मुख्य सामग्रीवर वगळा

कंबोडिया - मंदिरे आणि बरेच काही.

अंगकोरवाट आणि बाकी मंदिरे पाहून झाल्यावर सियाम रीपहुन एक बोट राईड अवश्य घ्यायला हवी. 

तसेही कंबोडियात सगळीकडे पाण्याच्या कालव्यांचे जाळे असल्याने सगळीकडे पाणी दिसतच राहते.

 पाण्याच्या तलावात कमळे तर आहेतच!


कंबोडियातील सर्वात महत्वाचे असे टोनले सॅप (सब/सप - असा उच्चार तिथले लोक करतात. ) तळे जवळच आहे. गोड्या पाण्याचे अत्यंत विशाल असे हे तळे आणि ह्याच नावाची नदी. ऋतूनुसार हिच्या प्रवाहाची दिशा बदलते हे एक आश्चर्यच आहे. 
२५ डिसेंबर २०१२ ला उतरत्या दुपारी आम्ही ह्या नौकाविहाराला गेलो होतो. मेकाँगचे काय किंवा टोनले सपचे काय, पाणी अतिशय मळकट आहे. लाल माती मिसळून झालेला गढूळ रंग असावा तसे आहे. ह्या तळ्यात अनेक तरंगत्या वसाहती आहेत. गावंच म्हणा ना लहानशी. मग त्यात घरे, दुकाने सगळे काही आहे. प्रामुख्याने कोळी इथे राहत असले तरी इतरही अनेक जण राहतात. काहीजण तर जन्मभर इथेच राहिलेले आहेत. काहीजणांकडे अधिकृत कागदपत्रे कोणत्याच देशाची नसतात. असेही काहीजण इथे राहतात असे कळले. 

इथल्या मुलांसाठी दुसऱ्या देशातील लोकांनी सुरु केलेल्या तरंगत्या शाळा, धर्मस्थाने देखील पाहायला मिळतात. 

तिथली मुले काहीतरी स्टंट दाखवून पैसे मागत असतात. मग ते उंचावरून उड्या मारणे असेल, सापाबरोबर एका टोपलीत बसणे असेल. हे सगळे पाहून मन अस्वस्थ होते हे नक्की. 

बोटीवर फडकणारा कंबोडियाचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवलेला दिसतो आहे. त्याचे कारण बहुधा कंबोडियाचे माजी राजे नॉरदोम सिंहनूक ह्यांचे १५ ऑक्टोबर २०१२ ला निधन झाले होते. त्यांचा अंत्यविधी फेब्रुवारी २०१३ मध्ये झाला. त्यानिमित्त दुखवटा व्यक्त करणे हे कारण असू शकते. 
नॉम पेन मध्ये सर्वत्र त्यांचे प्रचंड मोठे फोटो लावलेले होते. 

आपण गेल्या काही पोस्ट्स मधून कंबोडियातील अनेक ठिकाणे पाहिली. ह्यात नाही आले असे महत्वाचे ठिकाण म्हणजे माउंट कुलेन. तुम्ही जाल तेव्हा ते अवश्य पहा. 

कुलेन हा सुंदर धबधबा. त्याचे पाणी इतके शुद्ध की कंबोडियातील पाण्याच्या बाटल्या तयार करणाऱ्या कंपनीचे तेच नाव आहे. त्या प्रवाहात अनेक कोरलेली शिवलिंगे, शेषशायी विष्णू हे सगळे प्रत्यक्ष पाहण्यासारखे असेल. आम्ही गेलो होतो तेव्हा वेळाच्या अभावी आमचे पाहायचे राहिले ते. अंगकोरवाट पासून साधारण २५ / ३० किलोमीटर अंतरावर असलेला हा पर्वत. आता गाडी अगदी वरपर्यंत जाते म्हणतात. तरीदेखील प्रत्यक्ष जाल तेव्हा त्या वेळची परिस्थिती कशी आहे ती चौकशी करून जा. आम्ही गेलो तेव्हा काय कारण होते माहिती नाही, पण गाडी वरपर्यंत जात नव्हती. 

कंबोडिया म्हणजे फक्त अंगकोरवाट? कंबोडिया म्हणजे फक्त जुनी मंदिरे? कंबोडिया म्हणजे फक्त टोनले सॅप आणि मेकाँग?

हे सर्व असूनदेखील ह्या खेरीज कंबोडिया खूप काही उरतोच. 

