मुख्य सामग्रीवर वगळा

क्रांतीतीर्थ- श्यामजी कृष्ण वर्मा स्मारक- मांडवी

 मानवी इतिहासाच्या विशाल ग्रंथात, भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातल्या अनेक देशभक्तांच्या क्रांतीगाथांची वर्णने म्हणजे पुन्हा पुन्हा वाचावे, चिंतन मनन करावे असे अध्याय बनले आहेत. काही क्रांतिवीरांनी देशात राहून काम केले तर काहींनी देशाच्या बाहेर राहून देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. 

असेच एक महान क्रांतिकारक म्हणजे श्यामजी कृष्ण वर्मा. त्यांचा जन्म दिनांक ४ ऑक्टोबर १८५७ ला गुजरातच्या कच्छ मधल्या मांडवी गावात झाला. 

क्रांतिद्रष्टा श्यामजी कृष्ण वर्मा 
अगदी लहानपणीच त्यांच्या आई-वडिलांचा स्वर्गवास झाला. अत्यंत कुशाग्र बुद्धीच्या श्यामजींचे शिक्षण त्यांचे ज्येष्ठ स्नेही मथुरा दास यांच्या मदतीने झाले. एक विद्वान इंग्रज मोनियर विल्यम्स हे संस्कृत इंग्रजी शब्दकोश तयार करण्यासाठी प्राच्य आणि पाश्चात्य भाषांमध्ये काम करत होते. श्यामजी कृष्ण वर्मांचे भाषा कौशल्य पाहून ते आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी श्यामजींना आपले सहाय्यक बनावे असे सुचवले. परंतु त्याआधीच स्वामी दयानंद सरस्वती ह्यांच्यापासून प्रेरणा घेऊन श्यामजींनी वैदिक धर्म आणि दर्शनाच्या प्रचारासाठी काम करण्याचे ठरवले होते. 

१८७९मध्ये श्यामजी उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. तेव्हा त्यांची भेट मौनियर विल्यम्स आणि इतर भारतीय नेत्यांशी, शिक्षण तज्ञांशी झाली. हे सर्वजण भारतातील ब्रिटिश राजवटीमध्ये सुधारणांसाठी मागणी करत होते. 

लंडनमध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण करून जानेवारी १८८५ मध्ये श्यामजी भारतात परत आले. त्यांनी रतलाम, उदयपू,र जुनागड रियासतीचे दिवाण म्हणून काम केले. हे काम करत असताना त्यांना इंग्रजांची कुटील नीती, षडयंत्र आणि अत्याचारांची चांगलेच ओळख झाली. संपूर्ण जगात आपला न्याय व उदारमतवाद ह्यांचा ढोल वाजवणारे इंग्रज लोक प्रत्यक्षात अन्यायी आणि हुकूमशहा होते. 

 जेव्हा चापेकर बंधूंनी इंग्रज सरकारला स्वातंत्र्यसंग्रामाची एक चुणूक दाखवली. तेव्हा जसे लोकमान्य टिळकांनी त्यांचे कौतुक केले तसेच श्यामची कृष्ण वर्मांनी देखील त्यांचे कौतुक केले. ते इंग्रजांना विरोध करू लागताच इंग्रजांनी त्यांच्यावर अंकुश आणायला सुरुवात केली. श्यामजींनी लोकमान्य टिळकांशी विचार विमर्श करून दुष्मनांच्या घरात जाऊनच त्यांच्यावर वार करण्याचे ठरवले. १८९७ मध्ये ते भारत सोडून लंडनला गेले. 

१ जुलै १९०५ ला श्यामजींनी इंडिया हाऊसची स्थापना केली. इंडिया हाऊस हे भारतीय स्वतंत्रता संग्रामातील लंडनमध्ये असलेले मुख्यालय बनले. इथे नेहमीच देशभक्त जमत असत. 

ब्रिटिश सरकारला भारतात ब्रिटिश राजनिष्ठ भारतीय अधिकारी कसे मिळतात? तर ब्रिटनमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांमधूनच हे अधिकारी निर्माण होतात! त्यामुळे जर का ह्या विद्यार्थ्यांना देशसेवेसाठी तयार केले तर ब्रिटिश सरकारला मोठा झटका बसेल. श्यामजी कृष्ण वर्मांनी आपले तन, मन आणि धन देशाच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण करण्याचा संकल्प घेतला होता. 

 श्यामजी कृष्ण वर्मा आणि सरदार सिंह राव राणा या दोघांनी मिळून भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली. लोकमान्य टिळक त्यांच्याकडे योग्य छात्र पाठवत असत. लवकरच त्यांनी क्रॉमवेल रोडवर एक इमारत विकत घेतली व इंडिया हाऊस ची स्थापना केली. तिथे 25 विद्यार्थी आरामात राहू शकत. इथे एक मोठा हॉल देखील होता. त्यामुळे लंडनमध्ये राहणारे अनेक भारतीय विद्यार्थी तिथे सभांना येत असत. 

