Skip to main content

सिगिरिया - एक गुढवलय 

 सगळीकडे नुसते हिरवेगार! हिरवळ, झाडे, कुठे कुठे दाट जंगल देखील. सगळा साधारण सपाट पठारी प्रदेश. तुम्ही ती हिरवाई न्याहाळण्यात मग्न असताना अचानक तुमच्या डोळ्यांसमोर येतो एक महाकाय खडक! महाकाय म्हणजे किती मोठा असेल? तर फक्त ६६० फूट उंच! सपाट प्रदेशात अचानक हा महाकाय खडक उगवल्याने आश्चर्य चकित झाला असलात तर खरी चकित होण्याजोगी गोष्ट अजून पुढेच आहे. ह्या महाकाय खडकावर चक्क एक राजवाडा आहे. ह्या खडकाला आता राजवाडा म्हणावे की किल्ला असा प्रश्न पडतो! 

सिगिरिया 
📷स्नेहा टिळक

सिगिरिया 
📷wikimedia commons

सिगिरिया
 📷स्नेहा टिळक 

श्रीलंकेतील डम्बुला शहराजवळील सिगिरिया किंवा सिंहगिरी हे UNESCO ने विश्व वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. ह्या स्थानाला ऐतिहासिक, पौराणिक, सांस्कृतिक,धार्मिक आणि पुरातत्वशास्त्रीय देखील महत्व आहे. शिवाय हे नगर विकास रचनेचे एक उत्तम उदाहरण आहे. 


पुरात्तत्व संशोधकांना सापडलेल्या काही वस्तूंच्या पुराव्यानुसार सिगिरियात ५००० वर्षांपूर्वी सुद्धा मानवी वस्ती होती. काही लोक म्हणतात की सिगिरियाचा राजवाडा म्हणजेच रावणाची सोन्याची लंका! इथे सोन्याने बांधलेला राजवाडा होता. काहीजण म्हणतात की तो राजवाडा कुबेराने (धनदेवता) जो रावणाचा सावत्र भाऊ होता त्याने बांधलेला होता. 

काही जणांना वाटते की हा राजवाडा परग्रहावरील वासियांनी बांधलेला असणार अन्यथा ६६० फुटांवर कोणी मानव कसे काय बांधकाम करू शकेल?!

इतिहासतज्ञांच्या मते आणि श्रीलंकेत सापडलेल्या काही ऐतिहासिक वर्णनानुसार सिगिरिया ही राजा कश्यपाची राजधानी होती. राजा कश्यपाने, त्याच्या वडिलांना धातुसेन राजाला मारून सत्ता बळकावली. पण त्याला नेहमीच सिंहासनाचा खरा वारसदार असलेला त्याचा जो भाऊ होता, त्याची भीती वाटत राहिली. त्या भावाच्या आक्रमणापासून वाचण्यासाठी कश्यपाने ही सुरक्षित जागा आपल्या राजधानीसाठी निवडली. राजा कश्यपाच्या राजवटीत (४७७-४९५ CE) मध्ये ह्या किल्ल्यातील बरीचशी बांधकामे झाली. काहीजणांच्या मते हा राजा कश्यपाचा रंग महाल होता. 

राजा कश्यप अखेर त्या भावाबरोबर, मोग्गलनबरोबर झालेल्या लढाईत हरला व मृत्यू पावला. त्या नंतर राजधानी परत मूळ जागी म्हणजे अनुराधापूरला गेली आणि सिगिरियातील त्या खडकाच्या तळाशी असलेले राजवाडे बुद्ध भिक्षूंच्या विहारासाठी देण्यात आले. खडकावरील राजवाडा मात्र वापरला गेला नाही. त्या नंतर काही वर्षांनी बुद्ध भिक्षूंनी पण ही जागा सोडली आणि सिगिरिया अनेक वर्षे, अनेक शतके दुर्लक्षित राहिले, विस्मृतीत गेले. 

सिगिरिया किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूने पाणी भरलेला खंदक आहे. तो बघून कंबोडियातील अंगकोर ची आठवण होते. तिकीट खिडकी जवळ जल उद्याने आहेत. 



