Skip to main content

मोहिनीराज - अद्वितीय अर्धनारीनटेश्वर मंदिर 

ह्या मंदिराला भेट देताना माझ्या मनात मोहिनीराज ह्या नावाविषयी कुतूहल होते. मोहिनी हे स्त्रीचे नाव आणि सहसा राज येते पुरुषांच्या नावाच्या पुढे. मग हे दोन शब्द एकत्र कसे आले? ह्याविषयी अपार कुतूहल मनात घेऊनच मी ह्या मंदिराला भेट दिली. मोहिनीराज मंदिर, महाराष्ट्र राज्यातील, अहमदनगर जिल्ह्यातील, नेवासा ह्या गावी आहे. 

मोहिनीराज मंदिर, नेवासा 

संत ज्ञानेश्वरांनी लहिलेल्या ज्ञानेश्वरी ह्या ग्रंथात नेवाश्याचा उल्लेख आढळतो. हा ग्रंथ म्हणजे तेराव्या शतकात लिहिली गेलेली श्रीमद्भगवत गीतेवरील भावार्थ रचना आहे. हा ग्रंथ केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरातील मराठी भाषिकांसाठी सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा मानला जातो.

ज्ञानेश्वरीत म्हटले आहे, " त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवनसूत्र श्रीमहालया असे. " ह्याचा अर्थ असा की श्रीमहालया क्षेत्राच्या भोवतीचा पाच कोसांचा भाग हा त्रिभुवनात पवित्र असून, हे क्षेत्र म्हणजे जणू जगाचे जीवनसूत्रच आहे. ज्ञानेश्वरी ह्याच परिसरात लिहिली गेली. 

ज्ञानेश्वरीतील नेवासा ह्या गावाचा उल्लेख 

प्राचीन काळी नेवासा ह्या गावाचे नाव निधीनिवास, श्रीमहालया असे होते. ह्या गावाच्या अनेक प्राचीन ग्रंथात असलेल्या उल्लेखामुळे, पुरातत्व शास्त्राच्या अभ्यासकांची उत्सुकता जागृत झाली. त्यांनी ह्या भागात उत्खनन करायचे ठरवले. उत्खनन मोहीम यशस्वी झाली आणि नेवासा क्षेत्रात मध्य पाषाणयुगातील अनेक हत्यारे सापडली. ह्या संबंधीचे शोध निबंध प्रसिद्ध झालेले आहेत. आपण आंतरजालावर देखील वाचू शकतो. 

ह्या मंदिरासंबंधीची कथा जरी पुरातन असली तरी मंदिर मात्र नवे आहे. किती नवे? तर हे मंदिर १७७३ मध्ये बांधले गेले असा उल्लेख सापडतो, म्हणजे अवघ्या २५० वर्षे वयाचे हे मंदिर आहे! 

समुद्र मंथनाच्या वेळी मंथनातून जेव्हा अमृत आणि सुरा - दारु निघाली तेव्हा त्याची वाटणी कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा सगळे अमृत देवांच्या वाट्याला येऊन ते अमर व्हावेत आणि दानवांच्या वाट्याला फक्त दारू जावी ह्यासाठी मोहिनीरूप घेतले गेले. मोहिनी म्हणजे जिचा मोह पडेल, भुरळ पडेल अशी सुंदर स्त्री. मोहिनीने हे वाटपाचे काम चोखपणे बजावले. देवांच्या वाट्याला अमृत आले आणि दानवांच्या मद्य. 

ह्या मंदिरातील मूर्ती अर्धनारीनटेश्वराच्या रूपात आहे म्हणजे विष्णू आणि मोहिनी एकाच मूर्तीत आहेत. मूर्तीचा उजवा भाग विष्णुरूपातील तर डावा भाग मोहिनी रूपातील आहे. म्हणूनच ह्या मंदिराचे नाव मोहिनीराज मंदिर- मोहिनी आणि विष्णू मंदिर. असे म्हटले जाते की ह्या प्रकारची अर्धनारीनटेश्वराची मूर्ती असणारे हे एकमेव मंदिर आहे. 



मोहिनीराज 

शिव पार्वती दोघे एका मूर्तीत, अर्धनारीनटेश्वराच्या रूपात अनेक ठिकाणी बघायला मिळतात. पण विष्णू आणि मोहिनी असे बघायला मिळणे ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. 


