Skip to main content

मार्तंड सूर्य मंदिर, अनंतनाग, काश्मीर

 ढासळलेले खांब, उडालेले छप्पर, कळसाचा पत्ताच नाही. भव्य आवारात सर्वत्र भग्न शिलाखंड पडलेले असे उध्वस्त मंदिर पाहून मन विषण्ण होते.

विस्तीर्ण आवार, तुटक्या खांबांवरची आणि भिंतीवरची कलाकुसर, मुळातले ते तीन मजली मंदिर असावे असे वाटायला लावणारी रचना, सर्वच मंदिराच्या गतवैभवाची जाणीव करून देते.




हे आहे मार्तंड सूर्य मंदिर, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्यातर्फे संरक्षित असलेले स्मारक. पण तसे संरक्षित असल्याच्या खुणा मात्र प्रवेशद्वाराशी लावलेली पाटी सोडता कुठेही दिसत नाहीत.




उघडे राहून, ऊन, पाऊस, वारा, बर्फ यांना तोंड देत हे मंदिर दरवर्षी आणखीच ढासळते आहे असे जुने फोटो पाहताना नक्कीच वाटते. मंदिराच्या आवारातील उद्यान हे स्थानिकांचे संध्याकाळी फिरायला येण्याचे किंवा सुट्टीच्या दिवशी सहलीला येण्याचे ठिकाण आहे. मंदिराच्या अवशेषांचे रक्षण करण्यासाठी कोणीही रखवालदार नसतो. ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून ते भग्नावशेष दिवसेंदिवस अधिकच ढासळत आहेत.

कार्कोट वंशाचा राजा ललितादित्य मुक्तपीड ह्याने आठव्या शतकात ह्या मंदिराचे निर्माण केले.

राजा ललितादित्य हा काश्मीरच्या इतिहासातील अत्यंत शूर आणि पराक्रमी राजा होता. अजिंक्य राजा म्हणून तो इतिहासाला ज्ञात आहे. त्याने अरब आक्रमणापासून तर भारताचे रक्षण केलेच शिवाय तिबेट मधील आक्रमकांपासून पण केले. इतकेच नव्हे तर आपल्या राज्याचा विस्तार पार अफगाणिस्तान तसेच सध्याच्या उजबेकिस्तान, ताजीकीस्तान, किर्गिस्तानपर्यंत केला. कवी कल्हणाने लिहिलेल्या 'राजतरंगिणी' या काश्मीरच्या इतिहास विषयक काव्यग्रंथात ललितादित्याविषयी, त्याच्या पराक्रमाविषयी गौरवपूर्ण व सविस्तर लिहिलेले आढळते. ललितादित्याने काश्मीर प्रांतात अनेक मंदिरांची निर्मिती केली. अत्यंत सुंदर शिल्पकला व स्थापत्य असलेली ही मंदिरे होती. 'मार्तंड सूर्य मंदिर' हे त्यापैकीच एक आणि प्रमुख मंदिर.


भारतातील केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यात हे मंदिर आहे. पहलगाम पासून साधारण चाळीस किलोमीटरवर हे ठिकाण आहे. कधीकाळी या भागाचे नाव नक्कीच मार्तंड असणार. पण सध्या मात्र ते मट्टन गाव या नावाने ओळखले जाते. एखाद्या नावाचा अपभ्रंश किती विचित्र होऊ शकतो, तो झालेला अपभ्रंश कसा रुळतो आणि आता स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही तो तसाच कसा राहतो ह्याचे हे दुर्दैवी उदाहरण आहे.


आठव्या शतकात जेव्हा हे मंदिर निर्माण केले गेले. पण काही तज्ज्ञांचे म्हणणे असे आहे की मंदिराच्या पायाचा काही भाग त्याच्याही शेकडो वर्ष आधीपासूनच आहे. म्हणजेच त्याचा अर्थ हे मंदिर आठव्या शतकापेक्षाही पुरातन आहे. जेव्हा आठव्या शतकात हे मंदिर निर्माण केले गेले तेव्हा अशा उंचीवर बनवले होते की तिथून संपूर्ण कश्मीर घाटी दिसायची.


तेव्हा काश्मिरी वास्तुकलेचा एक अद्भुत नमुना म्हणून सुप्रसिद्ध असलेले हे मंदिर आपल्या निर्माणानंतर पाच-सहाशे वर्ष वैभवाच्या शिखरावर होते. पंधराव्या शतकात शाह मीर घराण्यातील सिकंदर राजा बुतशिकन म्हणून ओळखला जातो. बुतशिकन म्हणजे मूर्तिभंजक. सिकंदराचा समकालीन इतिहासकार हसन अली लिहितो की मंदिरातील तर सोडाच पण लोकांच्या घरातील हिंदू देवतांच्या मूर्ती देखील सिकंदराने फोडून टाकल्या. हिंदू लोकांचे जबरदस्ती धर्मांतर करून त्यांना इस्लाम धर्माचे अनुयायी केले. ज्यांनी धर्मांतर करणे मान्य केले नाही त्यांचे शिरकाण केले गेले. सिकंदराने उध्वस्त केलेल्या अनेक मंदिरांपैकी मार्तंड सूर्य मंदिर हे एक मंदिर.

