Skip to main content

अंगकोरवाट - विश्वाची अमूल्य ठेव

 जगातील सर्वात मोठे मंदिर कोणते? कोणत्या देशाच्या झेंड्यावर मंदिराची आकृती आहे? ह्याची उत्तरे सगळ्यांना माहितीच असतील. सर्वांनी ते प्रसिद्ध छायाचित्र पाहिले असेलच. इथे ह्या पोस्टमध्ये प्रस्तुत करत आहोत अंगकोरवाटची आम्ही काढलेली छायाचित्रे. 

अंगकोरवाट 

जगातील सर्वात मोठे मंदिर आहे अंगकोरवाट आणि अर्थातच कंबोडियाच्या राष्ट्रीय ध्वजावर अंगकोरवाटची आकृती आहे. 

कंबोडिया कुठे आहे? आग्नेय आशिया मध्ये थायलंड, व्हिएतनाम आणि लाओस ने वेढलेला असा हा देश आहे.

कंबोडिया केवढा आहे? अगदी लहान आहे. १८१,३०५ चौरस फूट म्हणजे महाराष्ट्राच्या निम्म्याहून थोडाच जास्त मोठा असा हा देश आहे. 

किती जुना आहे? इसवीसन पूर्व ४००० वर्षे तरी इथे मानवी वस्ती असावी असे काही पुरावे पुरातत्व शास्त्रज्ञांना सापडले आहेत. 

पण आज आपण मुख्यत्वाने पाहणार आहोत ते तिसऱ्या चौथ्या शतकापासून भारतीय प्रभाव असणारे आणि भारतीय संस्कृती आजूबाजूच्या देशात नेणारे कंबोडिया. 

अनेक हिंदू आणि भारतीय राजवटी इथे भरभराटीला आल्या आणि आसपासच्या प्रदेशातील सर्वात मोठी राजसत्ता म्हणून प्रस्थापित झाल्या. साहजिकच त्यांचा प्रभाव संपूर्ण आग्नेय आशियावर आपल्याला दिसून येतो. 

देशाच्या सीमा त्या त्या वेळच्या राजसत्तेच्या शक्तीनुसार लहान मोठ्या होत राहिल्या. भारतीय भाषा -संस्कृत, संस्कृती, धर्म, कला, वास्तुशास्त्र ह्या सगळ्यांचा प्रभाव कंबोडियावर होता आणि आहे. 

कंबोडिया नाव कसे पडले? ह्याविषयी अनेक मतमतांतरे आहेत. कंबोज देश ह्या संस्कृत शब्दावरून कंपुचीया आणि कंबोडिया आले. पण मुळात कंबोज, कंबूज कसे आले? तर 'कंबू स्वयंभू' नावाचे भारतीय ऋषी तिथे गेले. त्यांनी तिथल्या मेरा नावाच्या राजकन्येशी विवाह केला आणि कंबूज देश वसवला असे म्हणतात. कोणी म्हणतात कौंडिण्य नावाचे ऋषी होते त्यांनी युद्धात स्थानिक राजवटीला जिंकले. तिथल्या नागकन्या राणी सोमाने त्यांच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. तिच्याशी विवाह करून ते तिथेच राहिले. तिथल्या एका मंदिराच्या माहितीत देखील ही कथा सांगितली जाते. 

कंबुजमधील वेगवेगळ्या राजांनी मोठमोठे मंदिर समूह बांधलेले आपल्याला दिसून येतात. अंगकोरवाट बांधले गेले ते बाराव्या शतकात. राजा सूर्यवर्मन द्वितीय ह्याने यशोधरापूर ह्या आपल्या राजधानीत हे मंदिर बांधले. दिवाकरपंडित नावाचे त्यांचे मंत्री, सल्लागार किंवा गुरु. ह्यांनी राजाला इथे मंदिर बांधण्यासाठी सुचवले असे शिलालेखात उल्लेख सापडतात. 

अंगकोर वाट हे नाव कसे आले?

असे म्हणतात की अंगकोर वाट हे पूर्वी होते नोकोर - नगर +वाट. त्यावरून अंगकोरवाट झाले. संस्कृतात नगर म्हणजे शहर आणि वाट म्हणजे आवार. आग्नेय आशियात वाट हा शब्द वापरला जातो मंदिराचे आवार किंवा मंदिर ह्या साठी. त्यामुळे अर्थातच अंगकोरवाटचा अर्थ होतो मंदिरांचे शहर. 

