Skip to main content

कोडाईकनाल - प्रिन्सेस ऑफ हिल स्टेशन्स 

समुद्रसपाटीपासून 7200 फूट उंचीवर असलेले कोडाईकनाल हे भारतातील एक उत्कृष्ट हिल स्टेशन आहे. याला 'प्रिंसेस ऑफ हिल स्टेशन' आणि 'गिफ्ट ऑफ फॉरेस्ट' म्हणून देखील ओळखले जाते. हे तामिळनाडूच्या दिंडीगुल जिल्ह्यात आहे आणि त्याच्या सभोवताली पलानी पर्वत रांगा आहेत. पलानी पर्वतरांगाचे मूळ रहिवासी म्हणजे पलिआन भटक्या जमाती, जे शिकारी होते आणि मध, औषधी वनस्पती इत्यादी जंगलात सापडणाऱ्या वस्तू गोळा करणारी जमात होती. तामिळ संगम साहित्य म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्राचीन तामिळ साहित्यात, कोडाईकनालचे संदर्भ आढळतात.

कोडाईकनाल म्हणजे धुके किंवा दाट धुके, रमणीय भूप्रदेश आणि आनंददायी हवामान! तेथे अनेक ठिकाणे आणि स्पॉट्स असे आहेत, जिथे पर्यटक म्हणून आपण नक्की भेट द्यायला हवी.आपल्या सहलीत आपण ते सगळे बघावे अशी धडपडदेखील कराल. पण मी सांगते की वाटेतले कोणतेही ठिकाण देखील तितकेच सुंदर असेल! जरी ते पर्यटन स्थळांच्या यादीत लिहिलेले नसले तरीही! तर आपल्याकडे खासगी वाहन असल्यास, जेव्हा आणि जिथे वाटेल तिथे थांबा आणि मनसोक्त फोटोज घ्या! फोटो घेऊन झाले की मग शांतपणे ते सौंदर्य डोळ्यांनी देखील बघून घ्या! 


स्पॉटची नावे वेगवेगळी असतील. ते सायलेंट व्हॅली किंवा कॅप्स फ्लाय पॉईंट किंवा इको पॉईंट किंवा सुसाइड पॉईंट असेल परंतु एक गोष्ट सगळीकडे सारखीच असेल ती म्हणजे सुंदर आणि रमणीय नैसर्गिक दृश्य!!

आम्ही उदगमंडलम ते कुन्नूर पर्यंत नीलगिरी माउंटन रेल्वेने प्रवास केला. कुन्नूरहून आम्ही कोडईकनाल रस्त्याने प्रवास केला. हे अंतर 200 किमीपेक्षा जास्त आहे. रस्ता चांगल्या स्थितीत आहे आणि आजूबाजूला दिसणारे दृश्य सुंदर आहे. मला सर्वात जास्त आवडले ते म्हणजे नारळ, पाम आणि केळीच्या बागांची झालेली गुंफण आणि पार्श्वभूमीला असलेल्या पर्वतरांगा!









जेव्हा आपण या प्रदेशात असाल तेव्हा आपल्याला प्रत्येक रेस्टॉरंट मध्ये हा ट्रे दिसेल. एकाहून एक चविष्ट चटण्या असतात ह्या! पण ह्यातली पूड चटणी मात्र अतिरिक्त फॅट खायला नको म्हणून तेल किंवा तूपाशिवाय खायचा प्रयत्न करू नका. नाहीतर शिंक, ठसका, खोकला आणि गुदमरणे एका वेळी कसे होते त्याचा अनुभव येईल! हे छायाचित्र कुन्नूर - कोडई कनाल रोडवरील रेस्टॉरंटचे आहे.



 

रस्त्याच्या आजूबाजूला दिसणारे दृश्य असे होते!







सुमारे ६/७ तासांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर, संध्याकाळी आम्ही कोडाईकनालला पोहोचलो. कोडाईकनालचे सुप्रसिद्ध सुंदर धुके सगळीकडे पसरलेले होते. 

