Skip to main content

भारतीय सिनेमाचे राष्ट्रीय संग्रहालय - गुलशनमहाल - National Museum Of Indian Cinema.

 प्रत्येक शहरात अशी काही ठिकाणे असतात की जिथला पत्ता सांगणे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. असाच एक पत्ता म्हणजे दक्षिण मुंबईची जणू रक्तवाहिनी असलेला पेडर रोड. श्रीमंत उद्योजक, गुणवान आणि ऐश्वर्यसंपन्न कलावंत यांची निवासस्थाने असलेला पेडर रोड. ज्या रस्त्यावरून प्रतिदिनी लाखो वाहने जात असतात असा पेडर रोड. असे म्हटले जायचे की ह्या रस्त्याला लागण्यापूर्वी महालक्ष्मी मंदिरात लक्ष्मीचे दर्शन घ्यायचे आणि नंतर ह्या रस्त्यावरच्या मंगेशकरांच्या प्रभुकुंज मध्ये गानसरस्वती लता मंगेशकरांचे दर्शन घ्यायचे! त्याच रस्त्यावर लक्ष्मी ज्यांच्यावर प्रसन्न आहे असे अनेक लक्ष्मीपुत्र राहतात. नावेच घ्यायची झाली तर जिंदाल आहेत, अंबानी आहेत. अशा सुप्रसिद्ध, सुप्रतिष्ठित पेडर रोडच्या मुगुटातला हिरवा पाचू म्हणजे गुलशन महाल आणि त्याच्या आजूबाजूची हिरवाई. 

गुलशनमहाल 
मोठाले वृक्ष, त्यांच्याभोवती बांधलेले पार, त्या शीतल सावलीत बसण्यासाठी कोणालाही मोहात पडतील. 

गर्द सभोवती ... 
गुलशन महाल ह्या इमारतीचे पूर्वीचे नाव होते गुलशन आबाद - गुलशनाबाद. 
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर बांधला गेलेला, कच्छ चे व्यापारी पीरभाई फलकदिन यांचा हा बंगला. पाच एकरांच्या परिसरात असलेला, झाडांनी वेढलेला हा सुंदर बंगला. बंगल्यातून दिसणारा अरबी समुद्र बंगल्याच्या सौंदर्यात वाढ करीत असे. 
काळ बदलला. पिढी दर पिढी बंगल्याचे मालक बदलले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तर राज्यकर्त्या ब्रिटिशांनी तिथे मिलिटरीचे हॉस्पिटल उभारले.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 'डॉक्युमेंट्री फिल्म्स ऑफ इंडिया' आणि 'फिल्म डिव्हिजनचे' ऑफिस म्हणून हा बंगला वापरला गेला. 
या बंगल्याच्या सिनेजगताशी तसा जुना संबंध होता. 1932 मध्ये या घराची मालकीण खुर्शीद हज यात्रेला गेली होती तेव्हा त्या प्रवासाचे चित्रण करून तिने एक माहितीपट तयार केला होता. म्हणूनच ती माहितीपट तयार करणारी पहिली भारतीय स्त्री ठरली होती. 1930 च्या सुमाराला त्या काळातील आघाडीची अभिनेत्री आणि निर्माती देविका राणी यांनी या गुलशनमहाल परिसरातले एक घर भाड्याने घेतले होते.
फिल्म्स डिव्हिजनचे ऑफिस नव्या इमारतीत गेल्यावर गुलशन महाल हा क्वचित कधी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी भाड्याने दिला गेला. 
आणि आता २०१९ पासून तिथे उभे आहे भारतातील पहिले सिनेमा म्युझियम- चित्रपट संग्रहालय. NMIC- National Museum Of Indian Cinema. 

