Skip to main content

कंबोडिया - मंदिरे आणि बरेच काही.

अंगकोरवाट आणि बाकी मंदिरे पाहून झाल्यावर सियाम रीपहुन एक बोट राईड अवश्य घ्यायला हवी. 

तसेही कंबोडियात सगळीकडे पाण्याच्या कालव्यांचे जाळे असल्याने सगळीकडे पाणी दिसतच राहते.

 पाण्याच्या तलावात कमळे तर आहेतच!


कंबोडियातील सर्वात महत्वाचे असे टोनले सॅप (सब/सप - असा उच्चार तिथले लोक करतात. ) तळे जवळच आहे. गोड्या पाण्याचे अत्यंत विशाल असे हे तळे आणि ह्याच नावाची नदी. ऋतूनुसार हिच्या प्रवाहाची दिशा बदलते हे एक आश्चर्यच आहे. 
२५ डिसेंबर २०१२ ला उतरत्या दुपारी आम्ही ह्या नौकाविहाराला गेलो होतो. मेकाँगचे काय किंवा टोनले सपचे काय, पाणी अतिशय मळकट आहे. लाल माती मिसळून झालेला गढूळ रंग असावा तसे आहे. ह्या तळ्यात अनेक तरंगत्या वसाहती आहेत. गावंच म्हणा ना लहानशी. मग त्यात घरे, दुकाने सगळे काही आहे. प्रामुख्याने कोळी इथे राहत असले तरी इतरही अनेक जण राहतात. काहीजण तर जन्मभर इथेच राहिलेले आहेत. काहीजणांकडे अधिकृत कागदपत्रे कोणत्याच देशाची नसतात. असेही काहीजण इथे राहतात असे कळले. 

इथल्या मुलांसाठी दुसऱ्या देशातील लोकांनी सुरु केलेल्या तरंगत्या शाळा, धर्मस्थाने देखील पाहायला मिळतात. 

तिथली मुले काहीतरी स्टंट दाखवून पैसे मागत असतात. मग ते उंचावरून उड्या मारणे असेल, सापाबरोबर एका टोपलीत बसणे असेल. हे सगळे पाहून मन अस्वस्थ होते हे नक्की. 

बोटीवर फडकणारा कंबोडियाचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवलेला दिसतो आहे. त्याचे कारण बहुधा कंबोडियाचे माजी राजे नॉरदोम सिंहनूक ह्यांचे १५ ऑक्टोबर २०१२ ला निधन झाले होते. त्यांचा अंत्यविधी फेब्रुवारी २०१३ मध्ये झाला. त्यानिमित्त दुखवटा व्यक्त करणे हे कारण असू शकते. 
नॉम पेन मध्ये सर्वत्र त्यांचे प्रचंड मोठे फोटो लावलेले होते. 

आपण गेल्या काही पोस्ट्स मधून कंबोडियातील अनेक ठिकाणे पाहिली. ह्यात नाही आले असे महत्वाचे ठिकाण म्हणजे माउंट कुलेन. तुम्ही जाल तेव्हा ते अवश्य पहा. 

कुलेन हा सुंदर धबधबा. त्याचे पाणी इतके शुद्ध की कंबोडियातील पाण्याच्या बाटल्या तयार करणाऱ्या कंपनीचे तेच नाव आहे. त्या प्रवाहात अनेक कोरलेली शिवलिंगे, शेषशायी विष्णू हे सगळे प्रत्यक्ष पाहण्यासारखे असेल. आम्ही गेलो होतो तेव्हा वेळाच्या अभावी आमचे पाहायचे राहिले ते. अंगकोरवाट पासून साधारण २५ / ३० किलोमीटर अंतरावर असलेला हा पर्वत. आता गाडी अगदी वरपर्यंत जाते म्हणतात. तरीदेखील प्रत्यक्ष जाल तेव्हा त्या वेळची परिस्थिती कशी आहे ती चौकशी करून जा. आम्ही गेलो तेव्हा काय कारण होते माहिती नाही, पण गाडी वरपर्यंत जात नव्हती. 

कंबोडिया म्हणजे फक्त अंगकोरवाट? कंबोडिया म्हणजे फक्त जुनी मंदिरे? कंबोडिया म्हणजे फक्त टोनले सॅप आणि मेकाँग?

हे सर्व असूनदेखील ह्या खेरीज कंबोडिया खूप काही उरतोच. 

कंबोडिया म्हणजे अप्सरा नृत्य. मोठ्या कंपन्या तर आहेत. पण गरजू लोक त्या नृत्य नाट्यातले पोशाख घालून सर्व मंदिरांच्या बाहेर उभे असतात. त्यांच्याबरोबर तुम्ही फोटो काढून घ्यावे आणि त्यांना पैसे द्यावे म्हणून. 

