मुख्य सामग्रीवर वगळा

भारतीय सिनेमाचे राष्ट्रीय संग्रहालय - गुलशनमहाल - National Museum Of Indian Cinema.

 प्रत्येक शहरात अशी काही ठिकाणे असतात की जिथला पत्ता सांगणे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. असाच एक पत्ता म्हणजे दक्षिण मुंबईची जणू रक्तवाहिनी असलेला पेडर रोड. श्रीमंत उद्योजक, गुणवान आणि ऐश्वर्यसंपन्न कलावंत यांची निवासस्थाने असलेला पेडर रोड. ज्या रस्त्यावरून प्रतिदिनी लाखो वाहने जात असतात असा पेडर रोड. असे म्हटले जायचे की ह्या रस्त्याला लागण्यापूर्वी महालक्ष्मी मंदिरात लक्ष्मीचे दर्शन घ्यायचे आणि नंतर ह्या रस्त्यावरच्या मंगेशकरांच्या प्रभुकुंज मध्ये गानसरस्वती लता मंगेशकरांचे दर्शन घ्यायचे! त्याच रस्त्यावर लक्ष्मी ज्यांच्यावर प्रसन्न आहे असे अनेक लक्ष्मीपुत्र राहतात. नावेच घ्यायची झाली तर जिंदाल आहेत, अंबानी आहेत. अशा सुप्रसिद्ध, सुप्रतिष्ठित पेडर रोडच्या मुगुटातला हिरवा पाचू म्हणजे गुलशन महाल आणि त्याच्या आजूबाजूची हिरवाई. 

गुलशनमहाल 
मोठाले वृक्ष, त्यांच्याभोवती बांधलेले पार, त्या शीतल सावलीत बसण्यासाठी कोणालाही मोहात पडतील. 

गर्द सभोवती ... 
गुलशन महाल ह्या इमारतीचे पूर्वीचे नाव होते गुलशन आबाद - गुलशनाबाद. 
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर बांधला गेलेला, कच्छ चे व्यापारी पीरभाई फलकदिन यांचा हा बंगला. पाच एकरांच्या परिसरात असलेला, झाडांनी वेढलेला हा सुंदर बंगला. बंगल्यातून दिसणारा अरबी समुद्र बंगल्याच्या सौंदर्यात वाढ करीत असे. 
काळ बदलला. पिढी दर पिढी बंगल्याचे मालक बदलले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तर राज्यकर्त्या ब्रिटिशांनी तिथे मिलिटरीचे हॉस्पिटल उभारले.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 'डॉक्युमेंट्री फिल्म्स ऑफ इंडिया' आणि 'फिल्म डिव्हिजनचे' ऑफिस म्हणून हा बंगला वापरला गेला. 
या बंगल्याच्या सिनेजगताशी तसा जुना संबंध होता. 1932 मध्ये या घराची मालकीण खुर्शीद हज यात्रेला गेली होती तेव्हा त्या प्रवासाचे चित्रण करून तिने एक माहितीपट तयार केला होता. म्हणूनच ती माहितीपट तयार करणारी पहिली भारतीय स्त्री ठरली होती. 1930 च्या सुमाराला त्या काळातील आघाडीची अभिनेत्री आणि निर्माती देविका राणी यांनी या गुलशनमहाल परिसरातले एक घर भाड्याने घेतले होते.
फिल्म्स डिव्हिजनचे ऑफिस नव्या इमारतीत गेल्यावर गुलशन महाल हा क्वचित कधी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी भाड्याने दिला गेला. 
आणि आता २०१९ पासून तिथे उभे आहे भारतातील पहिले सिनेमा म्युझियम- चित्रपट संग्रहालय. NMIC- National Museum Of Indian Cinema. 

तिकीट खिडकी 
प्रवेशद्वार 
NMIC च्या फलकाशेजारी असलेला पुतळा कोणाचा असेल ह्याचा अंदाज कोणताही भारतीय किंवा निदान कोणताही मराठी माणूस नक्कीच बंधू शकेल. तो पुतळा आहे भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक दादासाहेब फाळके ह्यांचा. 
व्हिक्टोरियन गॉथिक पद्धतीच्या उंच कमानी, भव्य दरवाजे, नक्षीदार खांब, बाहेरून जाणारे नक्षीदार चक्राकार जिने, गच्चीचे नेटके कठडे या वास्तूला एक वेगळेच सौंदर्य प्राप्त करून देतात. आजूबाजूला असलेली आणि उत्तम निगा राखलेली बाग आपले हिरवी सावली ह्या फिक्‍या बदामी गुलाबी रंगाच्या इमारतीवर पसरून उभी असते. मागचा निळा समुद्र, हिरवी झाडे आणि फिकी बदामी इमारत हे सगळे मिळून मंत्रमुग्ध करणारे वातावरण निर्माण करतात. 

