Skip to main content

उदगमंडलम! उटी - क्वीन ऑफ हिल्स 

उदगमंडलम!! किती सुंदर नाव! उदग - उदक (संस्कृत) म्हणजे पाणी आणि मंडलम (संस्कृत) म्हणजे प्रदेश आहे. पाण्याचा प्रदेश! जर तुम्ही उदगमंडलमला भेट दिली तर लगेच तुम्हाला कळेलच की हे नाव किती योग्य आहे! या प्रदेशात आणि आजूबाजूला अनेक तलाव आहेत. आकाशात पाणी भरलेले, कधीही बरसायला तयार असणारे ढग आणि धुके..खरोखर उदगमंडलम नाव सार्थ आहे!

तामिळनाडू सीमेवरील, नीलगिरी डोंगरभागात राहणारे तोडा लोक हे त्या भागाचे मूळ रहिवासी होते. तोडा भाषेत ह्या ठिकाणाचे नाव 'ओथकल मुंड' होते, ज्याचा अर्थ विकिपीडियानुसार ओथकल म्हणजे पर्वत आणि मुंड म्हणजे घर आहे. अजून एक धारणा अशीही आहे की टोडा भाषेतील, ह्या गावाच्या नावाचा अर्थ म्हणजे ओथका - एक दगड आहे आणि मुंड म्हणजे गाव आहे!! 

बाकी सगळी कथा नेहमीप्रमाणेच आहे. काही ब्रिटीश अधिकारी या ठिकाणी आले होते, त्यांना हे ठिकाण खूप आवडले. त्यांनी कोईमतूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले की ही जागा स्वित्झर्लंडसारखी आहे! त्यावेळी जॉन सुलिवान हे कोईमतूरचे जिल्हाधिकारी होते. ते आले, त्यांनी पाहिले आणि ते ह्या गावाच्या प्रेमात पडले. 

त्यांनी तोडा लोकांकडून ही जागा मिळविली आणि तेथे त्यांनी एक बंगला बांधला. ब्रिटिश लोकांना उदगमंडलम किंवा ऊटकमंड असे उच्चार करता येत नव्हते म्हणून त्यांनी त्या जागेचे नाव ऊटी असे ठेवले. हे ठिकाण लवकरच ब्रिटीश शासकांसाठी, उन्हाळ्या सुट्टीतील आवडते विश्रांतीस्थान ब नले.

होईसळा राजांच्या, विशेषतः विष्णुवर्धनच्या काळात, बाराव्या शतकात देखील या शहराचे संदर्भ सापडतात. 

तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील, उदगमंडलम हे भारतीय पर्यटक तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांचेही आवडते ठिकाण आहे.ते का? त्याचे अगदी नेमके कारण सांगायचे तर वर्षभर आनंद देणारे नैसर्गिक सौंदर्य, पर्वत आणि टेकड्या, तलाव, नद्या, झाडे आणि फुले आणि ह्यामुळे होणारे आनंददायी वातावरण असे देता येईल.

उडगमंडलम हे आरामात बघण्याचे ठिकाण आहे. घाईगडबडीने पाहण्याजोगी अनेक पर्यटनस्थळे इथे नाहीत. फक्त बोटॅनिकल गार्डन, गुलाबाच्या बागेतून फिरा, तलावांमध्ये नौकाविहारासाठी जा किंवा जंगलात चालत जा आणि पर्वतांवर ट्रेक करा!! 
 
सर्वात जवळचा विमानतळ कोईमतूर आहे. म्हणून आम्ही जानेवारी २०१९ मध्ये उदगमंडलमला गेलो होतो तेव्हा मुंबईहून कोइमतूर विमान घेतले आणि मग टॅक्सीने उदगमंडलमला गेलो. रस्त्याची अवस्था चांगली आहे. रस्त्याने जाताना दिसणारे दृश्य साधारण असे आहे!