तिकीट खिडकी 
प्रवेशद्वार 
NMIC च्या फलकाशेजारी असलेला पुतळा कोणाचा असेल ह्याचा अंदाज कोणताही भारतीय किंवा निदान कोणताही मराठी माणूस नक्कीच बंधू शकेल. तो पुतळा आहे भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक दादासाहेब फाळके ह्यांचा. 
व्हिक्टोरियन गॉथिक पद्धतीच्या उंच कमानी, भव्य दरवाजे, नक्षीदार खांब, बाहेरून जाणारे नक्षीदार चक्राकार जिने, गच्चीचे नेटके कठडे या वास्तूला एक वेगळेच सौंदर्य प्राप्त करून देतात. आजूबाजूला असलेली आणि उत्तम निगा राखलेली बाग आपले हिरवी सावली ह्या फिक्‍या बदामी गुलाबी रंगाच्या इमारतीवर पसरून उभी असते. मागचा निळा समुद्र, हिरवी झाडे आणि फिकी बदामी इमारत हे सगळे मिळून मंत्रमुग्ध करणारे वातावरण निर्माण करतात. 

गुलशन महाल 
गुलशन महाल 
गुलशन महाल 
गुलशन महाल 
गुलशन महाल 
गुलशन महाल 

गुलशन महाल 
गुलशन महाल 
गुलशन महाल 
चित्रपट संग्रहालयाचे दोन भाग आहेत पहिला गुलशन महालमध्ये तर दुसरा नव्या पाच मजली अत्याधुनिक इमारतीत.
ल्युमियेरेपासून झालेली तंत्रज्ञानाची सुरुवात, नंतर आलेले मूकपट, त्यानंतर आलेले बोलपट, मग रंगीत चित्रपट हे सगळे आपल्याला गुलशन महलमधील वेगवेगळ्या नऊ विभागातून पाहायला मिळते. गाणी ऐकता येतात, इतकेच काय आपल्या आवाजात गाणी रेकॉर्ड करून देखील ऐकता येतात. 

आराखडा 
प्रॅक्सीनोस्कोप 
भारतीय परंपरा 
जादुई दिवा 
राजा हरिश्चंद्र 
मूकपटातील नायिका 
सिनेमा सिनेमा 
मराठी आणि गुजराथी सिनेमाचा संक्षिप्त इतिहास 
साहित्याचा प्रभाव 
सिनेमा आणि समाज 
१९४७

या संग्रहालयाचा दुसरा भाग असलेली भव्य अत्याधुनिक 
इमारत, त्या इमारतीतील अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सांगितला जाणारा चित्रपट व्यवसायाचा इतिहास, बदलत गेलेली उपकरणे हे सगळे पाहताना जुन्या इमारतीतून नव्या इमारतीत आल्यावर एक शतक भराचा प्रवास करून आल्यासारखे वाटते. 

नवी इमारत 
नवी इमारत 
नवी इमारत 
नवी इमारत 
नवी इमारत 
नव्या इमारतीतला प्रत्येक मजला एका विशिष्ट संकल्पनेला वाहिलेला आहे. सत्यजित रे आणि सिनेमा, गांधी आणि सिनेमा, लहान मुलांसाठी फिल्म स्टुडिओ, टेक्नॉलॉजी, क्रीएटिव्हिटी आणि इंडियन सिनेमा, सिनेमा ऍक्रोस इंडिया असे वेगवेगळे भाग असलेली दालने आणि मजले नव्या इमारतीत आहेत. 

भारतातील सिनेमा दालन 
भारतीय सिनेमातील पथ शोधक 
जत्रा आठवली ना?
जाहिरात 
सेन्सॉर प्रमाण पत्र 
भारतातील प्रारंभीच्या काळातील सुप्रसिद्ध स्टुडियोज 
कॅमेरा, लाईट,ऍक्शन 
अभिनेत्री 
माहिती आणि फोटो 
फिल्म्स डिव्हिजन 
फिल्म फेस्टिवल्स 
फिर भी दिल हैं हिंदुस्थानी 
दादासाहेब फाळके पुरस्कार 
सिनेसंगीत 
भारतीय सिनेसंगीत 
चित्रपटाची निर्मिती, कॅमेरा, लाईट, नंतर त्याचे संकलन, इतकेच काय त्याची प्रसिद्धी या सर्वांविषयी अत्यंत विस्ताराने प्रेक्षकांना माहिती मिळेल. डिजिटल एडिटिंग, थ्रीडी सिनेमा हे सर्व कसे होते ते बघता येते. कित्येक गोष्टी स्वतः करून बघायला मिळतात. 
चित्रपट निर्मिती 
शूटिंग 
शूटिंग 
प्रोजेक्टर 
ऍनिमेशन 
संकलन 