गुलशन महाल 
गुलशन महाल 
गुलशन महाल 
गुलशन महाल 
गुलशन महाल 
गुलशन महाल 

गुलशन महाल 
गुलशन महाल 
गुलशन महाल 
चित्रपट संग्रहालयाचे दोन भाग आहेत पहिला गुलशन महालमध्ये तर दुसरा नव्या पाच मजली अत्याधुनिक इमारतीत.
ल्युमियेरेपासून झालेली तंत्रज्ञानाची सुरुवात, नंतर आलेले मूकपट, त्यानंतर आलेले बोलपट, मग रंगीत चित्रपट हे सगळे आपल्याला गुलशन महलमधील वेगवेगळ्या नऊ विभागातून पाहायला मिळते. गाणी ऐकता येतात, इतकेच काय आपल्या आवाजात गाणी रेकॉर्ड करून देखील ऐकता येतात. 

आराखडा 
प्रॅक्सीनोस्कोप 
भारतीय परंपरा 
जादुई दिवा 
राजा हरिश्चंद्र 
मूकपटातील नायिका 
सिनेमा सिनेमा 
मराठी आणि गुजराथी सिनेमाचा संक्षिप्त इतिहास 
साहित्याचा प्रभाव 
सिनेमा आणि समाज 
१९४७

या संग्रहालयाचा दुसरा भाग असलेली भव्य अत्याधुनिक 
इमारत, त्या इमारतीतील अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सांगितला जाणारा चित्रपट व्यवसायाचा इतिहास, बदलत गेलेली उपकरणे हे सगळे पाहताना जुन्या इमारतीतून नव्या इमारतीत आल्यावर एक शतक भराचा प्रवास करून आल्यासारखे वाटते. 

नवी इमारत 
नवी इमारत 
नवी इमारत 
नवी इमारत 
नवी इमारत 
नव्या इमारतीतला प्रत्येक मजला एका विशिष्ट संकल्पनेला वाहिलेला आहे. सत्यजित रे आणि सिनेमा, गांधी आणि सिनेमा, लहान मुलांसाठी फिल्म स्टुडिओ, टेक्नॉलॉजी, क्रीएटिव्हिटी आणि इंडियन सिनेमा, सिनेमा ऍक्रोस इंडिया असे वेगवेगळे भाग असलेली दालने आणि मजले नव्या इमारतीत आहेत. 

भारतातील सिनेमा दालन 
भारतीय सिनेमातील पथ शोधक 
जत्रा आठवली ना?
जाहिरात 
सेन्सॉर प्रमाण पत्र 
भारतातील प्रारंभीच्या काळातील सुप्रसिद्ध स्टुडियोज 
कॅमेरा, लाईट,ऍक्शन 
अभिनेत्री 
माहिती आणि फोटो 
फिल्म्स डिव्हिजन 
फिल्म फेस्टिवल्स 
फिर भी दिल हैं हिंदुस्थानी 
दादासाहेब फाळके पुरस्कार 
सिनेसंगीत 
भारतीय सिनेसंगीत 
चित्रपटाची निर्मिती, कॅमेरा, लाईट, नंतर त्याचे संकलन, इतकेच काय त्याची प्रसिद्धी या सर्वांविषयी अत्यंत विस्ताराने प्रेक्षकांना माहिती मिळेल. डिजिटल एडिटिंग, थ्रीडी सिनेमा हे सर्व कसे होते ते बघता येते. कित्येक गोष्टी स्वतः करून बघायला मिळतात. 
चित्रपट निर्मिती 
शूटिंग 
शूटिंग 
प्रोजेक्टर 
ऍनिमेशन 
संकलन 

गांधी आणि भारतीय सिनेमा 
गांधी आणि भारतीय सिनेमा 
गांधी आणि भारतीय सिनेमा 
सत्यजित रे 
सत्यजित रे - अनोखी पोस्टर्स 
सुलेखन 

भारतीयांना असलेले सिनेमाचे वेड सर्वश्रुत आहे. जो सिनेमा आपण पडद्यावर बघतो तो तयार कसा होतो हे पाहणे देखील औत्सुक्याचे आणि आनंदाचे ठरते. 

सिनेमाप्रेम - वेड 
 गेल्या शंभर वर्षांचा इतिहास सांगणारे हे संग्रहालय लवकरच मुंबईच्या पर्यटनातील एक मानबिंदू ठरणार आहे यात शंकाच नाही. एकूणच जागतिक पातळीवर देखील अत्यंत अभिमानाने मिरवावे असे हे भारतातील पहिले चित्रपट संग्रहालय मुंबईत उभे राहिले आहे हे नक्की.
The National Museum of Indian Cinema
Address- Films Division, Ministry of Information & Broadcasting, Government of India, 24 – Dr. G. Deshmukh Marg, Mumbai-26. 

 The Museum  is open to the public from Tuesday  to  Sunday (11 AM to 6 PM) and will remain closed on Mondays and Public Holidays. 

The entry fee to  the Museum is: 

  • Indian Visitors above 14 yrs and above: INR 75 
  • Children 3 to 13 yrs : INR 40 
  • Foreign Citizen above 14 yrs : INR  500 
  • Foreign Citizen 3 to 13 yrs : INR 250 

       Parking is available at the Films Division Complex.

#Bollywood #Making Of Cinema # 

One Day Tour In Mumbai #PeddarRoad # Sightseeing in Mumbai #GulshanmahalMumbai #भारतीय सिनेमा का राष्ट्रीय संग्रहालय 


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

कोस्टल कर्नाटक- २ मंगळुरू, मुलकी, उचिल, उडुपी

  आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते.  नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते.  मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात.  काद्री मंजुनाथ मंदिर  का...