Coimbatore To Udagamandalam 




Coimbatore To Udagamandalam 



Coimbatore To Udagamandalam 




प्याकरा तलाव बोटिंग 

प्याकरा नदीवर असलेल्या धरणामुळे प्याकरा तलाव तयार झाला आहे. तेथे एक जलविद्युत केंद्र देखील आहे आणि अनेक धबधबे पाहायला मिळतात. या प्रदेशात जवळपास ९ महिने पाऊस पडतो. प्याकरा तलावामध्ये नौकाविहार करणे किंवा त्याच्या आजूबाजूला असलेल्या बागेत फिरणे, दुकानात खरेदी करणे म्हणजे उदगममंडलला भेट देणार्‍या पर्यटकांचे आवडते काम आहे.

 


















Pyakra Lake 👈 विडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा!

तलावाभोवती उंच झाडे अगदी दाट जंगल असावे तशीच आहेत. तलावामध्ये मातकट रंगाचे पाणी आहे. बोटीच्या इंजिनचा आवाज खूप येतो व आजूबाजूच्या शांततेवर ओरखडे उमटवतो.

 उदगमंडलममध्ये दोन किंवा तीन मेणाच्या पुतळ्यांची संग्रहालये आहेत. आमचा ड्रायव्हर आम्हाला वॅक्स प्लॅनेटमध्ये घेऊन गेला होता. त्यावेळी ते एक लहानसे ठिकाण होते. आपण ते १५ - २० मिनिटांत पाहू शकतो.

































दोडाबेटा शिखर

 नीलगिरी पर्वतरांगांमधील हे सर्वोच्च शिखर आहे! ट्रेकर आणि छायाचित्रकारांच्या साठी तर हे स्वप्न आहे. पण इतरांसाठी देखील काळजीचे कारण नाही. कारण आपण कारने अगदी वरपर्यंत जाऊ शकता! आजुबाजूचा परिसर खूपच सुंदर आणि निसर्गरम्य आहे.

Near Dodabetta  👈 विडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा!






















हे पर्यटक तसेच स्थानिकांचे आवडते ठिकाण आहे. म्हणूनच, जर तुम्हाला गर्दी टाळायची असेल, तर तुम्हाला सकाळी लवकर जावे लागेल. वेधशाळेमध्ये दुर्बिणी आहेत, परंतु दुर्बिणीतून पहाण्याची संधी मिळाली नाही तरीसुद्धा निराश होण्याचे कारण नाही. इथून नुसत्या डोळ्यांनी दिसणारे दृश्य देखील अप्रतिम आहे! 

Dodabetta  👈 विडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा!


समुद्र सपाटीपासूनची उंची आणि सभोवतालच्या डोंगरामुळे खुपदा थंडगार वारा वाहत असतो. अगदी भरदुपारी ऊन असतानाही, हवामान खरोखर थंड होऊ शकते. म्हणून त्यासाठी तयार रहा. 

येथे एक रेस्टॉरंट आहे जेथे आपण पकोडा आणि चहा, कॉफी सारख्या गोष्टी  खरेदी करू शकता.

उदगमंडलम वनस्पति उद्यान 

ही प्रचंड मोठी बोटॅनिकल गार्डन म्हणजे  बागकाम विभागाने देखभाल केलेले एक सरकारी उद्यान आहे. ह्या उद्यानाचे एकूण क्षेत्र ५५ एकर आहे. १८४० मध्ये भाजीपाला लागवड म्हणून सुरू झालेला हा उपक्रम, हळूहळू १८४७ मध्ये एका सार्वजनिक बागेत परिवर्तित झाला. तेथे हजारो प्रकारच्या वनस्पती आणि फुले आहेत. एका दिवसात संपूर्ण बाग पाहणे अशक्य आहे.

