Skip to main content

अंगकोर थम- टेरेस ऑफ लेपर किंग आणि इतर

रॉयल पॅलेस

अंगकोर थम च्या रॉयल स्क्वेअर मध्ये रॉयल पॅलेस आहे. ११व्या शतकापासून १६व्या शतकापर्यंत वापरात असणाऱ्या ह्या राजवाड्यातले आज मात्र फार काही शिल्लक नाही. किंबहुना काहीच शिल्लक नाही म्हटले तरी चालेल.

त्याचे मुख्य कारण म्हणजे ज्या वास्तू माणसांसाठी बांधलेल्या आहेत, त्या लाकूड आणि इतर नाशिवंत गोष्टी वापरून बांधायची पद्धत होती असे दिसते. जे मंदिर असेल, धार्मिक पूजा, उपासने साठी बांधलेली वास्तू असेल, तीच दगडाने बांधायची पद्धत असावी. त्यामुळे मंदिरे सगळी अजूनही टिकली आहेत तर निवासी वास्तू , स्थाने मात्र एकही दिसत नाही.

रॉयल पॅलेस मधील काही गोपुरे, एखाद दुसरे प्रवेशद्वार आणि दोन तळी आहेत अजून.
पण त्या परिसरातल्या बाकी अनेक गोष्टी, अनेक वास्तू, अनेक बांधकामे अजूनही बघायला मिळतात. अनेक शतकांच्या कालावधीत वेगवेगळ्या वेळी बांधल्या गेलेल्या त्या वास्तू आज आपण बघणार आहोत.

टेरेस ऑफ लेपर किंग

टेरेस चे काय करावे बरे मराठीत भाषांतर? ती काही गच्ची नाही. चौथरा किंवा ओटा आहे. असो. टेरेसच राहू दे!

कोण हा लेपर किंग? महारोगी, कुष्ठरोगी राजा? इतिहासाला नक्की ज्ञात नाही. कोणी म्हणतात की जयवर्मन सप्तम, कोणी म्हणतात यशोवर्मन प्रथम. कोणी कोणी तर म्हणतात की कुबेराला समर्पित असलेला हा टेरेस आहे आणि कुबेर महारोगी होता. ही तर अगदी वेगळीच माहिती होती माझ्यासाठी. असा कुठे संदर्भ मिळतो आहे ह्याचा शोध घेतला. पण कुठेच कुबेराला कुष्ठरोग झाला होता असा उल्लेख सापडला नाही.

कुबेर ह्या शब्दाचा संस्कृत मध्ये एक अर्थ बेढब, बेडौल, कुरूप असा होतो हे मात्र सापडले. आता असे वाटते आहे की त्यामुळेच, ह्या अर्थामुळे झालेला कदाचित भाषांतराचा गोंधळ असावा.

कोणी म्हणतात मृत्युदेवता यमासाठीचा आहे हा टेरेस. ती मूर्ती नंतर काही कारणाने अशी खराब झाली की महारोगी माणसासारखी दिसू लागली म्हणून लेपर किंग टेरेस नाव पडले.

कारण काहीही असो ह्या जागेला लेपर - महारोगी राजाचा टेरेस म्हणतात हे नक्की.

एक कथा बयोनच्या भिंतीवरील शिल्पांत होती. एक राजा सर्पाशी युद्ध करतो आहे. सर्पाचे विष त्याच्या उघड्या हातांना लागते आहे. नंतर तो राजा एका स्त्रीकडून आपले हात तपासून घेतो आहे. त्या नंतर तो राजा अंथरुणावर आजारी पडलेला दाखवला आहे. हे महारोगी राजाचे शल्प म्हणून तिथे दाखवले जाते. 

दंतकथेवरुन शिल्प कोरले गेले की शिल्पावरून दंतकथा प्रचलित झाली, माहिती नाही. मात्र त्या टेरेसवर संपूर्ण कंबोडियातील मंदिरातील शिल्पांत कुठेच दिसत नाही अशी एक मूर्ती आपल्याला दिसते. एक अनावृत्त माणूस गुडघ्यावर हात ठेवून बसलेला आहे. त्याचा उजवा हात, हाताची बोटे झडल्यासारखी दिसत आहेत. आता ती मुळातच होती की नंतर पडझड, तोडफोड झाल्याने तशी झाली माहिती नाही.
त्याच्याकडे पाहताना वाटते, मूळ मूर्तीच्या हातात काहीतरी धरलेले होते. कालांतराने ते तुटले आणि हात असा दिसू लागला. 
ही मूळ मूर्तीची प्रतिकृती आहे. मूळ मूर्ती कंबोडियाचे राजधानी नॉम पेन येथे  संग्रहालयात आहे.
ह्या मूर्तीची रोज पूजा होते आहे असे दिसते. आम्ही गेलो डिसेंबर २०१२ मध्ये तेव्हा मूर्तीच्या समोर कोणीतरी उदबत्त्या लावून गेले होते.