अंगकोरवाटचे मूळ नाव होते 'परम विष्णुलोक'. विष्णुचे पवित्र स्थान. 

त्या आधीच्या राजवटी शंकराला पुजणाऱ्या शैव होत्या. अंगकोरवाट मध्ये मात्र विष्णू हीच मुख्य देवता, विष्णूची पूजा आणि वैष्णव प्रभाव होता. 

कंबोडिया मधील सियाम रीप ह्या शहराच्या जवळ असलेले अंगकोरवाट आज देखील जगातील सर्वात मोठे मंदिर किंवा कोणत्याही धर्माचे धर्मस्थळ तर आहेच. पण अंगकोर थोम हे शहर देखील त्या काळातले जगातील सर्वात मोठे शहर असावे असे नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार तज्ज्ञ सांगत आहेत. चारशे एकरांच्याहून जास्त विस्तार असलेल्या क्षेत्रात हे भव्य मंदिर समूह उभे आहेत. 

मंदिराची संरचना चारी बाजूनी खंदक आणि पाण्याचा कालवा, त्याच्या मध्यभागी मंदिर अशी आहे. पाच शिखरे आहेत, त्यातले मधले सर्वात उंच म्हणजे साधारण दोनशे फुट उंच आहे. 

तीन वेगवेगळ्या स्तरांवर बाहेरपासून आतपर्यंत मंदिराची उंची वाढत गेली आहे. बाजूचे पाणी म्हणजे क्षीरसमुद्र आणि मध्यभागी मेरू पर्वत अशी ही संकल्पना आहे. 

भारतीय खगोलशास्त्राचा एक अद्भुत नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतो. मार्च मध्ये एकदा आणि सप्टेंबरमध्ये एकदा अशा दोन विषुवदिनांच्या पहाटे सूर्य अंगकोरवाटच्या मधल्या कळसाच्यावर उगवतो. त्या दिवशी जगभरातील असंख्य लोक ते दृश्य पाहण्यासाठी मंदिराच्या आवारात जमतात. 

पण अगदी रोजच भल्या पहाटे, सूर्योदयाच्या आधीपासून पर्यटक मंदिराच्या आवारात जमलेले असतात. अंगकोरवाटच्या कळसांमागून उगवणारा सूर्य आजपर्यंत करोडो फोटोंमध्ये आला असेल. 

आम्ही गेलो होतो त्या दिवशी म्हणजे २४ डिसेंबर २०१२ला हवा ढगाळ होती. सूर्य बराच वर येईपर्यंत दिसला नाही. ह्या पोस्टमधील सगळे फोटो आम्ही त्या दिवशी काढलेले आहेत. 

त्या दिवशी देखील हजारो पर्यटक पहाटेच जमलेले होते. अंधारात काहीच दिसत नव्हते पण अनेक लोक जमलेले आहेत एवढेच जाणवत होते. तितक्यात बारीक पाऊस पडायला सुरुवात झाली. तरीदेखील कोणी आपल्या धरून ठेवलेल्या जागेवरून हलले नाही. चांगला फोटो मिळण्याची आशा मोठी वाईट असते! 


थोडे उजाडल्यावर लक्षात आले की किती लोक तिथे जमलेले होते!

सर्वात पहिला फोटो -ज्यात मंदिराचे पाण्यात प्रतिबिंब दिसते आहे, त्या पाण्यात असंख्य कमळे उमलली होती. 



मंदिरात लांबलचक सज्जे आहेत ज्यात रामायण महाभारतातील दृश्ये आहेत. कित्येक किलोमीटर लांबी असलेले हे सज्जे असल्याने भिंतीवर शिल्पांसाठी खूप जागा मिळाली आहे. 



ह्या वरच्या फोटोत आपल्याला सज्जाच्या लांबी रुंदीचा, भिंतीवरील शिल्पांच्या उंचीचा आणि भव्यतेचा अंदाज येईल. 

समुद्रमंथनाचे दृश्य अंगकोर मध्ये विविध रूपांत साकारलेले दिसते. 