कंबोडिया म्हणजे अप्सरा नृत्य. मोठ्या कंपन्या तर आहेत. पण गरजू लोक त्या नृत्य नाट्यातले पोशाख घालून सर्व मंदिरांच्या बाहेर उभे असतात. त्यांच्याबरोबर तुम्ही फोटो काढून घ्यावे आणि त्यांना पैसे द्यावे म्हणून. 

जे अप्सरा नृत्यनाट्य सभागृहात सादर केले जाते त्याच्या जाहिराती शहरभर लागलेल्या असतात. एक फार सुंदर पोस्टर पाहायला मिळाले. महाराष्ट्रीय नऊवारी साडीशी ह्या पोशाखाचे खूप साधर्म्य वाटले म्हणून मुद्दाम फोटो काढून ठेवला. 
कंबोडियातील एखादा तरी सांस्कृतिक कार्यक्रम अवश्य बघा. आम्ही रॉयल पॅलेस जवळील पाहिला होता. त्या त्या देशाची संस्कृती, इतिहास पर्यटकांना सोप्या आणि रंजक पद्धतीने कळण्यासाठी अशा कार्यक्रमांचा खूप उपयोग होतो. 

आम्ही पाहिलेल्या कार्यक्रमात जनसामान्यांचे आयुष्य, त्यांच्या आयुष्यातील संस्कार दाखवले होते. विवाह संस्कार तर अगदी हिंदू विवाह संस्कारांसारखाच होता. सप्तपदी, होम ह्या सकट. 

अंगकोरवाट ला एका मंदिराबाहेर ही मुले उभी होती. त्यांना काही सादर करून दाखवायचे होते. पण आम्हाला ते बघायला वेळ नव्हता. त्यांनी मग पैसे नाही मागितले पण एक वेगळी मागणी केली. मी कपाळाला लावली होती तश्या टिकल्या मागत होते. दुर्दैवाने माझ्यापाशी त्या वेळी नव्हत्या अजून टिकल्या! 

ताडाची किंवा ताडासारखी झाडे अनेक. त्यापासून पेय तयार करून ते ताजे ताजे विकणारे अनेक जण मंदिरपरिसरात दिसतील. 

लोकांची भरपूर कष्ट करायची तयारी असावी असे वाटले. काटक लोक आहेत.

मंदिरावर वाढणारी झाडे काढत राहणे हा बहुतेक तिथे सतत करावा लागणार उद्योग असणार. हा माणूस असाच साधारण तीस फुटांवर चढलेला आहे. कुठेही संरक्षक दोरी बांधलेली नाही. 

सतत काम तरी किती करणार? कामात मध्येच मैत्रिणींबरोबर गप्पा मारण्यासारखा विरंगुळा हवाच!

जवळपास प्रत्येक मंदिराबाहेर हॅन्डमेड पेपरवर एम्बॉस केलेले अप्सरा नृत्य, रामायणातले किंवा इतर देखावे विकणारे कलाकार तुम्हाला दिसतील. आम्ही देखील त्यांच्याकडून खरेदी केली होती. घरात लावले देखील होते. 

बाकी खरेदीसाठी नॉम पेन मधील मोठे स्थानिक मार्केट किंवा प्रत्येक पर्यटन स्थळाजवळ असणारी विविध प्रकारच्या वस्तूंची दुकाने आहेतच. 

रस्त्यावरचे दुकान 
कंबोडियातील प्रसिद्ध टुकटुक- स्कुटर रिक्षा. 

इथले लोक सर्वसाधारणपणे अगदी साधे, सुस्वभावी, नम्र लोक आहेत. पर्यटन हा त्यांचा महत्वाचा व्यवसाय आहे. साधारणपणे फसवणूक फारशी करत नाही. आदराने बोलतात. अर्थात आदर द्यावा आणि घ्यावा हे सर्वत्र खरेच असते. 

 कोविड मुळे पर्यटन बंद असताना अंगकोरवाट ची व्यवस्था पाहणाऱ्या कोणालाही कामावरून कमी केले गेले नाही ही फार आश्वासक गोष्ट वाटते. त्यांना त्या वेळात मंदिरांच्या दुरुस्त्या करता आल्या. एरवी सतत पर्यटक येतजात असल्याने त्या दुरुस्त्या करायला वेळ आणि जागा मिळत नाही. व्हील चेयर जाईल असे रस्ते करण्याचा प्रयत्न एखाददोन ठिकाणी तरी झाला आहे असे वाचले. 

कंबोडियाने स्थैर्य अनुभवले तसेच अत्यंत वादळी कालखंड देखील अनुभवला. अशांतीचा कालखंड देशाच्या परिस्थितीवर खूपच वाईट परिणाम करून गेला आहे. एकेकाळची समृद्धी नाहीशी झाली आहे. परकीय आर्थिक मदत मोठ्या प्रमाणावर घ्यायला लागत आहे. 