इथे मी छायाचित्रांची मालिका देते आहे. खोलीच्या खिडकीतून दिसणारे दृश्य, धुके असताना आणि नसताना तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्यप्रकाशाने धुके बाजूला सरले तेव्हा कसे होते त्याचे हे फोटो आहेत. ह्यावरून तुम्हाला धुक्याची कल्पना येईल. 









अप्पर लेक व्यू पॉईंट 

या ठिकाणाहून आपल्याला चांदणीच्या किंवा स्टारफिश च्या आकाराच्या कोडाई तलावाचे एक सुंदर दृश्य दिसू शकते. हा तलाव मानवनिर्मित आहे आणि कोडाईकनालचा मध्यबिंदू आहे. जेव्हा आपण प्रत्यक्ष तलावाला भेट देता तेव्हा तलावाचा आकार सहज लक्षात येत नाही. परंतु जेव्हा आपण अप्पर लेक व्ह्यू पॉइंट वरून पाहता तेव्हा तलावाचा चांदणीसारखा आकार लगेच लक्षात येतो. 











 मोईर पॉईंट 

कोडाईतील हे एक अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे. हे ठिकाण अप्पर लेक पॉईंटपासून कारने 15/20 मिनिटांच्या अंतरावर आहे. सर मोईर यांच्या स्मरणार्थ ह्या ठिकाणाला नाव दिले गेले आहे. त्यांनी १९२९ मध्ये हा रस्ता तयार केला होता. आपल्याला रस्त्याच्या उदघाटनाप्रीत्यर्थ उभारलेला एक स्तंभ बघायला मिळतो.

इथून दिसणारे दृश्य अक्षरशः मंत्रमुग्ध करणारे आहे. एक मनोरा उभारलेला आहे. तिथून आपण देखाव्याचा आणि त्या सुखद हवेचा आनंद घेऊ शकता. येथे एक लहान पार्क आहे आणि जवळपास काही छोटी दुकाने आहेत.












 
पाईन ट्री फॉरेस्ट

मोईर पॉईंटपासून, गाडीने सुमारे 15 मिनिटांच्या अंतरावर आणखी एक सुंदर ठिकाण आहे. त्याचे नाव पाईन ट्री फॉरेस्ट. ह्या परिसरात शेकडो उंचच उंच पाईनचे वृक्ष उभे आहेत. 

सगळा परिसर सुंदर आहेच. आपण आरामात फिरू शकता. जंगलात घोडेस्वारी आणि इतरही काही प्रकार मनोरंजनासाठी उपलब्ध आहेत. पण केवळ स्वतः च्या आनंदासाठी, जनावरांवर स्वार होऊन प्रवास करणे, मी निषिद्ध मानते त्यामुळे मी पायीच चालणे पसंत केले. 

ह्या जंगलात फिरणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. उंच भव्य झाडे इतकी उंच वाढत आहेत जणू आकाशाकडे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याला काही सांगावा देत आहेत. काय असेल ते मातीच्या पोटात शेकडो वर्षे दडलेले गुपित? ते ह्या झाडांनी कशाला सांगितले असेल का?

आपल्याला जमिनीवर पाईनची शंकूच्या आकाराची शेकडो फळे विखुरलेली दिसतात. पाईनच्या झाडाच्या खोडांवर काही प्रकारचे Lichen, म्हणजे आपण मसाल्यात दगडफूल वापरतो तसे, वाढलेले दिसते. 

झाडांच्या शेंड्यावरून आणि झाडांच्या मधून दिसणारे सूर्यकिरण खरोखर जादूई दिसतात. तिथे सगळे जगच वेगळे दिसते!! 

तिथल्या लोकांचे म्हणणे आहे की जंगलात काही प्रकारच्या वनस्पती आणि मशरूम आहेत, जे खाल्ल्यास आपल्याला निरनिराळे भास आणि भ्रम होतात. पण त्या वनस्पती न खाताही, फक्त उंच झाडांच्या मुकुटांकडे, सूर्याच्या किरणांकडे, जमिनीवर विखुरलेल्या शंकूच्या आकाराच्या फळांकडे आणि लांबच लांब खोडांच्या रांगांकडे पाहणे हे देखील आपल्याला दुसर्‍या जगात घेऊन जाण्यासाठी पुरेसे असते!!!





















