Skip to main content

Hangzhou - चीनमधील नंदनवन - भाग २

आता आपण भेट देणार आहोत Lingyin मंदिराच्या निसर्गरम्य भागाला. वेस्ट लेक मधील सर्वोत्तम सुंदर स्थळांपैकी एक असा हा भाग आहे. कडक ऊन असलेल्या एका दुपारी आम्ही इथे गेलो होतो. मात्र इकडे गेल्यावर ऊन अजिबात जाणवले नाही. शतकांपासून तिथे उभे असलेले मोठे मोठे वृक्ष आणि डोंगर उतारावरून झुळझुळ वाहणारे झरे ह्यामुळे वातावरण अगदी प्रसन्न होते. 

Lingyin मंदिराच्या परिसरात जाताच, आपण ह्या परिसराच्या प्रेमातच पडतो. अगदी प्रथम दर्शनी प्रेम म्हणतात तसेच काहीसे! त्या परिसरातील निर्मल शांतता तुम्हाला काही पावलातच काही शतके मागे घेऊन जाते. उगीच नाही ह्या मंदिराला 'temple of the soul's retreat' म्हटले जात!!.

बौद्ध धर्मातील चान पंथाचा हा मठ आहे. चीनमधील जवळपास सर्वात मोठा मठ म्हणा ना. जेव्हा सांस्कृतिक क्रांतीच्या नावाने रेड आर्मी, देशातील इतिहास आणि संस्कृतीच्या सगळ्या खुणा नष्ट करत होती, तेव्हा देखील हे ठिकाण अगदी थोड्या विध्वंसावर बचावले. कोणा उच्च पदस्थ भक्तामुळे हे शक्य झाले असे म्हणतात. 

 हुई ली (Hui Li ) नावाच्या एका भारतीय भिक्षूने चौथ्या शतकात ह्या मठाची स्थापना केली. अर्थात हुई ली हे त्याने चीनमध्ये धारण केलेले नाव होते. त्याचे मूळ भारतीय नाव होते मतियुक्ती. ( संदर्भ - १. Himalaya Calling - The Origins of China and India- Chung Tan. Chung Tan हे एक विद्वान लेखक, इतिहास अभ्यासक आहेत. चीनचा इतिहास आणि भारत चीन संबंध ह्या विषयात त्यांचा विशेष अभ्यास आहे. २०१० मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते. २. शोधगंगा-Shodhganga ) 

जेव्हा मतियुक्ती ह्या सुंदर ठिकाणी आले, तेव्हा त्यांना बाकी पर्वत शिखरांपेक्षा अगदी वेगळे दिसणारे एक शिखर दिसले. चुनखडीच्या दगडाचे. त्यांना खूप आनंद झाला आणि आश्चर्य देखील वाटले. ते शिखर त्यांच्या मातृभूमीतील, भारतातील एका शिखरासारखे दिसत होते. मध्य भारतातील गृध्रकूट शिखरासारखे दिसले. गृध्रकूट ह्या शिखराचा उल्लेख बौद्ध साहित्यात खूपदा केला गेलेला आढळतो. भारतातील, बिहार मधील राजगीर येथे हे शिखर आहे. मग त्या जागेचे नाव पडले Feilai Feng- भारतातून उडून आलेले शिखर! 

हा मठ दोन डोंगरांच्या मध्ये वसलेला आहे. ७० हुन अधिक गुंफा आणि लेणी ह्या परिसरात आहेत. शेकडो बुद्ध मूर्ती तिथे बघायला मिळतात. ह्या परिसरात शिरताच डाव्या हाताला तुम्हाला एक दगडी पॅगोडा दिसेल, साधारण ८ मीटर उंचीचा ह्या षट्कोनी पॅगोडाचे सात थर आहेत, ज्यावर काही बुद्ध वचने आणि आकृती कोरलेल्या आहेत. भारतीय भिक्षु Hui Li/ मतियुक्ती ह्यांच्या स्मरणार्थ हा पॅगोडा बांधला गेला आहे. ह्याला Ling Jiu पॅगोडा असेही म्हटले जाते. इथे त्यांची राख पुरलेली आहे. चौथ्या शतकात बांधल्या गेलेल्या ह्या पॅगोडाचे ९७५ मध्ये आणि परत १५९० मध्ये नूतनीकरण करण्यात आले. 