जे अप्सरा नृत्यनाट्य सभागृहात सादर केले जाते त्याच्या जाहिराती शहरभर लागलेल्या असतात. एक फार सुंदर पोस्टर पाहायला मिळाले. महाराष्ट्रीय नऊवारी साडीशी ह्या पोशाखाचे खूप साधर्म्य वाटले म्हणून मुद्दाम फोटो काढून ठेवला. 
कंबोडियातील एखादा तरी सांस्कृतिक कार्यक्रम अवश्य बघा. आम्ही रॉयल पॅलेस जवळील पाहिला होता. त्या त्या देशाची संस्कृती, इतिहास पर्यटकांना सोप्या आणि रंजक पद्धतीने कळण्यासाठी अशा कार्यक्रमांचा खूप उपयोग होतो. 

आम्ही पाहिलेल्या कार्यक्रमात जनसामान्यांचे आयुष्य, त्यांच्या आयुष्यातील संस्कार दाखवले होते. विवाह संस्कार तर अगदी हिंदू विवाह संस्कारांसारखाच होता. सप्तपदी, होम ह्या सकट. 

अंगकोरवाट ला एका मंदिराबाहेर ही मुले उभी होती. त्यांना काही सादर करून दाखवायचे होते. पण आम्हाला ते बघायला वेळ नव्हता. त्यांनी मग पैसे नाही मागितले पण एक वेगळी मागणी केली. मी कपाळाला लावली होती तश्या टिकल्या मागत होते. दुर्दैवाने माझ्यापाशी त्या वेळी नव्हत्या अजून टिकल्या! 

ताडाची किंवा ताडासारखी झाडे अनेक. त्यापासून पेय तयार करून ते ताजे ताजे विकणारे अनेक जण मंदिरपरिसरात दिसतील. 

लोकांची भरपूर कष्ट करायची तयारी असावी असे वाटले. काटक लोक आहेत.

मंदिरावर वाढणारी झाडे काढत राहणे हा बहुतेक तिथे सतत करावा लागणार उद्योग असणार. हा माणूस असाच साधारण तीस फुटांवर चढलेला आहे. कुठेही संरक्षक दोरी बांधलेली नाही. 

सतत काम तरी किती करणार? कामात मध्येच मैत्रिणींबरोबर गप्पा मारण्यासारखा विरंगुळा हवाच!

जवळपास प्रत्येक मंदिराबाहेर हॅन्डमेड पेपरवर एम्बॉस केलेले अप्सरा नृत्य, रामायणातले किंवा इतर देखावे विकणारे कलाकार तुम्हाला दिसतील. आम्ही देखील त्यांच्याकडून खरेदी केली होती. घरात लावले देखील होते. 

बाकी खरेदीसाठी नॉम पेन मधील मोठे स्थानिक मार्केट किंवा प्रत्येक पर्यटन स्थळाजवळ असणारी विविध प्रकारच्या वस्तूंची दुकाने आहेतच. 

रस्त्यावरचे दुकान 
कंबोडियातील प्रसिद्ध टुकटुक- स्कुटर रिक्षा. 

इथले लोक सर्वसाधारणपणे अगदी साधे, सुस्वभावी, नम्र लोक आहेत. पर्यटन हा त्यांचा महत्वाचा व्यवसाय आहे. साधारणपणे फसवणूक फारशी करत नाही. आदराने बोलतात. अर्थात आदर द्यावा आणि घ्यावा हे सर्वत्र खरेच असते. 

 कोविड मुळे पर्यटन बंद असताना अंगकोरवाट ची व्यवस्था पाहणाऱ्या कोणालाही कामावरून कमी केले गेले नाही ही फार आश्वासक गोष्ट वाटते. त्यांना त्या वेळात मंदिरांच्या दुरुस्त्या करता आल्या. एरवी सतत पर्यटक येतजात असल्याने त्या दुरुस्त्या करायला वेळ आणि जागा मिळत नाही. व्हील चेयर जाईल असे रस्ते करण्याचा प्रयत्न एखाददोन ठिकाणी तरी झाला आहे असे वाचले. 

कंबोडियाने स्थैर्य अनुभवले तसेच अत्यंत वादळी कालखंड देखील अनुभवला. अशांतीचा कालखंड देशाच्या परिस्थितीवर खूपच वाईट परिणाम करून गेला आहे. एकेकाळची समृद्धी नाहीशी झाली आहे. परकीय आर्थिक मदत मोठ्या प्रमाणावर घ्यायला लागत आहे. 

युद्धकाळातले जमिनीतले बॉम्ब अजूनही फुटत असतात. रानात चरणाऱ्या जनावरांचे, शेत नागरणाऱ्या शेतकऱ्यांचे जीव घेत असतात. इतकेच काय मेकाँग नदीत बुडवली गेलेली दारुगोळ्याने भरलेली जी जहाजे होती, त्यातील दारुगोळा वर काढण्याचे काम अजून चालू आहे. पाण्यात वर्षानुवर्षे विषारी घटक पदार्थ विरघळले गेले असण्याचे दुष्परिणाम लोक भोगत आहेत. 