युद्धकाळातले जमिनीतले बॉम्ब अजूनही फुटत असतात. रानात चरणाऱ्या जनावरांचे, शेत नागरणाऱ्या शेतकऱ्यांचे जीव घेत असतात. इतकेच काय मेकाँग नदीत बुडवली गेलेली दारुगोळ्याने भरलेली जी जहाजे होती, त्यातील दारुगोळा वर काढण्याचे काम अजून चालू आहे. पाण्यात वर्षानुवर्षे विषारी घटक पदार्थ विरघळले गेले असण्याचे दुष्परिणाम लोक भोगत आहेत. 

अशा अवचित फुटणाऱ्या बॉम्बमुळे जीव गेलेले तर असंख्य आहेतच पण अपंग झालेले देखील अनेक जण आहेत. ते मग जमतील ते वेगवेगळे उद्योग करायचा प्रयत्न करतात. पर्यटन स्थळाबाहेर वाद्यवृंद तयार करून, संगीत ऐकवून पर्यटकांकडून पैसे मिळवणे हे अनेक ठिकाणी पाहायला मिळते. 

युद्ध करणारे देश वेगळेच आणि ज्या भूमीवर युद्ध केले गेले तिथले भोगणारे वेगळेच. हा संपूर्ण इतिहास वाचायला हवा. 

कंबोडियात चीनची आर्थिक तसेच इतरही गुंतवणूक वाढते आहे. ह्या संपूर्ण प्रदेशातच चीनला आपले वर्चस्व स्थापित करायचे असावे. गुन्हेगारीत देखील वाढ होते आहे. 

पुरातन मूर्तींची वर्षानुवर्षे झालेली तस्करी हा तर मोठाच विषय आहे. अनेक मंदिरे जंगलाने वेढली गेली असल्याने तस्करांचे फावले. तस्करांनी एका रात्रीचे १२ डॉलर असा पगार देऊन शेजारी देशातील लोकांना कामाला ठेवले. काम काय? तर कंबोडियामधील मंदिरातील मूर्ती तोडून चोरून आणणे. अशा हजारो मूर्ती अगदी आत्ता आत्तापर्यंत चोरल्या गेल्या. कंबोडियातून बाकी जगभरात पाठवल्या गेल्या. आता त्या परत कंबोडियात याव्यात ह्या साठी कंबोडियाचे प्रयत्न चालू आहेत. नुकतेच ब्रिटिश सरकारला पत्र पाठवले गेले आहे की तुमच्या म्युझियम्स मधील कंबोडियातील / ख्मेर मूर्ती अधिकृतरीत्या तिथे आल्या आहेत का हे तपासून पहा. ज्या नसतील त्या कंबोडियाला परत करा. जगभरातून काही मूर्ती परत मिळाल्या देखील. आशा आहे की बाकी मूर्तीदेखील स्वस्थळी पोचतील. 

कंबोडियाला एकदा जाऊन आलात की तुम्ही विसरू शकत नाही कंबोडिया हे नक्की. 

-------------------------------------------------------------

Ref 

https://english.cambodiadaily.com/lifestyle/from-angkor-to-london-cambodia-tries-to-recover-its-looted-treasures-178969/

https://www.straitstimes.com/asia/asian-insider-podcast-how-chinese-money-transformed-cambodian-coastal-town-sihanoukville

https://www.phnompenhpost.com/national/efforts-ongoing-rid-kingdoms-rivers-wartime-curse

-------------------------------------------------

कंबोडिया मालिकेतील ह्या आधीचे लेख वाचण्यासाठी -
१. बांते स्रेइ एक सुखद स्वप्न 

२. अंगकोरवाट - विश्वाची अमूल्य ठेव. 
३.ता प्रोह्म आणि प्रेह खान-अजब न्याय नियतीचा   
४. बयोन चेहरे- एक रहस्य 

५.अंगकोर थम- टेरेस ऑफ लेपर किंग आणि इतर 

6.PhnomPenh-कंबोडियाची राजधानी 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

कोस्टल कर्नाटक ६ - अविस्मरणीय शरावती बॅकवॉटर बोटिंग, शरावती कांडला मॅन्ग्रोव्ह बोर्ड वॉक