Li Hui/ Matiyukti Pagoda

पॅगोडाच्या जवळच मागच्या खडकावर आपल्याला संस्कृत अक्षरे कोरलेली दिसतात. ओम माणिपद्मे हं! बौद्ध जप मंत्र आहे हा. अनेक शतके जुनी संस्कृत अक्षरे अचानक चीन मध्ये पाहताना खूपच रोमांचक वाटते!

Om Mani Padme Ham - Sanskrit inscription 

ह्या गुंफातून अनेक शतके वेगवेगळ्या वेळी अनेक बुद्ध मूर्ती कोरल्या गेल्या. आपल्याला पाहताना त्यामुळे कोरीवकामाची वेगवेगळी शैली लक्षात येते. 

The different Hast mudras- Hand gestures of Buddha.

 Li gong गुहा - जिला व्याघ्र गुंफा असे सुद्धा म्हणले जाते. तिचे प्रवेशद्वार कोणाला वाघाच्या जबड्यासारखे वाटले म्हणून. दहाव्या शतकातील सुमारे १७८ बुद्ध मूर्ती इथे आहेत. काही ठिकाणी काही अक्षरे पण कोरलेली आहेत.

Tiger cave

18 Arhats Staues

हे Huayan हुन किंवा पश्चिमेकडून आलेल्या तीन संतांचे पुतळे आहेत. पण प्राचीन चिनी साहित्यात जेव्हा पश्चिमेकडून म्हणले जाते तेव्हा ते म्हणजे भारतातून असे असते. मग हे साधू देखील भारतीय साधू असतील का? नक्की माहिती नाही, पण बहुतेक भारतीय साधूच असतील.

Three Saint Statue With inscription
ह्या डोंगरात अनेक गुंफा आढळतात. 
 
Inside the cave.

Amitabh buddha

See the plates on his clothing

 Guanyin गुंफेमध्ये वर एका कोपऱ्यात दगडाच्या दोन थरात छोटी फट आहे. तिथून नैसर्गिक सूर्यप्रकाश दिसतो. हा जणू आकाशाला जोडणारा चंदेरी धागाच. ह्या गुहेच्या नावाचा अर्थ आहे स्वर्गाकडे जाणारी गुंफा. 

Silver thread of sky

दुसऱ्या एका गुंफेत काही गोष्टी चित्रित केलेल्या आहेत. त्यातील एक गोष्ट आहे पहिल्या शतकातील. भारतीय भिक्षु मातंग आणि धर्मरत्न पांढऱ्या घोड्यावर अनेक बौद्ध धर्मग्रंथ घेऊन येत आहेत अशी. 

दुसरी गोष्ट चित्रित केलेली आहे ती Zhu Shixing ह्या चिनी भिक्षूची. धर्माच्या अभ्यासासाठी पश्चिमेकडे प्रवास करणारा पहिला भिक्षु असे त्याला म्हटले जाते. संस्कृतातील अनेक बौद्ध सूत्रे त्याने उतरवून घेतली. 

ह्या दोन्हीचे फोटो मात्र नाहीत माझ्याकडे. 

सर्वात मोठी मूर्ती आहे ती मैत्रेय बुद्धाची.. त्याला Fat belly Buddha किंवा Laughing Buddha असे देखील म्हटले जाते. त्याच्या सोबत १८ अरहत आहेत. 

Maitreya Buddha

Steps going to some more caves

मंदिराकडे जाण्याच्या रस्त्यावर, डावीकडे तुम्हाला काही झरे दिसतील. पाणी अगदी नितळ आहे. त्या झऱ्यांचा ताजेपणा, गारवा, वाहणाऱ्या पाण्याचा मंद आवाज ह्यामुळे Lingyin मंदिर परिसराचे सौंदर्य आणखीनच खुलले आहे.
 
