मुख्य सामग्रीवर वगळा

बयोन चेहरे- एक रहस्य

 अंगकोर थम

अंगकोर थम, ख्मेर राजघराण्याची शेवटची राजधानी. राजा जयवर्मन सप्तम ह्याने वसवलेली राजधानीची नगरी. अंगकोर म्हणजे नगर ( संस्कृत ) आणि थम - मोठा, प्रचंड, महान ( ख्मेर ). राजधानीला साजेसे नाव आहे हे. 

कंबोडियातील अंगकोरवाट मंदिरापासून पावणेदोन- दोन किलोमीटर अंतरावर आणि सियाम रीप पासून साधारण आठ किलोमीटर अंतरावर असलेली अंगकोर थम नगरी बाराव्या शतकात वसवली गेली. सोळाव्या शतकापर्यंत इथे मानवी वस्ती होती. नंतर काही शतके ती नगरी अंधारात राहिली. लोक ही नगरी का सोडून गेले ते नक्की कारण इतिहासाला ज्ञात नाही. लागोपाठ अतिवृष्टी आणि दुष्काळ, त्यामुळे झालेली वाताहत असे त्या मागचे कारण असू शकेल असे म्हणतात. 

ह्या पूर्ण शहराच्या चारी बाजूना तटबंदी आहे. त्याच्या बाहेर पाण्याने भरलेले खंदक आहेत. तटबंदीला चारी दिशांना महाद्वारे आहेत. त्या प्रत्येकावर तीन चेहरे दिसतात. पूर्वी कदाचित चौथ्या बाजूला पण चेहरा असेल. हे चेहरे आहेत सुप्रसिद्ध बयोन मंदिरात असलेल्या चेहर्यांसारखे. अंगकोरवाट म्हटले की तीन फोटो डोळ्यांपुढे येतात. एक म्हणजे अंगकोरवाट मंदिराच्या शिखरांचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब, दुसरे म्हणजे ता प्रोह्म मंदिरातले झाड आणि तिसरे हे बयोनचे चेहरे. 

पूर्वी इथे उघड बंद करता येतील असे लाकडी दरवाजे देखील होते. त्याच्या खुणा आपल्याला दिसतात. चारी दिशांच्या तटबंदीला असलेल्या चार महाद्वारांशिवाय आणखी एक महाद्वार पूर्वेला आहे. त्याचे नाव आहे विजय द्वार - व्हिक्टरी गेट. 
Victory Gate 
समुद्रमंथन 
पाण्याने भरलेले खंदक आहेत. जवळच एक नदी आहे. ते पाणी ख्मेर परंपरेनुसार क्षीरसमुद्र दर्शवते आहे. समुद्रमंथन करणारे देव आणि दानव आपल्याला महाद्वाराकडे जाणाऱ्या पुलावर दिसतात. एका बाजूला ५४ आणि दुसऱ्या बाजूला ५४. हिंदू तत्वज्ञानातील १०८ ह्या संख्येचे महत्व जाणून हे ५४/५४ पुतळे केलेले आहेत. आज मात्र ते खंडित अवस्थेत आहेत. 
तटबंदीच्या काही भागावर नक्षी कोरलेली असणार. पण आज मात्र काळाने तिथे आपली पावले उमटवली आहेत. ती नक्षी फारच क्वचित दिसते आहे. 
साधारण १० ते १२ किलोमीटर लांबीची ही तटबंदी होती. 
उंची साधारण आठ नऊ मीटर. एखाद्या किल्ल्यात प्रवेश करतो आहोत असेच काहीसे ह्या दारातून आत जाताना वाटते. अंगकोरथम त्या काळची राजधानी असल्यामुळे संपूर्ण नगराला तटबंदी असणे संयुक्तिक वाटते. 

अंगकोरवाट पुरातत्व संकुलातील फारच कमी ठिकाणे अशी आहेत की जी मंदिरे नाही आहेत. एक संपूर्ण नगरी असलेले तर अंगकोर थम हे एकमेव ठिकाण. 
क्षीरसमुद्र झाला, समुद्र मंथन झाले, आता ख्मेर परंपरेनुसार मेरू पर्वत हवाच. तो ही आहे. मेरू पर्वत म्हणून बयोन मंदिरे ह्या अंगकोर थम च्या अगदी मध्यभागी, केंद्रस्थानी आहेत. 

