Skip to main content

Phnom Penh - कंबोडियाची राजधानी 

 

फुलांचे दुकान 

कमळांचा गुच्छ 

सुगंधी लिलियम्स 

सुगंधी लिलियम्स 

Phnom Penh मधील सेंट्रल मार्केट मधले हे एक फुलांचे दुकान आहे. लक्षात ठेवा की Phnom Penh चा उच्चार करताना सुरुवातीचा Ph आणि शेवटचा h सायलेंट आहे, त्याचा उच्चार करायचा नाही. म्हणजे फक्त नॉम पेन असे म्हणायचे. अवघड वाटते आहे का लक्षात ठेवायला? मग तुम्ही नॉम पेन च्या जुन्या नावाचा उच्चार करून पहा. तो कदाचित सोपा वाटेल. जुने नाव आहे Krong Chaktomuk Serimongkul!!! 

नॉम पेन मधील, म्हणजेच कंबोडियाच्या राजधानीमधील सेंट्रल मार्केट हे अगदी अवश्य जाण्याजोगे ठिकाण आहे. 

सेंट्रल मार्केट 
📷Wikimedia Commons

आर्ट डेको शैलीतील ही इमारत आहे. गडद पिवळ्या रंगाचा एक भव्य घुमट मध्यभागी आणि त्यातून निघालेली चार दालने अशी इमारतीची रचना आहे. हे सगळेच वेगवेगळ्या दुकानांनी गच्च भरलेले आहे. दागिने, टर्न, मौल्यवान खडे, भेट वस्तू, स्मृतिचिन्हे, कपडे, घड्याळे, खेळणी, भांडी ... तुम्ही कोणतेही नाव घ्या आणि बहुतेक ते इथे मिळेलच! 

मध्यभागी असलेला घुमट 
📷Wikimedia Commons


दुकानांनी गजबजलेले एक दालन .
📷Wikimedia Commons

हि इमारत १९३७ मध्ये बांधली गेली. आम्ही २०१२ मध्ये गेलो होतो तेव्हा नुकतेच ह्या इमारतीचे नूतनीकरण झाले होते. भरपूर गर्दीची जागा असेल तरी, इमारतीच्या छताची उंची आणि मोकळी, ताजी हवा खेळावी म्हणून केलेली जाळी ह्यामुळे तिथे घुसमटत नाही. पर्यटक आणि स्थानिक लोक, इथे सगळ्यांचीच गर्दी असते. 

नॉम पेन ही कंबोडिया/ कम्पूचीया ह्या देशाची राजधानी. कंबोडिया चा गतकाळ अतिशय वादळी घटनांनी ग्रस्त झालेला होता. कमोडियातील आद्य मानवी वसाहत अगदी ४००० B.C.मध्ये देखील अस्तित्वात होती ह्याचे पुरावे सापडले आहेत. हिंदू आणि बौद्ध धर्माचा,जीवनशैलीचा प्रभाव असणारी उर्जितावस्था काही शतके म्हणजे चौदाव्या शतकापर्यंत टिकली होती. त्यानंतरच्या चार शतकांचा इतिहास नीट नोंदलाच गेलेला नाही. त्या काळाला कंबोडियाचे डार्क एज म्हटले जाते. अनेक आक्रमणे, अनेक युद्धे ह्यामुळे कंबोडिया विनाशाच्या स्थितीला येऊन ठेपला होता. त्यानंतर जवळपास एक शतक फ्रेंचांचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष अंमल होता. विसाव्या शतकाचा उत्तरार्ध नोंदला गेला तो राज्यपद्धतीत आणि शासन प्रणालीत झालेल्या बदलांमुळे. एकदोनदा नव्हेत तर अनेकदा हे बदल झाले. १९७५-७९ ह्या काळातील Khmer Rouge/ Pol Pot राजवटीतील वंशविद्वेष, वंशहत्या, नरसंहार, सामूहिक कत्तली हे तर मानवजातीच्या इतिहासातील काळा डाग म्हणूनच नोंदवले जातील. 
सध्या कंबोडियामध्ये घटनात्मक राजसत्ता आहे. २००४ पासून Norodom Sihamony हे राजा म्हणून निवडले गेले आहेत व आत्ताही सत्तेत आहेत. त्यांचे वडील King Sihanouk ह्यांचे बीजिंग येथे १५ ऑक्टोबर २०१२ ला निधन झाले व अंत्यविधी नॉम पेन येथे ४ फेब्रुवारी २०१३ ला झाला. आम्ही जेव्हा डिसेंबर २०१२ मध्ये नॉम पेन येथे गेलो होतो, तेव्हा त्यांचा मृतदेह रॉयल पॅलेस मध्ये ठेवलेला होता. शंभर सगळीकडे दिवंगत राजाचे फोटो असलेले मोठाले फलक लागलेले होते. 