मोहिनीराज मंदिर गर्भगृह 

मोहिनीराजाची डावीकडची लहान मूर्ती, जिच्यावर अभिषेक होतो अशी पंचधातूची मूर्ती आहे. उजवीकडची तिसरी मूर्ती लक्ष्मीची आहे. अर्धनारीनटेश्वराचे मंदिर असल्याने पूजा विधीच्या वेळी भक्त देवाला साडी, खण आणि धोतर असे सगळे अर्पण करतात. 

तेराव्या शतकात यादव राजवटीत प्रचलित असणाऱ्या हेमाडपंती वास्तुशैलीत हे सुंदर मंदिर बांधले गेलेले आहे. ह्या वास्तुशैलीला हेमाद्री/हेमाडपंतांचे म्हणजे यादव राजांच्या मुख्य प्रधानाचे नाव दिले गेलेले आहे. पण आता ज्या ज्या भागात नव्याने दुरुस्त्या झाल्या आहेत तिथे ही शैली कदाचित दिसणार नाही. 
 
मोहिनीराज मंदिर, प्रवेशद्वार 

प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपालांच्या सुंदर मूर्ती आहेत. ह्या मूर्तींचे वैशिष्ट्य असे की त्यांच्या हातात शस्त्रे तर आहेतच, पण एकेक पक्षी देखील आहे. 

मंदिरातील कोरीवकामात अनेक सुंदर रचना दिसून येतात. चित्तवेधक भाग असा की अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या रचना इथे आढळतात. 

दर्शनी भागावरील सुंदर रचना 

कमळे, फुलांच्या आणि पानांच्या वेळी, हत्ती अशा अनेक रचना दर्शनी भागावर कोरलेल्या आढळतात. सज्जाच्या वरच्या भागात आपल्याला पानांचे तोरण असल्यासारखी रचना दिसते. 

मुख्य प्रवेशद्वार 

मुख्य प्रवेशद्वार धातूचे बनवलेले आहे. त्याच्या लगत दगडी भागात आल्याला साखळी आणि घंटा, वेली, वर्तुळातील फुले अशा विविध रचना आढळतात. ह्या छायाचित्रात द्वारपालाच्या हातातील पक्षी जवळून दिसतो आहे. बहुतेक हंस असावा. 

ह्या दारापर्यंत पोचण्यासाठी तीनचार पायऱ्या चढायला लागतात. दारातून मग दुसरा जिना सुरु होतो. त्याची पहिली पायरी खूपच उंच आहे. 
 

कोरीवकामातील विविध रचना 

बाहेरच्या वेगळ्या बाजूने काढलेले छायाचित्र 

हे बाहेरील भागाचे अजून एक छायाचित्र. ह्यात वर मागच्या बाजूला तुम्हाला एक पांढरे गोलाकार बांधकाम दिसेल. तो मंदिराच्या सभागृहाच्या छताचा भाग आहे. खरे तर हेमाडपंती शैलीत नेहमी हे देखील उंच शिखर असते किंवा जिथे असा गोलाकार आहे तिथे त्यावर देखील मुख्य शिखराप्रमाणेच कोरीवकाम केलेलं असते. पण इथे मोहिनीराज मंदिरात त्या गोलाकार भागावर बाहेरच्या बाजूने कोरीवकाम केलेले नाही. केवळ एक छोटेसे शिखर आहे. कदाचित सभागृहावरील मूळ कळस काही ज्ञात अज्ञात कारणांमुळे नष्ट झाला असेल आणि मग हेमाडपंती शैलीपेक्षा वेगळे असे हे बांधकाम केले असेल. 

सज्जा 

गर्भगृहाच्या/ गाभाऱ्याच्या शिखरावर म्हणजेच मंदिराच्या मुख्य शिखरावर खिडकीसारखा चित्तवेधक सज्जा दिसतो. पूर्वी कदाचित येथे देखील सुंदर मूर्ती असतील. 

आपण मंदिरात प्रवेश करताच समोर सभागृह येते ते आडव्या चौरस आकाराचे आणि गाभारा आपल्या डावीकडे दिसतो. हे नेहमीपेक्षा वेगळे आहे. सहसा आपण मंदिरात प्रवेश गेल्यावर उभट चौरसाच्या आकाराचे सभागृह दिसते आणि मग तिथून समोरच गाभारा दिसतो. 

