Skip to main content

36 तासांचा दिवस - एका दिवसात16000+ किलोमीटर प्रवास

 36 तासांचा दिवस - एका दिवसात16000+ किलोमीटर प्रवास 


वर्षातला सर्वात मोठा दिवस कोणता असे विचारले तर उत्तर नक्की असेल की 21 जून..पण ह्या वर्षी आमचा सर्वात मोठा दिवस होता 26 जून..6 चे यमक जुळवत तो दिवस होता 36 तासांचा!! 


आमचे विमान होते 26 जून ला मुंबईहून पहाटे 2.20 चे. 25 जून ला म्हणजे निघायच्या आदल्या दिवशी मुंबईत 144 कलमाच्या बातम्या. शिवाय परिस्थिती आणखी रोमहर्षक करण्यासाठी म्हणून आणखी एक बातमी आली. ठाण्यात पण काहीतरी गडबड होणार अशी जोरदार हवा होती. म्हणून 25 जूनला रात्री लवकरच म्हणजे रात्री 10 वाजता घरातून निघालो. निघण्याआधीच एअरलाईनची अगदी ताजी ताजी ईमेल मिळाली होती की फ्लाईट जवळ जवळ 40 मिनिटे लेट आहे. पण प्रत्यक्षात विमानाचे पाय की पंख चाळीस मिनिटानंतरही मुंबईतून निघेच ना लवकर!अतिशय जड अंतःकरणाने विमानाने जवळपास पहाटे पावणेचार वाजता जमीन सोडली.


 विमानाने इतका वेळ मुंबईत घालवला तो मात्र सार्थकी लागला. KLM चे विमान असूनही अगदी रुचकर विगन अन्न मिळाले. सुरुवातीला कॅप्टनने अनाऊंस केले की विमान उशीर झालेला वेळ जवळ जवळ भरून काढेल, विमान नियोजित वेळेपेक्षा फार उशिरा Amsterdam ला पोचणार नाही.


खिडकीतून बाहेर पाहताना कापूस पिंजून ठेवल्या सारखे ढगांचे अनेक थर दिसत होते. त्यावरून जाताना विमानाला देखील मऊ मऊ वाटत असेल. किंवा सिनेमाचा स्पेशल इफेक्ट्सवाला एखादा सेट असावा तसे दिसत होते ढग. अधून मधून, ते कवितेत म्हणतात तसे ढगांचे अवगुंठन की काय ते बाजूला झाल्यावर खालचे दृश्य दिसत होते. 


डोंगर, हिरवळ पाहून मन तृप्त झाले. परत ढगांचा पडदा बाजूला झाला तेव्हा दिसला ब्लॅक सी. इतक्या वरून पाहताना अगदी शांत वाटत होता. नुकत्याच त्यात झालेल्या युक्रेन रशिया चकमकीचा, आगीचा काहीच मागमूस देखील त्याने दाखवला नाही. अर्थात अगदी थोडा वेळच ढग बाजूला झाले होते. 

 जेव्हा windmills दिसायला लागल्या तेव्हा आपण जवळ आलो ह्याची खात्री पटली. लांबलचक शेतांचे पट्टे, सुंदर घरे, अधून मधून दिसणारे कालवे..फारच सुंदर आणि प्रसन्न दृश्य होते ते. 






कॅप्टन ने उशीर झालेला वेळ जवळजवळ भरून काढू असे आश्वासन दिले होते खरे पण दिलेली आश्वासने पाळण्यासाठी नसतात बहुतेक! लवकर येण्याचे कितीही त्याच्या मनात असले तरी विमान चांगलेच उशिरा पोचले. तिथून आमचे पुढचे विमान होते San Francisco चे. त्यामुळे आता अगदी धावत पळत सगळे सोपस्कार पूर्ण करून ते गाठायला हवे होते.

 शिपुल चा अतिशय भव्य विमानतळ. बसायसाठी, झोपण्यासाठी जागोजाग सोफे ठेवलेले आहेत. लायब्ररी आहे, लॉकर्स आहेत. उत्तमोत्तम दुकाने आहेत. सर्व काही आहे. नाही आहे ती फक्त सुरळीत आणि वेगवान व्यवस्था. त्यात सध्या तिथे काम करणारे लोक अगदी कमी आहेत. त्यामुळे अनेक काऊंटर बंद आहेत. 

