मुख्य सामग्रीवर वगळा

सिगिरिया - एक गुढवलय 

 सगळीकडे नुसते हिरवेगार! हिरवळ, झाडे, कुठे कुठे दाट जंगल देखील. सगळा साधारण सपाट पठारी प्रदेश. तुम्ही ती हिरवाई न्याहाळण्यात मग्न असताना अचानक तुमच्या डोळ्यांसमोर येतो एक महाकाय खडक! महाकाय म्हणजे किती मोठा असेल? तर फक्त ६६० फूट उंच! सपाट प्रदेशात अचानक हा महाकाय खडक उगवल्याने आश्चर्य चकित झाला असलात तर खरी चकित होण्याजोगी गोष्ट अजून पुढेच आहे. ह्या महाकाय खडकावर चक्क एक राजवाडा आहे. ह्या खडकाला आता राजवाडा म्हणावे की किल्ला असा प्रश्न पडतो! 

सिगिरिया 
📷स्नेहा टिळक

सिगिरिया 
📷wikimedia commons

सिगिरिया
 📷स्नेहा टिळक 

श्रीलंकेतील डम्बुला शहराजवळील सिगिरिया किंवा सिंहगिरी हे UNESCO ने विश्व वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. ह्या स्थानाला ऐतिहासिक, पौराणिक, सांस्कृतिक,धार्मिक आणि पुरातत्वशास्त्रीय देखील महत्व आहे. शिवाय हे नगर विकास रचनेचे एक उत्तम उदाहरण आहे. 


पुरात्तत्व संशोधकांना सापडलेल्या काही वस्तूंच्या पुराव्यानुसार सिगिरियात ५००० वर्षांपूर्वी सुद्धा मानवी वस्ती होती. काही लोक म्हणतात की सिगिरियाचा राजवाडा म्हणजेच रावणाची सोन्याची लंका! इथे सोन्याने बांधलेला राजवाडा होता. काहीजण म्हणतात की तो राजवाडा कुबेराने (धनदेवता) जो रावणाचा सावत्र भाऊ होता त्याने बांधलेला होता. 

काही जणांना वाटते की हा राजवाडा परग्रहावरील वासियांनी बांधलेला असणार अन्यथा ६६० फुटांवर कोणी मानव कसे काय बांधकाम करू शकेल?!

इतिहासतज्ञांच्या मते आणि श्रीलंकेत सापडलेल्या काही ऐतिहासिक वर्णनानुसार सिगिरिया ही राजा कश्यपाची राजधानी होती. राजा कश्यपाने, त्याच्या वडिलांना धातुसेन राजाला मारून सत्ता बळकावली. पण त्याला नेहमीच सिंहासनाचा खरा वारसदार असलेला त्याचा जो भाऊ होता, त्याची भीती वाटत राहिली. त्या भावाच्या आक्रमणापासून वाचण्यासाठी कश्यपाने ही सुरक्षित जागा आपल्या राजधानीसाठी निवडली. राजा कश्यपाच्या राजवटीत (४७७-४९५ CE) मध्ये ह्या किल्ल्यातील बरीचशी बांधकामे झाली. काहीजणांच्या मते हा राजा कश्यपाचा रंग महाल होता. 

राजा कश्यप अखेर त्या भावाबरोबर, मोग्गलनबरोबर झालेल्या लढाईत हरला व मृत्यू पावला. त्या नंतर राजधानी परत मूळ जागी म्हणजे अनुराधापूरला गेली आणि सिगिरियातील त्या खडकाच्या तळाशी असलेले राजवाडे बुद्ध भिक्षूंच्या विहारासाठी देण्यात आले. खडकावरील राजवाडा मात्र वापरला गेला नाही. त्या नंतर काही वर्षांनी बुद्ध भिक्षूंनी पण ही जागा सोडली आणि सिगिरिया अनेक वर्षे, अनेक शतके दुर्लक्षित राहिले, विस्मृतीत गेले. 

सिगिरिया किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूने पाणी भरलेला खंदक आहे. तो बघून कंबोडियातील अंगकोर ची आठवण होते. तिकीट खिडकी जवळ जल उद्याने आहेत. 



तिकीट खिडकी जवळील जल उद्यान 
📷स्नेहा टिळक


एल आणि यू आकाराची अनेक जल उद्याने आकर्षक भौमितिक रचना करून निर्माण केली आहेत. आहेत. तिथे चार गार्डन्स ऑफ पॅराडाईज आहेत. त्या आत्मा, हृदय, प्राण आणि सार ह्यांचे प्रतिनिधित्व करून आत्म्याचा प्रवास दाखवतात. 

खडक माथ्यावरून दिसणाऱ्या सिगिरिया च्या बागा.
📷स्नेहा टिळक

आणखी थोडे उंच चढून गेलं की येते तिसरे जल उद्यान, एका अष्टकोनी तळ्याच्या रूपात. 

अष्टकोनी तळे 
📷स्नेहा टिळक


आमच्या गाईडने आम्हाला सांगितले की त्या ६६० फूट उंच खडकाच्या माथ्यावर हायड्रॉलिक प्रणालीने खालून पाणी वाहून नेले जात असे. त्यातली काही कारंजी अजूनही चालतात असे तो म्हणाला, पण आम्हाला मात्र एकही चालू कारंजे बघायला मिळाले नाही. 

मोठाल्या खडकांच्या रचना असलेल्या, गुहा असलेल्या बोल्डर गार्डन्स देखील पाहायला मिळतात. 
 
