Skip to main content

बयोन चेहरे- एक रहस्य

 अंगकोर थम

अंगकोर थम, ख्मेर राजघराण्याची शेवटची राजधानी. राजा जयवर्मन सप्तम ह्याने वसवलेली राजधानीची नगरी. अंगकोर म्हणजे नगर ( संस्कृत ) आणि थम - मोठा, प्रचंड, महान ( ख्मेर ). राजधानीला साजेसे नाव आहे हे. 

कंबोडियातील अंगकोरवाट मंदिरापासून पावणेदोन- दोन किलोमीटर अंतरावर आणि सियाम रीप पासून साधारण आठ किलोमीटर अंतरावर असलेली अंगकोर थम नगरी बाराव्या शतकात वसवली गेली. सोळाव्या शतकापर्यंत इथे मानवी वस्ती होती. नंतर काही शतके ती नगरी अंधारात राहिली. लोक ही नगरी का सोडून गेले ते नक्की कारण इतिहासाला ज्ञात नाही. लागोपाठ अतिवृष्टी आणि दुष्काळ, त्यामुळे झालेली वाताहत असे त्या मागचे कारण असू शकेल असे म्हणतात. 

ह्या पूर्ण शहराच्या चारी बाजूना तटबंदी आहे. त्याच्या बाहेर पाण्याने भरलेले खंदक आहेत. तटबंदीला चारी दिशांना महाद्वारे आहेत. त्या प्रत्येकावर तीन चेहरे दिसतात. पूर्वी कदाचित चौथ्या बाजूला पण चेहरा असेल. हे चेहरे आहेत सुप्रसिद्ध बयोन मंदिरात असलेल्या चेहर्यांसारखे. अंगकोरवाट म्हटले की तीन फोटो डोळ्यांपुढे येतात. एक म्हणजे अंगकोरवाट मंदिराच्या शिखरांचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब, दुसरे म्हणजे ता प्रोह्म मंदिरातले झाड आणि तिसरे हे बयोनचे चेहरे. 

पूर्वी इथे उघड बंद करता येतील असे लाकडी दरवाजे देखील होते. त्याच्या खुणा आपल्याला दिसतात. चारी दिशांच्या तटबंदीला असलेल्या चार महाद्वारांशिवाय आणखी एक महाद्वार पूर्वेला आहे. त्याचे नाव आहे विजय द्वार - व्हिक्टरी गेट. 
Victory Gate 
समुद्रमंथन 
पाण्याने भरलेले खंदक आहेत. जवळच एक नदी आहे. ते पाणी ख्मेर परंपरेनुसार क्षीरसमुद्र दर्शवते आहे. समुद्रमंथन करणारे देव आणि दानव आपल्याला महाद्वाराकडे जाणाऱ्या पुलावर दिसतात. एका बाजूला ५४ आणि दुसऱ्या बाजूला ५४. हिंदू तत्वज्ञानातील १०८ ह्या संख्येचे महत्व जाणून हे ५४/५४ पुतळे केलेले आहेत. आज मात्र ते खंडित अवस्थेत आहेत. 
तटबंदीच्या काही भागावर नक्षी कोरलेली असणार. पण आज मात्र काळाने तिथे आपली पावले उमटवली आहेत. ती नक्षी फारच क्वचित दिसते आहे. 
साधारण १० ते १२ किलोमीटर लांबीची ही तटबंदी होती. 
उंची साधारण आठ नऊ मीटर. एखाद्या किल्ल्यात प्रवेश करतो आहोत असेच काहीसे ह्या दारातून आत जाताना वाटते. अंगकोरथम त्या काळची राजधानी असल्यामुळे संपूर्ण नगराला तटबंदी असणे संयुक्तिक वाटते. 

अंगकोरवाट पुरातत्व संकुलातील फारच कमी ठिकाणे अशी आहेत की जी मंदिरे नाही आहेत. एक संपूर्ण नगरी असलेले तर अंगकोर थम हे एकमेव ठिकाण. 
क्षीरसमुद्र झाला, समुद्र मंथन झाले, आता ख्मेर परंपरेनुसार मेरू पर्वत हवाच. तो ही आहे. मेरू पर्वत म्हणून बयोन मंदिरे ह्या अंगकोर थम च्या अगदी मध्यभागी, केंद्रस्थानी आहेत. 

बयोन 
बयोन मंदिरे ही जयवर्मन सप्तम ने बांधलेली राज मंदिरे आहेत. त्यांचे मूळ नाव होते जयगिरी किंवा ब्रह्म गिरी. 
अनेक शतके जगाच्या नजरेपासून दूर राहिल्यावर जेव्हा जयगिरी लोकांना सापडले तेव्हा तिथे म्हणे वडाची झाडे वाढलेली होती. बुद्धाचा आणि banyan trees चा संबंध लावला गेला. पण स्थानिक लोक banyan trees ना बयॊन म्हणत असत म्हणून मग मंदिराचे नाव बयोन झाले अशी कथा सांगितली जाते. ती फारच ओढून ताणून नावाशी आणून जोडलेली अशी वाटते. 

