Skip to main content

अंगकोर थम- टेरेस ऑफ लेपर किंग आणि इतर

रॉयल पॅलेस

अंगकोर थम च्या रॉयल स्क्वेअर मध्ये रॉयल पॅलेस आहे. ११व्या शतकापासून १६व्या शतकापर्यंत वापरात असणाऱ्या ह्या राजवाड्यातले आज मात्र फार काही शिल्लक नाही. किंबहुना काहीच शिल्लक नाही म्हटले तरी चालेल.

त्याचे मुख्य कारण म्हणजे ज्या वास्तू माणसांसाठी बांधलेल्या आहेत, त्या लाकूड आणि इतर नाशिवंत गोष्टी वापरून बांधायची पद्धत होती असे दिसते. जे मंदिर असेल, धार्मिक पूजा, उपासने साठी बांधलेली वास्तू असेल, तीच दगडाने बांधायची पद्धत असावी. त्यामुळे मंदिरे सगळी अजूनही टिकली आहेत तर निवासी वास्तू , स्थाने मात्र एकही दिसत नाही.

रॉयल पॅलेस मधील काही गोपुरे, एखाद दुसरे प्रवेशद्वार आणि दोन तळी आहेत अजून.
पण त्या परिसरातल्या बाकी अनेक गोष्टी, अनेक वास्तू, अनेक बांधकामे अजूनही बघायला मिळतात. अनेक शतकांच्या कालावधीत वेगवेगळ्या वेळी बांधल्या गेलेल्या त्या वास्तू आज आपण बघणार आहोत.

टेरेस ऑफ लेपर किंग

टेरेस चे काय करावे बरे मराठीत भाषांतर? ती काही गच्ची नाही. चौथरा किंवा ओटा आहे. असो. टेरेसच राहू दे!

कोण हा लेपर किंग? महारोगी, कुष्ठरोगी राजा? इतिहासाला नक्की ज्ञात नाही. कोणी म्हणतात की जयवर्मन सप्तम, कोणी म्हणतात यशोवर्मन प्रथम. कोणी कोणी तर म्हणतात की कुबेराला समर्पित असलेला हा टेरेस आहे आणि कुबेर महारोगी होता. ही तर अगदी वेगळीच माहिती होती माझ्यासाठी. असा कुठे संदर्भ मिळतो आहे ह्याचा शोध घेतला. पण कुठेच कुबेराला कुष्ठरोग झाला होता असा उल्लेख सापडला नाही.

कुबेर ह्या शब्दाचा संस्कृत मध्ये एक अर्थ बेढब, बेडौल, कुरूप असा होतो हे मात्र सापडले. आता असे वाटते आहे की त्यामुळेच, ह्या अर्थामुळे झालेला कदाचित भाषांतराचा गोंधळ असावा.

कोणी म्हणतात मृत्युदेवता यमासाठीचा आहे हा टेरेस. ती मूर्ती नंतर काही कारणाने अशी खराब झाली की महारोगी माणसासारखी दिसू लागली म्हणून लेपर किंग टेरेस नाव पडले.

कारण काहीही असो ह्या जागेला लेपर - महारोगी राजाचा टेरेस म्हणतात हे नक्की.

एक कथा बयोनच्या भिंतीवरील शिल्पांत होती. एक राजा सर्पाशी युद्ध करतो आहे. सर्पाचे विष त्याच्या उघड्या हातांना लागते आहे. नंतर तो राजा एका स्त्रीकडून आपले हात तपासून घेतो आहे. त्या नंतर तो राजा अंथरुणावर आजारी पडलेला दाखवला आहे. हे महारोगी राजाचे शल्प म्हणून तिथे दाखवले जाते. 

दंतकथेवरुन शिल्प कोरले गेले की शिल्पावरून दंतकथा प्रचलित झाली, माहिती नाही. मात्र त्या टेरेसवर संपूर्ण कंबोडियातील मंदिरातील शिल्पांत कुठेच दिसत नाही अशी एक मूर्ती आपल्याला दिसते. एक अनावृत्त माणूस गुडघ्यावर हात ठेवून बसलेला आहे. त्याचा उजवा हात, हाताची बोटे झडल्यासारखी दिसत आहेत. आता ती मुळातच होती की नंतर पडझड, तोडफोड झाल्याने तशी झाली माहिती नाही.
त्याच्याकडे पाहताना वाटते, मूळ मूर्तीच्या हातात काहीतरी धरलेले होते. कालांतराने ते तुटले आणि हात असा दिसू लागला. 
ही मूळ मूर्तीची प्रतिकृती आहे. मूळ मूर्ती कंबोडियाचे राजधानी नॉम पेन येथे  संग्रहालयात आहे.
ह्या मूर्तीची रोज पूजा होते आहे असे दिसते. आम्ही गेलो डिसेंबर २०१२ मध्ये तेव्हा मूर्तीच्या समोर कोणीतरी उदबत्त्या लावून गेले होते.