 

भूतपूर्व राजा Norodok Sihanouk( १९२२-२०१२)


नॉम पेन ही फ्रेंचांनी बांधलेली राजधानी Tonle Sap, Mekong आणि Bassac ह्या तीन नद्यांच्या संगमावर वसलेली आहे.शहरात अनेक ठिकाणी नदीतीरावर सुंदर बाग आणि फिरण्यासाठी जागा विकसित केलेल्या आहेत. 

नदीच्या किनारी..

 संध्याकाळी ह्या बागांतून फेरफटका मारणे किंवा मग नावेने नदीतुन फिरून येणे ही नॉम पेन मधील संध्याकाळची विशेष आकर्षणे आहेत. 
नौकाविहार 

नावेमधून फिरताना तुम्हाला अनेक उंच उंच इमारतींची बांधकामे चाललेली दिसतात. लवकरच नॉम पेन ची क्षितिज रेषा ह्या बांधकामांनी भरून जाणार आहे किंवा खरे तर आटा पर्यंत भरून गेली देखील असेल. आपल्या वादळी भूकालावर, त्यामुळे झालेल्या पीछेहाटीवर मात करून नॉम पेन आधुनिक तंत्रज्ञानाकडे जगाच्या बरोबरीने जाउ पाहत आहे. 

ह्या सगळ्या प्रक्रियेत गावातून शहरात आलेल्या लोकांच्या लोंढ्याला पुरेशा नागरी सुविधा नॉम पेन मध्ये नाहीत. वाहतूक कोंडी ही नित्याची बाब आहे. पण काही लोकांनी ह्या अडथळ्यांवर मत केली आहे. ते चक्क बोटीवर तरंगत्या घरात राहत आहेत. तुम्ही ह्या फोटोत नीट पाहिलेत तर तुम्हाला एका नौकघरावर चक्क डिश अँटेना देखील दिसेल!

तरंगती घरे

ह्या शहराचे नाव नॉम पेन कसे पडले त्याची एक रंजक कथा सांगण्यात येते. चौदाव्या शतकात ,पेन नावाच्या एका आजीबाईंना एक लाकूड नदीवर तरंगताना दिसले. त्यांनी ते किनाऱ्यावर आणले. त्या लाकडात त्यांना चार बुद्धमूर्ती सापडल्या. असे म्हणतात की एक विष्णुमूर्ती देखील सापडली. त्या आजीबाईंनी ह्या सगळ्या मूर्तींसाठी टेकडी उभारून त्यावर मंदिर बांधले. म्हणून ह्या शहराचे नाव नॉम पेन - पेनबाईंची ची टेकडी असे पडले. त्या आजीबाईंनी बांधलेल्या मंदिराचे नाव आहे Wat Phnom.- टेकडीवरचे मंदिर. 

हि टेकडी साधारण ३० मीटर उंच आहे. संपूर्ण परिसरात मंदिरे,पॅगोडा,स्तूप वगैरे अनेक बांधकामे आहेत. ह्या संपूर्ण परिसराला वाट नॉम ऐतिहासिक परिसर म्हणून ओळखले जाते. 

मुख्य पॅगोडाकडे जाणाऱ्या पायऱ्या 

मुख्य पॅगोडा

भित्तीचित्र 

पॅगोडामधील बुद्ध मंदिर 

 Wat Phnom परिसरातील स्तूप 

टेकडीवरून दिसणारे दृश्य

नॉम पेन मधील बाकी काही पहिले नाहीत तरी राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय मात्र आवर्जून बघायला हवे. परंपरागत कलात्मक वास्तुशैलीतील ही टेराकोटाची इमारत फार सुंदर आहे. १०० वर्षांपूर्वी बांधल्या गेलेल्या ह्या इमारतीतील चौक , बाग, कृत्रिम तळे तसेच बागेची सजावट ह्या सगळ्यामुळे इमारत लक्षात राहते. 

राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय -प्रवेशद्वार 

दर्शनी हॉल - गरुड 

वस्तुसंग्रहायलयाच्या आत फोटो काढायला परवानगी नाही. तिथे विष्णूच्या आणि शंकराच्या सुंदर मूर्ती आहेत. अंगकोर राजवट हा कंबोडियाच्या सुवर्णकाळ मनाला जातो. त्याच्या अनेक खुणा आपल्याला इथे पाहायला मिळतात. इथे संस्कृत मध्ये कोरलेले काही प्राचीन लेख देखील पाहायला मिळतात. संग्रहालय खरेच खूप मोठे आहे. 

जरी आत फोटो काढायला परवानगी नाही तरी मधल्या चौकात ,बागेत, प्रवेश करतो त्या हॉल मध्ये फोटो काढता येतात. ही बघा, ह्या सुंदर इमारतीतील काही दृश्ये. 


मध्यभागी असलेला चौक, बाग आणि तळे 

पारंपरिक वास्तुशैली

कृत्रिम तळे 

 
बागेतील गणेशमूर्ती

रॉयल पॅलेस परिसरात सध्याच्या राजांच्या निवासस्थानासोबतच इतरही अनेक महत्वाच्या इमारती आहेत. त्यातील बऱ्याच इमारती लोकांना बघण्यासाठी उपलब्ध आहेत. एक सिल्वर पॅगोडा आहे ज्यात चांदीच्या फरशा आहेत. एक पाचूची बुद्ध मूर्ती आहे. त्या मूर्तीवर हिरे आणि इतर मौल्यवान रत्ने जडवलेली आहेत. शाही सिंहासन असलेला एक हॉल आहे, जिथे खास बैठक होतात, विशेष अतिथींचे स्वागत केले जाते. पॅगोडाज आहेत,अजूनही काही इतर इमारती आहेत. इमारतींच्या आतल्या भागाचे फोटो घ्यायला परवानगी नाही. राजवाड्याच्या सर्वात जुन्या भागातल्या भिंतींवर रामायणातील काही भित्तिचित्रे आढळतात. 

रॉयल पॅलेस परिसरातील पॅगोडा 

रॉयल पॅलेस परिसरातील एक इमारत 

विपुल सोनेरी रंग

वैशिष्ट्यपूर्ण कळस 

राजवाड्यातील गणेश मूर्तींचा संग्रह 

शाही सिंहासन हॉल 

रॉयल पॅलेस परिसरातील पॅगोडा 

नॉम पेन मध्ये एक किलिंग ग्राउंड आहे जिथे हजारोंच्या, लाखोंच्या संख्येत लोक मारले गेले होते, शिवाय एक तिथे झालेल्या नरसंहाराच्या भीषण खुणा वागवणारे संग्रहालय आहे. पण मी हे दोन्हीही बघायला जाण्याइतका धीर गोळा करू शकले नाही. ह्या दोन्हीही जागा, त्या जी कहाणी सांगत आहेत ती कहाणी हा मानवतेवरील काळा डाग आहे. तुम्ही नेटवर शोधून ह्या विषयी आणखी माहिती वाचू शकता. 

राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयाच्या मैदानातील रंगमंचावर रोज एक सांगीतिक कार्यक्रम सादर होतो. आम्हाला जो कार्यक्रम पाहायला मिळाला त्यात कंबोडियातील रूढी,परंपरा दाखवणारा कार्यक्रम होता. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या अनेक प्रथा त्यात दाखवलेल्या होत्या. एक विशेष गोष्ट अशी की लग्न समारंभातील काही रूढी ह्या भारतातील हिंदू विवाह पद्धतीशी साधर्म्य दाखवणाऱ्या होत्या. 


विवाहविधी 

विवाहविधी - प्रार्थना 

वधूवरांवर फुलांच्या पाकळ्या उधळणे 

मध्यभागी केलेल्या पूजेच्या भोवती फेरे

 साधारणपणे पर्यटक पाहतात त्या जागा जवळ जवळ आहेत. तुम्ही Sisowath Quay वर चालत चालत गेलात तर ह्यातील बरीच ठिकाणे पाहून होतात. 