येथे विस्तीर्ण लॉन, कन्झर्व्हेटरी, ग्लास हाउसेस, नर्सरीज आहेत. मे मध्ये वार्षिक फ्लॉवर शो आयोजित केला जातो, जो वनस्पतीशास्त्र अभ्यासक आणि वनस्पती प्रेमींसाठी ही एक पर्वणीच असते. बागेतील काही दृश्ये अशी आहेत.


 




















































Government Botanical Garden 👈 विडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा!

उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोरचा रास्ता संध्याकाळी गजबजलेला असतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने आणि रेस्टॉरंट्स आहेत. 




उदगमंडल रोज गार्डन 

उदगमंडलममधील आणखी एक आकर्षण म्हणजे गुलाबांचे उद्यान. हे एल्क हिलच्या उतारावर वसलेले आहे. हे भारतातील सर्वात मोठ्या रोझ गार्डनपैकी एक आहे आणि ह्या उद्यानाला वर्ल्ड फेडरेशन ऑफ रोज सोसायटीजकडून गार्डन ऑफ एक्सलन्स पुरस्कार प्राप्त झाला आहे.

या उद्यानाला भेट दिल्यावर डोळे तसेच मनदेखील सुखावून जाते. गुलाबांचे रूप, रंग, गंध विविध प्रकारचे आणि आनंददायी! या उद्यानात गुलाबांचे 20000 हून अधिक प्रकार आहेत. 

छायाचित्रकारांसाठी एक छोटीशी सूचना - सकाळी लवकर बागेला भेट द्या. अन्यथा दिवस मध्यान्हीकडे झुकायला लागला की सूर्यप्रकाशाने फोटो न्हाऊन मग उजेडामुळे वाहून जातात!! डोंगरउतारावर असल्याने, संध्याकाळी लवकर अंधार पडत असणार!

फुलांची नावे अतिशय मनोरंजक अशी दिलेली आहेत आणि ती वाचून आपल्या चेहऱ्यावर नक्की हास्य उमटेल! बागेत सुंदर सजावट केलेली आहे. पर्गोला आणि गुलाबवेलींच्या कमानी आहेत. माझ्याकडे या बागेची अनेक छायाचित्रे आहेत! त्यापैकी काही येथे देते आहे. 




































































































आम्ही क्लब महिंद्रा, डर्बी ग्रीन, उटी इथे राहिलो होतो. ह्या रिसॉर्टमध्ये खूप सुंदर फुले आणि सक्युलंटस आहेत, जागेची रचना उत्तम आणि सौंदर्यपूर्ण आहे. रेस्टॉरंट मध्ये मिळणारे अन्न चविष्ट आहे तसेच रिसॉर्टमध्ये एक छोटेसे दुकान देखील आहे. 

 














































 

त्यांच्याकडे रेस्टॉरंट मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ असतातच. पण जर का तुमची काही खास गरज वा पथ्य असेल आणि ते तुम्ही पुरेसे आधी सांगितले, तर नक्की त्याप्रमाणे ते तुम्हाला अन्न तयार करून देतात. आम्ही विगन आहोत असे सांगितल्यावर त्यांनी आमच्यासाठी फार चांगले विगन पदार्थ आणि पक्वान्ने केली होती. 










जेव्हा आपण उदगमंडलममध्ये असाल तेव्हा आपण नैसर्गिक तेले आणि अर्क अवश्य खरेदी करा. आम्ही लेमनग्रास- गवती चहाचा अर्क विकत घेतला होता आणि तो फारच चांगला होता.

येथे अनेक चॉकलेटचे कारखाने आहेत. आपल्याला हाताने तयार केलेली, विविध प्रकारची चॉकलेटस देखील मिळू शकतात. शहरात आणि आजूबाजूला चहाचे कारखाने आहेत. शहराच्या बाहेर, डोंगर उतारांवर अनेक चहाच्या बागा दिसतात. 

