Skip to main content

सूचो आणि झाउझुआंग (चोचंग), चीन 

गेल्या आठवड्यातल्या पोस्टमध्ये आपण शांघाय येथे होतो! या आठवड्यात आपण शांघायच्या आजुबाजूला फिरू या!

शांघायपासून सुमारे 100 कि.मी. अंतरावर सुझाऊ किंवा सूचो नावाचे एक सुंदर प्राचीन शहर आहे. आज सूचो हे पूर्व चीनमधील महत्वाचे औद्योगिक शहर आहे आणि विज्ञान संशोधन आणि विकास संस्था आणि उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. हे शहर उद्योग आणि प्राचीन वारसा यांचे अप्रतिम मिश्रण म्हणून देखील ओळखले जाते. हे शहर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचा एक भाग आहे.

सूचोचा सुमारे २५०० वर्षांचा इतिहास आहे. काळाच्या ओघात शहराचे नाव बर्‍याच वेळा बदलले गेले. अनेक शतके हे देशातील सर्वात प्रमुख शहर होते. सूचो किंवा सुझाऊ हे नाव ५८९ ए.डी. मध्ये शहराला दिले गेले आहे. ह्या शहरामध्ये बऱ्याच प्रसिद्ध बागा होत्या. परंतु त्यातील बऱ्याच बागा, वेगवेगळी बंडे, उठाव, युद्धे आणि परदेशी आक्रमक राजवटीच्या काळात नष्ट झाल्या. त्यातील दोन उद्याने पूर्ववत करायचा उत्तम प्रयत्न केलेला आहे. 

'Humble Administrator's garden' सर्वात प्रसिद्ध आहे. 1000 वर्षांपूर्वी तयार केली गेलेली ही बाग आहे. काळाच्या ओघात तिचे स्वरूप कितीदा तरी बदलले आहे आणि बदलणार्‍या मालकांसह बर्‍याच वेळा बागेचा नकाशा देखील बदलला आहे. बागेचे नाव प्राचीन चीनी अभिजात साहित्यातील काही ओळींवरून घेतले आहे असे म्हणतात.

बागेचे एकूण क्षेत्रफळ सुमारे १२ एकर इतके आहे. ही बाग सूचो मधील सर्वात मोठी बाग आहे ह्यात काहीच आश्चर्य नाही!

 

Lotus pond




At the entrance




Map of the Garden 





Restoration work going on! With a little break!




Beautiful Pavilions




Nature, Architecture and Reflection 


वनस्पती, वास्तुशास्त्र, खडक आणि पाणी ह्या चार घटकांच्या समन्वयासाठी बाग प्रसिद्ध आहे. बागेत काही अतिशय उल्लेखनीय हॉलस आहेत. हॉल पाहताना चिनी पेंटिंग्ज, कॅलीग्राफी, कोरीवकाम, सुंदर लाकडी फर्निचर आणि उत्तम चीनीमातीची भांडी, फुलदाण्या हे काही विशेष लक्ष देण्याजोगे, उल्लेखनीय मुद्दे आहेत.

















The Mural


हे शिल्प एका प्रवेशद्वारावर कोरलेले होते. मला आश्चर्य वाटले. काय अर्थ असू शकेल ह्या शिल्पाचा असे वाटले आणि म्हणून त्याचा फोटो घेतला. हे शिल्प अनेक पिढ्या दर्शविते आहे की मानवजन्माच्या विविध अवस्था ? 

बागेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे खिडक्यांच्या सुंदर चौकटी! खिडक्या अशा प्रकारे केलेल्या आहेत की बाहेरील झाडे, पाणी आणि खडकांचे वेगवेगळ्या ऋतूंत, दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरात, बदलते सौंदर्य पाहता येईल. त्यांना असलेली चौकट बाहेरील दृश्याला एक वेगळेच परिमाण देते आणि बाहेरील देखावा, भिंतीवर टांगलेल्या एखाद्या पेंटिंगसारखा दिसतो.




























View of the windows from Outside 




The most spectacular!


बागेत खडकांच्या सुंदर शिल्पाकृती आणि विविध रचना केलेल्या आहेत. 


















Children will be children!!

बागेत फिरताना बरोबर गाईड मात्र नक्की घ्यायला हवा. इतक्या अवाढव्य बागेतले, आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेत, काय प्राधान्याने पाहायला हवे, हे तो नीट सांगू व दाखवू शकतो. मी शांघायहुन गाईडेड टूर घेतली असल्याने सोबत इंग्रजी जाणणारा गाईड होता ते उत्तम झाले.