बयोन 
बयोन मंदिरे ही जयवर्मन सप्तम ने बांधलेली राज मंदिरे आहेत. त्यांचे मूळ नाव होते जयगिरी किंवा ब्रह्म गिरी. 
अनेक शतके जगाच्या नजरेपासून दूर राहिल्यावर जेव्हा जयगिरी लोकांना सापडले तेव्हा तिथे म्हणे वडाची झाडे वाढलेली होती. बुद्धाचा आणि banyan trees चा संबंध लावला गेला. पण स्थानिक लोक banyan trees ना बयॊन म्हणत असत म्हणून मग मंदिराचे नाव बयोन झाले अशी कथा सांगितली जाते. ती फारच ओढून ताणून नावाशी आणून जोडलेली अशी वाटते. 

आता म्हणजे २०१२ च्या डिसेम्बरमध्ये आम्ही गेलो होतो तेव्हा लांबून पाहताना नुसते कसले तरी ढिगारे मध्यभागी आहेत असे दिसत होते. आधी पाहिलेल्या कोणत्याही मंदिर रचनेतील रेखीवपणा इथे दिसत नव्हता. 
जसे आपण जवळ जातो तशी त्याची रचना स्पष्ट होऊ लागते. बाहेर दोन चौकोनी प्राकार आहेत. त्यांच्या आत बयोनचे सुप्रसिद्ध चेहरे असलेली गोपुरे आहेत. 

बाहेरचे दोन चौकोनी प्राकार, सज्जांनी वेढलेले आहेत. 
त्यांच्या भिंतीवर अनेक देखावे कोरलेले आहेत. बाहेरील सज्जामध्ये जनसामान्यांचे रोजचे जीवन प्रचंड आकाराच्या भिंतीवरील शिल्पात कोरलेले दिसते. रोज ह्या नगरात काय व्यवहार होत असतील ह्याची कल्पना येते. देव, राजे, बुद्ध, ऋषी, रामायण महाभारतातील कथा असे इतर सर्व ठिकाणी दिसत असताना, मानवी जीवनाला शिल्पांत स्थान मिळालेले केवळ इथेच आपल्याला दिसते.
दुसऱ्या एका शिल्पात युद्धासाठी निघालेल्या सैन्याचे चित्र दिसते.
आतल्या भिंतीवर अनेक हिंदू पौराणिक कथा आपल्याला दिसतात. 
काही दारे अजूनही चांगली आहेत. त्यावरचे कोरीवकाम अजूनही आकर्षक दिसते आहे. आत आपण पाहतो तर सगळीकडे मोडलेले खांब, तुटून पडलेली शिल्पे असे दृश्य दिसते. 
अंगकोर मधील सगळ्या मंदिरात अशा कमीतकमी दोन तरी इमारती आढळतात. त्यांना लायब्ररीज म्हणतात. 
मला फार उत्सुकता होती की नक्की ह्या इमारती कशासाठी वापरत असतील. भरपूर शोधल्यावर एक उल्लेख सापडला तो असा की इथे बसून बहुतेक मंत्रोच्चरण करत असतील. काही मंदिरातील अशा इमारतींच्या भिंतीवर संस्कृतमधील काही श्लोक सापडले आहेत. 

आता बाकी सगळे झाले पाहून. आपण त्या मधल्या ढिगांकडे जातो. कसले हे ढीग? मळकट रंगाचे, काही तांबूस दगड रचून ठेवल्यासारखे? जवळ जाताच आपण थक्क होतो. एक दोन नव्हे तर तब्बल चाळीसच्या वर असे मनोरे आपल्याला दिसतात. त्यावर असतात बयोन चे सुप्रसिद्ध चेहरे. प्रत्येक मनोऱ्यावर तीन किंवा चार असे. 
मुळात अशी ५२ गोपुरे किंवा मनोरे होते म्हणतात. प्रत्येकावर चारीकडे बघणारे चार चेहरे. 
इथे आपण जातो तेव्हा सगळीकडे चेहरेच चेहरे. सर्वांवर ते सुप्रसिद्ध अंगकोर स्मितहास्य. 