तिकीट खिडकी जवळील जल उद्यान 
📷स्नेहा टिळक


एल आणि यू आकाराची अनेक जल उद्याने आकर्षक भौमितिक रचना करून निर्माण केली आहेत. आहेत. तिथे चार गार्डन्स ऑफ पॅराडाईज आहेत. त्या आत्मा, हृदय, प्राण आणि सार ह्यांचे प्रतिनिधित्व करून आत्म्याचा प्रवास दाखवतात. 

खडक माथ्यावरून दिसणाऱ्या सिगिरिया च्या बागा.
📷स्नेहा टिळक

आणखी थोडे उंच चढून गेलं की येते तिसरे जल उद्यान, एका अष्टकोनी तळ्याच्या रूपात. 

अष्टकोनी तळे 
📷स्नेहा टिळक


आमच्या गाईडने आम्हाला सांगितले की त्या ६६० फूट उंच खडकाच्या माथ्यावर हायड्रॉलिक प्रणालीने खालून पाणी वाहून नेले जात असे. त्यातली काही कारंजी अजूनही चालतात असे तो म्हणाला, पण आम्हाला मात्र एकही चालू कारंजे बघायला मिळाले नाही. 

मोठाल्या खडकांच्या रचना असलेल्या, गुहा असलेल्या बोल्डर गार्डन्स देखील पाहायला मिळतात. 
 
खडकांचा बोगदा!
📷स्नेहा टिळक

तिथल्या काही विटांच्या भिंती आणि पायऱ्या १५०० वर्षे जुन्या आहेत हे कळल्यावर आश्चर्य वाटते. 

एका ब्रिटिश लेखकाने लिहून ठेवले आहे की त्या खडकाचा पृष्ठभाग चित्रांनी आभूषित केलेला होता. ४०० फूट लांब आणि १०० फूट उंच इतका भाग चित्रांनी भरलेला होता. किती सुंदर दिसेल हे दृश्य? ह्या विचाराने पण थक्क व्हायला होते. दुर्दैवाने आता मात्र अगदीच थोडी भित्तिचित्रे शिल्लक आहेत. ती पाहून आपल्याला अजिंठ्यातील भित्तिचित्रांची आठवण होते. 



चित्रसज्जा कडे जाणारा चक्राकार जिना 
📷स्नेहा टिळक



सुंदर भित्तिचित्रे 
📷स्नेहा टिळक



गाईडने आम्हाला सांगितले की ह्या भिंतीचा काही भाग गिलावा करून आणि घासून इतका गुळगुळीत केलेला होता, जणू आरसाच. त्यावर सूर्याचे किरण पडून परावर्तित व्हावे अशी योजना होती. 

सैनिक चौकी?
📷स्नेहा टिळक

नागफणा खडक 
📷स्नेहा टिळक
आता ज्या द्वारामुळे ह्या जागेला सिगिरिया- सिंहगिरी असे नाव मिळाले ते सिंहद्वार पाहू या. काही वर्षांपूर्वी पर्यंत सिंहाचे मस्तक देखील होते असे कळले. सध्या मात्र सिंहाचे पुढचे दोन पाय तेवढे दिसतात. 

सिंहद्वार 
📷स्नेहा टिळक

सिंहद्वारातून वर जाण्यासाठी जिना 
📷Commons Wikimedia

वयस्कर लोक, शारीरिक व्याधी असणारे आणि लहान मुले ह्यांनी जाण्याजोगे हे ठिकाण आहे असे मला वाटत नाही. ते कोणी बरोबर असतील तर खाली जल उद्यानाच्या तिथे ते थांबू शकतात. १५०० आणि त्याही कमी अधिक उंची रुंदीच्या पायऱ्या आहेत. कुठे नुसताच चढ आहे. रस्ता नक्कीच अवघड आहे. 


हा मार्ग नसे दुर्बलांसाठी! 
📷स्नेहा टिळक

वरपर्यंत जाणे अवघड असले तरी तिथे पोचल्यावर त्या सगळ्या कष्टांचे सार्थक होते. खडकमाथ्यावरुन दिसणारे भोवतालच्या परिसराचे सुंदर दृश्य, राजवाड्याचे अवशेष आणि पुरातन टेरेस गार्डन्स ह्या सगळ्याचा आनंद घ्यायचा असेल तर तेवढा त्रास घ्यायला काहीच हरकत नाही. 