अशा अवचित फुटणाऱ्या बॉम्बमुळे जीव गेलेले तर असंख्य आहेतच पण अपंग झालेले देखील अनेक जण आहेत. ते मग जमतील ते वेगवेगळे उद्योग करायचा प्रयत्न करतात. पर्यटन स्थळाबाहेर वाद्यवृंद तयार करून, संगीत ऐकवून पर्यटकांकडून पैसे मिळवणे हे अनेक ठिकाणी पाहायला मिळते. 

युद्ध करणारे देश वेगळेच आणि ज्या भूमीवर युद्ध केले गेले तिथले भोगणारे वेगळेच. हा संपूर्ण इतिहास वाचायला हवा. 

कंबोडियात चीनची आर्थिक तसेच इतरही गुंतवणूक वाढते आहे. ह्या संपूर्ण प्रदेशातच चीनला आपले वर्चस्व स्थापित करायचे असावे. गुन्हेगारीत देखील वाढ होते आहे. 

पुरातन मूर्तींची वर्षानुवर्षे झालेली तस्करी हा तर मोठाच विषय आहे. अनेक मंदिरे जंगलाने वेढली गेली असल्याने तस्करांचे फावले. तस्करांनी एका रात्रीचे १२ डॉलर असा पगार देऊन शेजारी देशातील लोकांना कामाला ठेवले. काम काय? तर कंबोडियामधील मंदिरातील मूर्ती तोडून चोरून आणणे. अशा हजारो मूर्ती अगदी आत्ता आत्तापर्यंत चोरल्या गेल्या. कंबोडियातून बाकी जगभरात पाठवल्या गेल्या. आता त्या परत कंबोडियात याव्यात ह्या साठी कंबोडियाचे प्रयत्न चालू आहेत. नुकतेच ब्रिटिश सरकारला पत्र पाठवले गेले आहे की तुमच्या म्युझियम्स मधील कंबोडियातील / ख्मेर मूर्ती अधिकृतरीत्या तिथे आल्या आहेत का हे तपासून पहा. ज्या नसतील त्या कंबोडियाला परत करा. जगभरातून काही मूर्ती परत मिळाल्या देखील. आशा आहे की बाकी मूर्तीदेखील स्वस्थळी पोचतील. 

कंबोडियाला एकदा जाऊन आलात की तुम्ही विसरू शकत नाही कंबोडिया हे नक्की. 

-------------------------------------------------------------

Ref 

https://english.cambodiadaily.com/lifestyle/from-angkor-to-london-cambodia-tries-to-recover-its-looted-treasures-178969/

https://www.straitstimes.com/asia/asian-insider-podcast-how-chinese-money-transformed-cambodian-coastal-town-sihanoukville

https://www.phnompenhpost.com/national/efforts-ongoing-rid-kingdoms-rivers-wartime-curse

-------------------------------------------------

कंबोडिया मालिकेतील ह्या आधीचे लेख वाचण्यासाठी -
१. बांते स्रेइ एक सुखद स्वप्न 

२. अंगकोरवाट - विश्वाची अमूल्य ठेव. 
३.ता प्रोह्म आणि प्रेह खान-अजब न्याय नियतीचा   
४. बयोन चेहरे- एक रहस्य 

५.अंगकोर थम- टेरेस ऑफ लेपर किंग आणि इतर 

6.PhnomPenh-कंबोडियाची राजधानी 





Comments

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...

शिवथरघळ

जर आपण भारताचा नकाशा पाहिला  तर आपल्याला नकाशात डावीकडे, गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत काळसर  हिरवी रेषा दिसते. ही रेषा  गुजराथ येथून सुरु होते  आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू मार्गे जाऊन केरळला पोहोचते. ती रेषा म्हणजेच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट म्हणजे दख्खनच्या पठाराची जणू किनारच आहे. दख्खन पठाराच्या काठावरच्या ह्या पर्वत रांगा आहेत.  या भागात बरीच जंगले, जलसाठे, धबधबे आहेत आणि जैवविविधता तसेच त्याचे वय यामुळे या भागाला 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून ओळखले गेले आहे. पश्चिम घाट हिमालयापेक्षाही जुना आहे! वरंधा घाट  📷विकिमीडिया कॉमन्स  पश्चिम घाट हा अनेक मुख्य नद्यांचे उगमस्थान आहे. वरील छायाचित्रात दिसते आहे त्या प्रमाणे, वर्षा ऋतूत या प्रदेशात अनेक धबधबे पाहायला मिळतात.  पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) अनेक सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे शिवथरघळ धबधबा. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण रौद्र सौंदर्यानिशी आणि ताकदीनिशी रोरावत खाली येताना दिसतो.  हा धबधबा सुमारे शंभर फूट उंचीवर...