Skip to main content

क्रांतीतीर्थ- श्यामजी कृष्ण वर्मा स्मारक- मांडवी

 मानवी इतिहासाच्या विशाल ग्रंथात, भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातल्या अनेक देशभक्तांच्या क्रांतीगाथांची वर्णने म्हणजे पुन्हा पुन्हा वाचावे, चिंतन मनन करावे असे अध्याय बनले आहेत. काही क्रांतिवीरांनी देशात राहून काम केले तर काहींनी देशाच्या बाहेर राहून देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. 

असेच एक महान क्रांतिकारक म्हणजे श्यामजी कृष्ण वर्मा. त्यांचा जन्म दिनांक ४ ऑक्टोबर १८५७ ला गुजरातच्या कच्छ मधल्या मांडवी गावात झाला. 

क्रांतिद्रष्टा श्यामजी कृष्ण वर्मा 
अगदी लहानपणीच त्यांच्या आई-वडिलांचा स्वर्गवास झाला. अत्यंत कुशाग्र बुद्धीच्या श्यामजींचे शिक्षण त्यांचे ज्येष्ठ स्नेही मथुरा दास यांच्या मदतीने झाले. एक विद्वान इंग्रज मोनियर विल्यम्स हे संस्कृत इंग्रजी शब्दकोश तयार करण्यासाठी प्राच्य आणि पाश्चात्य भाषांमध्ये काम करत होते. श्यामजी कृष्ण वर्मांचे भाषा कौशल्य पाहून ते आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी श्यामजींना आपले सहाय्यक बनावे असे सुचवले. परंतु त्याआधीच स्वामी दयानंद सरस्वती ह्यांच्यापासून प्रेरणा घेऊन श्यामजींनी वैदिक धर्म आणि दर्शनाच्या प्रचारासाठी काम करण्याचे ठरवले होते. 

१८७९मध्ये श्यामजी उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. तेव्हा त्यांची भेट मौनियर विल्यम्स आणि इतर भारतीय नेत्यांशी, शिक्षण तज्ञांशी झाली. हे सर्वजण भारतातील ब्रिटिश राजवटीमध्ये सुधारणांसाठी मागणी करत होते. 

लंडनमध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण करून जानेवारी १८८५ मध्ये श्यामजी भारतात परत आले. त्यांनी रतलाम, उदयपू,र जुनागड रियासतीचे दिवाण म्हणून काम केले. हे काम करत असताना त्यांना इंग्रजांची कुटील नीती, षडयंत्र आणि अत्याचारांची चांगलेच ओळख झाली. संपूर्ण जगात आपला न्याय व उदारमतवाद ह्यांचा ढोल वाजवणारे इंग्रज लोक प्रत्यक्षात अन्यायी आणि हुकूमशहा होते. 

 जेव्हा चापेकर बंधूंनी इंग्रज सरकारला स्वातंत्र्यसंग्रामाची एक चुणूक दाखवली. तेव्हा जसे लोकमान्य टिळकांनी त्यांचे कौतुक केले तसेच श्यामची कृष्ण वर्मांनी देखील त्यांचे कौतुक केले. ते इंग्रजांना विरोध करू लागताच इंग्रजांनी त्यांच्यावर अंकुश आणायला सुरुवात केली. श्यामजींनी लोकमान्य टिळकांशी विचार विमर्श करून दुष्मनांच्या घरात जाऊनच त्यांच्यावर वार करण्याचे ठरवले. १८९७ मध्ये ते भारत सोडून लंडनला गेले. 

१ जुलै १९०५ ला श्यामजींनी इंडिया हाऊसची स्थापना केली. इंडिया हाऊस हे भारतीय स्वतंत्रता संग्रामातील लंडनमध्ये असलेले मुख्यालय बनले. इथे नेहमीच देशभक्त जमत असत. 

ब्रिटिश सरकारला भारतात ब्रिटिश राजनिष्ठ भारतीय अधिकारी कसे मिळतात? तर ब्रिटनमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांमधूनच हे अधिकारी निर्माण होतात! त्यामुळे जर का ह्या विद्यार्थ्यांना देशसेवेसाठी तयार केले तर ब्रिटिश सरकारला मोठा झटका बसेल. श्यामजी कृष्ण वर्मांनी आपले तन, मन आणि धन देशाच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण करण्याचा संकल्प घेतला होता. 