आमचे विमान उशिरा पोचले. अनेकांच्या कनेक्टिंग फ्लाईट होत्या. पण immigration आणि security वाल्यांना त्याच्याशी काही देणे घेणे नव्हते. सुमारे हजार दीड हजार लोक रांगेत उभे होते. त्यात ज्यांची कनेक्टींग फ्लाईट आहे त्यांच्यासाठी वेगळी रांग नाहीच. आमच्या सारखे अनेक जण ऑफिसर ला सांगत होते की आम्ही जर का लवकर हे सर्व सोपस्कार पार पाडले नाहीत तर आमचे विमान चुकेल. पण ते सर्व ऑफिसर नियम म्हणजे नियम ह्यावर ठाम होते. रांगेचा फायदा सर्वांना!! रांगेत उभे रहा. नंबर येईल तेव्हा येईल.. त्यातच अर्ध्याच्या वर काऊंटर बंद. चालू असलेल्या पैकी देखील अनेक काऊंटर मध्येच काही वेळ बंद झाले होते.


जे काऊंटर चालू होते तिथला कामाचा वेग तर खेडेगावात मुक्कामी S T येते तिच्या ड्रायव्हर कंडक्टर इतकाच. त्यामुळे जे काम 15/ 20 मिनिटात होणे अपेक्षित होते त्याला चार पाच पट वेळ लागत होता. आम्हा सर्वांचे वारंवार सांगून झाल्यावर, विमानांना 15 मिनिटे उरलेली असताना, ज्यांची विमाने चुकायच्या बेतात आहेत अशा लोकांना अखेर पुढच्या रांगेत जायची परवानगी दिली त्याने. 


तिथून सर्व सोपस्कार करून गेटशी पळत जाईपर्यंत अजून 10 मिनिटे गेली. कारण दोन्ही मध्ये भरपूर अंतर. विमानतळ भव्य असल्याने अंतरे खूप जास्त आहेत.

तिथे पळत जाऊन पोचलो तर विमान अजून निघायचे होते. ते दिसलेच आम्हाला काचेबाहेर उभे. हुश्श झाले अगदी. पण गेटवर तिकिटे दाखवताच शुभ समाचार मिळाला की ब्रिज काढला आहे विमानाचा नुकताच. आता तो परत लावायचा तर खूप उशीर होईल. तसे ते करू शकत नाहीत. थोडक्यात काय तर आम्हाला त्या विमानात जाता येणार नाही. 
हेचि काय फळ मम तपाला..इतके पळत आलो ते वायाच गेले म्हणायचे की! 

मग आमची वरात निघाली परत ट्रान्स्फर ऑफिस कडे. वाटले होते अर्ध्या तासात दुसऱ्या फ्लाईटचे मिळेल तिकीट आणि पुढचा प्रवास सुरू होईल. ते ऑफिस विमानतळावरच पण भरपूर लांब. पावले मोजणारे घड्याळ हातात घातले नसल्याचे फारच वाईट वाटले चालताना!! 

तिथे पोचतो तर काय आमच्यासारखे फ्लाईट चुकलेले चारपाचशे लोक होते तिथे. क्यू तिकीट घेतल्यावर प्रत्यक्ष नंबर यायचा वेळ त्यांनी दिला होता. त्यामुळे तिथे समोरच घुटमळत राहिलो. प्रत्यक्षात नंबर आला त्यानंतर तीन साडेतीन तासांनी.


तोपर्यंत अनेक कहाण्या ऐकायला पाहायला मिळाल्या. किती प्रकारचे गोंधळ होऊ शकतात हे दिसले. एक नव्वदीच्या युरोपियन आजी आणि त्यांची नात. एक फ्लाईट चुकल्यावर दुसरीचे तिकीट मिळाले..पण ते वेगळ्या विमानतळावर जाणारे होते, जिथला विसा त्यांच्याकडे नव्हता. मग त्यांना गेटवरून परत यावे लागले होते. खूपच अस्वस्थ झाल्या होत्या. साहजिकच होते त्यांचे रडकुंडीला येणे. 

