Skip to main content

उदगमंडलम! उटी - क्वीन ऑफ हिल्स 

उदगमंडलम!! किती सुंदर नाव! उदग - उदक (संस्कृत) म्हणजे पाणी आणि मंडलम (संस्कृत) म्हणजे प्रदेश आहे. पाण्याचा प्रदेश! जर तुम्ही उदगमंडलमला भेट दिली तर लगेच तुम्हाला कळेलच की हे नाव किती योग्य आहे! या प्रदेशात आणि आजूबाजूला अनेक तलाव आहेत. आकाशात पाणी भरलेले, कधीही बरसायला तयार असणारे ढग आणि धुके..खरोखर उदगमंडलम नाव सार्थ आहे!

तामिळनाडू सीमेवरील, नीलगिरी डोंगरभागात राहणारे तोडा लोक हे त्या भागाचे मूळ रहिवासी होते. तोडा भाषेत ह्या ठिकाणाचे नाव 'ओथकल मुंड' होते, ज्याचा अर्थ विकिपीडियानुसार ओथकल म्हणजे पर्वत आणि मुंड म्हणजे घर आहे. अजून एक धारणा अशीही आहे की टोडा भाषेतील, ह्या गावाच्या नावाचा अर्थ म्हणजे ओथका - एक दगड आहे आणि मुंड म्हणजे गाव आहे!! 

बाकी सगळी कथा नेहमीप्रमाणेच आहे. काही ब्रिटीश अधिकारी या ठिकाणी आले होते, त्यांना हे ठिकाण खूप आवडले. त्यांनी कोईमतूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले की ही जागा स्वित्झर्लंडसारखी आहे! त्यावेळी जॉन सुलिवान हे कोईमतूरचे जिल्हाधिकारी होते. ते आले, त्यांनी पाहिले आणि ते ह्या गावाच्या प्रेमात पडले. 

त्यांनी तोडा लोकांकडून ही जागा मिळविली आणि तेथे त्यांनी एक बंगला बांधला. ब्रिटिश लोकांना उदगमंडलम किंवा ऊटकमंड असे उच्चार करता येत नव्हते म्हणून त्यांनी त्या जागेचे नाव ऊटी असे ठेवले. हे ठिकाण लवकरच ब्रिटीश शासकांसाठी, उन्हाळ्या सुट्टीतील आवडते विश्रांतीस्थान ब नले.

होईसळा राजांच्या, विशेषतः विष्णुवर्धनच्या काळात, बाराव्या शतकात देखील या शहराचे संदर्भ सापडतात. 

तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील, उदगमंडलम हे भारतीय पर्यटक तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांचेही आवडते ठिकाण आहे.ते का? त्याचे अगदी नेमके कारण सांगायचे तर वर्षभर आनंद देणारे नैसर्गिक सौंदर्य, पर्वत आणि टेकड्या, तलाव, नद्या, झाडे आणि फुले आणि ह्यामुळे होणारे आनंददायी वातावरण असे देता येईल.

उडगमंडलम हे आरामात बघण्याचे ठिकाण आहे. घाईगडबडीने पाहण्याजोगी अनेक पर्यटनस्थळे इथे नाहीत. फक्त बोटॅनिकल गार्डन, गुलाबाच्या बागेतून फिरा, तलावांमध्ये नौकाविहारासाठी जा किंवा जंगलात चालत जा आणि पर्वतांवर ट्रेक करा!! 
 
सर्वात जवळचा विमानतळ कोईमतूर आहे. म्हणून आम्ही जानेवारी २०१९ मध्ये उदगमंडलमला गेलो होतो तेव्हा मुंबईहून कोइमतूर विमान घेतले आणि मग टॅक्सीने उदगमंडलमला गेलो. रस्त्याची अवस्था चांगली आहे. रस्त्याने जाताना दिसणारे दृश्य साधारण असे आहे!


Coimbatore To Udagamandalam 




Coimbatore To Udagamandalam 



Coimbatore To Udagamandalam 




प्याकरा तलाव बोटिंग 

प्याकरा नदीवर असलेल्या धरणामुळे प्याकरा तलाव तयार झाला आहे. तेथे एक जलविद्युत केंद्र देखील आहे आणि अनेक धबधबे पाहायला मिळतात. या प्रदेशात जवळपास ९ महिने पाऊस पडतो. प्याकरा तलावामध्ये नौकाविहार करणे किंवा त्याच्या आजूबाजूला असलेल्या बागेत फिरणे, दुकानात खरेदी करणे म्हणजे उदगममंडलला भेट देणार्‍या पर्यटकांचे आवडते काम आहे.

 


















Pyakra Lake 👈 विडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा!

तलावाभोवती उंच झाडे अगदी दाट जंगल असावे तशीच आहेत. तलावामध्ये मातकट रंगाचे पाणी आहे. बोटीच्या इंजिनचा आवाज खूप येतो व आजूबाजूच्या शांततेवर ओरखडे उमटवतो.