मोडेन पण वाकणार नाही!




Lichen 




पाइन जंगलापासून सुमारे 10 मिनिटांच्या अंतरावर 'गुना लेणी' नावाचे आणखी एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. पूर्वी या जागेचे नाव 'डेविल्स किचन' असे होते. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गुना' या कमल हसन च्या चित्रपटाचे चित्रीकरण याच परिसरात करण्यात आले होते आणि तो चित्रपट अतिशय लोकप्रिय झाल्यामुळे ह्या जागेचे नाव गुना लेणी असे पडले. 

 घनदाट जंगलात, अतिशय उंच डोंगरमाथ्यावर तयार झालेल्या या गुहा आहेत. गुहा धोकादायक आहेत आणि अनेक हायकर्स गुहेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना मृत्यूमुखी पडल्यानंतर आता या लेण्या लोकांसाठी बंद केल्या आहेत. परंतु नुसते या ठिकाणी भेट देणे देखील थरारक आहे.

जुन्या शोला झाडाची मुळे जमिनीवर वाढलेली दिसतात. त्या मुळांच्यामुळे बनलेला चक्रव्यूह, ह्या ठिकाणाची उंची, शेजारची खोल दरी आणि धुके असे सगळे मिळून हे स्थान अगदी रहस्यमय बनवतात!



 













इथे जाताना थोड्या पायऱ्या आहेत आणि साधारण अर्धा एक किलोमीटर चालायला लागते प्रवेशद्वारापासून इथे पोचायला. मग नंतर इथे किती फिरलो ते कळत पण नाही!!

खरे तर ह्या गुहा थ्री पिलर पॉईंटच्या मागच्या बाजूला आहेत. इथून जवळच, गाडीने अगदी १० मिनिट अंतरावर थ्री पिलर रॉक्स व्यू पॉईंट आहे.


थ्री पिलर रॉक्स व्यू पॉईंट

भव्य, विशाल, अतिउंच, गगनचुंबी अशी सगळी विशेषणे लावू शकाल असे हे तीन प्रचंड मोठे खडक आहेत. ते खडक आणि लगतची खोल खोल दरी असे दृश्य कधी न विसरता येण्याजोगे आहे. 

साधारण चारशे फूट उंच असे हे खडक धुक्याच्या आवरणाने लपेटले जातात. क्षणार्धात जोरात वारा येतो आणि धुक्याला बाजूला करतो. पण धुके काही ऐकत नाही. वारा जरा बाजूला झाला की धुके परत येऊन हजर होते. हा खेळ किती वेळ बघावा आणि त्याचे किती फोटो काढावे? कितीही तास असेच जाउ शकतात. आपण मंत्रमुग्ध होऊन अशा नैसर्गिक चमत्कारांचे नवल करत राहतो. 


 












दिवसभर खूप उत्साहाने अनेक ठिकाणे बघितल्यावर थोडी विश्रांती तर हवीच. आम्ही ठरवले की चला, बोटीत बसून विश्रांती घेऊ या!

 हे तळे कोडाईकनाल चा केंद्रबिंदू आहे. म्हणजे सगळे अंतर मोजले जाते ते तळ्यापासून!! हे तळे आणि जवळचे ब्रायंट पार्क ही दोन्ही अतिशय लोकप्रिय ठिकाणे. 
तळ्याच्या भोवतीचा साधारण ५ किलोमीटरचा रस्ता, चालणारे, पळणारे, सायकलस्वार सगळ्यांचाच आवडता आहे. 

चांदणीच्या आकाराचे तळे, त्यातली निळी कमळे, धुक्याची शाल पाण्यावर आणि सुखद वारा अंगावर असे हे नौकानयन अगदी आनंदाचे आहे. 




