दुसरे एक जोडपे होते त्यांची एक फ्लाईट चुकली. आता दुसरी फ्लाईट तीन दिवसांनी. मग इथेच तीन दिवस मुक्काम करायचा किंवा मग तोच प्रवास तुकड्या तुकड्यात करून दोन दिवसांत घर गाठायचे. त्या साठी त्यांना तीन विमाने बदलायला लागणार होती. इतक्या सगळ्या गोंधळात अजून वाईट म्हणजे त्या मुलीची हिऱ्याचे पदक असणारी सोन्याची साखळी हरवली.

एक सातवा महिना लागलेली आई आणि बरोबर 4 वर्षांची लहान मुलगी. त्यांना कधीचे मिळणार होते तिकीट कोणास ठाऊक?

एक मोठा परिवार होता. त्यांना दुसरे तिकीट मिळाले ते इतक्या लगेचचे होते की सगळ्यांना गोळा करून गेटवर जाण्यासाठी त्यांना पळायला लागले. मग त्यातल्या तरुण मुलांनी पळत पुढे जायचे आणि गेटवर थांबायचे असे त्यांनी ठरवले!

अडचणींचे विविध प्रकार..त्या मानाने आपली समस्या काहीच नाही असे आमचा नंबर यायच्या आधीच मला पटले होते. 


अखेर आमचा नंबर आला. काऊंटर वरच्या ऑफिसर ने आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. त्याच दिवशीच्या अमेरिकेत जाणाऱ्या अजून दोन फ्लाइट्स तर इतक्या वेळात निघून गेल्या होत्या. मग त्याने आम्हाला Amsterdam ते Salt Lake City आणि Salt Lake City ते San Francisco असे तिकीट बदलून दिले. पहिले तिकीट KLM चे होते आणि दुसरे United एअरलाइन्सचे. त्याच दिवशी जाता येणार असल्याने आम्ही खुश झालो. दोन फ्लाईट्स मध्ये वेळ होता 51 मिनिटे! तरी ती फ्लाईट मिळेल तुम्हाला असे त्याने सांगितले. 

आम्ही सुटकेचा निःश्वास टाकत गेट वर पोचलो. तर ती फ्लाईट लेट असल्याची घोषणा झाली!! परत आम्ही ट्रान्स्फर डेस्कला आलो. कारण आता पुढची फ्लाईट मिळणे अवघड होणार होते. पण चौकशी कक्षातील अधिकाऱ्याने आम्हाला सांगितले की तरीही तुम्ही ही फ्लाईट घ्याच. कमीतकमी युरोपच्या तर बाहेर पडाल!!

त्याच्या बोलण्यात तथ्य होतेच. सध्या युरोपच्या अनेक विमानतळांवर विविध कारणाने असेच गोंधळ चालू आहेत.

ह्या सगळ्या गोंधळात जे कर्मचारी हजर आहेत त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण येतो आहे. अनेक अस्वस्थ लोकाना उत्तरे देताना त्यांच्या संयमाची कसोटी लागते आहे.

आम्ही salt Lake City चे विमान पकडले. ऐनवेळी घेतलेले तिकीट असल्याने विमानात vegan जेवण मिळण्याची शक्यता नव्हतीच. पण तरी क्रू ने मला फळे, सलाड्स, ब्रेड जाम असे दिले. संपूर्ण सफरचंद, भले मोठे अख्खे केळे असे दोन वेगवेगळ्या वेळी दिले त्यांनी. त्यामुळे 11 तासांच्या त्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सामग्रीतून प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा देण्याच्या त्यांच्या वृत्तीचे फार कौतुक वाटले.


आम्ही पश्चिमेकडे जात असल्याने घरातून निघून चोवीस तास होत आले तरी दिवस मावळलेला नव्हताच. संपूर्ण प्रवासभर माझी विंडो सीट मी पूर्णपणे उपभोगली. कधी ढग बाजूला होतील आणि खालचे दृश्य दिसेल ते पाहण्यासाठी पूर्ण वेळ लक्ष ठेवून होते मी!