बयोन स्मित 
हे गूढ, शांत स्मित अंगकोर स्मित म्हणून प्रसिद्ध झाले आहे. डोळे मिटलेले, चेहरा शांत, प्रसन्न असे हे चेहरे सर्वत्र दिसतात आणि आपल्याला वेगळीच अनुभूती देतात. 

त्या स्मितहास्यात काहीतरी खास आहे नक्की. सर्वत्र भग्नावशेष पसरलेले असताना देखील ते स्मित आपल्याला आधार देत राहते. विश्वास देत राहते. कशाचा विश्वास? जगण्यावरचा? माणूसकीवरचा? प्रलयानंतर येणाऱ्या शांतीचा? उत्पत्ती-स्थिती-लय ह्या चक्राचा? माहिती नाही..नक्की कशाचा विश्वास ते. आपण विचार करत राहतो. 
आता हे पुढचे दोन फोटो जवळपास एकाच ठिकाणाहून दिसणाऱ्या दोन वेगवेगळ्या दृश्यांचे आहेत. 
एकीकडे पाहिले तर आपल्याला दूर अंतरावर पण ह्याच मंदिरात बुद्ध मूर्ती दिसते आहे. त्याच ठिकाणाहून पाहिले तर दुसरीकडे शंकराची पिंड दिसते आहे.
तिथे दिसणारी शंकराची पिंड भारतीय मनाला शिवलिंग वाटत नाही ह्याची अनेक कारणे आहेत. पिंडीचा वेगळा आकार आणि त्याची पूजा झालेली नसणे ह्यामुळेही शंकराची पिंड वाटतच नाही. 

चेहरे???
आता मूळ प्रश्न तसाच उरतो. हे इतके सगळे चेहरे करण्यामागचे कारण काय? हे कोणाचे चेहरे आहेत? 
काही इतिहास तज्ज्ञ म्हणतात हे बुद्धाचे अवलोकितेश्वराचे चेहरे आहेत. जयवर्मन सप्तम ने बौद्ध धर्माला राजाश्रय दिला होता. त्यामुळे त्याने बांधलेल्या राज मंदिरात बुद्धाचे चेहरे असणार. 

काहीजण म्हणतात हे खुद्द राजाचे चेहरे आहेत. त्या काळी राजे स्वतःला देवराज म्हणजे देवाचा अवतार किंवा अंश मानत असत. त्याप्रमाणेच राजाने स्वतःला बुद्धाचा अंश मानून हे चेहरे करवले असतील. 

कोणी म्हणतात देवाचे सर्वत्र लक्ष आहे हे सांगण्यासाठी चारी बाजूना पाहणारे चेहरे आहेत. कोणी म्हणतात की तेव्हाच्या राज्यातील लहान लहान प्रदेशाचे प्रतिनिधित्व करणारे हे मनोरे आहेत. आमचे सगळीकडे लक्ष आहे असे शत्रूला सांगत आहेत. 
 
त्या विषयी लिहिलेली अधिकृत नोंद सापडेपर्यंत बयोनचे चेहरे एक रहस्यच राहणार आहेत हे खरे. आज इतक्या शतकांनंतरही ते चेहरे दरवर्षी लाखो पर्यटकांना आकर्षित करत आहेत. 