ह्या मूर्तीखेरीज बाकी संपूर्ण टेरेस जवळपास रिकामाच आहे. कोणी म्हणतात की राजघराण्यातील लोकांच्या अंतिम संस्कारांची ही जागा होती.
पण जे लोक एवढीच मूर्ती बघून परत जातील ते खूप मोठी चूक करतील. खरे बघण्याजोगे दृश्य तर ह्या टेरेस च्या खाली आहे.

आपण उतरलो की एकाच्या आत एक अशा दोन भिंती आहेत. बाहेरची भिंत कोरी आहे. त्यावर काही शिल्पे नाहीत. दोन भिंतीच्या मध्ये इतकी जागा आहे की आपण सहज त्यातून फिरू शकतो.


टेरेसच्या आतल्या भिंतींवर भरगच्च शिल्पे कोरलेली आपल्याला दिसतील. अनेक आकृती, अगदी ठसठशीत एकापुढे एक ओळीत कोरलेल्या आहेत.
त्यात काही कथा, काही प्रसंग कोरलेले असतीलही कदाचित. पण पाहताना तसे जाणवत नाही.
इतक्या आकृती कोरलेल्या आहेत, त्यातील काही देवता आहेत, काही दानव आहेत. काही अप्सरा आहेत. प्रत्येक आकृतीत वैविध्य आहे. चेहऱ्यावरचे भाव, अंगावरचे दागिने, बसण्याची पद्धत सर्वच वेगवेगळे आहे.


इथेच एका शिल्पात आपल्याला नऊ फण्यांचा नाग कोरलेला दिसतो. अतिशय रेखीव आहे ते शिल्प.
कंबोडियातील बाकी शिल्पांपेक्षा ही शिल्पे वेगळी वाटतात ती त्यांच्या खोलीमुळे. भिंतीपासून ते शिल्प किती पुढे आलेले आहे ते आपण पाहू शकता. असे दिसते आहे कारण त्या शिल्पांची लांबी रुंदी विशेष जास्त नसली तरी खोली मात्र जास्त आहे.

त्यानंतर अगदी जवळच असा दुसरा चौथरा आपल्याला दिसतो. त्याचे नाव आहे एलिफन्ट टेरेस.

एलिफन्ट टेरेस.

हा भव्य असा चौथरा म्हणजे एका राजेशाही सभागृहाचा पाया आहे. त्या चौथऱ्याचे पाच भाग आहेत. मधल्या भागात गरुड आणि सिंह आहेत. ती राजाची बसण्याची जागा होती. तिथे बसून राजा सैनिकांच्या विजयी मिरवणुकांचे स्वागत करायचा. विविध खेळांच्या स्पर्धा बघायचा. काही विशेष प्रसंगी तिथेच दरबार भरायचा.

उरलेल्या चार भागांवर हत्तीच्या मिरवणूका आणि विविध शिल्पे कोरलेली आहेत. मिरवणुकांमध्ये अलंकारांनी शृंगारलेले हत्ती माहुतांसकट असलेले आपल्याला दिसतात. इतर शिल्पांत जंगली हत्तीची शिकार कशी करतात ते प्रसंग दाखवलेले आहेत. ह्या सर्व हत्तीच्या शिल्पांमुळेच ह्या टेरेसचे नाव एलिफन्ट टेरेस असे पडले आहे.

इतर शिल्पांमध्ये काही अप्सरा आणि देवता देखील आपल्याला दिसतात.

प्रासात फीमेनकास

हे त्याच परिसरातले एक महत्वाचे मंदिर. इथे नावात आकास - आकाश आहे आणि अर्थ देखील स्वर्गीय मंदिर असाच आहे. रॉयल पॅलेस कंपाउंडच्या मध्यभागी हे लहानसे मंदिर आहे. दहाव्या शतकात बांधले गेलेले हे हिंदू मंदिर आहे. पायऱ्यांना उभा चढ आहे. अरुंद पायऱ्या चढून आपण वर पोचतो. इतक्या उंचावर पोचल्यावर  नक्कीच आकाशात गेल्यासारखी अनुभूती येते!