ह्या मूर्तीखेरीज बाकी संपूर्ण टेरेस जवळपास रिकामाच आहे. कोणी म्हणतात की राजघराण्यातील लोकांच्या अंतिम संस्कारांची ही जागा होती.
पण जे लोक एवढीच मूर्ती बघून परत जातील ते खूप मोठी चूक करतील. खरे बघण्याजोगे दृश्य तर ह्या टेरेस च्या खाली आहे.

आपण उतरलो की एकाच्या आत एक अशा दोन भिंती आहेत. बाहेरची भिंत कोरी आहे. त्यावर काही शिल्पे नाहीत. दोन भिंतीच्या मध्ये इतकी जागा आहे की आपण सहज त्यातून फिरू शकतो.


टेरेसच्या आतल्या भिंतींवर भरगच्च शिल्पे कोरलेली आपल्याला दिसतील. अनेक आकृती, अगदी ठसठशीत एकापुढे एक ओळीत कोरलेल्या आहेत.
त्यात काही कथा, काही प्रसंग कोरलेले असतीलही कदाचित. पण पाहताना तसे जाणवत नाही.
इतक्या आकृती कोरलेल्या आहेत, त्यातील काही देवता आहेत, काही दानव आहेत. काही अप्सरा आहेत. प्रत्येक आकृतीत वैविध्य आहे. चेहऱ्यावरचे भाव, अंगावरचे दागिने, बसण्याची पद्धत सर्वच वेगवेगळे आहे.


इथेच एका शिल्पात आपल्याला नऊ फण्यांचा नाग कोरलेला दिसतो. अतिशय रेखीव आहे ते शिल्प.
कंबोडियातील बाकी शिल्पांपेक्षा ही शिल्पे वेगळी वाटतात ती त्यांच्या खोलीमुळे. भिंतीपासून ते शिल्प किती पुढे आलेले आहे ते आपण पाहू शकता. असे दिसते आहे कारण त्या शिल्पांची लांबी रुंदी विशेष जास्त नसली तरी खोली मात्र जास्त आहे.

त्यानंतर अगदी जवळच असा दुसरा चौथरा आपल्याला दिसतो. त्याचे नाव आहे एलिफन्ट टेरेस.

एलिफन्ट टेरेस.

हा भव्य असा चौथरा म्हणजे एका राजेशाही सभागृहाचा पाया आहे. त्या चौथऱ्याचे पाच भाग आहेत. मधल्या भागात गरुड आणि सिंह आहेत. ती राजाची बसण्याची जागा होती. तिथे बसून राजा सैनिकांच्या विजयी मिरवणुकांचे स्वागत करायचा. विविध खेळांच्या स्पर्धा बघायचा. काही विशेष प्रसंगी तिथेच दरबार भरायचा.

उरलेल्या चार भागांवर हत्तीच्या मिरवणूका आणि विविध शिल्पे कोरलेली आहेत. मिरवणुकांमध्ये अलंकारांनी शृंगारलेले हत्ती माहुतांसकट असलेले आपल्याला दिसतात. इतर शिल्पांत जंगली हत्तीची शिकार कशी करतात ते प्रसंग दाखवलेले आहेत. ह्या सर्व हत्तीच्या शिल्पांमुळेच ह्या टेरेसचे नाव एलिफन्ट टेरेस असे पडले आहे.

इतर शिल्पांमध्ये काही अप्सरा आणि देवता देखील आपल्याला दिसतात.