 लोकमान्य टिळकांनी सुचवलेले अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती घेऊन इंडिया हाऊस मध्ये राहत होते. लाला हरदयाल, वीरेंद्र नाथ चट्टोपाध्याय, विनायक दामोदर सावरकर, मदनलाल धिंग्रा हे इंडिया हाऊसमध्ये राहणारे प्रमुख विद्यार्थी होते. तिथे ‘इंडियन सोशलॉजिस्ट’ नावाची एक मासिक पत्रिका प्रकाशित व्हायला सुरुवात झाली. इथेच ‘इंडियन होमरूल सोसायटीची’ परिकल्पना तयार झाली. मॅडम भिकाजी कामा यादेखील श्यामजी कृष्ण वर्मांच्या सोबत स्वातंत्र्यासाठी काम करत होत्या. तिथेच राहून सावरकरांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्य समर’ हा ग्रंथ तयार केला.

ब्रिटिश सरकारची वक्रदृष्टी श्यामजींवर होतीच. आपल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून श्यामजी लंडन सोडून पॅरिसला गेले. जाताना त्यांनी सावरकरांवर इंडिया हाऊसची जबाबदारी सोपवली. सावरकरांनी इंडिया हाऊसला भारतीय क्रांतीचे केंद्र तर बनवलेच पण कोणत्याही कायदेशीर बाबीत इंडिया हाऊस अडकणार नाही याचीही खबरदारी घेतली!

कर्जन वायलीच्या हत्येची योजना ह्याच इंडिया हाऊस मध्ये तयार झाली.

श्यामजींनी भारतात आणि भारताच्या बाहेर राहून भारताच्या स्वतंत्रता संग्रामात महान कार्य केले. युरोपमध्ये अनेक जणांना भेटून भारताची परिस्थिती, स्वातंत्र्याची आवश्यकता त्यांनी समजावून सांगितली. क्रांतिकारकांना शक्य ती सर्व मदत ते तिकडून करत होते. पॅरिस नंतर श्यामजी कृष्ण वर्मा स्वित्झर्लंड मध्ये जिनेव्हाला गेले. आपल्या अनेक प्रकाशनांद्वारे त्यांनी भारतीय क्रांतिकारकांची प्रशंसा करत त्यांची बाजू जगाला समजावून दिली. स्वित्झर्लंड मध्येही त्यांनी ‘द इंडियन सोशलॉजिस्ट’ या मासिकाचे प्रकाशन करायला सुरुवात केली आणि आपल्या लेखणीने स्वातंत्र्यसंग्रामाला तलवारीची धार प्राप्त करून दिली. सतत ब्रिटिशांचा ससेमिरा त्यांच्या मागे असूनही ते कधीच ब्रिटिशाना शरण गेले नाहीत.

अखेर ३० मार्च १९३०च्या रात्री त्यांनी जिनेव्हामध्ये अंतिम श्वास घेतला. जिनेव्हा सरकारने या विचारवंत क्रांतीकारकाचे विधीपूर्वक अंतिम संस्कार केले आणि त्यांच्या अस्थी सांभाळून ठेवल्या. 

श्यामजींनी म्हटले होते, “माझ्या अस्थी भारतात तेव्हाच नेल्या जाव्यात जेव्हा इंग्रजांच्या गुलामीतून भारत स्वतंत्र झालेला असेल.” आपण असे करंटे की स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही ५५ वर्षे त्यांच्या अस्थी जिनेव्हामध्येच राहिल्या. अखेर २००३ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्या अस्थी भारतात आणण्याची सर्व कार्यवाही पूर्ण करून अस्थी भारतात आणल्या. 

वीरांजली यात्रा 
आज मांडवी मध्ये त्यांचे स्मारक म्हणून एक भव्य सुंदर क्रांती तीर्थ निर्माण केले गेले आहे. 
क्रांतीतीर्थ 
क्रांतीतीर्थ 
क्रांतीतीर्थ 

क्रांतीतीर्थ मोठ्या दिमाखात महान क्रांतिकारक शामजी कृष्ण वर्मा यांना मानवंदना देत आहे. 

श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांच्या आयुष्याचे चित्रण असलेले अगदी सजीव वाटणारे पुतळे आपल्याला त्यांची जीवनगाथा सांगतात. आपल्यासोबत पूर्ण वेळ एक मार्गदर्शक असतो. 