आता म्हणजे २०१२ च्या डिसेम्बरमध्ये आम्ही गेलो होतो तेव्हा लांबून पाहताना नुसते कसले तरी ढिगारे मध्यभागी आहेत असे दिसत होते. आधी पाहिलेल्या कोणत्याही मंदिर रचनेतील रेखीवपणा इथे दिसत नव्हता. 
जसे आपण जवळ जातो तशी त्याची रचना स्पष्ट होऊ लागते. बाहेर दोन चौकोनी प्राकार आहेत. त्यांच्या आत बयोनचे सुप्रसिद्ध चेहरे असलेली गोपुरे आहेत. 

बाहेरचे दोन चौकोनी प्राकार, सज्जांनी वेढलेले आहेत. 
त्यांच्या भिंतीवर अनेक देखावे कोरलेले आहेत. बाहेरील सज्जामध्ये जनसामान्यांचे रोजचे जीवन प्रचंड आकाराच्या भिंतीवरील शिल्पात कोरलेले दिसते. रोज ह्या नगरात काय व्यवहार होत असतील ह्याची कल्पना येते. देव, राजे, बुद्ध, ऋषी, रामायण महाभारतातील कथा असे इतर सर्व ठिकाणी दिसत असताना, मानवी जीवनाला शिल्पांत स्थान मिळालेले केवळ इथेच आपल्याला दिसते.
दुसऱ्या एका शिल्पात युद्धासाठी निघालेल्या सैन्याचे चित्र दिसते.
आतल्या भिंतीवर अनेक हिंदू पौराणिक कथा आपल्याला दिसतात. 
काही दारे अजूनही चांगली आहेत. त्यावरचे कोरीवकाम अजूनही आकर्षक दिसते आहे. आत आपण पाहतो तर सगळीकडे मोडलेले खांब, तुटून पडलेली शिल्पे असे दृश्य दिसते. 
अंगकोर मधील सगळ्या मंदिरात अशा कमीतकमी दोन तरी इमारती आढळतात. त्यांना लायब्ररीज म्हणतात. 
मला फार उत्सुकता होती की नक्की ह्या इमारती कशासाठी वापरत असतील. भरपूर शोधल्यावर एक उल्लेख सापडला तो असा की इथे बसून बहुतेक मंत्रोच्चरण करत असतील. काही मंदिरातील अशा इमारतींच्या भिंतीवर संस्कृतमधील काही श्लोक सापडले आहेत. 

आता बाकी सगळे झाले पाहून. आपण त्या मधल्या ढिगांकडे जातो. कसले हे ढीग? मळकट रंगाचे, काही तांबूस दगड रचून ठेवल्यासारखे? जवळ जाताच आपण थक्क होतो. एक दोन नव्हे तर तब्बल चाळीसच्या वर असे मनोरे आपल्याला दिसतात. त्यावर असतात बयोन चे सुप्रसिद्ध चेहरे. प्रत्येक मनोऱ्यावर तीन किंवा चार असे. 
मुळात अशी ५२ गोपुरे किंवा मनोरे होते म्हणतात. प्रत्येकावर चारीकडे बघणारे चार चेहरे. 
इथे आपण जातो तेव्हा सगळीकडे चेहरेच चेहरे. सर्वांवर ते सुप्रसिद्ध अंगकोर स्मितहास्य. 


बयोन स्मित 
हे गूढ, शांत स्मित अंगकोर स्मित म्हणून प्रसिद्ध झाले आहे. डोळे मिटलेले, चेहरा शांत, प्रसन्न असे हे चेहरे सर्वत्र दिसतात आणि आपल्याला वेगळीच अनुभूती देतात. 

त्या स्मितहास्यात काहीतरी खास आहे नक्की. सर्वत्र भग्नावशेष पसरलेले असताना देखील ते स्मित आपल्याला आधार देत राहते. विश्वास देत राहते. कशाचा विश्वास? जगण्यावरचा? माणूसकीवरचा? प्रलयानंतर येणाऱ्या शांतीचा? उत्पत्ती-स्थिती-लय ह्या चक्राचा? माहिती नाही..नक्की कशाचा विश्वास ते. आपण विचार करत राहतो. 
आता हे पुढचे दोन फोटो जवळपास एकाच ठिकाणाहून दिसणाऱ्या दोन वेगवेगळ्या दृश्यांचे आहेत. 
एकीकडे पाहिले तर आपल्याला दूर अंतरावर पण ह्याच मंदिरात बुद्ध मूर्ती दिसते आहे. त्याच ठिकाणाहून पाहिले तर दुसरीकडे शंकराची पिंड दिसते आहे.
तिथे दिसणारी शंकराची पिंड भारतीय मनाला शिवलिंग वाटत नाही ह्याची अनेक कारणे आहेत. पिंडीचा वेगळा आकार आणि त्याची पूजा झालेली नसणे ह्यामुळेही शंकराची पिंड वाटतच नाही. 