ब्रायंट पार्क 
सन १९०८ मध्ये या उद्यानाची आखणी करणाऱ्या वन अधिकाऱ्याच्या नावावरुन या उद्यानाचे नाव ठेवण्यात आले आहे. २० एकरांचा हा परिसर असून, त्यात विविध रंगांची फुले, फिरण्यासाठी सुंदर रस्ते, हिरवीगार लॉन आहे. जानेवारी 2019 मध्ये आम्ही कोडाईकनालला गेलो होतो तेव्हा उद्यानात काही दुरुस्तीचे काम चालू होते. उन्हाळ्यात पार्कमध्ये वार्षिक फ्लॉवर शो आयोजित केला जातो. बहुतेकदा मे महिन्यात असतो.






 सायलेंट व्हॅली 

 सायलेंट व्हॅली, कॅप्स पॉईंट, बेरीजाम तलाव इत्यादी ठिकाणांना भेट देण्यासाठी वन विभागाकडून विशेष परवानगी घेणे आवश्यक आहे. दररोज काही मोजक्याच वाहनांना वनक्षेत्रात प्रवेश करण्याची परवानगी आहे. म्हणून तेथे लवकर पोहोचणे चांगले आहे अन्यथा त्या रस्त्यावर, या भागात जाण्यासाठी थांबलेल्या वाहनांची लांबच रांग लागलेली असते.







मला हे आवडले की अभयारण्याच्या अधिकाऱ्यांनी लोकांना वनसाक्षर करण्यासाठी सर्व प्रयत्न केले आहेत. बेरीजाम तलावाच्या रस्त्यावर सायलेंट व्हॅली आहे. जर हवा स्वच्छ असेल तर आपल्याला खूप खोल दरी दिसेल. ते नक्कीच खूप सुंदर दृश्य असणार. मात्र आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा दरी धुक्याने भरलेली होती!








कॅप्स फ्लाय व्हॅली 

नावावरूनच लक्षात येईल की इथे खूप वारा असेल! हलक्या वजनाचे काहीही म्हणजे वाळके पान, टिश्यू पेपर, कॅप असे काहीही, तुम्ही दरीत फेकायचा प्रयत्न केला की बुमरँग सारखे ते परत तुमच्याकडे येते!




बेरीजाम लेक व्यू पॉईंट 

आता ही सगळ्याच पर्यटन स्थळांची खासियत आहे. ज्या तळ्याच्या जवळ आपण जाणार आहोत, तेच रस्त्यातून लांबून दाखवायचे! माहितीपत्रकात ठिकाणांची संख्या वाढवायला असे करतात की काय कोणास ठाऊक? पण इथून दिसणारे दृश्य सुंदरच होते त्यामुळे पर्यटकांची देखील काही तक्रार नसेल!





बेरीजाम तलाव

कोडाईकनाल जवळील काही शहरांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करणारा हा जलाशय आहे. तलावामध्ये बोटिंगला परवानगी नाही. हे प्रतिबंधित क्षेत्र असल्याने इथे सकाळी 9.30 ते संध्याकाळी 3.30 वाजेपर्यंतच प्रवेश करण्यास परवानगी आहे, तेही वनविभागाचा परवाना असेल तरच. 

हे वनक्षेत्र वनस्पती आणि प्राण्यांनी समृद्ध आहे आणि इथे काही दुर्मिळ औषधी वनस्पती देखील आढळतात. नैसर्गिक सौंदर्यासह, ह्या भागातील शांततेमुळे हे ठिकाण मन मोहवते. इथे नक्की भेट द्यावी असेच हे ठिकाण आहे. 

 प्रवेशद्वाराजवळ एक मंदिर आहे. वनक्षेत्रात संधी मिळालीच तर, आपण काही वन्य प्राणी पाहू शकता. या प्रदेशाचे वैशिष्ट्य असलेल्या निळ्या लिली ह्या तलावात भरपूर प्रमाणात आहेत.























संरक्षित क्षेत्राच्या बाहेर येऊन आता कोडाईकनाल शहरात परत जाउ या! 

कोकर्स वॉक 

हे कोडाईकनालमधील एक लोकप्रिय आकर्षण आहे. हा एक किंवा दीड किमीचा एक छोटा रस्ता आहे. कोडाई तलावाच्या अगदी जवळ हे ठिकाण आहे.
हा रस्ता पर्वत आणि दऱ्यांनी वेढलेला आहे आणि इथून अतिशय सुंदर दृश्य दिसते. हे ठिकाण पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि त्यामुळे बर्‍याच वेळा इथे गर्दी असते. पण दरीच्या बाजूला चांगले कुंपण केलेले आहे, त्यामुळे रस्ता तसा धोकादायक नाही. रस्त्याच्या कडेला काही विक्रेतेही छोटी दुकाने थाटून बसलेले आहेत. 