इंडिया हाऊस प्रतिकृती व भानुमती आणि श्यामजी कृष्ण वर्मा पुतळे 
इंडिया हाऊस प्रतिकृती व भानुमती आणि श्यामजी कृष्ण वर्मा पुतळे 
इंडिया हाऊस प्रतिकृती व भानुमती आणि श्यामजी कृष्ण वर्मा पुतळे 
इंडिया हाऊस प्रतिकृती 
इंडिया हाऊस प्रतिकृती 

इंडिया हाऊस प्रतिकृती 

इंडिया हाऊस प्रतिकृती 

इंडिया हाऊस प्रतिकृती 

सुंदर परिसर 

इंडिया हाऊसची प्रतिकृती आहे. ज्यामध्ये भारतीय क्रांतीसंग्रामाचे वर्णन आहे. श्यामजी कृष्ण वर्मा व भानुमती वर्मा ह्यांचे अस्थिकलश आहेत. बाहेर क्रांतिकारकांच्या छायाचित्रांची व कार्याचे वर्णन करणारे फलक असलेली दीर्घिका आहे. 

क्रांतिकारक प्रतिमा 
क्रांतिकारक प्रतिमा 

क्रांतीतीर्थ 

स्वच्छता, सौंदर्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार ह्यामुळे हे प्रेरणादायी स्मारक अविस्मरणीय ठरले आहे.

भूजमध्ये आपण नारायण सरोवर मध्ये धार्मिक,अध्यात्मिक यात्रेसाठी जाल, रोड टू हेवनला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी फोटो हवेत म्हणून जाल.

पण मांडवीला क्रांतीतीर्थावर मात्र राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी किंवा जागृत ठेवण्यासाठी अवश्य जा.

 #Shyamaji Krushna Varma #Freedom fighters of India #Mandavi #Bhuj #Kutch #Gujrat #Gujrat Tourism


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

कोस्टल कर्नाटक ६ - अविस्मरणीय शरावती बॅकवॉटर बोटिंग, शरावती कांडला मॅन्ग्रोव्ह बोर्ड वॉक

मी आधीच्या पोस्टमध्ये सांगितले होते की आजचा सूर्यास्त समुद्रात होता तर उद्याचा सूर्योदय शरावती नदीत असणार आहे! तोच हा सूर्योदय शरावती नदीत, कमळांच्या मध्ये.  शरावती बॅकवॉटर बोटिंग  दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहापर्यंत आम्ही बोटिंगच्या ठिकाणी पोचलो. कारण आम्हाला सूर्योदय चुकवायचा नव्हता. होनावर जवळचे शरावती नदीतील बोटिंग हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.  आजूबाजूची शांतता, संथ पाणी, स्वच्छ नितळ पाण्यात वाकून आपले प्रतिबिंब न्याहाळणारी नारळाची झाडे, पाण्यात अध्ये मध्ये असलेली लहानशी बेटे, खारफूटीची जंगले, कमळाची पाण्यावर तरंगणारी पाने, उगवत्या सूर्याची पाण्यात मिसळणारी किरणे, त्याने तांबूस झालेले पाणी .. एक वेगळेच जग असते ते. तुम्ही जितक्या वेळासाठी बोट ठरवलेली असेल.. तास दीड तास..  तो वेळ, तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असणार हे मी अगदी खात्रीने सांगू शकते.  आपोआप जगाचा, आयुष्याचा कोलाहल मंद होत जातो. पहाटेचा मवाळ प्रकाश, पाण्यावर हेलकावणारी नाव, हवेतला अगदी किंचितसा सुखद गारवा आणि मुरत जाणारी शांतता ह्या सगळ्याने मन निवळत जाते.  आम्ही गेलो त्या दिवशी,...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका  आज उडुपीहून लवकर निघून शृंगेरीला पोचण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच निघालो. रस्ता खूपच छान होता. आता खरं सांगायचे तर कोस्टल कर्नाटक प्रवासात रस्ता सुंदर होता म्हणणे ही द्विरुक्तीच आहे.  सगळ्या सडका अगदी एका पातळीतील आणि गुळगुळीत आहेत. खड्डे खळगे, रस्ते वर खाली असणे असे काही नसल्याने महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हाला थोडे चुकल्यासारखे वाटले खरे!!! शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, स्वच्छता ह्यामुळे प्रवास फार आनंदाचा होतो. उडुपी शृंगेरी रस्ता तर आगुंबे जंगलातून जातो. त्यामुळे दाट झाडी होती. रस्त्यात सुप्रसिद्ध आगुंबे घाटही येतोच. सकाळची प्रसन्न वेळ आणि इतका छान रस्ता..दिवसाची चांगली सुरुवात होण्यासाठी आणखी काय पाहिजे?!!  आम्हाला वाटले होते इतक्या लवकर फारसे कोणी श्रुंगेरीत आलेले नसेल. पण शृंगेरीला पोचल्यावर लक्षात आले की आमच्यासारखाच विचार अनेकांनी केला होता!  अनेक बस रात्रभराचा प्रवास करून सकाळी शृंगेरीला पोचल्या होत्या. त्या लोकांच्या प्रातर्विधी आणि अंघोळीसाठी अनेक ठिकाणी माफक पैसे घेऊन उत्तम सोय केलेली होती....

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....