तीन थरांवर पिरॅमिडसारखी रचना असलेले हे मंदिर आहे. असे म्हणतात आणि त्या काळी  कंबोडियात येऊन गेलेल्या चिनी प्रवाशाने पण लिहून ठेवले आहे की ह्याचा कळस सोन्याचा होता.
ह्या मंदिराविषयी एक अनोखी आख्यायिका ऐकायला मिळाली. नागांना ह्या प्रदेशाचे मूळ रहिवासी आणि राजे मानले जाते. असे म्हणतात की त्या त्या वेळच्या ख्मेर राजाला रोज रात्री पहिल्या प्रहरात नाग अधिपतीला भेटायला ह्या मंदिरात यावेच लागत असे. नाग अधिपती एका महिलेच्या रूपात असे. त्या भेटीच्या वेळी दुसऱ्या कोणालाही तिथे यायला अनुमती नव्हती. मंत्री तर नाहीच पण राजाची राणी देखील तिथे असून चालत नसे. समजा राजाशिवाय आणखी कोणी तिथे आले किंवा जर का राजा एखादे दिवशी नाग अधिपतीच्या भेटीला गेलाच नाही तर राजासाठी मृत्यू आणि त्याच्या देशावर संकट ओढवणार हे नक्की.

रामायण महाभारत काळापासून अशा अनेक कथा आपल्याला आढळतात. त्यामुळे ह्या कथेचे तितकेसे आश्चर्य वाटले नाही.
ह्या मंदिराची गोपुरे आता भग्नावस्थेत आहेत. त्यावरचे कोरीवकाम कधीकाळी सुंदर असेलही, पण आत्ता दिसत नाही.
View of Preah Pithu Temples from
 Royal Palace Compound

ह्याच परिसरात अजून कितीतरी मंदिरे आहेत, जवळपास सगळी भग्नावस्थेत आहेत. त्यावर फार लक्षवेधक कोरीवकाम देखील नाही. त्यामुळेच कदाचित त्यांच्या जीर्णोद्धाराकडे कोणाचे लक्ष गेले नसावे.

प्रे रुप

दहाव्या शतकात बांधले गेलेले हे हिंदू मंदिर अतिशय भव्य आहे. पाच गोपुरे असलेले असे हे मंदिर आहे.  मध्यभागी राजभद्रेश्वर ह्या नावाने शिवलिंग विराजमान होते. राजेंद्रवर्मन ह्या राजाचे हे राज मंदिर असल्याने त्याच्या नावाने शिवलिंग असणे त्या काळाच्या तेथील प्रथेला धरून होते. दुसऱ्या गोपुरात राजाच्या रूपात शंकर होता. तिसऱ्या मध्ये विष्णू होता. एकाच ठिकाणी शंकर आणि विष्णू असणे इतकेच ह्या मंदिराचे वैशिष्ट्य नाही तर उर्वरित दोन गोपुरांमध्ये उमा आणि लक्ष्मी देखील विराजमान होत्या.

आम्ही डिसेंबर २०१२ मध्ये ह्या मंदिरात गेलो होतो तेव्हा मात्र ह्या पाचपैकी एक देखील गोपुर आणि मंदिर उघडे नव्हते. त्यामुळे आत अजून देखील त्या मूर्ती आहेत का नाहीत ते पाहता आले नाही.


मंदिराची उंची भरपूर आहे. असे म्हणतात की वरील फोटोत जमिनीवर जीं आयताकृती दिसते आहे ते राजघराण्यातील अंत्य संस्कारांसाठी केलेली जागा आहे. काही इतिहास तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे मात्र हे शंकराचे मंदिर असल्याने तिथे पूर्वी नंदी असणार. आता नंदी गेला आहे मात्र त्याचा पाया राहिला आहे.
मंदिराच्या परिसरात अनेक घुमटाकार इमारती आहेत. त्याखेरीज देखील वेगवेगळ्या आकाराच्या अनेक इमारती आहेत. अनेक शतकांत अनेक राजांनी मूळ मंदिराच्या रचनेत भर घातली. त्यामुळे सगळ्या इमारतींचे वय वेगवेगळे आहे. स्थिती मात्र एकसारखीच आहे ती म्हणजे भग्नावस्था.

बापून

अंगकोर थम परिसरातील आणखी एक आणि आजच्या ह्या पोस्टमधील शेवटचे मंदिर आहे बाफून किंवा बापून. ११ व्या शतकात बांधले गेलेले हे शिवमंदिर. ज्या ठिकाणी उभे आहे ती जमीन अस्थिर आहे असे म्हणतात. त्यामुळे ते अनेकदा डळमळले आहे. नंतर एका राजाने तिथून शंकर काढून बुद्ध मूर्ती बसवण्यासाठी अजून काही मोडतोड केली. 