समुद्रमंथन 
समुद्रमंथन शिल्पात देव आणि दानवांच्या चेहरेपट्टीतला फरक, जोर लावून ओढताना त्यांनी रोवलेले पाय हे सगळे बारकावे दिसतात. परमेश्वराचा कूर्मावतार देखील आपल्याला ह्या शिल्पात पाहायला मिळतो आहे. मेरू पर्वताला आधार देण्यासाठी इथे कूर्म- कासव दाखवले आहे. समुद्रमंथनासाठी दोरी बनलेल्या वासुकी नागाचा फणा, खाली असलेले पाण्यातले मासे देखील खूप चान्गल्या प्रकारे दगडात दाखवले आहे. 

समुद्र मंथन 

शरशय्येवरील भीष्म पितामह 

राजा 

गरुडावर आरूढ विष्णू ?

नुसते त्या सज्जातील शिल्पे बारकाईने पाहायचे म्हटले तरी अनेक दिवस लागतील. 

मंदिर आवारात अनेक ठिकाणी देवता आणि अप्सरांच्या काही हजार आकृती कोरलेल्या आहेत. त्यांच्या वस्त्रांचे बारकावे, दागदागिने, केशरचना, चेहऱ्यावरील भाव ह्या सर्वात विविधता अचंबित करते. 




मंदिराच्या रचनेत अनेक स्तर आहेत. त्यामुळे साहजिकच भरपूर जिने आहेत. मधल्या मोकळया जागा आहेत. 






मंदिराच्या वरच्या मजल्यावरून दिसणारे दृश्य देखील फार सुंदर आहे. तिथून बघताना मंदिर संरचनेची थोडी तरी कल्पना येते. 

वाचनालय 

मंदिर आवारात अशा अनेक वास्तू आहेत. त्यातील काही राजघराण्याची वाचनालये होती असे म्हणतात. 

Decorative panel

वरील फोटोत असणाऱ्या अनेक प्रमाणबद्ध मूर्ती आपल्याला थक्क करतात. प्रत्येक मूर्तीची देहबोली वेगळी. केवळ मनुष्याकृतीच नव्हेत तर प्राणी, शस्त्रे, रथ, बाजूच्या भिंतीच्या कठड्यावरील कोरीवकाम सर्वच अप्रतिम आहे. 

सुस्थितीतील अशी पॅनेल्स आता संख्येने खूपच कमी उरली आहेत. पण जेव्हा सगळी म्हणजे शेकडो पॅनेल्स आणि हे संपूर्णच मंदिरच सुस्थितीत असेल तेव्हा किती कलापूर्ण आणि त्यामुळेच वैभवशाली दिसत असेल ह्याची आपण कल्पना करू शकतो. 

प्रचंड आवार, इतकी भव्यता, अवाढव्य उंची, अनेक शतकांपूर्वी मानवाने घडवलेला वास्तुरचनेतील चमत्कार, शिल्पांचे सौंदर्य, प्रत्येक कठड्यावरील, खांबावरील नक्षीकाम हे सगळेच आपल्याला विस्मयचकित करते. 

मधली काही शतके लपलेले ह्या मंदिराचे अस्तित्व, त्या आधी आणि नंतर झाली युद्धे, आधुनिक युगातील गोळीबाराच्या खुणा, वाढणारी झाडे हे सर्व मंदिराच्या दुरावस्थेला कारणीभूत होत आहेत. भंगलेल्या मूर्ती, तुटलेले कठडे, ढासळणारे चिरे, आवारात पडलेले दगड हे सगळे मन विषण्ण करते. 

२०१२ मध्ये मुख्य मंदिरासाठी चढण्याचे जिने उंच आणि अरुंद पायऱ्यांचे होते. त्यामुळे तिथे जाणे हा सर्वार्थाने रोमांचक अनुभव होता. आता कदाचित पायऱ्या जास्त चांगल्या केल्या असतील. 


वरून दिसणारे दृश्य 

मुख्य मंदिरात अर्थातच पूर्वी विष्णूची मूर्ती असणार. अष्टभुज अशा विष्णूमूर्तीला तिथे 'ता रिच' म्हटले जाते. 


