मुख्य सामग्रीवर वगळा

क्रांतितीर्थ - क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय

१८९६ मध्ये पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. १८९७ मध्ये आला ब्रिटिश सरकारचा संसर्गजन्य रोग विरोधी कायदा. 
त्या कायद्याची अंमलबजावणी अतिशय अमानुषरीत्या केली गेली. लोकांच्या देवघरात ब्रिटीश अधिकारी प्लेग कमिशनर वॉल्टर चार्ल्स रँड ह्याचे सैनिक बुटासकट शिरु लागले. देवघरातले देव रस्त्यावर फेकू लागले. भारतीय धार्मिक, सामाजिक प्रथा परंपरांचा अनादर करत लोकांचा छळ केला गेला. 
स्वैपाकघरातील लोणच्याच्या बरण्या, इतर खाद्यपदार्थ संसर्गाचे कारण सांगून उकिरड्यावर ओतले गेले. केवळ संशयावरून कित्येक लोकांचे घरगुती सामान जाळून टाकले. इतकेच करून ब्रिटिश सरकार थांबले नाही. तर प्लेगचे रुग्ण शोधण्याच्या नावाखाली घरातील स्त्रिया आणि वृद्ध ह्यांच्यावर अत्याचार केले गेले. 
पुण्यातील जनतेत मोठा असंतोष पसरला. हा सगळा अत्याचार मुकाट्याने सहन करणे कठीणच होते. उन्मत्त रँडला अद्दल घडवण्याची योजना काही स्वाभिमानी तरुणांनी आखली. त्यात सहभागी होते चापेकर बंधू, म्हणजे दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव चापेकर . त्यांच्यासमवेत होते त्यांचे अजून काही शूर मित्र. 
२२ जून १८९७ला पुण्यात एक मोठा समारंभ ब्रिटिशांनी आयोजित केला होता. इंग्लडच्या राणीच्या म्हणजे राणी व्हिक्टोरियाच्या राज्यारोहणाचा हिरकमहोत्सव इंग्लंड मध्ये आणि इंग्रजांचे राज्य असलेल्या देशांत साजरा होत होता. त्यानिमित्ताने पुण्यात रोषणाई करण्यात आली होती. एका मोठ्या मेजवानीचे आयोजन करण्यात आले. 
त्याच दिवशी रँडला मारण्याचे चापेकर बंधूनी ठरवले. ते गणेशखिंडीत अंधारात दबा धरून बसले. मेजवानीहून घरी परतणाऱ्या रॅन्डवर दामोदर चापेकर ह्यांनी गोळ्या झाडल्या. रँड कोमात गेला आणि नंतर इस्पितळात त्याचा ३जुलै १८९७ ला मृत्यू झाला. 
त्याच वेळी दुसरा ब्रिटिश अधिकारी आयर्स्ट ह्याच्यावर बाळकृष्णाने गोळी झाडली. आयर्स्टचा तात्काळ मृत्यू झाला. 
त्यावेळी पोलीस चापेकर बंधूंना पकडू शकले नाहीत. तरी नंतर चापेकर बंधूंच्या परिचयातील द्रविड बंधूंनी पैशांच्या आशेने फितुरी केली. त्यामुळे दोन्ही चापेकर बंधू पकडले गेले. याचा बदला म्हणून तिसरे बंधू वासुदेव हरी चापेकर व महादेव रानडे यांनी द्रविड बंधूंचा वध केला. त्यानंतर त्यांनाही अटक झाली. 
ब्रिटिश सरकारने खटल्याचे नाटक केले आणि आधीच सर्वाना माहिती असलेला निकाल दिला गेला. तिन्ही चापेकर बंधूंना फाशीची शिक्षा झाली. 
दामोदर चापेकर यांना १८ एप्रिल १८९८ला, वासुदेव चापेकर यांना ८ मे १८९९ला आणि बाळकृष्ण चापेकर यांना १२ मे १८९९ ला येरवडा तुरुगात फाशी देण्यात आली.
स्वातंत्र्यसंग्रामात एकाच घरातील तीन भाऊ सहभागी असणे तशी दुर्मिळ गोष्ट. चापेकर बंधू आणि सावरकर बंधू ही दोन आडनावे डोळ्यांसमोर येतात. त्यातील चापेकर बांधून फाशी झाल्यावर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांनी देवीसमोर स्वातंत्र्यासाठी झुंजण्याची शपथ घेतली होती. 
चापेकर बंधूंचे घराणे कोकणातील चापे यथील होते. पण नंतर ते पुण्याजवळील चिंचवड येथे स्थायिक झाले. चिंचवडमधील मोरया गोसावी मंदिराच्या जवळ त्यांचे घर होते. त्यांचे वडील हरिपंत चाफेकर हे कीर्तनकार होते. तिन्ही भावांचा जन्म (दामोदर- १८६९, बाळकृष्ण- १८७३, वासुदेव- १८८०) ह्याच चिंचवडच्या वाड्यात झाला. म्हणजे फाशी दिली तेव्हा त्यांची वये विशी तिशीतीलच होती. इतक्या तरुण वयात ते भारतात क्रांतीचे स्फुल्लिंग पेटवून गेले. अनेकांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देऊन गेले. 
चापेकर बंधूंचा जन्म झालेला वाडा आता क्रांतीतीर्थ चापेकर स्मारक म्हणून ओळखला जातो. ह्या वाड्यात चापेकरांच्या आयुष्यातील प्रसंग पाहायला मिळतात. जुन्या पुण्यातील वाड्याच्या रचनेप्रमाणे सर्व मांडणी केली आहे. तसेच चलचित्राच्या आधारे माहिती सांगितली जाते. त्यामुळे इतिहास जिवंत होऊन आपल्या समोर उभा राहतो. 
क्रांतितीर्थ 
क्रांतितीर्थ 
गाऊ त्यांना आरती 
वाड्यातील चौक 
वाड्यातील चौक 
पोथीवाचनाची बैठक 
वाडा दाखवताना कठडे, नक्षीदार खांब, भिंतीवरील चित्रे सगळे अगदी जुन्या काळातल्यासारखे दाखवले आहे. 
भित्तिचित्रे 
तसेच मनुष्याकृती हुबेहूब पुतळ्यांमुळे सर्व वातावरण अगदी सजीव झाले आहे. आपल्याला माहिती सांगण्यासाठी प्रत्येक खोलीत चलचित्र असतेच. शिवाय एक मार्गदर्शक देखील आपल्यासोबत असतो. मी दोनदा गेले. दोन्ही वेळा अगदी तरुण उत्साही मुले मार्गदर्शक म्हणून काम करत होती. 
माहिती 
प्रत्येक मजल्यावर काय काय आहे ह्याची माहिती देणाऱ्या अशा पाट्या लावलेल्या आहेत. 
देवघर 
माजघर 
गोफण मंडळ आरती 
कोठीची खोली 
स्वैपाकघर 
धर्म इतिहास संगीत शिक्षण 
चापेकरांचे ज्वलंत विचार 
रँडचा वध करण्याआधी चतुःश्रुंगी देवीचे दर्शन घेतले होते. तिला सत्कर्मी धैर्य दे असे साकडे देखील घातले होते. 
देवीला साकडे 