सुचो शहर, विशेषतः शहराचा जुना भाग खूपच सुंदर आहे. जुन्या वास्तुशास्त्रातील शक्य तेवढ्या सौंदर्यपूर्ण रचना त्यांनी जतन केल्या आहेत व नवीन बांधकामात देखील त्यातले काही आकार वापरले आहेत. अगदी शहरातले बस स्टॉप देखील बघा, किती सुंदर केले आहेत. 

 


Bus stop!

जुन्या घरांची रचना आणि वास्तुशैली जतन केलेली आहे. अशा काही गल्ल्या पर्यटकांसाठी मोठे आकर्षण बनल्या आहेत. 

























अनेक शतके सूचो भोवती एक तटबंदी होती, भिंत होती. भिंतीची लांबी सुमारे 15000 मीटर होती. त्याभोवती पाण्याचे खंदक आणि कालवे होते. म्हणूनच शहरात येण्यासाठी संरक्षित दारे होती ती, जमीन आणि पाण्यातली!! ह्या दरवाज्यांसाठी सूचो प्रसिद्ध आहे. 

 'पैनमेन निसर्गरम्य क्षेत्र' पर्यटन विभागाने उत्तम रित्या विकसित केलेले आहे. ह्या क्षेत्रातील रुईरंग पॅगोडा, जमीन आणि पाण्यातील दारे, बागा, अनेक पूल, सगळेच खूप सुंदर आहे. 

 





Bull in the temple


ही तेथील मंदिरातील गंमतशीर प्रथा! तिथे असे मानले जाते की तुम्ही मनात एखादी इच्छा धरून, ह्या बैलाच्या पुतळ्याची शेपटी धरलीत तर तुमची इच्छा पूर्ण होते!! ह्या चीनी ताईंना विचारायला हवे, त्यांची इच्छा पूर्ण झाली का ते!









Panmen gate 











The beautiful descend in he scenic area 









The ancient system to open the water gate 




View from the height




Beautiful lamps and the surveillance camera!




Description of the area





Ruiguang pagoda



सूचो विणकामाच्या फ्रेम्स साठी प्रसिद्ध आहे. मला माझ्या नंतरच्या ट्रिप मध्ये म्हणजे नोव्हेंबर २०१३ मध्ये काही फ्रेम खरेदी करायची संधी मिळाली. 

सूचोच्या जवळच, साधारण ३० किलोमीटर अंतरावर चीनमधील सर्वात प्रसिद्ध जल शहर आहे. 'झाउझुआंग( झौझंग/ चाऊचन्ग )' असे या शहराचे नाव आहे. झाउझुआंग ह्या शहराला सुमारे २७०० वर्षांचा इतिहास आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. शहरातील अनेक जलमार्ग आणि चांगल्या प्रकारे संरक्षित व जतन केलेली, जलमार्गाच्या दोन्ही बाजूला असलेली प्राचीन घरे, जलमार्ग सुशोभित करणाऱ्या वेली आणि झाडे, अनेक सुंदर दगडी पुल ...ह्यातील प्रत्येक गोष्ट तेथील वातावरण जादुई आणि स्वप्नवत होण्यासाठी कारणीभूत आहे. 

ह्या शहराला 'व्हेनिस ऑफ ईस्ट' म्हणून ओळखले जाते. हे शहर पर्यटकांचे अतिशय लोकप्रिय आकर्षण आहे आणि चीन राष्ट्रीय पर्यटन प्रशासनाने या शहराला AAAAA निसर्गरम्य परिसर म्हणून वर्गीकृत केलेले आहे.

मी भाग्यवान होते की मी एप्रिल २०१३ मध्ये वसंत ऋतूत झाउझुआंगला भेट दिली. तेव्हा हवा खूपच छान, प्रसन्न होती आणि रंगीबेरंगी फुले पूर्ण बहरली होती. कालवे आणि जलमार्ग स्वच्छ ठेवलेले होते. त्यामुळे गोंडोला किंवा बोटची सफर फारच आनंददायक झाली. 

मी शांघायहून एक दिवसाची टूर घेतली होती. त्यामुळे संध्याकाळपूर्वी तिथून शांघायला जाण्यासाठी निघावे लागले. परंतु मला वाटते की रात्रीचे दृश्य देखील खूपच सुंदर आणि नेत्रदीपक असेल. संध्याकाळी गावात एक सांस्कृतिक कार्यक्रम होतो असे म्हणतात, जो मला बघता आला नाही. तुम्ही कोणी जाल तेव्हा हे दोन्ही नक्की बघा आणि मला फोटो आणि व्हिडिओज पाठवा!!