हे मंदिर इतके भव्य होते, इतकी शिल्पे कोरलेली होती, इतके मजबूत होते की ते नष्ट करण्यासाठी सिकंदराच्या माणसांना एक वर्ष लागले.


सूर्य देवतेला समर्पित असलेली देशभरात काही मोजकी मंदिरे आहेत. ओरिसातील कोणार्क आहे, गुजराथमध्ये मोढेरा आहे. उत्तर भारतात विशेष आढळत नाहीत. त्यामुळेही काश्मीरमधील हे मार्तंड सूर्य मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे.


मंदिराच्या भव्य आवारात चारी बाजूंना दीर्घा म्हणजे गॅलरी म्हणावी अशी रचना असावी. कारण त्याचे अवशेष असलेले खांब आपल्याला दिसतात. मग कदाचित ही लहान लहान मंदिरे असावीत किंवा अभ्यासाची जागा असावी किंवा नुसता मंदिर रचनेतील सौंदर्य वाढवण्याचा एक भाग असावा. या गॅलरीच्या खांबांवरची नक्षी सुंदर असावी अशी कल्पना भग्नावशेषांवरून आपल्याला येऊ शकते. हे एकूण 84 खांब आहेत असे आपल्याला माहितीपत्रकात वाचता येते.



मुख्य मंदिराच्या समोर आपल्याला पायऱ्या बांधलेले कुंड आढळून येते. . अनेक उद्ध्वस्त मूर्ती आपल्याला दिसतात. गंगा, यमुना, विष्णू अशा मूर्ती ओळखता येतात. एक तीन मस्तकांची मूर्ती दिसते ती बहुदा ब्रह्मदेवाची असावी.








केवळ निसर्गाचा प्रकोप असता तर कदाचित मूर्ती इतक्या वाईट अवस्थेत दिसल्या नसत्या. विकृत मनोवृत्तीच्या माणसांनी तोडून, घाव घालून, घासून त्या खराब केल्या आहेत.

मुख्य मंदिरातील गर्भगृह, त्यासमोरच सभा मंडप, त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या लहान खोल्या यावरून मंदिराच्या भव्यतेचा अंदाज आपण करू शकतो. गाभारा तर अगदी सगळ्या मूर्ती नाहीश्या करून ओसाड केला आहे.









'प्रत्नकीर्तिमपावृणु' हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे बोधवाक्य आहे. आपल्याला सगळ्या संरक्षित स्मारकांच्या पाट्यांवर हे वाचायला मिळते. त्याचा अर्थ आहे की चला प्रयत्न करू या. आपल्या पूर्वजांचा गौरव पुढील पिढ्यांपर्यंत पोचवू या. मात्र असे प्रयत्न या मंदिराच्या संरक्षणासाठी,संवर्धनासाठी आणि संरचनेसाठी होत आहेत की नाही याचा संभ्रम पडावा अशीच स्थिती मार्तंड मंदिराची आहे.

एरवी आपण एखाद्या शिल्पकलेनी नटलेल्या मंदिरात गेलो की तिथे प्रत्येक शिल्पाचे बारकाईने निरीक्षण करतो. अभ्यास करतो, त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करतो. पण मार्तंड मंदिराची उद्ध्वस्त स्थिती पाहून मन इतके विषण्ण झाले होते की तिथे फार वेळ थांबावे असेच वाटले नाही. मात्र तुम्ही कोणी जाल तेव्हा ही चूक करू नका. तेथील ज्या मूर्ती थोड्याफार बऱ्या अवस्थेत असतील त्यांचे फोटो काढून ठेवा. एक मोलाचा ऐतिहासिक ऐवज असेल तो.


मार्तंड मंदिर फार कमी प्रवासी कंपन्या दाखवतात. पण आपण सर्वांनी जर का आपल्या काश्मीर पर्यटनात या मंदिराचा समावेश केला, या मंदिराला जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवून दिली, तर कदाचित जागृती निर्माण होईल आणि मंदिराचे संगोपन, संवर्धन व्हावे यासाठी प्रयत्न सुरू होतील.


नॅशनल मॉन्युमेंट अथॉरिटी म्हणजेच राष्ट्रीय संस्मारक प्राधिकरणाच्या अधिकृत चिन्हात मार्तंड मंदिराचा समावेश असल्याची बातमी मध्ये वाचली होती पण प्राधिकरणाच्या संस्थळावर मात्र हे चिन्ह अजून आलेले दिसत नाही.