रँडचा वध 
फितूर द्रविड बंधूंचा वध 
वंशवृक्ष 
भगिनी निवेदितांची भेट 
छत्रपती शिवाजी महाराज 
चापेकरांचे आदर्श होते छत्रपती शिवाजी महाराज. लोकमान्य टिळकांच्या कार्यापासून त्यांना प्रेरणा मिळाली होती. लोकमान्य टिळकांनी चापेकरांची तुरुंगात भेट घेऊन त्यांना गीतेची प्रत दिली होती. 
चापेकर वाड्यातील त्या काळातील काही वस्तू इथे पाहायला मिळतात. तसेच नव्या तंत्रज्ञानामुळे चापेकरांचे गोफण मंडळाच्या माध्यमातून केलेले शक्ती संवर्धन, स्वातंत्र्यासाठी प्रयत्न, रँडच्या वधाची घटना आपल्यापुढे प्रत्यक्ष घडते आहे असेच वाटते. त्या वेळचा संपूर्ण इतिहास जिवंत होऊन समोर उभा राहतो. 
क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती आणि पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कार्पोरेशनच्या संयुक्त विद्यमाने हे क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय उभारले गेले आहे. 
प्रत्येकाने आवर्जून पाहावे, आपल्या मुलांना दाखवावे असेच हे स्मारक आणि संग्रहालय आहे. 
क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय 

क्रांतितीर्थाचा पत्ता 
क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय 
३६७/१, राम मंदिराजवळ, चिंचवड गाव 
पुणे ४११०३३
स्मारकापासून अगदी जवळ राम मंदिर आहे. तसेच मोरया गोसावी गणेश मंदिर चालत जाण्याच्या अंतरावर आहे. चालत फार तर दहा मिनिटे लागतील. ही दोन्ही ठिकाणे देखील पाहून होतील. 
मोरया गोसावी मंदिर 


#chapekar wada #nationalmuseum #krantiveer #krantiteerth #DamodarHariChapekar 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका  आज उडुपीहून लवकर निघून शृंगेरीला पोचण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच निघालो. रस्ता खूपच छान होता. आता खरं सांगायचे तर कोस्टल कर्नाटक प्रवासात रस्ता सुंदर होता म्हणणे ही द्विरुक्तीच आहे.  सगळ्या सडका अगदी एका पातळीतील आणि गुळगुळीत आहेत. खड्डे खळगे, रस्ते वर खाली असणे असे काही नसल्याने महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हाला थोडे चुकल्यासारखे वाटले खरे!!! शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, स्वच्छता ह्यामुळे प्रवास फार आनंदाचा होतो. उडुपी शृंगेरी रस्ता तर आगुंबे जंगलातून जातो. त्यामुळे दाट झाडी होती. रस्त्यात सुप्रसिद्ध आगुंबे घाटही येतोच. सकाळची प्रसन्न वेळ आणि इतका छान रस्ता..दिवसाची चांगली सुरुवात होण्यासाठी आणखी काय पाहिजे?!!  आम्हाला वाटले होते इतक्या लवकर फारसे कोणी श्रुंगेरीत आलेले नसेल. पण शृंगेरीला पोचल्यावर लक्षात आले की आमच्यासारखाच विचार अनेकांनी केला होता!  अनेक बस रात्रभराचा प्रवास करून सकाळी शृंगेरीला पोचल्या होत्या. त्या लोकांच्या प्रातर्विधी आणि अंघोळीसाठी अनेक ठिकाणी माफक पैसे घेऊन उत्तम सोय केलेली होती....

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...