त्यामुळे मग वाटले की कदाचित पूर्वी सध्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजवीकडे मुख्य दरवाजा असणार. सध्या मात्र तिथे भिंत घालून तो बंद करण्यात आला आहे. त्या बाजूने प्रवेश केला तर आपल्यासमोर उभ्या चौरस आकारातील सभागृह येईल आणि मग गाभारा समोरच दिसेल. मोहिनीराज देवस्थानात नेहमी जाणाऱ्या भक्तांकडे चौकशी केल्यावर कळले की खरेच काही दशकांपूर्वी म्हणजे साठ सत्तर वर्षांपूर्वी पश्चिमेकडूनच मुख्य दरवाजा होता!

मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला सुंदर कोरीवकाम केलेले सभागृह दिसते. छतावर रासक्रीडेत नाचणाऱ्या गोपी आणि कृष्णाच्या आकृती कोरलेल्या दिसतात. अतिशय प्रमाणबद्ध मानवी शरीराचा नमुनाच तिथे पाहायला मिळतो. 


सभागृहाचे छत 


कोरीवकाम 


साखळीला अडकवलेल्या घंटा, कमल पुष्पे, पाने अशा सुंदर रचना कोरीवकामात वापरलेल्या आढळतात. खांबांच्या अगदी वर छत तोलून धरणाऱ्या यक्षांच्या आकृती आहेत. बहुतेक यक्षच असावेत. मंदिरातील खांबात आकारांचे आणि रचनांचे विविध प्रकार हाताळलेले दिसतात. 

हे मंदिर शहराच्या मध्येच आहे. चहुबाजूने नागरी वस्ती आणि धावते रस्ते. गाडीबरोबर काढलेल्या ह्या फोटोमुळे तुमच्या लक्षात येईल की मंदिर किती उंच आहे! जवळपास ७५ फूट उंचीचे हे मंदिर आहे. माघ महिन्यात इथे मोठा उत्सव आणि जत्रा असते.

 

मोहिनीराज मंदिर, नेवासा

एकाच मूर्तीत विष्णू आणि मोहिनी रूप असणारे असे हे अद्वितीय मोहिनीराज मंदिर. आपल्याला मातृका माहिती आहेत. त्यात देखील वैष्णवी असते. वैष्णवी म्हणजे विष्णूची सर्व आयुधे धारण करणारी देवी. वैष्णवी रूपातील मूर्ती आपल्याला अनेक ठिकाणी दिसतात. पण असे अर्धे पुरुष आणि अर्धी स्त्री असा देह असणारे विष्णूमोहिनीचे हे एकमेव मोहिनीराज मंदिर. 

मोहिनीराजाच्या ह्या रूपातून आपल्याला विश्वातील स्त्रीपुरुष परस्परपूरकता, एकता आणि समानतेचा संदेश मिळतो.

Comments

  1. नेवाशाला खांब्याचे मंदिर आहे एवढेच माहीत होते 🙏मोहिनीराज मंदिर माहित नव्हते 👍👍

    ReplyDelete
    Replies
    1. हो!! लहानसे पण सुंदर आहे मंदिर. बऱ्याच जणांचे कुलदैवत आहे.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...

शिवथरघळ

जर आपण भारताचा नकाशा पाहिला  तर आपल्याला नकाशात डावीकडे, गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत काळसर  हिरवी रेषा दिसते. ही रेषा  गुजराथ येथून सुरु होते  आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू मार्गे जाऊन केरळला पोहोचते. ती रेषा म्हणजेच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट म्हणजे दख्खनच्या पठाराची जणू किनारच आहे. दख्खन पठाराच्या काठावरच्या ह्या पर्वत रांगा आहेत.  या भागात बरीच जंगले, जलसाठे, धबधबे आहेत आणि जैवविविधता तसेच त्याचे वय यामुळे या भागाला 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून ओळखले गेले आहे. पश्चिम घाट हिमालयापेक्षाही जुना आहे! वरंधा घाट  📷विकिमीडिया कॉमन्स  पश्चिम घाट हा अनेक मुख्य नद्यांचे उगमस्थान आहे. वरील छायाचित्रात दिसते आहे त्या प्रमाणे, वर्षा ऋतूत या प्रदेशात अनेक धबधबे पाहायला मिळतात.  पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) अनेक सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे शिवथरघळ धबधबा. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण रौद्र सौंदर्यानिशी आणि ताकदीनिशी रोरावत खाली येताना दिसतो.  हा धबधबा सुमारे शंभर फूट उंचीवर...