नीलगिरी माउंटन रेल्वे 

 १९०८ पासून कार्यरत असणारी ही सिंगल ट्रॅक ट्रेन आहे. हा खूपच संस्मरणीय व गतकाळाच्या स्मृती जागवणारा प्रवास आहे. हा प्रवास करताना, आपण टाइम मशीन मध्ये बसून ७०-८० वर्षे मागे गेलो आहोत असे वाटू लागते. 

नीलगिरीचे चढ-उतार, बोगदे आणि वळणे ह्या सगळ्यामुळे हा प्रवास रोमांचक होतो. आपण ट्रेनमधून दिसणारी दृश्ये कधीच विसरणार नाही इतकी ती सुंदर आहेत. घनदाट जंगले, हिरव्यागार गवताने आणि झाडांनी आच्छादित उतार आणि धुक्यात दडलेल्या दऱ्या आणि डोंगर.. हा प्रवास खूप सुंदर आहे! 

उदगममंडलम ते मेट्टुपालम पर्यंतचे अंतर ४६ कि.मी. आहे आणि डोंगर चढ उतारांमुळे ते पार करण्यासाठी जाताना ५ तास आणि परत येताना ३ तास ३० मिनिटे लागतात. ऊटी टुरिझम- नीलगिरी रेल्वेच्या संकेतस्थळाच्या म्हणण्यानुसार, मार्गावर १६ बोगदे, २५० पूल आणि २०८ वळणे आहेत!

दार्जिलिंग हिमालयन रेल्वे आणि कालका शिमला या दोन इतर रेल्वेबरोबरच ही रेल्वेगाडी, जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आली आहे. 

या प्रवासासाठी तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता. आपल्याला खूप अगोदरच बुकिंग करावे लागेल, प्रवासाच्या दोन किंवा तीन महिन्यांपूर्वीच करावे लागेल.ती तिकिटे अगदी पटकन, संपूर्ण बुक होऊन जाऊ शकतात. 










Entry! 👈 विडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा!




























 
View From The Train 👈 विडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा!

उदगमंडलम हुन आम्ही ह्या ट्रेन ने कुन्नूर ला गेलो आणि तिथून मग टॅक्सी ने कोडाईकनाल ला गेलो. निलगिरी पर्वताला निळेपण देणाऱ्या कुंजीर फुलांविषयी तर मी सांगितलेच नाही. ते आता कोडाईकनाल च्या पोस्ट मध्ये लिहीन. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा, कोविड लस मिळायची वाट पहा!!

#ClubMahindraOoty #ToyTrainOoty #BotanicalGardenOoty #WaxPlanet #WhatToSeeInOoty #OotyTrip #UdagmandalamTrain #InAndAroundOoty #KunjirFlowersOoty

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...

शिवथरघळ

जर आपण भारताचा नकाशा पाहिला  तर आपल्याला नकाशात डावीकडे, गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत काळसर  हिरवी रेषा दिसते. ही रेषा  गुजराथ येथून सुरु होते  आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू मार्गे जाऊन केरळला पोहोचते. ती रेषा म्हणजेच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट म्हणजे दख्खनच्या पठाराची जणू किनारच आहे. दख्खन पठाराच्या काठावरच्या ह्या पर्वत रांगा आहेत.  या भागात बरीच जंगले, जलसाठे, धबधबे आहेत आणि जैवविविधता तसेच त्याचे वय यामुळे या भागाला 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून ओळखले गेले आहे. पश्चिम घाट हिमालयापेक्षाही जुना आहे! वरंधा घाट  📷विकिमीडिया कॉमन्स  पश्चिम घाट हा अनेक मुख्य नद्यांचे उगमस्थान आहे. वरील छायाचित्रात दिसते आहे त्या प्रमाणे, वर्षा ऋतूत या प्रदेशात अनेक धबधबे पाहायला मिळतात.  पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) अनेक सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे शिवथरघळ धबधबा. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण रौद्र सौंदर्यानिशी आणि ताकदीनिशी रोरावत खाली येताना दिसतो.  हा धबधबा सुमारे शंभर फूट उंचीवर...