 श्यामजी कृष्ण वर्मा आणि सरदार सिंह राव राणा या दोघांनी मिळून भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली. लोकमान्य टिळक त्यांच्याकडे योग्य छात्र पाठवत असत. लवकरच त्यांनी क्रॉमवेल रोडवर एक इमारत विकत घेतली व इंडिया हाऊस ची स्थापना केली. तिथे 25 विद्यार्थी आरामात राहू शकत. इथे एक मोठा हॉल देखील होता. त्यामुळे लंडनमध्ये राहणारे अनेक भारतीय विद्यार्थी तिथे सभांना येत असत. 

 लोकमान्य टिळकांनी सुचवलेले अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती घेऊन इंडिया हाऊस मध्ये राहत होते. लाला हरदयाल, वीरेंद्र नाथ चट्टोपाध्याय, विनायक दामोदर सावरकर, मदनलाल धिंग्रा हे इंडिया हाऊसमध्ये राहणारे प्रमुख विद्यार्थी होते. तिथे ‘इंडियन सोशलॉजिस्ट’ नावाची एक मासिक पत्रिका प्रकाशित व्हायला सुरुवात झाली. इथेच ‘इंडियन होमरूल सोसायटीची’ परिकल्पना तयार झाली. मॅडम भिकाजी कामा यादेखील श्यामजी कृष्ण वर्मांच्या सोबत स्वातंत्र्यासाठी काम करत होत्या. तिथेच राहून सावरकरांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्य समर’ हा ग्रंथ तयार केला.

ब्रिटिश सरकारची वक्रदृष्टी श्यामजींवर होतीच. आपल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून श्यामजी लंडन सोडून पॅरिसला गेले. जाताना त्यांनी सावरकरांवर इंडिया हाऊसची जबाबदारी सोपवली. सावरकरांनी इंडिया हाऊसला भारतीय क्रांतीचे केंद्र तर बनवलेच पण कोणत्याही कायदेशीर बाबीत इंडिया हाऊस अडकणार नाही याचीही खबरदारी घेतली!

कर्जन वायलीच्या हत्येची योजना ह्याच इंडिया हाऊस मध्ये तयार झाली.

श्यामजींनी भारतात आणि भारताच्या बाहेर राहून भारताच्या स्वतंत्रता संग्रामात महान कार्य केले. युरोपमध्ये अनेक जणांना भेटून भारताची परिस्थिती, स्वातंत्र्याची आवश्यकता त्यांनी समजावून सांगितली. क्रांतिकारकांना शक्य ती सर्व मदत ते तिकडून करत होते. पॅरिस नंतर श्यामजी कृष्ण वर्मा स्वित्झर्लंड मध्ये जिनेव्हाला गेले. आपल्या अनेक प्रकाशनांद्वारे त्यांनी भारतीय क्रांतिकारकांची प्रशंसा करत त्यांची बाजू जगाला समजावून दिली. स्वित्झर्लंड मध्येही त्यांनी ‘द इंडियन सोशलॉजिस्ट’ या मासिकाचे प्रकाशन करायला सुरुवात केली आणि आपल्या लेखणीने स्वातंत्र्यसंग्रामाला तलवारीची धार प्राप्त करून दिली. सतत ब्रिटिशांचा ससेमिरा त्यांच्या मागे असूनही ते कधीच ब्रिटिशाना शरण गेले नाहीत.

अखेर ३० मार्च १९३०च्या रात्री त्यांनी जिनेव्हामध्ये अंतिम श्वास घेतला. जिनेव्हा सरकारने या विचारवंत क्रांतीकारकाचे विधीपूर्वक अंतिम संस्कार केले आणि त्यांच्या अस्थी सांभाळून ठेवल्या. 

श्यामजींनी म्हटले होते, “माझ्या अस्थी भारतात तेव्हाच नेल्या जाव्यात जेव्हा इंग्रजांच्या गुलामीतून भारत स्वतंत्र झालेला असेल.” आपण असे करंटे की स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही ५५ वर्षे त्यांच्या अस्थी जिनेव्हामध्येच राहिल्या. अखेर २००३ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्या अस्थी भारतात आणण्याची सर्व कार्यवाही पूर्ण करून अस्थी भारतात आणल्या. 