ह्या शहरातील जीवन खरोखर अगदी शांत आहे. सर्व गोंडोलिया स्त्रियाच होत्या. त्यांची गोंडोलाची वेळ येईपर्यंत त्या शांतपणाने वाट पाहत होत्या.

ह्या शहराच्या, गेल्या काही दशकातील, अगदी सुरुवातीच्या काळातील आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीस, प्रसिद्ध चीनी चित्रकार चेन यिफेई कारणीभूत आहेत. न्यूयॉर्कमधील त्यांच्या चित्रकला प्रदर्शनात झाउझुआंगची काही चित्रे होती आणि त्यामुळे जगाला झाउझुआंगबद्दल माहिती मिळाली. शांघाय आणि सूचोच्याजवळ असल्यामुळे, प्रवासाचे जलद मार्ग उपलब्ध असल्याने आंतरराष्ट्रीय पर्यटकांना झाउझुआंगला, एक दिवसात येऊन जाणे सोपे झाले आहे. 

 

Ancient Houses and stone bridges




Residents washing clothes





One more bridge































































Knitting away the time!!










Spring is here! The Cherry blossoms!





The dream come true!






Singing a song!!



जलमार्गाने भरपूर वेळ प्रवास केल्यावर आम्ही जमिनीवरील रस्ते पण पाहिले!!
















तिथे एक प्रदर्शन भरलेले होते. जुन्या खोक्यांपासून नवीन वस्तू, शहरातील प्राचीन इमारतींच्या प्रतिकृती केलेल्या होत्या. खूप सुंदर आणि सफाईदार काम केलेले होते. 














खूप आवडलेले एखादे ठिकाण सोडणे, कदाचित आपण जन्मात इथे परत येणार नाही आहोत हे माहिती असताना, अवघडच असते. बरं, अशी आवडलेल्या आणि मनात रुतून बसलेल्या ठिकाणांची यादी पण मोठी. एक जन्म कसा पुरे पडणार??!!!





अच्छा झाउझुआंग!! मला तेव्हा निघतानाच माहिती होते की हे ठिकाण माझ्या कायम लक्षात राहणार आहे. आज, जवळपास आठ वर्षांनी पण, मला ते सगळे आठवते आहे. भुरळ पडणारी गोंडोला सफर, फुलून पुलावर ,पाण्यावर वाकलेले चेरी ब्लॉसम्स, जलमार्गावर चवऱ्या ढाळणाऱ्या लोंबत्या पोपटी वेली, ते दगडी पूल आणि कमानी, प्रसन्न हवा आणि आनंदात असलेली तृप्त,निवांत मी!

#ClassicalGardensInChina #OneDayTourFromShanghai #No1WaterTownInChina #SilkThreadEmbroidary #VeniceOfEast #GondolaRideInChina #NatureAndArchitectureInChina

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...

शिवथरघळ

जर आपण भारताचा नकाशा पाहिला  तर आपल्याला नकाशात डावीकडे, गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत काळसर  हिरवी रेषा दिसते. ही रेषा  गुजराथ येथून सुरु होते  आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू मार्गे जाऊन केरळला पोहोचते. ती रेषा म्हणजेच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट म्हणजे दख्खनच्या पठाराची जणू किनारच आहे. दख्खन पठाराच्या काठावरच्या ह्या पर्वत रांगा आहेत.  या भागात बरीच जंगले, जलसाठे, धबधबे आहेत आणि जैवविविधता तसेच त्याचे वय यामुळे या भागाला 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून ओळखले गेले आहे. पश्चिम घाट हिमालयापेक्षाही जुना आहे! वरंधा घाट  📷विकिमीडिया कॉमन्स  पश्चिम घाट हा अनेक मुख्य नद्यांचे उगमस्थान आहे. वरील छायाचित्रात दिसते आहे त्या प्रमाणे, वर्षा ऋतूत या प्रदेशात अनेक धबधबे पाहायला मिळतात.  पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) अनेक सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे शिवथरघळ धबधबा. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण रौद्र सौंदर्यानिशी आणि ताकदीनिशी रोरावत खाली येताना दिसतो.  हा धबधबा सुमारे शंभर फूट उंचीवर...