1975 मध्ये रिलीज झालेल्या आंधी सिनेमातील "तेरे बिना जिंदगी से.... " ह्या गाण्यात मार्तंड मंदिरातील चित्रीकरण झाले होते.





इथे दिग्दर्शक दिसतो असे म्हणता येईल असे ते दृश्य होते. भंगलेल्या नात्याची कहाणी आणि मागचे उध्वस्त मंदिर.

आरकीओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया - ए एस आय ची साईट पाहिली तर त्याच्यावर काश्मीरमधील अनंतनाग, बारामुल्ला, कारगिल, पुलवामा अशा अनेक जिल्ह्यातील मंदिरांच्या म्हणजे अर्थातच मंदिरांच्या अवशेषांची स्थळे असलेली यादी सापडते.

कधीतरी ही सर्व मंदिरे निर्धोकपणे पर्यटकांना पाहता येतील अशी आशा करूयात.

—------

काश्मीर पर्यटनासाठी सूचना

१. श्रीनगर विमानतळाच्या बाहेर आलात की पुन्हा श्रीनगर विमानतळावर जाईपर्यंत बहुतेक् सगळ्या मोबाईलना रेंज नसते हे लक्षात ठेवावे.

२. भारतात सगळीकडे डिजिटल पेमेंट स्वीकारत असताना काश्मीरमध्ये मात्र बऱ्याच ठिकाणी अजूनही रोख रकमेचा आग्रह धरला जातो.

३. टीप घेण्याविषयी आणि ती त्यांना हवी तेवढी घेण्याविषयी सर्व सेवा पुरवणारे आग्रही असतात.

४. हे सगळे असले तरी काश्मीर अत्यंत सुंदर आहे खरोखर धरतीवरचा स्वर्ग आहे. तेव्हा नक्की पाहायलाच हवे.


 

Comments

  1. एकदम मस्त.

    चीड चीड होते नकारात्मक विचारांमुळे आणि उदासीनतेमुळे. कलाकार आणि कलाकारी एवढ्या विपुल प्रमाणात आपल्याकडे होती आणि आहे पण विध्वंस केला ह्या सगळ्याचा, त्याने मन विषण्ण होते.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

महेश्वर

महेश्वर हे मध्यप्रदेश पर्यटन निगमच्या पर्यटन स्थळांमधले एक महत्वाचे नाव आहे. पण करोडो भारतीयांसाठी ते केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर एक तीर्थस्थान असते. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेले स्थान आहे.  महेश्वर किल्ला प्रवेशद्वार  राजवाडा प्रवेशद्वार  बाह्यरूप  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  राजवाडा प्रवेशद्वार  अहिल्याबाई होळकर हे केवळ भारताच्याच नव्हे तर विश्वाच्या इतिहासातील एक सोनेरी पान. संपूर्ण मानव विश्वातील यशस्वी स्त्री राज्यकर्त्यांची सूची करायची झाली तर अहिल्याबाई होळकरांचे नाव ठळकपणे लिहायला लागेल.   31 मे 2025 ला त्यांची तीनशेवी जयंती आहे. पण 300 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या अहिल्याबाईंचे आयुष्य अगदी आजच्या आधुनिक काळातल्या आव्हानातही मार्गदर्शक ठरावे असेच आहे.  त्यांच्याविषयीचा आदर मनात घेऊनच आपण महेश्वरला जातो आणि त्या भावनेच्या प्रकाशात महेश्वर पाहतो. महेश्वरला फार मोठी प्राचीन परंपरा आहे. स्कंद पुराणाच्या रेवा खंडात आणि वायू पुराणाच्या नर्मदा रहस्य मध्ये महिष्मती म्हणजे महेश्वरचे वर्णन आलेले आहे. 'गुप्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

Prashanti Kutiram, Bangalore

I am happy to write my first post of 2022!! I am here with a really very special post! This is not a tourist place and still it holds a special place in each and every visitor’s mind. This is Prashanti Kutiram of Bangalore. Prashanti kutiram as the name suggests, surely makes your mind peaceful. It's around 70-80 kms from Bangalore airport but with the famous traffic jams of Bangalore, it may take two and half hours by taxi.  This is the place where The Swami Vivekananda Yoga Anusandhan Sansthan is situated on a sprawling 100 acres. Swami Vivekanand  Swami Vivekanand  Ramakrishna Paramahans and Sharada Mataji  SVyasa Founded in 1986, Svyasa follows Swami Vivekanand's teachings and combines best of east and West. So it combines Yoga and spirituality with modern sciences.  The first thing you will notice about Vyasa is the greenery. The campus is having umpteen trees. It's hilly area. The steep paths and slopes offer you the much needed exercise!! The Green Umbre...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...