गांधी आणि भारतीय सिनेमा 
गांधी आणि भारतीय सिनेमा 
गांधी आणि भारतीय सिनेमा 
सत्यजित रे 
सत्यजित रे - अनोखी पोस्टर्स 
सुलेखन 

भारतीयांना असलेले सिनेमाचे वेड सर्वश्रुत आहे. जो सिनेमा आपण पडद्यावर बघतो तो तयार कसा होतो हे पाहणे देखील औत्सुक्याचे आणि आनंदाचे ठरते. 

सिनेमाप्रेम - वेड 
 गेल्या शंभर वर्षांचा इतिहास सांगणारे हे संग्रहालय लवकरच मुंबईच्या पर्यटनातील एक मानबिंदू ठरणार आहे यात शंकाच नाही. एकूणच जागतिक पातळीवर देखील अत्यंत अभिमानाने मिरवावे असे हे भारतातील पहिले चित्रपट संग्रहालय मुंबईत उभे राहिले आहे हे नक्की.
The National Museum of Indian Cinema
Address- Films Division, Ministry of Information & Broadcasting, Government of India, 24 – Dr. G. Deshmukh Marg, Mumbai-26. 

 The Museum  is open to the public from Tuesday  to  Sunday (11 AM to 6 PM) and will remain closed on Mondays and Public Holidays. 

The entry fee to  the Museum is: 

  • Indian Visitors above 14 yrs and above: INR 75 
  • Children 3 to 13 yrs : INR 40 
  • Foreign Citizen above 14 yrs : INR  500 
  • Foreign Citizen 3 to 13 yrs : INR 250 

       Parking is available at the Films Division Complex.

#Bollywood #Making Of Cinema # 

One Day Tour In Mumbai #PeddarRoad # Sightseeing in Mumbai #GulshanmahalMumbai #भारतीय सिनेमा का राष्ट्रीय संग्रहालय 


Comments

  1. उत्तम माहिती. नक्की बघतो. धन्यवाद.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 4 - स्यालमी - बनियाकुंड

आदल्या संध्याकाळी भुरभुरत असलेल्या पावसाने हवेतला गारवा अजूनच वाढवला होता. इतक्या लहान तंबूमध्ये झोपण्याची पहिलीच वेळ होती. पण सुरुवातीचे दोन तास सोडले तर नंतरचे पाच तास चांगली झोप झाली. अगदी प्रसन्न जाग आली.काल एकदाच क्षणभर का होईना, मनात तरळून गेलेला,"आपण ट्रेक इथेच थांबवावा का?"ह्या विचाराचा आज कुठे मागमूसही उरला नव्हता. मनात होते,  "इरादे अगर पक्के हो, तो डगमगाए कदम क्यु? हौसले बुलंद हो तो सहमा सा हो मन क्यु? मंज़िल अब दूर नहीं.. बस संभल के चलना, कभी न रुकना, हार ना मानना, बस्स .. चलते रहना।" - वृंदा टिळक आमच्या सगळ्याच कॅम्पसाईट्स भन्नाट जागांवर होत्या. आजची स्यालमीची कॅम्प साईट देखील त्याला अपवाद नव्हती. नजर पोचेल तिथपर्यंत फक्त पर्वत रांगा आणि जंगल. मानवी वस्तीची जवळपास काहीच चाहूल नाही.  📷Samrat Darda  सगळ्यांचे आवरून वॉर्म अप करून आम्ही निघालो. आजचा सगळा रस्ता सुंदर असणार होता. काल इतके चढ उतार चढून उतरून आता सगळ्यांची चांगली तयारी झाली होती. शिवाय आज मी नीकॅप्स देखील घातल्या होत्या!! त्यामुळे समजा जरी आज रस्ता अवघड असला असता तरी काळजीचे काही कारण नव्हते....