 माझी तपश्चर्या सार्थकी लागली. मला अप्रतिम दृश्ये पाहायला मिळाली. लहान लहान टेकड्या, खाली हिरवळ आणि शिखरावर बर्फ असे बराच वेळ दिसल्यावर मग बर्फ वाढत गेला. थोड्याच वेळात हिरवळ पूर्ण नाहीशी होऊन बर्फाने जमीन, पर्वत, शिखरे सगळेच व्यापून टाकले. इतका प्रचंड मोठा बर्फाच्छादित परिसर मी पहिल्यांदाच पाहिला. ते होते ग्रीनलंड आणि आईसलंड. आर्क्टिक समुद्र दिसला. पुस्तकातली पात्रे जिवंत होऊन समोर यावीत तसेच मला ही नकाशातील नावे प्रत्यक्ष बघताना वाटत होते. 




बर्फ संपला आणि पाणी दिसायला लागले. त्या पाण्यात अनेक लहान लहान वर्तुळाकार बेटे. फारच सुंदर दृश्य होते ते. कमळाची पाने तरंगत असावीत तसेच वरून पाहताना वाटत होते. समोर स्क्रीनवर मी पूर्णवेळ लाईव्ह फ्लाईट लोकेशन लावून ठेवली होती. त्यामुळे त्यातल्याच काही बेटांचे नाव कोरल आयलंड होते तेही कळले. 

घरातून निघाल्या पासून चोवीस तास झालेच होते आणि तरीही दिवस मावळला नव्हता! सतत सूर्य सोबत असणे फार आनंदाचे होते.






Salt Lake City जवळ विमान आले. आता पुढच्या विमानाला आम्हाला अर्धा तासच उरणार होता. आमचे सामान डायरेक्ट सान फ्रान्सिस्कोला येणार असल्याने त्यात वेळ जाणार नव्हता. फक्त international flight मधून डोमेस्टिक फ्लाईटला जाण्यासाठी इमिग्रेशन करून पळत सुटायचे होते. 

आम्ही तसे फ्लाईट क्रुला सांगितलेले होते. विमान थांबले, सीट बेल्ट सोडू शकता ची घोषणा झाली की लगेच दाराजवळ या असे त्यांनी सांगितले. दाराशी एक ऑफिसर असेल, तो तुम्हाला पुढच्या फ्लाईट साठी मार्गदर्शन करेल असेही सांगितले. आम्ही आश्वस्त झालो. 

पण थोड्याच वेळात कॅप्टन सांगायला आल्या की साल्ट लेक सिटी विमानतळावर आम्हाला सामान ताब्यात घ्यायला लागेल आणि मग पुढच्या विमानात परत चेक इन करायला लागेल! अर्थातच आता पुढचे विमान मिळायची शक्यता मावळत चालली होती.

तरी आम्ही प्रयत्न सोडले नाहीत. सगळ्यांच्या आधी अगदी 'पयला माझा नंबर' च्या आवेशात विमानातून उतरलो आणि पळत सुटलो. इमिग्रशन साठी मोठी रांग. त्यात लगेच दुसरे विमान असलेल्यांसाठी काही वेगळी रांग नाही. तेव्हाच आमचे पुढचे विमान चुकले हे निश्चित कळले आम्हाला. 


 इमिग्रेशन झाल्यावर सामान येण्याची वाट पाहत आम्ही बेल्टशी उभे होतो. खूप वेळ सामान आले नाही. अनेक शक्यता होत्या. त्यात सामान विमानात भरलेच न जाणे किंवा मग सामान सान फ्रान्सिस्को ला गेले असणे ह्या फारच उत्कंठा वर्धक शक्यता होत्याच. पण आमची उत्सुकता आणि नव्या साहसाचा सामना करायची संधी आमच्याकडून हिरावून घेऊन अखेर उशिरा का होईना पण आमची एक बॅग दिसली!! आता एक आली म्हणजे यथावकाश बाकीच्या पण येतील अशी आशा निर्माण झाली. एकेक करत सगळे सामान आले. 


ज्या KLM ने आम्ही प्रवास करत होतो त्यांचे तर काऊंटर नव्हते salt Lake City ला पण त्यांची पार्टनर असलेली डेल्टा एअर लाइन्स चे होते. लगोलग आम्ही त्यांच्या काऊंटर वर गेलो. 

