य देवतेला समर्पित असलेली देशभरात काही मोजकी मंदिरे आहेत. ओरिसातील कोणार्क आहे, गुजराथमध्ये मोढेरा आहे. उत्तर भारतात विशेष आढळत नाहीत. त्यामुळेही काश्मीरमधील हे मार्तंड सूर्य मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे.


मंदिराच्या भव्य आवारात चारी बाजूंना दीर्घा म्हणजे गॅलरी म्हणावी अशी रचना असावी. कारण त्याचे अवशेष असलेले खांब आपल्याला दिसतात. मग कदाचित ही लहान लहान मंदिरे असावीत किंवा अभ्यासाची जागा असावी किंवा नुसता मंदिर रचनेतील सौंदर्य वाढवण्याचा एक भाग असावा. या गॅलरीच्या खांबांवरची नक्षी सुंदर असावी अशी कल्पना भग्नावशेषांवरून आपल्याला येऊ शकते. हे एकूण 84 खांब आहेत असे आपल्याला माहितीपत्रकात वाचता येते.



मुख्य मंदिराच्या समोर आपल्याला पायऱ्या बांधलेले कुंड आढळून येते. . अनेक उद्ध्वस्त मूर्ती आपल्याला दिसतात. गंगा, यमुना, विष्णू अशा मूर्ती ओळखता येतात. एक तीन मस्तकांची मूर्ती दिसते ती बहुदा ब्रह्मदेवाची असावी.








केवळ निसर्गाचा प्रकोप असता तर कदाचित मूर्ती इतक्या वाईट अवस्थेत दिसल्या नसत्या. विकृत मनोवृत्तीच्या माणसांनी तोडून, घाव घालून, घासून त्या खराब केल्या आहेत.

मुख्य मंदिरातील गर्भगृह, त्यासमोरच सभा मंडप, त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या लहान खोल्या यावरून मंदिराच्या भव्यतेचा अंदाज आपण करू शकतो. गाभारा तर अगदी सगळ्या मूर्ती नाहीश्या करून ओसाड केला आहे.









'प्रत्नकीर्तिमपावृणु' हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे बोधवाक्य आहे. आपल्याला सगळ्या संरक्षित स्मारकांच्या पाट्यांवर हे वाचायला मिळते. त्याचा अर्थ आहे की चला प्रयत्न करू या. आपल्या पूर्वजांचा गौरव पुढील पिढ्यांपर्यंत पोचवू या. मात्र असे प्रयत्न या मंदिराच्या संरक्षणासाठी,संवर्धनासाठी आणि संरचनेसाठी होत आहेत की नाही याचा संभ्रम पडावा अशीच स्थिती मार्तंड मंदिराची आहे.

एरवी आपण एखाद्या शिल्पकलेनी नटलेल्या मंदिरात गेलो की तिथे प्रत्येक शिल्पाचे बारकाईने निरीक्षण करतो. अभ्यास करतो, त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करतो. पण मार्तंड मंदिराची उद्ध्वस्त स्थिती पाहून मन इतके विषण्ण झाले होते की तिथे फार वेळ थांबावे असेच वाटले नाही. मात्र तुम्ही कोणी जाल तेव्हा ही चूक करू नका. तेथील ज्या मूर्ती थोड्याफार बऱ्या अवस्थेत असतील त्यांचे फोटो काढून ठेवा. एक मोलाचा ऐतिहासिक ऐवज असेल तो.


मार्तंड मंदिर फार कमी प्रवासी कंपन्या दाखवतात. पण आपण सर्वांनी जर का आपल्या काश्मीर पर्यटनात या मंदिराचा समावेश केला, या मंदिराला जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवून दिली, तर कदाचित जागृती निर्माण होईल आणि मंदिराचे संगोपन, संवर्धन व्हावे यासाठी प्रयत्न सुरू होतील.