पायात खाबड खुबड रस्त्याने चालायला आणि पायऱ्यांनी चढायला योग्य अशी पायताणे मात्र हवीत. सोबत पाणी न्यायचे मात्र विसरू नका. रस्त्यात किंवा वर खडक माथ्यावर काहीही मिळत नाही. 



आम्ही पोचलो! सिगिरियामधील सर्वात उंच जागा 


खडकमाथ्यावर पोचल्यावर मानवनिर्मित भले मोठे तळे दिसते, काही टेरेस गार्डन्स दिसतात, इमारतींची जोती/ पायाचे अवशेष दिसतात. इतक्या उंचावर पाणी कसे पोचवले असेल? विटा आणि अजस्त्र संगमरवरी शिळा ६६० फूट उंचीवर कशी पोचवली असतील? जर का आत्ता आहेत हे सगळे जिने तेव्हा नव्हते तर मग माणसे वर राजवाड्यात कशी जात असतील? आज खडकावर आडवे चर आणि खुणा दिसतात त्या खरेच ट्रॉली साठी किंवा लिफ्ट साठी तयार केलेल्या होत्या का? तेव्हा लिफ्ट्स खरेच असतील तर कोणता ऊर्जा स्रोत वापरात असतील? सैनिकी चौक्या असे ज्याला आज म्हटले जाते, ते उभे चर/ छोट्या गुफा इतक्या खड्या कातळावर कशा कोरल्या असतील? त्या खोदण्यामागे काय उद्देश असेल? 
हे सगळे प्रश्न आपल्याला पडत राहतात. ह्यात काहीच आश्चर्य नाही की स्वत:च एक आश्चर्य असलेले सिगिरिया हे श्रीलंकेतील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ बनले आहे! प्रत्येक हौशी प्रवाश्यासाठी नक्की 'एकदा तरी भेट द्यायलाच हवी' अशी जागा. 

राजवाडा - खडकावरला!
📷 Open source, Internet

असे कितीतरी प्रश्न आहेत ज्याची अजून उत्तरे मिळायची आहेत. ती उत्तरे सापडेपर्यंत सिगिरिया एक गूढच राहणार आहे. श्रीलंकेत म्हटले जाते की सिगिरिया हे जगातले आठवे आश्चर्य आहे, ते मात्र खरेच पटते. 

#MysteriousDestination #Vacation #PalaceOnRock

Comments

  1. खूप छान माहिती आणि फोटोंमुळे वास्तूची भव्यता समजली.

    ReplyDelete
  2. Wa khrech kiti ashray aahe na,khup mast vatate vachtana tuzyabrobar tithe firat aahot asech bhasate.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...

शिवथरघळ

जर आपण भारताचा नकाशा पाहिला  तर आपल्याला नकाशात डावीकडे, गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत काळसर  हिरवी रेषा दिसते. ही रेषा  गुजराथ येथून सुरु होते  आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू मार्गे जाऊन केरळला पोहोचते. ती रेषा म्हणजेच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट म्हणजे दख्खनच्या पठाराची जणू किनारच आहे. दख्खन पठाराच्या काठावरच्या ह्या पर्वत रांगा आहेत.  या भागात बरीच जंगले, जलसाठे, धबधबे आहेत आणि जैवविविधता तसेच त्याचे वय यामुळे या भागाला 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून ओळखले गेले आहे. पश्चिम घाट हिमालयापेक्षाही जुना आहे! वरंधा घाट  📷विकिमीडिया कॉमन्स  पश्चिम घाट हा अनेक मुख्य नद्यांचे उगमस्थान आहे. वरील छायाचित्रात दिसते आहे त्या प्रमाणे, वर्षा ऋतूत या प्रदेशात अनेक धबधबे पाहायला मिळतात.  पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) अनेक सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे शिवथरघळ धबधबा. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण रौद्र सौंदर्यानिशी आणि ताकदीनिशी रोरावत खाली येताना दिसतो.  हा धबधबा सुमारे शंभर फूट उंचीवर...