 उदगमंडलममध्ये दोन किंवा तीन मेणाच्या पुतळ्यांची संग्रहालये आहेत. आमचा ड्रायव्हर आम्हाला वॅक्स प्लॅनेटमध्ये घेऊन गेला होता. त्यावेळी ते एक लहानसे ठिकाण होते. आपण ते १५ - २० मिनिटांत पाहू शकतो.

































दोडाबेटा शिखर

 नीलगिरी पर्वतरांगांमधील हे सर्वोच्च शिखर आहे! ट्रेकर आणि छायाचित्रकारांच्या साठी तर हे स्वप्न आहे. पण इतरांसाठी देखील काळजीचे कारण नाही. कारण आपण कारने अगदी वरपर्यंत जाऊ शकता! आजुबाजूचा परिसर खूपच सुंदर आणि निसर्गरम्य आहे.

Near Dodabetta  👈 विडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा!






















हे पर्यटक तसेच स्थानिकांचे आवडते ठिकाण आहे. म्हणूनच, जर तुम्हाला गर्दी टाळायची असेल, तर तुम्हाला सकाळी लवकर जावे लागेल. वेधशाळेमध्ये दुर्बिणी आहेत, परंतु दुर्बिणीतून पहाण्याची संधी मिळाली नाही तरीसुद्धा निराश होण्याचे कारण नाही. इथून नुसत्या डोळ्यांनी दिसणारे दृश्य देखील अप्रतिम आहे! 

Dodabetta  👈 विडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा!


समुद्र सपाटीपासूनची उंची आणि सभोवतालच्या डोंगरामुळे खुपदा थंडगार वारा वाहत असतो. अगदी भरदुपारी ऊन असतानाही, हवामान खरोखर थंड होऊ शकते. म्हणून त्यासाठी तयार रहा. 

येथे एक रेस्टॉरंट आहे जेथे आपण पकोडा आणि चहा, कॉफी सारख्या गोष्टी  खरेदी करू शकता.

उदगमंडलम वनस्पति उद्यान 

ही प्रचंड मोठी बोटॅनिकल गार्डन म्हणजे  बागकाम विभागाने देखभाल केलेले एक सरकारी उद्यान आहे. ह्या उद्यानाचे एकूण क्षेत्र ५५ एकर आहे. १८४० मध्ये भाजीपाला लागवड म्हणून सुरू झालेला हा उपक्रम, हळूहळू १८४७ मध्ये एका सार्वजनिक बागेत परिवर्तित झाला. तेथे हजारो प्रकारच्या वनस्पती आणि फुले आहेत. एका दिवसात संपूर्ण बाग पाहणे अशक्य आहे.

येथे विस्तीर्ण लॉन, कन्झर्व्हेटरी, ग्लास हाउसेस, नर्सरीज आहेत. मे मध्ये वार्षिक फ्लॉवर शो आयोजित केला जातो, जो वनस्पतीशास्त्र अभ्यासक आणि वनस्पती प्रेमींसाठी ही एक पर्वणीच असते. बागेतील काही दृश्ये अशी आहेत.


 




















































Government Botanical Garden 👈 विडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा!

उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोरचा रास्ता संध्याकाळी गजबजलेला असतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने आणि रेस्टॉरंट्स आहेत. 




उदगमंडल रोज गार्डन 

उदगमंडलममधील आणखी एक आकर्षण म्हणजे गुलाबांचे उद्यान. हे एल्क हिलच्या उतारावर वसलेले आहे. हे भारतातील सर्वात मोठ्या रोझ गार्डनपैकी एक आहे आणि ह्या उद्यानाला वर्ल्ड फेडरेशन ऑफ रोज सोसायटीजकडून गार्डन ऑफ एक्सलन्स पुरस्कार प्राप्त झाला आहे.

या उद्यानाला भेट दिल्यावर डोळे तसेच मनदेखील सुखावून जाते. गुलाबांचे रूप, रंग, गंध विविध प्रकारचे आणि आनंददायी! या उद्यानात गुलाबांचे 20000 हून अधिक प्रकार आहेत. 

छायाचित्रकारांसाठी एक छोटीशी सूचना - सकाळी लवकर बागेला भेट द्या. अन्यथा दिवस मध्यान्हीकडे झुकायला लागला की सूर्यप्रकाशाने फोटो न्हाऊन मग उजेडामुळे वाहून जातात!! डोंगरउतारावर असल्याने, संध्याकाळी लवकर अंधार पडत असणार!