नॅशनल मॉन्युमेंट अथॉरिटी म्हणजेच राष्ट्रीय संस्मारक प्राधिकरणाच्या अधिकृत चिन्हात मार्तंड मंदिराचा समावेश असल्याची बातमी मध्ये वाचली होती पण प्राधिकरणाच्या संस्थळावर मात्र हे चिन्ह अजून आलेले दिसत नाही.




1975 मध्ये रिलीज झालेल्या आंधी सिनेमातील "तेरे बिना जिंदगी से.... " ह्या गाण्यात मार्तंड मंदिरातील चित्रीकरण झाले होते.





इथे दिग्दर्शक दिसतो असे म्हणता येईल असे ते दृश्य होते. भंगलेल्या नात्याची कहाणी आणि मागचे उध्वस्त मंदिर.

आरकीओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया - ए एस आय ची साईट पाहिली तर त्याच्यावर काश्मीरमधील अनंतनाग, बारामुल्ला, कारगिल, पुलवामा अशा अनेक जिल्ह्यातील मंदिरांच्या म्हणजे अर्थातच मंदिरांच्या अवशेषांची स्थळे असलेली यादी सापडते.

कधीतरी ही सर्व मंदिरे निर्धोकपणे पर्यटकांना पाहता येतील अशी आशा करूयात.

—------

काश्मीर पर्यटनासाठी सूचना

१. श्रीनगर विमानतळाच्या बाहेर आलात की पुन्हा श्रीनगर विमानतळावर जाईपर्यंत बहुतेक् सगळ्या मोबाईलना रेंज नसते हे लक्षात ठेवावे.

२. भारतात सगळीकडे डिजिटल पेमेंट स्वीकारत असताना काश्मीरमध्ये मात्र बऱ्याच ठिकाणी अजूनही रोख रकमेचा आग्रह धरला जातो.

३. टीप घेण्याविषयी आणि ती त्यांना हवी तेवढी घेण्याविषयी सर्व सेवा पुरवणारे आग्रही असतात.

४. हे सगळे असले तरी काश्मीर अत्यंत सुंदर आहे खरोखर धरतीवरचा स्वर्ग आहे. तेव्हा नक्की पाहायलाच हवे.


 

Comments

  1. एकदम मस्त.

    चीड चीड होते नकारात्मक विचारांमुळे आणि उदासीनतेमुळे. कलाकार आणि कलाकारी एवढ्या विपुल प्रमाणात आपल्याकडे होती आणि आहे पण विध्वंस केला ह्या सगळ्याचा, त्याने मन विषण्ण होते.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...

शिवथरघळ

जर आपण भारताचा नकाशा पाहिला  तर आपल्याला नकाशात डावीकडे, गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत काळसर  हिरवी रेषा दिसते. ही रेषा  गुजराथ येथून सुरु होते  आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू मार्गे जाऊन केरळला पोहोचते. ती रेषा म्हणजेच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट म्हणजे दख्खनच्या पठाराची जणू किनारच आहे. दख्खन पठाराच्या काठावरच्या ह्या पर्वत रांगा आहेत.  या भागात बरीच जंगले, जलसाठे, धबधबे आहेत आणि जैवविविधता तसेच त्याचे वय यामुळे या भागाला 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून ओळखले गेले आहे. पश्चिम घाट हिमालयापेक्षाही जुना आहे! वरंधा घाट  📷विकिमीडिया कॉमन्स  पश्चिम घाट हा अनेक मुख्य नद्यांचे उगमस्थान आहे. वरील छायाचित्रात दिसते आहे त्या प्रमाणे, वर्षा ऋतूत या प्रदेशात अनेक धबधबे पाहायला मिळतात.  पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) अनेक सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे शिवथरघळ धबधबा. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण रौद्र सौंदर्यानिशी आणि ताकदीनिशी रोरावत खाली येताना दिसतो.  हा धबधबा सुमारे शंभर फूट उंचीवर...