कंबोडिया मालिकेतील ह्या आधीचे लेख वाचण्यासाठी -
१. बांते स्रेइ एक सुखद स्वप्न 
https://silvervegantravels.blogspot.com/2022/07/blog-post_14.html
२. अंगकोरवाट - विश्वाची अमूल्य ठेव. 
https://silvervegantravels.blogspot.com/2022/07/blog-post.html
३.ता प्रोह्म आणि प्रेह खान-अजब न्याय नियतीचा   
https://silvervegantravels.blogspot.com/2022/07/blog-post_16.html
४.PhnomPenh-कंबोडियाची राजधानी  
https://silvervegantravels.blogspot.com/2020/09/phnom-penh.html

#angkorwatcambodia #angkorwat #angkorwattemple #cambodia #angkor #siemreap #angkorwatsunrise #angkortemple #angkorthom #angkorwatt #angkorwattour #angkortemples #siemreapcambodia #explorecambodia #siemreaptrip #bayontemple #taprohm #cambodiatravel #cambodiatrip #taprohmtemple #bayon  #banteaysrei  #angkorwattemples #siemrep  #travelphotography 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

कोस्टल कर्नाटक ६ - अविस्मरणीय शरावती बॅकवॉटर बोटिंग, शरावती कांडला मॅन्ग्रोव्ह बोर्ड वॉक

मी आधीच्या पोस्टमध्ये सांगितले होते की आजचा सूर्यास्त समुद्रात होता तर उद्याचा सूर्योदय शरावती नदीत असणार आहे! तोच हा सूर्योदय शरावती नदीत, कमळांच्या मध्ये.  शरावती बॅकवॉटर बोटिंग  दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहापर्यंत आम्ही बोटिंगच्या ठिकाणी पोचलो. कारण आम्हाला सूर्योदय चुकवायचा नव्हता. होनावर जवळचे शरावती नदीतील बोटिंग हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.  आजूबाजूची शांतता, संथ पाणी, स्वच्छ नितळ पाण्यात वाकून आपले प्रतिबिंब न्याहाळणारी नारळाची झाडे, पाण्यात अध्ये मध्ये असलेली लहानशी बेटे, खारफूटीची जंगले, कमळाची पाण्यावर तरंगणारी पाने, उगवत्या सूर्याची पाण्यात मिसळणारी किरणे, त्याने तांबूस झालेले पाणी .. एक वेगळेच जग असते ते. तुम्ही जितक्या वेळासाठी बोट ठरवलेली असेल.. तास दीड तास..  तो वेळ, तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असणार हे मी अगदी खात्रीने सांगू शकते.  आपोआप जगाचा, आयुष्याचा कोलाहल मंद होत जातो. पहाटेचा मवाळ प्रकाश, पाण्यावर हेलकावणारी नाव, हवेतला अगदी किंचितसा सुखद गारवा आणि मुरत जाणारी शांतता ह्या सगळ्याने मन निवळत जाते.  आम्ही गेलो त्या दिवशी,...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका  आज उडुपीहून लवकर निघून शृंगेरीला पोचण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच निघालो. रस्ता खूपच छान होता. आता खरं सांगायचे तर कोस्टल कर्नाटक प्रवासात रस्ता सुंदर होता म्हणणे ही द्विरुक्तीच आहे.  सगळ्या सडका अगदी एका पातळीतील आणि गुळगुळीत आहेत. खड्डे खळगे, रस्ते वर खाली असणे असे काही नसल्याने महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हाला थोडे चुकल्यासारखे वाटले खरे!!! शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, स्वच्छता ह्यामुळे प्रवास फार आनंदाचा होतो. उडुपी शृंगेरी रस्ता तर आगुंबे जंगलातून जातो. त्यामुळे दाट झाडी होती. रस्त्यात सुप्रसिद्ध आगुंबे घाटही येतोच. सकाळची प्रसन्न वेळ आणि इतका छान रस्ता..दिवसाची चांगली सुरुवात होण्यासाठी आणखी काय पाहिजे?!!  आम्हाला वाटले होते इतक्या लवकर फारसे कोणी श्रुंगेरीत आलेले नसेल. पण शृंगेरीला पोचल्यावर लक्षात आले की आमच्यासारखाच विचार अनेकांनी केला होता!  अनेक बस रात्रभराचा प्रवास करून सकाळी शृंगेरीला पोचल्या होत्या. त्या लोकांच्या प्रातर्विधी आणि अंघोळीसाठी अनेक ठिकाणी माफक पैसे घेऊन उत्तम सोय केलेली होती....

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....