प्रासात फीमेनकास

हे त्याच परिसरातले एक महत्वाचे मंदिर. इथे नावात आकास - आकाश आहे आणि अर्थ देखील स्वर्गीय मंदिर असाच आहे. रॉयल पॅलेस कंपाउंडच्या मध्यभागी हे लहानसे मंदिर आहे. दहाव्या शतकात बांधले गेलेले हे हिंदू मंदिर आहे. पायऱ्यांना उभा चढ आहे. अरुंद पायऱ्या चढून आपण वर पोचतो. इतक्या उंचावर पोचल्यावर  नक्कीच आकाशात गेल्यासारखी अनुभूती येते!

तीन थरांवर पिरॅमिडसारखी रचना असलेले हे मंदिर आहे. असे म्हणतात आणि त्या काळी  कंबोडियात येऊन गेलेल्या चिनी प्रवाशाने पण लिहून ठेवले आहे की ह्याचा कळस सोन्याचा होता.
ह्या मंदिराविषयी एक अनोखी आख्यायिका ऐकायला मिळाली. नागांना ह्या प्रदेशाचे मूळ रहिवासी आणि राजे मानले जाते. असे म्हणतात की त्या त्या वेळच्या ख्मेर राजाला रोज रात्री पहिल्या प्रहरात नाग अधिपतीला भेटायला ह्या मंदिरात यावेच लागत असे. नाग अधिपती एका महिलेच्या रूपात असे. त्या भेटीच्या वेळी दुसऱ्या कोणालाही तिथे यायला अनुमती नव्हती. मंत्री तर नाहीच पण राजाची राणी देखील तिथे असून चालत नसे. समजा राजाशिवाय आणखी कोणी तिथे आले किंवा जर का राजा एखादे दिवशी नाग अधिपतीच्या भेटीला गेलाच नाही तर राजासाठी मृत्यू आणि त्याच्या देशावर संकट ओढवणार हे नक्की.

रामायण महाभारत काळापासून अशा अनेक कथा आपल्याला आढळतात. त्यामुळे ह्या कथेचे तितकेसे आश्चर्य वाटले नाही.
ह्या मंदिराची गोपुरे आता भग्नावस्थेत आहेत. त्यावरचे कोरीवकाम कधीकाळी सुंदर असेलही, पण आत्ता दिसत नाही.
View of Preah Pithu Temples from
 Royal Palace Compound

ह्याच परिसरात अजून कितीतरी मंदिरे आहेत, जवळपास सगळी भग्नावस्थेत आहेत. त्यावर फार लक्षवेधक कोरीवकाम देखील नाही. त्यामुळेच कदाचित त्यांच्या जीर्णोद्धाराकडे कोणाचे लक्ष गेले नसावे.

प्रे रुप

दहाव्या शतकात बांधले गेलेले हे हिंदू मंदिर अतिशय भव्य आहे. पाच गोपुरे असलेले असे हे मंदिर आहे.  मध्यभागी राजभद्रेश्वर ह्या नावाने शिवलिंग विराजमान होते. राजेंद्रवर्मन ह्या राजाचे हे राज मंदिर असल्याने त्याच्या नावाने शिवलिंग असणे त्या काळाच्या तेथील प्रथेला धरून होते. दुसऱ्या गोपुरात राजाच्या रूपात शंकर होता. तिसऱ्या मध्ये विष्णू होता. एकाच ठिकाणी शंकर आणि विष्णू असणे इतकेच ह्या मंदिराचे वैशिष्ट्य नाही तर उर्वरित दोन गोपुरांमध्ये उमा आणि लक्ष्मी देखील विराजमान होत्या.

आम्ही डिसेंबर २०१२ मध्ये ह्या मंदिरात गेलो होतो तेव्हा मात्र ह्या पाचपैकी एक देखील गोपुर आणि मंदिर उघडे नव्हते. त्यामुळे आत अजून देखील त्या मूर्ती आहेत का नाहीत ते पाहता आले नाही.


मंदिराची उंची भरपूर आहे. असे म्हणतात की वरील फोटोत जमिनीवर जीं आयताकृती दिसते आहे ते राजघराण्यातील अंत्य संस्कारांसाठी केलेली जागा आहे. काही इतिहास तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे मात्र हे शंकराचे मंदिर असल्याने तिथे पूर्वी नंदी असणार. आता नंदी गेला आहे मात्र त्याचा पाया राहिला आहे.
मंदिराच्या परिसरात अनेक घुमटाकार इमारती आहेत. त्याखेरीज देखील वेगवेगळ्या आकाराच्या अनेक इमारती आहेत. अनेक शतकांत अनेक राजांनी मूळ मंदिराच्या रचनेत भर घातली. त्यामुळे सगळ्या इमारतींचे वय वेगवेगळे आहे. स्थिती मात्र एकसारखीच आहे ती म्हणजे भग्नावस्था.