मी आधीच्या पोस्टमध्ये सांगितले होते की आजचा सूर्यास्त समुद्रात होता तर उद्याचा सूर्योदय शरावती नदीत असणार आहे! तोच हा सूर्योदय शरावती नदीत, कमळांच्या मध्ये.  शरावती बॅकवॉटर बोटिंग  दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहापर्यंत आम्ही बोटिंगच्या ठिकाणी पोचलो. कारण आम्हाला सूर्योदय चुकवायचा नव्हता. होनावर जवळचे शरावती नदीतील बोटिंग हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.  आजूबाजूची शांतता, संथ पाणी, स्वच्छ नितळ पाण्यात वाकून आपले प्रतिबिंब न्याहाळणारी नारळाची झाडे, पाण्यात अध्ये मध्ये असलेली लहानशी बेटे, खारफूटीची जंगले, कमळाची पाण्यावर तरंगणारी पाने, उगवत्या सूर्याची पाण्यात मिसळणारी किरणे, त्याने तांबूस झालेले पाणी .. एक वेगळेच जग असते ते. तुम्ही जितक्या वेळासाठी बोट ठरवलेली असेल.. तास दीड तास..  तो वेळ, तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असणार हे मी अगदी खात्रीने सांगू शकते.  आपोआप जगाचा, आयुष्याचा कोलाहल मंद होत जातो. पहाटेचा मवाळ प्रकाश, पाण्यावर हेलकावणारी नाव, हवेतला अगदी किंचितसा सुखद गारवा आणि मुरत जाणारी शांतता ह्या सगळ्याने मन निवळत जाते.  आम्ही गेलो त्या दिवशी,...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

लोकमान्य टिळक जन्मस्थान, रत्नागिरी

लोकमान्य टिळक म्हणजेच   बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक महत्वाचे नाव.  केसरी आणि मराठाचे संपादक, गणित आणि कायदयाचे शिक्षक, स्वातंत्र्यसमराला दिशा देणारे एक प्रभावी राष्ट्रीय नेतृत्व, गीतेवर भाष्य लिहिणारे तत्वचिंतक, संशोधक अशा विविध रूपांत आपण त्यांना ओळखतो.  त्यांनी म्हटलेले 'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ' हे नुसते वाक्य किंवा घोषणा राहिली नाही तर ती भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजली. स्वातंत्र्यसंग्रामाला ह्यातून ऊर्जा मिळाली.  वंदे मातरमचा घोष बंगालासोबतच संपूर्ण देशांत गुंजला आणि स्वातंत्र्याची प्रेरणा बनला. त्यात 'लाल बाल पाल' ह्या त्रयीचा मोठा वाटा होता.  ब्रिटिश सरकार त्यांना 'भारतीय असंतोषाचे जनक' असे म्हणत असे. निद्रिस्त समाजाला जागे करण्याचे श्रेय लोकमान्य टिळकांना जाते.  त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ ला रत्नागिरी येथे झाला. आज आपण पाहणार आहोत ते जिथे त्यांचा जन्म झाला ते रत्नागिरीमधील घर. आता तिथे स्मारक केलेले आहे.  वयाच्या साधारण दहाव्या वर्षापर्यंत लोकमान्य टिळक ह्या वास्तूत राहिले. ही वास्तू रत...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका  आज उडुपीहून लवकर निघून शृंगेरीला पोचण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच निघालो. रस्ता खूपच छान होता. आता खरं सांगायचे तर कोस्टल कर्नाटक प्रवासात रस्ता सुंदर होता म्हणणे ही द्विरुक्तीच आहे.  सगळ्या सडका अगदी एका पातळीतील आणि गुळगुळीत आहेत. खड्डे खळगे, रस्ते वर खाली असणे असे काही नसल्याने महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हाला थोडे चुकल्यासारखे वाटले खरे!!! शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, स्वच्छता ह्यामुळे प्रवास फार आनंदाचा होतो. उडुपी शृंगेरी रस्ता तर आगुंबे जंगलातून जातो. त्यामुळे दाट झाडी होती. रस्त्यात सुप्रसिद्ध आगुंबे घाटही येतोच. सकाळची प्रसन्न वेळ आणि इतका छान रस्ता..दिवसाची चांगली सुरुवात होण्यासाठी आणखी काय पाहिजे?!!  आम्हाला वाटले होते इतक्या लवकर फारसे कोणी श्रुंगेरीत आलेले नसेल. पण शृंगेरीला पोचल्यावर लक्षात आले की आमच्यासारखाच विचार अनेकांनी केला होता!  अनेक बस रात्रभराचा प्रवास करून सकाळी शृंगेरीला पोचल्या होत्या. त्या लोकांच्या प्रातर्विधी आणि अंघोळीसाठी अनेक ठिकाणी माफक पैसे घेऊन उत्तम सोय केलेली होती....

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....