वीरांजली यात्रा 
आज मांडवी मध्ये त्यांचे स्मारक म्हणून एक भव्य सुंदर क्रांती तीर्थ निर्माण केले गेले आहे. 
क्रांतीतीर्थ 
क्रांतीतीर्थ 
क्रांतीतीर्थ 

क्रांतीतीर्थ मोठ्या दिमाखात महान क्रांतिकारक शामजी कृष्ण वर्मा यांना मानवंदना देत आहे. 

श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांच्या आयुष्याचे चित्रण असलेले अगदी सजीव वाटणारे पुतळे आपल्याला त्यांची जीवनगाथा सांगतात. आपल्यासोबत पूर्ण वेळ एक मार्गदर्शक असतो. 

इंडिया हाऊस प्रतिकृती व भानुमती आणि श्यामजी कृष्ण वर्मा पुतळे 
इंडिया हाऊस प्रतिकृती व भानुमती आणि श्यामजी कृष्ण वर्मा पुतळे 
इंडिया हाऊस प्रतिकृती व भानुमती आणि श्यामजी कृष्ण वर्मा पुतळे 
इंडिया हाऊस प्रतिकृती 
इंडिया हाऊस प्रतिकृती 

इंडिया हाऊस प्रतिकृती 

इंडिया हाऊस प्रतिकृती 

इंडिया हाऊस प्रतिकृती 

सुंदर परिसर 

इंडिया हाऊसची प्रतिकृती आहे. ज्यामध्ये भारतीय क्रांतीसंग्रामाचे वर्णन आहे. श्यामजी कृष्ण वर्मा व भानुमती वर्मा ह्यांचे अस्थिकलश आहेत. बाहेर क्रांतिकारकांच्या छायाचित्रांची व कार्याचे वर्णन करणारे फलक असलेली दीर्घिका आहे. 

क्रांतिकारक प्रतिमा 
क्रांतिकारक प्रतिमा 

क्रांतीतीर्थ 

स्वच्छता, सौंदर्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार ह्यामुळे हे प्रेरणादायी स्मारक अविस्मरणीय ठरले आहे.

भूजमध्ये आपण नारायण सरोवर मध्ये धार्मिक,अध्यात्मिक यात्रेसाठी जाल, रोड टू हेवनला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी फोटो हवेत म्हणून जाल.

पण मांडवीला क्रांतीतीर्थावर मात्र राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी किंवा जागृत ठेवण्यासाठी अवश्य जा.

 


Comments

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

महेश्वर

महेश्वर हे मध्यप्रदेश पर्यटन निगमच्या पर्यटन स्थळांमधले एक महत्वाचे नाव आहे. पण करोडो भारतीयांसाठी ते केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर एक तीर्थस्थान असते. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेले स्थान आहे.  महेश्वर किल्ला प्रवेशद्वार  राजवाडा प्रवेशद्वार  बाह्यरूप  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  राजवाडा प्रवेशद्वार  अहिल्याबाई होळकर हे केवळ भारताच्याच नव्हे तर विश्वाच्या इतिहासातील एक सोनेरी पान. संपूर्ण मानव विश्वातील यशस्वी स्त्री राज्यकर्त्यांची सूची करायची झाली तर अहिल्याबाई होळकरांचे नाव ठळकपणे लिहायला लागेल.   31 मे 2025 ला त्यांची तीनशेवी जयंती आहे. पण 300 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या अहिल्याबाईंचे आयुष्य अगदी आजच्या आधुनिक काळातल्या आव्हानातही मार्गदर्शक ठरावे असेच आहे.  त्यांच्याविषयीचा आदर मनात घेऊनच आपण महेश्वरला जातो आणि त्या भावनेच्या प्रकाशात महेश्वर पाहतो. महेश्वरला फार मोठी प्राचीन परंपरा आहे. स्कंद पुराणाच्या रेवा खंडात आणि वायू पुराणाच्या नर्मदा रहस्य मध्ये महिष्मती म्हणजे महेश्वरचे वर्णन आलेले आहे. 'गुप्...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...