खडकांचा बोगदा!
📷स्नेहा टिळक

तिथल्या काही विटांच्या भिंती आणि पायऱ्या १५०० वर्षे जुन्या आहेत हे कळल्यावर आश्चर्य वाटते. 

एका ब्रिटिश लेखकाने लिहून ठेवले आहे की त्या खडकाचा पृष्ठभाग चित्रांनी आभूषित केलेला होता. ४०० फूट लांब आणि १०० फूट उंच इतका भाग चित्रांनी भरलेला होता. किती सुंदर दिसेल हे दृश्य? ह्या विचाराने पण थक्क व्हायला होते. दुर्दैवाने आता मात्र अगदीच थोडी भित्तिचित्रे शिल्लक आहेत. ती पाहून आपल्याला अजिंठ्यातील भित्तिचित्रांची आठवण होते. 



चित्रसज्जा कडे जाणारा चक्राकार जिना 
📷स्नेहा टिळक



सुंदर भित्तिचित्रे 
📷स्नेहा टिळक



गाईडने आम्हाला सांगितले की ह्या भिंतीचा काही भाग गिलावा करून आणि घासून इतका गुळगुळीत केलेला होता, जणू आरसाच. त्यावर सूर्याचे किरण पडून परावर्तित व्हावे अशी योजना होती. 

सैनिक चौकी?
📷स्नेहा टिळक

नागफणा खडक 
📷स्नेहा टिळक
आता ज्या द्वारामुळे ह्या जागेला सिगिरिया- सिंहगिरी असे नाव मिळाले ते सिंहद्वार पाहू या. काही वर्षांपूर्वी पर्यंत सिंहाचे मस्तक देखील होते असे कळले. सध्या मात्र सिंहाचे पुढचे दोन पाय तेवढे दिसतात. 

सिंहद्वार 
📷स्नेहा टिळक

सिंहद्वारातून वर जाण्यासाठी जिना 
📷Commons Wikimedia

वयस्कर लोक, शारीरिक व्याधी असणारे आणि लहान मुले ह्यांनी जाण्याजोगे हे ठिकाण आहे असे मला वाटत नाही. ते कोणी बरोबर असतील तर खाली जल उद्यानाच्या तिथे ते थांबू शकतात. १५०० आणि त्याही कमी अधिक उंची रुंदीच्या पायऱ्या आहेत. कुठे नुसताच चढ आहे. रस्ता नक्कीच अवघड आहे. 


हा मार्ग नसे दुर्बलांसाठी! 
📷स्नेहा टिळक

वरपर्यंत जाणे अवघड असले तरी तिथे पोचल्यावर त्या सगळ्या कष्टांचे सार्थक होते. खडकमाथ्यावरुन दिसणारे भोवतालच्या परिसराचे सुंदर दृश्य, राजवाड्याचे अवशेष आणि पुरातन टेरेस गार्डन्स ह्या सगळ्याचा आनंद घ्यायचा असेल तर तेवढा त्रास घ्यायला काहीच हरकत नाही. 

पायात खाबड खुबड रस्त्याने चालायला आणि पायऱ्यांनी चढायला योग्य अशी पायताणे मात्र हवीत. सोबत पाणी न्यायचे मात्र विसरू नका. रस्त्यात किंवा वर खडक माथ्यावर काहीही मिळत नाही. 



आम्ही पोचलो! सिगिरियामधील सर्वात उंच जागा 


खडकमाथ्यावर पोचल्यावर मानवनिर्मित भले मोठे तळे दिसते, काही टेरेस गार्डन्स दिसतात, इमारतींची जोती/ पायाचे अवशेष दिसतात. इतक्या उंचावर पाणी कसे पोचवले असेल? विटा आणि अजस्त्र संगमरवरी शिळा ६६० फूट उंचीवर कशी पोचवली असतील? जर का आत्ता आहेत हे सगळे जिने तेव्हा नव्हते तर मग माणसे वर राजवाड्यात कशी जात असतील? आज खडकावर आडवे चर आणि खुणा दिसतात त्या खरेच ट्रॉली साठी किंवा लिफ्ट साठी तयार केलेल्या होत्या का? तेव्हा लिफ्ट्स खरेच असतील तर कोणता ऊर्जा स्रोत वापरात असतील? सैनिकी चौक्या असे ज्याला आज म्हटले जाते, ते उभे चर/ छोट्या गुफा इतक्या खड्या कातळावर कशा कोरल्या असतील? त्या खोदण्यामागे काय उद्देश असेल? 
हे सगळे प्रश्न आपल्याला पडत राहतात. ह्यात काहीच आश्चर्य नाही की स्वत:च एक आश्चर्य असलेले सिगिरिया हे श्रीलंकेतील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ बनले आहे! प्रत्येक हौशी प्रवाश्यासाठी नक्की 'एकदा तरी भेट द्यायलाच हवी' अशी जागा. 

राजवाडा - खडकावरला!
📷 Open source, Internet

असे कितीतरी प्रश्न आहेत ज्याची अजून उत्तरे मिळायची आहेत. ती उत्तरे सापडेपर्यंत सिगिरिया एक गूढच राहणार आहे. श्रीलंकेत म्हटले जाते की सिगिरिया हे जगातले आठवे आश्चर्य आहे, ते मात्र खरेच पटते. 

#MysteriousDestination #Vacation #PalaceOnRock

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

कोस्टल कर्नाटक- २ मंगळुरू, मुलकी, उचिल, उडुपी

  आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते.  नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते.  मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात.  काद्री मंजुनाथ मंदिर  का...