Pavilion for enjoying the springs

 अगदी प्राचीन काळापासूनच Ling Yin मंदिर हे चीनमधील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत मंदिरामध्ये अग्रभागी आहे. अनेक मोठाली सभागृहे, पॅगोडाज, वाचनालय असे आपल्याला ह्या आवारात आढळते. हजारो बौद्ध भिक्षूंनी इथे राहून बुद्ध सूत्रांचा अभ्यास केलेला आहे आणि करत आहेत. सांस्कृतिक क्रांतीच्या काळात देशभरातील बौद्ध भिक्षूंचे हे आश्रयस्थान बनले होते. 

बौद्ध मंदिरात प्रवेश करताच तुम्हाला अशी सुंदर मोठी पात्रे दिसतात. तिथे उदबत्त्यांचे जुडगेच जाळले जातात. भक्तांची अशी समजूत आहे की हा धूर आपले शरीर स्वच्छ करतो आणि आरोग्यदायी आहे.


Large incense Burners

मंदिराच्या आवारात दोन स्तंभ आहेत. ह्यांना सूत्र स्तंभ असे म्हणले जाते कारण ह्यावर धर्म सूत्रे लिहिलेली असतात. हे अष्टकोनी आहेत, दोन थरांचा पायाचा भाग आहे. ह्या स्तंभांचे एकूण तीन भाग असतात. पाया, स्तंभ आणि शिखर. विशेष गोष्ट म्हणजे हे स्तंभ उभारले गेले ते Fengxian मंदिरात ९६९ मध्ये. कालांतराने ते मंदिर पडले. मग हे स्तंभ इथे आणण्यात आले.

Sutra Pillar 

Burning Of incense sticks- an important ritual 

पूर्वी मंदिराच्या आवारात चार दगडी पॅगोडा होते. आता मात्र त्यातील दोनच उरले आहेत. ९६० मध्ये उभारले गेलेले हे पॅगोडाज चीन मधील सर्वात जुने दगडी पॅगोडाज मानले जातात. 

Ancient Stone Pagodas

In front of the temple halls

Hall of medicine Buddha


Decorated wall

Buddha idols 

Hui Li/ Matiyukti?? well..may be! I can't read Chinese script

Snowball flowers

ह्या सोबतच West Lake- Hangzhou पोस्ट पूर्ण करते. West lake च्या बांधावरून रमत गमत फिरणे किंवा Lingyin मंदिरात ऊन सावलीचा खेळ पाहत झाडाच्या सावलीत बसून झऱ्यांचे मंद संगीत ऐकणे हे अविस्मरणीय अनुभव आहेत.

 ह्या परिसराचे नैसर्गिक सौंदर्य शरीर, मन आणि आत्म्याला भावणारे असेच आहे. तेव्हा कबुल करावेच लागते की खरोखरच हे नंदनवन आहे!!

#wealthiestBuddhistMonasteryChina #IndianMonkInChina #AroundLingyin #ParadiseInChina #HuiLiMatiyukti  #WestLakeHangzhou  #LingyinTempleScenicArea  #FeilaiFengPeakGrottoescaves
#SuHang

Comments

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 4 - स्यालमी - बनियाकुंड

आदल्या संध्याकाळी भुरभुरत असलेल्या पावसाने हवेतला गारवा अजूनच वाढवला होता. इतक्या लहान तंबूमध्ये झोपण्याची पहिलीच वेळ होती. पण सुरुवातीचे दोन तास सोडले तर नंतरचे पाच तास चांगली झोप झाली. अगदी प्रसन्न जाग आली.काल एकदाच क्षणभर का होईना, मनात तरळून गेलेला,"आपण ट्रेक इथेच थांबवावा का?"ह्या विचाराचा आज कुठे मागमूसही उरला नव्हता. मनात होते,  "इरादे अगर पक्के हो, तो डगमगाए कदम क्यु? हौसले बुलंद हो तो सहमा सा हो मन क्यु? मंज़िल अब दूर नहीं.. बस संभल के चलना, कभी न रुकना, हार ना मानना, बस्स .. चलते रहना।" - वृंदा टिळक आमच्या सगळ्याच कॅम्पसाईट्स भन्नाट जागांवर होत्या. आजची स्यालमीची कॅम्प साईट देखील त्याला अपवाद नव्हती. नजर पोचेल तिथपर्यंत फक्त पर्वत रांगा आणि जंगल. मानवी वस्तीची जवळपास काहीच चाहूल नाही.  📷Samrat Darda  सगळ्यांचे आवरून वॉर्म अप करून आम्ही निघालो. आजचा सगळा रस्ता सुंदर असणार होता. काल इतके चढ उतार चढून उतरून आता सगळ्यांची चांगली तयारी झाली होती. शिवाय आज मी नीकॅप्स देखील घातल्या होत्या!! त्यामुळे समजा जरी आज रस्ता अवघड असला असता तरी काळजीचे काही कारण नव्हते....