फुलांची नावे अतिशय मनोरंजक अशी दिलेली आहेत आणि ती वाचून आपल्या चेहऱ्यावर नक्की हास्य उमटेल! बागेत सुंदर सजावट केलेली आहे. पर्गोला आणि गुलाबवेलींच्या कमानी आहेत. माझ्याकडे या बागेची अनेक छायाचित्रे आहेत! त्यापैकी काही येथे देते आहे. 




































































































आम्ही क्लब महिंद्रा, डर्बी ग्रीन, उटी इथे राहिलो होतो. ह्या रिसॉर्टमध्ये खूप सुंदर फुले आणि सक्युलंटस आहेत, जागेची रचना उत्तम आणि सौंदर्यपूर्ण आहे. रेस्टॉरंट मध्ये मिळणारे अन्न चविष्ट आहे तसेच रिसॉर्टमध्ये एक छोटेसे दुकान देखील आहे. 

 














































 

त्यांच्याकडे रेस्टॉरंट मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ असतातच. पण जर का तुमची काही खास गरज वा पथ्य असेल आणि ते तुम्ही पुरेसे आधी सांगितले, तर नक्की त्याप्रमाणे ते तुम्हाला अन्न तयार करून देतात. आम्ही विगन आहोत असे सांगितल्यावर त्यांनी आमच्यासाठी फार चांगले विगन पदार्थ आणि पक्वान्ने केली होती. 










जेव्हा आपण उदगमंडलममध्ये असाल तेव्हा आपण नैसर्गिक तेले आणि अर्क अवश्य खरेदी करा. आम्ही लेमनग्रास- गवती चहाचा अर्क विकत घेतला होता आणि तो फारच चांगला होता.

येथे अनेक चॉकलेटचे कारखाने आहेत. आपल्याला हाताने तयार केलेली, विविध प्रकारची चॉकलेटस देखील मिळू शकतात. शहरात आणि आजूबाजूला चहाचे कारखाने आहेत. शहराच्या बाहेर, डोंगर उतारांवर अनेक चहाच्या बागा दिसतात. 

नीलगिरी माउंटन रेल्वे 

 १९०८ पासून कार्यरत असणारी ही सिंगल ट्रॅक ट्रेन आहे. हा खूपच संस्मरणीय व गतकाळाच्या स्मृती जागवणारा प्रवास आहे. हा प्रवास करताना, आपण टाइम मशीन मध्ये बसून ७०-८० वर्षे मागे गेलो आहोत असे वाटू लागते. 

नीलगिरीचे चढ-उतार, बोगदे आणि वळणे ह्या सगळ्यामुळे हा प्रवास रोमांचक होतो. आपण ट्रेनमधून दिसणारी दृश्ये कधीच विसरणार नाही इतकी ती सुंदर आहेत. घनदाट जंगले, हिरव्यागार गवताने आणि झाडांनी आच्छादित उतार आणि धुक्यात दडलेल्या दऱ्या आणि डोंगर.. हा प्रवास खूप सुंदर आहे! 

उदगममंडलम ते मेट्टुपालम पर्यंतचे अंतर ४६ कि.मी. आहे आणि डोंगर चढ उतारांमुळे ते पार करण्यासाठी जाताना ५ तास आणि परत येताना ३ तास ३० मिनिटे लागतात. ऊटी टुरिझम- नीलगिरी रेल्वेच्या संकेतस्थळाच्या म्हणण्यानुसार, मार्गावर १६ बोगदे, २५० पूल आणि २०८ वळणे आहेत!

दार्जिलिंग हिमालयन रेल्वे आणि कालका शिमला या दोन इतर रेल्वेबरोबरच ही रेल्वेगाडी, जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आली आहे. 

या प्रवासासाठी तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता. आपल्याला खूप अगोदरच बुकिंग करावे लागेल, प्रवासाच्या दोन किंवा तीन महिन्यांपूर्वीच करावे लागेल.ती तिकिटे अगदी पटकन, संपूर्ण बुक होऊन जाऊ शकतात. 










Entry! 👈 विडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा!




























 
View From The Train 👈 विडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा!

उदगमंडलम हुन आम्ही ह्या ट्रेन ने कुन्नूर ला गेलो आणि तिथून मग टॅक्सी ने कोडाईकनाल ला गेलो. निलगिरी पर्वताला निळेपण देणाऱ्या कुंजीर फुलांविषयी तर मी सांगितलेच नाही. ते आता कोडाईकनाल च्या पोस्ट मध्ये लिहीन. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा, कोविड लस मिळायची वाट पहा!!

#ClubMahindraOoty #ToyTrainOoty #BotanicalGardenOoty #WaxPlanet #WhatToSeeInOoty #OotyTrip #UdagmandalamTrain #InAndAroundOoty #KunjirFlowersOoty

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....

कोस्टल कर्नाटक- २ मंगळुरू, मुलकी, उचिल, उडुपी

  आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते.  नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते.  मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात.  काद्री मंजुनाथ मंदिर  का...