आता २०११ मध्ये त्याचा जीर्णोद्धार पूर्ण होऊन उदघाटन झाले. पण डिसेंबर २०१२ मध्ये आम्ही गेलो त्या दिवशी काही कारणाने ते बंद होते. त्यामुळे आतून बघता आले नाही.  केवळ बाहेरून पाहून समाधान मानायला लागले. वरच्या मजल्यांवर प्राण्यांची शिल्पे आहेत असे म्हणतात. मात्र त्या साठी भरपूर पायऱ्या चढायची आणि चालायची तयारी हवी. 
कंबोडियातील सियाम रीप जवळील अंगकोर थम आणि रॉयल पॅलेस कंपाउंडची फेरी आज आपण पूर्ण केली. 

कंबोडिया मालिकेतील ह्या आधीचे लेख वाचण्यासाठी -
१. बांते स्रेइ एक सुखद स्वप्न 
https://silvervegantravels.blogspot.com/2022/07/blog-post_14.html
२. अंगकोरवाट - विश्वाची अमूल्य ठेव. 
https://silvervegantravels.blogspot.com/2022/07/blog-post.html
३.ता प्रोह्म आणि प्रेह खान-अजब न्याय नियतीचा   
https://silvervegantravels.blogspot.com/2022/07/blog-post_16.html
४. बयोन चेहरे- एक रहस्य 
https://silvervegantravels.blogspot.com/2022/07/blog-post_19.html
५.PhnomPenh-कंबोडियाची राजधानी  
https://silvervegantravels.blogspot.com/2020/09/phnom-penh.html

#angkorwatcambodia #angkorthom # terraceoflaperking #terraceofelephants #Prerup #angkorwat #angkorwattemple #cambodia #angkor #siemreap #angkorwatsunrise #angkortemple #angkorthom #angkorwatt #angkorwattour #angkortemples #siemreapcambodia #explorecambodia #siemreaptrip #bayontemple #taprohm #cambodiatravel #cambodiatrip #taprohmtemple #bayon  #banteaysrei  #angkorwattemples #siemrep  #travelphotography 


Comments

Popular posts from this blog

महेश्वर

महेश्वर हे मध्यप्रदेश पर्यटन निगमच्या पर्यटन स्थळांमधले एक महत्वाचे नाव आहे. पण करोडो भारतीयांसाठी ते केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर एक तीर्थस्थान असते. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेले स्थान आहे.  महेश्वर किल्ला प्रवेशद्वार  राजवाडा प्रवेशद्वार  बाह्यरूप  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  राजवाडा प्रवेशद्वार  अहिल्याबाई होळकर हे केवळ भारताच्याच नव्हे तर विश्वाच्या इतिहासातील एक सोनेरी पान. संपूर्ण मानव विश्वातील यशस्वी स्त्री राज्यकर्त्यांची सूची करायची झाली तर अहिल्याबाई होळकरांचे नाव ठळकपणे लिहायला लागेल.   31 मे 2025 ला त्यांची तीनशेवी जयंती आहे. पण 300 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या अहिल्याबाईंचे आयुष्य अगदी आजच्या आधुनिक काळातल्या आव्हानातही मार्गदर्शक ठरावे असेच आहे.  त्यांच्याविषयीचा आदर मनात घेऊनच आपण महेश्वरला जातो आणि त्या भावनेच्या प्रकाशात महेश्वर पाहतो. महेश्वरला फार मोठी प्राचीन परंपरा आहे. स्कंद पुराणाच्या रेवा खंडात आणि वायू पुराणाच्या नर्मदा रहस्य मध्ये महिष्मती म्हणजे महेश्वरचे वर्णन आलेले आहे. 'गुप्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

Prashanti Kutiram, Bangalore

I am happy to write my first post of 2022!! I am here with a really very special post! This is not a tourist place and still it holds a special place in each and every visitor’s mind. This is Prashanti Kutiram of Bangalore. Prashanti kutiram as the name suggests, surely makes your mind peaceful. It's around 70-80 kms from Bangalore airport but with the famous traffic jams of Bangalore, it may take two and half hours by taxi.  This is the place where The Swami Vivekananda Yoga Anusandhan Sansthan is situated on a sprawling 100 acres. Swami Vivekanand  Swami Vivekanand  Ramakrishna Paramahans and Sharada Mataji  SVyasa Founded in 1986, Svyasa follows Swami Vivekanand's teachings and combines best of east and West. So it combines Yoga and spirituality with modern sciences.  The first thing you will notice about Vyasa is the greenery. The campus is having umpteen trees. It's hilly area. The steep paths and slopes offer you the much needed exercise!! The Green Umbre...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...