नदीकिनारी असलेल्या बागेतून दिसणारे शहराचे सुंदर दृश्य 

सैनिकांचे पुतळे

नदीच्या किनारी 

अप्सरा डान्स बॅले हा कंबोडियातील प्रसिद्ध ग्रुप आहे. नॉम पेन शहरात ठिकठिकाणी तुम्हाला अप्सरा डान्स बॅले ची पोस्टर्स दिसतील. 

अप्सरा नर्तिकेचे पोस्टर

शहरातल्या प्रवासासाठी टॅक्सीज सहज उपलब्ध आहेतच. अजून एक खास वाहतुकीचा मार्ग उपलब्ध आहे तो म्हणजे स्कुटर रिक्षा!

स्कुटर रिक्षा 

तुम्ही कंबोडियात असाल आणि शाकाहारी किंवा विगन असाल, तर तुम्हाला अगदी जागरूक राहावे लागेल.अन्न करताना काय काय वापरले आहे त्याची चौकशी करायला हवी. कारण त्यांची शाकाहारी अन्नाची संकल्पना वेगळी असू शकते. आम्ही गावात फिरत होतो, बाजाराजवळून जाताना मला ही हातगाडी दिसली. मला ते काय आहे ते कळलेच नाही. लोक आपण भुईमुगाच्या शेंगा घेतो, मक्याची कणसे घेतो, फळांच्या फोडी घेतो आणि मग तो गाडीवाला त्यावर मसाला टाकून देतो, तसाच हा गाडीवाला देखील देत होता. मग मी जवळ जाऊन त्याचा फोटो घेतला. बघा, तुम्हाला ओळखू येतंय का? कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा. 

ओळख काय?!! कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा!

नॉम पेन ला आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि बऱ्याच देशांशी विमान वाहुतुकीने कंबोडिया जोडला गेलेला आहे.आम्ही इथे दोन दिवस आणि दोन रात्री राहिलो होतो. आम्ही सिंगापूरहुन सिम रीप ला जाताना नोम पेन ला गेलो होतो. जर का तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर तुम्ही नॉम पेन ला दोन तीन दिवस द्या. नाहीतर मग नोम पेन ला एक दिवस एक रात्र देखील पुरेल. राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय मात्र नक्की पहा. राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय तुम्हाला कंबोडियाच्या इतिहास, संस्कृती, धर्म आणि कला ह्याबद्दल एक पार्श्वभूमी तयार करून देते, ज्या माहितीचा तुम्हाला सिम रीप जवळची अंगकोर आणि इतर मंदिरे पाहताना उपयोग होईल.
अंगकोरची मंदिरे तर प्रत्येकाने पाहायलाच हवीत अशीच. त्याबद्दल परत कधीतरी.

Comments

  1. मस्त 👌तिसर्य़ा 😍😍😍गणपती पण छान .

    ReplyDelete
  2. मस्त लिहिलेस. कोड्याचे उत्तर खाण्याचे शिंपले म्हणजे तिसऱ्या किंवा स्नेल आहेत. स्पष्ट दिसत नाहीये

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 4 - स्यालमी - बनियाकुंड

आदल्या संध्याकाळी भुरभुरत असलेल्या पावसाने हवेतला गारवा अजूनच वाढवला होता. इतक्या लहान तंबूमध्ये झोपण्याची पहिलीच वेळ होती. पण सुरुवातीचे दोन तास सोडले तर नंतरचे पाच तास चांगली झोप झाली. अगदी प्रसन्न जाग आली.काल एकदाच क्षणभर का होईना, मनात तरळून गेलेला,"आपण ट्रेक इथेच थांबवावा का?"ह्या विचाराचा आज कुठे मागमूसही उरला नव्हता. मनात होते,  "इरादे अगर पक्के हो, तो डगमगाए कदम क्यु? हौसले बुलंद हो तो सहमा सा हो मन क्यु? मंज़िल अब दूर नहीं.. बस संभल के चलना, कभी न रुकना, हार ना मानना, बस्स .. चलते रहना।" - वृंदा टिळक आमच्या सगळ्याच कॅम्पसाईट्स भन्नाट जागांवर होत्या. आजची स्यालमीची कॅम्प साईट देखील त्याला अपवाद नव्हती. नजर पोचेल तिथपर्यंत फक्त पर्वत रांगा आणि जंगल. मानवी वस्तीची जवळपास काहीच चाहूल नाही.  📷Samrat Darda  सगळ्यांचे आवरून वॉर्म अप करून आम्ही निघालो. आजचा सगळा रस्ता सुंदर असणार होता. काल इतके चढ उतार चढून उतरून आता सगळ्यांची चांगली तयारी झाली होती. शिवाय आज मी नीकॅप्स देखील घातल्या होत्या!! त्यामुळे समजा जरी आज रस्ता अवघड असला असता तरी काळजीचे काही कारण नव्हते....