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 3 - देवरियाताल -स्यालमी

ट्रेकचा तिसरा दिवस. कालचा सारी- देवरियाताल प्रवास तर खूपच छान झाला होता. पायही दुखले नव्हते की थकल्यासारखे देखील वाटले नव्हते. त्यामुळे उत्साहाने आजच्या दिवसाला सुरुवात केली. आजचा दिवस तसा अवघड असेल अशी, इंडियाहाईक्सच्या  वेब साईटवरचे वर्णन वाचून कल्पना आली होती. आज अंतर नऊ किलोमीटरपेक्षा जास्त होते. पण वाटेत अनेक शिखरे दिसणार होती. घनदाट जंगलातून जाणार होतो त्यामुळे अनेक पक्षीही दिसणार होते. त्याचीही उत्सुकता होती. सगळेजण देवरियाताल कॅम्पसाईट मधून बाहेर पडलो. अवघे एक दिवस वास्तव्य केलेले असले तरी मन थोडेतरी गुंतलेले असतेच.  देवरियातालच्या रस्त्याच्या डाव्या बाजूने एक जंगलवाटेचा फाटा होता. त्या वाटेने आम्ही निघालो. थोडा वेळ चालल्यावर आम्हाला पुन्हा एकदा चंद्रशिला शिखर दिसणार होते. अधून मधून दिसणारे हे शिखर आपल्याला कुठे पोचायचे आहे त्याची जाणीव करून द्यायचे, त्यानेही एक नवे बळ मिळायचे. पण आज आकाश इतके ढगाळ होते की शिखर दिसलेच नाही.उजवीकडे पुन्हा एकदा सारी गाव मात्र दिसले. 📷Cotrekker 📷Sumati Dhembre ह्या फोटोवरून कशा रस्त्याने आम्ही चालत होतो, चढ किती होता त्याची कल्पना येईल....

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 5- अंतिम भाग - बनियाकुंड- तुंगनाथ- चंद्रशिला

  📷Samrat Darda १५ एप्रिल, बनियाकुंड कॅम्पसाईट मधून काढलेला चंद्राचा सुंदर फोटो. त्या दिवशी शुक्ल पक्षातील सप्तमी किंवा अष्टमी असावी. कारण १७ एप्रिलला रामनवमी होती. सुंदर काळ्याभोर रात्रीचा सघन अंधार.. पौर्णिमा अजून साताठ दिवसांवर असली तरीही आत्तापासूनच तेजाळलेला चंद्र.. चमचमणारे, मध्येच ढगांच्या आड लपणारे चांदणे, आमच्या मनातील समिटविषयीची उत्सुकता..फार अनोखी रात्र होती ती.  उद्या पहाटे दोन वाजताचा वेकप कॉल असणार होता. आम्हाला आवरून, ब्रेकफास्ट करून तीन वाजता निघायचे होते. न विसरता घेण्याच्या गोष्टी तशा तर डे पॅक मध्ये भरूनच ठेवल्या होत्या. हेडलॅम्पच्या उजेडात सामान देखील आवरून ठेवले होते. पहाटे निघताना बाकी सामान मेन टेन्ट मध्ये नेऊन ठेवायचे होते.  इतक्या उंचीवर जायचे होते. काही तासांत आम्ही ४००० फुटांचा अल्टीट्युड गेन करणार होतो. झोपण्यासाठी डोळे मिटले खरे, पण मिटल्या डोळ्यांपुढेही बर्फाच्छादित शिखरांचीच दृश्ये तरळत होती. कधीतरी झोप लागली. सतत अधूनमधून जाग येऊन घड्याळात बघत होते. सगळे दोन वाजता उठणार, त्या आधी आपण आपले आवरून घेऊ या असा विचार डोक्यात होता तो बहुधा सतत ज...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...