बापून

अंगकोर थम परिसरातील आणखी एक आणि आजच्या ह्या पोस्टमधील शेवटचे मंदिर आहे बाफून किंवा बापून. ११ व्या शतकात बांधले गेलेले हे शिवमंदिर. ज्या ठिकाणी उभे आहे ती जमीन अस्थिर आहे असे म्हणतात. त्यामुळे ते अनेकदा डळमळले आहे. नंतर एका राजाने तिथून शंकर काढून बुद्ध मूर्ती बसवण्यासाठी अजून काही मोडतोड केली. 

आता २०११ मध्ये त्याचा जीर्णोद्धार पूर्ण होऊन उदघाटन झाले. पण डिसेंबर २०१२ मध्ये आम्ही गेलो त्या दिवशी काही कारणाने ते बंद होते. त्यामुळे आतून बघता आले नाही.  केवळ बाहेरून पाहून समाधान मानायला लागले. वरच्या मजल्यांवर प्राण्यांची शिल्पे आहेत असे म्हणतात. मात्र त्या साठी भरपूर पायऱ्या चढायची आणि चालायची तयारी हवी. 
कंबोडियातील सियाम रीप जवळील अंगकोर थम आणि रॉयल पॅलेस कंपाउंडची फेरी आज आपण पूर्ण केली. 

कंबोडिया मालिकेतील ह्या आधीचे लेख वाचण्यासाठी -
१. बांते स्रेइ एक सुखद स्वप्न 
https://silvervegantravels.blogspot.com/2022/07/blog-post_14.html
२. अंगकोरवाट - विश्वाची अमूल्य ठेव. 
https://silvervegantravels.blogspot.com/2022/07/blog-post.html
३.ता प्रोह्म आणि प्रेह खान-अजब न्याय नियतीचा   
https://silvervegantravels.blogspot.com/2022/07/blog-post_16.html
४. बयोन चेहरे- एक रहस्य 
https://silvervegantravels.blogspot.com/2022/07/blog-post_19.html
५.PhnomPenh-कंबोडियाची राजधानी  
https://silvervegantravels.blogspot.com/2020/09/phnom-penh.html

#angkorwatcambodia #angkorthom # terraceoflaperking #terraceofelephants #Prerup #angkorwat #angkorwattemple #cambodia #angkor #siemreap #angkorwatsunrise #angkortemple #angkorthom #angkorwatt #angkorwattour #angkortemples #siemreapcambodia #explorecambodia #siemreaptrip #bayontemple #taprohm #cambodiatravel #cambodiatrip #taprohmtemple #bayon  #banteaysrei  #angkorwattemples #siemrep  #travelphotography 


Comments

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...

शिवथरघळ

जर आपण भारताचा नकाशा पाहिला  तर आपल्याला नकाशात डावीकडे, गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत काळसर  हिरवी रेषा दिसते. ही रेषा  गुजराथ येथून सुरु होते  आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू मार्गे जाऊन केरळला पोहोचते. ती रेषा म्हणजेच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट म्हणजे दख्खनच्या पठाराची जणू किनारच आहे. दख्खन पठाराच्या काठावरच्या ह्या पर्वत रांगा आहेत.  या भागात बरीच जंगले, जलसाठे, धबधबे आहेत आणि जैवविविधता तसेच त्याचे वय यामुळे या भागाला 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून ओळखले गेले आहे. पश्चिम घाट हिमालयापेक्षाही जुना आहे! वरंधा घाट  📷विकिमीडिया कॉमन्स  पश्चिम घाट हा अनेक मुख्य नद्यांचे उगमस्थान आहे. वरील छायाचित्रात दिसते आहे त्या प्रमाणे, वर्षा ऋतूत या प्रदेशात अनेक धबधबे पाहायला मिळतात.  पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) अनेक सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे शिवथरघळ धबधबा. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण रौद्र सौंदर्यानिशी आणि ताकदीनिशी रोरावत खाली येताना दिसतो.  हा धबधबा सुमारे शंभर फूट उंचीवर...