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 3 - देवरियाताल -स्यालमी

ट्रेकचा तिसरा दिवस. कालचा सारी- देवरियाताल प्रवास तर खूपच छान झाला होता. पायही दुखले नव्हते की थकल्यासारखे देखील वाटले नव्हते. त्यामुळे उत्साहाने आजच्या दिवसाला सुरुवात केली. आजचा दिवस तसा अवघड असेल अशी, इंडियाहाईक्सच्या  वेब साईटवरचे वर्णन वाचून कल्पना आली होती. आज अंतर नऊ किलोमीटरपेक्षा जास्त होते. पण वाटेत अनेक शिखरे दिसणार होती. घनदाट जंगलातून जाणार होतो त्यामुळे अनेक पक्षीही दिसणार होते. त्याचीही उत्सुकता होती. सगळेजण देवरियाताल कॅम्पसाईट मधून बाहेर पडलो. अवघे एक दिवस वास्तव्य केलेले असले तरी मन थोडेतरी गुंतलेले असतेच.  देवरियातालच्या रस्त्याच्या डाव्या बाजूने एक जंगलवाटेचा फाटा होता. त्या वाटेने आम्ही निघालो. थोडा वेळ चालल्यावर आम्हाला पुन्हा एकदा चंद्रशिला शिखर दिसणार होते. अधून मधून दिसणारे हे शिखर आपल्याला कुठे पोचायचे आहे त्याची जाणीव करून द्यायचे, त्यानेही एक नवे बळ मिळायचे. पण आज आकाश इतके ढगाळ होते की शिखर दिसलेच नाही.उजवीकडे पुन्हा एकदा सारी गाव मात्र दिसले. 📷Cotrekker 📷Sumati Dhembre ह्या फोटोवरून कशा रस्त्याने आम्ही चालत होतो, चढ किती होता त्याची कल्पना येईल....

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 5- अंतिम भाग - बनियाकुंड- तुंगनाथ- चंद्रशिला

  📷Samrat Darda १५ एप्रिल, बनियाकुंड कॅम्पसाईट मधून काढलेला चंद्राचा सुंदर फोटो. त्या दिवशी शुक्ल पक्षातील सप्तमी किंवा अष्टमी असावी. कारण १७ एप्रिलला रामनवमी होती. सुंदर काळ्याभोर रात्रीचा सघन अंधार.. पौर्णिमा अजून साताठ दिवसांवर असली तरीही आत्तापासूनच तेजाळलेला चंद्र.. चमचमणारे, मध्येच ढगांच्या आड लपणारे चांदणे, आमच्या मनातील समिटविषयीची उत्सुकता..फार अनोखी रात्र होती ती.  उद्या पहाटे दोन वाजताचा वेकप कॉल असणार होता. आम्हाला आवरून, ब्रेकफास्ट करून तीन वाजता निघायचे होते. न विसरता घेण्याच्या गोष्टी तशा तर डे पॅक मध्ये भरूनच ठेवल्या होत्या. हेडलॅम्पच्या उजेडात सामान देखील आवरून ठेवले होते. पहाटे निघताना बाकी सामान मेन टेन्ट मध्ये नेऊन ठेवायचे होते.  इतक्या उंचीवर जायचे होते. काही तासांत आम्ही ४००० फुटांचा अल्टीट्युड गेन करणार होतो. झोपण्यासाठी डोळे मिटले खरे, पण मिटल्या डोळ्यांपुढेही बर्फाच्छादित शिखरांचीच दृश्ये तरळत होती. कधीतरी झोप लागली. सतत अधूनमधून जाग येऊन घड्याळात बघत होते. सगळे दोन वाजता उठणार, त्या आधी आपण आपले आवरून घेऊ या असा विचार डोक्यात होता तो बहुधा सतत ज...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...