नंतर म्हणजे बाराव्या शतकाच्या शेवटाकडे जयवर्मन सप्तम ने बौद्ध धर्माला राजाश्रय दिला आणि त्यामुळे अंगकोर वर बौद्ध प्रभाव वाढला. त्यामुळे आता ही विष्णू मूर्ती मुख्य मंदिरात नाही. तिथे आता बुद्ध मूर्ती आहे.


अजून एका ठिकाणी अशा बुद्ध मूर्ती आहेत. पूजा म्हणून आपल्या डोळ्यांपुढे येणारे सर्व संस्कार होत नसतील तरी मूर्तींसमोर उदबत्त्या लावल्या जातात, त्यांना वस्त्रे घातली जातात असे लक्षात आले. आता ह्या संदर्भात परिस्थिती काही बदलली असेल तर माहिती नाही. नुकतेच जाऊन आलेले कोणी ह्यावर खुलासा करू शकेल. 

राजसत्ता आणि धर्म ह्यांचे परस्पर समीकरण,आणि त्याचा संस्कृती आणि कलेवर होणारा परिणाम आपल्याला इथे पाहायला मिळतो. 

वरील फोटोतले शिखर आहे ते मध्य शिखर मेरू पर्वत म्हणून मंदिरातले सर्वात उंच शिखर आहे. 



मंदिराच्या भिंती म्हणजे मेरू पर्वताला वेढणारा वासुकी नाग असे समजले जाते. बाहेरून एका टोकाला दिसणारी शेपटी वरच्या एका फोटोत दिसते आहे. हे नागाचे मस्तक आहे ते मात्र तुटले होते, ते आता दुरुस्त करून खाली ठेवलेले आहे.

अंगकोरवाट पाहताना अनेक शतकांचा इतिहास आपल्या अवतीभोवती वावरत असतो. विविध भावनांचा कल्लोळ मनात होत राहतो. 

विश्वाची अमूल्य ठेव असलेल्या ह्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी अनेक देश कंबोडियाला मदत करत आहेत. भारताचा देखील ह्यात मोलाचा सहभाग आहे. 

 ज्यांना ज्यांना जाणे शक्य आहे त्यांनी ह्या मंदिरांची स्थिती अजून वाईट होण्याच्या आत, लवकरात लवकर जाऊन ही मंदिरे बघायला हवीत असे नक्कीच वाटते. 


#angkorwat #cambodia #siemreap #angkor #angkorwattemple #travel #khmer #siemreaptrip #travelphotography #phnompenh #angkortemples #angkorthom #cambodiatravel #asia #cambodiatrip #angkorwatcambodia #southeastasia #siemreapcambodia #temple #travelgram #beautifulcambodia #adventure #cambodian #explorecambodia #visitcambodia #taprohm #wanderlust #angkorwatsunrise #travelcambodia








Comments

  1. खूप छान फोटो, माहिती....

    ReplyDelete
  2. मस्त🙏 नेहमी सारख लिखाण यात तुझा मंदिरांचा अभ्यासपण जाणवतो👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...

शिवथरघळ

जर आपण भारताचा नकाशा पाहिला  तर आपल्याला नकाशात डावीकडे, गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत काळसर  हिरवी रेषा दिसते. ही रेषा  गुजराथ येथून सुरु होते  आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू मार्गे जाऊन केरळला पोहोचते. ती रेषा म्हणजेच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट म्हणजे दख्खनच्या पठाराची जणू किनारच आहे. दख्खन पठाराच्या काठावरच्या ह्या पर्वत रांगा आहेत.  या भागात बरीच जंगले, जलसाठे, धबधबे आहेत आणि जैवविविधता तसेच त्याचे वय यामुळे या भागाला 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून ओळखले गेले आहे. पश्चिम घाट हिमालयापेक्षाही जुना आहे! वरंधा घाट  📷विकिमीडिया कॉमन्स  पश्चिम घाट हा अनेक मुख्य नद्यांचे उगमस्थान आहे. वरील छायाचित्रात दिसते आहे त्या प्रमाणे, वर्षा ऋतूत या प्रदेशात अनेक धबधबे पाहायला मिळतात.  पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) अनेक सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे शिवथरघळ धबधबा. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण रौद्र सौंदर्यानिशी आणि ताकदीनिशी रोरावत खाली येताना दिसतो.  हा धबधबा सुमारे शंभर फूट उंचीवर...