कोकर्स वॉक जवळच्या डोंगरउतारावर कुरिंजीची फुले दिसतात. ज्यांना कुरींजी फुले माहित नाहीत, त्यांच्यासाठी सांगते की , नीलगिरी पर्वताला हे नाव आणि निळा रंग देणारी ही फुले आहेत. नील - निळा आहे तो कुरींजीच्या निळ्या रंगामुळे आहे. ही फुले नीलगिरी पर्वताच्या उतारावर 12 वर्षानंतर एकदा फुलतात आणि संपूर्ण पर्वतरांगा निळ्या करतात! 

आम्ही अगदी थोडक्यात ह्या सुंदर दृश्याला मुकलो. 2018 मध्ये, कुरिंजीची फुले ऑगस्ट ते डिसेंबर या महिन्यात फुलली. या कुरिंजी फुलण्याचा उल्लेख पंतप्रधान मा. मोदीजी ह्यांनी त्यांच्या 'मन की बात' मधे देखील केला! असो. आता २०३० ची वाट पाहू या!

जरी आम्ही संपूर्ण फुलोरा बघण्याचा आनंद गमावला होता, तरी आम्हाला काही उशीरा फुलणारी फुले मात्र बघायला मिळाली. पण दुर्दैवाने माझ्याकडे कुरिंजी फुलांचा एकही फोटो नाही. का? का म्हणून काय विचारता? त्याच कोडाईकनालच्या प्रसिद्ध आणि सुंदर धुक्यामुळे. 

बर्‍याच वेळा असे घडते की अवघ्या काही मिनिटांत, दरी धुक्याने भरुन जाते आणि समोरचे काहीही दिसत नाही. जेव्हा आम्ही कोकर वॉक ला चालत होतो तेव्हा आम्हालाही त्याचा आनंद घेता आला.

असे म्हटले जाते की कधीकधी आपण या रस्त्यावर चालत असताना एक अभूतपूर्व दृश्य दिसू शकते. आपल्याभोवती इंद्रधनुष्याचे वलय असलेली आपली छाया ढगांवर उमटलेली आपण पाहू शकतो. आम्ही मात्र इतके भाग्यवान नव्हतो!!











Peach blossom 




Coakers Walk



कोडईकनालमध्ये बघण्याजोगी आणखीही काही ठिकाणे आहेत. तेथे जवळच काही सुंदर धबधबे आहेत. वेधशाळा, संग्रहालये, मंदिरे, ट्रेकिंग, फन पार्क, वॅक्स म्युझियम असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आपण आपल्या आवडीनुसार आणि वेळेच्या उपलब्धतेनुसार त्यास भेट देऊ शकता. 

कोडाईकनालमध्ये शाकाहारी भोजन मिळविणे ही काही मोठी समस्या नाही. आपल्याला दक्षिण भारतीय शाकाहारी चविष्ट पदार्थ मिळू शकतात. शहरातील तलावाच्या परिसरात, आपल्याला बरीच शाकाहारी रेस्टॉरंट्स सापडतील. 

 कोडाईकनालमध्ये राहण्यासाठी, खूप पर्याय उपलब्ध आहेत. आम्ही 'ल पोशे क्लब महिंद्रा' येथे थांबलो होतो. यामध्ये विस्तृत जागा आहे आणि सुंदर लँडस्केप केलेले आहे. एकूणच, एक चांगली देखभाल केलेली अशी ही सुविधा आहे. परंतु आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक असल्यास, ज्यांना चालायला त्रास होतो असे, तर त्यानुसार खोल्या निवडा. खूप मोठे आवार असल्याने आणि अनेकदा वरखाली चढणाऱ्या उतरणाऱ्या पायऱ्या असल्याने त्यांना त्रास होऊ शकतो. काही खोल्या आहेत, ज्या समतल भागात आहेत. त्या निवडाव्या लागतील. आम्ही मात्र ह्या ठिकाणी राहण्याचा पुरेपूर आनंद घेतला होता.