तिथला डेल्टाचा स्टाफ खूप चांगला होता. त्यांनी आमच्या साठी सगळे प्रयत्न केले. त्यांनाही ही व्यवस्था करायला दोन तास लागले. तोपर्यंत आम्ही काऊंटरवर वाट पाहत उभे! तिथे इतका वेळ उभे राहून तिथली व्यवस्था इतकी ओळखीची झाली की नव्या येणाऱ्यांना तुमचे काऊंटर इकडे आहे..आता तिकडे जा असे फुकटात मार्गदर्शन करायला पण मी सुरुवात केली!! 


दोन तासांनी त्यांनी आम्हाला तिकिटे दिली. आता तिकीट घेतले आम्ही Salt Lake City ते San Jose. फ्लाईट ला वेळ थोडा होता. गेट पर्यंत पोचायला तुम्हाला इथून अर्धा तास चालायला लागेल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आम्ही घाईने सिक्युरिटीसाठी गेलो. डोमेस्टिक प्रवास असल्याने आता फार वेळ लागणार नव्हताच. आम्हाला फ्लाईट नक्की मिळणार होती. सिक्युरिटीसाठी इथेही मोठी रांग. पण ती पटपट पुढे सरकत होती. आमचा नंबर आला आणि आमच्या आनंदात भर पडली. तिकिटे देताना काहीतरी गोंधळ झाला होता आणि त्यामुळे आमची तिकिटे आम्हाला परत तिकीट काऊंटर वर जाऊन बदलून घ्यायला लागणार होती!!

परत आम्ही तिकीट काऊंटर वर!! बहुतेक त्यांच्याकडून आमच्या ट्रॅव्हल documents चे नंबर उलट सुलट पडले होते. ते लगोलग दुरुस्त करून, नवी तिकिटे घेऊन तो ऑफिसर स्वतः आम्हाला सोडायला आला. तो सोबत असल्याने आम्हाला पुन्हा रांगेत उभे राहावे लागले नाही. सिक्युरिटी चेक झाल्यावर आता गेट कडे जाणे इतकेच काम उरले होते. पण गेट लांब आणि बोर्डिंग टाईम झाला होता. त्या दिवशी Salt Lake City विमानतळावर पांढऱ्या केसांच्या एक बाई पळताना दिसल्या अनेकांना त्या कोण असतील हे तुम्ही ओळखलेच असेल. 

गेट वर बोर्डिंग सुरू झालेले होते पण संपले नव्हते! ना आरंभ..ना अंत.. अशा संधिवेळेला आम्ही गेटवर जाऊन पोचलो!! विमानात बसलो. 




San Jose ला पोचतानाचा हा फोटो. अजूनही २६ जून च आहे. रात्रीचे ११. ३९ झाले आहेत. पण आता अवघ्या काही मिनिटात हा दिवस आणि प्रवास दोन्ही संपणार आहे, चित्तथरारक का काय म्हणतात तसा दिवस आणि प्रवास संपणार आहे ह्या विचाराने हायसे वाटले होते.


ह्या सगळ्या अनुभवातून खूप शिकता आले. अनेक लोकांना पाहता आले. त्यांच्या अडचणी समजल्या. स्वतः च्या मनाच्या स्थिरतेची, खंबीरतेची, शारीरिक आणि मानसिक सामर्थ्याची परीक्षा करता आली. अतिशय सुंदर दृश्ये विमानातून पाहता आली. विमानतळावर अतिशय अव्यवस्था पाहिली. तसेच खूप चांगले, मदत करणारे लोकही पाहिले. 

 घरी मुलांचा मात्र पूर्ण दिवस सगळ्या एअरलाईंनना फोन करण्यात, जे फोन लागतच नव्हते ते करण्यात, तणावात गेला. आम्हाला हॉटेलवर उतरायचे असेल तर reservations कोणती करता येतील, आम्हाला connecting flights कोणत्या असतील, आम्हाला Salt Lake City हून येणारे विमान मिळाले नाही तर काय करायला लागेल असे वेगवेगळे विचार आणि योजना त्यांनी करून ठेवल्या. 