चेहरे???
आता मूळ प्रश्न तसाच उरतो. हे इतके सगळे चेहरे करण्यामागचे कारण काय? हे कोणाचे चेहरे आहेत? 
काही इतिहास तज्ज्ञ म्हणतात हे बुद्धाचे अवलोकितेश्वराचे चेहरे आहेत. जयवर्मन सप्तम ने बौद्ध धर्माला राजाश्रय दिला होता. त्यामुळे त्याने बांधलेल्या राज मंदिरात बुद्धाचे चेहरे असणार. 

काहीजण म्हणतात हे खुद्द राजाचे चेहरे आहेत. त्या काळी राजे स्वतःला देवराज म्हणजे देवाचा अवतार किंवा अंश मानत असत. त्याप्रमाणेच राजाने स्वतःला बुद्धाचा अंश मानून हे चेहरे करवले असतील. 

कोणी म्हणतात देवाचे सर्वत्र लक्ष आहे हे सांगण्यासाठी चारी बाजूना पाहणारे चेहरे आहेत. कोणी म्हणतात की तेव्हाच्या राज्यातील लहान लहान प्रदेशाचे प्रतिनिधित्व करणारे हे मनोरे आहेत. आमचे सगळीकडे लक्ष आहे असे शत्रूला सांगत आहेत. 
 
त्या विषयी लिहिलेली अधिकृत नोंद सापडेपर्यंत बयोनचे चेहरे एक रहस्यच राहणार आहेत हे खरे. आज इतक्या शतकांनंतरही ते चेहरे दरवर्षी लाखो पर्यटकांना आकर्षित करत आहेत. 

कंबोडिया मालिकेतील ह्या आधीचे लेख वाचण्यासाठी -
१. बांते स्रेइ एक सुखद स्वप्न 
https://silvervegantravels.blogspot.com/2022/07/blog-post_14.html
२. अंगकोरवाट - विश्वाची अमूल्य ठेव. 
https://silvervegantravels.blogspot.com/2022/07/blog-post.html
३.ता प्रोह्म आणि प्रेह खान-अजब न्याय नियतीचा   
https://silvervegantravels.blogspot.com/2022/07/blog-post_16.html
४.PhnomPenh-कंबोडियाची राजधानी  
https://silvervegantravels.blogspot.com/2020/09/phnom-penh.html

#angkorwatcambodia #angkorwat #angkorwattemple #cambodia #angkor #siemreap #angkorwatsunrise #angkortemple #angkorthom #angkorwatt #angkorwattour #angkortemples #siemreapcambodia #explorecambodia #siemreaptrip #bayontemple #taprohm #cambodiatravel #cambodiatrip #taprohmtemple #bayon  #banteaysrei  #angkorwattemples #siemrep  #travelphotography 

Comments

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...

शिवथरघळ

जर आपण भारताचा नकाशा पाहिला  तर आपल्याला नकाशात डावीकडे, गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत काळसर  हिरवी रेषा दिसते. ही रेषा  गुजराथ येथून सुरु होते  आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू मार्गे जाऊन केरळला पोहोचते. ती रेषा म्हणजेच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट म्हणजे दख्खनच्या पठाराची जणू किनारच आहे. दख्खन पठाराच्या काठावरच्या ह्या पर्वत रांगा आहेत.  या भागात बरीच जंगले, जलसाठे, धबधबे आहेत आणि जैवविविधता तसेच त्याचे वय यामुळे या भागाला 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून ओळखले गेले आहे. पश्चिम घाट हिमालयापेक्षाही जुना आहे! वरंधा घाट  📷विकिमीडिया कॉमन्स  पश्चिम घाट हा अनेक मुख्य नद्यांचे उगमस्थान आहे. वरील छायाचित्रात दिसते आहे त्या प्रमाणे, वर्षा ऋतूत या प्रदेशात अनेक धबधबे पाहायला मिळतात.  पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) अनेक सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे शिवथरघळ धबधबा. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण रौद्र सौंदर्यानिशी आणि ताकदीनिशी रोरावत खाली येताना दिसतो.  हा धबधबा सुमारे शंभर फूट उंचीवर...