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 3 - देवरियाताल -स्यालमी

ट्रेकचा तिसरा दिवस. कालचा सारी- देवरियाताल प्रवास तर खूपच छान झाला होता. पायही दुखले नव्हते की थकल्यासारखे देखील वाटले नव्हते. त्यामुळे उत्साहाने आजच्या दिवसाला सुरुवात केली. आजचा दिवस तसा अवघड असेल अशी, इंडियाहाईक्सच्या  वेब साईटवरचे वर्णन वाचून कल्पना आली होती. आज अंतर नऊ किलोमीटरपेक्षा जास्त होते. पण वाटेत अनेक शिखरे दिसणार होती. घनदाट जंगलातून जाणार होतो त्यामुळे अनेक पक्षीही दिसणार होते. त्याचीही उत्सुकता होती. सगळेजण देवरियाताल कॅम्पसाईट मधून बाहेर पडलो. अवघे एक दिवस वास्तव्य केलेले असले तरी मन थोडेतरी गुंतलेले असतेच.  देवरियातालच्या रस्त्याच्या डाव्या बाजूने एक जंगलवाटेचा फाटा होता. त्या वाटेने आम्ही निघालो. थोडा वेळ चालल्यावर आम्हाला पुन्हा एकदा चंद्रशिला शिखर दिसणार होते. अधून मधून दिसणारे हे शिखर आपल्याला कुठे पोचायचे आहे त्याची जाणीव करून द्यायचे, त्यानेही एक नवे बळ मिळायचे. पण आज आकाश इतके ढगाळ होते की शिखर दिसलेच नाही.उजवीकडे पुन्हा एकदा सारी गाव मात्र दिसले. 📷Cotrekker 📷Sumati Dhembre ह्या फोटोवरून कशा रस्त्याने आम्ही चालत होतो, चढ किती होता त्याची कल्पना येईल....

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 5- अंतिम भाग - बनियाकुंड- तुंगनाथ- चंद्रशिला

  📷Samrat Darda १५ एप्रिल, बनियाकुंड कॅम्पसाईट मधून काढलेला चंद्राचा सुंदर फोटो. त्या दिवशी शुक्ल पक्षातील सप्तमी किंवा अष्टमी असावी. कारण १७ एप्रिलला रामनवमी होती. सुंदर काळ्याभोर रात्रीचा सघन अंधार.. पौर्णिमा अजून साताठ दिवसांवर असली तरीही आत्तापासूनच तेजाळलेला चंद्र.. चमचमणारे, मध्येच ढगांच्या आड लपणारे चांदणे, आमच्या मनातील समिटविषयीची उत्सुकता..फार अनोखी रात्र होती ती.  उद्या पहाटे दोन वाजताचा वेकप कॉल असणार होता. आम्हाला आवरून, ब्रेकफास्ट करून तीन वाजता निघायचे होते. न विसरता घेण्याच्या गोष्टी तशा तर डे पॅक मध्ये भरूनच ठेवल्या होत्या. हेडलॅम्पच्या उजेडात सामान देखील आवरून ठेवले होते. पहाटे निघताना बाकी सामान मेन टेन्ट मध्ये नेऊन ठेवायचे होते.  इतक्या उंचीवर जायचे होते. काही तासांत आम्ही ४००० फुटांचा अल्टीट्युड गेन करणार होतो. झोपण्यासाठी डोळे मिटले खरे, पण मिटल्या डोळ्यांपुढेही बर्फाच्छादित शिखरांचीच दृश्ये तरळत होती. कधीतरी झोप लागली. सतत अधूनमधून जाग येऊन घड्याळात बघत होते. सगळे दोन वाजता उठणार, त्या आधी आपण आपले आवरून घेऊ या असा विचार डोक्यात होता तो बहुधा सतत ज...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...