एकूणच अतिशय अविस्मरणीय प्रवास झाला. एक दिवस, एकाच दिवसातले 36 तास प्रवास, 16000 किलोमीटर, 5 फ्लाईटस, 3 उशीर झालेल्या फ्लाईटस, दोन चुकलेल्या फ्लाईटस पण शेवटी तीन विमानांनी प्रवास करून!


लक्षात ठेवण्याच्या गोष्टी 

१. केबिन बॅग मध्ये कपड्यांचा एक तरी संपूर्ण सेट हवा. फ्लाईट्स डिले, सामान आलेले नाही असे काही झाले तर उपयोगी पडतो हा केबिन बॅग मधला सेट. 

२. प्रवासाचा विमा काढताना त्यात फ्लाईट डिले, लॉस्ट बॅगेज किंवा मिस्प्लेसड बॅगेज असे सगळे समाविष्ट आहे की नाही ते अवश्य बघून घ्या. 

३. केबिन बॅग मध्ये खाण्याचे काही पदार्थ अवश्य असू द्या. 

४. ज्या देशात विमान बदलणार आहात त्या देशाची थोडी करन्सी किंवा मग अमेरिकन डॉलर्स सोबत असू द्या. 

५. फोन पूर्ण चार्ज केलेला हवा. विमानात चार्ज करायचे लक्षात ठेवा. 


# KLM Airlines # Schiphol #Amsterdam # Delta #FlightDelay # Travel 



Comments

  1. खूप सकारात्मक लिहिले आहे. अतिशय वाचनीय लेख.

    ReplyDelete
  2. Beautifully expressed and captured every moment. You made me to recall my US trip which also took 42 hours and changing of 4 flights.

    ReplyDelete
  3. खरं तर मजा आली वाचतांना....हे सगळं लिहितांना तुलाही मजाच आली असेल.............तेव्हां मात्र काय अवस्था झाली असेल, कल्पना येते. शेवटच्या टिप्स महत्वाच्या..लक्षात ठेवू.

    ReplyDelete
  4. मनातल्या मनात भयंकर धावपळ आणि दमछाक झाली वाचताना ... पण मजा आली

    ReplyDelete
  5. वृंदा कसलेही वर्णन करण्याची तुझी एक विशिष्ट शैली आहे की ती गोष्ट किंवा तो प्रवास डोळ्यासमोर उभा राहतो....खूप छान.... विमान चुकले, पोचायला उशीर झाल्याने करायला लागणारी धावपळ, इमिग्रेशन साठी लांबच लांब रांग, त्यात पुढचे विमान चुकेल का ही धाकधुक सर्व आपणच अनुभवत आहोत, असे वाटले इतकी तुझी भाषा छान आहे !!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...

शिवथरघळ

जर आपण भारताचा नकाशा पाहिला  तर आपल्याला नकाशात डावीकडे, गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत काळसर  हिरवी रेषा दिसते. ही रेषा  गुजराथ येथून सुरु होते  आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू मार्गे जाऊन केरळला पोहोचते. ती रेषा म्हणजेच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट म्हणजे दख्खनच्या पठाराची जणू किनारच आहे. दख्खन पठाराच्या काठावरच्या ह्या पर्वत रांगा आहेत.  या भागात बरीच जंगले, जलसाठे, धबधबे आहेत आणि जैवविविधता तसेच त्याचे वय यामुळे या भागाला 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून ओळखले गेले आहे. पश्चिम घाट हिमालयापेक्षाही जुना आहे! वरंधा घाट  📷विकिमीडिया कॉमन्स  पश्चिम घाट हा अनेक मुख्य नद्यांचे उगमस्थान आहे. वरील छायाचित्रात दिसते आहे त्या प्रमाणे, वर्षा ऋतूत या प्रदेशात अनेक धबधबे पाहायला मिळतात.  पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) अनेक सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे शिवथरघळ धबधबा. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण रौद्र सौंदर्यानिशी आणि ताकदीनिशी रोरावत खाली येताना दिसतो.  हा धबधबा सुमारे शंभर फूट उंचीवर...