 

तुम्ही पुरेसे आधी सांगितले तर, ते तुम्हाला तुमच्या आवश्यकतेप्रमाणे अन्न तयार करून द्यायचा नक्की प्रयत्न करतात. आम्हाला त्यांनी खूप चविष्ट विगन अन्न आणि पक्वान्ने करून दिली होती.

कोडाई कनाल ला वेगवेगळी उत्तम फळफळावळ पिकते. ही प्लेट पण तुम्हाला तेच सांगते आहे बघा! 






चला! आता घरी जायची वेळ झाली! आम्ही कोईमतूरपर्यंत कारने आलो आणि मग तिथून मुंबईचे विमान घेतले. कोडाई पासून कोईमतूरला जाणारा रस्ता तर चांगला आहेच, आजूबाजूला दिसणारे दृश्य देखील सुंदर आहे! 







 #ClubMahindra #KurinjiThe NeelgiriFlower # Mankibaat #GunaCaves #PlacesToVisitInKodaikanal #KodaiKanalInTwoDays. 





Comments

  1. छान! कोडाईकॅनाल बघताना छान वाटतच पण या प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उज्वल अशा लेखामुळे आणखी छान वाटले

    ReplyDelete
  2. खूप सुंदर फोटो आहेत, त्यामुळे सहल सुंदर होऊन जाते

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

महेश्वर

महेश्वर हे मध्यप्रदेश पर्यटन निगमच्या पर्यटन स्थळांमधले एक महत्वाचे नाव आहे. पण करोडो भारतीयांसाठी ते केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर एक तीर्थस्थान असते. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेले स्थान आहे.  महेश्वर किल्ला प्रवेशद्वार  राजवाडा प्रवेशद्वार  बाह्यरूप  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  राजवाडा प्रवेशद्वार  अहिल्याबाई होळकर हे केवळ भारताच्याच नव्हे तर विश्वाच्या इतिहासातील एक सोनेरी पान. संपूर्ण मानव विश्वातील यशस्वी स्त्री राज्यकर्त्यांची सूची करायची झाली तर अहिल्याबाई होळकरांचे नाव ठळकपणे लिहायला लागेल.   31 मे 2025 ला त्यांची तीनशेवी जयंती आहे. पण 300 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या अहिल्याबाईंचे आयुष्य अगदी आजच्या आधुनिक काळातल्या आव्हानातही मार्गदर्शक ठरावे असेच आहे.  त्यांच्याविषयीचा आदर मनात घेऊनच आपण महेश्वरला जातो आणि त्या भावनेच्या प्रकाशात महेश्वर पाहतो. महेश्वरला फार मोठी प्राचीन परंपरा आहे. स्कंद पुराणाच्या रेवा खंडात आणि वायू पुराणाच्या नर्मदा रहस्य मध्ये महिष्मती म्हणजे महेश्वरचे वर्णन आलेले आहे. 'गुप्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

Prashanti Kutiram, Bangalore

I am happy to write my first post of 2022!! I am here with a really very special post! This is not a tourist place and still it holds a special place in each and every visitor’s mind. This is Prashanti Kutiram of Bangalore. Prashanti kutiram as the name suggests, surely makes your mind peaceful. It's around 70-80 kms from Bangalore airport but with the famous traffic jams of Bangalore, it may take two and half hours by taxi.  This is the place where The Swami Vivekananda Yoga Anusandhan Sansthan is situated on a sprawling 100 acres. Swami Vivekanand  Swami Vivekanand  Ramakrishna Paramahans and Sharada Mataji  SVyasa Founded in 1986, Svyasa follows Swami Vivekanand's teachings and combines best of east and West. So it combines Yoga and spirituality with modern sciences.  The first thing you will notice about Vyasa is the greenery. The campus is having umpteen trees. It's hilly area. The steep paths and slopes offer you the much needed exercise!! The Green Umbre...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...